बिथरलेले हिंदूत्व
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला.
अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.
यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला.
त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली.
पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले.
यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले.
"बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले.
हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले.
ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.
यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले.
हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो.
सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.
या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले.
पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते.
पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.
आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका.
निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.
असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले.
सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या.
ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले.
राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला.
सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.
लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.
मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.
पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
💬 प्रतिसाद
(196)
ब
बिटाकाका
गुरुवार, 04/05/2018 - 20:34
नवीन
आलात ना मूळ मुद्द्यावर, तुमच्या लेखात तर दम नाहीचाये म्हणून बिटाकाका नामक शूद्र सभासदवर घसरण्याची वेळ येतेय. अभ्यासू लेखनासाठी लै लै शुभेच्छा!!
--------------------------------
हिंदुत्ववादी म्हणजे तुमच्यामते कोण हा वरपासून खालपर्यंत विचारला गेलेला प्रश्न एकदा तरी डोळ्याखालून घातला असतात आणि उत्तर द्यायचे कष्ट घेतले असतेत तर अशी वैयक्तिक आयडीचे नाव वगैरे घेऊन टीका करायची गरज पडली नसती. त्यामुळे असोच, तुम्ही अजून वैयक्तिक घोडे नाचावलेत तर माझी काही हरकत नाही, उलट अनेकानेक शुभेच्छा!!
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
गुरुवार, 04/05/2018 - 20:50
नवीन
*क्षुद्र
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Fri, 04/06/2018 - 07:43
नवीन
अरुण जोशी यांची कमेंट आवडली. लेखाचे छान विडंबन केलेले आहे.
पण तुम्हाला वाटते तशी अॅनोलोजी पूर्णपणे लागू करता येणार नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Fri, 04/06/2018 - 08:11
नवीन
तुमचा स्पोर्टपणा देखील आवडला/भावला.
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Fri, 04/06/2018 - 08:42
नवीन
वाचताना भयंकर हसलो
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sat, 04/07/2018 - 05:43
नवीन
बिटाकाका
तुम्ही सगळ्यांनाच कमी का बरं लेखता ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 04/07/2018 - 05:47
नवीन
उदाहरण द्या. खरेतर कमी तुम्ही लेखले आहे लेखात पण तूर्तास ते राहुद्या.
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sat, 04/07/2018 - 05:50
नवीन
बिटाकाकांकडे काही उत्तरे तयार आहेत. त्यासाठीचे अपेक्षित प्रश्न आम्ही विचारावेत अशी त्यांची इच्छा आहे.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 04/07/2018 - 06:10
नवीन
वैयक्तिक बोलणे ही तुमची आवड दिसते, अशीच जोपासत राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-------------------------------------
वैयक्तिक टोलेबाजीतून वेळ मिळाला वर तुम्ही लेखात उल्लेखिलेले हिंदुत्ववादी कोण ते तेवढं (उत्तर तयार असेल तर ) सांगून टका.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 04/07/2018 - 05:52
नवीन
उत्तर भारतात हिंदू बनिया आणि जैन हे दोन भिन्न धर्म नाहीत.
========================
हिंदू बनिया लोक हिंदू ब्राह्मण वा हिंदू अन्यशी खूप दूरचे आहेत (रोटी बेटी इ त). त्यामानाने हिंदू बनिये आणि जैन खूपच घट्ट आहेत. रादर एकच आहेत.
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sat, 04/07/2018 - 12:11
नवीन
एक साधासा प्रश्न आहे
रंगपंचमीला पाणी नासल्यामुळे आणि होळीला लाकडे जाळल्यामुळे हिंदुत्वनिष्ठा कशी काय सिद्ध होते
(शक्य असेल तर या प्रश्नाला उत्तर द्यावे प्रश्नाला प्रश्न करत बसू नये)
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 04/07/2018 - 12:50
नवीन
समजा भारतात वर्षाला १०० लि. पाऊस पडतो.
त्यातले ९० लि. १-२ महिन्यात वाहून समुद्रात जातात.
४ लिटर वर्षभर घटलेली भूजलपातळी, वितळलेला बर्फ इ इ मधे जातात.
उरलेल्या ६ लिटरपैकी ४.८ लिटर शेतीला देतात.
उरलेल्या १.२ लिटरपैकी ०.९ लिटर उद्योगांना देतात.
उरलेल्या ०.३ लिटरपैकी ०.१ संस्थांना देतात.
आता उरलेले ०.२ लिटर पाणी देशभर वर्षभर घरगुती वापरसाठी असते.
त्यात एक दिवस होळी खेळली तर जग इकडचे तिकडे होइल म्हणणारे, म्हणवून घेणारे शुद्ध महामूर्ख असतात.
----------------
कारण ४.८ लिटर शेतातून आलेले पाणी खते आणि किटकनाशके असली वीषे घेऊन येते. उद्योगांनी झिरो लिक्विड डिस्चार्ज करावा वा एम पी सी बी नॉर्म पाळावे असा नियम आहे तो ४% लोक पाळत नाही. संस्था नि घरे यांचे पाणी प्रत्येक गावात नि शहरात ट्रीट करूनच नदीत सोडावे असा नियम आहे तो भारतात १% पाळला जात नाही.
--------------------------
तरी लोक नेमके रंगपंचमीलाच (होळी एवजी) बोंबा ठोकतात म्हणजे
१. एकतर मूर्ख आहेत.
२. किंवा जलक्षेत्रातलं काही कळत नाही.
३. किंवा उत्साही पुरोगामी आहेत.
४. किंवा जे हे सगळं जाणतात, ते हरामखोर हिंदूविरोधी आहे. त्यांना जोर फक्त त्याच दिवशी येतो. ते निर्बुद्ध लोकांचं असं मत बनवतात कि जे काय वाईट होतं ते त्याचं दिवशी होतं.
सबब रंगपंचमी उत्साहाने साजरी करणे हिंदूत्ववादी आहे. कारण तो ऐतिहासिक सण आहे नि त्याने ०.००००००००००१% देखील जलप्रदूषण होत नाही. अक्कलवंतांना जलप्रदूषण म्हटले कि नक्की कशावर जोर द्यावा याचीही अक्कल हवी. आणि आपल्या परंपरांवरचे प्रेम भलतेच पातळ नसावे. आणि रंगपंचमीला जास्त किंवा फुकट पाणी सरकार देत नाही.
====================================
लाकडाची आकडेवारी असू दे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 07:13
नवीन
गोटा, हा प्रतिसाद कळला आहे का?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sat, 04/07/2018 - 14:51
नवीन
हे भारीये. स्वतःला विचारलेल्या प्रश्नांना बगल देऊन वैयक्तिक टोलेबाजी आणि दुसर्यांना हा वैधानिक इशारा. लैच भारी.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 04/07/2018 - 15:31
नवीन
प्रश्नाला प्रश्न न करता कशी काय सिद्ध होते हे सांगीतलं आहे. बघू.
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sat, 04/07/2018 - 18:45
नवीन
माझे एकच विचारणे आहे प्रदूषणामधे हिंदुत्व शोधावं का
कुठे सावरकरांचे हिंदुत्व आणि आज हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेल्या वाटेल त्या गोष्टी
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 04/07/2018 - 20:36
नवीन
अवश्य शोधावं. का ते सविस्तर लिहिलं आहे. कळलं नाही का?
===============================
उद्या कोणी गोंगाट करेल हिंदूंनी प्रजनन थांबवावं. आणि तुम्ही विचाराल प्रजननामधे हिंदुत्व शोधावं का?
==========================================
कोण सावरकर? त्यांचं कोणतं हिंदुत्व? गाय उपयुक्त पशू हा शास्त्रीय आणि जीव पुन्हा जन्म घेतो हा अशास्त्रीय विचार एकदाच करणारा माणूस! आणि माणसाची एक क्लिष्ट तात्विक विचारसरणी असेल तर ती लोकांपर्यंत पोचवायला एक संघटन हवं. जसं शिवाजीचं राज्य होतं, हेडगेवारांचा संघ आहे, दयानंद सरस्वतींचा आर्य समाज आहे, समाजवाद्यांचा राष्ट्र सेवा दल आहे, दाभोळकरांची अनिंस आहे, तसं. लोकांनी काय सावरकरांची पुस्तकं वाचून हिंदू धर्म पाळावा कि काय? सामान्य गावकर्यांपर्यंत सावरकरी हिंदुत्व पोचवणारं काहिही नाही म्हणून त्यांचा हिंदुत्ववाद पिचका आहे. होळी आणि रंगपंचमी जपणारे सामान्य हिंदू जे हिंदूत्व जपतात तेच खरं हिंदूत्व.
===============================
सावरकरांना (म्हणे) तरुणपणी भारतीय इस्लाम आवडे (वा पंगा इ नव्हता.). नंतर (म्हणे) त्यांचं मत विखारी झालेलं. हिंदू लोकांनी नक्की काय करावं त्यांचं हिंदुत्व व्हर्जन फॉलो करताना?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sat, 04/07/2018 - 22:14
नवीन
सहीय !!
जर आज हिंदु समाज बिथरलेला आहे अस वाटत असेल तर तो खुपच सोशीक आहे ह्याची ही ग्वाही आहे. ईतकी पीडा तर देशात कोणत्याच समाजाला दिली गेलेली नाही.
दिल्लीत स्वातंत्र्यानंतर एका रोडला औरंगजेबच नाव देण्यात येत, तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये
१९८० साली ३,५० लाख काश्मिर पंडीत देशोधडीला लागतात तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये
एका पडीक वापरात नसलेल्या बाबरी मस्जिदीला पाडल्या बद्दल हजारो हिंदुंचे प्राण घेतले गेले तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये
स्वातंत्रानंतर ७० वर्षांपर्यंत हिंदु समाजाच्या प्रमुख देव श्री राम यांच्या जन्म स्थानाच्या देवळा बद्दल भांडायला लागतय तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये
लाखो हिंदुंना ( कर्नाटकातील, केरळातील ) फक्त ते हिंदु आहेत ह्या कारणाने ठार मारणार्या टिपु सुलतानला दे शाचा हिरो ठरवण्यात येत
तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये ( जुन्या काळात केरळातले ब्रांम्हण हे देशात प्रमुख उच्च शिक्षित हिंदु होते, उदा, शंकराचार्य )
"पोलिस नसले तर १५ मिनीटात हिंदुस्तानला हिंदु विरहीत करुन टाकु " ईती ओवेसी बंधू , हे सर्व मिडीयाला माहीत असुन सुद्धा ते जिवंत आहेत, त्यांच्या केसाला धक्का लागलेला नाही तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये
वरचे उदाहरण फक्त दाखल्यासाठी दिलेले आहेत.
जर तरी सुद्धा हिंदुंनी बिथरु नये अस वाटत असेल तर वाळुत डोक खुपसुन बसा !!
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 04/08/2018 - 02:30
नवीन
सर, इथे हिंदू म्हणून कोण तुम्हाला अपेक्षित आहे ?
गावात घोड्यावरून मिरवू शकत नाही, 21 व्या शतकात ही,
हत्या होते, तो दलित तरुण हिंदु म्हणून तुम्ही गणला होता का ?
स्त्रीला रेल्वे फलाटावर पाहून हस्तमैथुन करणारा तरुण हिंदू असतो का ? उघड उघड स्त्रीची छेड काढली तरी आजूबाजूचे हात धरून उभे राहणारे हिंदू असतात का ?
काही जण ब्यांका बुडवून पळून गेलेत, ते हिंदू होते का ?
डोक्यावरून मैला वाहणारे, हाताने गटार साफ करणारे हिंदू असतात का ?
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sun, 04/08/2018 - 06:20
नवीन
पगला गजोधर
तुमचे प्रश्न अगदी मार्मिक आहेत पण त्याची उत्तरे मिळण्याची शक्यता वाटत नाही.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 07:01
नवीन
गोटाजी,
तुमचा लॉजिकचा लै मोठा प्रोब्लेम हाये.
=====================================
हिंदूंनी बिथरणे योग्य कि अयोग्य हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण सुयोधन आणि दुर्योधन यांच्यात वितुष्ट / मतभेद आहेत, म्हणून पांडवांशी लढूच नये?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sun, 04/08/2018 - 13:45
नवीन
न गो साहेब
प गजोधर ने विचारलेल्या प्रश्नाची ऊत्तरे
खरेतर तुम्हीच द्यायला पाहीजेत !!
तुम्ही उभी केलेल्या केसचा तो प्रेमाईस असेल !!
पण तुम्ही दुसर्यावरच तोफा डागताय !,
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 06:49
नवीन
पगला गजोधर,
तसे तुम्ही दिलेले सर्वच मुद्दे खोटारडे आहेत.
=================
पण खरे मानले तरी, लहान भावाशी भांडण आहे म्हणून वाडा पाटलाला लूटू देणं मूर्खपणा आहे.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 06:52
नवीन
आधुनिक सॅनिटेशन सायन्सचा शोध होइस्तो, जगात सर्वत्र मैला, गटार साफ करणे कसे हाताळले जाई?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 06:54
नवीन
११० कोटी हिंदूंनी सगळे फलाट चिकचिक करून ठेवलेत कि काय?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 06:57
नवीन
कहना क्या चाहते हो भाई? एका हिंदूने बँक बुडविली म्हणून हिंदू धर्म बुडवायचा?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 04/08/2018 - 07:07
नवीन
एखादया भरकटलेल्या अहिंदू तरुणाने जर अतिरेकी कारवाय केली , तर त्या संपूर्ण अहिंदू धर्मा विषयी, हिंदूंना बिथरवून का टाकलं जातंय ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 07:11
नवीन
त्या अहिंदू धर्माचे १८ कोट लोक भारतात आहेत. त्यांना इजा करायला बिथरलेले ११० कोट लोक हिंदू आहेत. प्रत्यक्षात काय झालंय का? पुरोगामी सोडून कोणाचंही डोकं बिथरलेलं नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 04/08/2018 - 08:33
नवीन
बघा, धागा लेखकाचा हा धागा परत एकदा वाचा नं प्लिज...
त्याने ११० कोट लोकांना उद्देशून "बिथरलेले" हा शब्द प्रयोग केला आहे, असा आपला विव्ह का झाला असेल बरे ? याबद्दल जरा मला विचार करू द्या प्लिज...
कारण ते उत्तर कोणी देतंच नाहीये...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 10:51
नवीन
मी अगदी सुस्पष्ट उत्तर दिलं आहे. बिथरलेत ना हिंदू, ना अहिंदू, ना हिंदुत्ववादी, ना त्यांचे विरोधक. बिथरलेत फक्त पुरोगामी.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Sun, 04/08/2018 - 11:13
नवीन
मग तुम्हीही लगेहाथो एक लेख पाडाच...
"बिथरलेले पुरोगामी", व सप्रमाण माहिती सह लिहा प्लिज..
वाचायला आवडेल आपले लेखन
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 04/08/2018 - 08:10
नवीन
गजोधारजी, ते घोड्यावरून फिरले म्हणून हत्या झाली ही बातमी तुम्ही अर्धवट सांगून लोकांचे विचार चुकीच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत का? अशा घटनांचा विकटीम म्हणून वापर करणे गैर आहे असे तुम्हाला अजिबात वाटत नाही का?
************************
प्राथमिक तपासात ही हत्या छेडछाड प्रकरणातून झाली असल्याचा दावा पोलीस करत आहेत. ही गोष्ट तुम्हाला माहीत नाहीये की माहीत नाही असा दाखवून चुकीचा संदेश द्यायचाय?
************************
इथे जसा हे हिंदू आहेत का वगैरे प्रश्न विचारावासा वाटला तसा तो लेखकाला का नाही विचारावा वाटला??
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 07:09
नवीन
आजकालच्या हिशेबानं बामनाच्या बाईवर झालेला बलात्कार हा पुरुष - स्त्री अन्याय इ सदरात येतो.
हाच बलात्कार दलित स्त्रीवर झाला तर तो हमखासपणे तिच्या लिंगावर नसून जातीवर असतो.
=========================
बा द वे, गुजरात, राजस्थानमधे तबेले सांभाळणारे सगळे दलितच असतात. ही बातमी देणारा पठ्ठ्या लै शहाणा पुरोगामी दिसतो.
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sun, 04/08/2018 - 06:17
नवीन
डँबीस साहेब तुमची कॉमेंट वाचली
पण प्रदूषण केल्याने आणि पाणी नासल्याने टिपू सुलतानचा बंदोबस्त कसा काय करता येईल ?
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 06:50
नवीन
असलं फ्रेजिंग डोक्यात घडायला जी बुद्धी लागते तिला पुरोगामी बुद्धी असे म्हणतात.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 07:04
नवीन
माणूस (कींवा कोणताही सजीव) नुसते साधे जगतो तेव्हा खूप प्रदूषण करत असतो. प्रदूषण होऊ नये म्हणून जगू नये असं म्हणाल का?
पाण्याची इतकी आकडेवारी तुम्हाला दिली, त्यातलं काहीतरी तुम्हाला कळालंय का?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Sun, 04/08/2018 - 13:36
नवीन
न गो साहेब ,
कोणती कॉमेंट ? मी अशी कोणतीही कॉमेंट केलेली नाही !!
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Sun, 04/08/2018 - 16:19
नवीन
भीषण वायू प्रदूषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहर होण्याचा बदलौकिक शाबूत राखणाऱ्या राजधानी दिल्लीचे गॅस चेंबर
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sun, 04/08/2018 - 16:40
नवीन
दिल्लित भारतातले सर्वाधिक पुरोगामी राहतात.
- Log in or register to post comments
न
नर्मदेतला गोटा
Mon, 04/09/2018 - 09:54
नवीन
इथे प्रदूषणाचा विषय आहे. पुरोगामी वगैरे चा काय संबंध सांगू शकाल का ? आपला दिल्लीचा काही अनुभव आहे का ?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 04/09/2018 - 12:27
नवीन
नर्मदेचा गोटा ,
ईतका मोठा लेख लिहीला म्हणजे तुम्हाला माहीती असायलाच पाहीजे कि तुम्हाला "हिंदु" म्हणजे कोण अपेक्षित आहे !
स्वतंत्र भारतात हिंदु बिथरणे कधी सुरु झाले ?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 13:01
नवीन
तमाम हिंदू नव्हे , तर "हिंदुत्ववादी" बिथरले आहेत काय ? असा त्यांचा धागा आहे , असे माझे मत आहे.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 04/09/2018 - 13:06
नवीन
गजोधर साहेब, तेच तर त्यांना लै येळा इचारण्याचा प्रयत्न झाला. हिंदु आणि हिंदुत्ववादी यांची व्याख्या काय आणि शिवाय फरक काय?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 13:09
नवीन
आहो आम्हीच तुम्हास आधी विचारले, पण तुम्ही उत्तर देण्यास टाळंटाळ करत आहात हे पाहिल्यावर मग इंटरेस्ट गेला.
आधी तुम्ही सांगा, मग दुसऱ्यास विचारा.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 04/09/2018 - 13:19
नवीन
वाईच परत जाऊन वाचा वर. मी माझी व्याख्या तिसऱ्याच प्रतिसादात दिली होती. पण तुम्ही लेखकाला विचारले नाही म्हणजे तुम्ही अमुक एक व्याख्या गृहीत धरलेली असायला हवी ना? लेखकाने तर स्पष्टीकरण दिलेच नाही शिवाय बाण, वर्तुळ, जैन, शहा असा बराच घोळ घालून अजून आपलीही व्याख्या यायचीच आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 13:29
नवीन
ठीक आहे,
माझ्या वैयक्तिक मते, भारतीय "सेक्युलर" नागरिक हे "हिंदू" आहेत,
व 'भारतीय-सेक्युलर-विरोधक' हे 'हिंदूत्ववादी' आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 04/09/2018 - 21:06
नवीन
उगाच आपली शंका म्हणुन विचारतो : तुमच्या व्याख्ये मध्ये सगळे ब्लॅक अॅन्ड व्हाईट सारखे डायकोटोमस आहे की मधे काही ग्रे अरीया देखील आहे ?
उदाहरणार्थ काही लोक हिंदु बौध्द जैन शीख लिंगायत(?) वगैरे भारतीय धर्मांना ( आणि पारशी , निरीश्वरवादी अन्य कोणत्याही विचारधारांना देखील) समान मानतात त्यांच्या बाबब्त सेक्युलर आहेत पण अब्राहमिक धर्मांना , जे की स्वतःचाच धर्म श्रेष्ठ आणि बाकी सारे हीन काफीर असा प्रचार करतात त्यांना परके मानतात त्यांना तुम्ही काय म्हणणार , हिंदु की हिंदुत्ववादी ?
हिंदू--------?----------हिंदूत्ववादी
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 04/10/2018 - 04:25
नवीन
तुमच्या साठी परत एकदा अपडेटवून परत लिहितो.
.
माझ्या वैयक्तिक मते, "सर्व भारतीय सेक्युलर नागरिक" हे "हिंदू" आहेत,
व 'भारतीय-सेक्युलर-विरोधी' हे 'हिंदूत्ववादी' आहे.
त्याच तर्कांने
हिंदु = सुफी
तर
हिंदुत्ववादी = तालिबानी
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 04/10/2018 - 05:38
नवीन
LLRC
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 04/10/2018 - 05:59
नवीन
#GCNA
Guruji Can Not Answer
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »