कळतं रे पण..
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय,
पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय.
येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय?
कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच,
किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच..
तरीही,
उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात,
तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात.
स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं?
पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं?
कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन
चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन!
...
सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत;
जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..
💬 प्रतिसाद