परदेशी गेलेले भारतीय
दरवर्षी लखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. लाखो भारतीय नागरीक नोकरीसाठी परदेशी जातात. कधीतरी अनपेक्षितरित्या परदेशात गंभीर परिस्थिती निर्माण होते, जीवीताला धोका नोर्माण होतो. अशावेळी परदेशस्थ भारतीय साहजिकच भारत सरकारने आपली सुटका करुन आपलाला भारतात सुखरूप परत न्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतात, सरकारला विनंती करतात, त्यांचे नातेवाईक सरकारला विनंती करतात. सरकारही तसा प्रयत्नं करतं
सध्या युक्रेन युद्धामुळे तिथे असलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आणि सरकारने आपली सुटका करावी अशी विनंती विद्यार्थी व पालक यांनी केली. सरकारने अर्थातच योग्य हालचाली करुन त्यांना परतही आणलं. अशा घटना यापूर्वीही घडल्या होत्या.
मात्र यावेळचं चित्र जरा वेगळं, किंबहुना विपरीत आहे.
हे सर्व विद्यार्थी स्वांत सुखाय, स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी गेले आहेत. युद्ध सुरु होण्याआधी अनेक दिवस या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला फुकट नेलं पाहिजे असा त्यांचा आणि पालकांचा आग्रह का? आखातात गेलेया हातावर पोट असलेल्या कामगारांना फुकट आणणं समजण्यासारकहं आहे. सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एकिकडे अनेक विद्यार्थी व पालक कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक विद्यार्थी उद्धटपणे बोलताना, अरेरावी करताना दिसून आले आहेत. "आम्हाला अनेक मैल चालावं लागलं मग सरकारी विमान मिळालं, जेवणखाण चांगलं नव्हतं, स्वच्छ्तागृहं स्वच्छ नव्हती, आम्हाला आणलं तर उपकार केले का? अशी भाषा वापरताना काही विद्यार्थी दिसत आहेत. काही वायरल व्हिडीओ मध्ये विमानतळावर स्वागथार्थ आलेले सरकारी अधिकारी/ मंत्री यांची दखल न घेता वा त्यांनी केलेल्या स्वगताला प्रतिसादही न देता विद्यार्थी दिसत होते.
तर अशा स्वस्खुशीने स्वांतसुखाय परदेशी गेलेल्या आणि जाणीवपूर्वक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने फुकट का आणावे?
आता तर या विद्यार्थ्यांना तिथे परत जाणं शक्य नसेल तर इथल्या वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी यांच्यापायी आपलं नुकसान का सहन करावं?
हे म्हणजे बँकेत व्याज कमी मिळतं म्हणून नफा कमावण्यासाठी शेअरमध्ये पैसे गुंतवणार्यांनी बाजार आपटल्यावर सरकारकडे नुकसान भरपाई मागण्यासारखं आहे
मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल
🗣 चर्चा
(60)
इ
इरसाल
गुरुवार, 03/10/2022 - 11:15
नवीन
बर झालं ना अस कोणी म्हटलं नाही आणी थांबल नाही तिकडे ते.
उगाच "नीम हकीम खतरा ए जान" कशाला ओढवुन घ्यायची. वरुन रशिया जीव घेतोय तर जमिनीवर हे लोकं जीव घेताय अस झालं असत म्हणजे?????
(रेफ. भारतातुन ओवाळुन टाकलेले भाबडे जीव तिकडे वैद्यकीय शिक्षण घ्याय्ला गेलेत)
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Wed, 03/09/2022 - 04:07
नवीन
युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या दुसऱ्या शहरात हलवले आहे. तिथून त्याना भारतात आणले जाईल. अत्ता भारतात आल्यावर त्या विद्यार्थ्यांचा attitude बघण्यासारखा असेल.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 03/09/2022 - 09:35
नवीन
जी मुल युक्रेन मध्ये शिक्षण घेण्या साठी गेले आहेत.
त्याचे कारण भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा देवू शकतं नाही
भ्रष्ट सरकार आणि बोल बच्चन राजकीय पक्ष फक्त फेकत असतात.
आता युक्रेन मध्ये जी मुल आहेत.
त्यांना तेथील स्थानिक प्रशासन,आणि बाजू च्या देशातील सरकार मदत करत आहेत.
सर्व सुविधा पुरवत आहे.
भारत सरकार काही ही करत नाही.
फक्त जाहिरात आणि श्रेय घेत आहे.
भारत सरकार फक्त विमान पाठवून त्यांना भारतात आणत आहे.
आणि तो देशाचा पैसा खर्च होत आहे.
कोणत्या ही राजकीय पक्षाचा होत नाहीं
ते विमान तिकीट चे पैसे ती मुल देतील.
तुम्ही मागणी करा .
तुम्हाला जाहिरात पण करायची आहे,स्वतःची लाल पण करायची आहे.
आणि मागे भक्त बदनामी पण करत आहेत तरी तिकडे दुर्लक्ष पण करायचे आहे.
सर्व फायदे पाहिजेत.
लोक मूर्ख आहेत का?
- Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर
Wed, 03/09/2022 - 14:35
नवीन
लोक म्हणजे तुम्ही ना? शक्य तरी आहे का मूर्ख असणे?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/10/2022 - 09:06
नवीन
भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा देवू शकतं नाही....
हे कधीपासून?
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 03/10/2022 - 17:50
नवीन
शिक्षणावर डाव्यांचा असर आहे, व्यवसायिक शिक्षण नाही, समान संधी नाहीत म्हणून ओपन कॅटेगरीची हुशार पोरे परदेशी जाऊन ब्रेनड्रेन होतोय वगैरे वगैरे आरोप आपण आधीपासून ऐकले नाहीत का आता अवचितच भारतात उत्तम शिक्षण मिळत असल्याचे आपल्यास आपल्याला साक्षात्कार झालाय मुवि ?
एक जुना धागा सापडला बुआ उद्बोधक
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 03/10/2022 - 09:15
नवीन
"भारत सरकार काही ही करत नाही."
"भारत सरकार फक्त विमान पाठवून त्यांना भारतात आणत आहे."
अनमोल तर्क वाचून धन्य झालो .. प्रभूंचे पाय दावा कोणीतरी
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 03/09/2022 - 17:13
नवीन
अर्ध शतक निम्मित sunil kachure सायबांचा सत्कार युक्रेन चे तिकीट देऊन करण्यात येत आहे .
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 03/10/2022 - 11:19
नवीन
आजपासुन मी,
श्री. सुनिल कचुरे(काचुरे), श्री. संजय राउत, श्री. कमाल राशेद खान, श्री. मुन्नवर राणा यांचा न बिघडणारा पंखा (आजन्म) झालो हे घोषित करतोय.
(पुन्हा एकदा प्रयत्न करुन बघतो...) सर तुम्ही ऑनलाईन क्लास घेता कां?
- Log in or register to post comments
न
नगरी
गुरुवार, 03/10/2022 - 16:49
नवीन
माझा धाकटा भाऊ,त्याचे आवडीचे वाक्य,शिकलेले तितका हुकलेला! आज पटले.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2