हातात फक्त आठ वर्षे!
भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत.
पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज.
पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय.
आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील.
पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे.
पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !!
चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.
🗣 चर्चा
(92)
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 10:11
नवीन
मी सीएसटीम वरून ठाणे साठी लोकल ट्रेन पकडली
दोन्ही सीट मध्ये कोणी तरी संडास केली होती.
पाहिले स्टेशन गेले जागा रिकामी होती सर्व शी शी करून त्या सीटवर बसले नाहीत
दादर मध्ये सर्व सीट पॅक झाल्या .
पर्याय उपलब्ध नव्हता.
लोक त्या संडास वर पाय ठेवून त्या सीटवर बसली
काही तत्व नाहीत,काही स्वतःचे विचार नाहीत.
फक्त स्वार्थ
मी त्यांच्या लक्षात आणून दिले तरी ती लोक काही तेथून उठले नाहीत.
.अनेक इमारती मध्ये पाणी वाहून जाते .कोणाला काही पडलेली नसते.
पण दोन दिवस पाणी आले नाही तर गटार चे पाणी पण पितील.
पण सुधारणार नाहीत.
भारतीय लोक पर्यावरण साठी काहीच करू शकणार नाहीत
अपेक्षा ठेवू नका.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 10:18
नवीन
सहना सारखे अती शाहने जगात खूप आहेत.
त्यांचे आयुष्य तर गेले.
कारण वातावरणात आज पण २५% ऑक्सिजन आहे,आज पण माणसाची खोगीर भरती चे पोट भरण्या इतका पावूस आणि अन्न धान्य पिकते.
त्या मुळे सर्व मिळत आहे.
म्हणून sahana सारखे विचार करणारे जिवंत आहेतं
निसर्ग बदलला तर माणूस काही ही करू शकणार नाही.
माणसाची exist जवळ आलेली आहे.
Sahana सारख्या विचार करणाऱ्या लोकांना सहार चे वाळवंट मध्ये शिफ्ट केले तर च खरी झळ पोचेल आणि सर्व निसर्गाचे देणे स्वतः वापरून ऐश करून निसर्गावर वर च उलटनारे विचार मेंदूत येणार नाहीत
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 10:59
नवीन
1) जल स्तर खोल जात आहे.
त्याला पाण्याचा उपसा हे कारण नाही.
उपसा केल्या मुळे जल स्तर खोल जात आहे हे अशास्त्रीय कारण आहे.
सामान्य लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांना दोषी ठरवण्याचे..
आणि पाण्यावर उद्योगपती ह्या अती स्वार्थी लोकांचा हक्क स्थापित करण्याचा.
खरे कारण आहे जल भरणी होत नाही.
काँक्रिट ची जंगल उभी राहिली त्या मुळे पाणी वाहून जात आहे.
जमिनीत मुरत नाही वृक्ष तोड प्रचंड आहे.वृक्षाची मुळ पाणी धरून ठेवतात आणि जमिनीत ते पाणी मुरावतात.
ह्या सर्व जल भरणी चे मार्ग बंद झाले आहेत.
फडणवीस सरकार नी अमीर खान ला बरोबर घेवून छान योजना आखली .
खड्डे खणले,बांध घातले त्या मुळे जलस्तर वाढला हे सत्य आहे.
२) गोड्या पाण्याचे जे मूळ source आहेत.
त्या नद्या.
फालतू आयएएस ऑफीसर बिनडोक राजकीय नेते ह्या मुळे कित्येक शहरांचे सांड पाणी नदीत सोडले जाते .खूप अमूल्य असा नैसर्गिक खजिना त्या मुळे खराब होतो.
Ai वर आधारित आयएएस ऑफिसर हवा आणि थोडा तरी देशावर प्रेम करणारा
नेता हवा.
३)गंगा,यमुना ह्या महत्वाच्या नदी ची पूर्ण वाट लागलेली आहे.
४) उद्योगपती पती त्यांचे chemical युक्त सांडपाणी नदीत सोडतात.
मूर्ख नेते आणि स्वार्थी प्रशासन ह्यांच्या कृपेने.
५) डिझेल,पेट्रोल आता बंद होणे गरजेचे आहे .
पर्यायी इंधन व्यवस्था होणे खूप गरजेची आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 06/16/2022 - 11:15
नवीन
गावचे सांडपाणी नदीत सोडायचे हे ज्याने रुजवले त्या महात्म्याला लाख सलाम.
या एकाच विचाराने नद्यांची पूर्ण वाट लागली आहे.
बहुतेक सर्वच महापालीकांनी याचा पूरेपूर वापर करत सांडपाण्याची स्वतःची जाबाबदारी ढकलून दिली आहे.
पुण्यात तर मुळा मुठा नद्यांची गटारे पालिकेने स्वतःच केली आहेत. त्यात भर म्हणून की काय नद्यांचे तळ सिमेंट ने भरुन टाकले आहेत.
सिमेंटचे रस्ते हे वापरायला चांगले असले तरी पर्यावरणासाठी वाईट आहेत. त्यामुळे पाणी मुरणे पूर्ण बंद होते.
पण कोणीच हे मुद्दे पुढे आणत नाही
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 06/16/2022 - 12:14
नवीन
इकडे चिंचवडमध्ये पालिकेने काही ठिकाणी पुलांवर वगैरे उंच जाळ्या बसवल्या आहेत तसेच बाजूला निर्माल्य कुंड ठेवले आहेत , अपेक्षा ही की लोकांनी निर्माल्य नदीत टाकू नये पण तरीही काही महाभाग जाळ्याच्या वरुन हवेत उंच फेकून निर्माल्य नदीतच टाकतात ते ही प्लॅस्टीकच्या पिशवीतून.
सर्व सरकारी अधिकार्यांना (आता कामावर असलेले व नव्याने रुजू होणारे) अतिशय विस्तृत व खोलवर असे पर्यावरण विषयक प्रशिक्षण द्यायला हवे. म्हणजे यातल्या किमान दहा टक्के अधिकार्यांची जरी मानसिकता बदलली आणि ते पर्यावरणाचा विचार प्राधान्याने करत कामांना परवानगी देवू लागले तर काहीतरी सुधारणा होईल. सर्व लोकप्रतिनिधिनांही असे प्रशिक्षण सातत्याने द्यायला हवे.
तस पाहिलं तर कोणतीही भूमी ज्यावर इमारती उभ्या आहेत तेवढे क्षेत्रफळ पाणी मुरण्यास अनुपलब्ध असणारं. पण रेन वॉटर हार्वेस्टींग (मराठी शब्द ?) सारख्या उपाययोजनांतुन याची भरपाई किंबहूना अधिकच भरपाई करता येवू शकते. मोठ्या रस्त्याच्या कडेला पाणी मुरण्याकरिता कृत्रिम व कार्यक्षम व्यवस्था तयार केल्या जावू शकतात. बहूधा समृद्धी महामार्गात ही योजना केली आहे.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 10:59
नवीन
1) जल स्तर खोल जात आहे.
त्याला पाण्याचा उपसा हे कारण नाही.
उपसा केल्या मुळे जल स्तर खोल जात आहे हे अशास्त्रीय कारण आहे.
सामान्य लोकांवर नियंत्रण ठेवून त्यांना दोषी ठरवण्याचे..
आणि पाण्यावर उद्योगपती ह्या अती स्वार्थी लोकांचा हक्क स्थापित करण्याचा.
खरे कारण आहे जल भरणी होत नाही.
काँक्रिट ची जंगल उभी राहिली त्या मुळे पाणी वाहून जात आहे.
जमिनीत मुरत नाही वृक्ष तोड प्रचंड आहे.वृक्षाची मुळ पाणी धरून ठेवतात आणि जमिनीत ते पाणी मुरावतात.
ह्या सर्व जल भरणी चे मार्ग बंद झाले आहेत.
फडणवीस सरकार नी अमीर खान ला बरोबर घेवून छान योजना आखली .
खड्डे खणले,बांध घातले त्या मुळे जलस्तर वाढला हे सत्य आहे.
२) गोड्या पाण्याचे जे मूळ source आहेत.
त्या नद्या.
फालतू आयएएस ऑफीसर बिनडोक राजकीय नेते ह्या मुळे कित्येक शहरांचे सांड पाणी नदीत सोडले जाते .खूप अमूल्य असा नैसर्गिक खजिना त्या मुळे खराब होतो.
Ai वर आधारित आयएएस ऑफिसर हवा आणि थोडा तरी देशावर प्रेम करणारा
नेता हवा.
३)गंगा,यमुना ह्या महत्वाच्या नदी ची पूर्ण वाट लागलेली आहे.
४) उद्योगपती पती त्यांचे chemical युक्त सांडपाणी नदीत सोडतात.
मूर्ख नेते आणि स्वार्थी प्रशासन ह्यांच्या कृपेने.
५) डिझेल,पेट्रोल आता बंद होणे गरजेचे आहे .
पर्यायी इंधन व्यवस्था होणे खूप गरजेची आहे.
- Log in or register to post comments
D
dadabhau
Wed, 06/15/2022 - 13:34
नवीन
sunil kachure ह्या आयडी च्या डोक्यात fault आहे असे जाणवते...अजूनही कुणाला तसं वाटतं का?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 06/16/2022 - 08:23
नवीन
मला अजिबात तसे वाटत नाही.
कारण मी त्यांच्या पोस्ट वाचतच नाही.
:))
तुम्ही इतरांना सुधरवू शकत नाही.
पण
तुम्ही तुमच्यात बदल करू शकता.
;)
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Wed, 06/15/2022 - 14:47
नवीन
प्रथमत: लेखाबद्दल तर्कवादी यांचे आभार. लेख लिहून आपली जनता सुधारली असे होणार नाही, पण जे काही करू पाहतात त्यांना तरी निदान आपण काही चांगले करतो आहोत याची पावती मिळते. विषय खूप मोठा आहे आणि पर्यावरण रक्षण ही मानवाची खरी जबाबदारी आहे इथपासून ते हा एक बागुलबुवा आहे इथपर्यंत सर्व मते यात आहेत. खूप दिवसांपूर्वी मायकेल क्रिच्टन या लेखकाचे ‘स्टेट ऑफ फिअर’ हे पर्यावरणवादी अतिरेकी याविषयीचे पुस्तक वाचले होते, आणि याकडे अशाही दृष्टीने पाहणारे आस्तित्वात असल्याचा शोध लागला होता. असो.
तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण कोणते, हे बर्याच लोकांना माहित नसते. वाहने, औद्योगिकरण, शहरीकरण, जंगलाचा र्हास इ. गोष्टी मुख्यत्वे यासाठी जबाबदार असाव्यात असाच सार्वत्रिक समज असतो. तथापि तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण मांसाहार हे आहे, हे संशोधनाने सिध्द झालेले आहे. संदर्भ शोधून देऊ शकेन. मानवाच्या पोषणासाठी जी शेती लागते, त्यात प्राण्यांचे पोषण करणे आणि प्राणी खाणे हे तापमानवाढीला सर्वाधिक जबाबदार आहे, आणि आपली लोकसंख्या आधिकाधिक मांसाहाराकडे वळत आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Wed, 06/15/2022 - 16:17
नवीन
धन्यवाद स्वधर्म जी.
बरोबर.. पण निदान सर्वप्रथम या विषयातले जास्तीत जास्त पैलू, मुद्दे चर्चिले जावे व ज्ञानात भर पडावी (किंवा अज्ञान दूर व्हावे असेही म्हणू शकतो) हे महत्वाचे. लोक पर्यावरणाबद्दल बोलू लागले, प्राधान्याने विचार करु लागलेत की तो विषय ट्रेण्डिंग होईल आणि राजकारण्यांनाही त्यात तातडीने लक्ष घालावे लागेल.. आधी आपण पर्यावरणाला पुरेसे फुटेज तरी देवूयात (सध्या राजकारणाला देतोय तितके तरी किमान)
हे कसे ? अधिक विस्ताराने सांगू शकता का ? हे जर खरे असेल तर मला माझ्या शाकाहारी असण्याचा अधिकच अभिमान वाटू लागेल.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
गुरुवार, 06/16/2022 - 10:04
नवीन
हे दोन प्रकारे सांगता येईल. पहिले म्हणजे सामान्यज्ञान आणि दुसरे शास्रीय संशोधन. सामान्य ज्ञानानुसार जायचे तर आपण एका कोंबडीचे उदाहरण घेऊ. एक कोंबडी एका माणसाला अन्न म्हणून किती पुरेल? साधारण त्याची दोन वेळची किंवा तीन वेळची भूक एका कोंबडीतून भागू शकेल. आता कोंबडी कापण्याएवढी मोठी होईपर्यंत तिने किती धान्य खाल्ले असेल याचा विचार करू. अंदाजे ९० दिवस पाळल्यावर ती कापली असे मानले व रोज तिला खायला पाव किलो धान्य लागते; असे समजले तर २२.५ किलो धान्य तरी तिने खाल्ले असणार. एवढ्या धान्यावर माणूस किती दिवस भूक भागवू शकेल? निदान १०-१५ दिवस तर सहजच. हीच आकडेमोड जर शेळी, गाय इ. वरच्या स्तरातील प्राण्यांसाठी केली, तर याहून मोठा फरक पडतो. यात जमिनीचा वाढीव वापर, जनावराचा मिथेन, वाहतूक इ. मुळे झालेले अधिक उत्सर्जन धरलेलेच नाही. त्यामुळे तुंम्ही शाकाहार करून फार तापमानवाढ रोखण्यासाठी खूप मदत करत आहात, याचा आनंद मानायला आजिबात हरकत नाही. आकडे ढोबळ आहेत, पण तत्व समजण्यासाठी नक्कीच पुरेसे अचूक आहेत.
शास्रीय संशोधन तर यावर खूप झालेलेच आहे. सहज गुगल केले तरी अनेक संदर्भ मिळतील.
खालील संदर्भानुसार हरितवायू उत्सर्जनातील २५% हा वाटा केवळ अन्न उत्पादनासाठी जमिनीचा वापर याचा आहे, तर वीज निर्मिती २५%, औद्योगिकरण २१%, वाहतूक १४% इमारती ६% व इतर सर्व १०% आहे. म्हणून हे तापमानवाढीचे सर्वात मोठे कारण आहे. पण अन्न उत्पादन तर आपण थांबवू शकत नाही. म्हणून मग त्यातला मांसाहाराचा परिणाम कसा आहे हे पहावे लागेल.
https://globalecoguy.org/the-three-most-important-graphs-in-climate-change-e64d3f4ed76
या दुसर्या संदर्भात मुख्यत्वे औद्योगिक रित्या प्राणी उत्पादन करण्यामुळे कसे हरित वाय़ू उत्सर्जन वाढते व त्याचा तापमानवाढीतील वाटा किती आहे हे सिध्द करण्यात आलेले आहे. बीबीसीच्या लेखानुसार एकून अन्न उत्पादनाचा उत्सर्जनातील वाटा २६%, त्या २६%तील ५८% वाटा हा प्राणिज पदार्थांचा व त्यातील ५०% वाटा हा शेळ्या, मेंढ्या व गाय यांच्या पदार्थांचा आहे. हा लेख आयपीसीसीच्या संशोधनावर आधारित आहे.
https://www.bbc.com/news/science-environment-49238749
तिसरा एक संदर्भ सायंटिफिक अमेरिकन या विख्यात मासिकातील आहे. त्यानुसार बीफ खाण्यामुळे चिकन खाण्यापेक्षा १३ पट (टक्के नव्हे) अधिक उत्सर्जन होते, तर बटाटा खाण्यामुळे झालेल्या उत्सर्जनापेक्षा ते ५७ पट अधिक आहे. एका साधारण अमेरिकन माणसाच्या बीफ खाण्यामुळे एक कार १८०० मैल (२९०० किमी) चालवण्याइतके हरितवायू उत्सर्जन होते.
https://www.scientificamerican.com/article/the-greenhouse-hamburger/
म्हणून मांसाहार हे तापमानवाढीचे सर्वात मोठे व महत्वाचे कारण आहे, हे वरील संदर्भावरून स्पष्ट झाले आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 06/16/2022 - 11:47
नवीन
हे भयंकरच म्हणावं लागेल. हा विषय का चर्चिला जात नाही ते कळत नाही. बहूधा हा विषय घेतला तर त्यावर धार्मिक गोष्टी जोडल्या जावून प्रचंड विरोध होण्याची भिती वाटत असावी.
निदान जागतिक वसुंधरा परिषद वा पर्यावरण विषयक इतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकांच्या वेळेला फक्त शाकाहारी भोजन दिले जावून एक उदाहरण घालून द्यावे.
थेटपणे मांसाहार कमी करा वा करु नका असा प्रचार करणे शक्यच नाही पण शाकाहारी पदार्थांना "पर्यावरणपूरक" (इको फ्रेंडली वा एन्व्हाय्रोन्मेंट फ्रेंडली) स्न्मान दिला जावा म्हणजे हळूहळू शाकाहाराकडे कल वाढू लागेल.
पण अर्थातच दूध व दूग्धजन्य पदार्थांचे सेवनही कमी करावे लागेल.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
गुरुवार, 06/16/2022 - 12:07
नवीन
तर्क वादी ती जाहिरात आहे .त्या वर चर्चा झाली तर underpant पण अंगावर राहणार
नाही पूर्ण नागडे होतील संशोधक
आणि पोकळ बांबू चे फटके बसतील..
म्हणून चर्चा होत नाही
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
गुरुवार, 06/16/2022 - 12:35
नवीन
सुनीलजी, वरील संदर्भ चुकीचे अथवा खोटे आहेत असे संदर्भ तुंम्ही द्या. अन्यथा ते तुमचे मतच राहील. सत्याचा किंवा तथ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 06/16/2022 - 13:00
नवीन
अशी भाषा टाळत मुद्देसूद प्रतिवाद केलात तर लोक तुमची मतं , तुमचे प्रतिसाद अधिक गांभीर्याने घेतील असं नाही वाटत का तुम्हाला ?
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
गुरुवार, 06/16/2022 - 12:30
नवीन
>> बहूधा हा विषय घेतला तर त्यावर धार्मिक गोष्टी जोडल्या जावून प्रचंड विरोध होण्याची भिती वाटत असावी.
एकदा धार्मिक बाजू आली, की सगळा विषय दिशाच हरवून बसतो. विज्ञानाला, निसर्गाच्या नियमांना मानवाच्या धार्मिक समजूतीचे किंवा भावनांचे काहीही पडलेले नाही. मानवासहित, किंवा मानव नष्ट झाला, तरी ती प्रक्रीया अव्याहतपणे चालूच राहणार. तुंम्ही हानी करत राहिलात, तर तुंम्हीच संपाल, निसर्गात त्या ध्वस्त पर्यावरणातही तग धरेल अशी प्रजाती अस्तित्वात येतील. त्यामुळे ‘निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा’ असल्या घोषणा संपूर्णपणे निरर्थक आहेत. खरं तर मानवी जीवन वाचवा हेच पर्यावरणाची काळजी असलेल्यांसाठी महत्त्वाचं आहे.
धार्मिक बाजूची गंमत म्हणजे भारतात जे शाकाहारी आहेत, ते धार्मिक कारणानेच बहुसंख्य शाकाहारी आहेत. मांसाहारामुळे होणारी पर्यावरणाची हानी समजून घेऊन शाकाहारी बनलेले फारसे कोणी माझ्या माहितीत तरी नाहीत.
परदेशातील लोकांबरोबर बोलत असताना एकाने गमतीशीर मुद्दा माडला. म्हणे आजकाल मुलांना प्राण्याविषयी ‘रिस्पेक्ट’च नाही. त्यांना वाटतं चिकन हे सुपरमार्केटमध्ये किंवा फॅक्टरीत तयार होतं. आणि अगदी साबण, चपला, इ. सारखं गाई बैलांचे अवयव तिथे यांत्रिकपणे मांडले जातात, वजन केले जातात, पॅक केले जातात. त्यामुळे जिवंत प्राण्याला आपण काय यातना देत वाढवतो व कापतो ते घेणार्याला समजतच नाही. सगळी दृष्टीआड सृष्टी. त्यांना भावनिक दृष्ट्या शाकाहारी बनण्यासारखी परिस्थिती तिथेही नाही अन इथेही. शेवटी ‘ज्यूसी’ चवीला पर्याय नाही.
- Log in or register to post comments
N
Nitin Palkar
Wed, 06/15/2022 - 16:16
नवीन
मूळ लेख आणि त्यावरील अनेक प्रतिक्रिया खूपच चांगल्या आणि गांभीर्याने विचार करण्यायोग्य आहेत. काही जणांची विचारधाराच तिरकी असल्याने लेखातील कोणत्याही मुद्द्याचा योग्य प्रतिवाद न करता केवळ पिंक टाकण्याच्या उद्देशानेही आलेल्या प्रतिक्रियांना फाट्यावर मारावे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Wed, 06/15/2022 - 16:21
नवीन
धन्यवाद नितीन जी
आपण चर्चा सुरु ठेवू .. हळूहळू ज्ञान वाढत जाईल, नवीन गोष्टी सगळ्यांसमोर येतील तशी काही लोकांची उदासीनता कमी होईल.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 16:42
नवीन
ब्रह्मांड निर्मिती बिग बँग,
पृथ्वी ची निर्मिती,सजीव निर्मिती,माणसाची निर्मिती.वनस्पती निर्मिती.
हा काळ खूप जुना आहे
खुप किचकट जैव रासायनिक घडणा घडल्या आणि जैव सृष्टी अस्तित्वात आली.
तेव्हा पासून माणूस जे अन्न खातो त्या वनस्पती आहेत.खूप सारे मांसाहारी प्राणी आहेत,सस्तन प्राणी आहेत.
ही सर्व निसर्गाची निर्मिती आहे.
निसर्गात एक पण जीव किंवा वनस्पती अशी नाही ज्या मुळे पर्यावरण हानी होईल आणि पृथ्वी वरची जीव सृष्टी धोक्यात येईल.
प्रायोजक केलेल्या संशोधक लोकांची मत मांडू च नका.
आम्हाला माहीत आहेत.
माणसाने निसर्गात बदल केला.
डिझेल,पेट्रोल,कोळसा ,लोखंड,विविध धातू हे पृथ्वीच्या पोटात होते..ते माणसाने बाहेर काढले.
जैव इंधन माणसाने बाहेर काढले त्याचे ज्वलन केले हे कृत्य निसर्गाच्या विरुद्ध होते आणि आहे.
विविध रसायने माणसाने निर्माण केली ती पृथ्वी वर अस्तित्वात नव्हती..
हे पण निसर्ग विरोधी कृती आहे.
रबर,प्लास्टिक माणसाने निर्माण केले ते निसर्गात नव्हते...खूप .मोठी लिस्ट आहे माणसाच्या काळ्या कर्तुत्वाची.
त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पर्यावरण धोक्यात आले.
पृथ्वी ची निर्मिती अब्ज वर्ष होवून गेली.पर्यावरण ह्या दोन शे वर्षात धोक्यात आले.
उगाच प्रायोजित केलेले संशोधक आणि त्यांची मतं मनावर घेवू नका.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 17:01
नवीन
मागील काही वर्षात विज्ञान विषयातील मासिकात संशोधनाच्या नावाखाली बातम्या येत होत्या .
गाई,म्हैस अशा रवंध करणाऱ्या जनावर मुळे कार्बन चे प्रमाण वातावरणात वाढत आहे अशा आशयाच्या त्या बातम्या होत्या.
पण हे प्राणी अनाधी काळापासून पृथ्वी वर आहेत आणि त्यांची संख्या आज च्या पेक्षा पूर्वी जास्त होती .तेव्हा माणूस लपून रह्याचा.
तेव्हा नाही कार्बन वाढला वातावरणात..
खरे तर ते संशोधन नव्हते जाहिरात होती
जाहिरात आणि खरे संशोधन ह्या मधील फरक समजणे खूप अवघड आहे..
विचार केल्या शिवाय समजणार पण नाही.
प्राणी जे मांस किंवा दूध देतात त्यांना बदनाम करायचे.
त्यांना पाळण्यावर निर्बंध आणायचे हा हेतू होता.
ही जाहिरात वजा संशोधन नेहमी प्रसिद्ध करून अनुकूल वातावरण बनवून आपले प्रॉडक्ट बाजारात आणयचे हा हेतू.
पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.
काहीच वर्षात कृत्रिम मांस बाजारात आले , सिंथेटिक दूध बाजारात आले.
खरे प्रायोजक समोर आले .
पण लोकांनी कृत्रिम मांस पण नाकारले आणि सिंथेटिक दूध पण नाकारले.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Wed, 06/15/2022 - 17:25
नवीन
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Wed, 06/15/2022 - 19:44
नवीन
आजच्या घडीला संपूर्ण जगात रिन्यूएबल एनर्जी फक्त ३०% आहे व उरलेली खनिज तेलाद्वारे उत्पन्न केलेली. ह्या व्हिडियोत म्हंटल्या प्रमाणे कार्बन टॅक्स लावला तरी तो भरून आपले उत्पादन चालू ठेवणे हेच कंपन्यांना फायदेशीर आहे. त्यामुळे खनिज तेल किंवा कोळश्याचा उपयोग करून वीज उत्पन्न करणे हे फायदेशीर ठरू शकतं. हल्लीच आलेल्या बातमीवरून असे दिसतंय की भारत सरकार अदानी ग्रुपकडून त्यांच्या ऑस्ट्रेलियातील खाणीतील ८३०८ करोड रुपयांचा कोळसा आयात करणार आहे.
जरी सामान्य माणसाने त्याच्या त्याच्या व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा थोडाफार प्रयन्त जरी केला तरी काहीतरी फरक हा नक्कीच पडेल. रामसेतू बंधनातला हा खारीचा वाटा जरी असला तरी तो स्वागतार्ह आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 06/16/2022 - 07:30
नवीन
बरोबर आहे. व्यक्तिगत प्रयत्न करत रहायला हवेत. मी एकट्याने केल्याने काय होईल असा विचार न करता प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. तसेच पर्यावरण विषयक जागरुक असलेल्या लोकांची संख्या वाढत राहिक्यास उद्योगांवरही पर्यावरणपूरक उत्पादने बाजारात आणण्याकरित अप्रत्यक्ष दबाव निर्माण होईल.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 17:50
नवीन
जलस्तर खाली गेला ह्या विषयी पण सर्रास खोटी माहिती पसरवली जाते.
उपसा वाढल्यामुळे जलस्तर खाली जात आहे.
ते कारण आहेच पण त्या पेक्षा पण बाकी करणे जास्त महत्वाची आहेत पण त्याचा उच्चार कोणी करत नाही किंवा ती कारण चर्चेत पण येऊ दिली जात नाहीत.
१) मोकळ्या जागा कमी झाल्या . काँक्रिट करणं वाढले त्या मुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जावू लागले.
२)दलदली च्या जागा नष्ट झाल्या ह्या दलदलीच्या जागा नैसर्गिक रित्या जळभरण करत होत्या.
३) जंगल कमी झाली.
झाडांची मुळं पाणी धरून ठेवतात पाणी वाहून देत नाहीत.
त्या मुळे जमिनीत पाणी मुरते.
उपसा नाही केला तरी जमिनीतील पाण्याची पातळी ठराविक पॉइंट च्या वर कधीच येणार नाही...
नाहीतर एक दोन हजार वर्षापूर्वी जमिनीवरून पाणी वाहत असते..पण तसे काही पूर्वी घडल्याची नोंद नाही .
आमचा आड होता माझ्या आजोबांच्या काळातील १५० वर्ष तरी जुना असेल त्याची खोली ५० फूट होती.
आणि आज पण त्याच अंतरावर पाणी लागते.
कारण जल भरन करणारी नैसर्गिक स्थिती आज पण जास्त बदलेली नाही.
आणि विविध सरकार नी थोडे फार प्रयत्न पण केले आहेत
तलाव बांधणे,खड्डे खोदणे,झाडे लावणे ह्या योजना राबवल्या आहेत.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/15/2022 - 19:12
नवीन
https://www.bbc.com/marathi/india-61808395
पर्यावरण बदलाचा असा पण परिणाम होईल.मी माझ्या अगोदर च्या पोस्ट मध्ये उल्लेख केला होता झाडे फळं देणे बंद करतील.
त्याची सुरुवात आहे जे कोकणातील हापूस आंब्य विषयी घडतं आहे.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 06/16/2022 - 05:41
नवीन
1. मी आंघोळीला 5 लीटर पेक्षा कमी आणि जेंव्हा शेंपू लावला तरीही 10 लीटर पेक्षा कमी पाणी वापरतो. बाकी साबण शेंपू सर्व हिरवे निशाण वाले वापरतो. फरशीसाठी गोनाईल. कपडे दर तीन दिवसांनी. मशीन सेमी ऑटो. कपडे व्यवस्थित पिळून ड्रायर मध्ये टाकतो. पाणी कमी लागते. बाकी फ्री पाण्यामुळे सकाळी 4 वाजता उठावे लागते. तरच सरासरी 300 लीटर पाणी भरणे शक्य होते. एक फायदा योग आणि व्यायाम करण्याची सवय जडली. याचे श्रेय माननीय केजरिवाल यांना देता येईल.
2. घरात मोठ्या गमल्यांत एक विदेशी पाम ( एक लहान गमल्यात), मधुमालतीची, गिलोय, मोगर्याची वेल, जास्वंद, कढी पत्ता 3 (एक मोठ्या आणी 2 लहान), पारिजात, सदाफुली, तुळशी 3, दोन मध्ये गुलाबाची वेल, दोन आयातकर कमी उंचीच्या गमल्यांत नेहमीच पुदिना राहतो. दोन मध्ये वेळोवेळी हिवाळ्यात टोमॅटो, मिरची, वांगी, पालक, कोथिंबिर झेंडू इत्यादि. झेंडू अजूनही जीवंत आहे. पुन्हा ऑक्टोबर मध्ये लावतो. इत्यादि. रोज तीस लीटर पाण्यात हे सर्व जमते. हिवाळ्यात कमी लागते. जेंव्हा पाणी मुबलक मिळत होते. तेंव्हा जास्त गमले ठेवले होते. पूजेसाठी फुले क्वचितच विकत घेतो.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
गुरुवार, 06/16/2022 - 07:32
नवीन
हा प्रयत्न करुन बघेन. काही वेळा सवयी मोडणं कठीण जातं पण तरी प्रयत्न करेन.
- Log in or register to post comments
स
सुक्या
गुरुवार, 06/16/2022 - 12:02
नवीन
5 लीटर?? आंघोळ 5 लीटर मधे ?
कायतरी चुकतयं
- Log in or register to post comments
स
साहना
Sat, 06/18/2022 - 05:27
नवीन
५ लिटर पाण्यात अंघोळ करणे शक्य नाहीच. आपण मांजर तर नाही ना ?
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Sat, 06/18/2022 - 08:01
नवीन
ते एकतर झिरो ग्रॅविटी मध्ये आंघोळ करत असतील किंवा पाण्याचे सर्फेस टेन्शन कमी करून आंघोळ करत असतील. तसं असेल तर ५ लिटर पाणी म्हणजे पाण्याचा अपव्यय करतात ते.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
गुरुवार, 06/16/2022 - 09:38
नवीन
सरकार ही अशी यंत्रणा आहे त्यांना सुनियोजित कारभार व्हावा आणि लोकांचे आयुष्य ठीक चालावे म्हणून निर्माण केले आहे
सरकार मध्ये सामील असणाऱ्या सर्व दर्जा च्या लोकांना जनता त्यांच्या कुटुंब सहित सांभाळते..मग पंतप्रधान असून किंवा साधा शिपाई.
देशाला धोकादायक अशी स्थिती पर्यावरण हानी मुळे होत असेल तर जे जनतेच्या पैशावर गुजराण करतात त्यांनी उपाय शोधले पाहिजेत.
सरकारी यंत्रणेने हुशार लोकांची मत विचारत घेवून सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून ...उपाय योजले पाहिजेत..जनता पैसा पुरवत आहे स्वतः कष्ट करून ...त्या पैश्याच्या जोरावर सरकार कडे अनेक यंत्रणा आहेत जे जनतेच्या पैशावर उदर निर्वाह करत आहेत...त्यांनी योजना आखून उपाय करावेत..
पाहिले तर नदीत सांडपाणी सोडणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावे
सरकारी विभाग असेल bmc वैगेरे तर महापौर आणि आयुक्त ह्यांना तुरुंगात टाकावे.जर सांडपाणी नदीत जात असेल तर
अनवशक्या चैनी चे प्रॉडक्ट पूर्ण बंद करावेत.. two wheeler ल ६५० cc che इंजिन ..फालतू गिरी
असे प्रॉडक्ट निर्माण करणाऱ्या लोकांना आजन्म तुरुंगात टाकावे .सरकारी यंत्रणा नी प्रामाणिक पने काम केले आणि आपण जनतेच्या पैस्यावर दोन खास खात आहे आणि ऐश करत आहे ह्याची जाणीव ठेवली तर
सर्व अडचणी काहीच वर्षात दूर होतील.
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/16/2022 - 14:44
नवीन
नऊशे सदनिका,सत्तर दुकाने .
सिवेज ट्रीटमेंट प्लान्ट ट्रीटेड पाणी फ्लश आणी बागेत वापरतात
डोमेस्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्लांट,उर्वरक बागेत वापरतात.
रेन हार्वेस्टिंग काही प्रमाणात
इ वेस्ट डिस्पोजल कॅम्प
हे सर्व व्यवस्थित राबवले आहे. परीसरात झाडे,फुलबागा आसल्यामुळे गारवा राहून उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रांचा तुलनात्मक वापर कमी.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sat, 06/18/2022 - 19:50
नवीन
स्तुत्य उपाययोजना
- Log in or register to post comments
स
सुरसंगम
Fri, 06/17/2022 - 10:39
नवीन
सामान्य माणूस करतो हो पण सरकारी जेवढं कार्यलये आहेत तिकडेच बोंब आहे.
पाणी, वीज, जेवण याची अक्ष्म्य हेळसांड चालू आहे.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sat, 09/03/2022 - 13:03
नवीन
संक्षिप्त
अमेरिका
अमेरिकेत मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेने गाठलेला तळ, युरोपातील बहुतांश देशांत पडलेला भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांमुळे कृषी उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे असून त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. आफ्रिका खंडातील २२ दशलक्ष लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागण्याच्या भीतीसह २०२२-२३मध्ये जगात अन्नधान्यांची दरवाढ, टंचाई निर्माण होण्याची शक्यता विविध अहवालांतून व्यक्त केली जात आहे.
‘वल्र्ड इकॉनॉमिक फोरम’ आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सुमारे २५ दशलक्ष लोकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ‘लेक मीड’ या जलाशयाने तळ गाठला आहे. अशी स्थिती १९३७ नंतर प्रथमच निर्माण झाली आहे. कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांमुळे अमेरिकेतील दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, ओरेगॉन, नेवाडा, उटाह आणि न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती सर्वात गंभीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पशुधनाचे उत्पादन कमी होऊ शकते
युरोप
युरोपातील अनेक देशांना वर्षांच्या सुरुवातीपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जुलै, ऑगस्ट महिन्यात या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. युरोपातील नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठीेचे पाणी आणि जलविद्युत क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे.
हाईन, डॅन्यूब, ओडर, लोरी, पो, वाल या प्रमुख नद्यांसह अनेक नद्या कोरडय़ा पडल्या आहेत.
युरोपात गेल्या पाचशे वर्षांतील सर्वात मोठा भीषण दुष्काळ पडला आहे.
चीन
चीन ६१ वर्षांतील भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. यांगत्से नदीचा प्रवाह रोडावला आहे.
शांघायसह अन्य प्रमुख शहरातील दिवे रात्री बंद केले जात आहेत, इतण्या भीषण वीज टंचाईला चीन सामोरे जात आहे. टेस्ला, टोयाटो सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विजेअभावी आपले प्रकल्प बंद केले आहेत.
पूर्ण बातमी /लेख
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/04/2022 - 04:15
नवीन
यांच्या यांच्या नेमके उलट, भारतामध्ये भरपूर पाऊस पडायला लागलेला आहे. चार महिन्याची सरासरी दोन-तीन महिन्यात गाठली जात आहे. कधी न भरणारी धरणे सुद्धा भरून वहायला लागली आहेत.
भारताच्या सध्याच्या राज्यकर्त्यांना अनुकूल अशी भूमिका निसर्ग का घेत आहे काही कळत नाही.
या शेवटच्या वाक्यावरती हा धागा जोरदार पळायला आता काही हरकत नसावी.
:)
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sun, 09/04/2022 - 09:51
नवीन
हवामान बदलाचाच हा ही एक भाग आहे. कुठे सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर कुठे सरासरीपेक्षा कमी.
पण जास्त पावसाच्याबाबत ही एक निरीक्षण असे आहे की पावसाचे दिवस कमी झालेत आणि प्रत्येक दिवशी पडणारा पाऊस खूप जास्त असे होत आहे. माझे पुर्ण आयुष्य पिंपरी चिंचव॑ड शहरात गेले आहे आणि हे निरीक्षण अगदी खात्रीने मलाही जाणवत आहे गेले ३-४ वर्षांपासून.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/04/2022 - 11:07
नवीन
मी पण थोडासा सहमत आहे.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 09/04/2022 - 09:55
नवीन
वर्षानुवर्षे धरणांतील गाळ उपसला न गेल्यामुळे त्यांची साठवणक्षमता पुर्वीपेक्षा कमी झाली असेल आणि त्यामुळे ती लवकर भरत असतील अशी काही शक्यता असू शकते काय ?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 09/04/2022 - 11:10
नवीन
थोडासा परिणाम गाळामुळे होणार हे नक्की.
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sun, 09/04/2022 - 13:12
नवीन
अमेरिकेत सध्या उष्णतेची लाट आली आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कॅलिफोर्निया राज्यातही सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये 53 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
निसर्गाची हानी होत असल्यानं, निसर्गाने आपला प्रकोप केला आहे. आपल्याला उष्णतेच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी दिली. पृथ्वीला तीव्र पूर आणि वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे गेविन यांनी सांगितले. राज्यातील ग्रीड ऑपरेटर्संनी वीज तोडण्याचा इशारा दिल्याने लोकांच्या अडचणी वाढू शकतात. ग्रीड ऑपरेटरने संभाव्य वीज संकटाचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळं वीज खंडित होत असल्याने ई-वाहन चालकांना त्यांच्या वाहनांचे शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याने जनतेसाठी कूलिंग सेंटरही उभारले आहेत. 2020 च्या उन्हाळ्यापासून कॅलिफोर्नियाच्या ग्रीडसाठी ही सर्वात मोठी चाचणी आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील काही भागात भीषण वीज संकट होते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळं युरोपमधील ऊर्जा संकट वाढत असताना सध्याचे संकट आले आहे. यासह, जगभरातील हवामान बदलामुळं विक्रमी तापमानात वाढ होत आहे.
पूर्ण बातमी
- Log in or register to post comments
त
तर्कवादी
Sun, 09/04/2022 - 13:16
नवीन
ही थोडी जुनी बातमी आहे
सध्या ब्रिटनमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. देशातील बहुतांश जलस्रोत आता कोरडे पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा थेम्स नदीवर देखील परिणाम झाला आहे.
बातमी
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2