Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

व
विवेकपटाईत
Tue, 03/03/2026 - 07:17
🗣 162 प्रतिसाद
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9360 views

🗣 चर्चा (162)
ल
लिओ Sat, 03/07/2026 - 11:28 नवीन
एक करार करु यात भविष्यात जर तुम्हाला जर परत लिहावेसे वाटले कि १९७१ इंदिरा गांधीनी कित्येक हजार चौ. की. मी. चा प्रदेश युध्दानंतर परत केला अमुक केले तमुक केले. आणि सर्व तोट्यात व्यापार केला तर ते खुशाल लिहा. पण छप्पनेश्वरांनी २०२५-२०२६ मध्ये सांगितल्यावर रशियाकडुन घेणे बंद केले व सांगितल्यावर रशियाकडुन तेल घेतले (कोणी ते विचारु नका) . यातली एक मेख लपवत आहात. या युध्द परिस्थितीत रशिया सवलती च्या दरात तेल देतच नाही कदाचित महाग देत असेल, ठिक आहे आपली गरज भागत आहे. पण छप्पनेश्वरांची छप्पन इंचाची छाती झुकल्यामुळे हे तेल रशियाकडुन मिळत आहे .(या केस मध्ये कोणाची छाती झुकली हे विचारु नका ). या सगळ्याचा अंधभक्ताना हा व्यापार कळुन पण छप्पनेश्वर सर्वोतम. एकुण या केसमध्ये बुडावर पडलो तर नाक वर आणि नाकावर पडलो तर बुड वर. पण फायद्याचा व्यापार झाला ( गुजराती एकदम एक्सपर्ट ). १९७१ मध्ये सर्व बाजुनी तोट्याचा व्यापार झाला हे सिध्द करायला अंधभक्त एकदम एक्सपर्ट. मुद्दा काय अंधभक्तांनी १९७१ च्या तोट्यातील व्यापाराबद्द्ल लिहायचे. आणि मोरुंनी ( मोदी रुग्ण) २०२५-२०२६ च्या फायद्याच्या व्यापाराबद्द्ल लिहायचे.. ???
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 03/07/2026 - 07:46 नवीन
थिंक बँक तूनळी वाहीनीवर अविनाश धर्माधिकारी यांच्या मुलाखतीत त्यानी असा उल्लेख केलाय की खामेनी ऑपरेशनसाठी मोसादने किमान १ वर्षभर ईराण्/तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करुन खामनी आणि त्यांच्या ईनर सर्कलमधील महत्वाच्या अधिकारी लोकांवर पाळत ठेवली आणि त्यातुन त्यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी होणार्‍या मीटींगची जागा कळली. हेजबोल्लावर झालेला पेजर अ‍ॅटॅक असो किवा ही बातमी--मोसाद नेहमीच काहीतरी नवीन युद्धतंत्र वापरत असते जे जगाला तोंडात बोट घालायला लावते. पण वरील मुद्द्यानुसार आपले ट्रॅफिक कॅमेरे कितपत सुरक्षित आहेत? सायबर युद्ध हा आता नवीन युद्धाचा अटळ भाग आहे आणि डेटा प्रोसेसिंग साठी आपण गुगल अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट वर अजुन किती काळ अवलंबुन राहणार आहोत हा कळीचा मुद्दा आहे. हे म्हणजे तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू कुठे आहे हे चोराला माहीत आहे फक्त त्याचा चोरी करायचा मूड कधी होईल ते बघायचे. ते जाउद्या- बहुतेक चिनी बनावटीचे फोन आपण वापरतो, हुआवे, ओप्पो आणि काय काय , ते आपली माहीती चोरुन तिकडे पाठवत नाहीत कशावरुन? फोनवरील अनेक अ‍ॅप तुम्हाला लोकेशन ऑन ठेवायला भाग पाडतात त्यामुळे बहुतेक सगळ्यंच्या फोनवरील जी पी एस ऑन असते त्याचे काय? म्हणजे तुमचा रोजचा दिवसभराचा ट्रॅफिक पॅटर्न गुगल ला माहीत आहेच. फक्त तो कोणाला आणि कधी विकायचा एव्हढाच विषय आहे. जाता जाता- साले हे मिपावर चकरा मारायचे व्यसन लागलेय. ऑफलाईन मोडवर जगण्यासाठी काय करावे?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 03/07/2026 - 08:05 नवीन
मोसादने किमान १ वर्षभर ईराण्/तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक करुन खामनी आणि त्यांच्या ईनर सर्कलमधील महत्वाच्या अधिकारी लोकांवर पाळत ठेवली आणि त्यातुन त्यांना हल्ल्याच्या दिवशी सकाळी होणार्‍या मीटींगची जागा कळली.
खामेनी हे न समजण्याइतका मूर्ख नव्हता. त्याने ठरवले असते तर इराणमध्ये सुरक्षित स्थळी नक्कीच लपून बसता आले असते. परंतु देशातील विरोधकांना संधी मिळू नये म्हणून त्याने शहीद होणे पत्करले, आणि त्यात तो जिंकलही. आता इराणी जनता एक होऊन अमेरिका आणि त्याच्या मित्रांविरुद्ध एक होऊन प्रतिकार करत आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/07/2026 - 12:05 नवीन
तुमची ही प्रतिक्रिया आणि आग्या यांचा प्रतिसाद,हाच चर्चेचा आशय फेबु, तूनळीवर अनुभवला आहे. खूप हसू आलं, किती सारखे विचार प्रवाह सोशल मीडिया तयार होतात :) Predictable!!!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/07/2026 - 12:11 नवीन
जाता जाता- साले हे मिपावर चकरा मारायचे व्यसन लागलेय. ऑफलाईन मोडवर जगण्यासाठी काय करावे?
मिपाच व्यसन जरा बरंय! ऑफलाईन मोडसाठी -दिवसातून ४ तास मोबाईल / सिस्टिम पासून दूर जा. माळ्यावर टाका. दिसणार नाही असे ठेवा. -लेकरांचा २ तास अभ्यास घ्या. १ तास विदाउट मोबाईल /डिजिटल गोष्टी फिरायला जा. चहा /पेय गॅलरीत पीत जा, सूर्य चंद्र पाहत!!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/07/2026 - 12:18 नवीन
एक सांगू का, तुमचं काम इंटिरियस्टिंग असेल तर सिस्टिमवर लॉग इन आलो तरी सोशल मीडिया आठवत नाही. दोन दिवस मी सिस्टिमवरच आहे पण काम नवीन आवडीचं आहे त्यामुळे सोशल मीडिया आठवलंच नाही. WFH म्हणूनच बोर आहे. काहीच माणसं दिसत नाही. रच्यकाने माजगावकर wfo आहे पण इथे माणसं कमी म्हणून बोर होतं :) थोडं तरी स्पर्धात्मक वातावरण हवं ;)
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 03/07/2026 - 07:51 नवीन
अभिनंदन पटाईत काका!!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/07/2026 - 12:17 नवीन
भारताला अमेरिकेने ३० दिवस रशियन तेल विकत घेण्याची अनुमती दिली हा दावा वाचून हसायला आले. मुळात भारताने रशियाकडून तेल विकत घेणे थांबविले नव्हते ना तेल विकत घेण्यासाठी अमेरिकेची अनुमती मागितली होती. गेले वर्षभर ट्रंप भारताला दरडावत आहे की रशियाकडून तेल घेऊ नका. भारत आपल्या धमक्यांकडे दुर्लक्ष करतोय हे पाहून ट्रंपने चवताळून आयातशुल्क वृद्धी केली. तरीही भारताने लक्ष न देता तेलखरेदी सुरूच ठेवली. आता ट्रंपच्या अधिकाऱ्याने परस्पर घोषणा करून ट्रंपप्रमाणे स्वतःस हास्यास्पद बनवून घेतले. भारताने अत्यंत प्रगल्भपणे ट्रंपच्या कोणत्याही दाव्याचा प्रतिवाद न करता संपूर्ण दुर्लक्ष करून ट्रंपला अदखलपात्र केले आहे. याच विषयावर How India had the last laugh after Trump's Russian oil waiver हा उत्कृष्ट लेख वाचनात आला.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/07/2026 - 15:08 नवीन
BUSTING “We never stopped buying Russian oil, discount na milne ki wajah se kam kar diya” PROPAGANDA

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 03/07/2026 - 16:30 नवीन
माहीत नाही का? पण मला हे युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल असे वाटतेय, हे कोरोनासारखे होईल असे वाटतेय, कोरोना आला तेव्हा पहिले एक दोन महिने आपल्याला काही पडली नव्हती कारण तो तिकडे चीनमध्ये होता जसजसा मार्च उलटू लागला तसतसा आपल्याकडे परिणाम दिसू लागला.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 03/07/2026 - 17:25 नवीन
तिसरं महायुद्ध वगैरे नाही झालं तर चांगल आहे. उलट जे चालू आहे ते पण लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. लवकरात लवकर ट्रम्पला अमेरिकेने घरी बसवयला पाहिजे. बायडेन अध्यक्ष असतानाच त्याला त्याच्या पक्षाने बदलला असता तर कदाचित ट्रम्प आलाही नसता.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 03/07/2026 - 17:39 नवीन
मला वाटतय चिन, रशिया तयारी करताहेत, एकदा तयारी झाली येत्या १५ दिवसात की धमाके करतील.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 03/07/2026 - 18:06 नवीन
इराणमध्ये खामेनी गेल्यावर बंडाळी होईल आणि युद्ध लांबणार नाही अशी स्वप्ने बघणाऱ्या ट्रम्पला पळावे लागणार हे नक्की. रशिया आणि चीनला मध्ये पडावे लागणार नाही.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 03/07/2026 - 18:16 नवीन
रशिया स्वतःच अडकलाय तो काही इराणची मदत करणार नाही. तर चीन इराणची मदत कारण्याऐवजी तैवान घायचा प्रयत्न करेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 03/07/2026 - 18:34 नवीन
मला वाटतय नाही, अमेरिकच्या दादगिरीविरुद्ध दुसरे टोक उभे राहण्याची ही योग्य संधी आहव मी चिन ती भूमिका निभावेल, अजूनही चीनच्या गोटातून हालचाल का नाही हे कळत नाहीये. अजून १५ दिवस वाट पाहून मग चिन प्रत्यक्षात मैदानात उतरेल. ह्या सगळ्यात प्रचंड वाट जगाची लागणार आहे!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/08/2026 - 04:29 नवीन
दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी विमान शेवटच्या क्षणी रद्द केल्यानंतर शेवटी तिसऱ्या विमानाने काल मध्यरात्री मुंबईत परतलो. आता पुण्यात यायला निघालोय. मुंबईत एक बदल दिसला. विमानतळापासून दादरपर्यंतच्या बहुसंख्य दुकानांवर दुकानाचे नाव मराठीत लिहिलेले दिसले.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Sun, 03/08/2026 - 06:20 नवीन
सुखरूप परतल्याबद्दल शुभेच्छा. आठवडाभरातील तेथील अनुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 03/08/2026 - 06:54 नवीन
अरे वा! सुखरुप आल्याबद्दल अभिनंदन, युद्धाचे अनुभव नक्की लिहा!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 03/08/2026 - 17:19 नवीन
सुखरूप आलात हे चांगले झाले.
  • Log in or register to post comments
त
तिता Mon, 03/09/2026 - 03:07 नवीन
इस्रायलने इराणच्या तेलसाठ्यांवर हल्ला केला आहे. ह्याचा बदला घेण्यासाठी इराण असा हल्ला सौदी, यूएई, बहरैन, कतार, कुवेत मध्ये करू शकतो. असे झाले तर जगावर गंभीर परिणाम होतील. इराणचे अरब जगताशी कित्येक शतकांचे वैर आहे. पण ह्या युद्धात इराण व्यतिरिक्त अरबांचेच मोठे नुकसान आहे. बरे, ते हे युद्ध लढत पण नाही आहेत. सर्व वैर बाजूला ठेऊन अरबांनी ह्या युद्धाचा विरोध केला पाहिजे. हे युद्ध म्हणजे संपूर्ण जगाचे नुकसान आहे.
  • Log in or register to post comments
क
कोण Mon, 03/09/2026 - 14:26 नवीन
अमेरिकेने हे युद्ध सुरू करण्याचे कारण काय असू शकते यावर चर्चा करूया. काही काळासाठी मोदी, राहुल, सोनिया आणि तुमच्या सर्व आवडत्या पात्रांना बाजूला ठेवा. मला वाटते की हे युद्ध AI आणि डेटा सेंटर नियंत्रणाबद्दल आहे. डेटा सेंटरला भरपूर ऊर्जेची गरज आहे आणि चीनला इराण आणि बहुधा व्हेनेझुआला येथून खूप स्वस्त तेल मिळत आहे. जर अमेरिका या उर्जेवर नियंत्रण ठेवू शकली तर ते चीनची गती कमी करू शकते. युद्ध सुरू झाल्यानंतर, जटिल परिस्थितीचा हवाला देत चीनने अलीकडच्या काळात आपले वाढीचे लक्ष्य कमी केले आहे. आता आणखी एक चीन समर्थक क्युबा अमेरिकेच्या हाती पडणार आहे. त्यामुळे, मला वाटते की या युद्धात आणि इतर यूएस कृतींमध्ये आणखी बरेच काही आहे कारण त्यांना चीनची गती कमी करायची आहे आणि पृथ्वीवरील दुर्मिळ सामग्रीच्या ब्लॅकमेलिंगला धक्का बसवायचा आहे. तुम्हाला काय वाटते?
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 03/09/2026 - 19:42 नवीन
तेल आणि अमेरिकन युद्धाचा संबंध नाही. एके काळी होता पण आता नाही. अमेरिकन अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून नाही. तेल कंपन्या पहिल्या दहा मध्ये सुद्धा नाहीत. फ्युजन आणि ते सिद्ध होईपर्यंत साधारण आण्विक ऊर्जा हे प्रमुख ऊर्जेचे स्रोत असणार आहेत. चीन, भारत, अमेरिका ह्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत. मोठ्या अमेरिकन कंपन्या जसे मायक्रोसॉफ्ट, गुगल इत्यादींनी आण्विक प्रकल्प विकत घेणे सुरु केले आहे. सध्या अमेरिका तेल निर्यात करते आयात करत नाही. इराण युद्धाने रशियन क्रूड ची डिमांड पुन्हा वाढली हे युरोप आणि अमेरिका साठी भूराजकीय नुकसान आहे. युद्धाचा खर्च आणि तेल ह्यांचे गणित बसत नाही. उदाहरण द्यायचे तर जमिनीतील तेलाची किमंत शून्य. तेल बाहेर काढले तरच त्याला किमंत आहे. ते बाहेर काढण्यासाठी आधी खर्च करावा लागतो. म्हणजे व्हेनेझुएला मध्ये १०० डॉलर्स चे तेल जमिनीत आहे तर ते बाहेर काढण्यासाठी, रिफायिं करण्यासाठी ३० - ४० डॉलर्स खर्च आधी होतात. त्याशिवाय भांडवल खर्च सुद्धा आहे. ते तेल मिळविण्यासाठी युद्ध करायचे तर आधी ५०० बिलियन डॉलर्स खर्च करावे लागतात. ते गणित जुळत नाही. इराक युद्धाचा खर्च हा इराक मधील एकूण तेलाच्या किमतीच्या साधारण ५०% होता. म्हणजे तेल बाहेर काढायचा खर्च धरल्यास एकूण नुकसान होते. अमेरिकन युद्धे हि नेहमीच अनेक कारणासाठी होतात (multi causal). इराण युद्धाचे प्रमुख कारण इस्राएल हे आहे. बीबी ना आपली सत्ता ठेवण्यासाठी देशाला युद्धाच्या खाईत कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अमेरिकन राजकर्त्यांनी आपल्या भयोपदानांत अडकवले आहे. ट्रम्प साहेबांच्या अंगावर एप्सटिन प्रकरण शेकत आहे. जनतेचा बुद्धिभ्रम करण्यासाठी काहीतरी इतर प्रकरण आवश्यक आहे. इस्राएल चा साम्राज्यविस्तार, ट्रम्प साहेबाना diversion, आणि त्यातून चीन चे नुकसान झाल्यास आणखीन फायदा हे हेतू आहेत असे वाटते. इराक मधील युद्धासाठी इस्राएल कारणीभूत होता. त्याशिवाय ट्रम्प ऍडमिन मधील लोकांची. भांडणे सुद्धा इथे कारणीभूत आहेत. जे डी वन्स हे ट्रम्प आणि पीटर थील ह्यांनी रस्त्यावरून उचलून आणलेल्या कुत्र्याप्रमाणे आहेत. ट्रम्प साहेबानी भुंक म्हटले कि वन्स त्या दिशेने भुंकतात. हा गुण सध्या त्यांच्यासाठी चांगला असला तरी पुढील निवडणुकीत त्यांच्या अंगाशी येणार आहे. म्हणून रुबिओ आणि हेगशेठ हे आपली फिल्डिंग लावत आहे. युद्धे टाळणे हे वन्स ह्यांचे पालुपद होते. युक्रेन युद्ध अजून चालू आहे, व्हेनेझुएला मध्ये अमेरिकन हस्तक्षेप, आता इराण युद्ध, पुढे म्हणे क्युबा मध्ये हल्ला हे सर्व वन्स ह्यांना डिफेन्ड करणे कठीण जाईल. ह्या उलट हेगशेठ आपण स्वतः राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उडी घेतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी अमेरिकेला युद्धांत भाग घेणे आवश्यक आहे. जेव्हडी युद्धे जास्त तितके हेगशेठ ह्यांना आपला उदो उदो करून घेणे शक्य होईल. त्याशिवाय इस्राएल जे अनेक अमेरिकन नेत्यांना दावणीस बांधून ठेवत आहे त्याचा सुद्धा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. युद्ध चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे. काही विमान हल्ले केल्यास इराण कोसळेल, यादवी माजेल इत्यादी होरा ट्रम्प साहेबांचा असावा. पण तो सपशेल चुकीचा ठरला आहे. खोमिनी ह्यांना मारून सुद्धा काहीही विशेष साध्य झाले नाही. खोमेनी हे इराण आण्विक अस्त्रांच्या विरुद्ध होते. इराण कडे आज आण्विक अस्त्रें नाहीत ह्याचे प्रमुख कारण खोमेनी आहेत. त्यांनाच ठार मारून आण्विक अस्त्रे इराण मिळवणार नाहीत हे तर्कशुद्ध नाही. इस्राएल चे फार नुकसान करण्याची क्षमता इराण कडे नाही. माझी जवळची मैत्रीण IDF मध्ये कार्यरत होती आणि तिचा काही परिवार इस्राएल मध्ये आहे. त्यांच्या मते तेल अवीव वर दिवसाला १०-१५ क्षेपणास्त्रें येतात त्यातील बहुतेक हवेत नष्ट केली जातात पण एखाद दुसरे खाली कोसळते. पण दुबई इत्यादी ठिकाणी मात्र हल्ले जास्त प्रभावी आहेत. इस्राएल प्रमाणे त्यांच्याकडे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कार्यरत नाही. ह्या हल्ल्यांनि त्याच्या जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. इस्राएल इराण च्या भांडणात "मुझे क्यू पिटा ?" हाच प्रश्न त्यांची मंडळी विचारात आहेत. पण त्याच वेळी इराण हे एक जुने राष्ट्र आहे. लोकांची संस्कृती जुनी आहे. त्यामुळे हा देश अचानक कोसळेल हि शक्यता कमी आहे. इराण मध्ये सर्वत्र असंख्य क्षेपणास्त्रे जमिनीत ठेवली आहेत. त्याशिवाय इराण असंख्य शाहिद यन्त्रभ्रमर निर्माण करतो. ह्याची किंमत सुद्धा त्यांच्या साठी कमी आहे. त्यामुळे अमेरिका, इस्राएल चे वर्चस्व असले तरी इराण अगदीच अबला नारी नाही. युद्ध जास्त काळ टिकले तर अमेरिका इस्राएल ला अब्जावधींचे नुकसान रोज सोसावे लागते. ३५,००० डॉलर्स च्या यन्त्रभ्रमर साठी १० मिलियन डॉलर्स ची यन्त्रभ्रमर विरोधी अस्त्रे वापरावी लागतात. हे किती काळ टिकू शकते ?
  • Log in or register to post comments
क
कोण Mon, 03/09/2026 - 14:34 नवीन
आणखी एक निरीक्षण म्हणजे हवाई दलापेक्षा अमेरिका इराणच्या नौदलाला अधिक लक्ष्य करत आहे. अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवायचे आहे, असे यावरून स्पष्ट होते. जर ते यावर नियंत्रण ठेवू शकले तर कमी-अधिक प्रमाणात ते स्वस्त तेलाच्या स्त्रोतापासून चीनची गळचेपी करू शकतात. "चीन रीअर अर्थ मटेरियल ब्लॅकमेलिंगला हे मोठे काउंटरवेट असेल."
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/09/2026 - 15:04 नवीन
इस्रायलला इराणच्या अणुप्रकल्प बंद करायचा आहे आणि हमास, हुती, आणि हिझबुल्लाह च्या मुळावरच कुर्हाड घालायची आहे. याची कारणे मी वर दिलेली आहेतच अमेरिकेचा हेतू चीनवर नियंत्रण ठेवायचे आहे यात व्हेनेझुएला आणि इराण हे दोन चीनला तेल पुरवणारे दोन देश याना वेसण घालायची आहे याशिवाय इराण चीनला युआन चलनात तेल विकत होता. त्यामुळे डॉलरच्या मक्तेदारीवर निर्बंध येत होते. ब्रिक्स देश या डिडोलारायझेशन मध्ये अग्रेसर होते. त्यात रशिया विरुद्ध युक्रेनला उभे करून त्यांनी रशियाच्या तेलावर निर्बंध टाकले आता या युद्धात चीनला शह द्यायचा आहे. कारण चीनने दुर्मिळ धातू वर निर्माण केलेली मतदारी अमेरिकन कंपन्यांच्या गळ्यात एक धोंड झालेली आहे त्यातून मुक्तता करणे हा एक हेतू आहे. तैवान हा चीनच्या अस्मितेचा भाग आहेअमेरिकेला तैवान बद्दल अजिबात प्रेम नाही पण चीनच्या गळ्यात अडकलेले ते हाड ते अजिबात काढणार नाहीत. तैवान मध्ये होत असणाऱ्या अर्धवाहक चिप्स (semiconductor chips) चीनच्या हाती पडू नये इतकाच हेतू आहे. त्यामुळे तैवानला चिप्स च्या बदल्यात शस्त्रास्त्रे विकून अमेरिका आपल्याच कंपन्यांची धन करत असते. राहिला भारत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील. हे तिन्ही देश सध्या तरी अमेरिकेच्या तुलनेत तसे लहान आहेत पण त्यांनी मोठे होऊ नये म्हणून त्यांच्यावर टेरिफ लावून सध्या तरी त्यांना गप्प बसायला लावले आहे. बाकी अमेरिकेशी दोन हात करण्याची भारताची सध्या तरी स्थिती नाही. त्यांची अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेच्या सहा पट आहे तर चीनची तिप्पट. तेंव्हा सध्या सुसरबाई तुझी पाठ मऊ म्हणणारे आपल्याला आवश्यक आहे. सा \ध्या अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आपलयाला जेमतेम ५० वर्षे झाली आहेत. त्यातून आपल्याला अमेरिकेच्या एक तृतीयांश जमीन असून अमेरिकेच्या चौपट लोकसंख्येचे पोट भरायचे आहे. २००३ साली आपली लोकसंख्या १०७ कोटी होती आणि २००८ साली १२० कोटी होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षात आपल्या लोकसंख्येत १३ कोटी १८ वर्षावरील तरुणांची वाढ झाली आहे आता या १३ कोटी लोकांना रोजगारही पुरवायचा आहे उगाच मीच पाटील म्हणून मिशा पिळून काय साध्य होणार आहे?
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 03/09/2026 - 15:23 नवीन
>> सा \ध्या अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊन आपलयाला जेमतेम ५० वर्षे झाली आहेत. त्यातून आपल्याला अमेरिकेच्या एक तृतीयांश जमीन असून अमेरिकेच्या चौपट लोकसंख्येचे पोट भरायचे आहे. २००३ साली आपली लोकसंख्या १०७ कोटी होती आणि २००८ साली १२० कोटी होती. एवढा सगळा विचार तुंम्ही केला आहे पण असे म्हटले जाते की आपल्या सरकारने अमेरिकेसोबत करारामुळे आपली कृषीव्यवस्था उध्वस्त होणार आहे. शेतमालावरील निर्बंध काढून (मका सोयाबीन इ.) त्यांना भारताची बाजारपेठ का मोकळी करून दिली आहे? सरकारमधल्या धुरीणांना हे एवढं सोपं कसं समजलं नाही?
  • Log in or register to post comments
क
कोण Mon, 03/09/2026 - 16:12 नवीन
***************************************************************************************** AI Feedback in US-India trade deal Fully protected items include wheat, rice, maize (corn), millets, pulses, dairy (milk, butter, ghee, cheese), poultry, and meat. The ban on Genetically Modified (GM) corn and soybeans remains strictly in place ***************************************************************************************** शेतमालावरील निर्बंध काढून (मका सोयाबीन इ.) त्यांना भारताची बाजारपेठ का मोकळी करून दिली आहे? --> हि माहिती कुठे मिळेल? खूप दिवस शोधत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 03/09/2026 - 18:32 नवीन
कोपायलट वरुनः Soybean, Oilseed & DDGS-Linked Losses The most significant negative impact is expected for soybean farmers and domestic oilseed processors. India is expected to allow imports of DDGS, a protein‑rich animal feed ingredient. India already has a surplus, and further inflows will depress demand for domestically produced soymeal. [newsmax.com], [deccanherald.com] Cheaper imports could push farmers to abandon oilseed crops like soybean and groundnut in favour of maize or rice, even though the government has been pushing hard for oilseed self‑sufficiency. [newsmax.com], [deccanherald.com] Duty‑free soybean oil imports (within tariff‑rate quotas) will put downward pressure on domestic edible oil prices, hurting farmers and processors. संदर्भः https://www.newsmax.com/politics/india-us-trade-pact/2026/02/09/id/1245384 https://www.deccanherald.com/india/explained-india-us-trade-pact-and-its-impact-on-millions-of-farmers-3892393#2
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 05:05 नवीन
India is

expected

to allow imports of DDGS
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 05:06 नवीन
India has approved the import of Distillers’ Dried Grains with Solubles (DDGS) from the United States under a bilateral trade agreement, granting duty concessions to ease domestic feed shortages. The imports are capped at 5 lakh tonnes, representing roughly 1% of total domestic consumption, aiming to support the poultry and dairy sectors without overwhelming domestic corn and soybean farmers
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 03/09/2026 - 18:32 नवीन
अन्नाची गरज जास्त तर जास्त अन्न आयात करणे बरोबर नाही का ? कमी अन्न असून फायदा कसला ? भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत. आज काल देशांत पनीर, अंडी, दूध सर्वच भेसळ युक्त आहे. अश्यांत विदेशी आयात देशासाठी चांगली आहे. शेतकर्यानी मंडळी मग सबसिडी, लोन माफी आणि त्यासाठी विविध ठिकाणी दंगे, चौकियाच्या बाजूने वाहतूक करून इतरांना ठार मारणे, एकूणच देहाती वागणूक इतरांना देणे हे सर्व काही करत आहेत ते वेगळे आणि तरीसुद्ध सामान्य मध्यमवर्गीय माणसाने कर देऊन आणि भेसळयुक्त अन्न खाऊन ह्यांना पोसावे हि अपेक्षा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 03/10/2026 - 04:42 नवीन
भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत सध्या ए आय आहे त्यामुळे अभ्यास न करता सुद्धा माहिति मिळते . ती घेण्याचे कष्ट करावे लागतात . रासायनिक खते , कीटकनाशक यांचा वापर जगात कुठे किति अहे ते बघा , आणि शेतकरी भेसळ करतात की व्यापारी हे पण बघा .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 05:03 नवीन
साहना यांची एकंदर मते अत्यंत एकांगी आणि विशिष्ट दृष्टिकोन ठेवून आहेत. त्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 03/10/2026 - 20:35 नवीन
अकार्यक्षम - सर्वच पिकांच्या बाबतीत भारतीय शेतकरी अत्यंत अकार्यक्षम (inefficient) आहेत. प्रति एकर पीक हे अत्यंत कमी आहे. ह्याचे मूळ कारण जमिनीचे छोटे तुकडे, सिंचनाचा अभाव, आधुनिक खते, यंत्रे ह्यांचा वापर न करणे इत्यादी आहे. - मूळ कारण हे आहे कि अकार्यक्षमता हि सरकार सबसिडी देऊन वाढवते त्यामुळे ज्याची शेती करण्याची लायकी नाही तो माणूस सुद्धा शेती करतो. जमीन विक्री आणि खरेदी सुद्धा सरकारने अशक्य करून ठेवले आहे त्यामुळे शेतीतून काढता पाय घेणे सुद्धा कठीण आहे. - तांदूळ ह्या धान्याचे उदाहरण घ्या. भारत १५२ दशलक्ष टन उत्पादन करतो. चीन १४८. पण भातासाठी शेतजमीन भारतांत दुप्पट आहे. इजिप्त, चीन आणि usa भात शेतीत अग्रेसर आहेत. अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ह्याचा पुरावा सोपा आहे. दूध भारतांतील दुधाची संपूर्ण सप्लाय चेन भेसळयुक्त आहे. गुरांना जबरदस्त इंजेक्शन्स आणि अँटी-बीओटीकस दिल्या जातात. ह्यावर कसलेही नियंत्रण नाही. गुरांना चारा नक्की काय दिला जातो हे कुणी पाहायला सुद्धा जात नाही. त्यानंतर हे प्रदूषित दूध घेऊन त्यांत विविध प्रकारची भेसळ केली जाते. [१] [२] पनीर तर म्हणे सगळीकडे सिंथेटिक आहे. [३] अंडी दुधाची जी गत आहे तीच ह्यांची सुद्धा. [४] > रासायनिक खते , कीटकनाशक यांचा वापर जगात कुठे किति अहे ते बघा , वापर किती आहे ह्या पेक्षा कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे. सर्व भारतीय भाजीपाल्यांत कीटकनाशकांचे प्रमाण फारच जास्त आहे. कोंबड्याना जो खाद्य दिला जातो त्यांत सुद्धा प्रचंड प्रमाणात कीटकनाशके आहेत जी शेवटी तुमच्या शरीरांत जातात. [५] [१] https://gfm.akshayakalpa.org/read/feature-article/the-dangerous-side-effect-of-indias-dairy-boom [२] https://www.ndtv.com/food/gujarat-factory-busted-for-making-milk-with-urea-and-detergent-10969829 [३] https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/how-to-recognize-fake-paneer-at-home/articleshow/109395959.cms [४] https://www.reddit.com/r/Fitness_India/comments/1pgo9mn/everyones_shocked_about_the_eggoz_egg_scandal_but/ [५] https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/8-foods-with-highest-level-of-pesticides/photostory/116438610.cms
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 03/11/2026 - 11:12 नवीन
Image removed. - (शेतकरी समुदायातला) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Tue, 03/10/2026 - 12:06 नवीन
>> अन्नाची गरज जास्त तर जास्त अन्न आयात करणे बरोबर नाही का ? कमी अन्न असून फायदा कसला ? खरंच? १. मागील काही वर्षांपासून आपल्याकडे अन्नधान्याची कोठारे अन्न सडून जाते व त्यासाठी ओरड होत असते. खास करून एफ डी आय ला यासाठी जबाबदार धरले जाते. पण सरकारी व्यवस्था ढिम्म हलत नाही. २. अन्नधान्याचे उत्पादन जास्त झाले की भाव कोसळतात आणि शेतकर्‍याला खर्चाइतकाही भाव मिळत नाही, हमी भाव तर सोडूनच द्या. अशा परिस्थितीत आणखी अन्नधान्य आयात करुन शेतकर्‍यांचे अधिक नुकसानच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे आपले मत अतिसुलभीकरणावर आधारित आहे असे म्हणावे लागेल. >> भारतीय शेतकरी अत्यंत कामचुकार, अकार्यक्षम आणि अन्नाच्या नावाखाली अक्षरशः विष लिकांच्या उदरांत ढकलत आहेत. आज काल देशांत पनीर, अंडी, दूध सर्वच भेसळ युक्त आहे. अश्यांत विदेशी आयात देशासाठी चांगली आहे. हा उपाय आहे? आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी! भेसळ होऊ नये, अन्न विषारी नसावे यासाठी वेगळे उपाय आहेत, जे आपण सदैव केलेच पाहिजेत. त्यासाठी आयात वाढवा म्हणजे अजब उपाय आहे.
  • Log in or register to post comments
क
कोण Mon, 03/09/2026 - 15:59 नवीन
अमेरिका-इराण युद्धात लक्ष न दिलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे झिम्बाब्वेने लिथियम निर्यातीवर बंदी घालणे. चीनची 15-20% लिथियम आयात झिम्बाब्वेमधून आहे आणि वरवर पाहता चीनवर लक्षणीय परिणाम झाला आहे. त्याच दिवशी झिम्बाब्वेने "यूएस हेल्थ एड" प्रस्ताव नाकारला कारण त्यासाठी अमेरिकेला "रीअर अर्थ" खनिजांमध्ये प्रवेश आवश्यक होता. असे दिसते की बऱ्याच गोष्टी वेगाने घडत आहेत जरी त्यांच्या दरम्यान कोणतेही त्वरित सम्न्बध दिसत नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 03/09/2026 - 17:01 नवीन
भारताला अंदमान व निकोबारच्या दक्षिणेला समुद्रात तेल साठे सापडले म्हणतात. त्याचं उत्खनन सुरू झालं पाहिजे. भारत व चीन दोघांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. याच दोन देशांना सर्वात जास्त तेल लागतय, इतिहासात तरी हे दोन देश कायमच समृध्द राहिले आहेत. जगातला पहिला दुसरा नंबर यांचाच असायचा.अपवाद ब्रिटिश राजवटीचा.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 03/09/2026 - 18:29 नवीन
काश्मीर मधले लिथियम काढले कि अंदमान मधील गॅस काढू बरे का ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 03/09/2026 - 19:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 03/10/2026 - 09:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 03/10/2026 - 14:53 नवीन
युध्दाच्या दुसर्‍या दिवशीच खामेनी हा धर्मांध म्हातारा मेला हे चांगले झाले. पण त्याबरोबरच अमेरिकेचा निर्णायक विजय व्हायला नको कारण तसे होणे म्हणजे अमेरिका आणखी माजणे असा त्याचा अर्थ होईल. सध्या अमेरिकेला निर्णायक विजय मिळणे सोडाच हे युध्द अधिकाधिक जड जात आहे अशी चिन्हे आहेत. एक तर इराणने गल्फमधील अमेरिकेच्या वेगवेगळ्या देशांमधील तळांवर हल्ले केले आहेत आणि अमेरिकेच्या THAAD या अत्यंत महागड्या संरक्षण रडार प्रणालीचे नुकसान केले आहे. तसेच लो कॉस्ट वॉरफेअरमध्ये इराण अमेरिकेला भारी पडला आहे असे दिसत आहे. दुबई, बाहरेन, सौदी अरेबिया वगैरे ठिकाणी प्रत्येक वेळेस इराणने मोठी क्षेपणास्त्रे सोडली होती असे नाही तर त्या मानाने स्वस्त असलेले ड्रोनही पाठवले. अशा स्वस्तातल्या ड्रोनना इंटरसेप्ट करण्यासाठी अमेरिकेचा मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा वापरला गेला आहे अशाही बातम्या आहेत. समजा अमेरिकेला इराणमधील सत्ता उलथवता आली तरी तो देश इराकसारखा अस्थिर राहिल हे सांगायला कोणा ज्योतिर्विदाची गरज नाही. आणि समजा इराणमधील सत्ता उलथवता न आल्याने अमेरिका पळून गेली तर त्याच सत्तेचे इराणवरील वर्चस्व अधिक घट्ट होईल. वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इराणमधील धर्मांध राजवट उलथवायचीच होती तर त्या राजवटीविरोधात आवाज उठत होता त्या तत्वांना पाठबळ दिले असते तर अमेरिकेचा हेतूही साध्य झाला असता आणि हे दोन्ही परिणाम झाले नसते. तसाही खामेनी हा म्हातारा ८६ वर्षांचा होता आणि फार काळ राहिला असता असेही नाही. युध्दात तो धर्मांध म्हातारा मेला हे चांगले झाले असले तरी अमेरिकेने हे प्रकरण अशाप्रकारे हाताळल्यामुळे तीच धर्मांध सत्ता नव्या आणि तुलनेने तरूण- म्हणजे जास्त वर्षे सत्तेत राहायची शक्यता असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली अधिक प्रबळ होईल हा धोका आहे. आणि खामेनीचा मुलगा बापाच्या सत्तेविरोधात आवाज उठविणार्‍या आणि बाप मेल्यानंतर जल्लोष करणार्‍या स्त्रियांवर अजून कडकडून अन्याय आणि अत्याचार करेल हा पण धोका आहे. अमेरिकेने इराणमध्ये अजून आपले सैनिक उतरवलेले नाहीत. पण समजा आपले सैनिक उतरवले तर मात्र लिंडन जॉन्सन-रिचर्ड निक्सनचे व्हिएटनाम युध्द आणि जॉर्ज डब्लू बुशचे अफगाणिस्तान आणि इराक युध्द याप्रमाणे ट्रम्पतात्याचे इराण युध्द ठरेल. इराक आणि अफगाणिस्तानात जशी अमेरिकन सैनिकांची ससेहोलपट झाली त्याचीच पुनरावृत्ती इराणमध्ये होईल हे नक्कीच. म्हणजे हे सगळे उपद्व्याप करून तात्याने नक्की काय साध्य केले हा प्रश्न पडतोच. इराण आता तात्याच्या गळ्यातले हाडूक बनणार ही शक्यता जास्त. समजा स्वतःच्या इगोमुळे आपण हरलो हे तात्याला मान्य करायचे नसेल आणि म्हणून कडकडून हल्ला करून इराणमधील सत्ता जरी उलथवली तरी मग नंतर सत्तेत येणारे सरकार अमेरिकेच्या आशीर्वादानेच सत्तेत येणार. अफगाणिस्तानात सुरवातीला बबरक करमाल आणि नंतर महंमद नजिबुल्ला सरकारप्रमाणेच ते सरकारही होणार नाही याची काय खात्री आहे? रशिया आणि चीन अमेरिका अशी चूक कधी करते याचीच वाट बघत बसलेले असतील आणि मग १९८० च्या दशकात अमेरिकेने अफगाणिस्तानात रशियाविरूध्द जे केले तेच रशिया आणि चीन इराणमध्ये अमेरिकेविरूध्द करायचा प्रयत्न करतील ही शक्यता आहेच. मग रशियाने आपल्या कठपुतली सरकारच्या समर्थनासाठी अफगाणिस्तानात सैनिक उतरवले त्याप्रमाणे अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवणार का? आणि समजा तात्याने माघार घेतली- म्हणजे माघार घेताना आम्हीच जिंकलो असा दावा करूनच तात्या माघार घेणार पण खरी काय परिस्थिती आहे ती सगळ्यांना समजेलच. त्या परिस्थितीत अमेरिकेचे गल्फमधील मित्रदेश- सौदी अरेबिया, कतार, बाहरेन, युएई वगैरेंना तोंडघशी पाडल्याशिवाय तात्याला पळता येणार नाही. त्यातून अमेरिकेचे त्या भागातील वर्चस्व पण कमी होईल. मग नसते उपद्व्याप करून तात्याने नक्की काय मिळवले?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/10/2026 - 15:16 नवीन
अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात सर्वात मोठी आहे आणि ती इराणच्या ६० पट आहे. एखादा श्रीमंत माणूस जसा पैसा वाया गेला म्हणून जास्त फिकीर करत नाही तशीच स्थिती अमेरिकेची असते. एखाद्या मर्सिडीझ ने बैलगाडीला ठोकले तर बैलगाडीचे अपरिमित नुकसान होते. पैशात विचार केला तर ते काही हजार असेल पण बैलगाडीच्या मालकाला ते भयंकर जड जाते. या उलट मर्सिडीझ चे चार पाच लाखाचे नुकसान झाले तरी तिच्या मालकाला फार फिकीर नसते गेली १०० वर्षे जगभरात काड्या करून त्यांनी नक्की काय साध्य केले हे समजणे कठीण आहे. पण एक लाख कोटी पाण्यात गेले तर अमेरिकेला फार काही फरक पडत नाही. पण ज्या देशात षडयंत्र करतात त्या देशाची मात्र वाताहत होते. तात्या काही अमेरिकी सैनिक इराण मध्ये उतरवणार नाही. जर त्याने तसे केले तर त्याच्यासारखा मूर्ख तोच कारण कितीही झालं तरी इराणचे लोक त्यांच्यावर केलेला बॉम्बवर्षाव काही विसरणार नाहीत. आणि अमेरिकी सैनिकांचे जीव हे अमेरिकी लोकांचे मत बदलण्यास कारणीभूत होणारा सर्वात मोठा घटक आहे. तात्या इराणमधून नाक कापून बाहेर पडणार पण तो "मीच जिंकलो" म्हणून सगळीकडे टिमकी वाजवत फिरेल. मग बाकी लोक काहीही म्हणोत. काश्मीर प्रश्न १०० वर्षांपासून आहे पासून सिंदूर मध्ये ५ -६-७-८-११ विमान पडली अशी बेताल वक्तव्ये केली. मागे आपण काय बोललो होतो याबद्दल त्याला काही घेणे देणे नसते. इराक लिबिया आगगाणिस्तान निकारागुआ, चिली, व्हेनेझुएला व्हिएतनाम, फिलिपाइन्स अशा अनेक देशांच्या यादीत इराणचे नाव आले एवढंच.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 11:21 नवीन
Reliance ला अमेरिकेतील मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पात भागीदारी मिळाली. मौन बाळगल्याचे फायदे दिसू लागले. राहुल गांधी उगाच खरी भविष्यवाणी करतात ज्याला गोदी मिडिया फाट्यावर मारतात.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 03/12/2026 - 14:59 नवीन
मौन बाळगण्याचे फायदे! फक्त ते फायदे देशाला नसून एका ला़डक्या उद्योगपतीला मिळालेले आहेत. मौन बाळगल्याने देशाचं मात्र कैक पट नुकसान झालेलं आहे. समर्थकांच्या मते हा आणखी एक मास्टरस्ट्रोक असावा.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/12/2026 - 15:32 नवीन
तसे ते जाहीरपणे बोलले तरराहुल गांधीची भविष्यवाणी खरी ठरली हे मान्य करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 12:43 नवीन
इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास मिडियाला इस्राईलच्या डरपोक सरकारन बंदी घातली आहे. नंतर दृश्य दाखवताना तेथील लोकेशन दाखवण्यास मनाई केली आहे. विश्वगुरुला फॉलो करणारा एक डरपोक सदस्य मिळाला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/11/2026 - 14:05 नवीन
इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यास मिडियाला इस्राईलच्या डरपोक सरकारन बंदी घातली आहे. पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांडानंतर पुण्यात किती दहशत पसरली होती हे त्यावेळेस सज्ञान असलेल्या लोकांना नक्की आठवत असेल. हि स्थिती दहा लोकांचे हत्याकांड झाले असल्यावर झाली होती. १९७९ साली स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार कदाचित भत्ता कोसळणार म्हणून भारतात किती घबराट पसरली होती हेही तेंव्हाच्या लोकांना आठवत असेल. असे असताना आपल्या देशावर होणाया क्षेपणास्त्र हल्लयाचे थेट प्रक्षेपण सार्वजनिक न्यासावर झाल्यास किती भयगंड पसरेल हे देशाच्या नेत्यांना व्यवस्थित माहिती असते तेंव्हा असे प्रक्षेपण करण्यास नकार देणे हा सामान्य प्रक्रियेचा भाग आहे. त्याला डरपोक म्हणणे म्हणजे मूलभूत प्रक्रियेबद्दल टोकाचे अज्ञान आहे. भारताची किती विमाने पडली हे भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर ऐन भारत असताना सांगायला नकार दिला होता. याचे कारण त्याचा शत्रूला मनोबलात फायदा होऊ नये यासाठीच असते. हे जगजाहीर करावे हे सांगणारे राहुल गांधी एकतर मूर्ख आहेत किंवा देशद्रोही मणिपूर नागाप्रदेश किंवा कोणत्याही भागात दंगल झाली तर तेथील इंटरनेट बंद करणे हाही सामान्य प्रक्रियेचा भाग असतो कारण समाजकंटक सार्वजनिक न्यासावर अफवा पसरवण्यात पुढे असतात. आणि अशा अफवांमुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेचा पार बट्याबोळ होऊ शकतो इतके मूलभूत ज्ञान आपल्याला नसावे याचे आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 03/11/2026 - 15:18 नवीन
शिशुवर्गातील विद्यार्थ्याने माझा पूर्ण प्रतिसाद लाखो वेळा वाचला तरी समजणार नाही. उगाच बालिश हास्यास्पद समर्थन करून हसू करून घ्यायचे असेल तर करा. दुर्लक्ष केले जाईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/11/2026 - 15:46 नवीन
आपलंच खरं असंच आपल्याला समजायचं असलं तर चालू द्या.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 03/11/2026 - 16:18 नवीन
इराणने आता धमकी दिली आहे की गल्फ आणि इस्राएलमधील अमेरिकन टेक कंपन्या- गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमॅझॉन वगैरेंना लक्ष्य केले जाईल. तसेच इराणमधील एका बँकेवर हल्ला केला गेल्यानंतर दुबई आणि इतर भागातील फायनान्स कंपन्यांनाही लक्ष्य केले जाईल. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने दुबईतील आणि एच.एस.बी.सी ने दोहामधील आपली कार्यालये बंद केली आहेत अशा बातम्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही बँका अमेरिकन नाहीत. आता तात्या म्हणाला की इराणमध्ये हल्ला करण्यासारखे काही शिल्लकच राहिलेले नाही. तसे असेल तर मग इराण अगदी उघडपणे अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करू अशी धमकी कशी देत आहे? आणि त्या धमकीचा परिणामही होताना दिसत आहे. एकूणच तात्याने युध्द सुरू तर केले आहे पण इराणी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे दिसते. समजा अमेरिका तिथून पळून जाईल तरी इस्राएलपासून जॉर्डन, युएई, सौदी, कतार, बाहरेन, ओमान वगैरे अमेरिकेचे मित्रदेश कुठे जाणार? इराण अमेरिकेवर थेट हल्ला करू शकणार नाही कारण त्यांच्याकडे तितक्या लांब पोचतील अशी क्षेपणास्त्रे नसावीत. पण अमेरिकेच्या मित्रदेशांना मात्र या सगळ्या प्रकारात मोठी किंमत मोजायला लागू शकेल. तात्याने सापाच्या वारूळात हात घातला आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 58 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा