Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

डिंक म्हणजे DINK (double income no kids)

स
सुबोध खरे
Fri, 08/19/2022 - 09:06
🗣 136 प्रतिसाद
डिंक डिंक म्हणजे DINK (double income no kids) दुहेरी उत्पन्न आणि मूल नसणे. हा एक चर्चेचा विषय आहे आणि याबद्दल मिपावर धागा काढण्याबद्दल चर्चा झाली होती. ते वाचूनच मी हि सुरुवात करतो आहे. सध्या बऱ्याच स्त्रिया नोकरी व्यवसाय करू लागल्या आहेत त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा आणि स्त्रियांच्या स्वावलंबित्वाचा स्तर वाढत आहे हि एक सकारात्मक बाब आहे. यामुळे काही जोडप्यांची आपल्याला मूल नको अशी मनोवृत्ती होती / होत आहे किंवा झाली आहे. पूर्वी फारशा स्त्रिया नोकरी व्यवसाय करत नव्हत्या. त्याबद्दल समाजाची मनोवृत्ती सुद्धा तयार झालेली नव्हती. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र अशी समाजाची मानसिकता होती यामुळेच आपल्याला मूल नकोच अशी धारणा किंवा धाडस करणाऱ्या स्त्रिया नगण्य होत्या. आता उत्पन्नाची साधने सुद्धा उपलब्ध झाली असल्यामुळे आपल्या करियरला वाव मिळू शकतो आणि आपणही वेगवेगळ्या क्षेत्रात चमकू शकतो याची जाणीव स्त्रियांना झाल्यामुळे मूल नको हा चॉईस (निवडण्याचा हक्क) आपल्याला उपलब्ध आहे हि जाणीव सुद्धा स्त्रियांना होते आहे हि एक सकारात्मक बाब आहे. या सर्व गोष्टी मी लिहिण्याचे कारण मूल हवे हि नैसर्गिक उर्मी स्त्रियां मध्ये जास्त असते आणि समाज सुद्धा मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हि स्त्रीजन्माची इतिकर्तव्यता आहे आणि मातृत्व हा एक उच्च दर्जाचा त्याग ( आणि स्त्री हि त्यागमूर्ती) असे समजतो. या धारणेचा जबरदस्त पगडा अनेक स्त्रियांच्या डोक्यावर असतो आणि मूल नको असे म्हणणे हा स्त्रीत्वाचा अपमान होईल अशी भीती त्यांना वाटत असते. कायदा सुद्धा जाणीवपूर्वक आईला मुलांचा नैसर्गिक पालक समजतो. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवणाऱ्या जोडप्यांमध्ये स्त्रियांवर मानसिक ताण सुद्धा कुटुंबाकडून आणि समाजाकडून जास्त दिला जातो. यात समाजातील आणि कुटुंबातीलच स्त्रियांचा वाटा जास्त असतो. ज्यांना मूल होत नसतं अशी जोडपी सुरुवातीला आम्ही प्लॅनिंग करतो आहोत असे सांगतात. काही काळाने आम्हाला मूल होत नाही असे सांगण्यापेक्षा आम्हाला सध्या मूल नको असे सांगणे ते पसंत करतात. त्यात आम्हाला मूलच नको असे सांगणे सुद्धा काही जणांना फॅशनेबल वाटते. येथे चर्चा मूल नको हे जाणीवपूर्वक ठरवतात त्याबद्दल आहे. मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही. परंतु आम्हाला मूल होत नाही आणि दत्तक घेण्याची प्रक्रिया दुर्दैवाने अत्यंत किचकट असल्याने सुरुवातील दत्तक घेण्यास तयार झालेली जोडपी प्रत्यक्ष दत्तक घेण्याच्या वेळपर्यंत या प्रकाराला विटलेली मी अनेकदा पहिली आहेत. (अनेक वर्षे वंध्यत्व शास्त्रात काम केल्यावर आलेल्या असंख्य अनुभवावर मी असे लिहित आहे अर्थात माझेच अनुभव बरोबर किंवा सर्वोत्तम असा माझा कोणताही दावा नाही) लग्न झाले कि एक दोन वर्षात आता "एखादं मूल होऊन जाऊ द्या" असा धोशा मुलीच्या आई/ सासूकडून लावला जातो. अशा वेळेस आम्हाला कधीच मूल नको आहे असे ठामपणे सांगण्याची हिम्मत करणारी जोडपी फारच विरळ आहेत. बरीचशी जोडपी सध्या तरी मूल नको असे सांगताना आढळतात. हि अर्थात पळवाट असतेच असे नाही पण उगाच आताच वाद कशाला हा विचार असतो. बऱ्याच जोडप्यांची वृत्ती अजून ठाम आणि स्थिर झालेली नसते. त्यांना काही वेळ जाऊ दे मग परत विचार करू असेहि वाटत असते. परंतु काही जोडपी आता लग्नाच्या वेळेसच आपल्याला मूल कधीच नको अशी भूमिका घेताना दिसतात हि एक सकारात्मक गोष्ट आहे. कारण अगोदर असे स्पष्टपणे सांगण्याची हिम्मत नसणे हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त करून दिसते. माझ्या बरोबरच एम डी करणारी एक हुशार मुलगी असे करू शकली नाही आणी लग्न झाल्यावर तिने नवऱ्याला सांगितले. यामुळे त्यांचा घटस्फोट झाला परंतु हि प्रक्रिया दोघांना मानसिक दृष्ट्या फारच कष्टाची गेली. नवऱ्याला आपण कायम फसवले गेल्याची भावना होत होती आणि तिला आपण नवऱ्याला फसवल्याची खंत वाटत होती. परंतु घटस्फोटानंतर मात्र तिने आपल्या करियर कडे लक्ष केंद्रित केले आणि ती एका मोठ्या वैद्यकीय संस्थेत विभागप्रमुख म्हणून यशस्वीरीत्या काम करते आहे. आपल्याला मूल नको याची कारणे अशा काही जोडप्याना विचारली असता खालील कारणे त्यांनी मला सांगितली १) काही जोडप्यानी दोघांचे करियरचा आलेख चढता आहे त्यात आम्ही मुलाला वेळ देऊ शकणार नाही. मग मुलावर अन्याय करण्यापेक्षा आम्ही मूल नको असा निर्णय घेतला. यात काही जोडप्यानी सुरवातीला करियर साठी मूल लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि नंतर सुरळीत चाललेले करियर आणि संसार यात अडचणी आणण्यापेक्षा "आहे ते चांगले आहे" असा विचारपूर्वक निर्णय घेतला. २) एक जोडप्याने असेही सांगितले कि लोकसंख्या प्रचंड वाढलीआहे, त्यामुळे भुईला भार जास्त झाला आहे. अशात आम्ही अधिक भर घालणे आम्हाला पटत नाही ३) काही जोडप्यांमध्ये नवऱ्याला मुलांची फारशी आवड नव्हती आणि बायकोला मुलासाठी एवढे कष्ट काढणे किंवा वेळ देणे परवडणारे नव्हते. ४) काही जोडप्यांची त्यांना अध्याहृत असणाऱ्या सुखसोयी आपण मुलाला देऊ शकत नाही त्यामुळे मुलावर अन्याय करण्यापेक्षा त्याला जन्मच न देणे बरोबर वाटत होते. ५) काही लोकांना सुरुवातीला मूल हवे होते पण ते होत नव्हते. पण कालांतराने त्यांना दोघेच राहायची सवय झाली आणि आता यातून वेगळा विचार करण्यापेक्षा आहे ते चांगले आहे असेच वाटते आहे. ६) एका स्त्रीला लहान सात (रांगेने पाच बहिणी आणि नंतर दोन भाऊ) भावंडे होती आणि कळायला लागल्यापासून केवळ अपत्य( भावंड) संगोपनात आयुष्य गेल्यावर तिला आता परत त्या गोष्टीची शिसारी आली होती. हि सर्व उदाहरणे नवरा बायको दोन्ही जण नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थार्जन करत असलेल्या जोडप्यांची आहेत. आणि यातील बहुसंख्य जोडप्यांची हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असे जाणवले. त्यांना उद्या म्हातारपणी तुम्हाला कोण सांभाळेल याची भीती वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुसंख्य जोडप्यांची हेच सांगितले कि आजूबाजूला ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा दूर गावी राहत आहेत ते काय करतात? मुले असली तरी वृद्धपणी एकटेच राहाणारे असंख्य वरिष्ठ नागरिक आपण आजूबाजूला पाहतोच कि हेही सांगितले. तुम्हाला आपले स्वतःचे रक्ताचे कुणीतरी असावे असे वाटत नाही का? असे विचारल्यावर बहुतांशी लोकांनी कधीतरी वाटते पण तेवढ्यासाठी आपले स्वतःचे मूल जन्माला घालून पुढची १८-२० वर्षे त्यासाठी द्यायची तयारी नसल्याचे सांगितले. एक सकारात्मक गोष्ट म्हणजे बहुसंख्य जोडप्याचा निर्णय हा विचारपूर्वक आणि दोन्ही कडचा विचार करून घेतलेला होता आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटणे खंत वाटणे( guilty) असे वाटत नव्हते. परंतु बहुसंख्य जोडप्यांच्या आईवडिलांना हा निर्णय पसंत नसल्याचेही त्यांनी सांगितले आणि यामुळे आईवडिलांशी काही काळ विसंवाद झाल्याचे सांगितले. यात बहुसंख्य स्त्रियांच्या आई किंवा सासूने त्यांच्या निर्णयाला विरोध केल्याचे सांगितले. काही जोडप्यांची मात्र आपल्या एका पालकांनी आपल्याला सपोर्ट केल्याचे आवर्जून सांगितले. हि यादी संपूर्ण नाही किंवा परिपूर्ण आणि बिनचूक नाही. तसा माझा दावा हि नाही. पण हे मला आलेले अनुभव प्रातिनिधिक समजता येतिल

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32089 views

🗣 चर्चा (136)
T
Trump Mon, 08/22/2022 - 14:01 नवीन
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 14:02 नवीन
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 14:02 नवीन
भारत आणि रंगभेद
कॉलेजमध्ये 'कलर गया तो पैसा वापीस' अशी शेरेबाजी तिच्यावर होत असे! अर्थात ती दुसऱ्या वर्षी आमच्या ग्रुपला जॉईन होई पर्यंतच, नंतर कोणाची बिषाद होती तिला काही बोलायची
धन्यवाद. तुमच्यामुळे तीला होणारा काही त्रास वाचला असेल अशी मी अपेक्षा करतो. रंगभेदी आणि रंगभेदाला प्रत्यक्ष- आणि अप्रत्यक्षमार्गे प्रोत्साहन देणार्‍या लोकांविरोधात राहायची गरज आहे. माझ्या भारतातील अनुभवावरुन भारतात अजुन रंगभेदाविषयी जाणीवा अजुन प्रगल्भ नाहीत असे मला वाटते. लग्नाच्या जाहिरातीमध्ये सरसकट गोरा वर्ण, गोरी बायको हवी अशी वर्णने असतात. सहज बोलतानाही गोरे म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरुप असे समीकरण असते. दुर्देवाने ह्यामुळे रंगाने गडद पणे गुणाने चांगल्या लोकांमध्ये भयंकर असा न्युनगंड निर्माण होतो, त्यातुन कितीतरी होतकरु तरुण / तरुणी मागे पडत असतील.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 14:04 नवीन
तुमच्या त्या बुक्कीच्या चिन्हाने आणि हसर्‍या चेहर्‍याने गडबड केली, काही केल्या पुर्ण प्रतिसादच जात नव्हता. :)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/22/2022 - 14:45 नवीन
😀 तुमच्या त्या बुक्कीच्या... मिपावर थेट स्मायली टाकता येत नाहीत. तुम्हाला ह्या लेखाचा त्यासाठी उपयोग होईल! (जाहिरात 😉)
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 08/21/2022 - 19:27 नवीन
दोघांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड ....
सहमत.. विनापत्य जीवनशैलीचा निर्णय घेण्यामागे न्यूनगंड के कारण असू शकते. याचे स्पष्टीकरण असेही देता येईल - कोणत्याही जीवाला खरे तर अमरत्वाची इच्छा असते पण ते शक्य नसते म्हणून स्वतःच्या गुणसूत्रांपासून बनलेली अपत्य जन्माला घालावेसे वाटते अशी एक थिअरी आहे. म्हणजेच कोणत्याही जीवाला स्वतः श्रेष्ठ असल्याची, कुणीतरी विशेष असल्याची किंवा गुणवंत असल्याची एक भावना असते व म्हणून स्वतःसारखी अपत्ये जन्माला घालाविशी वाटते. जर ही भावनाच लोप पावलेली असेल.. आपणही "कुणीतरी आहोत" ही भावनाच हरवली असेल तर अपत्य जन्माला घालण्याची उर्मी पण नाहीशी होईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 08/21/2022 - 16:31 नवीन
लेख आणि प्रतिसाद, दोन्ही मस्तच
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 08/21/2022 - 16:44 नवीन
चांगला लेख चांगली चर्चा.
  • Log in or register to post comments
T
Trump Sun, 08/21/2022 - 16:48 नवीन
श्री दादा कोंडके यांची स्वतःला मुल नसल्यामुळे त्यांच्या पुतण्याने (श्री विजय कोंडके) यांनी कसा गैरफायदा घेतला, शेवटी वय निघुन गेल्यानंतर त्यांना कशा पश्चात्ताप झाला याचे चांगले वर्णन 'एकचा जीव' या पुस्तकामध्ये मध्ये आहे. बरे प्रतिसाद हे शहरी पार्श्वभुमीतुन लिहीले आहेत, ग्रामिण भागात ते लागु होत नाहीत.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 08/21/2022 - 18:17 नवीन
अवांतर वाटेल पण मुल नको या विचारातून पुढे लग्न तरी कशाला ? असा विचार पुढे येऊन लग्नसंस्था मोडकळीस येईल काय असे वाटते. (ती तशी मोडकळीस आली किंवा न आली मला फरक पडत नाही. जगाची चिंता वाहण्याचा भार माझ्या माथी नाही). कलियुगाच्या अंती सगळ्या जगाचा विनाश होतो असे जगातील सगळ्या धर्मग्रंथात वर्णन आहे असे म्हणतात. प्रत्यक्षात पृथ्वीची कोणत्या ग्रहाशी टक्कर होईल, सुर्याच्या उष्णतेमुळे धरतीवरील जीवन नष्ट होईल किंवा जलप्रलय होऊन पृथ्वी गिळंकृत होईल आणि मानवजात नष्ट होईल असे म्हणण्यापेक्षा मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ? विचार जास्तच अतिरंजित वाटतात काय ?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 08/21/2022 - 19:32 नवीन
असा विचार पुढे येऊन लग्नसंस्था मोडकळीस येईल काय असे वाटते.
लग्नसंस्था मोडकळीस येण्याचे इतरही अनेक कारण असू शकतात.
मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ?
"मूल नको" हा विचार खरे तर "मूल हवे" या आंतरिक ओढीच्या अभावामुळे आलेले आहे (क्वचित काही अपवाद असतीलही) . अशी ओढ नसणे हे निसर्गातले हे एक विचलन (व्हेरिएशन) आहे. हे विचलनच नियम बनेल का ? जर नाही तर अशी परिस्थिती ओढवणार नाही.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 09:58 नवीन
अवांतर वाटेल पण मुल नको या विचारातून पुढे लग्न तरी कशाला ?
काही कारणे कायदेशीर आहेत, काही मानसिक आहेत, काही शारिरीक आहेत, काही सामाजिक आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 08/22/2022 - 02:17 नवीन
मुले जन्माला घालणे बंद झाले तर एक दिवस आपोआपच मानवजात नष्ट होईल काय ? चर्चा प्रतिसाद आवडले अपत्य जन्माला घालणे आणि वाढवणे हि एकीकडे अतिशय नाजूक आणि वयक्तिक बाब असूनही कधी कधी ती सामाजिक म्हनण्यापेक्षा देश/ राज्या शकट चालवणे इथपर्यंत पोचते .... देश/ समाजाप्रमाणे हि बाब "सरकारी" होऊ शकते चीन = फक्त १ भारत = २ पुरे वरील दोन = मुलं = राष्ट्रीय संपत्ती आटोक्यात आणा ! खालील दोन = मुलं = राष्ट्रीय संपत्ती वाढवा ! सिंगापोरे: सरकारकी खर्चाने डेटिंग क्रूझ वर चला ( म्हणजे एक तर लग्न कराल बहुतेक आणि मग मूल होईल ) ऑस्ट्रेलिया = मूलं जन्माला आले कि ५ हजार डॉलर ( १ डॉलर = ५५ रु ) खास बोनस ,
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/22/2022 - 06:32 नवीन
मुले ही भानगड एकुणातच नको. मुले झाली की अनेक बम्धने येतात. आपण आपले बरेचसे व्यवसायातले/ करीयरमधले निर्णय केवळ मुले आहेत म्हणून घेऊ शकत नाही. किंवा नावडते निर्णय घ्यावे लागतात. मुलांना सांभाळणे हा ताप वाटत नाही. मात्र ती टीन एजर झाली की त्यांचे पालकांना टाकून बोलणे त्यांचे नको ते राग लोभ सांभाळणे हे करत बसावे लागते. त्यापेक्षा मुले नसलेली बरी. म्हातापणची काठी म्हणावे तर ;मुले तरुण झाली की आपण उगाच त्यांच्यावर भार तरी होतो किंवा मुलेच पालकांचे साठवलेले धन नष्ट करतात. पालकही उगाच मुलांसाठी याम्व त्याग केला , अशा बढाया मारून मुलांना हीन भावना देतात या पेक्षा जे काही होईल ते आपलया स्वतःमुळे होतेय या भावनेत राहिलेले बरे. लग्नदेखील शक्यतो न केलेले बरे. ( वपुंच्या भाषेत बोलायचे तर " एकट्या वेणीसाठी आख्खी बाई जन्मभर पत्करावी लागते " ) जन्मभर तडजोडी करत आयुष्य मारूनमुटकून जगायचे तरी कशाला
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 08/22/2022 - 09:52 नवीन
लग्न टिकेल की नाही याचीच शाश्वती वाटत नाही म्हणून मूल नको हे ही एक कारण असते. मूल असेल तर घटस्फोट घेणे अवघड जाते. मुलाचे संगोपन व जबाबदारी हा एक महत्वाचा व अतिरिक्त मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तसेही मूल म्हणजे म्हातारपणाची काठी ही अंधश्रद्धा आहे हे लोकांना आता पटू लागले आहे. जन्म देताना आम्हाला विचारल होत का? असा प्रश्न आता मुलं विचारु लागली आहेत. तसेच विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय जरा आकर्षक वाटू लागला आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा पर्याय जरा बरा वाटू लागला आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 08/22/2022 - 13:40 नवीन
लग्न टिकेल की नाही याचीच शाश्वती वाटत नाही म्हणून मूल नको हे ही एक कारण असते. मूल असेल तर घटस्फोट घेणे अवघड जाते. मुलाचे संगोपन व जबाबदारी हा एक महत्वाचा व अतिरिक्त मुद्दा विचारात घ्यावा लागतो. तसेही मूल म्हणजे म्हातारपणाची काठी ही अंधश्रद्धा आहे हे लोकांना आता पटू लागले आहे.
आता काळ खूप झपाट्याने बदलतोय.. कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती खूप वेगाने बदलली/बदलते आहे. जनरेशन गॅप ही झपाट्याने वाढली आहे. म्हणजे माझे पणजोबा व माझे आजोबा यांच्यातही जनरेशन गॅप असेलच पण त्यापेक्षा माझे आजोबा व माझे वडील यांच्यात असलेली जनरेशन गॅप जास्त असेल व माझे वडील व माझ्यात असलेली जनरेशन गॅप अजूनच जास्त.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 08/22/2022 - 13:49 नवीन
तसेच विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय जरा आकर्षक वाटू लागला आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली हा पर्याय जरा बरा वाटू लागला आहे.
लोक स्वतःशीच विवाह करु लागलेत आता तर.लिव इन ही जुने झाले कि काय असे वाटु लागलेय. म्हणजे मुले नको म्हणुन लग्न नको.पण आता काही जबाबदारीच नको म्हणुन स्वत:शीच विवाह करा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/23/2022 - 16:48 नवीन
विवाहापेक्षा लिव्ह इन हा पर्याय पुरुषासाठी आकर्षक आहे पण स्त्रियांसाठी अजिबात नाही. कारण मैत्रीणीचे वय वाढू लागले कि तिला सोडून देऊन नवी मैत्रीण करणे पुरुषाला सोपे जाते पण वय वाढणाऱ्या स्त्रीला कोणती सुरक्षितता मिळते? पुरुष स्त्रीचे रूप पाहतो तर स्त्री हि पुरुषात सुरक्षितता पाहते. मूल झाले तर त्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मुलाला टाकून जाणारी आई दुर्मिळ असते तर बायको मुलांना सोडून देणारें पुरुष कितीतरी असतात. यामुळे लिव्ह इन हा पर्याय सर्व सामान्य स्त्रियांसाठी सर्वथा गैरसोयीचा आहे. ९० वर्षांपूर्वी श्री र धों कर्वे यांनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया "चरितार्था"साठी लग्न करतात. १०० वर्षांपूर्वीच कशाला आजमितीला सुद्धा स्त्रियांना चरितार्थाचे मार्ग पुरुषांपेक्षा नक्कीच कमी उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 08/23/2022 - 20:53 नवीन
कारण मैत्रीणीचे वय वाढू लागले कि तिला सोडून देऊन नवी मैत्रीण करणे पुरुषाला सोपे जाते पण वय वाढणाऱ्या स्त्रीला कोणती सुरक्षितता मिळते?
तत्वतः असहमत. समजा पंचविशीतले स्त्री व पुरुष लिव्ह इन मध्ये एकत्र राहू लागले आणि चाळिशीमध्ये पुरुषाला ती स्त्री जोडीदार अनाकर्षक वाटू लागली तर नव्या मैत्रिणीसाठी दोन पर्याय असतील १) चाळिशीतील दुसरी स्त्री - एकतर चाळिशीतील एक स्त्री सोडून चाळिशीतीलच दुसर्‍या स्त्रीशी सख्य करण्यात काय प्रेरणा असणार ? पण तरी समजा त्याने अशी जोडी जमवलीच तर त्याचा अर्था त्या दुसर्‍या स्त्रीचेही आधीच्या एका चाळिशीतल्या पुरुषाशी नाते तुटले आहे (तिने त्याला सोडले की त्याने तिला सोडले हा भाग वेगळा) म्हणजेच आता नात्यात नसलेली चाळिशीतली पहिली स्त्री आणि दुसरा पुरुष आहेत. कदाचित ते एकत्र येवू शकतील किंवा येणारही नाहीत. पण एकूणात नात्यात असलेल्या चाळिशीतल्या पुरूषांची संख्या = नात्यात असलेल्या चाळिशीतल्या स्त्रियांची संख्या असेल आणि नात्यात नसलेल्या चाळिशीतल्या पुरूषांची संख्या = नात्यात नसलेल्या चाळिशीतल्या स्त्रियांची संख्या असेल २) पंचविशीतील दुसरी स्त्री - पंचविशीतील स्त्री चाळिशीतील पुरुषाला लाभेल ही शक्यता कमीच आणि तसे झाले तरी त्यामुळे पंचविशीतील एका पुरुषाला जोडीदार मिळणार नाही. एकतर त्याला मग चाळिशीतील स्त्रीशी जोडीदार नसलेल्या स्त्रीशी जोडी जमवावी लागेल किंवा एकटे रहावे लागेल.
मूल झाले तर त्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असते. त्यामुळे मुलाला टाकून जाणारी आई दुर्मिळ असते तर बायको मुलांना सोडून देणारें पुरुष कितीतरी असतात.
सहमत.
यामुळे लिव्ह इन हा पर्याय सर्व सामान्य स्त्रियांसाठी सर्वथा गैरसोयीचा आहे.
अर्थार्जन करणार्‍या स्त्रियांसाठी ठीक आहे पण कौटुंबिक व सामाजिक आघाड्यांवरचा विरोध विचारात घ्यावा लागेल. अर्थार्जन न करणार्‍या स्त्रियांकरिता बहुतांशी अयोग्य पर्याय आहे. अपत्य हवी असल्यासही बहुतांशी अयोग्य (भारतीय समाजाचा विचार करुन)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/24/2022 - 07:01 नवीन
मूलभूत फरक लक्षात घ्या पंचविशीतील तरुण केवळ पंचविशीतीलच नव्हे तर १८ पासून वरच्या वयोगटातील स्त्रीबरोबर लिव्ह इन मध्ये राहतो. जगभरात पुरुष वयाने जास्त आणि स्त्री वयाने कमी अशी बहुतांश लग्ने होतात. तेंव्हा चाळीशीच्या माणसाला चाळीशीचीच मैत्रीण असेल/असावी हा मुद्दा गैरलागू आहे. चाळीशीचा माणूस आर्थिक स्थैर्य असेल तर विशी पंचविशीच्या स्त्री बरोबर लिव्ह इन राहील? परंतु तिशीचा माणूस उगाच चाळीशी पंचेचाळिशीच्या स्त्रीबरोबर लिव्ह इन कशाला राहील? याशिवाय व्यवहारात स्त्री पुरुष १:१ हे प्रमाणच चूक आहे अन्यथा एकाच माणसाच्या चार बायका आणि बरेच पुरुष लग्नावाचून राहणे असे दिसले नसते. पुरुष एक बायको आणि अनेक अंगवस्त्रासहित सहज नांदू शकतो. उदा थायलंडचा राजा बायका आणि अंगवस्त्रांसह कोव्हीड मध्ये जर्मनीत जाऊन विलगीकरणात राहिलेला आहे. King Maha Vajiralongkorn of Thailand goes into isolation with his harem of 20 concubines in Germany, books an entire luxury hotel https://www.opindia.com/2020/03/thailand-king-isolation-20-concubine-harem-luxury-hotel/ पण किती बायका एकाहून अधिक नवरे आणि अधिक "ठेवलेले" पुरुष तुम्हाला दिसतात
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/22/2022 - 10:51 नवीन
Image removed. काळ झपाट्याने बदलतोय हे नक्की.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/22/2022 - 12:17 नवीन
😂 😂 😂
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 10:54 नवीन
ज्यांना मुले नको आहेत किंवा तत्सम विचार आहे त्यांनी येथे आपले मत नोंदवायला हरकत नाही. United Nations: Save the Earth – Global Birth Stop! https://www.change.org/p/united-nations-introduce-obligatory-world-wide-birth-controls अधिक जनसंख्या - दुनिया भर में जन्म नियंत्रण को तत्काल आवश्यक करे https://www.change.org/p/united-nations-overpopulation-%E0%A4%85%E0%A4%AC-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%BE%E0%A4%B5
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 08/22/2022 - 11:52 नवीन
हा लेख वाचून आपल्या ओळखीतल्या आणि नातेवाईकांच्या परिवारांकडे पाहिले. एक गोष्ट जाणवली गेल्या प्रत्येक पिढीत राहणीमान पूर्वीपेक्षा जास्त वाढत गेले त्याच बरोबर मुले जन्म घालण्याची इच्छा कमी होत गेली. उदाहरण आमचे आजोबांची पिढी 1925 च्या आधी जन्मलेले घरात 4 ते 8 मुले सामान्य बाब. 1925 ते 50 च्या आमच्या वडिलांची पिढी घरात 2 ते 5 मुले. 1950-75 ते आमची पिढी घरात 1 ते 2. 1975... नंतर जन्मलेली 0 ते 1. अनेकांच्या घरात मूल नाही पण पाळीव कुत्रे आहेत, हे ही विशेष
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/22/2022 - 16:55 नवीन
मुले कमी होण्याचं कारण राहणीमान वाढत गेले पेक्षा संतती नियमनाची साधने जितक्या सुलभ पणे उपलब्ध झाली तितके मुले कमी होण्याचे प्रमाण वाढले. मुले एक किंवा दोन असली कि तुम्हाला पालकत्वाचे सुख आणि अनुषंगिक फायदे मिळतात आणि त्यापेक्षा जास्त झाली कि हे फायदे त्या पटीत न मिळत उगाच भारं भार मुलांचा खर्च बोडक्यावर बसतो. लेकुरे उदंड जाहली तो ते लक्ष्मी सोडून गेली हे समर्थ रामदास स्वामींचे वाचन ३५० वर्षापूर्वोचे आहे
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 08/22/2022 - 17:03 नवीन
मुले कमी होण्याचं कारण राहणीमान वाढत गेले पेक्षा संतती नियमनाची साधने जितक्या सुलभ पणे उपलब्ध झाली तितके मुले कमी होण्याचे प्रमाण वाढले.
संतती नियमनाच्या साधनापैक्षा मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले ही कारणे जास्त कारणीभुत आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 08/22/2022 - 17:30 नवीन
संतती नियमनाच्या साधनापैक्षा मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले ही कारणे जास्त कारणीभुत आहेत.
हेच म्हणणार होतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/23/2022 - 16:42 नवीन
वस्तुस्थिती या उलट आहे. मुले जगण्याची शक्यता वाढली आणि अकाली मृत्युचे प्रमाण घटले यामुळे आपली लोकसंख्या काहींच्या काही वाढली. मुलांचे प्रमाण अजिबात कमी झाले नाही The main reasons for the large growth in population in India are: (i) decline in the death rates and (ii) a persistently high birth rate. The decline in the death rate has come about due to an increase in life expectancy https://www.yourarticlelibrary.com/population/reasons-for-population-growth-in-india/42392
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 08/23/2022 - 17:51 नवीन
श्री खरे, तुमचा मुद्दा काय आहे , होणार्‍या मुलांची संख्या कि लोकसंख्या?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/24/2022 - 06:50 नवीन
मुलांचे प्रमाण अजिबात कमी झाले नाही
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 08/22/2022 - 14:38 नवीन
डॉ. खरे साहेब
मूल होत नाही म्हणून आम्हाला मूलच नको सांगणारे असतात परंतु त्यांच्या सांगण्याच्या मागे एक नैराश्याची किंवा दुःखाची किनार असते. आणि हि मनोवृत्ती आपल्या दुःखावर झाकण टाकून ते दडवण्याची आहे आणि त्यात काही चूक आहे असेही मी मानत नाही.
ही एक शक्यता तर आहेच. पण या विरुद्ध शक्यताही अस्तित्वात असू शकते. म्हणजे "आम्हाला मूल नकोय " असे समोरच्याला सांगितले तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय प्रतिमा निर्माण होईल ? ते आपल्याला अगदीच स्वार्थी / चंगळवादी समजतील की काय या भितीपोटी "मूल होत नाहीये / झाले नाही" असे सांगितले जाण्याची पण शक्यता आहे. अर्थात हे खोटे फक्त ज्यांच्याशी फारसा निकटचा संबंध नाही त्यांच्यापुरते.. जवळच्या लोकांना सत्य ठावूक असतेच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/23/2022 - 16:35 नवीन
ते आपल्याला अगदीच स्वार्थी / चंगळवादी समजतील की काय या भितीपोटी "मूल होत नाहीये / झाले नाही" असे सांगितले जाण्याची पण शक्यता आहे. ज्या जोडप्यांमध्ये बेबनाव असतो ते सुद्धा आपल्या आईवडिलांना न सांगता मूल होण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात आणि आईवडिलांच्या समाधानासाठी "मूल होत नाही" असे सांगताना पाहिले आहे. सासूच्या आग्रहावरून वंध्यत्वाच्या उपचारांसाठी आलेल्या मुली मी पाहिल्या आहेत. कारण स्त्रीबीज तयार होण्याच्या वेळेस "संबंध" ठेवा म्हणून सांगितले असताना मुली आम्हाला सध्या मूल नको आहे असे खाजगी मध्ये सांगतात. नवरा बायको मध्ये शरीर संबंधच नसेल तर मूल कसे होणार ? जगात सर्व तर्हेचे लोक पाहायला मिळतात.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 08/23/2022 - 10:19 नवीन
डॉक्टर साहेब, "हिन्दी भाषेत एक म्हण आहे "99 का फेर " . एकदा राहणीमान वाढू लागले की अधिकची इच्छा होतेच. भरपूर कष्ट करून सर्व संकटांपासून मुलांना दूर ठेवणार्‍या आमच्या पिढीने संतती नियमनाची साधने वापरली. एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला नाही. अनेकांनी मुलांना उत्तम शिक्षा देण्यासाठी बंकांकडून शिक्षणासाठी कर्ज घेतले. आजची पिढीला मूल म्हणजे प्रतिष्ठेनुसार भरपूर खर्च आणि मौज मस्तीत कमी. परिणाम एक ते शून्य.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/26/2022 - 06:48 नवीन
आजची पिढीला मूल म्हणजे प्रतिष्ठेनुसार भरपूर खर्च आणि मौज मस्तीत कमी. हे फारच सरसकटीकरण आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 08/26/2022 - 13:44 नवीन
तर्कवादी आणि धर्मराजमुटके यांचे प्रतिसाद आवडले. उत्तम चर्चा सुरु आहे. रोचक मते आणि त्याला उत्तम प्रतिवाद केला जात आहे ! ✔️ दॅट्स मिपा !
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 08/26/2022 - 19:40 नवीन
तर्कवादी आणि धर्मराजमुटके यांचे प्रतिसाद आवडले.
धन्यवाद चौथा कोनाडा जी..
उत्तम चर्चा सुरु आहे.
संपली आता बहुतांशी ..:) नवीन काही मुद्दे आलेत तर होईल पुन्हा सुरू
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा