Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दिल्ली विधानसभा निवडणूक

व
विवेकपटाईत
Wed, 01/22/2025 - 07:34
💬 78 प्रतिसाद
दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार. दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात. जर दिल्लीत अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्‍यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती. पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही. आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्‍या शब्दांत मतदान टक्का कितीही असला तरी मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली सेवा आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही. बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान साहेब पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व उमेदवार निश्चित झाले नव्हते. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. बहुतेक भाजपला ते नको. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12389 views

💬 प्रतिसाद (78)
म
मुक्त विहारि Wed, 01/22/2025 - 12:54 नवीन
भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल... सहमत आहे... माझ्या मते.. केजरीवाल यायची शक्यता जास्त आहे..
  • Log in or register to post comments
त
तिता Fri, 01/24/2025 - 04:45 नवीन
काहीही झाले तरी भाजपाला मत देणारे पण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. हा भाजपाचा एकनिष्ठ एकगठ्ठा मतदार वर्ग आहे. बाकी Freeship तर प्रत्येक पक्ष offer करत आहे. मतदार सुजाण कमी आणि भावनिक जास्त आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/24/2025 - 10:19 नवीन
भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. आआपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अवघड आहे. भाजपच्या जागा ७ वरून नक्की वाढतील, पण ३६ पर्यंत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते. अर्थात आआप हरून भाजपला बहुमत मिळावे हीच इच्छा आहे. भविष्यात रेवड्या वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या पक्षापेक्षा वर्तमानात रेवड्या वाटणारा पक्ष मतदारांना अधिक जवळचा वाटतो हे कर्नाटक, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/06/2025 - 15:06 नवीन
बहुसंख्य संस्थांनी मतदानोत्तर चाचणी घेऊन भाजपला साधे बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकाद्वारे १२ लाखापर्यंत उत्पन्न असल्यास ते आयकरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ भाजपला कितपत मिळाला हे परवा समजेल. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा भाजपला भरभरून लाभ मिळाला. तसाच लाभ दिल्लीतही मिळेल का हा विविध पक्षांचा औत्सुक्याचा विषय असणार.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 02/06/2025 - 16:48 नवीन
दिल्लीत झालेल्या मतदानात. अल्पसंख्यक समुदायाने 80 टक्के मतदान केले आहे. दुसरीकडे 48% हिंदू घरातच बसून राहिला आहे. जर एक्सिट पोलवाल्यांनी अल्पसंख्यक मतांना २२-२५% वेटेज दिले नसेल तर सर्वांचे अंदाज चुकतील. निवडणूक जिंकण्यासाठी आप पार्टीला हिंदूंच्या तीन पैकी फक्त एका मताची गरज आहे. अल्पसंख्यक समुदाय किमान 65 जागांवर आप प्रति एकनिष्ठ आहे. काँग्रेस पार्टी भाजप चे मत खाणार. बाकी केल्या दहा वर्षात दिल्लीत दारूची दुकाने दुप्पट झाली आहे. दिल्लीची जनसंख्या एक कोटी होऊन जास्त वाढली असली तरी सुद्धा दिल्लीत सरकारी शाळा पहिले पेक्षा कमी झाल्या आहेत. डीटीसी असो जलबोर्ड असो वीज कंपन्या असो सर्वच भयंकर तोट्यात आहे. आयुष्यमान योजना ही दिल्लीत नाही. शीला दीक्षित च्या काळात निर्मित झालेले हॉस्पिटल मध्ये आयपीडी अजूनही पूर्णपणे सुरू झाल्या नाही. नवीन बनविण्याचा प्रश्नच येत नाही. मध्यवर्ग मोठ्या प्रमाणात दिल्ली सोडून गुडगाव आणि नोयेदा नोयेडा येथे शिफ्ट होत आहे. माझे बहुतेक दिल्लीतले हे शेवटचे मतदान. बाकी दिल्लीची ७५ टक्के जनता आणि ती अनिधीकृत कॉलोनीच मध्ये राहते. अधिकांश कॉलनीमध्ये पाण्याची समस्या अत्यंत बिकट झाली आहे. साफसफाई खराब गल्या, नाले सफाई इत्यादीमुळे भाजपाचा काही जागा निश्चित वाढतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/06/2025 - 18:26 नवीन
Image removed. Axis India Exit Poll ________________________________ Image removed. Other exit polls _________________________________ अजून काही अंदाज - चाणक्य स्ट्रॅटेजी - भाजप (३९-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (२-३) पोल डायरी - भाजप (४२-५०), आआप (१८-२५), कॉंग्रेस व इतर (०-२) पीपल्स इनसाइट - भाजप (४०-४४), आआप (२५-२८), कॉंग्रेस व इतर (०-१)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 13:32 नवीन
Axis My India, Pmarq आणि Poll Diary यांचा अंदाज बरोबर ठरला. Axis My India चा जागांचा व मतांच्या टक्केवारीचाही अंदाज जवळपास बरोबर आला. इतर काही जणांचा अंदाज जवळपास आला. Matrize आणि Mind Brink चा अंदाज बऱ्याच प्रमाणात चुकला.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/07/2025 - 18:01 नवीन
उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल कसे लागतात याची उत्सुकता आहे. बर्‍याचशा एक्झिट पोलचा अंदाज आहे की भाजप सत्तेत परतेल. तसे झाल्यास ती एक ऐतिहासिक घटना असेल. भाजपने यापूर्वी दिल्लीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता नोव्हेंबर १९९३ मध्ये. उद्या परत विजय मिळविल्यास त्यानंतर तब्बल ३१ वर्षे आणि जवळपास अडीच महिन्यांनंतर भाजप दिल्लीत विजय मिळवेल. इतक्या वर्षांच्या खंडानंतर कोणत्याही पक्षाने पुनरागमन करून विजय मिळविणे हाच एक विक्रम असेल. काँग्रेसने २०१८ मध्ये २० वर्षांच्या खंडानंतर मध्य प्रदेशात जवळपास बहुमत मिळविले होते (त्यापूर्वी काँग्रेसने १९९८ मध्ये मध्य प्रदेशात बहुमत मिळवले होते). काँग्रेससाठी २० वर्षांच्या खंडानंतर सत्तेत परतणे हा विक्रम होता. २०१७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपच्या नाकात दम आणला होता ही गोष्ट खरी आहे. समजा तेव्हा काँग्रेसचा गुजरातमध्ये विजय झाला असता तर तो मार्च १९८५ नंतर डिसेंबर २०१७ म्हणजे तब्बल ३२ वर्षे ९ महिन्यांच्या खंडानंतर विजय मिळाला असता. पण तसे झाले नाही. यापुढेही म्हणजे २०२७ किंवा २०३२ मध्ये काँग्रेसला गुजरातमध्ये विजय मिळाल्यात भाजपचा विक्रम मोडायची संधी काँग्रेसकडे असेल. पण भाजपचा उद्या विजय झाल्यास मात्र तो विक्रम सध्या तरी भाजपचाच. भाजपने १९९३ मध्ये ७० पैकी ४९ जागा जिंकल्या होत्या. आधी भाजप २०२५ मध्ये जिंकणार का आणि जिंकल्यास ४९ पेक्षा जास्त जागा जिंकणार का ते बघायचे. दिल्लीतील तरूण मतदारांनी भाजपची सत्ता कधी बघितलेलीही नाही. यापूर्वी १९९३ मध्ये म्हणजे बहुतेक तरूण मतदारांचा जन्म व्हायच्या आधी भाजपने दिल्लीत विधानसभा निवडणुक जिंकली होती. १९९३ मध्ये भाजप जिंकल्यानंतर १९९८ मध्ये पराभव होणे हा एक दैवदुर्विलास होता. मधल्या काळात झालेल्या १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतील ७ पैकी अनुक्रमे ५ आणि ६ जागा जिंकल्या होत्या. अगदी फेब्रुवारी १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ६ जागा जिंकल्यानंतर ९ महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र भाजपचा धुव्वा उडाला होता. ९ महिन्यात इतके वातावरण कसे बदलले? तर त्याचे मुख्य कारण होते कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. दिल्लीत आणि उत्तर भारतातच प्रत्येक जेवणात कांद्याचा वापर उदंड प्रमाणात होतो. १९९८ च्या सुरवातीला ४ रूपये किलो असलेला कांदा एकदम ६० रूपये किलो पर्यंत गेला. त्याचे कारण पावसामुळे कांद्याचे पीक गेले होते आणि आधीच करार केले होते त्याप्रमाणे कांद्याची निर्यात केली गेली होती. त्याला नक्की कोण जबाबदार होते? नक्की माहित नाही. भाजप समर्थकांचा दावा होता की नाफेडने वेळेत निर्यात रोखली नाही आणि तेव्हा नाफेडचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते बलराम जाखड होते. तर काँग्रेस समर्थक त्याचा सगळा दोष वाजपेयी सरकारला देत होते. त्यावेळेस निर्यातीचे निर्णय फक्त नाफेडच घेत असेल असे वाटत नाही त्यामुळे वाजपेयी सरकारचीही यात चूक असलीच पाहिजे. जे काही असेल ते असेल पण कांदा प्रकरण भाजपला जड गेले. इतकेच नाही तर आणखी एक कारणही या पराभवाला होते. त्यावेळेस रॉकेलवर चालणारे स्टोव्ह मोठ्या प्रमाणावर वापरले जायचे. त्या रॉकेलमध्ये भेसळ झाल्याने दिल्लीत अनेक ठिकाणी स्टोव्हचे स्फोट झाले होते आणि बरेच- मला वाटते ५० पेक्षा जास्त लोक त्यात जखमी झाले होते. अशा सगळ्या कारणांमुळे आपले कठीण आहे हे लक्षात आल्यावर भाजपने मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मांना हटवून त्यांच्या जागी सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री म्हणून नेमले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे भाजपने दिल्लीत सत्ता गमावली. वातावरण इतके भाजपविरोधात गेले होते की काँग्रेसने शिला दिक्षित या त्यामानाने तेव्हा अपरिचित असलेल्या आणि स्वतःच्या लोकप्रियतेच्या आधारावर फारशी मते फिरवू न शकणार्‍या नेत्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केले तरीही भाजपचा धुव्वा उडाला. त्यानंतर दिल्लीत शिला दिक्षित यांनी दिल्लीत नक्कीच चांगले काम केले. आज दिल्लीतील इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगले आहे. मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची सुरवात शीला दिक्षितांच्या पहिल्या कार्यकाळात झाली होती. त्यामुळे २००३ मध्ये भाजपचा पराभव झाला. २००८ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान २६/११ नंतर झाले होते तेव्हा दिल्ली हा शहरी भाग असल्याने मुंबईतील हल्ल्याचा परिणाम होईल आणि काँग्रेस हरेल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. २०१३ पासून पुढे काय झाले हे परत वेगळे लिहायलाच नको. उद्या काय होते याची उत्सुकता आहे. बघू काय होते ते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 02/08/2025 - 04:13 नवीन
१० फेब्रुवारी २०१५ रोजी आपटर्ड जे करत होते तो उन्माद नव्हता पण आज भाजप जिंकल्यास भाजप समर्थक (त्यांच्या भाषेत भक्त) जे काही करतील तो उन्माद असेल. काय समजलात?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 04:43 नवीन
आताची स्थिती - आआप २४, भाजप ४५, कॉंग्रेस १ मनीष सिसोदिया, केजरीवाल व आतिशी हे तिघेही मागे आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 05:45 नवीन
आताची स्थिती - आआप २८, भाजप ४२, कॉंग्रेस ० केजरीवाल आता पुढे, मनीष सिसोदिया १३००+ व आतिशी १०००+ मतांनी अजूनही मागे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 02/08/2025 - 06:52 नवीन
बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 02/08/2025 - 07:23 नवीन
बरोबर ३५-३५ असे झाले तर काय होईल ? काँग्रेस आणि इतर हे प्रत्येकी शून्य शून्य जागा असल्याने फोडाफोडी करण्याचा स्कोप शून्य दिसतो.
१९८९ मध्ये गोव्यात या परिस्थितीच्या एकदम जवळ अशी परिस्थिती आली होती. ४० पैकी काँग्रेस आणि म.गो.पक्षाला प्रत्येकी १९ जागा होत्या तर दोन जागा अपक्षांना होत्या. त्यापैकी एक अपक्ष काँग्रेसच्या बाजूचा तर दुसरा म.गो.पक्षाच्या बाजूचा होता. त्यामुळे २०-२० अशी बरोबरी होत होती. तेव्हा कोणतेही सरकार बनत नव्हते. नोव्हेंबर १९८९ च्या शेवटी मतमोजणी झाली तेव्हा ही परिस्थिती होती. मग त्या दोन्ही अपक्षांनी राजीनामा दिला आणि जानेवारी १९९० मध्ये त्या दोन जागांवर पोटनिवडणुक झाली होती. त्या दोन्ही जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि मग प्रतापसिंग राणे जानेवारी १९९० च्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री झाले होते. ती एक परिस्थिती वगळता इतर कोणत्याही राज्यात तसे झालेले नाही. त्यामुळे त्या परिस्थितीत काय होईल सांगता येणार नाही. मला वाटते अशा परिस्थितीत कोणाला सरकार बनवायला पाचारण करायचे की राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे राज्यपाल ठरवतील. छत्तिसगडमध्ये २००३, २००८ आणि २०१३ या तिनही विधानसभा निवडणुका एकदम चुरशीच्या होत्या. तिन्ही निवडणुकांमध्ये कधी भाजप पुढे होता तर कधी काँग्रेस. पण शेवटी ९० पैकी ४९-५० जागा जिंकून तिन्ही वेळा भाजप जिंकला. त्यावेळेसही ४५-४५ असे झाले तर काय करायचे असा प्रश्न टीव्हीवरील चर्चांमध्ये यायचा. हे लिहित असताना दिल्लीत भाजप ४६ आणि आप २४ अशी स्थिती आहे. काही वेळापूर्वी ३९-३१ असे आकडे होते. त्यामुळे ३५-३५ अशी बरोबरी व्हायची शक्यता त्यामानाने कमी दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 02/08/2025 - 07:36 नवीन
धन्यवाद. नीट लक्षात आले. गोव्यात लोकसभा निवडणुकीत अगदी कमी संख्या असल्याने एका व्यक्तीला देखील अतोनात महत्व प्राप्त होत असते.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 02/08/2025 - 07:24 नवीन
बरोबर ३५-३५ अस होताना दिसत नाही पण समजा झालाच आसत तर फोडफोडीसाठी लागणारे सगळे रिसोर्सेस भाजपकडे आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 02/08/2025 - 07:35 नवीन
आप मधल्यांना फोडणे हा एकमेव उपाय राहिला असता. वर चंद्रसूर्यकुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे शंका दूर झाली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 07:50 नवीन
आताची स्थिती - आआप २४, भाजप ४६, कॉंग्रेस ० केजरीवाल १८०० मतांनी मागे, मनीष सिसोदिया पुढे, आतिशी ३२००+ मतांनी अजूनही मागे. आता जवळपास हेच चित्र शेवटपर्यंत राहील असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 07:54 नवीन
सिसोदिया पराभूत झाल्याची अधिकृत घोषणा झाली. केजरू १८०० मतांनी मागे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 08:10 नवीन
६०० मतांच्या अंतराने सिसोदिया व १८४४ मतांच्या अंतराने केजरीवाल पराभूत झाले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 08:29 नवीन
आतिशी विजयी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 08:45 नवीन
आआपचा सत्येंद्र जैन पराभूत. आताची स्थिती - आआप २३ (६३% मते), भाजप ४७ (४७% मते), कॉंग्रेस ० (७% मते)
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 02/08/2025 - 09:13 नवीन
आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)
  • Log in or register to post comments
य
यश राज Sat, 02/08/2025 - 11:43 नवीन
आजच्या निकालामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आतिशी आणि गोपाळ राय वगळता आपचे बहुतेक सगळे मोठे नेते हरले आहेत/ हरत आहेत. स्वतः केजरू हरल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता पाताळविजयन या मद्रासी चित्रपटातील त्या राक्षसाप्रमाणे मी हा हा असे हसणार :)
अगदी सहमत कर्म काय ते म्हणतात ते हेच. केजरु स्वतःला दिल्लिचा मालक समजु लागला होता. आज मात्र स्वतःची लायकी कळाली असेल. आता पंजाब राजकारणात काय ऊलथापालथ होतेय ते बघणे मजेशीर असेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 02/08/2025 - 09:22 नवीन
दिल्लीकरांच्या दुःखात सहभागी आहे, अतिशय चांगली आरोग्यव्यवस्था नी अतिशय चांगल्या सरकारी शाळा आता तश्या राहणार नाहीत, त्यांच्यावर होणारा खर्च आता भाजप नेत्यांच्या खिशात जाणार. थोडक्यात चांगल्या दिल्लीचा आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश होणार, भ्रष्टाचार आणी गुन्हेगारीने बजबजपुरी येणार! केजरीवाल मनीष सिसोदिया असे दिग्गज पराभूत होऊ शकत नाही, त्याना पराभूत केले गेले म्हणजे बहुतेक महाराष्ट्र पॅटर्न तिकडेही राबवण्यात आलाय. लोकशाहीला श्रद्धांजली. दिल्लीतील गोबरयुगाला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 02/08/2025 - 09:40 नवीन
ईवीएम हो ईवीएम. सगळे ईवीएम अगोदरच फिक्स होते.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sat, 02/08/2025 - 09:49 नवीन
+१ हेच रडगाणे गातील आता :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 12:14 नवीन
मोहल्ला क्लिनिक बद्दल माहिती घ्या. शाहीनबाग मध्ये काय झाले? ह्याची पण माहिती घ्या. शीशमहल बद्दल माहिती घ्या. दारू घोटाळ्या बद्दल माहिती घ्या. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना नंतर पाठिंबा का दिला नाही? ह्या बद्दल माहिती घ्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 14:16 नवीन
https://www.newindianexpress.com/cities/delhi/2024/Oct/01/aaps-flagship-mohalla-clinics-face-closure A visit to several clinics across Delhi reveals a range of operational challenges, including untimely closures and acute staff shortages, which have left many clinics non-functional. An additional concern is the suspension of laboratory tests. These tests, which were previously free for patients and conducted by private labs reimbursed by the government, have been halted. The stoppage followed an Anti-Corruption Branch (ACB) investigation that revealed that nearly 65,000 fictitious patients were prescribed tests between February and December last year. The tests, performed by two private labs, led to ₹4.63 crore being disbursed from government funds for fraudulent services. The ACB inquiry, initiated after a complaint from Special Secretary (Vigilance) Y.V.V.J. Rajasekhar on January 10, uncovered significant discrepancies. According to the report, 63% of patients’ contact numbers were either invalid or belonged to individuals who had never visited the clinics. हे मोदी विरोधकांना दिसत नसले तरी सामान्य जनतेला दिसत असते. आणि तेच मतपेटीतून/ इ व्ही एम मधून प्रतिबिंबित होतं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:26 नवीन
अशी लोकं एकतर व्यक्तीपूजा तरी करत असतात किंवा पराकोटीचा व्यक्तीद्वेष... आणि दोन्ही गोष्टी त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी घातकच असतात, हे पण त्यांना कळत नाही. इतर जनांत, अशी माणसे फक्त, इतरांसाठी विदूषकाचे काम करतात. अभ्यास करून, प्रकटावे.....
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 12:59 नवीन
पक्या इमारतीत कमी भाड्यावर असलेल्या पन्नास पन्नास वर्ष जुने दवाखाने बंद केले. रस्त्याच्या कडेला कार्डबोर्डच्या कोंटेनर सारखे मोहल्ला क्लिनिक उघडले. तिथे पाणी आणि टॉयलेटची सुविधा नाही. हे क्लिनिक सकाळी नऊ ते 1 वाजेपर्यंत उघडे राहतात.प्रत्येक क्लिनिकांत एक डॉक्टर रुग्ण तपासाला रहात असे. रुग्ण रस्त्यावर बाहेर उभे राहतात. अनेक क्लिनिक केंव्हाच तुटून नष्ट झाले आहे. नागल पुला जवळ एक क्लिनिक रस्त्यात दिसायचे. क्लिनिक मला तरी नेहमीच रिकामे दिसत होते. बहुतेक हीच अवस्था अधिकान्श क्लिनिकची होती. तरी देखील कागदांवर मोहल्ला क्लिनिकांत चार तासांत शेकडो रुग्ण तपासले जात होते. अधिक काही बोलत नाही. सत्य पुढील काही दिवसांत जनतेसमोर येईलच.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 12:50 नवीन
दिल्लीत आले असते तर सत्य दिसले असते. गेल्या दहा वर्षांत दिल्लीची जनसंख्या दीड कोटी वाढली त्यात निम्न वर्ग जास्त वाढली. हजार एक नवीन शाळा उघडण्या एवजी आधीचा शाळा बंद झाल्या. (आरटीआय करून तपासू शकता) बाकी अटल योजनेत जवळपास सर्व शाळांना लॅब मिळाली. सरकारी शाळा सोडून मोठ्या प्रमाणात निजी शाळेत गरीबांना ही जावे लागत आहे. आरटीआय करून तथ्य तपासू शकता. शीला दीक्षितच्या काळात सहा नवे हॉस्पिटल उभारले. त्यात आमच्या जनकपुरी येथील 200 बेडचे एक होते. 2013 पर्यन्त opd ही सुरू झाल्या होत्या. आज 2025 सुरू झाले अजूनही चतुर्थांश आयपीडी पूर्ण सुरू नाही झाल्या. आरटीआय करून तपासू शकता. बाकी मोहल्ला क्लिनिक हे चार तास उघडते तिथे पाणी टॉयलेटची सुविधा ही नाही. औषधी नाहीत. बाहेरून रिकामे दिसत असले तरी चार तासांत चारशे पाचशे रोगी एक डॉक्टर तपासतो. पराजयाचे मुख्य कारण दिल्ली जळबोर्ड जे नाले सफाई, सिवर आणि पाणी पुरवठा करते. कमाई अभावी 70000 कोटींच्या तोट्यात असल्याने पगार द्यायला पैसा नाही. पाण्याच्या लाइन दुरुस्त होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून आमच्या भागात घाण पाणी येत आहे. पूर्ण पश्चिम दिल्लीची हीच परिस्थिति. गेल्या वेळी 10 पैकी दहा जागा आपला मिळाल्या होत्या. फक्त घाण पाण्यामुळे 9 जागा हातातून गेल्या. सर्व नाले तुडुंब वाहत आहे, सर्व गल्ल्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. आत्ताची परिस्थिति गेल्या दहा वर्षांत डीटीसीला 25000 कोटींचा तोटा करून दाखविला. प्रती यात्री 30 रु हून जास्त तोटा. बसेस संख्या 2013 पेक्षा कमी झाल्या आहे. हे वेगळे केंद्र सरकारने दिल्ली वर कृपा करत 2000 इलेक्ट्रिक बसेस फ्री दिल्या. बाकी सर्व महिलांना तिकीट घेण्याची गरज नाही. 10 लक्ष महिला बस ने प्रवास करतात. केजरीला विश्वास होता त्यातल्या अर्ध्या निश्चित त्याला मत देतील. गुन्हेगारी म्हणाल तर आमच्या उत्तम नगरचा पूर्व विधायक बाल्यान गुन्हेगारीतच जेल मध्ये गेला आहे. त्याच्या बायकोला तिकीट दिले. तिचा पराजय झाला. दंग्यांच्या ओरोपीन्ंना तिकीट दिले. तो जिंकला ही. केजरी सहित सर्वच मोठे नेता भ्रष्टाचार करून आत किंवा जमानत वर आहेत. खरे म्हणाल तर देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आपची होती. पण दिल्लीतील 18 टक्के मुस्लिम जनसंख्या त्यात अर्धी बंगलादेशी आहे आणि ते 80 टक्के मतदान करतात. बाकी लोकांचे तृतीयांश मत मिळाले तरी आप जिंकू शकते त्यामुळे केजरीवाल निश्चिंत होता. पण नळांना येणारे घाण पानी आणि एका वर एक बाटली फ्री असल्याने मध्यम वर्गीय आप समर्थक आणि छोटे दुकानदार, ऑटो चालक आप पासून दूर गेले.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 10:02 नवीन
आआपची बंद दाराआड बैठक सुरू आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. मतयंत्रात गडबड, बनावट मतदार, आमच्या समर्थकांना मत देण्यासाठी जाऊन दिले नाही, मतदारांना पैसेवाटप केले यापैकी कोणकोणती कारणे पराभवासाठी द्यायची यावर बैठकीत उहापोह सुरू आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/08/2025 - 10:33 नवीन
दिल्ली निवडणूकीत भाजपने घेतलेली आघाडी पाहता भाजपाने सत्ता मिळवलेली दिसत आहे. जवळ जवळ सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत बदल होत आहेत, लोकशाहीत सत्तेत बदल होत राहीले पाहिजेत. साचलेपण आलं की त्याचं गटार होतं आणि माजही यायला लागतो. उदाहरण आपल्याला केंद्रातलं सरकार डोळ्यासमोर आहेच. दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे. तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन. स्वच्छ यमुना , दिल्ली प्रदुषण, सुशासन, आणि दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही भाजपाची प्राथमिकता असेल. दिल्लीतलं राजकारण पाहता भाजपा दिल्लीत सत्तेसाठी आसूसलेली होती. सर्वप्रकारचे जुमले वापरणे सुरु होते. राज्यपाल आणि आप सरकारचा संघर्ष, इडी, आयकर यांची दडपशाही, आपच्या उमेदवारांना जेलात पाठविण्याची झालेली घाई, खोटेनाटे आरोप करुन आपच्या सरकारचे कंबरडे केंद्रीय सरकारने मोडलेले होते. आपचा संघर्ष आत आणि बाहेर असा दोन्ही ठिकाणी गेली अनेक वर्ष बघायला मिळाला. गल्ली-मोहल्ल्यातल्या आरोग्यसुविधा, सरकारी शाळांचा कायापालट, बीजली हाफ पाणी माफ, वेगवान प्रशासन या आणि अशा लोकप्रिय घोषणांनी केजरीवाल सरकारने आपली एक वेगळी छबी निर्माण केली. काही राज्यांमधे देशभर राजकारणांचा प्रवास सुरुही केला. श्री अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशभर कॉंग्रेस सरकार हटविण्यासाठी जी मोहीम सुरु केली त्याचं यश भाजपाला जसे मिळाले तसे, केजरीवाल सरकारलाही त्याचा फायदा झाला. एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. येत्या काळात आप विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी करतील त्यांनाही शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 14:09 नवीन
काय बिरुटे सर? आता किती दिवसांचे सुतक? बाकी सर्व आरोप करून झाले. आता फक्त दिल्लीच्या मतदारांची अक्कल काढायची राहिली आहे. तेच इ व्ही एम, इ डी, सीबी आय, पैशाचा खेळ, धमक्या, दडपशाही,लोकशाहीची हत्या हि तुणतुणी ऐकून दिल्लीचे मतदार कंटाळले आणि दिलं केजरीवालांना हाकलून. तुम्ही वाजवा तेच तुणतुणं-- पुढची पाच वर्षे दिल्लीत आणि महाराष्ट्रात सुद्धा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/08/2025 - 14:18 नवीन
डॉक्टर साहेब, सुतक वगैरे सर्व गोबरभक्तांना असतं. आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 14:30 नवीन
आमचं काम अन्यायी व्यवस्थेशी लढणं. व्यवस्थेशी भिडणं. हो लढा ना आणि भिडा ना. पण अन्याय नक्की कुठे होतोय आणि कोण करतंय हे निदान समजून तरी घ्या? आरामखुर्चीत बसलेल्या विचारवंतांच्या नादाला लागल्यास निराशाच पदरात येते एवढे समजून चला. दिल्लीतील परिस्थिती मी खूप जवळून पाहिली आहे आणि पाहतो आहे. सुरुवातीला लोकांच्या केजरीवाल यांच्याबद्दल प्रचंड अपेक्षा होत्या. मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी शाळा या दोन गोष्टी त त्यांनी सुरुवातीला केलेल्या सुधारणा नेत्रदीपक होत्या. पण जसा काळ गेला तसा आप ला सुद्धा भ्रष्टाचाराची कीड लागली आणि केजरीवाल यांचा प्रचंड अहंकार त्याला उपाय करायला संपूर्ण अपयशी ठरला. बहुतांश मोहल्ला क्लिनिक बंद पडली आहेत किंवा जेमतेम चालत आहेत. बाकी त्यांनी वाटलेल्या रेवड्यांमुळे दिल्ली वीज मंडळ फायद्यातून तोट्यात आले आहे. डीटीसीच्या बसेस मध्ये बायकांना फुकट प्रवास देण्यापेक्षा स्त्रियांसाठी वेगळ्या बसेस किंवा आहे त्याच बस मध्ये स्त्रियांसाठी वेगळे दार केले असते तर त्यात प्रवास करणाऱ्या स्त्रियांना जास्त सुविधा झाल्या असत्या. अशा अनेक गोष्टी आहेत. पण जाऊ द्या तुम्ही वातानुकूलित खोलीत आरामखुर्चीत बसून कळफलक बडवा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/08/2025 - 14:32 नवीन
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 14:33 नवीन
आपल्या कडून हीच अपेक्षा होती
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 14:40 नवीन
Delhi discoms in crisis: Debt and regulatory gaps the discoms continue to report a substantial shortfall in their revenue from the sale of electricity which is manifest in cumulative monumental RAs of Rs 27,200 crore. discoms will leave no stone unturned in recovering the money say by getting sanction of a steep hike in tariff to make up for the entire cumulative deficit in revenue. Indeed, the matter had gone right up to the Supreme Court (SC) which in an order given in early 2023 had directed the DERC to let discoms recover their RAs. This could lead to a 100 per cent hike in tariff. केजरीवालांच्या रेवड्या आता दिल्लीकरांच्या बोकांडी बसणार
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/08/2025 - 14:52 नवीन
१. दिल्लीतील महिलांना २,५०० रुपये. २. दिल्लीतील पहिल्या प्रसुतीनंतर महिलेला ५,००० रुपये व दुसऱ्या प्रसुतीनंतर ६,००० रुपये. ३. सिलेंडरवर गरीब महिलांना ५०० रुपयांचं अनुदान. ४. होळी व दिवाळीला एकेक सिलिंडर मोफत. ५. नवजात बाळासाठी सहा पोषण किट्स. ६. गर्भवती महिलेला २१,००० रुपये. ७. अटल कँटीन योजनेअंतर्गत ५ रुपयांमध्ये भोजन. ८. पन्नास हजार सरकारी नोक-या. ९. दिल्लीत पाच लाख रुपयांचे मोफत उपचार. डॉक्टरसाहेब, या रेवड्यांसाठी किती कर भर लागेल आपल्याला. किती किती जीएसटी द्यावा लागेल. किती आश्वासने पूर्ण होतील. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/08/2025 - 15:07 नवीन
हमारे देश मे मुफ्त की रेवडी बाटकर वोट बटोरने का कल्चर की कोशीश हो रही है, रेवडी कल्चर देश के विकास के लिये बहोत घातक है, रेवडी कल्चर को देश से हटाना है - आदरणीय मोदीजी यांचे अमुल्य विचार. दुवा. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/08/2025 - 15:09 नवीन
रेवड्या हा रोग च आहे. मग तो महाराष्ट्रात असो कि इतर कोणत्या राज्यात आणि कोणता पक्ष देतो ते सुद्धा महत्त्वाचे नाही. हा रोग केवळ दाक्षिणात्य राज्यापुरता मर्यादित होता आणि केजरीवालांनी तो मुख्य प्रवाहात आणला हाच सर्वात वाईट मुद्दा आहे. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडळ कमिशन द्वारे आरक्षणाची बाटली उघडलूयवर तिला बूच घालणे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य झालेलं नाही. केवळ सर्वोच्च न्यायालयाने ५० % चा प्रतिबंध घातल्यामुळे आरक्षण नियंत्रणात आहे आता रेवड्या देऊन निवडणूक जिंकता येतात हा प्रघात त्यांनी दिल्लीत आणि पंजाबात पाडल्यावर इतर राज्यांना आणि पक्षांचा निरुपाय झाला. फडणवीस हुशार असले तरी रेवड्यांशिवाय तरणोपाय नाही हे लक्षातआल्यामुळे महाराष्टात पण लाडकी बहीण सारखी रेवडी वाटून त्यांनी सत्ता मिळवली. कारण सत्ता हातात नसली तर साधन शुचितेला कुत्रं विचारत नाही एवढे समजण्याइतके फडणवीस आणि मोदी धूर्त नक्कीच आहेत आणि साधनशुचितेसाठी सत्ता हातातून घालवण्याइतके मूर्ख हि नाहीत. दुर्दैवाने या रेवड्यांवर सर्वोच्च न्यायालय सुद्धा नक्की निर्णय देऊ शकलेले नाही. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जितके देशाचे नुकसान केले आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान केजरीवाल यांनी केले आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 14:35 नवीन
बरोबर आहे. रोज मरे त्याला कोण रडज? किती दिवस सुतक पाळणार? दरवर्षी अनेक निवडणुका आणि प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर सुतक पाळायचे असेल तर वर्षातले ८-१० महिने सुतकातच जाणार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 14:20 नवीन
दिल्लीतील सध्याचे निकाल पाहता, भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्वीवाद विजय मिळाला असे म्हणता येत नाही. कॉंग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका आपच्या उमेदवारांना आणि त्याचा फायदा भाजपाला झालेला दिसत आहे समजा कॉंग्रेसचे उमेदवार नसते तरीही भाजपच्या विजयी उमेदवारांनी निर्विवाद विजय मिळाला असे म्हणता येणार नाही असे म्हणता आले असते कारण अपक्ष, एमआयएम वगैरेंनी घेतलेल्या मतांचा फटका आआपला बसला असे म्हणता आले असते. तरीही, विजय विजयच असतो. रेवडी-खैरातीत, लाडक्या बहीणींना २५०० रुपये. पाच रुपयात जेवण, पाचशे रुपयात सिलेंडर, मेट्रोत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, पन्नास हजार नौक-या यालाही मतदार भुललेला दिसतो. २०१३ ते २०२५ या वर्षात फुकट वीज, फुकट पाणी या रेवड्यांना दिल्लीकर भुलला नव्हता का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 16:28 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 03/05/2025 - 05:09 नवीन
कोंग्रेस आणि आपची युती झाली असती तर भाजपच्या दहा जागा अजून वाढल्या असत्या. कोंग्रेस ने फक्त हिंदू मते खाल्ली. अल्पसंख्यक 99 टक्के आप सोबत होता. बाकी आपचे 25 टक्के मतदार लोकसभेत भाजपला मत देतात. ते उदासीन राहिले असते.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 02/10/2025 - 13:10 नवीन
एक चांगलं सुशासन देण्याचा केजरीवाल-शिसोदिया यांनी प्रयत्न केला. डॉक्टर साहेब हा तुम्ही मस्त जोक केला. कारण याहून भ्रष्ट शासन देशात कधीच आले नसेल. उच्च शिक्षणाच्या 20 कोटी पैकी 19.43 कोटी विज्ञापन वर खर्च करणारी सरकार होती. आरोग्य सुविधा सुविधा तर रसातळवर पोहचली होती. दीड कोटी आबादी वाढली त्यात अधिकान्श निम्न वर्ग होता. तरी सकारी शाळा 2013 पेक्षा कमी होणारे हे एकमेव राज्य असेल. बाकी अनेक मंत्री विधायक, भ्रष्टाचार गुंडागर्दी दंगा आरोपात जमनात वर किंवा जेलं मध्ये आहे. आमच्या उत्तम नगर भागातील आता पूर्व विधायक बल्यान तुमच्या भाषेत शांतिपूर्ण कार्यामुळे जेल मध्ये आहे. त्याची बायको निवणूक हरली. गेल्या वेळी प. दिल्ली 10 पैकी 10 जागा आपला मिळाल्या होत्या. पण गेल्या दोन वर्षांपासून नळांना घाण पाणी येत असल्याने 9 जागा आपच्या हातून गेल्या. आता फ्री पाण्यामुळे जळबोर्ड 70000 कोटींच्या तोट्यात आला. जिथे पगार देण्यासाठी पैसा नाही तिथे पाईपलाईन दुरूस्ती नाले सफाई, सिवर लाइन दुरूस्ती कुठून होणार. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी 30 ते 80 रुपये 20 लीटर RO पाण्यासाठी खर्च करावे लागत आहे. डीटीसी ही 30000 कोटींपेक्षा जास्त तोट्यात आहे. 25000 कोटींचा तोटा गेल्या दहावर्षांतला आहे. भयंकर भ्रष्टाचार आणि 2007 पासून भाडे न वाढविल्याचा परिणाम. देशाच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार ही आपची होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/08/2025 - 15:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 20:04 नवीन
https://youtu.be/ZodvABuDUa4?si=U1yKmnqH-xiaimA6 ------
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/08/2025 - 21:28 नवीन
Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; अरविंद केजरीवालांच्या गुरुची मार्मिक प्रतिक्रिया, अण्णा हजारे म्हणाले... https://marathi.abplive.com/elections/anna-hazare-on-arvind-kejriwal-delhi-election-result-senior-social-worker-anna-hazare-has-reacted-to-the-delhi-assembly-results-2025-marathi-news-1343137 -------
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा