Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाराष्ट्रीय सण आणि होत असलेली भेसळ ( ? )

ब
बापूसाहेब
Tue, 10/19/2021 - 20:02
🗣 129 प्रतिसाद
आज कोजागिरी पौर्णिमा. लहानपणापासून मी पहात आलोय की आजच्या दिवशी मातीच्या किँवा इतर कोणत्याही भांड्यात दूध तापवून ते उकळवले जाते, आकाशातील पूर्ण चंद्र दिसत असतो. त्याची प्रतिबिंब दुधात पडेल अश्या ठिकाणी ते उकळवून नंतर घरातील सर्व जण ते दुध पितात.. परंतु आजकाल अश्या पद्धतीने सण साजरा न करता आमच्या इथे दांड्या खेळल्या जातायत. सर्व अरेंजमेंट मारवाडी फॅमिली ( संख्या फक्त २) आहे त्यांनी केलेली आहे... गाणी पण बहुतांश मारवाडी आहेत. नाचणारे ९८ टक्के मराठी आहेत. अर्थातच असं करायला विरोध नाही पण हे करताना आपण आपले सण साजरा करण्याची पद्धत विसरत चाललोय का ?? दसऱ्याच्या दिवशी घरी सोने ( अपट्याची पाने ) द्यायला लहान मुले आले होती ( मराठी ७-८ आणि ईतर भाषिक १-२ ). परंतु सर्व जण " हॅप्पी दसरा " असं म्हणतं होती. सोन घ्या सोन्यासारखे रहा असं म्हणण्याची पद्धत कुठे गेली ते समजेना. मकर संक्रातीच्या दिवशी पण " तिळगूळ घ्या गोड बोला " मागे पडून हॅपी मकर संक्रांती आणि पतंगबजी वाढत चाललीय. आम्हीं लहान असताना नवरात्रीत दांडिया खळण्यासाठी जायचो तेव्हा सर्व मराठी आणि हिंदी गाणी वाजवली जायची. कृष्णाचे गवळणी, गणपतीची गाणी , अंबेमातेची आणि इतर हिंदी गाणी वाजायची ( हे नाम रे .. सबसे बडा तेरा नाम हे गाणे तोंडपाठ होते. ) पण आमच्या गल्लीत मारवाडी , गुजराती गाणी वाजत होती... आणि विशेष म्हणजे त्यावर नाचणारे ९० टक्के मराठी होते. त्यामुळें मराठी लोकांना मराठी गाणी वाजवायला "लाज " वाटते का असा विचार मनात येऊन गेला. नवरात्रीत जे काही दांडिया कार्यक्रम होतात तेथे मराठी लोक साड्याऐवजी किंवा मराठी पेहरावा ऐवजी गुजराती ड्रेस का घालतात ? हीच गोष्ट लग्नात देखील.. मराठी मुलं आणि मुली विदेशी किंवा इतर धर्मीय पेहराव का करतात. उदा. मुली साडी सोडुन वेडिंग ड्रेस ( ख्रिश्चन लोकामध्ये घातला जातो तसा) किंवा घागरा घालतात.. याउलट कोणत्याही ख्रिश्चन मुलीने किंवा गुजराथी मुलीने लग्नात नऊवारी साडी घातलेली मी आजवर पहिली नाही.. पूर्वी हत्ती नक्षत्रात भोंडला/ हतका /हादगा हा खेळ / सण साजरा केला जायचा. पण बहुतेक आता नामशेष झाला. मी गेल्या ५-६ वर्षात कोणत्याही मुला मुलींनी हा प्रकार साजरा केल्याचे पाहिलेले नाही. ही पद्धत नष्ट झाली का ?? एलामा पैलामा.. आज कोन वार बाई आज कोन वार.. अशी अनेक गाणी आजही मला पाठ आहेत. पण आजकाल बहुतांश मराठी मुलांना किंवा मुलींना हे महिती आहे?? आणि ईथे ( महाराष्ट्रात) आल्यावर इथले पाहून किती मारवाडी गुजराथी लोकांनां ही गाणी महिती आहेत?? आमच्या वेळी रंगपंचमी आणि होळी हे दोन वेगवेगळे सण होते. आजही कोणतेही कॅलेंडर उघडुन पहा दोन्ही सण वेगवेगळे दाखवलेले आहेत. होळीच्या दिवशी आम्ही होळी पेटवायचो. पुरण पोळी खायचो. आणि रंगपंचमीला रंग खेळायचो. पण आता रंगपंचमी हा सण राहिलेला नाही... आणि होळीच्या दिवशी होळी कोणी पेटवत नाही ( पर्यावरण ह्या विषयावर ईथे चर्चा नको ). याउलट होळीच्या दिवशी रंग खेळले जातात.. आणि "हॅपी होली " च्या मेसेज ने इनबॉक्स फुल होतो. ज्या पद्धतीने आपण मारवाडी , गुजराती इ लोकांना सामावून घेउन त्यांच्या कलाने आपले सण साजरे करतोय त्या पद्धतीने ते लोक आपले सण साजरे करताना दिसत नाहीत. मी आजवर कोणी इतर भाषिक व्यक्तिने किंवा फॅमिली ने गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला असं पाहिलेले नाही. किंवा हद्ग्याची गाणी म्हणत फेर धरलेले आठवत नाही. पुण्यात याआधी कधीही न दिसणारी कबुतरे आता प्रत्येक चौकाचौकात उदंड संख्येने आलेली आहेत, याला कारणीभूत जैन आणि मारवाडी लोक आहेत. अर्थात कोणी कोणाला काय खायला घालावे हा त्यांचा प्रश्न पण मी पाहिले की हिच लोक इथे येऊन सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ वेळी वर्गणी देताना चींधिगिरी करतात पण आपली प्रथा आहे म्हणून पुण्यात जागोजागी कबुतरांच्या शिटा पसरवून ठेवलेत, त्यांना घातलेले खाद्य कुजून कुजून जाते पण तरीही ते शेकडो / हजारो रुपये महिना खर्च करतात. .. या लोकांचं पाहून आजकाल मराठी लोक देखील अश्याच पद्धतीने कबुतरांना खाद्य घालून " पुण्य " कमवू पाहतायत... दिवाळीच्या सणाच्या वेळी पण पारंपरिक फराळ नामशेष होऊन सोनपापडी, बिस्किटे, चॉकलेट इ प्रकार वाढत चाललीय आहेत. कोणी इतर भाषिक इथे येऊन इथल्या लोकांप्रमाणे चकल्या, लाडू, करांजिर करताना दिसत नाहीत. पण इथले लोक त्यांचं पाहून सोनपापडी कडे वळले. तर.. चर्चेचा मुद्दा हा की आपण आपले सण साजरे करायची पद्धत बदलत चाललोय का. ? ईतर भाषिक लोकं यांनी इथे आल्यावर इथल्या संस्कृतीत मिक्स होण्याऐवजी अल्पसंख्य असुन सुध्दा संस्कृतीक आक्रमण करत आहेत का?? की आपण होऊन आपल्या पद्धती सोडुन या नव्या पद्धती आत्मसात करत आहोत. ? आणि जर करत आसु तर का करतोय? याचे दूरगामी परिणाम काय होतील?? मी जे काही वर लिहिलय ते माझा गैरसमज आहे का ?? इतर मिपाकर या बाबतीत काय विचार करतात ?? टीप - हा धागा राजकीय हेतूने किंवा इतर भाषिक लोकांच्या द्वेष करण्यासाठी काढलेला नसुन आपल्या सण आणि परंपरा यामध्ये भेसळ होतेय की नाहीं या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी काढला आहे. मी माझी मते मांडली आहेत.. ती बरोबरच आहेत असं माझं म्हणणं नाही. मी कदाचित चुकीचा असू शकेल. धाग्याला मोदी ,.bjp , मनसे इ राजकीय संघटना कडे नेऊ नये.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39854 views

🗣 चर्चा (129)
M
mangya69 Sat, 10/23/2021 - 11:20 नवीन
कॉलेज , करियर , इंटरव्ह्यू इथे इंग्रजी चालते , रादर इंग्रजीच चालते मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 10/24/2021 - 08:18 नवीन
राजेशाचा राग हिंदीवर नसुन हिंदी भाषिकांवर असावा. पुढच्या खेपेस त्याचा आवडीचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर आला तर तो "हिंदी बोलण्यात गैर काय ?" असे येथेच विचारेल.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 10/25/2021 - 02:46 नवीन
मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ? मंग्या हा कसला तर्क आहे ? भारतात ४ विविध भाषिक लोक एकत्र गप्पा मारत असतील तर त्यातील २ मराठी लोक्कानी मराठी बोलवे असे कोणी म्हणत नाहीये ( ते शिष्टचाराला धरून होणार नाही ) परंतु २ मराठी माणसांनी खाजगीत एकमेकात कारण नसताना इतर भाषेत बोलण्याचे कारण काय? स्थानिक भाषा हि शिकली पाहिजे यात शंका नाही , प्रयत्न करणे तरी महत्वाचे आहे ४० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी ना बोलणारे लोक आहेत .. लाज वाटत नाही त्यांना .. ! आणि मराठी माणसाला देवनागरी मुले हिंदी जवळची वाटते हे जरी नैसर्गिक असले तरी मराठी चे खच्चीकरण करून हिदि स्वीकारणे हा मूर्खपणा आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 10/25/2021 - 02:49 नवीन
मग बोलले कुणी हिंदीत आपल्याशी तर लगेच आपण फुत्कार का काढायचा म्हणे ? मंग्या हा कसला तर्क आहे ? भारतात ४ विविध भाषिक लोक एकत्र गप्पा मारत असतील तर त्यातील २ मराठी लोक्कानी मराठी बोलवे असे कोणी म्हणत नाहीये ( ते शिष्टचाराला धरून होणार नाही ) परंतु २ मराठी माणसांनी खाजगीत एकमेकात कारण नसताना इतर भाषेत बोलण्याचे कारण काय? स्थानिक भाषा हि शिकली पाहिजे यात शंका नाही , प्रयत्न करणे तरी महत्वाचे आहे ४० वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी ना बोलणारे लोक आहेत .. लाज वाटत नाही त्यांना .. ! आणि मराठी माणसाला देवनागरी मुले हिंदी जवळची वाटते हे जरी नैसर्गिक असले तरी मराठी चे खच्चीकरण करून हिदि स्वीकारणे हा मूर्खपणा आहे
  • Log in or register to post comments
M
mangya69 Mon, 10/25/2021 - 04:22 नवीन
मला 3 भाषा येतात , त्यालाही 3 येतात , आता त्यांनी कोणत्या भाषेत बोलायचे हे ते ठरवतील. शाळा मराठी मीडियमची असूनही इंग्रजी शाळेत 6 तास मुले शिकतात , तेंव्हा मराठीचे खच्चीकरण होत नाही का ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 10/25/2021 - 06:07 नवीन
भारतीय सर्व भाषा जरी बोलता येत असतील तरी समोरच्याला आणि आपल्याला इंग्रजी बोलता येत असेल तर प्रदेश कोणताही असो कोणाच्याच अस्मिता दुखावल्या जात नाहीत, परंतु त्या प्रदेशातील भाषेऐवजी अन्य भारतीय भाषेत बोलले तर लगेच अस्मिता जागृत होते.
  • Log in or register to post comments
M
mangya69 Sat, 10/23/2021 - 11:31 नवीन
मुळात परशुराम , शिवाजी महाराज , 1 मे , 15 ऑगस्ट , 26 जानेवारी इ सोडले तर उर्वरित सणामागे घटनांचा आणि महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नव्हता, मग त्यातील परंपरा आपल्या खऱ्या की यूपीबिहारवाल्यांच्या खऱ्या ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 10/23/2021 - 12:16 नवीन
तसाच मंग्या ६९ ची थाप आहे. १) बेंदुर. २) विविध गावातील यात्रा. ३) वट पौर्णिमा. ४) विजया दशमी हा महाराष्ट्र मध्ये जसा साजरा होतो त्याच आणि यूपी,बिहार चा काहीच संबंध नाही ५) दिवाळी महाराष्ट्रात जशी साजरी होती त्याच्याशी यूपी ,बिहार चा काडी चा संबंध नाही १५aug आणि २६ जानेवारी हे सण नाहीत. ६) आषाढी वारी महाराष्ट्र च आहे.यूपी बिहार चा काडी चा संबंध नाही. सार्वजनिक गणेश ustav ह्याचें उगम स्थान च महाराष्ट्र आहे. यूपी,बिहार आणि महाराष्ट्र ह्यांची संस्कृती कुठेच एक नाही . तसे त्यांचे ustav पण एक नाहीत. फक्त राम नवमी ,गोकुळ अष्टमी हे त्यांचेच सण आहेत महाराष्ट्र नी उगाचच स्वीकारले आहेत.
  • Log in or register to post comments
M
mangya69 Sat, 10/23/2021 - 12:44 नवीन
तुमचे ते बेंदूर वगैरे आम्ही इ ह्या एका अक्षरात घातलेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 10/23/2021 - 13:36 नवीन
त्यांचे उगम मक्का मदिना किंवा त्याच्या आजू बाजू च्या प्रदेशात आहे .रिती परंपरा पण त्याच प्रदेशात उगम पावल्या आहेत.तरी भारतीय मुस्लिम ते सर्व पळतात ना. सर्वांची पद्धत एकसारखी असते का? प्रदेश नुसार काहीतर फरक होत गेलाच असेल. तसेच हिंदू धर्माचे आहे. भारतीय मुस्लिम लोकांना भारताचा अभिमान असतो को दुसऱ्या मुस्लिम देशांचा.? तसेच आहे महाराष्ट्र तील सन ,रीतिरिवाज ह्यांचा बाकी राज्याशी संबंध असला तरी आम्हाला मराठी पद्धतीचा अभिमान आहे.
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 10/23/2021 - 12:41 नवीन
आजचा एक किस्सा. एका मुस्लिम भागात काहीतरी घ्यायला थांबलो होतो. तर तिकडे एक मुस्लिम बाई कोळंबी विकत होती. तिच्याशी एक बुरखावाली बाई उर्दू मिश्रित हिंदीत बोलत होती. मी नेहमीप्रमाणे मराठीत तिला विचारलं कशी दिली कोळंबी. मग ती विकणारी बाई माझ्याशी मराठीत बोलायला लागली. तिचं मराठी ऐकून ती बुरखा वाली बाई पण तिच्याशी मराठीत बोलू लागली. ते पण अगदी चांगलं मराठी. माझ्यामुळे त्यांना शोध लागला एकमेकींना चांगलं मराठी येतं ते.
  • Log in or register to post comments
M
mangya69 Sun, 10/24/2021 - 06:53 नवीन
आजकाल सगळे लोक धान्य निवडलेलेच आणतात , पीठ तयार विकत आणतात. घरात चाळण मिळणे मुश्किल आहे. खिसणी किंवा गाळणे वापरावे लागेल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 10/24/2021 - 18:24 नवीन
नवीन चाळण घेतली जाते.नसेल घरात तर.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 10/25/2021 - 09:13 नवीन
आता ही मराठी नटी पहिला करवाँ चौथ साजरा करणार म्हणे ! अश्या परप्रांतीयांशी लग्न करणार्‍या मराठी नट्या म्हणजे वेगळेच प्रकरण आहे ! सोमि त्यांच्या बारिकसारीक गोष्टींना प्रसिद्धी देत त्या-त्या संस्कृतीचा उदोउदो करतात !
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 10/25/2021 - 13:48 नवीन
आता परप्रांतियाशी लग्न केलंय तर त्या त्या प्रथा पण पाळणार. मला तरी त्यात काही गैर वाटत नाही. आणि उलटंही होत असेलच ना. कुणी सांगावं तिचा नवरा गुढी उभारेल. पुर्वी एकदा एका मराठी मित्राच्या घरी त्याची एक मैत्रीण भेटली, ती बर्‍यापैकी छान मराठी बोलत होती पण तरी नंतर म्हणाली की "मी मराठी अजून शिकतच आहे त्यामुळे फारसं चांगलं येत नाही" मग माझ्या मित्राने सांगितलं की तिचं एका मराठी सहकर्‍यासोबत प्रेम जुळलं आणि त्या मुलाच्या आईने लग्नाला अनुमती देताना अट घातली की तिला मराठी शिकावं लागेल आणि त्यामुळे ती मराठी शिकली. प्रेमाखातर हे सगळं चालायचंच...
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 11/10/2021 - 03:54 नवीन
गुजराथी, दाक्षिणात्य असे सगळे लोक मराठी शिकतात व बोलतातही असे दिसते. बहुतांशी हिंदी भाषिक लोकांना मात्र मराठी भाषा शिकायची इच्छा नसते.
त्या त्रिभाषासूत्राला काडी लावायला हवी पहिले, म्हणजे मराठी, गुजराती, बंगाली, तामिळी, तेलगू लोकांनी इंग्रजी, मातृभाषा अन हिंदी अश्या तीन भाषा शिकायच्या शाळेत अन हिंदी गायपट्टा निवासी मात्र इंग्रजी अन हिंदीच शिकणार ! हे व्यस्त प्रकरण वाटते, कुठल्याही बिगरहिंदीभाषिक राज्यात रोजगाराच्या निमित्ताने जाणे असेल तर ती भाषा ह्या भय्या लोकांनी शिकायला हवीच, पर्यटक, यात्रेकरू वगैरेंना त्यासाठी ताणून धरण्यात अर्थ नाही. हिंदी लोक अवास्तव रिजिड असतात "ऐसे थोडे ही होता हैं यार" म्हणत जिथं तिथं स्वतःच्या परंपरा चालीरीती सगळं घुसडणार हे अन वरतून लोकांना अकला शिकवणार गावभरच्या. म्हणजे ह्यांना पोसून वरतून ह्यांचे ऐकून घ्या.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Fri, 11/12/2021 - 13:17 नवीन
तिसरी भाषा का हवी हे कळायचे असेल तर हिंदी भाषिकांना तमिळनाडूत आणि तमिळ भाषिकांना उत्तरेत जो त्रास होतो त्याबद्दल विचार करावा. आपल्याला देशाची भाषा इंग्लिश व्हावी असे वाटले तरी ते शक्य नाही. समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही. आणि त्यांना एकमेकांशी बोलायचे (उदाहरणार्थ सैन्यात किंवा कामधंदे, नोकरी इत्यादी वेळी) तर एक कॉमन भाषा आवश्यक आहे. मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवी. तुम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलताय. भारताची बरीच लोकसंख्या दुसऱ्या राज्यात तात्पुरत्या प्रकारे रहाते. तिच्या कामकाजासाठी अशी तिसरी कॉमन भाषा आवश्यक आहे कारण लोकल भाषा शिकणे हे जर तुम्ही बऱ्याच वर्षांसाठी रहात असाल तरच शक्य होते. शिवाय राज्यांनी एकमेकांशी बोलायचे तर एक कॉमन भाषा हवी. ती इंग्लिश हवी असा हट्ट तुम्ही धरत असाल तर एका मोठ्या लोकसंख्येला सिव्हिल सर्व्हिसेस मधून वगळावे लागेल.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 11/12/2021 - 20:08 नवीन
मग ती हिंदी ऐवजी दुसरी कुठली केली (उदाहरणार्थ संस्कृत अथवा उर्दू) तरी चालेल, पण एक भाषा हवी
तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे. उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय. सरकारात, व्यवसायात, सामान्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्लिशचा सढळहस्ते वापर होतो. इंग्लिश शिकण्यासाठी, तिचा वापर वाढण्यासाठी भरपुर साधने सहज उपलब्ध आहेत. जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे. मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/13/2021 - 05:36 नवीन
संगणकाची भाषा हि अजून तरी ( आणि येत्या काळात पण तशीच असण्याची शक्यता आहे) इंग्रजीच आहे. तेंव्हा इंग्रजी नको चा दुराग्रह आपल्याला खड्ड्यात टाकेल यात शंका नाही. इंग्रजीच्या बरोबर आपली मातृभाषा कशी वाढवता येईल याचा विचार करावा. मी तर उलट म्हणेन कि जेथे जाल तेथील स्थानिक भाषा नक्कीच शिकून घ्या. त्याचा खूप फायदा होतो. जिथे तिथे अगतिक व्हायला होणार नाही. उदा आपण जर आखातात नोकरीसाठी जाणार असाल तर अरबी भाषा जरुर शिकून घ्या.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 11/14/2021 - 19:41 नवीन
तुमचे मुद्दे बरोबर आहेत. पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाही. खासकरुन चीन , जापानमधली इंग्लिश प्रोफिशियन्सीचे आकडे खूप जास्त लिहिले आहेत (५१% च्या आसपास). माझ्या मते तरी या दोन्ही देशांतील खूप कमी लोकांना इंग्लिश भाषा येते.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sun, 11/14/2021 - 19:44 नवीन
तसेच सिंगापूरची टक्केवारी (६३%) ही कमी वाटते. सिंगापूरमध्ये इंग्लिश हीच मुख्य भाषा आहे
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sun, 11/14/2021 - 23:43 नवीन
तुमचे मुद्दे बरोबर आहेत.
धन्यवाद!
पण दिलेल्या लिंकवरील विदा विश्वासार्ह वाटत नाही
मी दिलेला दुवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आहे. विदा पण त्यांचाच आहे. इंग्लिश ही प्राथमिक भाषा नसलेल्या देशांबद्दल ती माहिती आहे. तुम्हाला तो विदा विश्वासार्ह वाटत नसेल तर ठीक आहे, काही जबरदस्ती नाही. तुमच्याकडे अयोग्य वाटणार्‍या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 11/15/2021 - 11:45 नवीन
तुमच्याकडे अयोग्य वाटणार्‍या माहितीबद्दल ( उदा. चीन, जपान, सिंगापूरची टक्केवारी) विरोधी विदा असेल तर शेअर करा.
विदा मी शोधला नाही पण गेली अनेक वर्षे मी जपानकरिताचे प्रोजेक्ट मॅनेज करत होतो. माझ्या टीममधले अनेकजण कमी अधिक काळ जपानमध्ये राहून आलेत त्यांच्या अनुभवानुसार मोठ्या वाहनकंपनीत काम करणार्‍या सुशिक्षित नोकरदारांनाही इंग्लिश फारशी येत नाही. माझ्या सहकार्‍यांना बँक व इतर ठिकाणी जपानी भाषा येत नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. माझाही मिटींग्जमध्ये असाच अनुभव . क्लायंटकडील खूप कमी लोकांना इंग्लिश येते. त्यातही अनेकांचे इंग्लिश तोडके मोडके काम चलाऊ असते. अनेकजण तर इंग्लिशमधून इमेल पाठवताना नक्कीच बेधडकपणे गुगल ट्रान्सलेटर वापरत असावेत असे जाणवते यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही... तर याउलट सिंगापूरबद्दल मी वाचले आहे (आता सगळा तपशील आठवत नाही) की तिथल्या एका अध्यक्षाने - जो खूप काळ तिथला अध्यक्ष होता आणि सिंगापूरच्या प्रगतीचा जनक मानला जातो त्याने विविधभाषी असलेल्या या देशात इंग्लिश हीच प्रमुख व्यवहाराची भाषा असावी म्हणून खूप आग्रह धरला, कायदे केलेत त्यामुळेच तिथे फक्त ६३% लोकांना इंग्लिश येत असेल हे फारसे पटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 11/15/2021 - 23:27 नवीन
यामुळेच ५०% जपान्यांना इंग्लिश येते यावर विश्वास बसत नाही...
तो विदा किती टक्के जनतेला इंग्लिश येते असा नसून इंग्लिश बोलणार्‍या जनतेची प्रोफेशिएन्सी किती आहे त्याचा आहे. थोडी शोधाशोध केली असता त्यांची परिक्षा घेण्याची पद्धत वगैरे तपशिल मिळाले.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Mon, 11/15/2021 - 08:03 नवीन
तुमचे लॉजिक इंग्लिश साठी आहे की,समाजाच्या अतिशय मोठ्या भागाला इंग्लिश कळत नाही (ते लॉजिक योग्य आहे का अयोग्य त्यावर पुढे) तेच लॉजिक संस्कृत अथवा उर्दू, किंवा कोण्त्याही इतर भाषेसाठी पण तितकेच लागू आहे.
जेव्हा दोन भिन्नभाषी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करतात, तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपले एकमेकांना समजत नाही तेव्हा त्या एक कॉमन भाषा शोधायचा प्रयत्न करतात. सध्या इंग्रजी आणि हिंदी हे दोन ऑप्शन आहेत. इंग्लिश शहरामध्ये बहुतांशी प्रमाणात चालते, पण जर तुम्हाला ओरिसा मध्ये रिक्षा पकडायची असेल किंवा पंजाब मध्ये सामान्य दुकानात सामान खरेदी करायचे असेल तर तुम्ही कोणती भाषा वापराल? मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा. इंग्लिश जेमतेम 10% भारतीयांना (त्यातही बहुतांशी जणांना अतिशय जुजबी स्वरूपात) येत असेल. थोडक्यात सांगायचे तर अशा भाषेचा शोध घेताना आपल्याकडे हिंदी शिवाय दुसरा पर्याय नाही.
उलट इंग्लिशच्या बाबत मात्र ते तितकेसे सार्थ ठरत नाही. अमेरिकेपाठोपाठ जगात इंग्लिश बोलणारे लोक भारतात सगळ्यात जास्त आहे. द्विभाषा, त्रिभाषा सुत्रामुळे इंग्लिश सगळीकडे पोचली आहे. वाढत्या शैक्षणिकरणामुळे आणखीन प्रसार होतोय.
लोक जास्त आहेत हे खरे, पण त्याचे कारण लोकसंख्या जास्त आहे. पण जेव्हा आपण % मध्ये बोलतो तेव्हा त्यात फरक पडतो. शिवाय आपण इंग्लिश ही ज्ञानभाषा म्हणून मान्य केलीच आहे, पण याचा अर्थ ती सामान्य व्यवहाराची भाषा होईलच असे नव्हे. उलट हिंदी चा प्रसार हा त्या मानाने समाजाच्या फार खालच्या थरात फार झपाट्याने होतो आहे. जगात आपली इंग्लिश प्रोफेशिएन्सी पण चांगली आहे.
मग इतक्या जमेच्या बाजू असताना, इंग्लिश का नको?
इंग्लिश नको असे कुणीच म्हटलेले नाही. पण तुम्ही theoretical मुद्दे मांडताय आणि मी प्रॅक्टिकल. ता.क. "हिंदी नको" चे मुद्दे काय आहेत? 1. एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का? तसंही आपण हिंदी चित्रपट पाहतोच. त्यावर का आक्षेप नाही मग? आणि असं अर्ग्युमेंट करणारे किती जण तो हिंदी भाषेत आहे म्हणून तो पहात नाहीत? 2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 11/15/2021 - 11:31 नवीन
माझ्या मते इथे कुणाचा विरोध हिंदीला नसावा. मी मराठी असलो तरी इतर राज्यात खासकरुन उतरकडील राज्ये, गुजरात, गोवा ई ठिकाणी गेल्यावर हिंदीत बोलायला माझी काहीच ना नाही. पण महाराष्ट्रात मला पदोपदी हिंदी बोलावं लागत असेल कारण काही आडमुठे हिंदी भाषिक व्यावसायिक मराठी शिकण्यास उत्सुक नाहीत म्हणून तर त्याबद्दल अशा हिंदी भाषकांना माझा विरोध आहे. बाकी तामिळनाडूत अगदी चेन्नई या राजधानीच्या शहरातही हिंदी व्यवहाराची भाषा म्हणून बर्‍यापैकी निरुपयोगी ठरते ही गोष्ट वेगळी. या निमित्ताने मला माझ्या पहिल्या नोकरीतील (स्थळ - पिंपरी, पुणे) पहिल्या मॅनेजरची आठवण झाली. साठी जवळ आलेले हे तामिळ गृहस्थ होते. कंपनीत अधिकारी वर्गात औपचारिक भाषा जरी इंग्लिश असली तरी अनेकदा अनौपचारिक संभाषण मराठी , हिंदीत होत असते. पण या मॅनेजरचा हिंदीला पुर्ण विरोध. कुणी चुकून जरी एखादं वाक्य त्यांच्याशी हिंदीत बोलला तर ते त्यांच्या नेहमीच्या फटकळपणाने ऐकवायचे " you speak in English or Tamil or you can speak in Marathi. I understand only English & Tamil. But I will learn Marathi for you". त्यांना मराठी कितपत यायचं माहित नाही पण छोटी छोटी आणि ठराविक मराठी वाक्य ते अनेकदा बोलायचे.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Mon, 11/15/2021 - 11:49 नवीन
काही आडमुठे हिंदी भाषिक व्यावसायिक मराठी शिकण्यास उत्सुक नाहीत पुण्या मुंबईतील भरपूर मराठी लोकं व्यवसायिकांबरोबर हिंदीतच बोलत असतात. मारवाडी लोकांना थोडी का असेना मराठी येतच असते परंतु आपले मराठी ग्राहक मात्र बऱ्याचदा हिंदीतच बोलत असतात. आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 11/15/2021 - 12:11 नवीन
आर्थिक कारणासाठी का असेना हिंदी व्यावसायिक मराठी नक्कीच शिकतील पण त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर बोलताना मराठीत किमान सुरवात तरी केली पाहिजे.
पुर्ण सहमत. मी दुकानांत, उपहारगृहात आवर्जुन मराठीच बोलतो.. समोरचा हिंदीत बोलत असेल तरी मी मराठीतच बोलतो.. अगदीच त्याला अजिबातच कळत नसेल तरच मग हिंदी. ..नुकताच कुणी स्थलांतरित होवून आला असेल तर त्याच्याकरिता सहकार्याची भावना असावी. पण अनेकदा समोरचा दुकानदार हा काही पहिल्या पिढीतला स्थलांतरित नसतो .. तो इथेच जन्मला, वाढलेला असतो पण तरी त्याला मराठी येत असूनही बोलण्याची इच्छा नाही हे अगदी स्पष्टपणे जाणवते. अशा वेळी तर मी अजिबात हिंदी बोलत नाही. आपण समोरच्याला हिंदीकरिता कम्फर्ट झोन निर्माण करुन दिला तर तो मराठी का शिकेल ? मला वाटतं तामिळींचा हिंदीला विरोधा याकरिताही असावा. जर ते हिंदी बोलू लागलेत तर समोरचा व्यावसायिक आणि कदाचित त्याच्या पुढच्या पिढ्याही तामिळ शिकणार नाही अशी कदाचित त्यांना भिती वाटत असेल
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 11/18/2021 - 02:23 नवीन
एक भाषा जास्त शिकावी लागते - ही वाईट गोष्ट आहे का?
विरोध शिकावी लागते ह्याला आहे. का त्या ओरिया, पंजाबी, गुजराती, मराठी, कानडी, बंगाली, केरळी, तमिळ, पूर्वोत्तरातल्या माणसाने हिंदी शिकावी? आयुष्यात कोणितरी अहिंदी भाषक भेटेल आणि आपण त्यांच्यासोबत बोलु शकू म्हणून? हिंदी हि अहिंदी भाषकांची ज्ञानभाषा नाही. ती त्यांची दैनंदिन व्यवहाराची पण भाषा नाही. भारतीय अहिंदी भाषकांना पोटापाण्यासाठी (व्यावसायिक कारणासाठी म्हणा हवे तर) इंग्लिश जवळची वाटते, नेमक्या त्याच कारणासाठी हिंदी भाषकांना पण इंग्लिशच जवळची वाटते. मग तसे असताना, हिंदी शिकायची जबरदस्ती का म्हणून?
मी हेच सांगतोय की हिंदी वगळता दुसरी कुठलीच भाषा (भारतीय वा अभारतीय) त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही आणि कदाचित उतरणार ही नाही. उतरणार असेल तर तुम्ही अशी भाषा सांगा.
त्या प्रकारच्या सर्वमान्यतेवर उतरलेली नाही कारण आपल्याकडे असलेली बहुसंख्य हिंदी जनता, हिंदी, मराठी, डोगरी, आणि इतर अनेक भाषांनी स्वीकारलेली समान देवनागरी लिपी आणि महत्वाचे म्हणजे केंद्र व बहुसंख्य असलेल्या हिंदी राज्यांचा इंग्लिशेतर अहिंदी भाषांविषयी उदासीन दृष्टिकोण. उदा. ही मध्यप्रदेशातल्या इंदुर स्टेशनची पाटीImage removed. ही तिकडच्याच राणी कमलापती स्टेशनची पाटी Image removed. हे झारखंडची राजधानी रांचीचे स्टेशन Image removed. आता ही अहिंदी भाषक राज्यातली स्थानके पहा: साईनगर, महाराष्ट्र Image removed. बोईसर, महाराष्ट्र Image removed. कुट्टीपुरम् , केरळ Image removed. चंदीगड, पंजाबImage removed. बाघा जतीन, बंगाल Image removed. धारवाड, कर्नाटक Image removed. चेन्नई, तामिळनाडु Image removed. सगळ्या पाट्यांवर इंग्लिश नावे आहेत. अहिंदी राज्यात हिंदी भाषेत पण नावे आहेत. हिंदी भाषिक राज्यांकडे तसे नाही. हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहिले कि झाले. उ.प्र., बिहार हे अपवाद. उ.प्र., बिहार मध्ये हिंदी आणि उर्दू ह्या राज्यभाषा आहेत त्यामुळे बर्‍याच ठिकाणी हिंदी, इंग्लिश सोबत उर्दू पण पाटीवर दिसते. पाटीवर आहे, पण शाळेत उर्दू तृतीय भाषा म्हणून शिकवल्या जाते का याबाबत कल्पना नाही. बरे हे फक्त रेल्वेचे नाही, बँक, पोस्ट ह्या इतर केंद्र सरकारी आस्थापनांचे पण तसेच. ह्या बळजबरीला विरोध आहे. मला वाटते इंग्लिश हि सुद्धा लवकरच सर्वमान्यतेवर उतरेल. नाहीतरी बोलण्यात इंग्लिश शब्द असतातच, नंतर वाक्य येतील. आवड असेल त्याने हिंदी भाषा शिकावी. ती पण तमिळ, मराठी प्रमाणे एक समृद्ध भाषा आहे. पण हिंदीच शिकले पाहिजे, असे नको. त्यामुळे तिसरी भाषा शिकावी का? हो भारतात बोलताना तिसरी भाषा आवश्यक आहे का? कदाचित हो. ती तिसरी भाषा हिंदीच असावी का? नाही.
2. हिंदी भाषी aggressive आहेत? मराठी भाषिकांची इमेज बाकी भारतात काय आहे याची कल्पना आहे का? आपण खरोखरच तसे आहोत का? आणि जर ते aggressive असतील तर मराठी लोकांना काउंटर aggressive व्हायला कुणी अडवलंय? की भाषा बदलली की अचानक लोकांचा स्वभाव बदलतो?
पास. भाषेवरून लोकांचा, अथवा लोकांवरून भाषेचा राग करण्याचे काही कारण नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा