Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

लाल सिंग चढ्ढा

स
सोत्रि
Sun, 08/14/2022 - 11:28
💬 207 प्रतिसाद
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला. सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो. सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात. जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात. सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 66892 views

💬 प्रतिसाद (207)
ड
डँबिस००७ Wed, 08/17/2022 - 14:29 नवीन
यश राज १००००००००००००% सहमत !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/17/2022 - 14:40 नवीन
केंद्र सरकारने रोहिंग्याया मुसलमान शरणार्थी लोकांना आसरा द्यायचा निर्णय केला समर्थक अन् विरोधक दोघांचे अभिनंदन !! माझ्या मते केंद्र सरकारने हे चुकीच पाऊल ऊचलल आहे. सापाला दुध पाजल तरीही तो डसायच सोडत नाही ! ह्याचा अनुभव म्यानमार ( बर्मा ) सारख्या बुद्ध धर्मीय देशाने घेतल्याने त्यांनी ह्या रोहींग्यांना देशाबाहेर हकलल आहे. रोहीग्यांचा मुळ देश बांग्लादेशच सुद्धा त्यांना परत घेत नाहीय. भारताने त्यांना परत घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडुन घेतलेला आहे. पश्चातापाची वेळ लवकरच येईल.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/17/2022 - 15:00 नवीन
ह्या बाबतीत पण कृषी कायद्यांच्या प्रमाणेच कन्फ्युज दिसते आहे, एक मंत्री ट्विट करून म्हणतो की त्यांना फ्लॅट आणि निर्वासित दर्जा देणार, दुसरे मंत्रालय म्हणते की बुआ नाही असे काहीच नाही, ते बेकायदेशीर असतीलच अन् deport पण होतीलच, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असली गत म्हणायची एकंदरीत.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 08/17/2022 - 15:39 नवीन
मला वाटते चित्रपटाचा दर्जा आणि त्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यात काही संबंध नाही. चित्रपट निर्मितीत महत्वाची भूमिका असलेल्या काही प्रथितयश कलावंतांनी प्रेक्षकांना गृहीत धरून समाजातल्या एका मोठ्या वर्गाला आपण कितीही दुखावले, अवमानित केले किंवा सातत्याने खिल्ली उडवली तरी आपले काही वाकडे होत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्याने त्यांना योग्य ती समज यावी या दृष्टीने बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते/ आहे. बाकी चू.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/18/2022 - 01:38 नवीन
प्रेक्षकांना गृहीत धरून समाजातल्या एका मोठ्या वर्गाला आपण कितीही दुखावले, अवमानित केले किंवा सातत्याने खिल्ली उडवली तरी आपले काही वाकडे होत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्याने त्यांना योग्य ती समज यावी या दृष्टीने बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते/ आहे. अगदी हेच हेच .... हे आवाहन प्रतीकात्मक आहे सतत चित्रपट/ जाहिराती यातून "वाईट प्रवृत्ती ती फक्त हिंदूत आहे" असे दाखवयाचे किंवा अतिशय सुक्ष्म पणे हा मुद्दा रेटायचा किंवा सतत हिंदूत कसा वर्णभेद आहे हे रेटत राहायचे हा "अजेंडा" आहे आणि तो लोकांनां कळून चुकला आहे म्हणून लोक ( कधी कधी मानवतेला धरून नसेल तरी) असे आवाहन चालवतात ... फारच थोडे कला निर्माते समाजातील हिंदू नसलेले समाज कसे देशात धर्मबदलाला प्रौढसं देत आहेत ते दाखवतात पण आपलेच हिंदू डोळे झाकून बसतात हे उदाहरण बघा... https://www.youtube.com/watch?v=MSprAZJWf18 दिग्दर्शकाने हिंमत दाखवली आहे यात, कि जेवहा ख्रिस्ती मिशनरी शाळा एका हिंदू बहुजन गरीब पालकाला त्याच्या मुल सध्या जात असलेल्या शाळेत उच्च जात त्याला डावलते आहे वैगरे न्यानामृत पाजत असते त्यावर तो बहुजण बाप आणि त्याची बायको त्या मिशनरी ल शालजोड्यातील ठेवून देतात बघा नक्की
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 15:40 नवीन
आमिर खानने "कौन बनेगा करोडपती" कार्यक्रमात तो "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान आहे हे दाखवुन दिलेच.
नक्की काय झाले हे बघण्याकरिता मी हा भाग पाहिला. दुवा sonyliv.com वर लॉगिन करुन ही छोटीशी चित्रफीत मोफत बघता येईल यात ०३:२० नंतर असे दिसते की स्पर्धक म्हणून आलेल्या कर्नल मिताली ह्यांच्या सन्मानार्थ अमिताभ त्यांना सलाम करण्याचे सर्वांनाआवाहन करतात. अमिताभ स्वतः उभे राहून कर्नल मितालींना सलाम करतात व तसेच प्रेक्षकही सलाम करतात तर हा सलाम स्वीकारुन मितालीजी ही सलाम करत आहेत. तर स्पर्धक म्हणून आलेला आमिर खान मितालीजींच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवत आहे. आमिर खानने सलाम न करता टाळ्या वाजवल्यात हे काहीसे चुकीचे वाटू शकते - खासकरुन इतर सर्वजण त्यांना सलाम करत असताना .. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर प्रेक्षकांतून भारत माता की अशी साद आल्यावर आमिर खान सुद्धा "जय" म्हणताना दिसत आहे. तर त्यानंतरचा "वंदे मातरम" चा जयघोष फक्त प्रेक्षकांतून आलेला आहे. अमिताभ, मितालीजी वा आमिर खान त्यावेळी पुन्हा स्थानापन्न होत आहेत व तिघेही "वंदे मातरम" म्हणताना दिसत नाहीत. यात आमिर खान "वंदे मातरम " न गाणारा व झेंड्याला सलाम न करणारा मुसलमान असल्याचे त्याने दाखवून दिले असे कुठे जाणवते ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/17/2022 - 18:41 नवीन
तर्कवादी, तुमच म्हणण पटल. आमिर खान हा खुप चांगला अभिनेता तर आहेच पण खुप चांगला माणुस सुद्धा आहे. वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. भारताचे उप राष्ट्रपती आपल्या पदावर असताना १५ अँगस्टला झेंडावंदनाच्या वेळी झेंड्याला सलाम करत नाहीत हे भारतीय जनतेने पचवले आहे मग आमिर खान का नाही. झेंड्याला सलाम करण्याच्या आड ईस्लाम येतो म्हणे, दुसर कारण असेल तर मला माहिती नाही, पण पाकिस्तानातल्या मुसलमान लोकांना झेंड्याला सलाम करताना ईस्लाम कसा आड येत नाही ? आमिर खानचा बहीष्कार करणारे आमच्या सारखे लोक मुर्ख आहेत. आमिर खानने कधीही हिंदु देवी देवतांचा अपमान केलेला नाही. आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेत. अभिनेता जवाबदार नसतो. सिनेमे निर्माण करणारे हिंदुच्या भावना दुखावणारे असतात जे नेहमी पडद्या आड असतात. त्यामुळे आमिर खान सारख्या निष्पाप माणसाला दुखण्याच पाप हिंदुंनी करु नये !! माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ? जर कोणत्याही सिनेमामुळे वा ईतर कारणामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तरी त्यांनी त्याची सवय घालुन घेतली पाहीजे. मकबूल फिदा हुसेनने नाही का देवी सरस्वतीची निवस्र प्रतिमा रेखली होती ? तुमच्या नाकावर टिच्चुन तो कतार मध्ये जाउन राहीला. जर कोणी आवाज उठवला किंवा समर्थन केले तर गळे कापले जातील. आता पर्यंत नूपुर शर्माच्या समर्थनात १८-२० वर गेलेले आहेत.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 19:44 नवीन
डँबिसजी,
वंदे मातरम , झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक असल्याने त्याबद्दल आमिर खानला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
तुम्ही माझे वाक्य बहुधा नीट वाचले नसावे. तरी हा सलाम झेंड्याला नसून कर्नल मितालीजींसाठी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे आमिर खानने झेंड्याला सलाम केला नाही असे अजून तरी निरीक्षणात आलेले नाही. त्यामुळे तुमचा मुद्दाच गैरलागू होतो.
आमिर खान ज्या सिनेमात काम करतो त्यामुळे हिंदू देवी देवतांचा अपमान होत असेल तर त्याला जवाबदार सिनेमाचे निर्माते, निर्देशक लेखक असावेत
अर्थातच !! बाकी उपराष्ट्रपती, मकबूल फिदा हुसेन ई लोक हे धागाविषयाशी संबंधित नाहीत. त्यांच्याबद्दल काही धागा असल्यास तिथे चर्चा करुयात.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 08/17/2022 - 19:53 नवीन
माझ्या मते ला सिं च चा बहीष्कार हा सिनेमाचा बहीष्कार होता, पर्यायाने बहिष्कारामूळे सिनेमा निर्माते, निर्देशक वैगेरे प्रभावीत झालेले असणार मग आमिर खान ह्या बहिष्काराने दुःख्खी का झाला ?
आमिर खान दु:खी झाला की नाही झाला याबद्दल मला माहित नाही. त्यामुळे मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आणि तसेही आमिर खानच्या वैयक्तिक सुख दु:खाशी मला काही देणे घेणे नाही. आमिर खानचा मी खास चाहता आहे असंही नाही. पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे. बघा पटतंय का...
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/17/2022 - 21:55 नवीन
पण एक विशिष्ट प्रोपागंडाद्वारे समाजात द्वेषाचे राजकारण केले जात असेल तर माझा त्याला विरोध आहे. १०० % पटल बुवा ! हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 08/18/2022 - 09:06 नवीन
हिंदु समाज द्वेषाचे राजकारण करत असुन त्याला विरोध करायलाच पाहीजे हे तुमचे म्हणणे अगदी बरोबरच आहे.
कोणताही समाज वाईट नाही. पण मूठभर समाजकंटक कोणत्याही समाजात असू शकतात. त्यांचा विरोध करायला हवा. आणि अशा लोकांच्या द्वेषपुर्ण प्रोपागंडामुळे इतर लोकांचा थोड्याफार प्रमाणात बुद्धीभेद होण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रोपागंडाचा विरोध करावा. असो. नवीन काही मुद्दा पुढे आला तर आणखी चर्चा होईलच. तोपर्यंत माझ्याकडून विराम. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/18/2022 - 01:26 नवीन
झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ? अश्या दिवशी सार्वजनिक समारंभाला जायलाच पाहिजे असे मी नाही म्हणत पण जर गेला असाल तर मान हा राखायला नको ? धर्माचा काही संबंध नाही आणि असेल असे जो म्हणत असेल तर मग त्या व्यक्तीला ( उप राष्ट्रपती ) देशापेक्षा धर्म मोठा वाटतो .. हे स्पष्ट आहे गडबड आहे मग जनता पक्षात जनसंघ विलीन झाला तेवहा सांजवाद्यांनी जनसंघाच्या लोकांनां विचारले कि तुमची देहरी निष्ठा आहे मग त्याचाच समाजवाद्यांना हि दुहेरी निष्ठा पटते? धन्य
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/18/2022 - 02:33 नवीन
उपराष्ट्रपती जेव्हा principal dignitary नसतो तेव्हा त्याने सैल्युट न करता अटेँशन पोझिशन मधे उभे राहणे असा प्रोटोकॉल आहे. जेव्हा राष्ट्रपती उपस्थित असतात तेव्हा राष्ट्रपती सैल्युट करतात. जेव्हा फक्त उपराष्ट्रपती हा principal dignitary असतो तेव्हाच तो सैल्युट करतो. अन्सारी आडनाव नसते तर हे निरीक्षण नोंदवले जात नाही. असले की व्हायरल होते. बाकी इतर काही असो, धिस इज ओन्ली टू बी फेअर विथ द देन व्हाईस प्रेसिंडेंट.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 08/18/2022 - 02:58 नवीन
.... असा प्रोटोकॉल आहे ठीक आहे तांत्रिक दृष्ट्या तुम्ही म्हणता ते असेल १००% बरोबर पण " ते केवळ अन्सारी" आहेत म्हणून टीका करतो असे नाही ,, अन्सारी साहेबांची इतर वक्त्यवे आणि त्यामागील वृत्ती हे पण बघावी
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/18/2022 - 03:19 नवीन
म्हणूनच बाकी इतर काही असो, असे म्हटले. मला जेवढे माहीत तेवढे म्हणालो. हे तुम्हाला उद्देशून नाही. इन जनरल, माझे म्हणणे असे की समजा, समजा, समजा, कोणाच्या मताप्रमाणे एक आख्खा धर्म खतरनाक असेल असे केवळ वादापुरते गृहीत धरले तरी जेव्हा आधीच गच्च गर्दी, अस्थिरता, रेटारेटी असते, तापलेली डोकी असतात तेव्हा "जनहितार्थ" सहज (व्हाट)साप साप म्हणून ओरडण्यापूर्वी किमान आत्ता दिसतेय ते नक्की सापच आहे, दोरी नाही इतके तरी पहावे इतकेच.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 03:01 नवीन
काय राव उत्तम नरेटिव सेट करण्याचा मूलभूत राजकीय अडाणीपणाचा हक्क तुम्ही असे कसे नाकारू शकता आम्हाला !? आता आमिर खान ने नाही केला त्या कर्नलला सल्युट, त्यावर एक निवृत्त कर्नल खालील विधान करतात Image removed. पण तुम्ही बघितले नसेल, आमिर तिथे पगडी घालून उभा होता नई का ? अन् तरीही सल्युट न करता अंगविक्षेप करत नाचत होता, तुम्ही बघितले नाहीत कारण तुम्हीच मूलतः लीब्रांडू आहात गवि. बाकी, काय असलं काही पोस्ट केलं का आमिरने कर्नलला सल्युट केला नाही ह्यात कर्नल ऐवजी झेंडा भरू रिकाम्या जागी, मग झेंड्याचा प्रोटोकॉल शोधत बसा तुम्ही, तोवर आम्ही थोडा कार्यभाग साधून घेऊ.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/18/2022 - 03:16 नवीन
ह्य ह्य ह्य.. :=))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/18/2022 - 07:04 नवीन
आमिर तिथे पगडी घालून उभा होता नई का ? अन् तरीही सल्युट न करता अंगविक्षेप करत नाचत होता, तुम्ही बघितले नाहीत शो मध्ये अमिताभ बच्चन सॅल्युट करण्याचे "आवाहन" करतो, या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन अमिताभ सकट सगळे सॅल्युट करतात. आता तुम्ही म्हणता तसे आमिर पगडी घालून उभा असावा आणि ती त्याच्या कानावर घट्ट बसलेली असावी ! त्यामुळे सॅल्युटच्या जागी तालिया हा शब्द देखील त्याने चुकुन ऐकला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही ! :) जाता जाता :- कोणालाही हा प्रश्न आता पडणारच नाही की सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या जागी सॅल्युट का केला ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 08:14 नवीन
लाख लोकांनी चूक केली म्हणून चूक बरोबर करून घ्यायची का ? मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना, तो करण्याचे सामूहिक आवाहन करणे चूक नाही का ? बॉलिवूड मध्ये लष्करी गणवेशांचे विकृतीकरण करून उगाच काहीतरी गणवेश दाखवल्या बद्दल तर कैक मिपाकरांनी इथेच मिपावर आपला सात्विक संताप सर्थपणे आधीही व्यक्त केलाय न ? मग आता फक्त आमिर आहे म्हणून इतरांच्या सामूहिक चुकीचे समर्थन तरी नको.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/18/2022 - 08:52 नवीन
मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना, तो करण्याचे सामूहिक आवाहन करणे चूक नाही का ? प्रोटोकॉलचा मुद्दा मी अमान्य करत नाही, सगळेच प्रोटोकॉल सगळ्या लोकांना ठावूक असतात असे अजिबात नसते. अनेक वेळा प्रोटोकॉल मोडुन पंतप्रधान / तत्सम वरिष्ठ पदावरील व्यक्ती देखील येणार्‍या परदेशी व्यक्तींना भेटतात. इथे त्या व्यक्ती बद्धल विशेष आदर, जिव्हाळा उघडपणे दाखवणे ही भावना अभिप्रेत असते. एक उदा देतो :- प्रोटोकॉल तोड़कर राष्ट्रपति जायद खुद रिसीव करने पहुंचे; मुलाकात के बाद मोदी भारत रवाना मग आता फक्त आमिर आहे म्हणून इतरांच्या सामूहिक चुकीचे समर्थन तरी नको. मी तर त्यांचा मोठा चाहता होतो. मी त्याचे चित्रपट आवार्जुन पाहिले आहे. त्याचा गझनी किमान ५-६ वेळा पाहिला आहे. परंतु आता तो मला त्याच्या तोच तोच चेहरापट्टी करुन अभिनय करतो ते आवडेनासे झाले आहे तसेच डॉक ने जे प्रतिसादात सांगितले आहे ते देखील मला अगदी तसेच वाटते. वरती प्रोटोकॉल मोडण्याचे एक उदा. दिलेच आहे ते तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करतो. जालावर शोधलेत तर अशी अनेक उदाहरणे सहज सापडतील. असो... या धाग्यावर आता बराच कथ्या कुटुन झाला आहे, तेव्हा मी आता या धाग्यावर अधिकचे प्रतिसाद देणे बंद करतो, कंटाळा आला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Cover
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 09:46 नवीन
अनेक वेळा प्रोटोकॉल मोडुन पंतप्रधान / तत्सम वरिष्ठ पदावरील व्यक्ती देखील येणार्‍या परदेशी व्यक्तींना भेटतात. इथे त्या व्यक्ती बद्धल विशेष आदर, जिव्हाळा उघडपणे दाखवणे ही भावना अभिप्रेत असते. मी अतिमहत्वाच्या व्यक्तींनी प्रोटोकॉल तोडण्याबद्दल बोलतच नाहीये सर, तो भाग कैक वेळा डिप्लोमसीला पूरक असतो. मी सामान्य माणसांबद्दल बोलतोय. मला पण आशा आहे की आपण समजून घ्याल. बाकी, तुम्ही आमिरचे फॅन होते, नव्हते, असाल, नसाल हे मला तरी मॅटर करत नाही, कारण मी मुळातच तुमच्याविषयी कुठलाही ग्रह करून घेत नाहीये, तर फक्त एक मुद्दा आहे तो मांडतोय अन् चर्चा करतोय, पण ठीक आहे, आपली ईच्छा असल्यास मी पण इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:27 नवीन
@जेम्स वांड मुळात बोडक्या डोक्याने, अंगात सिव्हिल कपडे असताना युनिफॉर्म परिधान केलेल्या अधिकाऱ्याला सल्युट करू नये असा प्रोटोकॉल असताना असा प्रोटोकॉल कुठे आहे हे मला दाखवता येईल का? नौदलात १८ वर्षे मी डोक्यावर टोपी न घालता वरिष्ठांना सलाम करत असे किंवा कनिष्ठांचा सलाम स्वीकारत असे. समर्थन करण्यासाठी किती टोकाला जावे याला सीमा असते का हो?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 10:45 नवीन
माफ करा, मी आत्ताच ओळखीतल्या एका नौदल अधिकारी असणाऱ्या माणसांकडून तुम्ही म्हणता ते कन्फर्म करून घेतलं, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, कोणीही सल्युट करू शकतो. त्यामुळे मी इथे माझे प्रोटोकॉल संबंधी सगळे प्रतिसाद मागे घेऊन बिनशर्त माफी मागतो स्पष्टीकरण:- १९९९-२००० साली सीनिअर डिविजन राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट असताना एका उस्तादने असा सल्युट करता येत नसतो असे सांगितले होते, मी तेच बेसिस धरून चाललो होतो पण ते चूक होते हे आता स्पष्ट झाल्यामुळे मी पुन्हा एकदा माफी मागतो आपली.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 10:55 नवीन
समर्थन करण्यासाठी किती टोकाला जावे याला सीमा असते का हो? तर, नाही असे नाही काहीच कारण कोणाचं समर्थन म्हणजे आमिर खानचे समर्थन करून मला काही खास प्राप्त होणार नाही, अगदी लाल सिंग चढ्ढा चे एखाद फुकट तिकीट पण नाही. ह्याची मी आपणांस निःसंदिग्ध ग्वाही देतो इथे. उपलब्ध नॉलेज नुसार मला जो वाटला तो मुद्दा मी धरला, तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:17 नवीन
काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच तुम्ही लिहायचं ठरवलंय असा दिसतं. डोक्यावर टोपी असताना सलाम करणे हे केवळ थलसेनेला( आर्मी) आणि लागू असणारा नियम आहे. सामान्य नागरिकांनाच नव्हे तर नौदलात सुद्धा डोक्यावर टोपी नसताना सलाम करता येतो / करायचा असतो. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 10:58 नवीन
काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच तुम्ही लिहायचं ठरवलंय असा दिसतं. उपलब्ध नॉलेज नुसार मला जो वाटला तो मुद्दा मी धरला, तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 08/18/2022 - 11:42 नवीन
तो चूक होता हे आपण दाखवलं, मी ते मान्य केलं, सिंपल, मणभर इगो नाही कॅरी करत बुआ आपण. बाकी कोण्या अज्ञात लोकांच्या हेतुंवर शंका घेणे, वैयक्तिक शेरेबाजी, अजेंडा शोधण्याचे आव आणणे इत्यादी माझ्या संस्कारांच्या चौकटीत बसत नाही इतकी मात्र मी आपणांस हमी देऊ शकतो. :)
जेम्स वांडजी वा.. क्या बात.. मनापासून आवडले. सर्वच मिपाकरांनी अशाच वृत्तीने चर्चा केल्यात तर किती बरे होईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:41 नवीन
@ गवि प्रोटोकॉलचा प्रश्न सध्या बाजूला ठेवा परंतु केव्हा एकदा नव्हे तर दोन वेळेस उपराष्ट्र्पती असली व्यक्ती जेंव्हा "मुसलमान या देशात सुरक्षित नाहीत" असे मुलाखतीत स्पष्टपणे म्हणतात आणि त्याच्यासाठी कोणताही पुरावा किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार देतात तेंव्हा अशा माणसाबद्दल संशय अधिकच बळावतो. याचा "अन्सारी" आडनावाशी सम्बन्ध नाही. "कलाम" आडनावाच्या माणसाबद्दल असे कोणतेही प्रवाद ऐकल्याचे ठेवत नाही हीच व्यक्ती इराण मध्ये राजदूत म्हणून असताना आपल्याच गुप्तहेर संघटनेच्या विरोधात कारवाई करतात तेंव्हा त्यांच्या राजनिष्ठेबद्दलही शंका निर्माण होते. https://twitter.com/rawnksood/status/1144581538954145792?lang=en https://www.sundayguardianlive.com/news/ex-raw-officers-want-pm-act-hamid-ansaris-anti-national-acts या माणसावर देशद्रोहाची कारवाई करावी असे तुमची गुप्तहेर संघटना मागणी करते असे असताना हे प्रकरण गंभीर नाही आणि त्यांच्या विरुद्ध अन्सारी आडनावामुळे असे होते हे आपल्याला म्हणायचे असेल तर मला काहीच म्हणायचे नाही चालू द्या तुमचे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:44 नवीन
https://zeenews.india.com/india/zee-exclusive-former-vice-president-hamid-ansari-reiterates-muslims-are-not-safe-in-india-2338761.html
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/18/2022 - 09:48 नवीन
सर्व मान्य. मुद्दा जोपर्यंत फक्त सैल्युटचा होता आणि तितकाच हायलाईट करुन निष्कर्ष काढला होता तितक्यापुरते ते स्पष्टीकरण होते अन्य सर्व आक्षेपार्ह कृत्ये निंद्य आहेत. ती पुढे आल्यास त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/18/2022 - 13:07 नवीन
गवि साहेब, अन्सारी आडनाव नसते तर हे निरीक्षण नोंदवले जात नाही. असले की व्हायरल होते. बाकी इतर काही असो, धिस इज ओन्ली टू बी फेअर विथ द देन व्हाईस प्रेसिंडेंट. ह्या उप राष्ट्रपती हामिद अंसारी ने किती कांड केलेले आहेत हे बघितले तर तुम्हाला तुमचे वाक्य परत घ्यावे लागेल. १. ईराण मध्ये राजदुत असताना भारताच्या रॉ अधिकार्यांना ह्यांने एक्स्पोज केले होते. २. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर दोनच वर्षांत २०१० ला दिल्लीमध्ये भरवल्या जाणार्या "अ‍ॅंटि टेरेरीस्ट काँन्फेरेंस " साठी अ‍ॅंटि टेरेरीस्ट स्ट्राटेजीवरचा एकस्पर्ट म्हणून पाकिस्तानच्या पत्रकार नुसरत मिर्झाला आमंत्रण पाठवायला ह्या कॉनफेरेंसच्या आयोजकावर जबरदस्ती केलेली होती. त्या आयोजकांनी आपल्या सद्सत विवेक बुद्धीवर असे आ मंत्रण पाठवले नाही. ह्या भारतीय मुळाच्या ब्रिटीश नागरीकाने मिडिया समोर येऊन ह्याची ग्वाही दिलेली आहे. https://www.youtube.com/watch?v=thT_2OMKyxI ३. उप राष्ट्रपती पदावर असताना पाकिस्तानच्या पत्रकार नुसरत मिर्झाला ५-६ वेळा स्पेशल व्हीजा दिला गेलेला होता. सर्वसाधारण पणे पाकिस्तानी लोकांना जो व्हिजा दिला जातो तो फक्त ३ शहरा पुरता मर्यादित असतो. जसे की दिल्ली, अजमेर शरिफ व अजुन एकादे शहर ( प्रवाशाला हवे ते ) . पण नुसरत मिर्झाला मात्र प्रत्येक भेटीत ७ शहरांना भेट द्यायची मुभा होती. नुसरत मिर्झा ने ज्या ज्या शहरांच्या भेटी घेतल्या त्या त्या ठिकाणी लगेच बाँब स्फोट झाले. नुसरत मिर्झा ने स्वःता एका मुलाखती दरम्यान ही माहीती कोणत्याही दबावा शिवाय दिलेली आहे. त्या मु लाखतीत तो पुढे म्हणतो की जेंव्हा जेंव्हा तो भारतात भेटीला यायचा त्यानंतर तो पाकिस्तानच्या गुत्पहेर विभागाच्या अधिकार्याला भेटुन पुर्ण माहीती देत असे. ते अधिकारी अश्या माहिती मुळे खुष असत. पुढे त्या त्या शहरात बाँबस्फोट झाले असल्याने त्या माहितीचा पुरेपुर उपयोग केल्याचे दिसते. https://www.youtube.com/watch? v=EjqLTmUno5Q ४. हामिद अंसारी ने नुसरत मिर्झाला ओळखतच नसल्याचे सांगीतल्यावर त्या दोघांचे एकाच कार्य क्रमातले स्टे ज शेअ र करतानाचे फोटो वायरल झाले. वर खरे साहेबांनी हामिद अंसारी बद्दल माहीती दिलेली आहेच. तरी सुद्दा ज्या दिवशी ते उप राष्ट्रपती म्हणुन निवृत्त झाले त्या दिवशीच्या मा मोदीजींच्या भाषणात २ मिनीटात हामिद अंसारी ची जी तासलेली आहे ते बघीतल तर कळत की निन्म दर्ज्याच्या माणसाला देशाचे उप राष्ट्रपती पदावर बघणे किती कष्ट दायक होते. https://www.youtube.com/watch? v=oYSqzPb2yUA
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/18/2022 - 16:07 नवीन
कान्डे बेसिसवर नावे ठेवण्यास विरोध नाही. माझे डॉ खरे यांना दिलेले उत्तर पहा. मुद्दा फक्त जे ध्वज सैल्युट केस होती त्यावर होता. http://misalpav.com/comment/1150531#comment-1150531
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 08/19/2022 - 01:12 नवीन
याचा "अन्सारी" आडनावाशी सम्बन्ध नाही. "कलाम" आडनावाच्या माणसाबद्दल असे कोणतेही प्रवाद ऐकल्याचे ठेवत नाही १००% काय उपयोग हा तर्क सांगून डॉक साहेब... ज्यांनी ठरवलेच आहे कि "अल्पसंख्यानकांच्या " कोणत्याही कृती बद्दल काहीही बोलायचे नाही आणि जो बलेलं तो संघी संकुचितवादि / धर्माद्ध / भाग आतंकवादी + इसलॅम्पफोबिया वाढवणारा ( च) असणार
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी गुरुवार, 08/18/2022 - 09:22 नवीन
झेंड्याला सलाम करण न करण हे व्ययक्तीक आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाचाय झेंड्याला निदान महत्वाच्या दिवशी ( उठसुठ नव्हे) मानवंदना न देणे हे वयक्तिक ?
चौकसजी झेंड्याला सलाम न करण्याचे मी समर्थन केलेले नाही. पण "केबीसी मध्ये आमिर खानने झेंड्याला सलाम केला नव्हता" असे केवीसीचा तो भाग पाहिल्यावर मला कुठेही आढळून आले नाही. त्याने "न केलेला सलाम" हा कर्नल मितालीजींसाठी होता, झेंड्यासाठी नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 08/17/2022 - 20:41 नवीन
लोकहो, चित्रपट टॉरेंटमार्गे उतरवला व बघितला. खास वाटला नाही. मूळ चित्रपटाचं भारतीय 'रूपां'तर तुटक व अर्थहीन भासलं. ख्रिश्चन पंथ उगीच मध्ये आणलेला वाटला. त्याचं प्रयोजन कळलं नाही. भारतीय पार्श्वभूमीवर विवाहपूर्व संतती दाखवायची खरंच गरज होती का? बहुधा ती स्वीकृत दाखवण्यासाठी ख्रिश्चन पंथाची सोय केली असावी. हा चित्रपट फुकट बघायला मिळाला तरंच बघा म्हणून सुचवेन. आणि सोबत स्वत:चं मानसिक वय वर्षे १५ च्या वर जाऊ देऊ नका. अन्यथा निराशा पदरी पडेल. तूर्तास फॉरेष्टाचा गंपू ( मूळ चित्रपट ) बघायची उत्सुकता मावळली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 08/18/2022 - 04:34 नवीन
पार्श्वभूमीवर विवाहपूर्व संतती दाखवायची खरंच गरज होती का? अहो गा पै , विवाहपूर्व संतती हा भारतीय संस्कृतीचा यू एस पी आहे.. Uda- कुंतीचा कर्ण .
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 04:47 नवीन
गामा पैलवानांना संस्कृती भारतीय प्रिय आहे, पण morals त्यांना Victorian आवडतात असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/18/2022 - 13:15 नवीन
मुनिवर, मग रूपाने तिच्या पोराला टोपलीत भरून कालव्यात सोडलेला दाखवायला हवा होता. मस्तपैकी हिंदू संकृतीच्या यूएसपीची जाहिरात झाली असती. काय गौडबंगाल आहे बरं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड गुरुवार, 08/18/2022 - 06:52 नवीन
एर्डोगान पत्नीला भेटण्यात प्रॉब्लेम काय ? आमिरचे मुसलमान असणे ? का अजून काही ? १९९५ साली भारत तुर्की व्यापार $२४२ मिलियन होता २०२० साली तो $ ४ बिलियन वगैरे झाला आहे. ०५/०८/२०१९ नंतर कलम ३७० रद्द झाले, त्यानंतर टर्की कायम पाकिस्तान सोबत उभा आहे, काश्मीर विषयावरून पाकिस्तानची साथ देणे, पाकिस्तानला पडत्या लिरा मधूनच मदत देणे, त्यांना पार युद्धनौका विकणे वगैरे पण करतोय की टर्की, मिलजेम प्रोजेक्ट अंतर्गत लेटेस्ट warship हल्लीच कमिशन केली पाकिस्तान ने इतके असूनही जर टर्की सोबत व्यापार थांबत नाही,पर्यटन थांबत नाही, दळणवळण थांबत नाही, सरकारी पातळीवरील द्विपक्षीय संबंध वगैरे अबाधित आहेत पण आमिर खान टर्किश फर्स्ट लेडीला भेटला त्यावर गहजब मात्र उडलाच पाहिजे असा आग्रह दिसला की तो उडवणाऱ्यांच्या हेतूवर शंका येते.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 08/18/2022 - 07:34 नवीन
अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप विमान उतरवून गरीबनवाझांची भेट घेतात तेव्हा तो राजकीय मास्टरस्ट्रोक असतो आता बोला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:23 नवीन
अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप विमान उतरवून गरीबनवाझांची भेट घेतात तेव्हा तो राजकीय मास्टरस्ट्रोक असतो याबद्दल श्री मोदी यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्याबद्दल पूर्वग्रहदूषितच नजरेने पाहायचे ठरवले तर त्याला काही इलाज नाही. तेंव्हा तुमचं चालू द्या
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/18/2022 - 09:21 नवीन
इतके असूनही जर टर्की सोबत व्यापार थांबत नाही,पर्यटन थांबत नाही, दळणवळण थांबत नाही, सरकारी पातळीवरील द्विपक्षीय संबंध वगैरे अबाधित आहेत. पाकिस्तानशी चार युद्धे झाली तरी त्यांच्याबरोबर व्यापार आणि राजनैतिक संबंध अजूनही टिकून आहेत. मग केवळ तुर्कस्तान बरोबर संबंध तुम्हाला का खटकतात? बाकी भारताबरोबर काश्मीर वरून संबंध ताणलेले असताना आमिर खान तुर्कीच्या अध्यक्षांच्या पत्नीला भेटला यात काही तुम्हाला चूक दिसत नाही तसेच राहुल गांधी सुद्धा डोकलाम आणि गालवान मध्ये कुरबुरी चालू असताना चीनला जाऊन तेथील राजकारण्यांना भेटले यातही काही चूक दिसत नसावी. चालू द्या
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/19/2022 - 04:15 नवीन
तुम्ही हे काय चालवलं आहेत ? अहो राहुल गांधी आणि आमिर खान काय तुलना होऊ शकेल का ? इतका तरी विचार करा. का चिडीला येऊन प्रत्येकाला तुम्ही काय असेच बोलणार तुम्ही काय त्याच्यावर दुर्लक्षच करणार वगैरे बोलून आपण कुठल्या लॉजिकल एंडला पोचणार आहोत का ? जरा तुमच्या विरोधात वैयक्तिक पण नाही मुद्दे आधारित गेलं का असलं ब्रॅण्डिंग करणं तुम्हाला संयुक्तिक वाटत असेल तर बोलणंच खुंटलं. तुम्ही troll ID नाही डॉक्टर, people respect you by virtue of your experience of life and service. It's a request for you to always keep that in mind sir. Just a humble suggestion. एखाद विचारवाद बरा वाटणे अन् त्यापायी लोकांशी संबंध खराब करणे इतका बालिश मी तरी नाही इतकं इथं बोलून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 08/19/2022 - 04:50 नवीन
विरोधात वैयक्तिक पण नाही मुद्दे आधारित गेलं का असलं ब्रॅण्डिंग करणं तुम्हाला संयुक्तिक वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.
अत्यंत नाईलाजाने आणि खेदाने सहमत व्हावे लागतेय. वान्डोबा, हे या प्रतिसादमालिकेशी संबंधित नाही किंवा डॉक्टरसाहेबांशीही संबंधित नाही. हे एक वेगळेच व्यापक काहीतरी वाटू लागलेय. कोणत्याही चर्चेत एका आयसोलेटेड मुद्द्यापुरते काही मत मांडले तरी आपण, "ऑप्शन १": खुद्द देशाचे थेट शत्रू किंवा मग "ऑप्शन २". लपलेला धोका ओळखू न शकणारे, खोट्या बेहोशीत असलेले , कळत नकळत गनीमाचे समर्थन करत असलेले आहोत (आणि हे सर्व असणे म्हणजे पुरोगामीच, लिबरलच) अशी काहीतरी इमेज जाणवून विचित्र वाटते. यापायी आताशा काही शक्यतो मतप्रदर्शन नकोच वाटते. पुरोगामी, लिबरल या प्रकारात काही दम आहे का ते ठाऊक नाही. त्याची व्याख्याही ठाऊक नाही, पण हे सकारात्मक भासणारे शब्द शिव्या बनून गेलेत असे वाटते आहे. गम्मत म्हणजे मी स्वत:ला मोदी समर्थक मानतो. त्यांच्या पक्षाला पाठिंबा देतो. किमान आतापर्यंत देत आलो. पण याचा अर्थ मी एका साच्यात फिट बसलेच पाहिजे असे चित्र दिसते. माझे कोणत्याच धर्माशी होलसेल शत्रुत्व नाही. मला केवळ घाबरलेल्या गर्दीत साप साप असे कोणी ओरडल्यास भीती वाटते. सापाची नव्हे. तो असला तरी दोघांना चावेल. भीती असते तुडवा तुडवीची. त्यात दोनशे मरतात. आणि कारण ठरते बहुधा एक दोरी.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 08/19/2022 - 05:40 नवीन
हे शिवी सदृश शब्द का झाले मला कळत नाही. कोणी माझ्या अंगावर थुंकलं तरी मी माझं पुरोगामीत्व आणि उदारपणा सोडणार नाही. एक आक्षेप असा घेतला जातो कि ज्या हिरीरीने लिबरल हिंदू धर्माची चिकित्सा करतात त्या पध्धतीने इतर धर्माची करीत नाही. पण हि अट कशासाठी? मी हिंदू असेल तर मला माझाच धर्म चांगला होण्यामध्ये रस असेल. आणि आज ज्या मजबूत पायावर उभे राहून आपण देशाच्या स्थिरतेलाच आव्हान देत आहोत तो पाया कितीही नाही म्हटलं तरीही पुरोगामी लोकांनीच तयार केला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 15:17 नवीन
कोणी माझ्या अंगावर थुंकलं तरी मी माझं पुरोगामीत्व आणि उदारपणा सोडणार नाही. वा! वा! श्री मोहनदास करमचंद यांच्या नंतर तुम्हीच. महात्मा सर टोबी आपण देशाच्या स्थिरतेलाच आव्हान देत आहोत तो पाया कितीही नाही म्हटलं तरीही पुरोगामी लोकांनीच तयार केला आहे. मूळ पुरोगामी आणि जमात - ए - पुरोगामी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तेवढा जाणून घेतलात तर पुरेसे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम धर्मामध्ये देशनिष्ठेपेक्षा धर्मनिष्ठेला जास्त महत्त्व दिले जाते, आणि माझ्या ५० % लोकसंख्या असलेल्या भगिनींना मी सहाव्या शतकात ढकलणारा धर्म स्वीकारा असे म्हणू शकत नाही यास्तव माझ्या अनुयायांना मी इस्लाम मध्ये धर्मांतर करा असे सांगणार नाही असे स्पष्टपणे लिहिलेले आहे. याशिवाय केवळ फाळणी नाही तर लोकसंख्येची अदलाबदल सुद्धा झालीच पाहिजे असे अत्यंत आग्रहाने सांगत असत त्याची कारणे सुद्धा त्यांनी विस्तृतपणे लिहिलेली आहेत. त्यांना कुणी ते पुरोगामी नाहीत म्हणून म्हणणार नाही. येथे जमात - ए - पुरोगामी लोक डॉ बाबासाहेबांच्या पेक्षा जास्त पुरोगामी आहेत. चालू द्या
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/19/2022 - 08:07 नवीन
मी तर सांगतो की मोदींना तुम्ही समर्थन द्या किंवा देऊ नका, मुद्दे आधारित द्या किंवा अजिबातच देऊ नका, थेट देशद्रोह अन् लिब्रांडू म्हणजे वाढीवपणाचा कळस वाटतो मला, ह्याने एनालिसिस ही कला नामशेष झाली नाही म्हणजे मिळवली. ह्या बाबतीत कित्ता गिरवायला हवा क्लिंटन साहेबांचा, क्लिंटन अर्थशास्त्र ते राज्यशास्त्र माफक मध्याच्या उजवे आहेत हे ते स्वतः निरलास कबूल करतात, मी माफक मध्याचा डावा, इथं क्लिंटन उजवे म्हणूनही नाक मुरडतात लोक अन् आमचा तर विषयच संपला. त्यामुळे तुमच्याशी काचकून सहमत अन् शिव्या खायला तयार मी पण.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 06:33 नवीन
अहो राहुल गांधी आणि आमिर खान काय तुलना होऊ शकेल का तुम्हाला चर्चा भरकटवायची असेल तर त्याला माझा इलाज नाही तुलना साधी सरळ आहे श्री राहुल गांधी चीनबरोबर आपल्या चकमकी चालू असताना चीन मध्ये जाऊन तेथील कम्युनिस्ट पक्षाबरोबर गुप्तपणे चर्चा करतात सुरुवातीला नकार देतात मग उघडकीस आल्यावर मान्य करतात. हीच स्थिती आमिर खानबद्दल आहे. जेंव्हा भारताचे तुर्कस्थान बरोबर काश्मीर प्रश्नात त्यांनी पाकिस्तानचा साथ दिल्याबद्दल वाजले होते आणि भारताने तुर्कस्तान शी चालू असलेला व्यापार बंद केला होता नेमके त्याच वेळेस हे महाशय तेथील अध्यक्षांच्या पत्नीची भेट घेतात? ते सुद्धा यांच्या पत्नीने त्यांना भारतात सुरक्षित वाटत नाही असे जाहीर विधान केले असताना? यानंतर तुम्हाला सिनेमा पाहायचा नसेल तर पाहू नका कोणी जबरदस्ती केलेली नाही असे यांची त्याच सिनेमातील साथीदार करीना खान सार्वजनिक ठिकाणी बोलताना म्हणते? इतका माज? कसला? पैशाचा? लोकांची स्मरणशक्ती वाईट असते पण इतकीसुद्धा वाईट नसते. ५२ पैकी दुसऱ्या कोणत्याही इस्लामी देशात गेले असते तर असे वादंग झाले असते का?. बाकी जपु ( जमात - ए - पुरोगामी) लोक सर्रास भाजप किंवा संघवाल्याना मुस्लिम विरोधी ठरवतात. तेंव्हा ते एक गोष्ट सोयिस्कर रित्या विसरतात कि भारताचे इतर मुस्लिम देशांशी वैर नाही आणि पाकिस्तान बद्दल जितका राग सामान्य भारतीयांना आहे तितका बांगला देश किंवा इंडोनेशिया किंवा कतार बद्दल नाही. भारताचे जितके सैनिक गेल्या ७५ वर्षात मृत्युमुखी पडले भारतात जितके दहशतवादी हल्ले झाले जितक्या दंगली झाल्या जितके बॉम्बस्फोट झाले त्यांचे उगम स्थान पाकिस्तानच आहे/ होते. दुर्दैवाने याच जपु लोकाना पाकिस्तानी खेळाडूंनी/ कलाकारांनी भारतात येऊन पैसा कमावण्यात काही गैर वाटत नाही. कलेसाठी कला किंवा खेळासाठी खेळ हि भूमिका घेऊन त्यांना दाऊद इब्राहीमने सुद्धा निर्मिती केलेला सिनेमा पाहण्यास अनमान वाटत नाही. बॉलिवूड मधील समस्त मंडळी याच लायकीची आहेत. दहशतवाद्यांकडून शस्त्रे मिळवल्याबद्दल आणि घातक शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्त ला अटक झाली तरी त्याच्या बरोबर सॉलिडॅरिटी दाखवतात. कोणालाही ड्रग्स बद्दल अटक झाली तरी त्याच्यावर अन्याय कसा झाला याबद्दल मोठ्या गळ्याने रडारड करतात याचा संताप होतो. त्यातून तो जर मुसलमान असला तर केवढं गहजब होतो. मी यावर उद्धृत केलेल्या ड्रग्स वरील धाडीत असलेले हिंदू नट नट्या यांच्या बद्दल एवढा गदारोळ का झाला नाही याबद्दल आपले काही मत आहे का? २००० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करी संबंधात ममता कुलकर्णी यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वारंट निघाले होते याबद्दल कधी कुणी ऐकले, वाचले नाही. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/non-bailable-warrants-issued-against-mamta-goswami/articleshow/57862513.cms Rs 2,000 crore drug case http://timesofindia.indiatimes.com/articleshow/57862513.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst पण बोटी वर रेव्ह पार्टीला गेलेला असताना आर्यन खान पकडला गेला त्याबद्दल केवढा गहजब झाला? तो काय तिथे नमाज पढायला गेला होता? इथे आपले मिपा वरील पुरोगामी लोक त्याच्याकडे ड्रग्स सापडली नाहीत म्हणून सरकारवर टीका करायला सज्ज साधी गोष्ट एखाद्या कुंटणखान्या वर धाड पडते तेंव्हा तेथे असलेल्या ग्राहकांना सुद्धा सुरुवातीला आत टाकले जाते कशासाठी तर ते कोणत्या दलालामार्फत तेथे आलेले आहेत हि माहिती काढण्यासाठी. ते ग्राहक काय तेथे हनुमान चालिसा वाचायला गेलेले नसतात. आर्यन खान च्या बाजूने केवढे सगळे लोक उभे राहिले आणि तेथे कार्यवाही करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर केवढे बालंट आणि किटाळ आणला गेला यातलं काहीच तुम्हाला खटकत नाही? आश्चर्य आहे? सोनाली बेंद्रे ने सुद्धा ताज वर हल्ला झाल्यानंतर आपले कमांडो किंवा सामान्य लोक हुतात्मा झाल्याची खंत व्यक्त करण्याऐवजी तेथील माझे फेव्हरेट वासाबी रेस्टोरंट बंद झाल्याची खंत व्यक्त केली होती. वरती प्रोटोकॉल बद्दल एवढे मोठे चुकीचे प्रतिसाद टाकले होतेत ते अज्ञानातून होते. त्याबद्दल तुम्ही क्षमा मागितली म्हणजे आपण अजून सभ्य आणि सज्जन आहात याचा पुरावा आहे म्हणून मी अजून आपल्याशी चर्चा करतो आहे. पण मीच बरोबर असेच आपले मत असले तर मी चर्चा येथे थांबवतो धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 08/19/2022 - 07:43 नवीन
कदाचित स्पष्ट करणे झाले नसेल नीट म्हणून करतो. राहुल गांधी - खासदार, विरोधी पक्षाचे नेते आमिर खान - ब्लडी सिविलियन तुलना होऊ शकते का ? हक्क, हक्कभंग, विशेषाधिकार, इत्यादींच्या हवाल्याने ? तरीही दोघांना एकच तागड्यात तोलण्याचा तुमचाही हट्टच असल्यास माझा पण नाईलाज असेल. त्याशिवाय तुम्ही चर्चा थांबवली हे बरेच केलेत कारण दुराग्रहासमोर तर्क चालत नसतो हेच खरे. आता तुम्ही आम्हाला समजा किंवा आम्ही तुम्हाला दुराग्रही समजू किंवा समजूतदार मिपाकर समजून घेतीलच स्वतःहून, त्यामुळे माझाही पास तुम्हाला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/19/2022 - 08:03 नवीन
दोन्ही ची तुलना केवळ साधर्म्यासाठी आहे. राहुल गांधी यांचा अपराध तर फारच गंभीर आहे. कारण विरोधी पक्षाच्या अनभिषिक्त नेत्याने प्रत्यक्ष युद्धसमान स्थिती असताना सरकारला अंधारात ठेवून शत्रूशी गुप्त चर्चा करणे हा माझ्या दृष्टीने देशद्रोह आहे.( अर्थात हे माझे मत केवळ वाचनात आलेल्या गोष्टींवर आधारित आहे वस्तुस्थिती कदाचित वेगळी असू शकते) परंतु ज्या माणसाला( आमिर खान) मी देशभक्त आहे आणि माझा सिनेमा पहा हे मीडियाला सांगावे लागते त्याने संशयास्पद रित्या वागू नये एवढी तरी सामान्य माणसाची अपेक्षा असते. एक ज्ञानेश्वरीतील दाखला देतो. सज्जन लोक हिवराच्या झाडाखाली बसत नाहीत असे लिहिलेले आहे. याचे संशीधन करताना श्री रा भि जोशी याना विदर्भात याचा संदर्भ लागला तेथील एक खेडूत माणूस त्यांना म्हणाला हिवराच्या सालीचा उपयोग दारू गाळण्यासाठी होतो. ( त्यावर श्री जोशी यांनी १६ वर्षाचा युवक कधीही विदर्भात गेलेला नसताना त्याला हे ज्ञान कसे मिळाले याबद्दल अचंबित होताना आढळतात)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा