Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जून २०१८

M
manguu@mail.com
Tue, 06/12/2018 - 15:33
🗣 363 प्रतिसाद
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 118005 views

🗣 चर्चा (363)
ए
एस Fri, 06/15/2018 - 20:35 नवीन
पुणेरी पगडीचा वाद - शरद पवारांची एक धूर्त राजकीय खेळी. भाजपचे हिंदुत्वाचे ध्रुवीकरण आणि पवारांचे ब्राह्मणेतर जातीय ध्रुवीकरण यात काहीच फरक नाही. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने दोन्ही वाईटच. मला व्यक्तिशः पुणेरी पगडी, शिंदेशाही पगडी, फुले-धाटणीचे मुंडासे, गांधी टोपी, फेटा, उपरणे, इत्यादी सर्व पारंपरिक वेशभूषा आवडतात. आणि त्यावरून माझी जात किंवा कंपू शोधू पाहणाऱ्याची मला कीव येते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 06/15/2018 - 21:52 नवीन
जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहल्याचा राग आल्याने तीन मातंग तरुणांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. आता उत्तर प्रदेश-बिहार आणि महाराष्ट्रात काय फरक राहिला? यात तुम्ही "मातंग" असा एकाच जातीचा उल्लेख केलात. या ऐवजी जर कोणाचीच जात पुढे न आणता फक्त `एका "क्षुल्लक" गोष्टीवरून २ व्यक्तींनी २ तरुणांना मारहाण केली' असं साधं सरळ म्हणून किंवा मार खाणाऱ्यांबरोबर मार देणाऱ्यांची पण जात "भटके विमुक्त" म्हणून लिहिली असतीत तर एवढा मोठा प्रतिसाद आणि स्वतःचे समर्थन करण्याची वेळच आली नसती नाही का? वर आणि त्यात "मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही." असं म्हणताय! मग मार खाणाऱ्यांची जात पाहण्यात का बरं रस उत्पन्न झाला? नंतर म्हणताय दुसऱ्या कुठल्या जमातीचा द्वेष करणाऱ्यांना तुम्ही लगेच फटकारता, रास्वसं, भाजपच्या कार्यकर्त्यांची केवळ द्वेषावरून हत्या झाली, याविरोधात मिपावर किंवा इतर कुठे तुम्ही जाहीर निषेध व्यक्त केलाय का? असल्यास माझ्या या प्रतिसादाखाली त्याचा पुरावा द्या... आणि "त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा." हे जागीच सिद्ध करून टाका. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/16/2018 - 00:02 नवीन
अवश्य. https://www.misalpav.com/comment/959133#comment-959133 हा प्रतिसाद व त्याआधीचे प्रतिसाद जरूर पहा. कम्युनिस्ट गुंडगिरी मी फार जवळून पाहिली आहे. केवळ हेच नाही, तर इतरत्रही रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचा मी निषेधच केला आहे. एक डॉ. म्हात्रे की आणखी कोणाचा प्रतिसाद होता. आणि त्याखाली मी अशा राजकीय हत्त्यांचा निषेध केला होता. अर्थात मिपावर किती प्रतिसाद कुठे दिलेत यावरून कुठल्या गोष्टीची सिद्धता तपासायला जाणे हेच हास्यास्पद आहे. बादवे, पहिल्या मुद्द्याबद्दल. मार खावा लागलेल्याची जात प्रतिसादात सांगणे आणि मारणाऱ्याची जात न सांगणे हा प्रकार मुद्दामच केला नाही कारण जातीभेद हा केवळ उच्चवर्णीयांकडून दलितांवर होतो असे नाहीये. जात ही एक फार मोठी उतरंड आहे. प्रत्येक जात ही इतर कोणत्याही जातीपेक्षा खाली किंवा वर आहे. पण बरोबरीला नाही. त्यामुळेच जाती-आधारित द्वेष ही कुण्या एका समाजघटकाची मक्तेदारी नाही. हे वास्तव आहे. हे नीट समजून घ्या. वरील घटनेला चिकटपट्टी लावून टाका. आणि अशाच स्वरूपाची इतर कुठलीही घटना घ्या ज्यात कृत्रिम भेदभावांच्या आधारे तीव्र द्वेषभावनांचे दर्शन घडले आहे. आणि मग, त्या अनुषंगाने वाटल्यास माझ्या मुद्द्यावर पुन्हा विचार करून बघा. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sat, 06/16/2018 - 00:43 नवीन
त्या धाग्यातील तुमचा पहिला प्रतिसाद बघा. त्याखालील इतर प्रतिसाद पण सरकारच्या (मोदी) नावाने नावे ठेवणारेच आहेत. समस्त पुरोगामी मंडळींना याची खात्री होती की मोदी, भाजप आणि रास्व संघ या सगळ्या हत्यांमध्ये आहे. आणि मग नंतर गापै चा प्रतिसाद बघा, ज्यावर तुम्ही उपरोक्त प्रतिसाद दिला आहे. अश्या प्रत्येक घटनेत पुरोगाम्यांकडून केवळ मोदी, भाजप आणि रास्व संघ हे तीन आणि हिंदू यांना दोष दिला जातो आणि मग जेव्हा सत्य समोर येते तेव्हा मग "मी नाही त्यातला" असे प्रतिसाद येतात, यात काही नवं नाही. बादवे, सध्या आपण मिपावरच बोलतोय त्यामुळे येथील प्रतिसाद दाखवा असेच म्हणायला लागणार. तुम्हाला बाकी कुठले काही दाखवून सिद्ध करायचे असेल तर माझी हरकत नाही. माझ्यामते सदर घटनेत जातीचा काही संबंध नसावा. त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या विहिरीत, ज्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, हि मुले पोहायला लागली. पोहू नका असे सांगून, दम देऊनही ऐकत नव्हती त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. आता हा वादाचा मुद्दा होऊ शकतो की किती मारहाण करावी, कपडे काढणे कसे चुकीचे आहे वगैरे. पण मुळात आपल्याला तिथे काय झालं आपल्याला माहित नाही, कशावरून त्या मुलांनी उलट उत्तरं दिली नसतील. सांगून सुद्धा ती मुलं "बघू तू काय करतो" असं म्हणून उचकवत असतील तर त्या क्षणी रागात काहीही होऊ शकतं. त्याला जातीय रंग द्यायची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या या धाग्यावरील मूळ प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून इतके प्रतिसाद झाले... नाहीतर तुम्ही कुठल्या बाजूचे याने मला असा काय फरक पडणार आहे!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 06/14/2018 - 19:22 नवीन
नै तर काय.. कुणीही काहीही केलं की सगळ्या गावाला त्यांना पार विवस्त्र करून वाट्टेल तितकं मारायची मुभा मिळतेच, घटनेत लिहिलं आहे तसं. कायदा वगैरे भास आहेत. नै तरी तिथे न्याय मिळत नाहीच, मग आम्ही केला न्याय तर बिघडलं कुठे?? आणि जातीयता वगैरे क्षुल्लक मुद्दे मध्ये आणू नका. तसं काही नसतंच आणि असलं तरी पिण्याच्या पाण्यात पोहणे ह्या घनघोर गुन्ह्याहून मोठं नसतं.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 06/15/2018 - 16:51 नवीन
प्यायच्या पाण्याच्या विहीरीत हि मुलं पोहायला जायची. कित्येकदा हटकलं तरी ऐकायची नाहि. शेवटी त्यांना चोप मिळाला. हि सरळ सरळ मारहाणीची केस आहे. त्याला जातीयवादाचा रंग दिला मिडीयाने. दुर्दैवाने भारतात अजुनही बर्‍याच वेळा अशाच मार्गाने समस्या सोडवल्या जातात... मग ते रस्त्यावरचे अपघात असो, बेकायदा वीज/पाणी जोडणी असो, किंवा दान-धर्माचं बक्षीस आपल्या पदरात पाडणं असो. दिवसेंदीवस ३६इंची छाती सरकारला घेरण्याचं तंत्र आहे हे.. आणि सरकार त्याला बळी पडतय.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 06/15/2018 - 17:04 नवीन
प्रॉस्टीट्युशनचं नाहि बे.. प्रेस्टीट्युशन म्हणतात त्याला
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Mon, 06/18/2018 - 05:09 नवीन
३६ नाही हो, ५६!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 06/14/2018 - 16:05 नवीन
आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधन https://www.loksatta.com/desh-videsh-news/arya-and-vedic-era-is-indigenous-says-asi-new-study-1697129/ असले संशोधन पुण्याच्या कुठल्या गल्लीबोळात तयार होते आणि नागपूरमार्फत दिल्लीला कसे पोचते हे आम्हाला ठाऊक आहे. लवकरच मूलनिवासी संघटना याचा पर्दाफाश करेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/15/2018 - 08:01 नवीन
आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधन हे संशोधन नवीन नसून बरेच जुने आहे. तरीही वैयक्तिक व राजकिय स्वार्थासाठी "आर्यन इन्व्हेजन थियरी" जिवित ठेवण्याचा काही पाश्च्यात्य आणि भारतिय डाव्यांचा प्रयत्न आहे... हे सुद्धा काही गुपित नाही, कारण त्यांनीचे ते बर्‍याचदा अनवधानाने मान्य केलेले आहे. मात्र, त्यासंबंधी नवनवीन पुरावे हाती येत असल्याने "आर्यन इन्व्हेजन थियरी" वाले सतत तोंडावर आपटत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे खालील व्हिडिओ वानगीदाखल देत आहे. या पहिल्या व्हिडिओत "आर्यन इन्व्हेजन थियरी" ही एक कवीकल्पना होती आणि तिचे निर्माण व पुरस्कार का केला गेला याबाबत सखोल विश्लेशण आहे. सर्वच व्हिडिओ शांतपणे पाहणे रोचक होईल. गडबडीत असल्यास सुरुवातीला नुसती शेवटची १५ मिनिटे तर पहायलाच हवी... ही दुसरी छोटी क्लिपसुद्धा बरेच काही सांगून जाते...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/15/2018 - 08:09 नवीन
"आर्यन इन्व्हेजन थियरी डिबंक्ड" अशी जालावर आणि यु ट्युबवर विचारणा केल्यास, आर्य हे मूळ भारतिय लोकच होते, हे सिद्ध करणारी (जनुकशास्त्रासह ) शास्त्रिय संशोधनांची बरीच माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/14/2018 - 17:21 नवीन
हा धागा भय्युजी महाराज बद्दल होता !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/14/2018 - 17:28 नवीन
धाग्याचे शीर्षक : चालू घडामोडी - जून २०१८ च च ला काना चा , ल ल ला दुसरा ऊकार लू चालू म्हणजे current . घ ड ला काना डा म म ला एक काना एक मात्रा मो, ड ड ला दुसरी वेलांटी डी , घडामोडी म्हणजे affairs ज ज ला दुसरा ऊकार जू न नळातला न , जून - म्हणजे जून महिना २०१८ म्हणजे ईसवी सन २०१८ , येशु ख्रिस्ताच्या जन्मानंतर २०१८ वर्षे झाली ते वर्ष ! अर्थात चालू घडामोडी - जून २०१८ म्हणाजे जुन २०१८ मधील करंट अफेयर्स ! =))))
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 06/15/2018 - 16:50 नवीन
श्री (सोमनाथ खांदवे) गुरुजींचे मला बरोबर वाटते.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/15/2018 - 17:26 नवीन
ख्या ! ख्या !! ख्या !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/15/2018 - 18:16 नवीन
काडीबाज सगा ! पण सोखांपण भारी मुरलेले दिसत आहेत, त्यामुळे एक तीर (पक्षी समीधा) वाया गेला ! =))
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 06/14/2018 - 18:53 नवीन
सुरुवातीच्या पोस्टमध्ये काहीतरी लिहावे लागते, नंतर इतर लोक इतर घडामोडी लिहितात
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 06/15/2018 - 07:30 नवीन
चालू घडामोडी - जून २०१८ हे नाव दिले ते बरे झाले. महिना निहाय घडामोडी शोधायला सोपे जाईल. पूर्वीचे १ २ ३ आकड्यांमुळे प्रतिसाद लिहताना खूप गफलत होयची.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 06/14/2018 - 20:08 नवीन
स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळणार; ६ महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार; अभ्यास करण्यासाठी उपसमिती मुंबई:- देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीत तुरुंगात गेलेल्या बंदींना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळणार असून त्यांना १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला असताना मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्या पार्शवभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून त्या कैद्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन मानधन देण्याचा निर्णय झाला असल्याचे बापट यांनी सांगितले. या विषयावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आणीबाणीत कैदी असलेल्या मिसाबंदीच्या संदर्भात मानधन देण्याचा निर्णय झाला असून उपसमिती नेमलीअसल्याचे बापट यांनी सांगितले. 2 महिन्यात या समितीचे काम पूर्ण होईल असे ते म्हणाले. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात कमिटी याबाबत सर्वे करणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत सगळे कामकाज 6 महिन्यात पूर्ण होईल तसेच यासाठी राज्याची एक कमिटी करणार असल्याचे बापट यांनी सांगितले. या काळात जे लोक कैद किंवा मिसाबंदी होते ते जर मृत झाले असतील तर त्यांच्या पत्नींना मानधन देणार असल्याचे बापट म्हणाले. १९९५ साली त्यांना सन्मानपत्र दिले होते. 10 हजारापर्यंत मानधन देणार असून वर्षातून एकदा मेडिकल सुविधा देण्यासाठी एकदा 10 हजार देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यभरात अडीच ते तीन हजार असे स्वातंत्र्यसैनिक असतील असे ते यावेळी म्हणाले. मी आणीबाणीच्या काळात 19 महिने जेलमध्ये होतो. त्यावेळी मी टेलको कंपनीत काम करत होतो. मला हा लाभ मिळाला तर मी सामाजिक कामासाठी देणार आहे. या निर्णयासाठी उशीर झाला असला तरी चांगला निर्णय आहे. गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री मी स्वतः 13 महिन्यांचा बंदीवास भोगला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगलेल्यांना सन्माननिधी देण्यात येतो. महाराष्ट्रातील अनेक जणांनी 1975 ते 77 याकाळात आणिबाणी कालावधीमध्ये तुरुंगवास भोगला आहे. अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान व गौरव करण्याचा निर्णय 40 वर्षांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 06/15/2018 - 02:13 नवीन
आयला हे स्वर्गातून काम बघातायत की काय?
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 06/15/2018 - 07:57 नवीन
नको यार. असले काही तरी फालतू निर्णय घेऊ नका. भाजपवाल्यांनो बंद करा असले प्रकार. स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन म्हणजे केवढा मोठा घोटाळा आहे हे सर्वश्रूत आहे. अक्षरशः स्वातंत्र्य मिळताना ३-४ वर्षांचे असणारे काही काही तर महाभाग जन्मेअले नव्हते तेव्हासुद्धा स्वातंत्र्यसैनिक होते. हे असले फुकट वाटण्याचे धंदे म्हणजे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण उपलब्ध करून देणे आहे. आणि मुळातच, आपल्या देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी, हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधार्‍यांच्या विरोधात आवाज उठवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यासाठी बक्षिशी कसली वाटताय. आजिबात आवडला नाही हा प्रकार. :(
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 06/15/2018 - 13:45 नवीन
.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 06:40 नवीन
शिक्षण विभागाने काढले परिपत्रक (GR)_ ६ मे २०१८ ते २० जुन २०१८ पर्यत सुट्टी , २१ June पासुन शाळा चालु. रमजान ईद निमित्त केलेले बदल . सर्वाना ईदच्या शुभेच्छा. मुलांना भरपूर ईदी मिळो
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 06/15/2018 - 06:48 नवीन
आज काढले का? आज तर पोरं शाळेत गेलीत.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 07:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/15/2018 - 13:00 नवीन
( आपण म्हणता तसा स्वतंत्र जी आर असू शकेल नाही असे नाही) पण आपण उपलब्ध केलेले छायाचित्र बहुधा विनंती निवेदन असावे, शासन निर्णय म्हणजे जी. आर नसावा. असे प्रथमदर्शनी वाटते. चुभूदेघे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/15/2018 - 08:12 नवीन
रोचक माहिती : ब्रिटिश राजपुत्र विलियमचे पुर्वज भारतिय असल्याचा जनुकशास्त्रिय पुरावा...
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 10:12 नवीन
अतिक्रमणधारकांना सरकारी जमिनीवरुन हटवण्यासाठी तसंच महत्वाच्या प्रकल्पांना उशीर होऊ नये यासाठी राज्य सरकारने अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबांना मोफत घर देण्याचा निर्णय घेतला आहे. जागा रिकामी व्हावी यासाठी त्यांना २६९ चौरस फुटांचं घर देण्यात येणार आहे. तसंच ज्या कुटुंबांना घर नको असेल त्यांना रोख रकमेचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. घराची जितकी किंमत असेल तेवढे पैसे त्यांना देण्यात येतील. जमीन लवकरात लवकर रिक्त व्हावी यासाठी ज्यांनी महापालिका क्षेत्रातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं आहे, तसंच सरकारी नियमाप्रमाणे पुनर्वसनासाठी पात्र असतील त्यांना मोफत २६९ चौरस फुटांचं घर देण्यात येईल किंवा घराच्या किंमतीचे पैसे देण्यात येतील. https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-governemnt-to-give-houses-to-encroachers-1697534/
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/15/2018 - 12:17 नवीन
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (23 एप्रिल) रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये 'संविधान बचाव रॅली'ला संबोधित केलं. या रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली. 'संविधान बचाव रॅली' विषयी ट्विट करून लोकांना माहिती देताना राहुल गांधी यांनी चुकीने 'संसद घेराव रॅली' असं ट्विट केलं. ट्विट करताना झालेली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी काही वेळात ते ट्विट डिलीट केलं. व त्यानंतर 'संविधान बचाव रॅली'चं दुसरं ट्विट केलं.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/15/2018 - 12:32 नवीन
May 19, 2018 पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातमधील हिंदू हे धर्मांधांच्या उद्दामपणामुळे असुरक्षित असतील, तर इतर ठिकाणच्या हिंदूंचा विचारही न केलेला बरा ! वडोदरा (गुजरात) – शहरापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या वाघोडिया येथे धर्मांधांनी रमझानच्या पहिल्याच दिवशी क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून त्यात हिंदू आणि मुसलमान यांचा समावेश आहे. (धर्मांधांनी आक्रमण केल्यावर हिंदूंनी प्रतिकार करायचा नाही का ? ‘आम्ही हिंदूंचे रक्षण करणार नाही आणि त्यांनाही स्वतःचे रक्षण करू देणार नाही’, या वृत्तीचे हिंदुद्वेषी पोलीस ! – संपादक) त्यांच्यावर संपत्तीची हानी करणे आणि हिंसाचार करणे, हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. येथील वाघोडिया भागात सुट्या पैशांवरून हिंदु युवकांचा मुसलमान सोडा विक्रेत्याशी वाद झाला. रमझानचा पहिला दिवस असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मुसलमान उपस्थित होते. त्यामुळे येथील वादानंतर धर्मांधांनी हिंसाचार चालू केला आणि त्याला हिंदूंनी विरोध केला. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 16:57 नवीन
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेनेच केल्याचा दावा आज याप्रकरणी चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता, अशी महत्त्वपूर्ण माहितीही एसआयटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारधारेसाठी काम करणारी एक कट्टरपंथी टोळी सक्रिय आहे. या टोळीकडूनच या तिन्ही हत्या घडवून आणण्यात आल्या. सुजीतकुमार उर्फ प्रवीण हा या टोळीसाठी भरती करायचा. त्याच्या चौकशीतच या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत किमान ६० सदस्य सक्रिय आहेत. यातील अनेक जण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.  या टोळीत सनातन आणि हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असला तरी या दोन संस्थांचा या हत्यांशी थेट संबंध आहे का, याबाबत अजूनतरी कोणतेही पुरावे आमच्या हाती लागलेले नाहीत, असे या अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले. ही टोळी कोणत्याही नावाशिवाय सक्रिय असून उत्तर प्रदेशातही या टोळीचे जाळे पसरलेले आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत, असे या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.  - गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या तिन्ही हत्यांसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल आणि त्यातील गोळ्या एकसारख्या होत्या, असे फॉरेन्सिक चाचणीत आढळून आले. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्याच्या मागील बाजूस एकाच प्रकारची खूण असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.  - गौरी यांच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा आणखी तीन जण तिथे मुख्य हल्लेखोरासोबत आले होते.  - कोणालाही मागमूस लागणार नाही, अशा पद्धतीने ही टोळी हत्येचा कट रचते. हल्ल्याआधी रेकी करायची, ज्याची हत्या घडवून आणायची आहे त्याच्याबाबत संपूर्ण माहिती गोळा करायची आणि नंतर नियोजनबद्धपणे हत्या घडवायची, अशाप्रकारे या टोळीचे काम चालते. सहा महिने ते एक वर्ष आधी कट रचून त्यावर काम केले जाते, अशीही माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे.  - कन्नड लेखक प्रा. एस. भगवान यांची हत्या घडवून आणण्याची योजना या टोळीने आखली होती. मात्र, हा कट उधळला गेला. याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींनी त्याची कबुली दिली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.  - गौरी लंकेश हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून परशुराम वाघमारेची अटक निर्णायक ठरल्याचे सांगण्यात आले.  https://m.maharashtratimes.com/india-news/parashuram-waghmare-killed-lankesh-unnamed-outfit-has-footprints-in-5-states-sit/articleshow/64604804.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 06/15/2018 - 19:47 नवीन
च्यायला म्हणे गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता. कोणे एके काळी पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हत्येतील पिस्तूल व गोळ्या समान होत्या. गौरी लंकेश ची नव्याने हत्या झाल्यावर दाभोलकर सुटले आणि त्यांची जागा गौरी लंकेशांनी घेतली. बोंबला तिच्यायला. मस्त मनोरंजक संगीत खुर्ची चाललीये. (संपादित) फक्त हे मनोरंजन हिंदुत्ववादी संघटनांवर शेकायला नको ! बस्सं, इतकंच !! -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 19:59 नवीन
सध्या काँग्रेस नाही , मोदीजींचे सरकार आहे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 06/15/2018 - 20:01 नवीन
कायदा व सुव्यवस्था राज्य सरकारची म्हणजे काँग्रेसची जबाबदारी असते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 20:54 नवीन
2 खून महाराष्ट्रात 2 खून कर्नाटकात मारेकरी तेच असतील कदाचित पण एकीकडे भाजपा राज्यसरकार , एकीकडे कोंग्रेस राज्यसरकार कट्टरपंथी अडकले तर आता दोष कोणच्या सरकारला द्यायचा ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 06/15/2018 - 20:59 नवीन
त्या गायकवाडचे काय झाले ? आता हा वाघमारे आला . परशुराम वाघमारे , नावात परशु आणि आडनावात मारे , नाव आडनाव दोन्ही हिंसक आहे . !!!!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 06/18/2018 - 07:15 नवीन
एकेक धर्मद्रोही मरू घातलेत हेच खरे अच्छे दिन.
इथे हा आयडी सरळसरळ धर्माधारीत दहशतवादाचे समर्थन करतो आहे. संपादकांनी नोंद घ्यावी. हेट स्पीचेसना आवर घालण्यासाठी मिपावर संपादकांनी आणखी सजग राहण्याची गरज आहे असे मला वाटते. मी गामा पैलवान ह्या दहशतवादाला समर्थन करणार्‍या आयडीचा तीव्र निषेध करतो.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 06/18/2018 - 09:12 नवीन
पुंबा, माझं वाक्य थोडं दुरुस्त करून परत सांगतो. ठळक शब्द दुरुस्तीचे :
एकेक धर्मद्रोही माफिया आपसांत मारामारी करून मरू घातलेत हेच खरे अच्छे दिन.
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Fri, 06/15/2018 - 18:15 नवीन
चालू घडामोडी मध्ये फक्त केंद्रीय सरकार विरोधातील बातम्या कॉपी पेस्ट करत बसणे यात कसलं आलंय ज्ञान ? भडकलेली काही डोकी हिंसाचार करत आहेत त्या मारहाणी मुळे हिरव्या गॉगल्स वाल्यानां आनंद झालाय . जो तो हिरव्या नजरेतून भाजपचं चुकाचं कुसळ शोधतोय आणि हेतुपुरस्सर काँग्रेस च मुसळ विसरतोय . त्यामुळे भाजप ने केलेली चांगली कामे दिसत नाहीत . 60 वर्ष ओरबाडून खाल्लेलं सोयीस्कर रित्या विसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दलितांना मारहाण करणारे चाबकाने फोडून काढून फासावर लटकवले पाहिजेत , त्या शिवाय हिरव्या गॉगल्स गॅंग जिलब्या घालायची बंद होणार नाही .
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/15/2018 - 21:57 नवीन
खांदवेसाहेब, केवळ मोदी सरकार हे दलितद्वेष्टे आहे हा शुद्ध दांभिक प्रचार आहे. काँग्रेसनेही काही वेगळे केलेले नाही. डाव्यांनीही नाही. तृणमूलसारख्यांनी नाही. बसपवगैरेंनीही नाही. दलित असो वा कुठल्याही समाजघटकांची स्थिती असो. ती तशीच राहण्यात सर्वच राजकीय पक्षांचा खरा स्वार्थ असतो. अन्यथा यांची दुकाने चालणार नाहीत. ध्रुवीकरण आणि संकुचित विचारसरणी हीच राजकीय पक्षांची खरी हत्यारे असतात.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 06/15/2018 - 22:54 नवीन
मागे एकदा मिपावर "विशेष सूचना" जाहीर केली होती. त्या सूचनेचा परिणाम असा झाला की श्रीगुरुजी आणि अरुण जोशी यांसारख्या मोदी सरकार/ हिंदुत्व या बाजूने बोलणाऱ्यांनी मिपासन्यास घेतला. कारण त्यातून तसा अर्थ ध्वनित होत होता हे मी निदर्शनास आणून दिलं होतं. तेव्हा काही सन्माननीय सदस्यांनी मी कसा चुकीचा आहे हे दाखवायचा प्रयत्न केला होता आणि वर संमं विरोधात बोलतो म्हणून कांगावा सुद्धा केला होता. अर्थात त्यानंतरच्या बऱ्याच धाग्यांमध्ये सरकारविरोधी म्हणा किंवा भाजप/ रास्वसं यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आक्षेपार्ह म्हणता येतील असे बरेच प्रतिसाद दिले. परंतु आता त्यांचा दणकून प्रतिवाद करणारे कोणी उरले नाही. आणि परत कुठली "विशेष सूचना"ही आली नाही! असो. हा लेख वाचा. शतकानोशतके घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध झालेले आहे की हिंदूच, किंबहुना हिंदूंमधलेच बहुसंख्य, स्वतःवर होणाऱ्या अत्याचारांसाठी कारणीभूत आहेत. हिंदूंना सहिष्णुतेचा आणि सेक्युलर असण्याचा इतका पुळका आहे की त्यांना इतर धर्मांकडून असलेला धोका लक्षातच येत नाही. बहुतांशी हिंदू मी कसा निधर्मी आणि पुरोगामी आहे हे दाखवण्यात इतके गुंग होतात की आपण विरोध कोणाचा आणि समर्थन कोणाचे करतोय हेच त्यांच्या लक्षात येत नाही. एखादा देश लढाईशिवाय आपल्या अमलाखाली आणायचा असेल तर तिथल्या शिक्षणव्यवस्थेला अमलाखाली आणलं तर काम होतं. हा उपाय दीर्घ कालावधीचा आहे, पण कुठल्याही लढाईशिवाय १००% यशाची खात्री आहे. त्या जोडीला त्या देशातील वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल पण घेतले की मग कामच झालं. आपल्याला शाळेपासूनच अकबर कसा महान होता आणि टिपू सुलतान कसा शूर होता हे शिकवलं जातं. औरंगजेब स्वतःच्या हाताने टोप्या (?) शिवून विकायचा म्हणजे तो किती साधा होता हे सांगितलं जातं. पण तेवढं चांगलं हिंदू राजांबद्दल शिकवलं जात नाही. सोशल मेडिया, वृत्तपत्र यामधून सुद्धा फक्त हिंदू इतर धर्मियांवर कसे अत्याचार करतात हेच गुऱ्हाळ चालू असतं. नाहीतर केवळ रेल्वेमध्ये सीटवरून झालेल्या मारामारीला जातीय रंग देऊन मुसलमान लोकांवर कसा अत्याचार होतो हेच दाखवत बसले नसते. दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रशांत पुजारीची हत्या भर बाजारात मुस्लिम लोकांकडून केली जाते तेव्हा एक छोटीशी बातमी देऊन पुढे मौन पाळलं जातं. जनगणनेप्रमाणे आत्ता जरी ७०% च्या वर हिंदू आणि ३०% च्या आसपास इतर धर्मीय म्हणले, तरी ७०% हिंदूंमधले ५०-६०% जरी स्वतःला निधर्मि/ पुरोगामी समजत असतील तर त्यांना या ३०% मुळे होत असलेला धोका दिसतच नाही. मग ते उर्वरित ४०-५०% हिंदूंना लोकांना नावे ठेवून गप्प बसायला भाग पाडतात. हे ३०% कधी डोईजड होऊन जातील हे आपल्याला कळणार पण नाही कारण ३०% चे ५०% व्हायला फार वर्ष लागत नाहीत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे युरोपातील देश आहेत. अमेरिकेतही काही फार बरी परिस्थिती नाही, बुरखाधारी आणि नुसती दाढीधारी (मिशी नसलेले) यांची संख्या वेगाने वाढते आहे. कॅनडा सारख्या देशात बऱ्याच दुकानात/ रेस्टॉरंट मध्ये आम्ही हलाल फूड विकतो असे बोर्ड लावलेले असतात. शाळांमध्ये पोर्क विकू नका एवढंच नव्हे तर इतर मुलांना डब्यातून आणायला पण बंदी करा अशी मागणी होते. एखाद्या भागात स्थलांतरित मुस्लिम लोकसंख्या वाढायला लागली की तिथून तिथले स्थानिक लोक तो भाग सोडून जातात. मग त्या भागात दुसऱ्या कुठल्या धर्माचा माणूस जाऊच शकत नाही. जाऊद्या. काय बोलणार. जे जे होईल ते बघत राहावे, पण त्यांचा संपूर्ण कब्जा होईपर्यंत आपण काही जगणार नाही याचे समाधान मानावे का आपल्या मुलाबाळांचे कसे होणार याची काळजी करावी हाच गोंधळ सध्या आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sat, 06/16/2018 - 04:42 नवीन
च्यायला , मुस्कटदाबी लईच जोरात चाल्लीय म्हणायच . पंचाचा निर्णय अंतिम ह्ये मान्य पण कुस्ती स्परधा नीकोप झाली तर मजा येति नायतर आपला पैलवान पडायला लागला की गुणवान पैलवान ला सारख फाऊल द्यायचा आस मीपा च्या पंचांना शोभत का ?
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Tue, 06/19/2018 - 01:26 नवीन
+1
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 06/19/2018 - 11:29 नवीन
खरे आहे. त्या सुचनेनंतर मिपावर लिहिण्यात रस उरला नाही. आता वेगळी चूल मांडावी की काय असे वाटू लागले आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 06/19/2018 - 11:44 नवीन
नुसता द्वेषाने कोणतीच लढाई जिंकू शकत नाही. प्रेमाने जग जिंकलेली लाखो उदाहरणे सापडतील. === काल आमच्या येथील सोमेश्वर मंदिरात मामाच्या पोराने भंडारा ठेवला होता. पर्वा शिरखुमयाची किटल्या घरी येऊन देणारी त्याचे मित्र झाडून उपस्थित होते. प्रेम वाटल्याने प्रेम मिळते आणि द्वेष वाटल्याने काय मिळणार ते प्रत्येकाने ठरवा. === भविष्याचा बागुलबुवा दाखवण्यापेखा भावी पिढीतील मुलाबाळांना प्रेम वाटायला शिकवा, त्यांचे आयुष्य सुखकर जाईल. === बाकी सगळ्या थेऱ्या प्रॅक्टिकली तंतोतंत शक्य होतातच असे नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 06/15/2018 - 21:51 नवीन
उजवीकडे गेलेली चर्चा वाचनाच्या सोयीसाठी डावीकडे आणत आहे.
पोरांनी पिण्याच्या पाण्यात पोहुन पाणी प्रदुषित केले अन त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी
अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च' हवी. कुठली शिक्षा व्हायला हवी? आणि ती कोणी द्यायची? बाकीच्या प्रतिसादास फाट्यावर मारण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 06/15/2018 - 22:19 नवीन
अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च' हवी.
हुश्श ! येवढे मान्य केलेत ते ही खुप झाले :) पहिल्यांदा कोणत्या तरी स्वयंघोषित पुरोगामी माणसाला स्वतःचे म्हणणे बदलुन योग्य ते म्हणणे स्विकारताना पाहिले आहे , एकदम हायसं वाटलं !
कुठली शिक्षा व्हायला हवी? आणि ती कोणी द्यायची?
खाजगी पाण्याची विहीर असल्यास मालकानेच चार रट्टे द्यावेत , शिवाय पोरांचा कान पकडुन त्यांच्या पालकांकडे न्यावे , अन झालेला प्रकार सांगावा , अन मग पालकांनी पोरांची उत्तरपुजा बांधावी ! सार्वजनिक तलाव विहीर मालमत्ता असल्यास आपण केवळ चार शव्द सुनाऊ शकतो असे मी म्हणणार होतो पण एकुणच तुमचे प्रतिसाद पाहुन मत बदलले आहे ते असे : आपण १००% दुर्लक्ष करावे , तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || हा अभंग आठवावा . केले प्रदुषित पाणी तर करु दे , आपलं काय जातंय असा विचार करुन अलिप्त रहावे ! चुकुनही चार शब्द समजावयाल जाऊ नये , पोलिस कंपलेंटचा तर विचारही करु नये , सदर पाणी प्रदुषित करणारी व्यक्ती कोणत्या तरी विशिष्ठ समाजाची असली तर आपल्यावरच केस दाखल करुन आपल्यालाच भोगायला लागु शकते ! सार्वजनिक पाणवठे विहिरी नद्या प्रदुषित झाल्या तर बिनधास्त होऊ द्यावे , आपण आपला हाय क्वालिटी वॉटर प्युरीफायर घरात लाऊन घेतला की विषय खलास !! :)
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 06/15/2018 - 22:58 नवीन
एस भाऊंनी या प्रतिसादात पण बरोबर भूमिका घेतली आहे. तळ्यात मळ्यात चालू आहे की काय? कृहघ्या.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/16/2018 - 00:23 नवीन
:-) मी कुठल्याही एका संकुचित विचारधारेला बांधील नाही हे पाहून मला बळेच त्यांची आवडती पगडी चढवून माझा सत्कार करत आपले आवडते/नावडते बनवू पाहणारे असेच अचंबित होतात. हे पाहून मजा येते. बादवे, सत्कार म्हटलं की मला 'सरकारनामा' आठवतो. बाप रे! सांभाळून राहिलं पाहिजे. :-) :-) :-)
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 06/16/2018 - 00:18 नवीन
खाजगी पाण्याची विहीर असल्यास मालकानेच चार रट्टे द्यावेत , शिवाय पोरांचा कान पकडुन त्यांच्या पालकांकडे न्यावे , अन झालेला प्रकार सांगावा , अन मग पालकांनी पोरांची उत्तरपुजा बांधावी !
'चार रट्ट्यांची' तुमची व्याख्या नेमकी काय आहे? ह्या घटनेत नागवं करून पट्ट्याने बेदम मारहाण करून वर व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला गेला. ह्याला तुम्ही 'चार रट्टे देणं' म्हणाल का? विचार करा, त्या पोरांचं वय कितीसं आहे. अशा कोवळ्या वयात झालेली मानहानी ते जन्मभर विसरू शकतील का? मानसशास्त्राचा तुमचा अभ्यास किती आहे ह्याची मला कल्पना नाही. पण ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांना आपल्या बहरू पाहणाऱ्या पौरुषत्वाची व आत्मसन्मानाची सर्वांदेखत इतकी मानखंडना होणं हे किती 'डिव्हास्टेटिंग' असू शकतं आणि त्याचा त्यांच्यावर होणार असलेला आयुष्यभराचा परिणाम फार भयानक असेल. बाकी माझया प्रतिसादांचा वाट्टेल तसा अर्थ काढण्याच्या तुमच्या सवयीला सलाम!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा