Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जुलै २०२१ (भाग २)

श
श्रीगुरुजी
Mon, 07/26/2021 - 18:35
🗣 65 प्रतिसाद
लंडनमधील न्यायालयाने विजय मल्ल्याला दिवाळखोर जाहीर केले आहे. मल्ल्याकडून थकीत कर्जवसुली, मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण यावर या निर्णयाचा काय परीणाम होऊ शकतो यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. https://www.indiatoday.in/india/story/uk-court-fugitive-businessman-vijay-mallya-bankrupt-1832930-2021-07-26

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22759 views

🗣 चर्चा (65)
स
सुक्या Mon, 07/26/2021 - 20:52 नवीन
लोकसत्ता मधील या बातमीनुसार माल्या आता दिवाळखोर झाला आहे. दिवाळखोरी झाल्यावर सारी कर्जे माफ किंवा राईट ऑफ होतात असे ऐकुन आहे. यात भारतातील कर्जे पण येतील का? हा निवाडा दुसर्‍या देशातील असल्यामुळे वसुलीसाठी अन्य देशातील मालमत्ता जप्त करता येणार नाही असे दिसते. भारतात चालु असलेल्या खटल्यांवर काही परीणाम होइल का? ब्रिटन च्या धोरणामुळे माल्याचे भारतात हस्तांतरण होणे अजुन तरी अवघड आहे. <<जुन्या धाग्यावरुन चोप्य पस्ते>>
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 07/27/2021 - 04:45 नवीन
ब्रिटन च्या धोरणामुळे माल्याचे भारतात हस्तांतरण होणे अजुन तरी अवघड आहे. भारत तसेच इतर विकसनशील देशातील गुन्हेगारांना इंग्लंडमध्ये आश्रय देणे हे इंग्लंडचे जुने धोरण आहे. खलिस्तानचा जगजितसिंह चौहान, तथाकथित जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अमानुल्ला खान, दाऊदचा साथीदार महंमद डोस/इक्बाल मिरची, गुलशनकुमारच्या खुनातील आरोपी नदीम, मल्या, नीरव मोदी अशा भारतातील अनेक वॉंटेड आरोपींना इंग्लडने राजाश्रय दिला आहे. मल्याचे भारतात प्रत्यार्पण करावे असा इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने जून २०२० मध्ये निर्णय देऊनही आजपर्यंत इंग्लंडने तो पाळलेला नाही. तामिळ अतिरेक्यांच्या लिट्टेचे मुख्यालय लंडनमध्ये होते.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 07/27/2021 - 07:20 नवीन
राजाश्रय देत असले तरी आमचा प्रत्येक पंतप्रधान लंडनला जाउन येतोच. आमच्या गुन्हेगारानां संऱक्षण देत असाल तर संबंध ठेवणार नाही अशी स्पष्ट भूमिका भारत कधीही घेत नाही. पाकिस्तानात मात्र दाउद लपुन बसलाय म्हणून आपण सारखी आगपाखड करत असतो.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 07/27/2021 - 08:52 नवीन
सारासार विचार करायला पाहिजे. केवळ ह्यामुळेच आपण लंडन बरोबर चे संबंध तोडणार असू तर नुकसान आपलेच आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 07/27/2021 - 09:43 नवीन
एकमेकात युद्ध झालं तरी ती राष्ट्रे एकमेकांशी संबंध तोडत नाहीत. एखाद्या राष्ट्राशी पूर्ण संबंध तोडणे हा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत होणारा निर्णय असतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/27/2021 - 10:17 नवीन
अमेरिकेला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार लादेन ला भारताने राज आश्रय दिला असता तर .अमेरिकेने राजनैतिक संबंध च नाही तर अजुन काय काय तोडले असते भारताचे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 07/27/2021 - 12:12 नवीन
दुबैला हवी असणारी राजकन्या परत करणे एकदा भारताने नाकारले होते... लै त्रास झाला, आपले गुन्हेगार तिकडे उजळ माथ्याने फिरु लागले... परत एकदा तोच प्रकार घडला, अजुन एक राजकन्या पळुन आली... पण आता त्रास होउ नये म्हणुन भारताने तिला निमुटपणे दुबैच्या स्वाधिन केले... आपले गुन्हेगार पाकिस्तानला निघुन गेले. तत्पर्यः- ज्याचे उपद्रवमुल्य जास्त तो कान पिळतो, निव्वळ नैतिकता कुचकामी असते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/28/2021 - 09:03 नवीन
अमेरिकेला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार लादेन ला भारताने राज आश्रय दिला असता तर .अमेरिकेने राजनैतिक संबंध च नाही तर अजुन काय काय तोडले असते भारताचे. असं काहीही झालं नसतं पाकिस्तानात घुसून लादेनला अमेरिकेने मारले त्यानंतर काय झालं? ना पाकिस्तानशी संबंध तोडले ना त्यांना होणारी मदत थांबवली. बाकी आपली एकंदर राजकारणाची जाण पाहून थक्क व्हायला होतं
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 07/27/2021 - 07:28 नवीन
राईट ऑफ वायलं माफ वायलं
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 07/27/2021 - 08:50 नवीन
भारताने पश्चिम बंगालमधील सिलीगुडी कॉरिडॉरवर, हसीमारा तळावर राफेल जेट्सचे पथक तैनात करण्यास सुरवात केली आहे. फ्रान्सपासून सुमारे 8,००० कि.मी. अंतरावर नॉन-स्टॉप उड्डाण करून आणखी तीन राफेल लढाऊ विमानांची अलीकडेच सातवी तुकडी भारतात आली. तिन्ही विमान थेट हसीमारा तळावर समाविष्ट केली जातील.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 07/27/2021 - 08:57 नवीन
न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने खोटी हेरगिरी प्रकरणात वैज्ञानिक नंबी नारायणन यांना दोषी ठरवणार्‍या केरळमधील माजी पोलिसांविरोधात कारवाई करण्यास सीबीआयला सांगितले. २०१८ मध्ये न्यायमूर्ती जैन समितीने डॉ. नारायणन यांची निर्दोष मुक्तता केली होती.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/27/2021 - 16:49 नवीन
स्विस बँकेत ब्लॅक money कोणी किती लपवून ठेवला आहे सरकार ला माहीत नाही. भारतीय जनतेचे हजारो करोड घेवून पळलेला एक पण चोर भारत सरकार पकडू शकले नाही. इच्छा च नाही तर कारवाई काय करणार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/28/2021 - 06:49 नवीन
स्विस बँकेत ब्लॅक money कोणी किती लपवून ठेवला आहे सरकार ला माहीत नाही. एक तर स्विस बँकेत काळाच पैसा असतो हा एक गैरसमज आहे आणि स्विस बँकेत लोक अवैध पैसे का ठेवत असत हेही वाचून पहा. बाकी तुमच्या विनोदी पोस्ट्स चालू द्या
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 07/28/2021 - 09:31 नवीन
एक तर स्विस बँकेत काळाच पैसा असतो हा एक गैरसमज आहे एकीच मारा लेकीन शॉल्लेट मारा. 😀
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/27/2021 - 17:04 नवीन
पैसा मिळत असेल का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/27/2021 - 17:39 नवीन
मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी .सरकार पण एकमेकांस साह्य करतात.भारत सरकार ला च इंटरेस्ट नसेल त्या चोरांना पकडण्यास तर विदेशी सरकार भारत सरकार च्या मदतीला येतात. त्या बदल्यात आपण पण काही तरी देतो. Very simple. आणि भोळी जनता बसते न्याय मिळेल ह्या आशेवर.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 07/28/2021 - 07:07 नवीन
अगदीयोग्य बोललास रे राजेशा.'दाउद दुबईत लपून बसलाय' हे पालुपद गेले अनेक वर्षे पोलिस्/सरकार चालवत आहे. गम्मत म्हणजे ह्यावर चित्रपटही निघाले. दुबई आहे मुंबईच्या आकाराची. भारत व आखाती देशांचे संबंध चांगले आहेत. मनात आणले तर दाऊदला प्कडायला ४ दिवस पुरेसे होते. २००४ साली रविंदर सिंग नामक रॉ अधिकारी अचानक गायब झाला व अमेरिकेत गेला. भारताने विचारणा करूनही अमेरिकेला तो अनेक वर्षे सापडत नव्हता. सी आय ए ने ह्या अधिकार्यासाठी व त्याच्या पत्नीसाठी अमेरिकन पासपोर्ट बनवले व काठमांडूतर्फे त्याला अमेरिकेत आणले गेले. भारताकडे असलेली गुप्त माहिती ही अधिकारी अमेरिकेला पुरवायचा. ह्यालाही पकडायला २ दिवस पुरेसे होते. पण येथील अधिकार्यांची व सरकारची साथ असल्याने हे प्रकरण सोडुन देण्यात आले. https://en.wikipedia.org/wiki/Rabinder_Singh_(intelligence_officer) स्वतःच्या फायद्यासाठी सगळेच देश नीतीमत्ता गुंडाळून ठेवतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/28/2021 - 08:59 नवीन
महाराष्ट्राच्या एका बड्या नेत्यानेच दाऊदला विमानणारे दुबईला पलायन करण्यासाठी मदत केली होती अशी बातमी सत्ताकेंद्राच्या मागच्या गल्लीतूनच बाहेर आली होती. त्यावर काय कारवाई झाली? हिंदू दहशतवादाची भूत उभे करणार्यांनी दाऊदला मदत केल्याचे सर्वाना माहीती आहे पण अशा गोष्टींचा पुरावा बाहेर येत नाही. बाकी एका पक्षाच्या बड्या नेत्याला अमेरिकेतील एका विमानतळावर अतिरिक्त परकीय चलन ( कि मादक पदार्थ?) बाळगण्यासाठी अटक होणार होती पण विरोधी पक्षाच्या सत्तेत असलेल्या बड्या नेत्याने शब्द टाकल्यावर रदबदली झाली होती. तेंव्हा माईसाहेब आपण फक्त कळफलक बडवू शकतो.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 07/28/2021 - 10:53 नवीन
२००१ साली बोस्टन विमान्तळावर झालेल्या अटकेची बातमी खोटी होती हे नंतर सिद्ध झाले. ९-११ नंतर चौकशीसाठी थांबवुन ठेवणे नित्याचे होते. 'दाउदला फरफटत आणण्याची भाषा करणारे आज हयात नाहीत. पण १९९८-२००४ व २०१४ पासुन ते २०२१, दाउदला अटक का होउ शकत नाही? ज्यानी त्याला पळायला मदत केली त्यांनाच गुरुस्थानी मानुन त्यांच्याच पक्षाबरोबर युती करण्याचे प्रयत्न होतात, ह्याचा अर्थ कसा काढायचा?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/28/2021 - 11:33 नवीन
ज्यानी त्याला पळायला मदत केली त्यांनाच गुरुस्थानी मानुन त्यांच्याच पक्षाबरोबर युती करण्याचे प्रयत्न होतात, ह्याचा अर्थ कसा काढायचा? सत्तातुराणां न भयं न लज्जा । हे सत्तेसाठी अत्यंत वखवखलेले आहेत इतका सोपा अर्थ आहे. फक्त दाऊदला पळायला मदत केली नव्हती. खऱ्या गुन्हेगारांना सोडून साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित अशा ९ जणांना मकोकाखाली अडकवून विनाजामीन विनाआरोपपत्र तुरूंगात डांबून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारे पण हेच. पण सत्तेविना राहता येत नसल्याने ते आधी पद्मविभूषण आणि आता यांचे आदर्श झालेत.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 07/28/2021 - 07:02 नवीन
बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 07/28/2021 - 07:06 नवीन
अमेरिकेचे रिपब्लिकन खासदार डेव्हिड नुन्स यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेटच्या निंगची शहरात नुकत्याच झालेल्या भेटीला भारतासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. हा भारतासाठी धोका आहे कारण चीन एक मोठा जल प्रकल्प विकसित करीत आहे ज्यामुळे भारताचा पाणीपुरवठा खंडित होऊ शकेल. शी जिनपिंग यांनी अरुणाचल प्रदेश जवळील नींगची या रणनीतिकदृष्ट्या स्थित सीमावर्ती असलेल्या तिबेटच्या शहराला अनपेक्षित भेट दिली. ब्रह्मपुत्र नदीच्या पात्रात पाहणी करण्यासाठी त्यांनी तिबेटमधील यार्लंग झांग्बो नावाच्या न्यांग नदी वर असलेल्या पुलाला भेट दिली होती.
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 07/28/2021 - 07:17 नवीन
मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मॉरिशस दौरा केला. या दौर्‍यात झालेल्या कराराप्रमाणे मॉरिशसच्या अगालेगा बेटावर भारताचा गुप्त लष्करी तळ कसा बनवला जात आहे. बेटाच्या मध्यभागी नवीन धावपट्टी तयार केली गेली आहे. बेटांवर सैनिक राहण्यासारख्या सुविधा बनवल्या जात आहेत. भारतीय बांधकाम कामगारांच्या दोन स्वतंत्र वस्त्यांमध्ये अनेक इमारतीही बांधल्या गेल्या आहेत. याशिवाय दोन नवीन जेट्टी बांधल्या गेल्या आहेत. भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांनी या तळावरचा करार गोपनीय ठेवला आहे.मॉरिशसजवळील रियुनियन बेटावर फ्रान्सबरोबर संयुक्त गस्त घालण्यासाठी नुकताच भारताने हिंद महासागराच्या या भागात पी -8 आय विमान तैनात केले आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 07/28/2021 - 08:11 नवीन
गोपनीय आहे तर बाहेर कसा आला?
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 07/29/2021 - 06:23 नवीन
उपग्रह चित्रणातून अशा प्रकारच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. त्यातून एका विद्यापीठाने ही बातमी दिली.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/28/2021 - 12:33 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/case-against-organiser-of-wedding-functions-of-mlas-sons-for-covid-norms-violation-zws-70-2543667/
लोकांच्या गर्दी करण्यावर टीका करणार्‍यांचे ह्यावर काय म्हणणे असेल ?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 07/28/2021 - 17:50 नवीन
अजून किती दिवस 'गर्दी टाळा, लसवंत व्हा" वगैरे उपदेश करणार आहेत मिडिया व सरकार, काही कळत नाही. पुढारलेल्या जगातले अनेक देश मार्गाला लागले. चीनही लागला. भारताची अवस्था 'प्रश्नपत्रिकेतील प्रश्नच कळले नाहीत' अशी झाली आहे. केंद्र सरकार्तर्फे ऑन्लाईन बुकिंग करुन लस मिळत होती तोवर ठीक होते. राज्यांच्या हातात हे काम सोपवले गेले आणि आता "नगरसेवक/आमदार ओळखीचा आहे का?" अशा विचारणा सर्वत्र होत आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 07/28/2021 - 18:33 नवीन
नाही तसे काही नाही ... चीन चे माहीत नाही .. पण इथे (म्हणजे आम्रविकेत) पुन्हा मास्क लावा असे सांगत आहेत. गर्दी टाळा, लसवंत व्हा वगेरे वगेरे चालुच आहे ... राज्यांच्या हातात हे काम सोपवावे ही राज्यांचीच ईच्छा होती .. आता रडुन काय फायदा ...
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 07/28/2021 - 19:58 नवीन
पुढारलेल्या जगातले अनेक देश मार्गाला लागले
नक्की? ग्रीस, फ्रान्स, इटली, जर्मनी व अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतांत, आता त्यांनी मेडिकल स्टाफसाठी लसी घेणे सक्तीचे केले आहे. ह्यांतील काही ठिकाणी तर -- उदा. फ्रान्स-- अजूनही काही कठोर निर्बंध घातलेत- जसे, रेस्टॉरंट्स किंवा इतर सार्वजनिक ठिकाणे (सिनेमा हॉल) -- इथे प्रवेशण्यापूर्वी लस घेणे आवश्यक आहे, किंवा नुकताच केलेला टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. कालच, ह्यानिमीत्ताने फ्रान्स येथे सुरू असलेल्या दंगली, व जर्मनी येथे सुरू असलेली आंदोलने टी. व्ही. वर पाहिली-- कारण ह्या निर्बंधांमुळे म्हणे, लोकांच्या 'स्वातंत्र्यावर' गदा येते. ऑस्ट्रेलिया, द. कोरीया, मलेशिया येथेही कोव्हिड जोरदार अद्यापि सुरू आहे. इंडोनेशियांत तर गंभीर परिस्थिती उदभवली आहे. मग, नक्की कुठले पुढारलेले देश आता 'मार्गाला लागले'?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/29/2021 - 07:47 नवीन
पुढारलेल्या जगातले अनेक देश मार्गाला लागले. चीनही लागला. चीनची माहिती नाही परंतु इतर देशात असे नाहिय तुम्ही कोणत्या देशच्य माहिती वर अवलंबून म्हणताय माहित नाही अगदी जिथे प्रथम पासून कोविद % कमी आहे अश्या ऑस्ट्रेलिया देशात तर सतत "स्नॅप छोटे " लोकडवून, हार्ड लोकडवून चालू आहेत नु सौथ वेल्स ( सिडनी राजधानी ) येथे तर अजून ४ आठवडे लोकडवून आहे .. डेल्टा पसरत आहे ... युनाइटेड किंग्डम मध्ये येणाऱ्या " फ्रिडम डे" बद्दल म्हणताय तर तिथे रुग्णांचे प्रमाण कमी होत नाहीये, बोरिस बाबा चा हा निर्णय कडाचित उलट येऊन धुगणास चावेल कदचित ( इंग्रजी म्हणींचे भाषान्तर !) , जपान मध्ये पण परिस्थिती कुठे चांगली आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/29/2021 - 07:54 नवीन
माईसाहेब कुरसूंदीकर भारतात हि सर्व परिस्थितीत नीट हाताळली गेली नाही असे आपले म्हणणे असेल तर ते मान्य आणि त्यामुळे उद्वेगाने लिहिले असेल तर समजू शकतो परंतु 'गर्दी टाळा, लसवंत व्हा" हे अजूनही खरेच आहे आणि योग्य आहे . त्यावर कसली टीका? कि आपला थोतांड वाला " गा पै" झालाय !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/29/2021 - 08:34 नवीन
'गर्दी टाळा, लसवंत व्हा" हे अजूनही खरेच आहे आणि योग्य आहे
अगदी बरोबर....! गर्दी टाळलीच पाहिजे. साबण-पाण्याने येताजाता हातं धुतली पाहिजेत. मास्क वापरला पाहिजे. दुर अंतर ठेवून एकमेकांशी बोललं पाहिजे. पण लोक गंभीरपणेच घेत नाहीत. मला वाटतं लोकांचा यापेक्षा घंटानाद, थाळीनाद, दिवाबत्तीवर तर विश्वास नसेल. ;) >>>> कि आपला थोतांड वाला " गा पै" झालाय ! मानवाकडून तयार करण्यात आलेली कोणतीच गोष्ट शंभर टक्के योग्य असूच शकत नाही. अनेकदा अनेक गोष्टी काम करतात तर काही वेळा कामच करत नाहीत- अदर पुनावाला. (संदर्भ - बातमी) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/29/2021 - 12:07 नवीन
साथीचे रोग संपुष्टात येण्यासाठी ,रोगावर नियंत्रण मिळवण्यााठी जनतेचे सहकार्य महत्वाचे असते.फक्त सरकार ची ती जबाबदारी नाही.भारताने covid नीट हाताळला नाही हे अयोग्य आहे. कमी आरोग्य सुविधा,सामुग्री,प्रचंड लोकसंख्या असताना सुद्धा भारताने बर्या पैकी covid वर विजय मिळवला आहे. ज्या अमेरिकेचे गोडवे गाण्याची काही लोकांची फॅशन आहे . अमेरिकेला च सर्वात जास्त दणका covid नी दिला आहे. भारताने पण 40 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे .ती संख्या अमेरिकेच्या पूर्ण लोकसंख्या एवढी आहे .आणि ब्रिटन च्या लोकसंख्या पेक्षा जास्त आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 07/30/2021 - 06:05 नवीन
मोदी सरकारने वैद्यकीय शिक्षणसंस्थामध्ये इतर मागासवर्गीयांसाठी २७% व सवर्ण आर्थिक मागासांसाठी १०% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राखीव जागा देण्यामुळे त्या जातींची मते मिळत नाहीत, उलट इतर जाती विरोधात मत देतात व त्यामुळे ते सरकार पुढील निवडणुकीत सत्तेत परतत नाही असे १९९१ पासून जवळपास प्रत्येक निवडणुकीत दिसले आहे. विश्वनाथ प्रताप सिंहांपासून फडणवीसांपर्यंत अनेकांनी हे अनुभवले आहे। हे माहिती असूनही वेगवेगळे सत्ताधारी पक्ष हा आतबट्ट्याचा जुगार पुन्हा पुन्हा का खेळतात ते समजत नाही. https://m.timesofindia.com/home/education/news/centre-offers-27-obc-quota-10-for-ews-in-medical-admission/amp_articleshow/84862611.cms
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 07/30/2021 - 07:17 नवीन
न्यू जर्सी येथील टाउनशिप ऑफ एडिसनच्या महापौरांनी जुलैला 'हिंदू अत्याचार जागरूकता महिना' म्हणून मान्यता दिली आहे. हिंदू समाजासाठी हा एक प्रकारचा विजय आहे. अनेक अमेरिकी विद्यापीठे आणि महाविद्यालयाच्या परिसरांना हिंदुभोबियाच्या धोक्यांविषयी जागरूक करण्यासाठी आजही संघर्ष केला जात आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/30/2021 - 13:58 नवीन
अँटीहिंदू ॲक्टीविटी हा सोपा शब्द असताना हे काय नवीन नामकरण ?
  • Log in or register to post comments
न
निनाद Fri, 07/30/2021 - 08:16 नवीन
नक्षल समर्थक स्टॅन स्वामींच्या श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान मर्सी सेंथिल कुमार यांनी केले भाषण. त्या म्हणाल्या, 'ख्रिश्चन फादर आणि सिस्टर पास्टर्स यांनीच भारतात शिक्षण आणि तर्कसंगतता आणली. भारतातील बहुतेक शैक्षणिक प्रगती ख्रिस्ती लोकांनीच केली आहे. ख्रिश्चन फादर आणि सिस्टर पास्टर्स यांनाच देशभरातील राजकारण आणि कायदा शिकवण्याची परवानगी देण्यात यावी' अशी सूचना केली आहे. 'महाविद्यालयांमध्ये ख्रिश्चन संतत्वाबद्दल शिकवले पाहिजे. आम्ही ख्रिश्चन पास्टर सिस्टर्स ना समाजाचे नायक आणि नायिका म्हणून पाहिले पाहिजे, असे डीएमकेचे आमदार सेंथिल कुमार यांच्या पत्नी असलेल्या मर्सी सेंथिल कुमार यांनी सांगितले. एक पाऊल पुढे टाकत, मर्सीने असे सुचवले की देशात असा कायदा आणला जावा ज्यामध्ये कोणत्याही किंवा ख्रिश्चन फादर आणि सिस्टर पास्टर्स नन्स अटक करण्या आधी व्हॅटिकनच्या पोपची परवानगी आवश्यक असेल.'
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/30/2021 - 08:42 नवीन
मानवतेच्या बूरख्या आड हिंदू द्वेष करणारे आणि राष्ट्र विरोधी प्रवृत्ती लपल्या आहेत. ख्रिस्त धर्म slow poision धर्म आहे .उघड मानवता,समानता ह्याचा देखावा उभा करायचा आणि कट्टर धर्मवेड्या लोकांना लाजवेल अशी कृत्य करायची ह्यांची परंपरा आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 07/30/2021 - 13:25 नवीन
केरळचा सेरोसर्व्हे अहवाल सांगतो की केरळमध्ये सहा कोव्हिड केसेस पैकी एक केस डिटेक्ट होत आहे. राष्ट्रीय सरासरी आहे तेहेतीस मधली एक. https://timesofindia.indiatimes.com/city/kochi/kerala-detects-one-in-six-covid-cases-national-average-is-1-in-33/articleshow/84877969.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/31/2021 - 14:55 नवीन
“शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. शिवसेनेत माज असायलाच पाहिजे. मग कोणी माजोरडा म्हणो गुंड म्हणो किंवा मवाली. मला कितीतरी जण म्हणतात की हा गुंड आहे मवाली आहे. बाळासाहेब पण म्हणायचे आमची मवाल्यांची संघटना आहे. आम्ही मवाली होतो म्हणून महाराष्ट्र टिकला, आम्ही मवाली होतो म्हणून १९९२ साली हिंदुंचं रक्षण झालं.”, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले. - खरं आहे. हे आहेत म्हणूनच सूर्यमाला, नवग्रह, आकाशगंगा व हे अखिल ब्रह्मांड टिकलंय. भाजपनेच ही घाण महाराष्ट्रात पसरवली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/01/2021 - 19:12 नवीन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/01/2021 - 19:14 नवीन
Fake case filed against Nambi Narayanan at behest of ISI to stall ISRO’s cryogenic engine tech: CBI

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/02/2021 - 02:36 नवीन
अदानी लॉजिस्टिक्स लिमिटेडने लुधियाना येथील अंतर्देशीय कंटेनर डेपो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सात महिने शेतकरी आंदोलकांनी येथील कामकाज रोखले आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही पंजाब सरकार ने ही नाकाबंदी हटवली नाही. त्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क अदानी ग्रुपने 2017 मध्ये लुधियाना आणि त्याच्या आसपासच्या उद्योगांना रेल्वे आणि रस्त्याद्वारे कार्गोच्या निर्यातीच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी स्थापन केले होते. आंदोलकांनी गेटसमोर ट्रॅक्टर ट्रेलर उभा केला, ज्यामुळे गेटमधून वाहनांची ये-जा थांबली. अजूनही आंदोलक सुविधेतील कर्मचाऱ्यांना आवारात येऊ देत नाहीत. पंजाब सरकारने संरक्षणही दिले नाही. या निर्णयामुळे ४०० नोकऱ्या गमावण्याव्यतिरिक्त, लॉजिस्टिक्स डेपो बंद केल्याने ७०० कोटींच्या रेल्वे वाहतूक, जीएसटी, सीमा शुल्क आणि इतर करांच्या रूपाने पंजाब राज्याच्या तिजोरीला नुकसान होईल. पुढे अंदाज आहे की या भागातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 08/02/2021 - 02:44 नवीन
केरळ सरकारने 'सुपर स्प्रेडर' ईदच्या विश्रांतीनंतर ओणमच्या एक आठवड्याआधीच हिंदूंवर निर्बंध लादले आहेत. केरळमधील धर्मनिरपेक्ष कम्युनिस्ट सरकारने राज्यातील दबावाला बळी पडून राज्यातील नागरिकांच्या जीवाला धोका पत्करून ईद-उल-अधा सण साजरा करण्यास परवानगी दिली होती. केरळ सरकारने १७ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बकरीद सणासाठी शिथिलतेची घोषणा केली होती. केरळमध्ये त्यावेळेस सर्वाधिक नवीन कोविड प्रकरणांची नोंद होत असतानाही हा निर्णय घेतला गेला होता. मात्र आता कोव्हिड कमी होत असतांनासुद्धा हिंदू सण ओणम आल्यावर निर्बंध लादले गेले आहेत.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/03/2021 - 05:13 नवीन
लिबर्टी तामिळला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, प्रिस्ट जेगाथ गॅस्पर राज म्हणाले की अनेक संस्था पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हद्दपार करण्यासाठी पाश्चिमात्य माध्यमांशी सहकार्य करत आहेत. ते म्हणाले की अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि इतर उदारमतवादी लोकशाही जागतिक शक्ती जसे की द वॉशिंग्टन पोस्ट, ले मोंडे, गार्डियन आणि इतर संस्थांसारख्या परदेशी-आधारित माध्यमांच्या मदतीने विरोधक पंतप्रधान मोदींना पराभूत करतील. २५ जुलै रोजी प्रकाशित झालेल्या मुलाखतीचा उतारा येथे तमीळ भाषेत उपलब्ध आहे. याचा अर्थ हा जागतिक कटाचा भाग असावा.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/03/2021 - 05:23 नवीन
जवळपास एक महिन्यापासून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी सोहळा साजरा होत आहे. भारतातील उत्सवाची सुरुवात द हिंदूच्या संपूर्ण पानांच्या अभिनंदन जाहिरातीने झाली होती. एन राम हे या डाव्या वृत्तपत्राचे संपादक मालक आहेत. ही सोहळा मालिका पुढे नेत अनेक डाव्या नेत्यांनी चीनच्या कम्युनिस्ट सरकारचा गौरव केला आहे. सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआयचे डी राजा आणि इतर काही नेते चीनी दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. भारताच्या डाव्या पक्षांनी नेहमीच चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या विश्वासाचे रक्षण केले आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांचे गलवान भागात चकमकी झालेल्या असल्या तरी कम्युनिस्ट चीनी समारंभात उघडपणे मिरवत आहेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 08/03/2021 - 06:07 नवीन
म्हणूनच कम्युनिस्ट हा शब्द जरी ऐकला तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. जगातील सगळ्यात हलकट आणि नीच जमात आहे ती. हिटलरला लाजवतील अशी हत्याकांडे त्या लोकांनी घडवून आणली आहेत आणि तरीही अमेरिकेतील मोठ्यामोठ्या विद्यापीठातील प्रोफेसर लोक त्याच कुजक्या आणि सडक्या विचारांची प्रत्येकवेळी 'but it was not real communism' असे म्हणत तळी उचलून धरत असतात. जर कम्युनिस्ट माणूस आणि विषारी साप या दोघांपैकी एकाला वाचविणे बंधनकरकच असेल तर सापाला वाचवावे. मागे एकदा फेसबुकवर कोणीतरी प्रश्न विचारला होता की जगात कोणत्या साथीने सर्वाधिक बळी घेतले आहेत. कोणी उत्तर दिले प्लेग, कोणी म्हटले कॉलरा वगैरे वगैरे. पण माझे उत्तर होते- कम्युनिझम. प्लेग, कॉलरा वगैरे आजार शरीराचे आहेत. त्यावर औषधाने उपचार होऊ शकतात. पण कम्युनिझम हा मनाचा आजार आहे. त्या विषाणूने एकदा एखाद्याला ग्रासले तर त्यातून सुटका होणे फारच कठीण. मग त्यातूनच हजारो-लाखोंची हत्याकांडे घडवून आणणारे नराधम फार मोठे संतपुरूष आहेत असा भ्रम उत्पन्न होतो. आणि अशा विषाणूने एखाद्या पंतप्रधानाला अंशतः जरी ग्रासले तरी मग अशा नराधमांना आपल्या घरी सरकारी पाहुणे म्हणून बोलावले जाते आणि त्यांचे आदराथित्य केले जाते.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/03/2021 - 08:26 नवीन
जपानने आपल्या कंपन्यांना चीनमधून निघून त्यांचे कारखाने उभारण्यासाठी नवीन ठिकाणांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी जपानने जपानच्या आर्थिक उत्पादनाच्या २० टक्के इतक्या किमतीचे भव्य पॅकेज मंजूर केले आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरस महामारीमुळे झालेल्या पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने जपानला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे जपानने हे मूलभूत पाऊल उचलले. या निर्णयामुळे चीन मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गमावेल. चीन आणि जपान तसे पारंपारीक शत्रू देश आहेत. चीनी लोक जपान्यांचा द्वेष करतात. याच वेळी भारत आणि व्हिएतनाम आणि बांगलादेश ही राष्ट्रे जपानला आकर्षित करण्याच्या या संधीकडे डोळे लावून बसले आहेत. स्वस्त मजूर आणि जबरदस्त उत्पादन यंत्रणा म्हणून भारत जपानसाठी सर्वोत्तम देश आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 08/03/2021 - 08:28 नवीन
भारत अमेरिका यांच्यात २००७-०८ मध्ये करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीननं भारतातील डाव्यांना हाताशी धरलं होतं. भारतातील डाव्या नेत्यांच्या माध्यमातून चीननं देशात विरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा भारताचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केला आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-tried-to-use-left-to-scuttle-n-deal-indo-us-nuclear-deal-vijay-gokhale-book-china-opposition-bmh-90-2550236/
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 08/03/2021 - 08:49 नवीन
तिसऱ्या जगातील देश ज्यावर केजीबीने शीतयुद्धाच्या काळात सर्वात जास्त ऑपरेशन प्रयत्नांचा विचार केला - तो भारत होता. या संदर्भात द मित्रोखिन आर्काइव्ह II: द केजीबी आणि द वर्ल्ड हे क्रिस्टोफर अँड्र्यू, वासिली मित्रोखिन लिखित पुस्तक वाचण्यासारखे आहे. https://mitrokhinarchiveii.blogspot.com/ येथे त्याचा धक्कादायक भारत विषयक भाग उपलब्ध आहे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 11 hours ago
  • सुंदर !!
    1 day 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा