🗣 चर्चा
(126)
स
सुमित्रा
Tue, 08/17/2021 - 19:43
नवीन
फक्त एवढंच म्हणेन की निओ बुद्धिझम आणि त्रिपिटकांमधला बुद्धिझम खूप जास्त वेगळा नाहीये.
मी तिबेट्/थाई (मूळ बौद्ध) यांच्या बुद्धिझमशी थोडी परीचित आहे . मूळ तत्त्वज्ञानाचा उगम सगळ्यांचा सारखा असल्यामुळे सन्घर्ष झाला नसावा. वेगळेपणा तुम्हाला कशात दिसेल तर तो पूजा/वंदना/भक्ती express करायच्या पद्धतीमध्ये. सुत्तपठणाच्या चालींमध्ये. असं माझं आत्तपर्यंतचं निरीक्षण आहे. (म्हणजे explicitly अभ्यास नाही केलेला. )
"आंबेडकरांनी बुद्धिझम ची फक्त principles घेतली....." - मी Buddha and His Dhamma सगळ्यात आधी वाचलं आणि नंतर वेस्टर्नांनी लिहिलेली त्रिपिटकांची इंग्लिश भाषांतरं वाचली. म्हणजे अजून दोनच वाचली आहेत. तिसरं सुरू आहे. (तसं माझं वाचन आणि अभ्यास खूप प्रचंड नसला तरीही काही गोष्टी ठामपणे सांगू शकते, कारण सगळ्या त्रिपिटकांमध्ये खूप सुसूत्रता आहे. ) एकंदरीत असं वाटलं की Buddha and His Dhamma म्हणजे त्रिपिटकांचा अगदी अगदी अर्क आहे. ते वाचून, आंबेडकरांनी एका आयुष्यात किती किती पायाभूत आणि प्रचंड मोठी कामं केली आहेत, हे पुन्हा एकदा लक्ष्यात आलं.
"यात बुद्धिझम चा भाग असलेल्या गूढ गोष्टी नाहीत." - मला तरी एकच मोठा फरक सापडला, बुद्धांनी कर्म आणि निर्वाणाविषयी जे सांगितलं, त्याचा अर्थ आंबेडकरांनी 'जास्त मानवता वादी, जास्त प्रॅक्टिकल' दृष्टीने लावला आहे. जरी त्यांनी थेरवादातला अर्थ जसाच्या तसा उचलला असता तर तेव्हाच्या brand new बुद्धिस्ट लोकांच्या मनात चांगलाच गोंधळ झाला असता. मी आत्ताही इथे थेरवादिन अर्थ लिहित नाहीये कारण की मागचा पुढचा संदर्भ न देता मी उगीच इथे काही लिहिलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. तो विषय स्वतः अभ्यास करून किंवा माझ्या टीचर सारख्या भारी टीचर कडून समजून घेण्यासारखा आहे.
निओ बुद्धिझम शब्द शोधल्याबद्दल धन्यवाद. हे माहिती होतं कि काहीतरी फरक आहे, पण त्याला खरंच वेगळं नाव द्यायचं असा कधी विचार नव्ह्ता केला. प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट असलेली केव्हाही चांगली :-)
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/10/2021 - 13:10
नवीन
धर्म म्हणजे एका ठराविक नियमावलीत(श्रद्धा,रीतिरिवाज,चालितित्ती) राहणार लोक समूह म्हणजे धर्म अशी व्याख्या करता येईल.
प्रतेक धर्माची पण काही विचारधारा नियमावली असते.
आणि ती नियमावली त्या धर्मातील किती लोक पाळतात ह्याला असाधारण महत्व आहे.
समजा बुद्ध धर्माची विचारधारा खूप अती उत्तम आहे पण धर्म बांधव त्या धर्मातील विचारधारा पाळत च नाही किंवा कमी लोक पाळतात तर फक्त धर्म चांगला असून काय फायदा.
तसेच हिंदू धर्म खूप महान आहे जीवनातील सर्व ज्ञान त्या मध्ये आहे पण हिंदू धर्मीय लोकांना ते ज्ञान माहीतच नाही ,धर्माचे कोणतीच विचारधारा हिंदू धर्मीय लोकातील सर्व लोक पाळत नाहीत तर फक्त हिंदू धर्म ची विचारधारा खूप great आहे ह्याला काय अर्थ आहे.
हेच लॉजिक बाकी सर्व धर्मांना लागू आहे.
धर्माची सर्व विचारधारा ,नियम,रीतिरिवाज,चालीरीती किती धर्म बांधव पाळतात ह्या वर च त्या धर्माचे यश अवलंबून असते.
चोरी करू नका.
खोटे बोलू नका
हिंसा करू नका.ही समान तत्व सर्व धर्मात आहेत किती लोक ह्या तत्वांचे पालन करतात.
उत्तर आहे नगण्य.धर्म हे आता राजकीय फायद्यासाठी,स्व फायद्यासाठी,आर्थिक फायद्या साठी वापरण्याचे हत्यार आहे.बाकी काही नाही.
समूहाची वर्चस्व वादाचे स्वप्न धर्म पूर्ण करतात.
आणि समूहात आपण सुरक्षित आहोत असे व्यक्ती ल वाटते.
प्राचीन मंदिर,लेणी,विविध वास्तू ह्या राजसत्ते नी उभारल्या आहेत.लोकांनी नाही.
राजसत्ता त्याच विचारधारेला किंमत देते जी विचारधारा त्यांचे सिंहासन भक्कम करते. आता पण तीच स्थिती आहे काही बदल झालेला नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/10/2021 - 13:19
नवीन
व्यक्ती स्वतंत्र चा.प्रतेक व्यक्ती ही युनिक असते तिचे स्वतःचे अस्तित्व असते त्या वर धर्म बंधन टाकत असेल तर तो धर्म हा निकृष्ट आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
मी हिंदू आहे पण माझा हिंदू धर्म मी चुरचाध्ये गेलो म्हणून मला बहिष्कृत करत नसेल तर माझा हिंदू धर्म हा अती उत्तम आहे
मी बौध्द धर्मीय आहे पण मला गणपती घरी बसवायची इच्छा आहे आणि मी घरी गणपती बसवला म्हणून मला बहिष्कृत केले गेले तर माझा धर्म हा ग्रेट नाही.आणि माझ्या विचार स्वातंत्र्य चा मान राखला गेला तर माझा बौध्द धर्म ग्रेट आहे.
ह्या चाचणीत कोणता धर्म अग्रेसर आहे ह्याचे उत्तर च कोणता धर्म अती उत्तम आहे हे ठरवेल.
धर्म नी व्यक्ती स्वतंत्र वर अती क्रमन करू नये.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/10/2021 - 18:55
नवीन
सम्राट अशोक ह्यांनी बौध्द धर्म स्वीकारला आणि त्यांच्या प्रयत्नांनी ची त्या धर्माला सुवर्ण काळ त्या वेळी बघायला मिळाला.धर्माचा विस्तार झाला राजसत्ता पाठिंबा होता हे कारण असावे त्या मागे.
पण बौध्द धर्म भारतात मात्र रुजला नाही ,विस्तारला ह्याला जबाबदार पण सम्राट अशोक च होते असे वाचनात आले आहे.
सम्राट अशोक हा एक न्यायप्रिय सहिष्णू सम्राट होता त्यांनी सर्व धर्मांना समान सुरक्षा दिली ,सामान वागणूक दिली.
सम्राट अशोक ज्यांच्या अती सहिष्णू स्वभाव मुळे बौध्द धर्म पेक्षा बाकी धर्म भारतात पसरले.
असा पण त्यांच्या वर आरोप होतो.
सम्राट अशोक हे केंद्रस्थानी असतील असे कोणतेच उस्तव भारतात बौध्द धर्मीय मोठ्या प्रमाणात साजरे करत नाहीत.
सहिष्णू पना मुळे धर्म संकटात येतो हे सत्य च आहे.
हिंदू धर्मीय लोकांनी सुद्धा जास्त सहिष्णू राहणे हिंदू धर्मासाठी धोक्याची घंटा असेल.
हेच इतिहास मधून शिकले पाहिजे.
आपण ज्याला अशोक चक्र म्हणतो ते अशोक चक्र नाही तर धम्म चक्र आहे .असे पण वाचनात आले आहे.
हिंदू,मुस्लिम,ख्रिस्त धर्मीय लोकांकडून विरोध होवू नये म्हणून ते अशोक चक्र आहे असं युक्तिवाद केला गेला होतं
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/10/2021 - 19:19
नवीन
दुसऱ्या महा युद्ध चा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारताला आणि त्या बरोबर अनेक देशांना स्वतंत्र मिळाले .
दुसरे महायुध्द झाले नसते आणि ब्रिटिश सत्तेची सर्व गुर्मी कोणी उतरवली नसती तर आज पण अनेक देश पारतंत्र्यात च असते.
भारतात कठोर विरोध ब्रिटिशांना झालाच नाही त्यांच्या सेवेत भारतीय च होते आणि तेच स्वतंत्र लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांवर अन्याय करत होते.
गांधी ,किंवा काँग्रेस च्या लुटपूटी च्या विरोधाला ब्रिटिश satte नी कधीच भीक घातली नसती.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/10/2021 - 19:21
नवीन
वरील पोस्ट करायची होती पण चुकून ह्या धाग्यावर दिला गेला.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 08/11/2021 - 14:37
नवीन
साहना,
आंबेडकरांना संस्कृत येत नव्हती आणि त्यामुळे त्यांना हिंदू धर्माबद्दल ज्ञान नव्हते तर मिसळपाव वरील विद्वानांनी अष्टाध्यायी कोळून प्याली आहे का ? आपणाला किती संस्कृत येते आणि आपण किती वेदाभ्यास केला आहे. आपल्या तर्काप्रमाणे बहुतेक भारतीयांना हिंदू धर्माचे ज्ञान नाही.
आंबेडकरांना संस्कृत येत नसतांनाही त्यांनी 'रिडल्स इन हिंदुइझम' कसं लिहिलं, हा प्रश्न उरतोच.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
गुरुवार, 08/12/2021 - 15:19
नवीन
मला स्वत:ला गौतम बुध्दांचे विचार सर्वाधिक पटले असले, तरी बौध्द धर्म भारतात इतका का पसरला नसावा, हा प्रश्न पडला होता. त्याबाबत, आंबेडकरांचा एक लेख वाचल्याचे आठवते, पण आत्ता नेमका संदर्भ मिळत नाही. जगातील त्यातल्या त्यात सर्वाधिक तर्कसुसंगत, विज्ञानवादी (म्हणजे पहिल्यांदा श्रध्देची मागणी करून नंतर पारलौकिक लाभाचा न वायदा करणारा) आणि नैतिक विचार बुध्दाने सांगितला, असे वाटते. याच विषयावर आनंद करंदीकरांचा एक व्हिडीओ जिज्ञासूंसाठी:
https://www.youtube.com/watch?v=eGjY-NhbCKQआनंद करंदीकर :- बौद्ध धर्म आणि सनातनी हिंदू
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Mon, 08/16/2021 - 18:17
नवीन
गॉडजिला
(अभ्यासू विद्यार्थी) सोकाजी
धर्मराजमुटके
चौकस२१२
सुमित्रा
गामा पैलवान
Rajesh188
कपिलमुनी
रावसाहेब चिंगभूतकर
अशा सर्वांचेच प्रतिसाद माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे आहेत
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Mon, 08/16/2021 - 18:17
नवीन
संग्रहणीय आहेत
- Log in or register to post comments
स
सुमित्रा
Wed, 08/18/2021 - 17:10
नवीन
आशु जोग, साहना, गा.पै. यांनी मनमोकळेपणाने आणि प्रेमाने सुस्पष्ट मुद्दे/प्रश्न विचारल्यामुळे चर्चा योग्य वळणे घेत राहिली.
Well done, we all!
It was a very nice experience to hear from learned people of मिपा.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 08/16/2021 - 22:49
नवीन
चौकस२१२,
नेमक्या याच कारणासाठी मी बौद्धांशी संवाद साधू इच्छितो. त्याचं काय आहे की बुद्ध वेगळा दाखवला की बौद्ध धम्म हा पारंपरिक हिंदू धर्माहून वेगळा आहे असा तथाकथित सिद्धांत मांडता येतो. मग हळूच बुद्धाच्या जोडीस येशू आणून बसवायची सोय होते.
बुद्धास मध्ये घालून भालचंद्र नेमाडे उघडपणे म्हणताहेत कॅथलिक पंथाने बौद्ध तत्त्वं उसनी घेतली आहेत : https://www.aksharnama.com/client/article_detail/4434
अशा रीतीने येशूचा चंचुप्रवेश झाला की बुद्धांना उर्वरित हिंदूंपासून अलग पाडणं उत्तरोत्तर सोपं होत जाईल. हे टाळायचं असेल तर बुद्धांना विचारप्रवण करणं हा मार्ग आहे.
आ.न.,
-गा.पै
- Log in or register to post comments
स
सुमित्रा
Wed, 08/18/2021 - 17:00
नवीन
त्यासाठी आंबेडकरी बौद्ध जनतेने Buddha and His Dhamma हे अवश्य वाचावं, त्याचा group study करावा. (मी एकटीने वाचलं, २-३ वेळेस वाचावं लागलं तेव्हा कळलं. ) आणि तिथेच न थांबता, त्रिपिटकांचा ही अभ्यास जरूर करावा.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 09/20/2021 - 04:44
नवीन
हो सहमत ... बौद्धांशी संवाद संवाद साधने महत्वाचे आहे ..
बुद्धास मध्ये घालून भालचंद्र नेमाडे उघडपणे म्हणताहेत कॅथलिक पंथाने बौद्ध तत्त्वं उसनी घेतली आहेत :
नेमाडे यांना कोणतरी सांगितले पाहिजे कि एकदा वाटिकाणास जाऊन पोप महाशयांना हे ऐकवा.. मग बघावे काय उत्तर मिळते ते ! नेमाडेंचे विधान हुकलंय !
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 08/17/2021 - 02:34
नवीन
विचारवंत ही जी जमात आहे त्यांचे एकमेव काम असते बुद्धिभेद करून चुकीच्या गोष्टी पण कशा बरोबर आहेत हे लोकांच्या मनावर बिंबवणे.
हिंदू हा धर्म नाही असा विचार लोकांत पसरवून लोकं मध्ये भ्रम निर्माण करण्याचे उद्योग काही लोक करत आहेत.
त्या साठी हवी तशी धर्माची व्याख्या करण्यात ह्यांना काहीच लाज वाटत नाही.
पण हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे.
रीतिरिवाज,परंपरा नी लोकांना एकत्र बांधून ठेवले आहे. ते काही विचारवंत लोकांच्या काव्या ना बळी पडणार नाहीत.
- Log in or register to post comments
ग
गॉडजिला
Fri, 08/20/2021 - 15:47
नवीन
नालंदा विद्यापीठात भारतात उगम पावलेल्या विवीध विचारसरणीवर असे ३० लाख ग्रंथ जाळले तेंव्हां तेथून बौध्द लोक चीन वगेरे ठिकाणी पळून गेले अन भारतातून बुध्द धर्म खऱ्या अर्थाने लोप पावला...
हे विद्यापीठ इस्लामी आक्रमकांनी जाळले, ब्रिटिशांनी न्हवे. बुध्द तत्वज्ञान सर्वात आधूनीक, प्रगत आणि सर्वमान्य विचारसरणी म्हणून हजारो वर्षे होती... भारतात उगम पावलेल्या विवीध पंथांचे एकमेकात वादविवाद, जय पराजय होत होते पण त्यानी कधीही एकमेकांचे समूळ उच्चाटन अग्रेसिवपणे केले नाही.
उदा. आजही वारकरी पंथ भारतात अस्तित्वात आहे आणि उपासनेची विचारसरणी जरी वेगळी असली तरी त्यांच्या संतांच्या समाध्यांना अभिषेक वैदिक पद्धतीने रोज होतात आणि संतांचा तसा उपदेश नाहीं म्हणून त्यांचा मार्ग अनुसरणारे कोणीही त्यावर वाद निर्माण करत नाही, भलेही या संताना प्रसंगी आयुष्यात वैदिकता अनुसरनार्या अथवा न अनुसरणार्या काही लोकांचा बराच त्रास झाला तरीहि सर्वच विचार सरणीचे लोक पराकोटीच्या सामंजस्यानेच राहतात कारण मार्ग विवीध असले तरी अंतिम ध्येय सर्वांचे समान होतें व राहील हीच बाब त्याकाळी लागू होती व हे सर्व विवीध मार्गांचे लोक हिंदूच होत. अगदी अफगाणिस्तानात पर्वताच्या आकाराच्या बुध्दमूर्ती तालिबानने तोफा डागून फोडेपर्यंत म्हणजेच विसाव्या शतकपर्यंत अफगाणिस्तान मुस्लिमबहुल असून देखील अस्तित्वात होत्या यावरून हिंदु म्हणजे काय आणि त्याला सुरुंग कोणाकडून व कसा लागला हे स्पष्ट होते.
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
गुरुवार, 09/16/2021 - 16:32
नवीन
Mukti Kon Pathe
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 09/17/2021 - 15:04
नवीन
आशु जोग,
लेख रोचक आहे. हे वाक्य विशेष दखलपात्र वाटलं :
स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवी होती तर मग हिंदू धर्म सोडायचाच कशाला? नारायण गुरूंनी केरळात हिंदू धर्मात राहूनंच दलितांच्या हिताच्या सुधारणा राबवल्या होत्या. हा भक्तीमार्ग आंबेडकरांना का अंगिकारावासा वाटला नाही, हा प्रश्न उद्भवतो. नारायण गुरु यांचं कार्य आंबेडकरांना बऱ्यापैकी समकालीन होतं. त्यामुळे आंबेडकरांना या कार्याचं मूल्यमापन करणं सहज शक्य होतं. पण ते का केलं नाही, हा प्रश्न आहे.
लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sat, 09/18/2021 - 07:53
नवीन
१. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट:
स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवी होती म्हणून आंबेडकरांना धर्मांतर करायचंच नव्हतं. ते का करायचं होतं ते त्या लेखात आलं आहे:
२. हिंदू धर्मांतर्गत दलितांच्या हिताच्या सुधारणा:
त्याच लेखात आलेलं विवेचन, जे होणं शक्य नव्हतं.
- (धर्मातीत स्पिरिच्युअल) सोकाजी
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 09/19/2021 - 12:02
नवीन
सोकाजी,
नेमकी हीच तर विसंगती आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवीये, तर तसं मॉडेल नारायण गुरूंनी हिंदू धर्मात उपलब्ध करवून दिलं आहे. मग ते मॉडेल न स्वीकारता आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला. बौद्ध नामे जो नवा धर्म स्वीकारला, त्यात अनुयायांची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट कितीशी झाली?
कोणी काही आढावा घेतलाय का? तुमच्या वरील प्रतिसादात उल्लेख्लेक्या इंग्रजी लेखात बौद्ध धर्मांतरामागे सामाजिक कारणं ( no hope for Untouchables ) असल्याचा उल्लेख आहे. मग नेमकं कारण काय धर्मान्तरामागे? अध्यात्मिक की सामाजिक? की दोन्ही? आणि धर्मांतराच्या अध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही फलनिष्पत्त्या काय आहेत?
मला वाटतं या दोन मुद्द्यांवर नवबौद्धांकरवी सखोल चर्चा झाली पाहिजे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Sun, 09/19/2021 - 14:46
नवीन
बाबासाहेबांनी धर्मांतर अद्ध्यात्मिक कारणामुळे केलं असं वाटल्यास विसंगती वाटू /दिसू शकते.
पण बाबासाहेबांनी धर्मांतर फक्त सामाजिक/राजकिय उद्दीष्टांसाठी केलं होतं. माझ्या मर्यादित अभ्यासानुसार कुठेही अद्ध्यात्मिक उद्दिष्ट हे प्राइम ऑब्जे़टीव्ह नव्हतं. अद्ध्यात्मिक कारण हे बाय-प्रॉडक्ट होऊ शकतं पण ते उद्दिष्ट अजिबात नव्हतं. तसं कोणी साधार दाखवून दिल्यास I stand to be corrected.
अस्पृश्यांना शिक्षणात आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांना समान संधी उपलब्ध होण्याची गरज होती आणि हिंदू धर्मात राहिल्यान ते शक्य होणार नाही हे त्यांच ठाम मत होतं. जन्म जरी हिंदू म्हणून झाला असला तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी सामाजिक विषमता असलेल्या हिंदू धर्माला पर्याय म्हणून समता आणि बंधूता ह्यावर आधारित असलेल्या 'बौद्ध धर्माचा' (??) त्यांनी स्विकार केला.
आता, त्या धर्मांतराच्या सामाजिक फलनिष्पत्तीबद्दल टिप्पणी करणं तुम्ही म्हणता तसं नवबौद्धांवरच सोडून देऊ.
- (अभ्यासू) सोकाजी
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 09/19/2021 - 22:09
नवीन
सोकाजी,
एकदम खरंय. इंग्रजी लेखातल्या या वाक्यास नेमका आधार कोणता ते शोधावं लागेल :
अर्थात, हे नवबौद्धांनी करायला पाहिजे. बौद्ध धर्म स्वीकारणं अध्यात्मिक कारणासाठी की सामाजिक कारणासाठी की दोन्हींसाठी यावर नवबौद्धांना विचारमंथन करावंच लागेल. अन्यथा त्यांची नवबौद्ध म्हणून जी ओळख आहे ती पुसट होत जाईल.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 09/20/2021 - 03:58
नवीन
Should be=normative claim.
एखादी गोष्ट आयडियली कशी असावी, ह्याबद्दल नोरमेटिव्ह दावे असतात. हौएव्हर, आंबेडकरांना हे रियल धार्मिक ऑब्जेक्टिव्ह खऱ्या आयुष्यात कुठेच दिसले नसावे. किंवा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ह्या गोष्टीआधी emancipation जास्त महत्वाचे वाटणे साहाजिकच आहे, नाही का ?
त्यामुळे त्यांच्या सुयोग्य धर्माच्या कल्पनेवरून धर्मांतराच्या मूळ उद्दिष्टावर गडबडून जाण्याचे कारण नाही. मूलतः सामाजिक कारणच.
बाबासाहेबांच्या नोरमेटिव्ह मताने धर्मपरिवर्तनाचे उद्दिष्ट तेच असावे, असे दिसत नाही.
उदा-
नोरमेटिव्ह क्लेम- सर्व सरकारांनी गांजा लीगल करावा. (एका ज्यूईश व्यक्तीचे मत.)
=\=
नाझी जर्मनीतून तो व्यक्ती पळून गेल्यास त्याचे कारण "नाझीन्नी गांजा लीगल केला नाही म्हणून."
थोडक्यात-
एका ओबवियस नोरमेटिव्ह क्लेम वरून तितक्याच ओबवियस धर्मांतराच्या कारणावर कन्फ्युज होण्याचे काही कारण नाही.annihilation of cast मध्ये कारण सुस्पष्ट आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 09/20/2021 - 01:11
नवीन
पण बाबासाहेबांनी धर्मांतर फक्त सामाजिक/राजकिय उद्दीष्टांसाठी केलं होतं. माझ्या मर्यादित अभ्यासानुसार कुठेही अद्ध्यात्मिक उद्दिष्ट हे प्राइम ऑब्जे़टीव्ह नव्हतं. अद्ध्यात्मिक कारण हे बाय-प्रॉडक्ट होऊ शकतं पण ते उद्दिष्ट अजिबात नव्हतं.
हो असच वाटतंय अर्थात हे वरवरच्या अभ्यासातून... साधे कारण स्पष्ट शब्दात सांगायचे तर " हिंदू धर्मात आपल्यावर जातीवयस्थेमुळे अन्याय होत राहिला आणि होत राहणार .. मग अप्लाय समाजाने १) धर्मच सोडला आणि आपण निधर्मी म्हणून घोषित केलं तर? २) धर्म सोडायचा तर मग दुसरा कोणता धर्म घयावा , रूढी परंपरेत अडकलेलंय समाजाला काय "पचेल" आणि इतर हिंदू समाजाशी फार तेढ होणार नाही ?....तर अगदीच फारकत नको म्हणून बुद्ध धर्म .. असा विचार केला गेलं असावा
इस्लाम स्वीकरणायचे त्यांचं मनात असावे असे वाटत नाही.. हा कदाचित ख्रिस्ती होऊ शकेले असते !
यातील त्यांनी क्रमांक २ चा पर्याय निवडला
मग रेव्ह टिळक यांनी धर्मांतर केलं ते कसे पाहता येईल ? ते बहुतेक अद्ध्यात्मिक कारणामुळे असावे ... त्यांच्या बाबतीत तर "अन्याय" हे कारण नसावे !
अर्थात चिंताजनक बाब रेव्ह टिळकआचे धर्मांतरं नसून आंबेडकरांचे धर्मांतर मानावे लागेल .. संख्येच्या दृष्टीने हिंदू समुदायाला त्याचाच जास्त धक्का बसला असणार !
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Mon, 09/20/2021 - 13:48
नवीन
असं वाटणं हे, काहीतरी करायचं म्हणून बौद्ध धर्मात धर्मांतर केलं, इतकं सुलभीकरण होऊन अतिशयोक्त होतंय. १९३६ साली त्यांनी धर्मांतर करणार असं ठरवून घोषणा केली आणि १९५६ साली धर्मांतर केलं, म्हणजे तब्बल २० वर्षांनी. त्या काळात त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास (comparative religion study) केला होता. त्यामुळे बौद्ध शिकवणींवर आधारित धर्म स्विकारण्याची त्यांची वैचारिक बैठक इतकी सोपी आणि सुलभ नव्हती.
हा आंबेडकरांचा निबंध त्यांची वैचारिक बैठक स्पष्ट करतो:
https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religion-dr-b-r-ambedkar/
- (अभ्यासू) सोकाजी
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 09/19/2021 - 22:30
नवीन
सुमित्रा,
पहिल्याप्रथम, विलंबाने उत्तर देतोय म्हणून क्षमस्व.
नियम नाहीत असं मी कुठेही म्हटलेलं नाही. नियम आहेत, पण ते सामान्य लोकांसाठी नसून सदस्यांसाठी आहेत. सामान्य गृहस्थी माणसाच्या चटकन आवाक्यात असेल असं काहीतरी हवं ना?
यासंबंधी buddhist law वर गुगलून बघितलं तर पहिला लेख हा सापडला : https://www.encyclopedia.com/religion/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/law-and-buddhism
या लेखातही हे विधान आलंय :
बौद्धधर्माचा कायद्यावर बराच प्रभाव पडला आहे. मात्र तरीही सामान्य जनतेला आचरणात आणता येईल या हेतूने पद्धतशीर लेखन झालेलं दिसून येत नाही. असं लेखन अस्तित्वात असलं तरी ते भारताबाहेरचं असेल. भारतात तरी झाल्याचं दिसून येत नाही. या अर्थी बौद्ध धर्मात स्मृती नाही, असं मला म्हणायचं आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3