इंधन - स्वस्त / महाग
तर ही गोष्ट त्या वेळची ज्या वेळी वेळी स्कूटर साठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं, गॅससाठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं फोन साठी पंधरा-वीस वर्षे थांबावं लागायचं, तरीपण आपण कसे महान याचा रशियन स्टाइल प्रपोगंडा चालायचा त्यावेळी वीज वाचवा पाणी वाचवा आणि इंधन वाचवा अशा आमच्यावर संस्कार केले जात होते.
तसं त्यात काही चूक नाही आणि अजूनही आपल्याला हेच सांगितले जाते. इंधन वाचवा हे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधन भारतात तयार होत नाही, भारत ते आयात करतो, आयात करण्यासाठी भारताला परकीय चलन द्यावे लागते आणि भारतामध्ये परकीय चलन त्या काळात नव्हते. त्यामुळे इंधन वाचणं म्हणजे देशभक्ती एक प्रकारे सांगितले जात होते.
सध्या इंधनाचे भाव शंभर रुपयाच्या वरती गेल्यामुळे परत एकदा तो हॉट टॉपिक झालेला आहे. मिसळपाव वरती पण गेल्या दोन चार महिन्यात या विषयावर बरेच धागे येऊन गेले. यातील मुख्य रोख हा सरकार प्रचंड कर लावून इंधनाच्या किमती कशा वाढीव ठेवते याच्यावरती होता, जे काही प्रमाणात खरंही आहे. पण ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघावे म्हणून हा धागा.
कृपया कोणत्याही प्रकारे राजकीय चर्चा न करता फक्त अर्थ आणि मानस शास्त्राच्या दृष्टीने आपण या कडे बघायचा प्रयत्न करूया. कारण सरकार कोणतंही असलं तरी फार काही वेगळं होणार नाही.
तर
प्रचंड करांचे फायदे
- सरकारला शाश्वत आणि भरपूर उत्पन्न मिळतं
- अधिकच्या किमती लोकांना कमी इंधन वापरण्यास प्रोत्साहीत करतात (अतिश्रीमंत सोडले तर मध्यम वर्गावर नक्कीच थोडा परिणाम होतो. जिथे गरज असेल तिथेच वाहने वापरली जातात)
- परकीय चलन वाजते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी होतो.
- प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधण्यासाठी चांगले कारण मिळते जसे सध्या इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी संशोधन आणि प्रयत्न चालू आहेत.
- एखाद्या प्रगत अर्थव्यवस्थेत वाहतूक खर्च जीडीपीच्या आठ टक्के हा उत्तम मानला जातो. भारतात तो सुमारे १४ % आहे. महाग इंधनामुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो त्यामुळे भारतीय उत्पादने ही आंतरराष्ट्रीय व्यापारात महाग ठरतात.
- स्पर्धात्मकता कमी झाल्याने काही क्षेत्रांतून आपण कायमचे बाहेर फेकले जातो आणि मग इतरांकडून त्याच गोष्टी घेताना आपल्याला वाढीव किंमती वरती घ्याव्या लागतात
- वाहतूक खर्च कमी झाल्याने किमती कमी होईल होतील त्यामुळे आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य पद्धतीने स्पर्धा करू शकतील. इंधन स्वस्त झाल्याने त्याचा वापरही वाढेल परंतु आपण अधिक निर्यात केल्याने मिळणाऱ्या परकीय चलनामुळे परकीय चलन गंगाजळीवरील दबाव बहुदा फार वाढणार नाही.
- महागाई वाढली नाही तर सरकारची लोकप्रियता वाढेल आणि सरकारी तिजोरीवर पगार किंवा इतर पद्धतीने येणारा बोजा ही कमी राहील.
- निर्यात वाढेल तशी अर्थव्यवस्था वाढीची गतीही वाढेल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल. परत याचा फायदा सरकारची लोकप्रियता वाढण्यास होईल.
- सरकारी उत्पन्न कमी होईल
- कमी किमतीमुळे इंधन वापर अति प्रचंड प्रमाणात वाढला तर त्याचा आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती वरती पण परिणाम होईल ज्यामुळे जागतिक मंदी सारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते
- इंधनाचे नवीन पर्याय शोधण्यास प्रोत्साहन मिळणार नाही
- मध्यपूर्वेतील देशावरील अवलंबित्व वाढेल
🗣 चर्चा
(106)
र
रंगीला रतन
गुरुवार, 10/07/2021 - 19:08
नवीन
चांगल आहे कि मग. खर्च कमी आणी प्रदुषण पन कमी. तुमच्या पोटात का दुखतय? तुम्हि युपी , कानपुर मधे रहाता कि हकिमी करता?
- Log in or register to post comments
H
hrkorde
गुरुवार, 10/07/2021 - 19:11
नवीन
मीपण वा योगीजी वा च म्हटले ना ?
- Log in or register to post comments
र
रंगीला रतन
गुरुवार, 10/07/2021 - 19:19
नवीन
तेजाल्ला ते वा योगीजी वा तारीफ साठी होता काय?
मला वाटलं उपरोधानी म्हणाल्या कोरडे वहिनी.
काय पण बोला तुमच्या इश्श नी नको त्या तारा छेडल्या कोरडे वहिनी. एकदम देवदास आठवला.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 10/09/2021 - 06:25
नवीन
तुमच्या इश्श नी नको त्या तारा छेडल्या कोरडे वहिनी
ह ह पु वा
तुमचं रंगीला रतन नाव सार्थ ठरवलं तुम्ही
पण या कोरडे वहिनी म्हणजे चंपाबाई उर्फ मोगा उर्फ हितेश उर्फ ..उर्फ ..उर्फ ..उर्फ
अशा आहेत ( अर्थात तुम्हाला ते माहित आहेच)
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 10/08/2021 - 17:03
नवीन
खाता महारष्ट्र च आणि पुळका मात्र तुम्हाला यूपी च असतो.
तुमचे बिऱ्हाड तिकडेच हलवा.योगी तुम्हाला सुखात ठेवतील बैल गाडी ची सफर घडवून आणतील.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 10/08/2021 - 16:32
नवीन
राजेश १८
मोगा १५
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3