(सिंह कधी रागीट असतो का ?)
नुकतेच श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी नुतन संसदभवनावर बसवण्यात येणार्या अशोकचिन्हाचे उद्घाटन केले. त्या चिन्हचे ट्विटर वर पाहण्यात आलेले हे फोटो >>
महुआ मोईट्रा ताईंनी ट्विट केलेला हा फोटो : ताई पुढे जाऊन सत्यमेव जयते चा संघमेव जयते इथवर प्रवास पुर्ण झालेला आहे असेही म्हणाल्या !
>>>
हा वायेसार ने ट्विट केला फोटो :
>>>
एक रुपाया दंड फेमस प्रशांत भूषण म्हणाले - "From Gandhi to Godse; From our national emblem with lions sitting majestically & peacefully; to the new national emblem unveiled for the top of the new Parliament building under construction at Central Vista; Angry lions with bared fangs.
This is Modi's new India!"
हा विकिपेडीयावर सापडलेला सारनाथ चा मुळ फोटो :
>>>
एकुणच सगळा टिवटिवाट पाहुन देशहिताचे काही ज्वलंत प्रश्न उभे रहातात >>>
खरेच सिंह कधी रागीट असतो का ? सिंह कधी मस्युलर , पिळदार स्नायु असलेला, बलदंड असतो का ? की गर्जना करणारा सिंह म्हणजे हिंदुत्ववादी अन गप्प बसलेला सिंह सेक्युलर असे असते ना ? राष्ट्रचिन्हावरचा सिंह कसा प्रेमळ असायला हवा , त्याच्या चेहर्यावर बकरीच्या सारखा करुण भाव असायला हवा , त्याचे सुळे तर अजिबात दिसता कामा नयेत. उलट लॅब्रॅडोर कसं जीभबाहेर काढुन लाळ घोटतं अन कधीही येऊन चाटेल असे वाटतं तसे काहीसे भाव असायाला हवेत सिंहाच्या चेहर्यावर !
आम्हाला तर वाटते कि राष्ट्रचिन्हावरील सिंह असा असायला हवा >>>
तुम्हाला काय वाटते ?
;)
तुम्हाला काय वाटते ?
;)
😃
4.सिंह धष्टपुष्ट न दिसता Pedigree चे pet food खाल्ल्यासारखा दिसतो आहे.लै बेक्कार हसलो याला. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? Pedigree चे pet food खाल्ल्यावर धष्ट्पुष्ट होत नाही काय? आणी सिंह कधीपासुन पेट फुड खायला लागला ??? Pedigree चे pet food खाल्लेला सिंह तुम्ही कुठे पाहीला ? खुसपट काढायचेच तर काहीही मुद्दा चालतो हे मात्र खरे ... म्हणजे बघा "2.अशोकचक्राचा रंग निराशावादी भासतो." हे पण एक कारण आहे. आशावादी व निराशावादी रंग पण असतात?बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर नेते ,कट्टर हिंदुत्व वगैरे छाती थोपटून घेतात समर्थक पण ती पाडणारे कोर्ट मध्ये शेपूट घालून आम्ही तिथे नव्हतोच आमचा काही संबंध नाही हे पटवून देतात.त्या नेत्यांनीच पूर्ण योजना आखून बाबरी पाडली होती. परंतु तेवढे पुरेसे नव्हते. त्याच जागेवर श्रीराममंदिर बांधणे हे अंतिम उद्दिष्ट होते. एकदा आधीचे मुख्य काम पूर्ण केल्यानंतर पुढील काम करण्यासाठी न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची गरज नव्हती. ते काम कोणी पार पाडले हे सर्व जगाने पाहिले होते. अर्थात आपल्या घरातून बाहेर पाऊलही न ठेवता आम्हीच हातोडे मारून बाबरी पाडली असे सातत्याने सांगणारे लबाड बोकेही जगाने पाहिले आहेत.गोध्रा दंगलीत शेठ नि बरोबर बदला घेतला ,कसे तेच हिंदुह्रिदय सम्राट आहेत ,"त्यांची"कशी जिरवली म्हणून भक्त मंडळी नाचत असतात आणि कोर्टात शेठ चा काहीच हात नव्हता हे सिद्ध करून झाल्यावर सुप्रीम कोर्ट ने म्हटलंय म्हणजे बरोबर असणार , करावा लागतो असा गनिमी कावा अशा पळवाटा .त्यात कसल्या पळवाटा? विरोधकांनी आणि अनेक तथाकथित निधर्मी संघटनांनी जंग जंग पछाडूनही मोदींना दंगल प्रकरणात अडकविता आले नाही. भारतात न्यायालये असल्याने तुम्हाला कोणी न्यायालयात खेचले तर तुम्हाला कायदेशीर मार्गानेच तुमची बाजू मांडावी लागते.त्या उलट एक केंद्रीय मंत्री सांगताहेत कि काही बदल नाही केलाय , फक्त पर्स्पेक्टिव्ह मुळे सिंह आक्रमक दिसताहेत,आर्टिस्ट स्वतः सांगतोय कि आम्ही फक्त रिप्लिका बनवलीय(ती जरा हुकलीय) कुठल्याही डोळे नीट असलेल्या माणसाला दिसेल कि पर्स्पेक्टिव्ह पेक्षा प्रपोर्शन मध्ये बदल झालेले आहेत .रेप्लिका हुकलीये असे शिल्पकाराने सांगितलेले नाही. मूळ साडेतीन फूट उंचीची प्रतिमा २१ फूट उंचीची केल्यावर सर्व बाजू त्या प्रमाणात वाढतातच. एखादे चित्र झूम केल्यावर ते मूळ चित्रापेक्षा जरा वेगळे दिसते. तसेच तुम्ही ज्या कोनातून प्रतिमा पाहता त्या कोनानुसार फरक दिसतो हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. एखाद्याचा फोटो अगदी समोरून काढणे आणि स्टुलावर उभे राहून काढणे यात फरक असतो. मूळ व्यक्ती तीच असली उंचीवरून काढलेल्या फोटोत तीच व्यक्ती बुटकी वाटते. तसंच इथेही आहे.