Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : जून २०१९

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/05/2019 - 09:43
🗣 126 प्रतिसाद
जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 72294 views

🗣 चर्चा (126)
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/05/2019 - 13:35 नवीन
In rare move, Pakistan military agrees to budget cut amid economic woes पाकिस्तानची आर्थिक हालत इतकी खस्ता झाली आहे की, कधी नव्हे ते पाकिस्तानी सैन्याने या वर्षीचे बजेट स्वतःहून कमी करून घेतले आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 06/05/2019 - 15:54 नवीन
स्वतःहुन पाकिस्तान ने सैन्याचे बजेट कमी केलेले नसणार , या निर्णयाच्या पाठीमागे जागतिक बैंके ची अट सुद्धा असू शकते .
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 06/05/2019 - 16:03 नवीन
मिलट्रि खर्च कमी करण्यासाठी.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 06/05/2019 - 16:40 नवीन
जानते राजे त्या दिवशी दिल्हि मध्ये असून सुद्धा मोदींच्या शपथविधि ला हजर राहिले नाही कारण क़ाय तर पाचव्या रांगेत त स्थान देवून अपमान केला गेला . पण आज राष्ट्रपती भवनातून पत्रक प्रसिद्ध करून ठामपणे सांगण्यात आले कि जाणत्या राजा ला पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते . याचा अर्थ सरळ आहे की राष्ट्रपती भवन धडधडित खोट बोलत आहे , कारण उभ्या हयातीति आमचे राजे खोटे कधी बोलले नाहीत , यू टर्न कधीच नाही :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 06/05/2019 - 17:52 नवीन
दिल्लीवाल्यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की पहिल्या पहिल्या रांगेच्या प्रवेशिकेवर रांग क्रमांक V ( इंग्रजी अक्षर व्ही) असे छापले होते जी पहिली रांग होती ( V= व्हीआयपी असे असेल कदाचित) जा. राजांनी असा समज करून घेतला कि रोमन V हा आकडा म्हणजे पाचवी रांग आहे. अपमान केलाय आपला. अनुपस्थित राहिले. स्पष्टीकरणाचा तर्क पटण्या सारखा आहे. बघा याचं पुरावा उत्खनन करून काही मांडता येते का ! (हे जा. राजा म्हणजे अर्धवट विधानं करून गुल्लाड होतात. ठामपणे राग ही व्यक्त करत नाहीत, ईव्हीएम आरोपांचं पण तसंच, पुरावा देत नाहीत नुसतंच गुगली टाकत राहायचं ... मग अश्यांन मतदारांना विश्वासाहर्ता वाटत नाही ना ... अन मग निवडणुकीत मतदारही गुगली टाकतात, त्यांच्या नातवाला सुद्धा घरी बसवतात !)
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 06/05/2019 - 18:25 नवीन
पुत्री च्या भविष्या मुळे उलट सुलट विधाने करत असतील दूसरे काय ? पण प्रधानानीं पुत्र प्रेमापोटी वेळो वेळी राजाला धोबी पछाड़ दिली आणि हे तमाम जनते ने बघितले .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/06/2019 - 07:26 नवीन
इ व्ही एमचं "अवघड जागी (गुप्त) दुखणं आणि गावातला एकमेव डॉक्टर जावई" अशी स्थिती झाली आहे. इ व्ही एम घोटाळा म्हटलं तर श्रीमती सुप्रिया सुळे कशा निवडून आल्या? आणि बरोबर म्हटलं तर पार्थ पवार कसे पडले? म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 06/06/2019 - 07:39 नवीन
केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपाने, शिवसेनेला पुन्हा एकदा 'अवजड उद्योग मंत्रालय' देऊन त्यांची बोळवण केली आहे. आता आणखी एक मंत्रीपदासाठी सेनेने भाजपाकडे तकादा लावला आहे. जर भाजपाने आणखी एक मंत्रीपद शिवसेनेला न दिल्यास, गेली पाच वर्षे सांभाळून ठेवलेले खिशातले राजीनामे आता तरी बाहेर येतील का ? . . . मला वाटते, ह्या अवजड उद्योग मंत्रालयाची निर्मीती खास शिवसेनेकरताच करण्यात आली आहे. :))
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/06/2019 - 10:33 नवीन
मोदी सरकार जोमाने कामाला लागलेले आहे. मजेची गोष्ट म्हणजे मिडीया मध्ये बर्याच लोकांना सशक्त विरोधी पक्षाची गरज वाटत आहे. पण सशक्त विरोधी पक्ष नेमक कोण हे सांगायला कोणीही पुढे येत नाही. अर्बन नक्षल ध्रुव राठी याने एक वेगळच तर्कट दिल होत. काँग्रेसला आता सुद्धा विरोधी पक्ष बनण्यासाठी २ सीट कमी पडत आहेत. एन डी ए सरकारने तरी सुद्धा काँग्रेसल विरोधी पक्ष म्हणुन मान्यता दिली पाहिजे. कारण आपने जेंव्हा दिल्ली मध्ये ७० पैकी ६७ जागा पटकावल्या तेंव्हा फक्त ३ जागा भाजपाला मिळालेल्या तरी सुद्धा भाजपाला विरोधी पक्ष म्हणुन मान्यता दिली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/07/2019 - 08:57 नवीन
विरोधी पक्ष नेता हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याला स्वतंत्र पगार आणि इत्तर भत्ते आणि सरकारी सोयी दिल्या जातात. त्यासाठी विरोधी पक्षाकडे लोकसभेत कमीत कमी ५५ जागा पाहिजेत. त्या नसतील तर असे पद देणे हे बेकायदेशीर आहे. म्हणून हे पद अतिरिक्त / तद अर्थ -AD HOC (विना आर्थिक लाभ) दिले जाऊ शकते उगाच कोणी उपटसूंभ म्हणतो म्हणून पद देणे हे चुक ठरेल
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 06/06/2019 - 10:36 नवीन
मनेका गांधींना मंत्रीमंडळाच्या बाहेर ठेवण्यामागे काय कारण असावे ? काहींच्या मते लोकसभा स्पिकर म्हणुन नेमणुक होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 06/06/2019 - 11:32 नवीन
हस्तर धाग्यांवर धागे काढतच आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 06/10/2019 - 12:12 नवीन
कुठे?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 06/08/2019 - 09:10 नवीन
काल वायनाड मध्ये रागानीं " नफरत को हम प्यार से जवाब देंगे " असे सांगितले . हे वाक्य त्यांनी जनते ला की भाजप ला उद्देशुन केले हे नाही . देशातील मतदार काँग्रेस बरोबर नफरत करतात हे त्यांनी मान्य केले , असा आपण समज केला की मग आता फक्त नफरत का करतात याचा एकदा शोध घेतला की काँग्रेस पवित्र झाली अस समजायच का ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 06/08/2019 - 09:25 नवीन
काळा ने राकॉ वर चाबुक ओढला .... ज्या संघाची चड्डि वरुन आयुष्य भर हेटाळनी केली त्या संघाच्या कार्यपद्धति चा अभ्यास कार्यकर्त्यांना करायला सांगण्याची वेळ राकॉ च्या सुप्रीमो वर आली .........
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 08:20 नवीन
सकाळची वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत, संघ कार्यकर्त्यांची बरिच वर्दळ सुरु होती. इतक्यात एक आलिशान फॉर्चुनर गाडी ब्रेक करकचून दाबर शाखेच्या दारावर थांबते. गाडीतून दोन-तीन बाऊंनसर टाईप लोक खाली उतरतात व थोडा वेळ थांबून गाडीचा दरवाजा उघडतात. संपूर्ण पांढरा सदरा, पॅंट, पायत सफेद चपला व डोळ्याला रेबॉनचा गॉगल लावलेला एक इसम गाडीतून बाहेर उतरतो. -- तोंडात भरलेला पानाचा तोबरा एका कोपर्‍यात रिकामा करत, समोर धावपळ करणार्‍या संघ स्वंयसेवकांना तो म्हणाला 'इथ ती चिकाटी- बिकाटी कुठ शिकवली जाते'? आमचा नेता म्हणला की जाऊन संघ स्वंयसेवकांकडून चिकाटी शिका, म्हनुन आलोय, क्लासचे पैशे कुणीकडे भरायचे ? -- फेसबुक वरुन ;
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 06/09/2019 - 09:27 नवीन
जबरदस्त, एकच नंबर किस्सा. मीपण मीपण , सायंशाखेवर ची वर्दळ आताशा कुठे ओसरत आली होती, त्या पॉश उपनगरातील तिनचारशे शिशु आणि कुमार स्वयंसेवकांचा देशभक्तीपर आरव वातावरणाला कसा रोमांचित करून गेला होता. इतक्यात जोरात ब्रेक दाबत एक हिरवट पिवळ्या रंगाची दणकट जीप धूळ उडवत थांबली. आपल्या मजबूत बुटांचा जोरकस आवाज करत तीनचार काटक जवान सावधान अवस्थेत उभे झाले. गर्द हिरव्या रंगाचा कडक गणवेश घातलेला एक अधिकारी ताडताड पावले टाकत सायंशाखेच्या शिक्षकासमोर उभा राहिला. विनम्रतेने हात जोडून तो विनंती करता झाला. " ते ध्वजारोहणाची पद्धत आणि ध्वज प्रणाम म्हणजे काय असते? कुठे आणि किती दिवसात शिकवतात ते?" . बहुतेक कुठूनतरी साभार.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 09:51 नवीन
अभ्या सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते दिसता. __ तुमच्या भावना दुखावल्या बद्दल माफी.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 06/09/2019 - 09:52 नवीन
मागतो.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 06/09/2019 - 10:05 नवीन
अरे, आपल्या आपल्यात काय माफी? मी संघाचाच, सहा वर्षे शाखा, एक ओटीसी, मग अभाविप, आधी कार्यालय मंत्री, मग शहरमंत्री. एक वर्ष पूर्णवेळ, दोन अधिवेशने, तीस चाळीस आंदोलने, पाच अटका. त्यानंतर भाजपा, परिवारातील प्रकाशनात काम, त्यासोबत भरपूर जबाबदार्या. . चेक करून पाहा वाटल्यास. गरज असेल देऊ का रेफरणसेस? . आपण?
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Mon, 06/10/2019 - 12:14 नवीन
IT milan?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 06/09/2019 - 16:15 नवीन
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही . त्यामुळे आयुष्यभर संघाला हिणवणाऱ्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांनां संघाची महत्ती सांगताना लाज वाटली नसेल का ? तरी बर आहे या वेळेस महाराष्ट्रात तरी भाजप ला मतदान घड़ऊन आणण्यासाठी संघाला धावपळ करण्याची गरज भासली नाही .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 06/09/2019 - 19:42 नवीन
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही अर्धा भाग अगदी परफेक्ट, पूर असो की भुकंप, अवर्षण असो की अतिवर्षा, युध्द असो की दंगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामान्य जनतेस अनेकदा मदतीचा हात दिला आहे आणि त्या मदतीतील शिस्त, निर्व्याजपणा, अचुकता आणि सेवाभाव निष्चितच वाखाणण्याजोगा आहे आणि वेळोवेळी त्याचे कौतुक होत आलेले आहे. मुलतः भारतीय मानसिकता अशा संकटाच्या वेळी भांबावुन जाण्याची जास्त आहे. आपत्ती व्यवस्थापन हा विषयच मुळी आजकाल गंभीरपणे घेतला जातोय. पूर्वीपासून एखादी दुर्घटना घडली की सैरावैरा पळणे, कशाचा पायपोस कशात नसणे, कुणी मदत जरी केली तरी ती अव्यवस्थितपणे, बेशिस्त, असमान पध्दतीने वाटली जाणे, वैद्यकीय मदत ही विस्कळीत स्वरुपाची असणे अशाच पध्दतीने हाताळली जाई. सिस्टिमॅटिकली मदत करण्यात प्रथम क्रमांक जाई सैन्यदलाला. कडवी शिस्त, प्लानिंग करुन हुकुमानुसार सर्व अनुयायांनी आचरण करणे, परिस्थितीची, सुखसोयीची तमा न बाळगता युध्दपातळीवर मदत करणे आणि बरीचशी साधने(डॉक्टर्स, यंत्रसामग्री, दळणवळण, पैसा) हाताशी असलेने सैन्यदल अशा परिस्थितीत कायमच प्रभावी ठरलेले आहे. सैन्याच्या ह्या काही गुणांचा समावेश संघाच्या मदतकार्यातदेखील आहे. त्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक करावेच लागेल पण ह्या कार्यापाठीमागे बर्‍याच गोष्टी असतात. संघाचे शहरी उच्च्शिक्षित भागात असलेल्या कार्यामुळे डॉक्टर्स वगैरे लोकांचा समावेश अशा मदतकार्यात नेहमीच राहिला आहे. सोबतच बर्‍याच संघविचारांच्या कार्य्कर्त्यांचे समाजात असलेले निरपेक्ष कार्यकर्ता म्हणून असलेले वजन उपयोगी पडलेले आहे. हे लोक अपहार करणार नाहीत ह्याची खात्री असलेने समाजाने पण वेळोवेळी संघाच्या पाठिमागे मदतीचा हात ठेवलेला आहे. बर्‍याच गावी संघविचाराने स्थापन केलेल्या ब्लड बँका, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पतसंस्था, बँका आदि संस्था अशा वेळी पूर्ण ताकदीने उभ्या राहिलेल्या आहेत. ह्याउलट इतर पक्षांची स्थिती आहे. संघातून जसा भाजपाचा जन्म आहे आणि संघाचा कार्याचा वारसा आहे तसा इतर पक्षांचा नाहिये. त्यामुळे संघ करतो आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस करत नाही अशी तुलनाच चुकीची आहे. काँग्रेस म्हणा कि इतर पक्ष म्हणा त्यांचे कार्यकर्त्यांचे स्वरुप निराळे आहे. त्यांची मदतीची आणि ती शिस्तबध्दपणे करण्याची पध्दत नाहीच आहे. तशी तुलनाच करायची असेल तर आजच्या भाजपाची आणि काँग्रेसची मदतीची करावी. म्हनजेच राजकीय पक्षाची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची करावी. दुर्घटनेतच नव्हे तर इतर बर्‍याच ठिकाणी म्हणजे देवस्थाने, सण समारंभ, गर्दीचि ठिकाने, समाजातील काही छोट्यामोठ्या गोष्टी अशात मदत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करत असतात पण ते एक्जिनसी संघटनेची मदत ह्या स्वरुपात दिसत नसते. कित्येक सामाजिक कार्यकर्ते मग बाबा आमटे असोत की डॉ बंग दंपती असोत, राजकीय अजेंडा न ठेवता राबत असतात, शिवसेनेसारखे पक्ष आनि त्यांचे शिवसैनिक कित्येक दुर्घटनामध्ये, अपघातांमध्ये स्वतःच्या खिशाला खार लावून नागरिकांना मदत करतात अशी कित्येक उदाहरणे आहेत. घरगुती किंवा लोकल आणिबाणीच्या प्रसंगीही ते सगळ्यात आधी धावत येतात. अशा दुर्घटनामध्ये त्यांनीही प्रचंड मदत निरपेक्ष स्वरुपात केलेली असते. शिरडी, तिरुपतीसारखी कित्येक श्रीमंत देवस्थाने, निरंकार बाबा, ब्रह्माकुमारी, पुट्टपर्ती साईबाबासारखी विवाद्य संतस्थानेही अशा वेळी प्रचंड मोठ्या स्वरुपात मदत उभी करतात. अगदी किल्लारी भुकंपातदेखील जिथे संघाचे कौतुक झाले तिथेच सेवादलानेही भरपूर काम केले. एक्सप्रेस ग्रुपला बांधून घेउन भुकंपात आईवडील गमावलेल्या मुलांसाठी खूप मोठी निवासी शाळा आपले घर ह्या नावाने चालु केली. ती अजुनही चालु आहे. टाटा सोशल सायन्सचे काम त्या काळात उभे राहिले. लॉरी बेकरसारखे अभियंता आणि स्थापत्यविषारदांच्या शिष्यमंडळींनी भुकंपरोधक घरे बांधायला मदत केली. परदेशातून मदत मिळवायला शरद पवारांनीही भरपूर प्रयत्न केले, समाजाच्या सर्व थरात मदत करायची भावना असतेच. फक्त पध्दत वेगवेगळी असते. राजकारणी पक्षांनी किती आणि कशी मदत केली हा चर्चेचा किंवा हिणवण्याचा विषय होऊन नये असे वाटते. तेथील लोकप्रतिनिधींनी अवश्य काम केलेच पाहिजे पण कुणा पक्षांने ते काम केलेच नाही असे कधीच नसते. मदतीच्या कार्यात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक, संस्था जे जीव तोडून मेहनत करतात ते कौतुकास्पद आहे पण त्या मदतीची अशी जाहिरात करुन किंवा मनानेच किस्से लिहुन त्याची किंमत कमी करु नका इतकी प्रार्थना. त्याचा कुणास हिणवण्यासाठी वापर करु नये असे मनापासून वाटते. धन्यवाद
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 06/10/2019 - 07:26 नवीन
संपूर्णपणे सहमत. दुर्घटनेच्या वेळी सर्व संघटना मदत करत असतात. फरक कुठे नेमका पडलाय ते सांगतो. सर्व माध्यमे नेहमीच आतापर्यंत संघाला जातीयवादी आणि विशेषतः ब्राह्मणी संघटना म्हणून प्रसिद्धी देतात. पण प्रत्यक्ष संघाचे on field काम पाहताना तसे काही दिसत नाही. म्हणजे संघाने कधी आपत्तीमध्ये हा मुसलमान आहे म्हणून कोणाला मदत नाकारल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे जेव्हा आपत्ती येते तेव्हा तिथले सेवाकार्य पाहून लोकांची संघाबद्दलची उत्सुकता चालवली जाते, कारण ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष पाहणे यात फरक पडतो तेव्हा ऐकवणाऱ्या माणसावरचा विश्वास उडतो. दुसरी गोष्ट जाहिरातीची - प्रत्येक संस्थेची कार्यपद्धती वेगळी असते. माझया माहितीत कोणीही इतरांचे कार्य कमी लेखल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना आपत्तीमध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था उत्तम समन्वयाने काम करत असतात. पण संघाने जर या कामाचा वापर आपल्यावरचे जातीयवादी लेबल हटवण्यासाठी केला तर त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेही संघाचा मूळ उद्देश सेवाकार्य हा नाही, संघटन हा आहे. सेवाकार्य असते तर मग एखादी NGO उघडता आली असती. पण तसे संघाने केले नाही, कारण ते सेवाकार्यापूरते मर्यादित नाही. सेवाकार्य हा संघाच्या कार्याचा एक भाग आहे. आणि त्याची जाहिरात करून ते मूल हेतू, जो आहे संघटन करणे, तो सध्या करू पाहतात. मला तरी यात काही चुकीचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/10/2019 - 07:52 नवीन
रा स्व संघाची ७० वर्षे जाणीवपूर्वक केलेली बदनामी आणि अपप्रचार यातून लोकांना सत्य स्थिती काय आहे हे समजावणे हा संघाचा एक हेतू काही वर्षांपासून झाला आहे. हि बदनामी कशी असते ते पहा. अगदी सुरुवातीपासून उदाहरण द्यायचे झाले तर नथुराम गोडसे हे पूर्वी संघात जात असत त्यावरून संघाला गांधीवधात गोवण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला गेला. यानंतर सुद्धा एखादा पूर्व संघ स्वयंसेवक एखाद्या गुन्ह्यात अडकला असेल तर "संघाचा स्वयंसेवक गुन्हेगार" अशी मोठा मथळा असलेली बातमी येते. अशी बातमी पूर्वीचा काँग्रेसी, समाजवादी किंवा कम्युनिस्टांबद्दल आलेली क्वचितच दिसते. सर्व प्रचार माध्यमे त्यांच्या ताब्यात असल्यामुळे इतकी वर्षे केलेला अपप्रचार लोकांच्या लक्षात येत नसे परंतु आता सार्वजनिक न्यासावर सत्य फार पटकन उपलब्ध होत असल्याने "पत्रदलाल अन पत्रवारांगनांचे" पितळ उघडे पडत चालले आहे. यात कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांना संघाबद्दल वाटत असलेला द्वेष कारणीभूत आहेच. त्यांनी पण "राष्ट्र सेवा दल" सारख्या संघटना काढल्या होत्या पण त्या चालल्या नाहीत ( याची कारणे वेगवेगळी आहेत). आता रास्व संघ जर आपला प्रचार करत असेल तर त्यात गैर काय आहे? श्री प्रकाश आमटे सुद्धा आपल्या अत्युच्च कार्याला देणग्या मिळवण्यासाठी कार्यक्रम आणि प्रसिद्धी करतच असतात. शेवटी राम कृपे बरोबर दामकृपा पण तितकीच महत्त्वाची
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/10/2019 - 08:26 नवीन
१०० % सहमत !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 06/10/2019 - 13:03 नवीन
बाकी समाजकार्यात तुलना करु नये या मताचा मी पण आहे , पण अगदी ठरवून काँग्रेस च्या लोकांनी संघावर केलेले हल्ले आठवल्या वर चीड येते . त्याच प्रमाणे तुम्ही उल्लेखलेल्या सर्व संघटना ( काँग्रेस व रा कॉ वगळून ) निर्व्याजपणे समाजसेवा करतात आणि त्याबद्दल सर्वसमाजा कडून या संघटना चे वेळो वेळी कौतुक केले गेले , पण संघा च्या वाटेला फक्त भाजप व्यतिरिक्त पक्षांकडून व समाजातील इतर घटकाकडून अवहेलनाच आली . अस क़ाय पाप केलय संघाने की काँग्रेस सह पक्ष व तथाकथित पुरोगामी हे सगळे एकत्र येवून धोपटत बसतात !!!!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 06/10/2019 - 14:29 नवीन
संघ नेहमीच हिंदुच्या हिताचे बघतो. संघ भगव्या रंगाला प्राधान्य देतो. संघाची प्रार्थना संस्कृतमधे आहे. आपत्तीकाळात मदत करताना संघ ड्रेसकोडमधे असतो. त्यामुळे होते क़ाय की संकटात असलेल्या समुदायाला संघाचे कार्य उठून दिसते. हेच काम पोस्टर व बैनर लावून पण साध्य होत नाही. भाजपमधील बहुसंख्य नेते हे संघाच्या मुशितून आलेले असतात. त्यामुळे भाजपविरोधक नेहमीच संघाच्या विरोधात असतात. अनेक वेळा बंदीची भाषा करुनदेखिल संघ नव्या उमेदिने पुढे येतो. आता हे सर्व मुद्दे आल्यावर सर्वधर्मसमभाववाले, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाले, शांतिप्रिय समाजवाले, धर्मांतरण करून पोटाची खळगी भरणारे यांच्या पोटात दुखणारच ना?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 06/10/2019 - 08:46 नवीन
संघातील मंडळीनी नैसर्गिक संकटा मध्ये जात धर्म न पाहता सामान्य जनतेस खुप वेळा मदती चा हात दिला हे सर्वानां माहित आहे , पण अशा प्रकारे निर्व्याज मनाने जनसेवा करणारी संघटना काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये नाही . रा स्व संघासारखी संस्था भारतात आहे हेच आपले भाग्य आहे. अन्यथा मदतीच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय एन जी ओ करोडो रुपये गोळा करतात, आपल्या आंतरराष्ट्रीय एन जी ओ स्टेटसच्या दबावा खाली लोकल प्रशासनाला मदत कार्यासाठी एकाधीकार मागतात मग जमवलेल्या पैश्याने धर्म परिवर्तन करतात, चर्च बांधतात. अशी अनेक उदाहरणे भारतात घडलेली आहेत. लोकल प्रशासन त्यावेळेला मुग गप्प बसते. सुनामि च्या वेळेला तामिळनाडु सरकारने भारतातल्या इतर सेवाभावी संस्थांना मदत कार्यासाठी परवानगी नाकारली. ती परवानगी त्यांनी वर्ल्ड व्हीजन नावाच्या अमेरीकेतल्या एन जी ओ ला दिली. हिंदुंचे मास धर्म परिवर्तन करण्याची ख्रीश्चन एन जी ओ वर्ल्ड व्हीजनला ही एक मोठी संधी हाती आली आणी त्यांनी त्याचा खुप फायदा करुन घेतला. सुनामीत घर गेलेल्यांना घर देण्याएवजी चर्च बांधुन देण्याची अजब मदत केली गेली. ह्या सर्वांच्या मागे तिथले करुणानिधी सरकार होते. "REMEMBER THIS! I spent months in the tsunami in Nagapatinam district of TN funding Swami Dayananda Saraswati's projects & made documentary. Christian NGOs led by World Vision announced it was a great opportunity to convert. Many Hindus forced to convert. " Rajiv Malhotra Tsunami: The Untold Story by Rajiv Malhotra, 2005 https://youtu.be/MOkWSa69NKA ‏
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 06/11/2019 - 16:40 नवीन
सुप्रिम कोर्टाचा भेदभाव पुर्ण व्यवहार !! प्रशांत कनौजीया नावाच्या तद्दन हलकट पुर्व पत्रकाराने उ प्र चे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या विरुद्ध ट्विटर वर अपमानकारक वाक्य लिहील, त्यावरुन प्रशांत कनौजीया याला तुरुंगात टाकलेले होते. ह्यामुळे डाव्या पत्रकारांना त्रास झाला व त्यांनी प्रदर्शने केली त्याची दखल घेत सुप्रिम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली उ प्र सरकारला प्रशांत कनौजीयाला ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले. ह्यावेळी सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी आहे. ह्याच सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी यांचे काही दिवसापुर्वीचे वर्तन बघा !! ममता बॅनर्जीवर दुसर्याने तयार केलेला मीम फेसबुकवर शेअर केला व त्यामुळे मु मं ममता बॅनर्जीचा अपमान झाला म्हणुन भाजपाच्या उमेदवार प्रतिक्षा शर्माला तुरुंगात टाकले ! ह्यावर सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली ! सुप्रिम कोर्टाचे जज एकाच टाईपच्या केसमध्ये दोन वेगवेगळा न्याय देउन नविन पायंडा पाडत आहे !! भाजपाच्या विरुद्ध काम करण्यात सुप्रिम कोर्टाचे जज सुद्धा मागे नाही हे दाखवत आहे !!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 06/11/2019 - 17:24 नवीन
डँबिस००७, सही पकडे है. माझ्या मते इंदिरा जयसिंग ,तिस्ता सेटलवाड, प्रशांत भूषण वगैरे पुरोगामींचं खरं उद्दिष्ट भारतीय न्यायव्यवस्थेविषयी अविश्वास उत्पन्न करून तिचं खच्चीकरण करणं हे आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 06/11/2019 - 17:26 नवीन
सुप्रिम कोर्टाचे जज सुश्रि ईंदिरा बॅनर्जी ह्यांनी प्रतिक्षा शर्माला मु मं ममता बॅनर्जींचा बिनशर्त माफी मागायला लावली ! -- - मी वर्तमान पत्रात वाचल्याप्रमाणे, सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते. मात्र नंतर शर्मा यांच्या वकिलांने ' माफि मागणे हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे' असा युक्तिवाद कोर्टासमोर केल्यानंतर, कोर्टाने प्रतिक्षा शर्मा यांनी माफी मागावी ही शिक्षा काढून टाकली होती.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 06/11/2019 - 18:13 नवीन
सुरुवातीला कोर्टाने, प्रतिक्षा शर्मा यांना ममता बॅनर्जी यांची बिनशर्त माफी मागायला सांगितले होते नंतर काय केले त्याने काय फरक पडतो ? पण त्याच बरोबर आता उ प्र सरकारला ताबडतोड प्रशाम्त कनौजीया ला सोडायला सांगीतलेच की पुर्वीच्या केस मध्ये प बंगाल सरकारला सांगीतले नव्हते !!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/12/2019 - 03:15 नवीन
२०११ ते २०१७ पर्यंत भारताचा जीडीपी ७% नव्हे तर ४.५% नी वाढला दरवर्षी असा रिसर्च पेपर श्री. अरविंद सुब्रमण्यन यांनी प्रसिद्ध केला आहे. ते मोदी १.० सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. पद सोडल्यावर असा पेपर लिहिण्याचे कारण काय असेल? भारतातल्या परदेशी गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बातमी मूळ पेपर
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 07:03 नवीन
अरेच्या! कोणी अर्थतज्ज्ञ विश्लेषण करायला तयार नाही? अचानक जगात सर्वात वेगात वाढणारी अर्थव्यवस्था एकदम कशी खालावली? आणि लगेच गर्तेत गेलेल्या अर्थव्यवस्थेला “सावरण्यासाठी” रिझर्व बँकेचा सत्तर वर्षात जमा झालेला ९ लाख ६० हजार कोटींचा साठा सरकारला दिसायला लागला! चमत्कार झाला! https://theprint.in/economy/rbi-to-the-rescue-modi-govt-eyes-banks-rs-9-6-trillion-surplus-to-beat-economy-blues/250245/
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 06/19/2019 - 07:23 नवीन
तुम्ही भलतेच चावट निराशावादी दिसता नगरीनिरंजन! इकडे आमचा प्रतिदिवस परतावा ९.९७ ते १०.०१ % वगैरे असताना आप ऐसा शंखनाद कैसे कर सकते हैं? मार्केटला माहितच असेल ना हे गौडबंगाल. त्याने प्राईस इन केलंच असतं ना. आमच्यासारखी आशावादी माणसंच चालवताहेत हो मार्केट, तुमच्या सारखी डिप्रेस्ड माणसं देखील अस्वली अवतार घेऊन पाडतीलच की ते. माणसं काय, काय ए. आय. थोडीच आहेत? सेन्सेक्स मध्ये सेन्स अंतर्भूत आहे हे तुम्ही विसरला वाट्टं? शिवाय जे ऑब्व्हियस आहे त्याचे विश्लेषण करायला आमचे अर्थतज्ञ काय चीप वाटले काय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 07:53 नवीन
विनोदबुद्धी फारच जोरदार आहे भो तुमची, हण्मंताण्णा! मार्केटला काय हो, लोकांचे पैसे चव्हाट्यावर आले तर बरंच आहे. ह्यात अस्वलीपणा काय नाय हो! मार्केटचे बैल चौखूर उधळणार बघा. पैसा मार्केटात आला की फकीर व्हायचं, झोल्यात बसेल ते घेऊन झोला उचलून चालू पडायचं. रिझर्व बँकेतून सर्कारी बँकेत आला की मग पुढचं बघून घ्यायला मेहुलभाईसारखे लै आहेत मार्केटात. सर्कारी बेलाऊट आवडे सर्वांना! तुम्च्यासारख्या मार्केटप्लेयरांना कसली काळजी?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 06/19/2019 - 08:11 नवीन
बाकी मूळ प्रश्नाला बरोबर टांग दिली बरं! पुण्याचे काय तुम्ही? निवडणुकीच्या आधी जगात भारी दौडणारी अर्थव्यवस्था निवडणुकीनंतर रिझर्व बँकेकडून बेलआऊट घ्यायची वेळ येण्याइतकी कशी खालावली? नोटबंदी आणि जीएसटीनंतर तर टॅक्स कलेक्शन लै जोरात वाढत होतं ना म्हणे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 15:09 नवीन
It is expecting a portion of the central bank’s reserves to be transferred to the treasury by the second quarter of the current financial year, for use in “more productive purposes”, three separate sources told ThePrint. “There is no particular reason why this extra capital should be kept with the RBI. Even at current levels, the RBI is already exceptionally highly capitalised,” the Economic Survey for FY17 said, adding that the amount could be redirected towards recapitalising the cash-starved public sector banks. the buffer of 28 per cent of gross assets that is held by the central bank is well above the global norm of around 14 per cent. लेखातील च वाक्ये उद्धृत केलेली आहेत. रिझर्व्ह बँक "स्वतः" नक्की काय करते, ज्यामुळे त्यांचे इतके उत्पन्न/ संचित धन निर्माण होते? मिपा वरील अर्थतज्ज्ञ खुलासा करतील काय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 15:15 नवीन
It is also true that it is RBI which failed in discharging its duty to regulate public banks. In seventies and eighties, RBI officials used to inspect branches of various banks and there used to be a fear in the minds of bankers. Since 1991, in the name of freedom, in the name of reformation, in the name of privatisation and liberalization, RBI has left everything free and Bhagwan Bharose. http://www.allbankingsolutions.com/Articles/Articles-DJ-PSU-Banks-Red.html हि २०१६ मधील स्थिती होती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/19/2019 - 15:20 नवीन
NPAs of public sector banks tripled since June 2014 NPAs have been in the news in recent days, largely because of former RBI governor Raghuram Rajan's written response to a parliamentary panel on the subject. Notably, he said

"a larger number of [the] bad loans originated in the period [of] 2006-2008"

-- during the UPA years, that is. https://www.indiatoday.in/business/story/npas-public-sector-banks-rti-rbi-1343621-2018-09-19
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 06/15/2019 - 09:09 नवीन
Income Tax विभागातल्या १२ 'भ्रष्ट अधिकार्यांना सेवानिवृत्त वयाच्या आधिच सरकारने कठोर निर्णय घेत सेवानिवृत्त करण्यात आल्याची बातमी वाचलेली असेलच !! ह्या १२ अधिकार्यात ११ अधिकारी खरच कुख्यात भ्रष्ट अधिकारी होते व त्यांच्यावर गैरव्यवहाराचे, घेण्याचे आरोप होते पण एक अधिकारी ज्याच्यावर कोणतेही आरोप नसताना त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे !त्याचे नाव आहे A K Srivastav. दोन कार्यालयातील अधिकारी महिलांनी ह्या अधिकार्यावर यौन शोषणाचा आरोप केलेला होता . कार्यालयीन चौकशीत व नंतर कोर्टाने A K Srivastav यांना निर्दोष म्हणुन सोडले ! ह्या अधिकार्याने NDTV च्या 5000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मामला उघडकीस आणला होता. त्यामागची खरी हकिकत अशी की Airtel Maxis च्य़ा केस मध्ये घेतलेले ५००० कोटी पि चीदंबरम ने NDTV मध्ये पार्क केलेले होते . UPA-2 च्या कारकिर्दीतच A K Srivastavने ते उघडकीस आणले. ह्याचा परिणाम म्हणुन ह्या अधिकार्याला बराच त्रास देण्यात आला होता. २०१५ मध्ये PMO ने ह्या अधिकार्याला नोईडा मध्ये कमिशनर नियुक्त केले होते. मे २२ ला फाईनांस मंत्रालयाने ११ लोकांची लिस्ट बनवुन ठेवलेली होती. A K Srivastav ह्यांच नाव घालुन १२ जणांची लिस्ट PMO ला कारवाईसाठी पाठवण्यात आली. ह्यात अरुण जेटलींचा हात असल्याच समोर आलय. अरुण जेटली , प्रणय रॉय व चीदंबरमचे मित्र आहेत त्यामुळे PMO ला १२ जणांच्या लिस्ट पाठवली पण A K Srivastav चे नाव कोर्टाने व आंतरीक चौकशीत क्लिअर झाल्याच लपवुन ठेवल. A K Srivastav वर चुकीची कारवाई करण्यात आलेली आहे ह्याची माहिती मोदीजींच्या लक्षात आणुन देण्यासाठी श्री सुब्रमण्यम स्वामी व ईतर लोकांनी प्रयत्न केला आहे . मोदीजी काय करतात हे येणार्या दिवसात दिसेलच ! प्रणय रॉय वर कारवाई सुरु झालेली आहे !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 06/15/2019 - 17:59 नवीन
त्या भांडखोर , कजाग बाई ने बंगाल मधील आरोग्यसेवा विस्कळीत केली आहे . ज्या दोन डॉक्टरानां पेशंट च्या नातेवाईकानीं मारहाण केली त्यांची विचारपुस न करता आंदोलक डॉक्टरानां कामावर हजर राहण्याचे आदेश बाईने दिले , त्या मुळे आंदोलन अजुन भडकले . सामान्य जनतेला आरोग्यसेवा न मिळाल्या मुळे खुप त्रास झाला असणार पण यासाठी डॉक्टरानां वेठबिगार समजणारी ती बाईच जबाबदार आहे अस वाटतंय . आता तिने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत पण गर्भित इशारे देवून .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 06/18/2019 - 11:36 नवीन
Government compulsorily retires 15 customs officials Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये principal commissioner, commissioner, additional commissioner व deputy commissioner अश्या वरिष्ठ पदांवर असलेल्या पण अकार्यक्षमता आणि/किंवा भ्रष्टाचाराचा ठपका असलेल्या १५ अधिकार्‍यांना सरकारने सक्तीच्या निवृत्तीवर पाठवले आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी सरकारने आयकर विभागातील १२ वरिष्ठ अधिकार्‍यांवर अशीच कारवाई केली होती, हे आठवत असेलच... Centre compulsorily retires 12 senior I-T officers for corruption, misconduct: Sources

म्हणजे, एकंदरीत, स्वच्छ भारत योजनेची जोरदार अंमलबजावणी चालू आहे !!!

  • Log in or register to post comments
ह
हस्तर Tue, 06/18/2019 - 12:24 नवीन
राधाकृष्ण विखेंच्या मंत्रीपदावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोध करत एखाद्या व्यक्तीनं पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर पुन्हा निवडून यावे लागते. पुन्हा निवडून न येता खालच्या किंवा वरच्या सभागृहाचे सदस्य नसताना मंत्रिपदाची शपथ घेता येत नाही असं अजित पवारांनी म्हटलं. तर राधाकृष्ण विखे–पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचे सांगत सतीश तळेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 06/19/2019 - 06:39 नवीन
विखे विधीमंत्री होते. राजू परुळेकरांचा द्विमुखी परात्पर एलियन होत असण्याच्या काळात ते लोकप्रभेत एक सदर चालवत. विखे-पाटलांवर एक इंट्रेस्टिंग लेख लिहिला होता त्यांनी. त्यामध्ये वाचल्याचं अधूक स्मरतंय. विख्यांना कोणतं खातं सर्वात जास्त आवडतं असं विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावत त्यांनी 'विधी' असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे बहुतेक यातले बारकावे त्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना माहितच असणार. (पवारांना असं विचारल्यावर 'जलसंपदा' हे उत्तर येईल का हे मात्र एक रोचक गेसवर्क ठरेल. (धरणांमध्ये किती टीएमेसी पाणीसाठा शिल्लक आहे असा प्रतिप्रश्न मात्र करायला जाऊ नये :) ))
  • Log in or register to post comments
ह
हस्तर Wed, 06/19/2019 - 07:06 नवीन
विखे सध्या काँग्रेस तर्फे निवडून आले आहेत त्यामुळे भाजप सरकार मध्ये मंत्री पद?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/19/2019 - 07:10 नवीन
चालू द्या. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/19/2019 - 07:43 नवीन
Modi govt 2.0: Ministers make it a point to reach office by 9.30am मंत्र्यांनी घरून काम न करता आपापल्या ऑफिसमध्ये वेळेवर (स. ९:३० वा) हजर होऊन तेथूनच काम करावे असा आदेश पंतप्रधानांनी दिल्यामुळे हल्ली केवळ मंत्रीच नाही तर त्याच्या हाताखालील कर्मचारीही वेळेवर कामाला लागल्याचे दृष्य दिसत आहे. त्याचबरोबर, प्रत्येक मंत्र्याला पुढील १०० दिवसांच्या कामाचे नियोजन व अपेक्षित परिणाम (planning & outcome) नेमून देवून, त्याच्या उत्तरदायित्वावर लक्ष ठेवण्याचा प्रयोग, भारताच्या इतिहासात, प्रथमच केला जात आहे. निवडणूका संपल्यावर आता, निदान सुजाण नागरिकांनी तरी, "आता पाच वर्षे नशीबात काय येईल ते भोगू", असा अज्ञानी, गैरलोकशाही किंवा सोईस्कर विचार सोडून, नागरिकांची खालील कर्तव्ये, जबाबदार्‍या व हक्क जाणून त्याप्रमाणे यथाशक्ती कृती करणे आवश्यक आहे: १. सरकार काय करत आहे किंवा काय करत नाही, इकडे लक्ष ठेवून, चुकांचा जाब विचारणे आणि चांगल्या योजनांना सहकार्य करून आपल्याकडून अपेक्षित असलेला हातभार लावणे. २. विरोधी पक्ष काय करत आहेत किंवा काय करत नाहीत, इकडे लक्ष ठेवून, ते चांगल्या सरकारी योजनांना सहकार्य करत नसले (किंवा त्याना खोडा घालत असले) तर त्यांबद्दल जाब विचारणे आणि त्यांच्या विधायक/सकारात्मक सरकार-विरोधाला पाठींबा देणे. असे ज्या लोकशाहीत होते, तिला "सहभागी लोकशाही (participatory democracy) असे म्हणतात व तो लोकशाहीचा सर्वोत्तम प्रकार आहे. हे ज्यांना जमत नसेल किंवा ती आपली जबाबदारी आहे असे वाटत नसेल, त्याना सुजाण नागरिक म्हणवून घ्यायचा आणि/किंवा "देशात लोकशाही धोक्यात आली आहे" किंवा "देशाचे काय खरे नाही" असा फुकटचा दांभीक गळा काढायचा हक्क नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 06/19/2019 - 08:31 नवीन
How 20,000 women in Vellore got together to save a dying river "एका बाजूला पाण्याच्या अभावाकडे पाहत दशकानुदशके नशीबाला बोल लावत व दुसरा कोणी आपल्या मदतीला धावून येईल याची वाट पाहत राहणारे" आणि "दुसर्‍या बाजूला स्वतःची लढाई स्वतः लढून, नदीला पुनर्जिवीत करणार्‍या वेल्लोरच्या या लढवय्या २०,००० झाशीच्या राण्या" ! भारत हा अनेक विसंगतींचा देश आहे, यात वाद नाही. मनरेगा (MGNREGA) योजनेच्या मदतीने, या रणमर्दिनी स्त्रियांनी, तमिळनाडूमधील दुष्काळी वेल्लोर जिल्ह्यातील नागनंधी (नागनंदी) या हंगामी नदीला आपल्या अथक प्रयत्नांनी पुनर्जिवीत केले आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी, गेल्या चार वर्षांत ३,५०० पुनर्भरण विहिरी (recharge wells, प्रत्येक विहिर, २०' खोल X १५' लांब X ६' रुंद, आहे) आणि पाणी अडवणारे असंख्य दगडी अडथळे निर्माण केले गेले आहेत. त्यामुळे, या भागातील भूजलाचा स्तर लक्षणियरित्या उंचावला आहे. तेथे पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या पण गेली १५ वर्षे कोरड्या पडलेल्या या नदीमध्ये आता इतके पाणी साठले आहे की, सद्याच्या अवर्षणाच्या काळातही, ते अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि भातशेतीची गरज भागवत आहे. या उदाहरणावरून बोध घेऊन, देशभरात इतर ठिकाणीही या प्रकारचे प्रकल्प सुरू झाले आहेत. Image removed. (सौजन्य : टाईम्स ऑफ इंडीया)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा