Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

ज
जावा फुल स्टॅक
Fri, 05/05/2023 - 15:17
🗣 125 प्रतिसाद
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा. पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो. चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत. धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते. चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही. --- रेटिंग : ४.२/५
  • चित्रीकरण *****
  • अभिनय *****
  • दिग्दर्शन ****
  • पटकथा ****
  • परिणामकारता ****
--- द केरल स्टोरी चित्रपटाचे युट्यूब टीजर --- हा चित्रपट आणि त्यातील संदेश यांपुरती मर्यादित चर्चा करण्याची; धाग्याला राजकीय वळण लागू न देण्याची मिपाकरांकडून अपेक्षा. - जावा फुल स्टॅक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24212 views

🗣 चर्चा (125)
क
कॉमी Mon, 05/08/2023 - 18:53 नवीन
The Mappila community originated primarily as a result of the West Asian contacts with Kerala, which was fundamentally based upon commerce ("the spice trade")
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 05/08/2023 - 19:18 नवीन
अच्छा. तेच का ते मोपल्यांचे बंड वाले? टिपूच्या अनेक शतके आधी एका राजाने स्वतःहून इस्लाम धर्म स्विकारला होता हे मी पण वरच्या एका प्रतिसादात लिहिले आहे. त्याच्या बरोबर सामान्य लोकांपैकी अनेकांनीही धर्मांतर केले असायची शक्यता आहेच. बादवे, दरवेळेस तुमचा आकड्यांवर भर असतो म्हणून विचारतो. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये केरळमध्ये साधारण २६% मुस्लिम आहेत ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे. त्यात विशेष काही नाही. पण त्या विकीपिडीयावरील लेखाचे शीर्षक आहे- मोपले. त्यावरून कोणाला वाटायचे की सगळे २६% मोपले आहेत. पण तसे नाही. त्याच लेखात दिले आहे की केरळी मुस्लिमांमध्ये मोपले किती आणि इतर किती याची वर्गवारी उपलब्ध नाही. मग सध्याचे लोक स्वयंप्रेरणेने धर्मांतर केलेल्यांचे वंशज आहेत (म्हणजेच टिपूने सक्तीच्या धर्मांतर केलेल्यांचे वंशज फार प्रमाणात नाहीत) हे म्हणण्यासाठी नक्की कोणती आकडेवारी उपलब्ध आहे? तुम्हीच दिलेल्या त्या लेखात दिलेल्या टेबलवरून कळते की केरळमधील मुस्लिमांपैकी ६०% पेक्षा जास्त मलबारमध्ये आहेत (मलापुरम- ३२.५६%, कोईकोडे- १३.६५%, कन्नूर- ८.३७%, कासारगोड- ५.४९% आणि वायनाड- २.६४%). नेमका हाच भाग टिपूच्या टाचेखाली आला होता. तेव्हा सध्याचे लोक टिपूने सक्तीने केलेल्या धर्मांतरीत लोकांचे वंशज आहेत ही शक्यता जास्त नाही का?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 05/08/2023 - 18:52 नवीन
काहीच वर्षापूर्वी आपल्या देशाची मुस्लिम धर्मामुळे फाळणी झाली. देशातले एकमेव मुस्लिम बहुल राज्यातून हिंदूंना हाकलून देण्यात आले आजूनही तिथे हिंदूंना वेचून ठार केलं जातं. केरळमध्ये ही हिंदुपेक्षा 5 पटीने मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. पण तरीही islamikrnacha धोका दिसत नाही?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Mon, 05/08/2023 - 19:25 नवीन
असा धोका न दिसणार्‍यांना विचारवंत म्हणतात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/09/2023 - 04:50 नवीन
टिपूने तेव्हा हे कांड केलं म्हणून आता स्वतंत्र भारतात पूर्ण भारतच इस्लामीकरण होईल याची लोकांना भीती दाखवणं हा शुद्ध संघी हलकटपणा आहे, १००० वर्षात झाले नाही पण कुरतडून कुरतडून धर्मांतर ( फक्त इस्लामी नाही कमी भेदक वाटणारे पण तेवधच धर्मांध ख्रिस्ती धर्मांतर ) होतंय आणि त्या यासाठी ही व्यस्थित कार्यक्रम आहे / असतो यावर विश्वास दिसत नाहीये,,, बर हा "लबे रेस का घोडा " प्रकार चा दूरपल्याचाच कार्यक्रम आहे हे हि कळत नसावे ) प्रत्यक्ष धर्मांतर कर्णायाधी , ज्यांचे धर्मांतर करा यचे आहे ( हिंदू) त्यांना आधी बोथट करणे , मग त्यात शिक्षण, त्यांचायतील वाईट प्रथानचा वापर करून त्यांच्यात फूट पाडणे ..( हिंदूंना जातीवरून ) हि अनेक शस्त्रे असतात बाकी "संघ हलकटपणा" वैगरे चालू द्या ... तो हि "लबे रेस का घोडा " आहे त्यामुळे हलकटपणा वैगरे बिरुदे लावून काय फरक पडणार नाही लोकआता एवढे "त्याचू" राहिले नाहीत
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/09/2023 - 06:05 नवीन
टिपूच्या काळात तलवारीच्या धाकाने धर्मांतर होत होतं. आताच्या काळात तसे होणे बरेच अवघड आहे. म्हणून तर आर्थिक मदत, ओळख लपवून फशी पाडणे असे प्रकार सुरू झाले व ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोघेही या प्रकारातून टाळकी वाढवित आहेत. याविषयी लोकांना जागृत करणे हा हलकटपणा नसून ही जागृती करणाऱ्यांना हलकट म्हणणे हाच खरा हलकटपणा आहे. भारताचं वाटोळं झालं तरी चालेल पण आम्ही संघद्वेषाची पिचकारी टाकणारच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/09/2023 - 05:17 नवीन
लोक डोळे मिटून पाठीमागे जयजयकार करत चाललेत , हायला हे बरं आहे तुमचं " भाजप ची जरा जरी पाठराखण केली कि लगेच "डोळे मिटून पाठीमागे जयजयकार" आणि ६० वर्षे नेहरू डोक्यावर घेऊन जे काय केले ते काय? लोकशाहीत दावे उजवे दोघांना हि अधिका र आहे ना रिंगणात उतरण्याचा.. ? का हेच मूळ मान्य नाही ? असही असु शकत का हो? काही लोक जागे झाले असतील सुद्धा ? ६० वर्षे काँग्रेस एके काँग्रेस च्या राज्यात "जी काही" विचारसरणी राबवली गेली तिचायतील चुका कळल्या असतील आणि दुसरी विचारसरणी असू शकते ? का सगळेच अंध भक्त याचा गठ्ठा घेऊन फिरताय लोकांना लावायला ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/10/2023 - 06:16 नवीन
पुरोगामी विचार सोडला आणि वस्तुस्थिती लक्षात घेतली तर केरळ चे उत्तरेकडचे जिल्हे ( कासारगोड, मल्लापुरम, वायनाड कन्नूर, कोढीकोडे) हे लोकसंख्या वाढीत अग्रेसर असले तरी दरडोई उत्पन्न, सकल उत्पन्न, मानवाधिकार यात केरळच्या इतर जिल्ह्याच्या मानाने मागासलेले आहेत. अर्थात योगायोगाने याच जिल्ह्यात मुसलमान लोकांची संख्या जास्त असल्याचे आढळते. केरळच्या जिल्ह्यांची तुलना उत्तर प्रदेश किंवा बिहारशी करणे म्हणजे आमची पपई तुमच्या हापूसच्या आंब्यापेक्षा जास्त गडद केशरी रंगाची आहे म्हणून स्वतः ची पाठ थोपटण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/11/2023 - 05:59 नवीन
त्यातही आम्ही आरोग्यव्यवस्थेत कित्ती कित्ती क्रांती केली अशी स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे लोक कितपत विश्वासार्ह असतात हा प्रश्नच आहे. फिडेल कॅस्ट्रोने क्युबात अशीच आरोग्यव्यवस्थेत मोठ्ठी क्रांती केली होती असे ढोल नेहमी पिटले जातात. मग त्याच्यावर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर का बोलावावा लागला होता? क्युबात डॉक्टर नव्हते का? https://www.nbcnews.com/id/wbna16346039 . तीच गोष्ट खुद्द केरळचे मुख्यमंत्री विजयन यांची. जर केरळमध्ये आरोग्यसेवा इतकी उत्तम असेल तर केरळचे मुख्यमंत्री स्वतः उपचार घ्यायला अमेरिकेला का गेले होते? https://www.thehindu.com/news/national/kerala/cm-leaves-for-treatment-in-the-us/article65350503.ece आणि हो. कम्युनिस्टांना इतर वेळेस अमेरिकेच्या नावाने खडे फोडल्याशिवाय जेवण घशाखाली उतरत नाही पण उपचार घ्यायला मात्र त्याच अमेरिकेला गेलेले चालते का? अमेरिकेच्या जवळच फिडेल कॅस्ट्रोने आरोग्यव्यवस्थेत मोठ्ठी क्रांती आणलेला तोच क्युबा देश आहे. मग तिथे का नाही त्यांना जावेसे वाटले? असो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/11/2023 - 06:20 नवीन
काय पातळीवरची आधुनिक वैद्यकीय सोय उपलब्ध आहेत हा एक निकष झाला. सर्वसामान्य लोकांना सेवा परवडतात का हा सुध्दा महत्वाचा निकष आहे. अमेरिकेत पैसे असतील तर जगातले सर्वोत्तम वैज्ञकिय उपचार मिळतात. पैसे नसतील तर मात्र खरे नाही.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 05/08/2023 - 20:26 नवीन
मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन या आद्य लव्ह जिहादि लोकांचे काय करायचे ??
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 05/08/2023 - 21:34 नवीन
>>>मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन या आद्य लव्ह जिहादि लोकांचे काय करायचे ?? लव्ह जिहाद मधला महत्वाचा आणि आक्षेपार्ह भाग "कसाब" ने "कपिल" हे नाव धारण करून मुलींना फसवणे.. हा आहे. मुख्तार अब्बास नक्वी किंवा शाहनवाजने असे नाव बदलून फसवाफसवी केल्याचे पुरावे आहेत का..? असल्यास पुरावे द्या अन्यथा विधान बिनशर्त मागे घ्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/09/2023 - 15:06 नवीन
हे बघा आपटार्ड लोकांना कोणताही कसलाही पुरावा देण्याची गरज नसते हे त्यांच्या युगपुरुष गुरु यांची शिकवण आहे. मग भले युगपुरुष यांनी तीन वेळेस न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असली तरीही. त्यांचं एकच पालुपद मोदी यांनी काहीही केलं तरी ते चूकच असतं. पुरावा कसला मागताय?
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 05/10/2023 - 04:29 नवीन
कपिलमुनी, पुरावे मिळाले का? का हे तुमचे नेहमीप्रमाणे सुरू असलेले ट्रोलिंगच आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/09/2023 - 04:39 नवीन
२ प्रकारचे लव्ह जिहाद असतात हे तुम्हाला माहित नाही का ? १) फसवून म्हणजे "कसाब" ने "कपिल" हे नाव धारण करून मुलींना फसवणे २) त्यातील त्यात सरळमार्गी! म्हणजे आपण मुस्लिम आहोत हे ना लपविता आपल्याला हिंदू मुलगी पटवता येतीय का बघणे आणि तिचे धर्मांतर करणे आणी या २) पद्धतीत धार्मिक संस्थेची होणारी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत ... आता तुमच्या वीच।रसरणीला जर क्रमांक २ हे आजीबाबत आक्षेपार्ह वाटत नसेल तर काय बोलणार कपाळ .. कदाचित क्रमानं १ हे अस्तित्वातच नसेल असेहि म्हणणे असेल आपले .. मूळ प्रश्न समजून घ्य्याचा नाही का? हिंदू शकत्यो इटारसानेच धर्मांतर करून आपलं धर्म वाढवण्याचं फंदात पडत नाहीत ( शक्यतो म्हणतंय ,, नाहीतर इस्कॉन चे घोडे पुढे कराल - आणि तसेही इस्कॉन येते स्वतःला हिंदू म्हणून घेत नाहीत हा वेगळा भाग ) त्यामुळे हिंदूंना बाकिच्यांनी आपले धर्मांतर केलेलं आवडत नाही ... पण झापड लावयाचीच ठरवली असतील तर राहू तसेच... सर्व तथाकथित उदारमतवाद्यांचा मुख प्रश्न आणि जळफळाट हा आहे की .. भारतातात हिंदूंवर झालेल्या अन्याय किंवा अत्याचाराचे असे उघड प्रदर्शन कसे करू देताय सरकार? काँग्रेस काळात असल काही खपवून घेतले जात नवहते दिवस चांगले होते,, अल्पसंख्यांकांनाच फक्त भावना असायच्या.. बहुसंख्याकच्या भावनांना कोण विचारतो.. गेले उडत .... हे बहुसंख्याक एकदम जागे कसे काय झाले...
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 05/09/2023 - 08:28 नवीन
श्री कॉमी, तुमचा ३२ हजार आकड्याला असलेला आक्षेप वरकरणी तरी योग्य दिसत आहे. अधिकृत विदा उपलब्ध नसल्याने मतांतरे अपेक्षित आहेत. पण त्या चित्रपटातील मुख्य मुद्दा प्रेमजिहाद ह्याबद्दल तुमचे मत काय? तुमचा त्याला पाठींबा आहे की विरोध आहे? तलवारीच्या जोरावर जी भारतात धर्मांतरे गोवा आणि इतस्ततः झाली त्यांना न्याय मिळायला नको का? ---
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 05/09/2023 - 15:25 नवीन
जबरदस्तीने किंवा फसवून केलेले लग्न आणि धर्मांतर वाईटच. त्याचा पाठींबा कोण करेल ? तलवारीच्या जोरावर>>> न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 05/09/2023 - 15:50 नवीन
जबरदस्तीने किंवा फसवून केलेले लग्न आणि धर्मांतर वाईटच. त्याचा पाठींबा कोण करेल ?
म्हणजे तुमचा केरळ स्टोरीचा मुद्दा मान्य आहे, फक्त तपशीलात मतभेद आहे.
न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?
त्या समुदायाने गुन्हा कबुल करवा, बिनशर्त माफी मागावी, नुकसान भरपाई द्यावी, त्यांची घरवापसी व्हावी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 05/09/2023 - 17:13 नवीन
न्याय म्हणजे भविष्यात हे प्रकार होऊ नये यासाठी धर्मांतर प्रतिबंध कायदा आणणे, धर्मप्रसारास कायदेशीर प्रतिबंध आणणे, धर्मप्रसारास भारतात येण्याऱ्या मिशनऱ्यांना प्रवेश परवाना न देणे इ.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/10/2023 - 03:02 नवीन
श्रीगुरुजी सहमत .. आणि वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत ... सर्वधर्माना समान कायदा .. म्हणजे सर्व नागरिकांना समान कायदा कॉमन सिविल कोड
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/10/2023 - 06:25 नवीन
लव्ह जिहादचे अजून एक प्रकरण. मुस्लिमाने हिंदू नाव घेऊन लग्न करून नंतर बायकोला ठार मारले.
  • Log in or register to post comments
उ
उनाड Wed, 05/10/2023 - 18:45 नवीन
हाच तर यू एस पी होता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/16/2023 - 05:05 नवीन
The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, हिंदू धर्माबद्दल अज्ञानामुळे केले धर्मांतर; सांगतेय अनघा… https://www.marathi.hindusthanpost.com/social/thrissur-anagha-converted-by-muslim-friend-says-the-kerala-story-real-film/
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 05/16/2023 - 05:20 नवीन
मुविकाका प्रतिसादाचे शीर्षक वाचून त्यात तुमचे मध्यपूर्वेतले स्वानुभव लिहिले असावेत असे वाटले होते, पण त्यात लिंक दिलेली बघून भ्रमनिरास झाला 😀
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/16/2023 - 05:33 नवीन
'द केरला ष्टोरी'च्या निमित्ताने 'धृव राठी' -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा