कल्पकता
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली.
डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे...
=============
कल्पकता
======
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था!
आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते.
प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्यात येत नाही.
मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे.
रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे.
चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो.
मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला.
पण आता बातम्या येत आहेत की,
- परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत.
- आज ही बातमी वाचली
IMF lifts China's 2024 growth forecast to 5%
"China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures".
(https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...)
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...
===================
टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.
- तुम्ही बुद्धिमान आहात, त्यामुळे सोन्याची खरेदी आणि त्याची अनुत्पादक साठवणूक करण्याचा अक्षम्य गुन्हा तुम्ही केला असण्याची अजिबात शक्यता नाही पण तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांत किंवा मित्रपरिवारात काही निर्बुद्ध लोकांनी हा अक्षम्य अपराध नक्कीच केला असेल, त्या लोकांना तुमचे मत / निष्कर्ष पुराव्याने शाबीत करून देण्यासाठी त्यांनी गेल्या पाच, दहा, पंधरा, वीसच काय तर पन्नास-शंभर किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्षांपूर्वी खरेदी करून साठवणूक केलेल्या सोन्याची मी त्यांच्या खरेदी पावतीवर त्यावेळची जी काही किंमत लिहिली असेल त्याच किमतीला खरेदी करण्यास तयार आहे. (आणि हा सोने खरेदी आणि त्याच्या साठवणुकीचा त्यांचा निर्बुद्धपणा केवळ अनुत्पादकच नाही तर नुकसानकारक सुद्धा आहे हे देखील सिद्ध करून दाखवायचे असल्यास पावतीवरील किमतीपेक्षा कमी भावात ते खरेदी करण्यासही मी तयार आहे)
- वरील प्रस्ताव तुमच्यासाठी वैचारिक / तात्त्विकदृष्ट्या फायद्याचा असला तरी तुम्ही पकडून आणलेल्या 'बकऱ्यां'साठी व्यावहारिकदृष्ट्या काहीच फायद्याचा नाही. त्यामुळे "एखाद्या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात होणारा लाभ म्हणजे 'प्रॉफिट' अर्थात फायदा" ह्या आदर्श निकषाला जागून त्यांचे नुकसान न करता थोडाफार का होईना पण फायदा करून देण्यासाठी म्हणून त्यांच्या पावतीवरील सोन्याच्या प्रतिग्रॅम किमती व्यतिरिक्त प्रतिग्रॅम १०० रुपये अतिरिक्त किंमत देऊन ते खरेदी करण्याची माझी तयारी आहे. ह्या प्रस्तावात "बघा, इतके वर्ष साठवूनही तुम्हाला प्रतिग्रॅम केवळ १०० रुपये नफा मिळाला" असे ऐकवून तुमचे सोन्याची साठवणूक अनुत्पादक असल्याचे मत सिद्ध करून दाखवता आल्याचा तुम्हाला मानसिक समाधानरूपी फायदा होईल, पाच, दहा, पंधरा, वीसच काय तर पन्नास-शंभर किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्षांपूर्वीच्या खरेदी किमतीपेक्षा 'बकऱ्यां'ना प्रतिग्रॅम १०० रुपयांचा घसघशीत आर्थिक फायदा होईल, आणि खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असलेल्या माझ्यासारख्या किरकोळ व्यापाऱ्यालाही चहा-पाणी, विडी-काडी, पान-सुपारीचा खर्च सुटण्यापुरते चार पैसे मिळून जातील, अजून काय पाहिजे? आहे कि नाही हा सर्वांसाठी फायदेशीर ठरणारा प्रस्ताव 😀
वरील दोनपैकी आपण कुठला प्रस्ताव स्वीकारताय हे जाणून घेण्यास अधीर झालो आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले उत्तर कळवावे अशी णम्र इनंती... स्वगत: अन्नाऐवजी नियमितपणे सकाळी न्याहारीला 'दास कॅपिटल'ची चार पाने, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनात अनुक्रमे १५-२० पाने छान चावून चावून खाल्ली कि मेंदू मस्तपैकी बधिर होऊन प्रत्यक्ष जीवनात आणि व्यावहारिक पातळीवर न टिकणाऱ्या एकसे एक भन्नाट अर्थशास्त्रीय कल्पना सुचायला लागलेला माणूस स्वतःला 'बुद्धीमंत', 'ज्ञानी' वगैरे समजायला लागतो म्हणे! सुचेनात का, अशा 'ज्ञानी' लोकांचे विचार पटून काही 'बकरे' स्वतःहून हलाल व्हायला तयार होणार असतील तर आमच्यासारख्या 'कॅपिटलिस्ट' लोकांच्या ते पथ्यावरच पडणार असल्याने प्रस्ताव द्यायला आपल्या बापाचे काय जाते? कुठलाही स्वीकारला तरी अपनी तो "पांचो उंगलीया घी में और सिर कढाईमे" ही होगा ना... 😂भाषांचेच उदाहरण घ्या, ३०हुन अधिक अधिकृत भाषा भारतात आहेत. किती जण मातृभाषा/इंग्रजी पलिकडे नविन भारतिय भाषा शिकायचा प्रयत्न करतात ?माईडे, तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना कोणकोणत्या भाषा येतात?डीपसीक वरील गर्दी आणि कुंभमेळ्यातील गर्दी यांचा तुलनात्मक अभ्यासाचा होता.:)