Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा

व
विवेकपटाईत
Tue, 03/03/2026 - 07:17
🗣 162 प्रतिसाद
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9360 views

🗣 चर्चा (162)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2026 - 15:24 नवीन
इराणच्या दक्षिण भागात असलेल्या होर्मोजगानमधील मिनाब शहरात २८ फेब्रुवारी रोजी एका शाळेवर हल्ला झाला. या हल्ल्यात १६५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला
या युद्धातील सर्वात दुर्दैवी आणि दुखद घटना. लहान मुलांचा काय दोष होता. त्या कबरीची रांग पाहिली. पण देशाची काय प्रतिक्रिया येते त्यावर या देशात श्रद्धांजलीचे कार्यक्रम ठरताहेत असे म्हणावे लागते. लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/06/2026 - 04:54 नवीन
अमेरिकेच्या पायदळाचे स्वागत करण्यास इराण उत्सुक. पायदळ अमेरिकेचा कच्चा विषय.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/06/2026 - 04:59 नवीन
लगे हाथ, हाथरस, मणिपूरमधील आपल्या भगिनींवर अत्याचाराचा निषेध म्हणून दोन मिनिटे डोळे बंद करूया. बलात्कार्यांना ओवाळणाऱ्याचा निषेध करूया. बरेच निषेध पेंडिंग आहेत.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 03/05/2026 - 17:17 नवीन
भारतीय व्यापारांनी गोबर विकून 500 कोटी पेक्षा जास्त विदेशी मुद्रा कमवली आहे. बाकी एका क्रूर शासकाने त्यांच्या देशातील विरोध करणाऱ्या हजारों लोकांची हत्या केली आहे. त्या नौसैनिक जहाजातील प्रत्येक सैनिकाला माहीत असेल ते इराण पर्यंत जिवंत पोहचू शकत नाही. पण ते इराणकडे गेले नसते. शरणागती पत्करली असती. तर तिथे त्यांच्या परिवारावर अत्याचार झाले असते. मरण स्वीकार करण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू गुरुवार, 03/05/2026 - 18:01 नवीन
मला खामेनीचा प्रचंड राग होता. त्याच्या धर्मान्धपणाचा पहिल्या बळी इराणी स्त्रियाच होत्या. जरा जरी बुरखा हलला की थेट फाशी दिली जायची.
असं प्रामाणिकप्रमाणे लिहिणाऱ्या (ज्यांनी अध्यात्म, तत्वज्ञान, पाकृ, सामाजिक-राजकीय लिखाण केलाय अश्या) मिपाकरांबद्धल याच मिपावर
राष्ट्राध्यक्ष खामेनीच्या हत्त्येने इकडच्या गोबरपंथीय जमातीत सध्या आनंद आहे, या आनंदाचं पहिलं कारण असतं की मूस्लीम कट्टरवाधी धर्मांध मरण पावला
असं लिहिलं जातंय व त्यांना गोबरवादी* ठरवलं जातंय हे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली! राष्ट्राध्यक्ष खामेनीच्या हत्त्येने इकडच्या गोबरपंथीय जमातीत... कुणाला कशाचं बोड्कीला केसाचं! लढाईची करणारे देश अमेरिका, इस्राईल, इराण व इतर आखाती देश आणि इथले डापू गोबरवाद्यांच्या नवे खडे फोडताहेत! धन्य आहे ! *गोबरवादी म्हणजे नेमकं काय ते तुमचं कारलं मार कसं (Karl Marx) जाणे!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/06/2026 - 04:22 नवीन
हा हा.. मी अंड भक्त नाही! मला थेट अश्मयुगपंथीय म्हणा हवं तर :)
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 03/05/2026 - 07:49 नवीन
भरताने खेमेणीच्या हत्तेचा निषेध केला नाही. ठीक आहे. पण कालच अमेरिकेने इराणच्या एका नौदल जाहजा वरती भारतीय उप सागरात हल्ला केला आहे. विशेष म्हणजे ते भारतातच सरवासाठी आलेलं. मोदी नाहीतर कमीत कमी सरकारकडून कोणीतरी ह्यावर बोललं पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 03/05/2026 - 17:04 नवीन
ते जहाज भारतातच थांबून राहिले असते तर वाचले असते. पण परत देशात गेल्यावर त्यांच्या सैनिकांना फासावर निश्चित चढवला गेले असते. बाकी भारताच्या नाही श्रीलंकेच्या ही दक्षिणे शंभर किलोमीटर दूर गेल्यानंतर खुल्या समुद्रात हल्ला झाला आहे. भारताचे आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. बाकी इराणच्या सरकारने नेहमीच युद्धात पाकिस्तानचा पक्ष घेतला आहे. भारताचे संबंध फक्त आर्थिक कारणांनी ठेवले आहे. सरकारी स्तरावर भारताने त्यांच्या मृत्यू वर संवेदना प्रगट केली आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/05/2026 - 18:10 नवीन
ट्विटरवर आज जे काही वाचले त्याप्रमाणे ते जहाज एक आठवडा आधी निघाले होते- म्हणजे युध्द सुरू होण्यापूर्वी. त्या जहाजावर हल्ला केला गेला भारताच्या सागरी सीमे अंतर्गत नाही तर त्या पलीकडे. मग भारताने याविषयी काय करणे या मंडळींना अपेक्षित होते समजत नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 03/06/2026 - 07:31 नवीन
धाग्यावरील चर्चा वाचून असा वाटायला लागलाय की युद्ध भारताने सुरु केलंय.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/06/2026 - 08:03 नवीन
युद्ध अमेरिका-ईस्रायलने सुरु केले आहे. भारतापुरता मुद्दा हा की अजून किती लाचारी करायची?मिठ्या मारायच्या? हे दोन्ही देश भारतिय नेत्रुत्वाला फाट्यावर मारतात आणि पाहिजे तसे वाकवतात असे चित्र समोर दिसते.नेत्रुत्वाची लाचारी एवढी की ज्या देशप्रमुखाची हत्या झाली त्याला आदरान्जली वाहण्याची देखील भीती वाटते.लाचारी एवढी की ईराणी जहाजावरचे ८७ नौसैनिक बुडुन मेले तरीही प्रतिक्रिया येत नाही. आता जबाब्दारी झटकण्यासाठी ते जहाज आमच्या हद्दित नव्हते वगैरे खुलासे चालु आहेत. ज्या देशाला मित्र देश म्हणता तो तुम्हाला फाट्यावर मारतो तुमच्या हद्दीच्या नजिक दुसर्या देशाच्या जहाजाला जलसमाधी देतो.. मग दुसरा देश श्रीलंका मदत करतो.. ह्याच देशाला ईराणला आपण संचलन करण्यासाठी आमंत्रण दिले होते. अमेरिका आमंत्रण आधी स्वीकारतो आणि ऐनवेळी नाकारतो. अमेरिका हेच चीनसोबत करण्याची हिंमत दाखवेल?
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 03/06/2026 - 08:37 नवीन
माझ्याघरी आलेला पाहुणा पुन्हा त्याच्या घरी जात असताना वाटेत त्याला काय झाल तर त्याला मी कसा जबाबदार? आणि हल्ला श्रीलंकेच्या सागरी हद्दीत झाला म्हणून त्यांनी मदत केली, आणि INS तारांगिनी तिथे काय करतेय या बातम्या वाचल्या नाहीत का की सोईस्कर दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 09:22 नवीन
पण चुकीच्या पद्धतीने हल्ला केला त्याचा निषेध तर करू शकतो ना? इतकही काय बुळचट रहावं? का ब्लॅकमेलिंग सुरू आहे एपस्टिन च्या नावाखाली? भाजपे युद्धावेळी उघडे पडतात!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/06/2026 - 09:30 नवीन
निषेध तर करू शकते ना सरकार? सरकार एवढे अमेरिका/ईस्रायलचे मिंधे असल्यासारखे का वागते? असो . येणार येणार म्हणता पंतप्रधानांची प्रतिक्रिया आलीच शेवटी- Military conflict can't fix any issue': PM Modi's big remark as US-Iran war burns West Asia वा! काय निषेध केलाय. आवडला.! https://www.indiatoday.in/india/story/military-conflict-never-the-answer-pm-modi-calls-for-restraint-as-iran-war-rages-2877697-2026-03-05
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 03/06/2026 - 10:45 नवीन
पण ग्रेटर इस्राईल बनवा आणि त्यांनी पाकिस्तान ला ठेचावे याला तुमचा पाठिंबा होता ना एका धाग्यावर मग आता तर तुम्ही खुश असायला हव, की बीजेपी ला शिव्या देण्यासाठी स्वतःच्या भूमिकेला तिलांजली दिली. बीजेपी ला शिव्या देताना काँग्रेसी आपलीच भूमिका बदलतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 11:20 नवीन
ग्रेटर इस्रायल नक्कीच बनावा! पण युद्ध वगैरे घोषित करून ह्या गोष्टी करायला हव्यात, खामेनी मेल्याचे आजिबात दुःख नाही पण क्या पद्धतीने मारले त्या पद्धतीला विरोध आहे. चुकीला आम्ही चूक म्हणतो, प्रत्येक गोष्टीचे आंधळे समर्थन करायला आम्ही गोबरभक्त वाटलो का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 14:11 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 14:35 नवीन
गोबरभक्तांच्या नादी लागण्यापेक्षा भुजबळांच्या नादी लागणे कधीही चांगले! भाजपेच पाहा, पक्ष वाढवणाऱ्या गोबरभक्तांना हॅकलिन भुजबळांसोबत सरकारात बसलेत! :)
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 03/06/2026 - 12:23 नवीन
बरं,एपस्टिन फाइल्सच्या तीस हजार दोनशे चाळीसाव्या पानातील एकशे नऊव्या ओळीत मोदींचे कारनामे आहेत. तुमच्यासाठी नाही तर कमीत कमी देशासाठी तरी ते वाचून हिथं लिहा. मग प्रियांका गांधी पंतप्रधान नक्कीच होतील. मग गाझा साठी इस्राएल वर आपण हल्ला करू.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 13:09 नवीन
प्रियांका गांधी पंतप्रधान होतील ह्याची आतापासून जळजळ होण्याचे कारण नाही! :)
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 03/06/2026 - 16:18 नवीन
हे लिवलंय व्हयं त्या फायलीत, मग घाबरायालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/07/2026 - 07:02 नवीन
मोरू लोक इतक्या वेळेस तोंडघशी पडले तरी सुधारण्याचे नाव घेत नाहीत. इराणची एक युद्धनौका भारताच्या कोची बंदरात सुरक्षित आहे. IRIS LAVAN IRIS Dena बद्दल भारताने काहीच केले नाही पासून भारताने इराणला वाऱ्यावर सोडले पर्यंत सर्व बोंबा मारून झाल्या. काहीही करून केवळ श्री मोदींवर राळ उडवायची एवढाच अजेंडा असलेले लोक सध्या जास्तच वैफल्यग्रस्त होऊन लिहीत असल्याने तोंडघशी पडताना दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
स
संदिप एस गुरुवार, 03/05/2026 - 08:15 नवीन
श्रीगुरूजी, आणी ईतर कोणीही अडकले असाल आणी काहीही मदत लागली तर नक्की संपर्क करा, मी पण ईथेच आहे - ०५५११२४५३६
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 03/05/2026 - 09:54 नवीन
कडक सॅल्युट. श्रीगुरूजी काळजी घ्या,लवकरच सुरक्षित परत याल. रिस्ट्रिक्टेड ऑपरेशन आहे.फुल स्केल वाॅर मधे बदलण्याची शक्यता कमीच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/05/2026 - 17:26 नवीन
सर्वांना धन्यवाद! परतीचा प्रयत्न सुरू आहे. रविवारचं एअर इंडियाचं तिकीट मिळालंय. परंतु आताच क्षेपणास्त्र हल्ल्याचा ॲलर्ट संदेश आलाय. अजून एस्केलेशन झाले नाही तर रविवारी संध्याकाळी भारतात पोहोचू.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/06/2026 - 05:27 नवीन
रविवारचे एअर इंडियाचे उड्डाण रद्द झाल्याचा आज पहाटे संदेश आलाय.‌ आता अनिश्चित काळासाठी अडकलोय. काल संयुक्त अरब अमिरातीत वेगवेगळ्या ठिकाणी १३१ ड्रोन हल्ले व ७ क्षेपणास्त्र हल्ले झाले. त्यातील १२५ ड्रोन हल्ले व ६ क्षेपणास्त्र हल्ले निकामी केले. परंतु उर्वरित हल्ल्यांमुळे ९४ नागरिक किरकोळ जखमी झाले व काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामुळे पुन्हा एकदा विमाने रद्द झाली आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 05:50 नवीन
काळजी घ्या गुरुजी!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 03/06/2026 - 15:03 नवीन
गुरूजी काळजी घ्या. अशा परिस्थितीत भारत सरकार/ विमान कंपन्याना पैसे देते की प्रवाशांनाच अधिकचे पैसे भरून आपआपले तिकीट मिळवावे लागते?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/06/2026 - 15:56 नवीन
विमान कंपन्या प्रचंड लूटमार करताहेत. आमची परतीची २ तिकिटे २३,००० मध्ये मिळाली होती. स्पाइसजेटने सर्व उड्डाणे रद्द केली व नवीन उड्डाणे जाहीर केली ज्याचे प्रतिव्यक्ती तिकीट ८८,००० रूपये आहे. इतिहाद प्रतितिकीट ६,४०० दिरहॅम (१,६०,०००) मागत आहे. सुदैवाने (!) आम्हाला २ तिकिटासाठी केवळ (!) ९७,१०४ घडताहेत. केंद्र सरकार, विमान वाहतूक मंत्री ही लुटमार थांबविण्यासाठी कणभरही काहीही करीत नाही. सरकारची मदत शून्य आहे. येथे अडकलेले प्रत्येक जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. तथाकथित मदतीसाठी अनेक क्रमांक सांगितले गेले ज्यावरून शून्य मदत मिळाली. वीणा वर्ल्ड, केसरी या कंपन्या आपापल्या प्रवाशांना मदत करीत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/06/2026 - 16:01 नवीन
वाईट वाटले! संकटकाळी तरी भारत सरकारने मदत करायला हवी! देशात मोदींचा फोटो दाखवण्यासाठी हजारो कोटी फुंकले जातात नी देशाबाहेर अडकेलेल्या नागरिकाना काढायला काडीची मदत नाही!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 03/06/2026 - 16:15 नवीन
अरेरे,आपल्या नागरिकांची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. सर्व जण सुखरूप लवकरात लवकर भारतभूमीवर येवोत.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/06/2026 - 16:27 नवीन
दुबईतून ऑनलाईन बुकिंग होत नसेल तर भारतातून कोणी केले तर स्वस्त पडते.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 03/06/2026 - 16:56 नवीन
गुरूजी म्हणतायतः >> केंद्र सरकार, विमान वाहतूक मंत्री ही लुटमार थांबविण्यासाठी कणभरही काहीही करीत नाही. सरकारची मदत शून्य आहे. येथे अडकलेले प्रत्येक जण परतीच्या तिकिटासाठी स्वतःच प्रयत्न करीत आहे. तथाकथित मदतीसाठी अनेक क्रमांक सांगितले गेले ज्यावरून शून्य मदत मिळाली. इथे डॉ. खरे म्हणतातः >> कधी कधी कोणतीही भुमिका न घेणे हीच सर्वोत्तम भुमिका असते ... ट्रम्प तात्यांनी टेरीफ लावल्यावर सुद्धा हीच माणसं असाच भुभु : कर करत होती बाकी इस्रायल आणि ज्यू द्वेषाने भरलेले प्रतिसाद आणि त्याला मोदीद्वेशाची फोडणी पाहून त्यांच्या... गुरुजी तुंम्हाला मोदीजी, भारतीय पासपोर्टचे, भारत सरकारचे दुबई व एम बी एस वगैरेंजवळ किती वजन आहे याचा काही अंदाज येतोय का? बाकीच्या देशांचेही नागरिक असाच आधाराचा अभाव अनुभवत आहेत का? जमले तरच उत्तर द्या, तुमची सुरक्षितता व प्राधान्याने परतणे मह्त्त्वाचे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/06/2026 - 17:09 नवीन
जगातील जनतेने आपला गाव खेड्यातलं नेतृत्व असो की, जिल्हा, राज्य आणि देशाचं नेतृत्व, आपला नेता निवडतांना, डोळे, नाक, दात, कपाळ, पोट, लहान आतडे, मोठे आतडे, किंवा छाती किती इंचाची आहे आणि कशी आहे, हे पाहण्यापेक्षा अशा माणसाच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली आहे की नाही, हेही किमान पाहिलं पाहिजे, जगभर अशा एका जागतिक सामाजिक सुधारणावादी चळवळीची जगाला गरज आहे, असे वाटले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/06/2026 - 18:49 नवीन
गुरुजी तुंम्हाला मोदीजी, भारतीय पासपोर्टचे, भारत सरकारचे दुबई व एम बी एस वगैरेंजवळ किती वजन आहे याचा काही अंदाज येतोय का?
हे वजन दिसण्याचे निकष काय आहे? इतिहाद या संअअच्या विमानसेवेने आज ६,४०० दिरहॅम (१,६०,००० रूपये) प्रति व्यक्ती असे शुल्क लावले आहे. इतर भारतीय विमानसेवा संस्था सुद्धा लुटत आहेत. हे शुल्क वाढविण्यात ना मोदी काही हस्तक्षेप करीत आहेत ना दुबई सरकार. अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ना मोदी इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया यांवर सक्ती करीत आहे ना दुबई सरकार त्यांना दमदाटी करीत आहे. वजन मोजण्याचे काही दुसरे निकष असतील तर सांगा. माझी मुलगी शिकते त्या विद्यापीठात अनेक देशांच्या विद्यार्थिनी - विद्यार्थी आहेत. त्यातील बरेच जण मायदेशी गेले आहेत. परंतु बहुसंख्य भारतीय येथेच आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 03/07/2026 - 15:51 नवीन
श्रीगुरुजी, तुम्ही निघालात ना सुखरुप? की अजूनही फ्लाईट डिले आहे? . दुबई एअरपोर्टवर ड्रोन चा हल्ला झाल्याने एअरपोर्ट आणि एमिरेटसची फ्लाईटस बंद केल्याची बातमी आहे. प्रवाशाना अंडरग्राउंड नेण्यात आले आहे सेफ्टीसाठी. . काळजी घ्या, काही अजून पर्याय आहेत का परत येण्यासाठी?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/06/2026 - 08:57 नवीन
@श्रीगुरुजी, काळजी घ्या, नीट या. _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 03/06/2026 - 12:31 नवीन
खेमिनीच्या हत्तेचा आपण निषेध केला नाही, जहजावरील हल्ल्यावरही आपण प्रतीक्रिया दिली नाही. तर आपण स्वतःलाच विश्वगुरू, महागुरू बोलणही बंद केलं पाहिजे. जागतिक राजकारणात आपण नक्कीच महत्वाचे आहोत पण एवढेही नाही की ही असली विशेषण आपल्याला शोभतील. उगाच आपल्या विकतच्या मीडियाला सांगून स्वतःच स्वतःचे गुणगान करायचे. आणि जिथं ठाम भूमिका घ्यायची तिथं मात्र शांत बसायचे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 03/06/2026 - 13:00 नवीन
आनंदाची बातमी To enable oil to keep flowing into the global market, the treasury department is issuing a temporary 30-day waiver to allow Indian refiners to purchase Russian oil,” the treasury secretary, Scott Bessent, said in a statement posted to social media भारताने रशिया कडुन तेल घ्यायचे नाही असा कडक संदेश अमेरिकेचा होता पण सध्याचे वातावरण पाहता एक महिन्यासाठी तेल आयात करण्याची परवानगी अमेरिकेने भारताला दिली आहे. अभिनंदन !! https://www.theguardian.com/us-news/2026/mar/05/us-waiver-india-russian-oil
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/06/2026 - 13:58 नवीन
तात्याने तुकडा फेकला.. आता मोती वरच्या वर झेलून कौतुकाने मिरवेल .. पॉ पॉ ने ओईल लाया .
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Fri, 03/06/2026 - 14:53 नवीन
  1. भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले होते का?
  2. भारताने, "भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले" असे म्हटले होते का?
  3. रशियाने भारताला तेल देणे थांबविले होते का?
  4. रशियाने, "रशियाने भारताला तेल देणे थांबविले" असे म्हटले होते का?
यापैकी कोणत्याही एकाही प्रश्नाचे उत्तर "हो" असे नाही. मग अमेरिकेच्या "तीस दिवस तेल घेऊ देऊ" या किंवा आधीच्या "तेल घेऊ देणार नाही" या वक्तव्यांना काही अर्थ आहे का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 03/06/2026 - 15:41 नवीन
रशियाचे तेलाचे जे टँकर सध्या समुद्रात उभे आहे तेच तेल रशिया देणार आहे नवीन नाही. त्यामुळे किती मिळेल याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 03/06/2026 - 20:24 नवीन
कोबी सिंह पेक्षा ताम्रमुख नेत्याचे चाटुकार आणि भाट जास्त असह्य आहेत. १. भारताने रशियन तेल घेणे कधीच बंद केले नव्हते. भारतांतील अनेक रिफायनरी रशियन क्रूड वर फुल्ल स्पीड कार्यरत आहेत आणि त्यांना अचानक बंद करणे शक्य नाही. २. भारतावर २५% तथाकथित टॅरिफ लावून सुद्धा भारताने रशियन क्रूड घेणे बंद केले नाही. शेवटी जितं मया म्हणून ताम्रमुखाने तथाकथित "ट्रेड डील' घोषित केली आणि स्वतःहून हे टॅरिफ बंद केले. ३. तथाकथित ट्रेड डील मध्ये ताम्रमुखाने तात्काळ टेरीफ्स कमी केले आणि बदल्यांत भारताने सर्व विषयावर "नंतर बघू" असे उत्तर दिले आहे. प्रत्यक्षांत भारत आणि अमेरिका दोन्ही बाजूनी कुठलीही ट्रेड डील केली नाही. बहुतेक विषयावर दोन्ही बाजूंचे एकमत सुद्धा झालेले नाही. कुठल्याही ट्रेड डील चा मसुदा सुद्धा लिहिला गेलेला नाही आणि माझ्या माहिती प्रमाणे किमान २०२६ मध्ये ह्यावर प्रगती होण्याची शक्यता शून्य आहे. लुटनिक आणि बेझेन्ट दोन्ही एक नंबरचे कामचुकार, अकार्यक्षम आणि चाटुकार आहेत. त्यामुळे कुठल्याही मिरवणुकीच्या पुढे आपण उगाच जाऊन मिरवणुकीचे नेत्तृत्व स्वतःच करत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही लोक करतात. ताम्रमूख TV आणि X वर प्रचंड वेळ खर्च करतात त्यामुळे दोन्ही माध्यमात आपल्या साहेबांची स्तुती करण्याची जी चढाओढ मंडळी करत आहेत त्यातून हि असली मुक्ताफळे उधळली जातात. भारतीय लोकांना ह्यावर वेळ दवडण्याची गरज नाही. त्याशिवाय ह्यावर मौन पाळणे हे सध्या तरी शहाणपणाचे आहे. टीप: १. ताम्रमुख अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने शून्य ट्रेड डील्स केल्या आहेत. मीडिया मध्ये जे काही ऐकू येते ते फक्त बोलबच्चनगिरी. कोबी सिंह ह्यांच्या पेक्षा सुद्धा मोठा दांभिक, खोटारडा, निर्लज्ज आणि धूर्त कोणी राजकारणी असेल असे वाटले नव्हते पण ताम्रमुख तसे आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 03/09/2026 - 11:26 नवीन
>> कोबी सिंह ह्यांच्या पेक्षा सुद्धा मोठा दांभिक, खोटारडा, निर्लज्ज आणि धूर्त कोणी राजकारणी असेल असे वाटले नव्हते पण ताम्रमुख तसे आहेत. कोबी सिंह यांनाही तसंच व्हायचं आहे बहुतेक. बहुधा म्हणूनच 'अब की बार ट्रंप सरकार' अशी घोषणा देत होते. फक्त त्यांनी नॉन गोदी मिडिया पत्रकारांना घाबरण्याचं बंद केलं तर जमेलही. ताम्रप्रमुख कुठल्याही पत्रकार परिषदेत बिनधास्त बोलतात, कुठेही जातात, पण कोबी सिंह यांचे महिला खासदारांकडून धोका असल्याने संसदेत येण्यापासूनही संरक्षण केले जाते. खरे कारण जनतेला माहित असते, ते वेगळे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/06/2026 - 15:03 नवीन
मोरू ( मोदी रुग्ण) लोक आजकाल कोणत्याही धाग्यावर आपली जुनी ठसठसती गळवं कुरवाळत बसले आहेत. त्याचा प्रतिवाद करण्यात काहीही हशील होणार नाही. मूळ धागा इस्रायल इराण युद्ध हा आहे. त्याबद्दल चर्चा करायच्या ऐवजी हे केवळ मोदीनि यंव करायला हवं होतं त्यंव करायला हवं होतं याचे रतीब टाकत राहिलेले आहेत. मोदींच्या जागी दुसरा येणार नाही हे त्यांना माहिती झालंय. त्यामुळे आपलं वैफल्य कुठे तरी निचरा करण्यासाठी बाहेर काढणं चालू आहे. सद्य स्थितीत श्री राहुल गांधी पंतप्रधान असते तर काय झालं असतं याचा विचार करून पहा. सुदैवाने असं काहीही नाही यात परमानंद आहे. कुठे वितंडवाद घालायचा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/06/2026 - 17:56 नवीन
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा. इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो. इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे. या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
. मूळ धागा नऊ ओळीचा. त्यात पाच ओळी भारताबद्दल. त्यातही नुकताच इस्रेलने सर्वोच्च सन्मानही दिल्याचाही उल्लेख. मग मिपावर चर्चा काय कुणी कीती बॉम्ब टाकले आणि कुणाचे कीती वर गेले , आजचा स्कोर काय? इतकीच करायची का? .
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 03/06/2026 - 18:25 नवीन
अभ्याच्या मुद्द्यात! धागाकर्ते उत्तर देतीलच.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 03/07/2026 - 03:54 नवीन
आजचा नवीन विनोद तात्या तात्या प्रतिबंध लावून ही मोदी शेट रशियाकडून सर्वात जास्त तेल विकत घेतात. त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे तात्या: आपण असं करू जगाला सांगू आम्ही शेटजीला रशिया कडून तेल विकत घेण्यासाठी एका महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. बघा कशी जिरेल मोदी शेटची.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/07/2026 - 07:07 नवीन
आपण आधी जितके तेल आधी घेत होतो त्या पेक्षा आता फार कमी घेतो हे सत्य आहे ना? आता रशियाकडुन तेल घेऊन त्यावर अधिकचा प्रिमियम द्यावा लागतोय का? आधी डिस्काऊंट ने मिळत होते ना? मी वाचलेला तेलसाठ्यांचा आकडा. अमेरिका: २०० दिवस चीनः १०४ दिवस जपानः २६० दिवस दक्षिण कोरिया: २१० दिवस सिंगापुरः २४५ दिवस आपणः २५-५० दिवस. जाता जाता: दिल्लीत सिलेंडरचे भाव ६० रुपयांनी वाढले म्हणे! कोबी जी म्हणे गॅस निर्माण करुन ट्युब मधुन नेउन ती ट्युब शेतात नेउन त्या गॅसवर पाण्याचा पंप चालवायचे हे खरे आहे का? :))) गटारातील गॅसवर चालणारी चहाची टपरी ही अद्भुत गोष्ट यांनीच सांगितली होती ना?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/07/2026 - 07:08 नवीन
https://www.bloomberg.com/news/articles/2026-03-06/bessent-says-us-may-unsanction-more-russia-oil-post-india-move https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/us-treasury-secretary-hints-at-lifting-more-russian-oil-sanctions-post-india-move/articleshow/129187047.cms?from=mdr भारताला रशियन तेल घेण्याविरुद्ध असलेले निर्बंध अमेरिका हटवणार. उगाच अपनी माँ का दूध पिया है तो सामने आ जा सारखी वक्तव्ये न करता शान्त राहून सरकार काम करत आहे. त्याचा परिणाम दिसून येतो आहे. पण मोरू लोकांचे वैफल्य अजूनच वाढते आहे. सध्या बर्नोलची विक्री जोरदार वाढली आहे असे ऐकतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 55 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा