Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - जुलै २०२१

च
चंद्रसूर्यकुमार
Fri, 07/02/2021 - 18:59
🗣 171 प्रतिसाद
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. rumsfeld त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले. १९७७ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर अध्यक्ष झाल्यानंतर रम्सफेल्ड जी.डी.सर्ल या खाजगी औषध कंपनीचे सी.ई.ओ बनले. १९८१ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन अध्यक्ष झाल्यानंतर १९८३ मध्ये अध्यक्षांनी त्यांना इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटायला पाठवले होते. त्यावेळी इराण-इराक युध्द चालू होते आणि इराक अमेरिकेचा मित्रदेश होता आणि सद्दाम हुसेन अमेरिकेचा महत्वाचा साथीदार होता. डॉनल्ड रम्सफेल्ड यांना जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष झाल्यावर २००१ मध्ये परत एकदा संरक्षणमंत्री म्हणून नेमले गेले. २००२-०३ मध्ये इराकमध्ये अतिसंहारक शस्त्रे आहेत म्हणून बुश प्रशासनाने खोटारडेपणा केला. त्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्याबरोबरच संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे पण त्या खोटारडेपणात होते. २० वर्षांपूर्वी ज्या सद्दाम हुसेनला रम्सफेल्ड भेटले होते तोच माणूस किती नालायक आहे याचा प्रचार करण्यात ते पुढे होते. बुश २००४ मध्ये दुसर्‍यांदा निवडून आले. दुसर्‍या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदावर कॉलिन पॉवेल यांच्याऐवजी कॉन्डोलिझा राईसना नेमले पण डॉनल्ड रम्सफेल्डना संरक्षणमंत्रीपदावर कायम ठेवले. २००३ चे इराक युध्द अमेरिकन जनतेत खूप अलोकप्रिय ठरले. २००४ मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली तेव्हापर्यंत तितकी प्रतिक्रिया आली नव्हती पण २००५-०६ मध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा इराकमध्ये हकनाक बळी गेल्यानंतर ती प्रतिक्रिया जास्त उमटली. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आणि त्याबद्दल इराक युध्दाची घोडचूक जबाबदार ठरविण्यात आली. त्यानंतर रम्सफेल्ड यांना संरक्षणमंत्रीपदावरून काढण्यात आले. कॉलीन पॉवेल यांनी नंतरच्या काळात इराक युध्द आणि त्यावेळी केलेला खोटारडेपणा ही चूक होती असे निदान तोंडदेखल्या तरी म्हटले पण रम्सफेल्ड यांनी ते पण म्हटले होते असे वाटत नाही. बुश प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ आणि नंतर भारतात संसदभवनावर हल्ला आणि त्यानंतर कालुचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस बुश प्रशासन भारताला 'संयम ठेवा' हा उपदेशाचा डोस पाजत होते. तसे करण्यातही डॉनल्ड रम्सफेल्ड पुढे होतेच. ९/११ नंतर आणि भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण असताना रम्सफेल्ड भारतात आले होते. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंगांशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जसवंतसिंग फारसे खुषीत दिसत नव्हते असे टिव्ही चॅनेल्सवर बघितल्याचे आठवते. म्हणजे कदाचित संयम ठेवा हा 'दम' रम्सफेल्ड यांच्याकडून दिला गेला असावा ही शक्यता आहे. डॉनल्ड रम्सफेल्ड कितीही नालायक असले तरी त्यांची एक गोष्ट मला आवडायची असे नसले तरी भावायची. आपण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सत्ताधारी आहोत हा एक प्रकारचा अहंकार किंवा दर्प म्हणा असा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचा त्यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच एकदम 'डॉमिनेटिंग' किंवा खरं तर 'बुलिंग' करणारे असायचे. असो. डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या इतिहासातील नालायक मंत्र्यांपैकी एक अध्याय संपला. आता हेनरी किसिंजरचा नंबर कधी लागतो ते बघायचे. बांगलादेशात याह्याच्या अत्याचारांना पाठीशी घालून लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी नरकात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली गेली असेल असे नेहमी वाटते. रम्सफेल्डही फार वेगळे नव्हते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 53342 views

🗣 चर्चा (171)
R
Rajesh188 Tue, 07/13/2021 - 16:38 नवीन
एक mbbs doctor निर्माण करण्यासाठी कमी १ करोड खर्च होतो. गरीब पण अतिशय बुद्धिमान मुल सरकारी कॉलेज मधून किरकोळ खर्चात डॉक्टर होतात. बुध्दी कमी आणि पैसे जास्त आणि बुध्दी जास्त आणि पैसे कमी. मग उत्तम दर्जा चे डॉक्टर कोठून निर्माण होतात. खासगी कॉलेज मधून की सरकारी.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 07/15/2021 - 05:13 नवीन
१. एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांनी पुण्याजवळीत जमिन व्यवहारात केलेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी न्यायाधीश दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे अशी बातमी आली आहे. त्यांना मंत्रीमंडळातून काढायचा निर्णय योग्य होता असे वरकरणी तरी वाटते. २. प्रीतम मुंडेंना मंत्रीमंडळात स्थान न दिल्यामुळे मुंडे समर्थक पदाधिकार्‍यांनी राजीनामे देऊन दबाव बनवायचा प्रयत्न केला. अर्थात त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वतः मोदींनी गुजरातमध्ये केशुभाई पटेल, काशीराम राणा वगैरे बलदंड नेत्यांना शिंगावर घेऊन त्यांचे साम्राज्य संपवले होते. त्यापुढे प्रीतम-पंकजा मुंडे अगदीच चिल्लर आहेत. त्यांची दखलही मोदी घेतील असे वाटत नाही. प्रीतम मुंडे गोपीनाथरावांची कन्या म्हणून दोनदा लोकसभेवर निवडून गेल्या. तसे पूर्वजांच्या लोकप्रियतेवर (पुण्याईवर मुद्दामून म्हणत नाही) राजीव गांधी आणि राहुल गांधी पण निवडून गेले होते. पूर्वीच्या काळात अशी पूर्वजांची लोकप्रियता कित्येक वर्षे उपयोगी पडत असे. आता मात्र तो कालावधी कमी झाला आहे हे नक्की. काही काळ पूर्वजांच्या लोकप्रियतेचा फायदा होईलही पण त्यानंतर स्वतःच्या हिंमतीवरच पुढची वाटचाल असते. १६ व्या लोकसभेत प्रीतम मुंडेंनी नक्की काय केले याविषयी लोकसभेच्या संकेतस्थळावर शोधाशोध केली. कोणत्याही महत्वाच्या चर्चेत त्यांनी भाग घेतला आहे असे दिसले नाही. किंवा ऑक्टोबर २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेल्यानंतर थेट २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारीची घोषणा झाली या मधल्या काळात कधी प्रीतम मुंडेंनी काही केले आहे असे विशेष ऐकायलाही आले नाही. मग फक्त गोपीनाथरावांची मुलगी या एका पात्रतेवर मंत्रीपदावर दावा त्यांचा असेल तर मोदी तरी ते नक्कीच मान्य करणार नाहीत. चार महिन्यांपूर्वी गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात अहमदाबाद महापालिकेसाठी स्वतः नरेंद्र मोदींच्या पुतणीला उमेदवारी दिली गेली नव्हती. जर स्वतःच्या लोकप्रियतेचा असा राजकीय फायदा मोदी स्वतःच्या नात्यातील लोकांना महापालिका निवडणुकीतही करून देत नसतील तर अन्य कोणाच्या कन्येला असे थेट केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल ही शक्यता शून्य. तीच गोष्ट पंकजा मुंडेंची. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस गोपीनाथराव हयात असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. पण ते अचानक गेले. मग तो वारसा आपल्याला थेट मुख्यमंत्री बनवेल अशी अपेक्षा त्यांची होती हे नक्की. स्वतःचे कर्तुत्व काय वगैरे गोष्टी फाट्यावर मारायच्या. इंदिरा गांधींचा मुलगा म्हणून राजीव थेट पंतप्रधान बनले त्याप्रकारे गोपीनाथरावांची मुलगी म्हणून आपल्याला मुख्यमंत्री बनवावे ही अपेक्षा त्यांची होती. अर्थातच मोदी त्याला धूप घालणे शक्य नव्हते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीसांनी त्यांना परळीतून पाडले हे अगदी मान्य केले तरी ते अंतर थोडेथोडके नाही तर २५ हजारांचे होते. तसेच दुसरा कोणी येऊन यांना यांच्या हक्काच्या मतदारसंघातून इतक्या मतांनी पाडू शकत असेल तर त्यांचा पायाच मुळात ठिसूळ होता हे नक्की. मतदारांना गोपीनाथरावांचा वारसदार म्हणून मत द्यायचेच ठरविले असेल तर त्यासाठी धनंजय मुंडे अधिक योग्य वाटले हे सत्य कसे नाकारणार? भाजपत अशी अमक्याचा मुलगा-मुलगी म्हणून सत्तापद हवे अशाप्रकारची संस्थाने निर्माण होत असतील तर ती खतम व्हायलाच हवीत. स्वतः मोदींनी केशुभाई पटेल या बलदंड नेत्याचे साम्राज्य उध्वस्त केले होते त्यापुढे हे इतर लोक म्हणजे अगदीच फुटकळ.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 07/15/2021 - 06:14 नवीन
भाऊ तोरसेकरांनी कालच मुंडे भगिनींच्या नाराजीचा समाचार येथे घेतला आहे. तेही तुमच्याप्रमाणे हेच म्हणतात की मोदी असल्या निव्वळ घराणेशाहीवर कसले क्लेम्स मागणार्‍यांना कसलीही दाद देणार नाहीत. आपण सांगितलेलीच गुजरातमधली उदाहरणे त्यांनीही दिलेली आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/15/2021 - 06:49 नवीन
१) झोटिंग समितीच्या अहवालाच्या ज्या बातम्या पूर्वी आल्या होत्या आणि आता येत आहेत त्यात काहीतरी गडबड आहे. २०१७ मध्ये हा अहवाल आल्यानंतर ऑक्टोबर २०१९ पर्यंत हा अहवाल फडणवीसांनी उघड केला नाही. अगदी विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनातील आपल्या शेवटच्या भाषणातही खडसेंनी हा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी केली होती. त्या अहवालात खडसेंना क्लीन चिट दिली आहे अशी बातमी माध्यमांमध्ये आली होती. कदाचित त्यामुळेच तो अहवाल जाहीर झाला तर आपले निर्दोषत्व सिद्ध होईल असे खडसेंना वाटले असावे. खडसे निर्दोष सिद्ध झाले तर त्यांना उमेदवारी नाकारता येणार नाही असे कदाचित फडणवीसांना वाटले असावे म्हणूनही तो अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा. तो अहवाल मंत्रालयातून गहाण झाला अशी मागील आडवड्यात बातमी होती. त्यावर वृत्तवाहिन्यांवर समूह चर्चा सुद्धा झाली होती. मंत्रालयात अजूनही फडणवीसांंची काही माणसे आहेत व त्यांनीच तो अहवाल गहाळ केला असावा, असे तारे राष्ट्रवादीच्या सदासंतप्त विद्या चव्हाणांनी तोडले होते. आता माध्यमे सांगताहेत की त्या अहवालात खडसेंवर ठपका ठेवलेला आहे. यात खरे खोटे काय हे समजणे अवघड आहे. कदाचित राष्ट्रवादीसाठी आता खडसेंची उपयुक्तता संपली असावी, म्हणून अशा बातम्या सोडल्या जात असाव्या. २) मुंडे भगिनींचे फारसे कर्तृत्व नाही हे बरोबर आहे. परंतु मंत्रीपदावर विराजमान केलेल्या भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, दानवे, राणे इ. चे तरी कर्तृत्व काय आहे? भाजपमध्ये बंड करणाऱ्यांंना किंमत नसते व ते बाहेर पडून एखाद्या मोठ्या पक्षात न जाता स्वतंत्रपणे लढले तर त्यांना किंंमत नसते हा इतिहास आहे. पूर्वी अण्णा डांगे, वाघेला, केशुभाई पटेल, कल्याणसिंह, यशवंत सिन्हा इ. नी हे अनुभवले आहे. त्यामुळे मुंंडे भगिनींच्या नाराजीला काडीचीही किंमत मिळणार नाही. उद्या फडणवीसांनी बंड केले किंवा ते बाहेर पडून पक्ष वगैरे काढला तर त्यांची सुद्धा अशीच अवस्था होईल, कारण भाजपत व्यक्तीला किंमत नसून फक्त पक्षाला किंमत असते. फडणवीस म्हणजे अवतारी महापुरूष अशी समजूत असणाऱ्या भक्तांनी हे समजून घेणे आवश्यक आहे कारण फडणवीस जे काही आहेत ते स्वकर्तुत्वाने नसून फक्त पक्षामुळे आहेत. अशा परिस्थितीत पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांंना संपवून फडणवीसांचा मार्ग निष्कंटक झाला असला तरी त्यामुळे पक्ष दुर्बल होत आहे हे अजून भाजप नेतृत्वाला सुद्धा समजलेले दिसत नाही. मुंडे भगिनींना मागे खेचून त्यांंच्याबरोबर पक्षाचे सुद्धा नुकसान होणार आहे. पवार, जगनमोहन रेड्डी, ममता वगैरेंंनी बाहेर पडून स्वत:ला प्रस्थापित करून दाखविले. पवार स्वबळावर पक्षाला सत्तेत आणू शकले नसले तरी बऱ्यापैकी जागा मिळवितात. माझ्या आठवणीत भाजपत असा एकही नेता नाही ज्याने आपला वेगळा पक्ष स्थापन करून बऱ्यापैकी यश मिळवले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 07/15/2021 - 12:28 नवीन
परंतु मंत्रीपदावर विराजमान केलेल्या भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, दानवे, राणे इ. चे तरी कर्तृत्व काय आहे?
इतरांविषयी मला माहित नाही पण डॉ.भागवत कराड एकदम लहान गावातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन एम.बी.बी.एस आणि एम.डी झाले आहेत. तसेच स्वतःच्या लोकसंग्रहाच्या आधारावर ते सुरवातीला औरंगाबाद महापालिकेवर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. असा माणूस पक्षाला उपयोगी पडू शकेल हे हेरून गोपीनाथ मुंडेंनी त्यांना भाजपमध्ये आणले. त्यानंतर जवळपास २५ वर्षे ते भाजपचे संघटनेचे काम करत आहेत. स्वतः मोदी कित्येक वर्षे संघटनेत होते आणि देशभरातील संघटनेत असलेल्यांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क असतो आणि त्यांचा लोकसंग्रह विलक्षण आहे. त्यातून ते चांगले आहेत आणि मंत्रीपदाची संधी दिल्यास चांगले काम करू शकतील असे मोदींना वाटले असायची शक्यता आहे. संघटनेत चांगला असलेला माणूस चांगला प्रशासक होऊ शकेलच असे नाही हे केशुभाई पटेलांच्या उदाहरणावरून समजून येईलच. पण त्यांना मंत्री म्हणून संधी द्यायला हवी असे मोदींना वाटले असायची शक्यता आहे. आताच्या मंत्रीमंडळ फेररचनेत मंत्रीमंडळातून वगळले गेलेले ओरिसाचे प्रतापचंद्र सरंगी पण असेच संघटनेतले होते. त्यांना मोदींनी मंत्री म्हणून संधी दिली होती. कदाचित मोदींच्या अपेक्षेला ते पुरे पडले नसावेत म्हणून त्यांना मंत्रीमंडळातून वगळलेले दिसते. त्याप्रमाणेच भागवत कराड यांची मंत्री म्हणून कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही तर त्यांनाही मोदी वगळतीलच.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/26/2021 - 12:53 नवीन
पवार स्वबळावर पक्षाला सत्तेत आणू शकले नसले तरी बऱ्यापैकी जागा मिळवितात
पवारांनी कोलाम्ट्याउड्या मारायचे बंद केले तर ते शक्य आहे. अन्यथा सोनियांना विरोध करायला नवा पक्ष स्थापन करायचा आणि त्यांच्याच सोबत मांडवली करायची. पवारांनी कधी कोनत्या विरोधी पक्षाला थेट अंगावर घेतल्याचे ऐकीवात नाही. त्यामुले पवार हे बारामती सोडले तर इतरकुठेही एक हाती सत्ता आणी शकतील असे विश्वासार्ह उरलेले नाहीत
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/15/2021 - 10:32 नवीन
भाजपत अशी अमक्याचा मुलगा-मुलगी म्हणून सत्तापद हवे अशाप्रकारची संस्थाने निर्माण होत असतील तर ती खतम व्हायलाच हवीत. सही रे सही ! आणि त्याबरोबर एकूणच राजकारणातील हि प्रथा कमी झाली तर बरेच (सर्व पक्षात ) आता पुढची या विषयातील गम्मत दिसेल ती शरद पवार राजकारणातून निवृत्त होतील तेव्हा मुलगी , पुतण्या कि जसे इंग्लडात एक मतप्रवाह जाते कि राणी "निवृत्त" झाली कि एक पिढी गाळून विल्यम लाच करा राजा ...!!! मग महाराष्ट्रात हि हेंहच लागू करणार काय ? क्रमांक कोणाचा? पार्थ कि रोहित ! लगे रहो मुन्नाभाई आपण अंकित आहोत त्यामुळे आपल्याला राजा आणि राजपुत्र पाहिजेतच .. तेवहा बसा लेको दशकानुधके असेच जगातील सर्वात मोठी लोकशाही झिंदाबाद !
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 07/15/2021 - 07:24 नवीन
उद्या फडणवीसांनी बंड केले किंवा ते बाहेर पडून पक्ष वगैरे काढला तर त्यांची सुद्धा अशीच अवस्था होईल, कारण भाजपत व्यक्तीला किंमत नसून फक्त पक्षाला किंमत असते.
अगदी खरे आहे.
फडणवीस म्हणजे अवतारी महापुरूष अशी समजूत असणाऱ्या भक्तांनी हे समजून घेणे आवश्यक आहे
बरोबर.
कारण फडणवीस जे काही आहेत ते स्वकर्तुत्वाने नसून फक्त पक्षामुळे आहेत.
मग कुठलेही बुजगावणे निव्वळ भाजपामधे आहे, म्हणून ते मोठे होते का? मग खडसेंचे काय झाले? मुंडे भगिनी काय करताहेत ? मी फडणवीसांचा भक्त वगैरे नाही. मात्र ते चांगले कार्य करताहेत, हे नाकारता येणार नाही. आणी म्हणूनच त्यांचे पक्षष्रेष्ठी त्यांचे मत विचारात घेतात. ह्याच आठवड्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीतील वृत्तांताचा काही अंश, जो मुंडे भगिनींच्या सम्दर्भातला आहे, तो इथे पहावा. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे, नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. त्यासाठी त्याला जनताभिमुख होऊन बरेच कष्ट करावे लागतात. हेच थोडेफार, ह्या वृतांतानुसार त्यांना मोदींनी सुनावले आहे, असे दिसते.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/15/2021 - 10:37 नवीन
",,,, कारण भाजपत व्यक्तीला किंमत नसून फक्त पक्षाला किंमत असते." हे असेच राहावे असे मनि वाटते पण सध्या भाजपच काही ठिकाणी आयाराम / गायराम पक्ष होतोय त्यामुळे भीती हि कि हा भाजपचाच गुण हळू हळू नामशेष होईल कि काय
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/15/2021 - 11:00 नवीन
मग कुठलेही बुजगावणे निव्वळ भाजपामधे आहे, म्हणून ते मोठे होते का? मग खडसेंचे काय झाले? मुंडे भगिनी काय करताहेत ? मी फडणवीसांचा भक्त वगैरे नाही. मात्र ते चांगले कार्य करताहेत, हे नाकारता येणार नाही. आणी म्हणूनच त्यांचे पक्षष्रेष्ठी त्यांचे मत विचारात घेतात. मुळात मोठे म्हणजे भाजपत मोठे का सर्वत्र मोठे? भाजपत कितीही मोठे असले तरी भाजपबाहेर ते शून्य असतात अशी अनेक उदाहरणे आहेत व फडणवीसही त्यास अपवाद नाहीत. भाजपत कितीही मोठे असले तरी एकदा पक्षाने लाथाडायचे ठरविले की त्यांचा पालापाचोळा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या जातीच्या मतांसाठी बनावट अहवाल तयार करून सवलतींचा वर्षाव करून इतर जातींंचा बळी देणे, खुर्ची टिकविण्यासाठी सहकाऱ्यांचा विश्वासघात करणे, भ्रष्टांना पाठीशी घालणे, अत्यंत भ्रष्ट जातीयवादी आयारामांची खोगीरभरती करणे, युतीसाठी लाचारी करून पक्षाचे नुकसान करणे इ. कार्ये निदान मी तरी मोठी कार्ये मानत नाही. ह्याच आठवड्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीतील वृत्तांताचा काही अंश, जो मुंडे भगिनींच्या सम्दर्भातला आहे, तो इथे पहावा. भाऊंनी म्हटल्याप्रमाणे, नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. त्यासाठी त्याला जनताभिमुख होऊन बरेच कष्ट करावे लागतात. हेच थोडेफार, ह्या वृतांतानुसार त्यांना मोदींनी सुनावले आहे, असे दिसते. बीड जिल्ह्यातील पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात का असे मोदींनी पंकजा मुंडेंंना विचारले म्हणे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी, नवीन मंत्री झालेल्यांंपैकी किती जण या व्यक्तीला भेटले असावे? नुसती स्वतःच्या समाजाची काळजी घेत कुठलाही नेता मोठा होत नसतो. तसेच मतांसाठी एखाद्या विशिष्ट समाजाची काळजी घेत सुद्धा (ते सुद्धा लबाडी करून आणि इतर समाजांवर अन्याय करून) कुठलाही नेता मोठा होत नसतो. अवांतर - बाकी भाऊ तोरसेकरांचे राजकीय अंदाज आता फारसे खरे ठरत नाहीत असे जाणवित आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 07/15/2021 - 11:04 नवीन
+१ भाउंचा निष्पक्षपणा हळू हळू संपत असुन ते पुर्ण भाजपा समर्थक झाले आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 07/15/2021 - 14:01 नवीन
श्रीगुरूजी व सौंदाळा ह्या दोघांना एकाच प्रतिसादात उत्तरे देत आहे. श्रीगुरुजी, तुम्ही फडवणीसांवर इतकी त्वेषाने माहितीपूर्वक टीका वेळोवेळी करत असता, तेव्हा लवकरच कधीतरी मोदीशा तुम्हालाच पुढील निवडणूकांच्या विचारविनीमयासाठी बोलावतील, असे आता वाटू लागले आहे. कदाचित तुम्हालाच ते फडणवीसांच्या जागेवर बसवतीलही! तसे त्यांनी केलेच तर आम्ही तुमच्या चुका काढण्यासाठी उत्सुकतेने, बाह्या सरसावून तयार राहूच! अर्थात, 'काय करणार, हाच सध्या सर्वांत उत्तम नेता दिसतो' वगैरे नेहमीच्या कॅव्हिट्स सुरूवातीच्या हनीमून काळात वापरू. पण त्यानंतर तयार रहा, बरं. :) :) :) सौंदाळा, तसे असेलही. पण येथे त्यांनी केवळ वस्तुस्थिती मांडली आहे, असे दिसते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/15/2021 - 14:34 नवीन
फडणवीसांवर माझा राग का आहे हे मी अनेकदा सोदाहरण स्पष्ट लिहिले आहे. त्यांच्या काही निर्णयांचा मला थेट फटका बसला आहे व भविष्यात बसेल. मला त्यातून जे दिसते व वाटते ते मी लिहितो. त्यातील काही आडाखे खरे ठरतात, काही चुकतात. त्यामुळे इतरांनी सुद्धा मुद्द्यांंवर बोलावे अशी अपेक्षा करतो. अर्थात मुद्देच संपले असतील तर . . .!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 07/15/2021 - 12:09 नवीन
बीड जिल्ह्यातील पद्मश्री मिळालेल्या व्यक्तीला तुम्ही भेटला आहात का असे मोदींनी पंकजा मुंडेंंना विचारले म्हणे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी, नवीन मंत्री झालेल्यांंपैकी किती जण या व्यक्तीला भेटले असावे?
पद्मश्री मिळालेले अनेक लोक असतात. म्हणजे भाजपच्या सगळ्या लोकांनी पद्मश्री मिळालेल्या व्यक्तींना भेटायला जायचे असा त्याचा अर्थ नाही. मुद्दा हा की पद्मश्री मिळालेले हे सद्गगृहस्थ पंकजांच्याच मतदारसंघाच्या आसपास कुठेतरी आहेत. त्यामुळे त्यांना पंकजा भेटल्या आहेत का हा प्रश्न आला. मंत्रीमंडळ विस्तारात किती लोक परळीच्या आसपासचे आहेत? त्याहून महत्वाचे म्हणजे असले प्रश्न कधी शब्दशः घ्यायचे नसतात. पंकजांचा सामान्य मतदारांशी संपर्क तुटलेला आहे हे सूचित करायला मोदींनी हे एक उदाहरण का वापरले नसेल? म्हणजे भाजपच्या लोकांनी कोणाकोणाला पद्मश्री मिळाली आहे त्याची यादी घेऊन त्यातील सगळ्यांना भेटायला जावे असे मोदींना म्हणायचे नसावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/15/2021 - 10:11 नवीन
वरून हुकूम च आलं आहे घराणेशाही विषयी पोस्ट करत जा. त्याची अंमलबजावणी करावीच लागते. बी जमिनीत टाकल्यावर फळ यायला काही दिवस जावे लागतात बी पुरले की लगेच फळ येत नाही. त्या प्रमाणे घराणेशाही निर्माण होण्यासाठी किती तेरी दशक पक्ष सत्ताधारी असावा लागतो. घराणेशाही ही अनेक दशकं हमखास जिंकणाऱ्या पक्षात च निर्माण होते. अपयशी पक्षात निर्माण होत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/15/2021 - 10:24 नवीन
Bjp वाले घराणेशाही विषयी बोलतात तेव्हा लय मज्जा वाटते. १८८ आपल्याला मज्जा वाटते हे वाचून बाकी अनेकांना हि "मज्जाच "वाटते तुम्हाला काँग्रेस म्हणायचे आहे का? (चाचा, इंदू , राजू, सुनबाई आणि पप्पू ) खर तर तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले तर तो सुदिन,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/15/2021 - 10:32 नवीन
श्री श्री प्रभू १८८ चा कोणताही प्रतिसाद वाचला की मला मज्जाच वाटते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/15/2021 - 10:33 नवीन
सरळ सोप्या शब्दात लीहले आहे अनेक दशक जो राजकीय पक्ष सत्तेत असतो त्या पक्षातच घराणे शाही निर्माण होते. काँग्रेस स्वतंत्र मिळायचा अगोदर पण भारतीय राजकारणात दबदबा ठेवून होती आणि स्वतंत्र नंतर ६० ते ६५ वर्ष सत्तेत होतो विरोधक अगदी कमजोर होते. त्या मुळे काँग्रेस मध्ये घराणेशाही निर्माण झाली . Bjp हा किंवा त्यांची पितृक संस्था ह्यांचा दबदबा भारतातील लोकात खूप कमी होतं . आणि आता ते सत्तेवर आहेत. त्यामुळे ह्या पक्ष घराणेशाही निर्माण करण्याच्या स्टँडर्ड मध्ये . मला वाटतं हे अडाणी लोकांना पण समजेल .
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 07/15/2021 - 23:45 नवीन
सरळ सोप्या शब्दात लीहले आहे अनेक दशक जो राजकीय पक्ष सत्तेत असतो त्या पक्षातच घराणे शाही निर्माण होते. काँग्रेस मधील घराणेशाही चा असा पाठपुरावा "अजब तर्कातून" निर्माण करणे" याला खूप हुशारी लागते पण काय आहे बरेचदा खूप हुशार माणसाची अशी विधाने आमचयासारख्या "अडाणी " डोक्यावरून जातात बर गेलं बाजार १८८ हे हि सांगावे कि आपण जो तर्क लढवला आहे तो सगळ्या जगातील राज्यकारणाला लागू पडतो का? कारण असे कि इतर देशात १५-२० वर्षे सलग पंतप्रधान पॅड एकाच व्यक्ती कडे राहिलेल दिसत तिथे नाही घराणेशाही दिसली ते?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 07/16/2021 - 12:44 नवीन
आज दहावीचा निकाल लागला आहे. ९९.५% विद्यार्थी पास झाले आहेत. हा निकाल पूर्ण अंतर्गत मूल्यांकनावर झाला होता त्यामुळे शाळांमध्ये पूर्ण वस्तुनिष्ठ मूल्यमापन न होता भरमसाठ गुणांची खिरापत वाटली गेली असायची शक्यता आहे. तसे झाले असल्यास पुढे खूपच प्रश्न निर्माण होतील. अकरावीचे प्रवेश देताना सगळे कट-ऑफ खूप वर जातील. काही वर्षांपूर्वी 'बेस्ट ऑफ पाच' अशी पध्दत दहावीला महाराष्ट्रात होती तेव्हा माझ्या पुतणीला १००% दहावीला मिळाले होते. या 'बेस्ट ऑफ पाच' पैकी गणित, विज्ञान, संस्कृत या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतील हे समजू शकतो. पण इतर विषयांमध्ये- भाषा/समाजशास्त्र यात १००% मार्क कसे काय मिळाले असतील हे माझ्या तरी समजापलीकडचे आहे. तसे असेल तर गेल्या काही वर्षांपासूनच मार्क वाटायचे प्रमाण वाढले होते आणि ते पण बोर्डाकडून. तर मग शाळा किती मार्क वाटत असतील? मग काय कट-ऑफ १००% ला नेणार का? सगळेच समजायच्या पलीकडचे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/16/2021 - 17:05 नवीन
पण काही वर्षांपासून ९९.९ % मिळवणारे विद्यार्थी आहेत. पण ज्ञान झीरो. पाहिले ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील काहीच ह्यांना समजलेले नसते. कोणत्याच विषयात सखोल ज्ञान नसते. 99.9% वाले फक्त नोकरी करतानाच मिळतील विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या यादीत ही मुलं बिलकुल नसतात. फक्त पाठांतर वर कारकुनी करण्याच्या लेव्हल चे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 07/16/2021 - 18:08 नवीन
राज्यात एकूण १,०४,६३३ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. https://maharashtratimes.com/career/career-news/fyjc-admission-2021-students-get-huge-marks-in-ssc-tough-competition-for-fyjc-admission/articleshow/84471287.cms मटामधील याच बातमीत पुढील माहिती दिली आहे-- Image removed. या माहितीप्रमाणे ६.३४३% विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. यामुळे अकरावीच्या प्रवेशाचा पेच निर्माण व्हायची शक्यता आहे अशा बातम्या आहेत. यावर्षी दहावी झालेले विद्यार्थी २००५ मध्ये जन्माला आले असतील. त्यावेळी ग्रहदशा नक्की काय होती हे त्या विषयातील माहिती असलेल्या कोणीतरी खरोखरच तपासून बघायला हवे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/16/2021 - 21:36 नवीन
बाकी बोर्डाचे दहावीचे निकाल लागले नसतील तर पण त्यांच्या मुलांना स्टेट बोर्ड पेक्षा जास्त गुण देवून त्यांच्या उद्धार करणार. ह्या चादाओढीत ११० टक्के मार्क देवू नये म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 07/16/2021 - 17:54 नवीन
युजीसीने इतिहासाचा नवा अभ्यासक्रम आणायचा बेत केला आहे. त्यात मुघलांना वगळण्यात आले आहे आणि त्याजागी राणाप्रताप, विक्रमादित्य वगैरे भारतीय राजांचा उल्लेख असणार आहे. हे नक्कीच स्वागतार्ह पाऊल आहे. मी कॉलेजमध्ये इतिहास कधी शिकायला गेलो नव्हतो त्यामुळे बी.ए, एम.ए पातळीला इतिहासात काय शिकवतात माहित नाही पण शाळेत असताना मात्र बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळी वंशावळ एकापेक्षा जास्त वेळा होती. दक्षिणेतील पांड्य, चालुक्य हे राजे, आपल्या शिवाजी महाराजांसारखे आसामातील लचित बुडफुकन तसेच देशाच्या इतर भागातील वेगवेगळी राजघराणी यांचा उल्लेखही नसायचा. जहांगीर कसा न्यायप्रेमी होता, शाहजहान कसा कलाप्रेमी होता वगैरे कौतुके वाचत आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव कसा पास झाला हे अनेकदा वाचत माझा शाळेत असताना इतिहासाचा अभ्यास झाला. हा प्रकार बंद होणार असेल आणि सातवाहन, चालुक्य, पांड्य, मौर्य, कलिंग, गजपती वगैरे राजघराण्यांविषयी, ताजमहालऐवजी हाळेबिडूची आणि दक्षिणेतील इतर मंदिरे याविषयी शिकायला मिळणार असेल तर ते चांगले असेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 07/16/2021 - 19:46 नवीन
कॉंग्रेसने या मुद्द्याला विरोध सुरू केला आहे. दुसरीकडे मुंबईतील एका पुलाला मोइनुद्दीन चिस्ती व एका उद्यानाला टिप्या सुलतानाचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेने आणला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या एका आमदाराने अजान स्पर्धा घेण्याचा घाट घातला होता. शिवसेना हिंदुत्ववादी होती/आहे असे समजणारे बाळ ठाकरेंचे चाहते, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेशी १९८९ पासून युती केली आहे असे सांगून स्वतःच्या घोडचुकीचे समर्थन करून ठाकरे घराण्यासमोर लाचारी करणारे भाजप नेते यांच्या कानफटात पुन्हा एकदा सणसणीत चपराक बसली आहे. शिवसेना मराठीवादी, हिंदुत्ववादी वगैरे कधीच नव्हती हे माझ्यासारख्या राजकारणाचा गंध नसलेल्याला समजते, परंतु शिवसेना हिंदुत्ववादी आहे हा भ्रम १९८०च्या दशकात भाजपला का व कसा झाला व तो भ्रम अजूनपर्यंत का टिकलाय याची कल्पना नाही. परंतु उद्या उद्धव ठाकरेंनी नुसता डोळा मारला तरी महाराष्ट्रातील भाजपचे नेते लगेच लाळ गाळत धावत मातोश्रीवर जातील याची मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/17/2021 - 16:35 नवीन
दुसरीकडे मुंबईतील एका पुलाला मोइनुद्दीन चिस्ती व एका उद्यानाला टिप्या सुलतानाचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेने आणला आहे. Image removed. संदर्भ :- Shiv Sena MP Rahul Shewale wants the newly constructed Mankhurd Govandi flyover to be named after “Garib Nawaz” Khwaja Moinuddin Chishti.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/16/2021 - 18:31 नवीन
हिंदुस्थान मध्ये हिंदू संस्कृतीचा इतिहास शिकवणे गरजेचे आहे .त्याच बरोबर स्थानिक पातळीवर जे राजे होवून गेले त्यांचा इतिहास शिकवणे गरजेचे. मुघली इतिहास शिकवण्याची गरज नाही. मुघलांना अजुन पण त्यांच्या धर्माचे उगमस्थान पॅलेस्टाईन ,इस्त्रायल च भाग च प्रिय आहे. कोणत्या ही देशात राहत असले तरी त्यांची निष्ठा तिकडेच असते.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sat, 07/17/2021 - 08:08 नवीन
हिंदुस्थान मध्ये हिंदू संस्कृतीचा इतिहास शिकवणे गरजेचे आहे .त्याच बरोबर स्थानिक पातळीवर जे राजे होवून गेले त्यांचा इतिहास शिकवणे गरजेचे. मुघली इतिहास शिकवण्याची गरज नाही. मुघलांना अजुन पण त्यांच्या धर्माचे उगमस्थान पॅलेस्टाईन ,इस्त्रायल च भाग च प्रिय आहे. कोणत्या ही देशात राहत असले तरी त्यांची निष्ठा तिकडेच असते.
प्रतिसाद वाचल्यावर हा गामा पैलवान किंवा श्रीगुरुजी यांचा प्रतिसाद असेल असं वाटलं. पण राजेश की यांनी हा प्रतिसाद लिहला आहे हे पाहून एक क्षण मी झोपेत आहे की काय असं वाटल. पहिल्यांदाच मी राजेश १८८ यांच्या या प्रतिसादाचे अनुमोदन करतो.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 07/17/2021 - 08:12 नवीन
त्यांचा आयडी हॅक झाला असावा
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/16/2021 - 20:57 नवीन
Taliban ask for list of girls above 15, widows under 45 to be married to their fighters: Reports https://www.hindustantimes.com/world-news/taliban-asks-for-list-of-girls-widows-to-be-married-to-their-fighters-reports-101626413987086.html
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 07/17/2021 - 02:38 नवीन
कसला प्रकाश हवाय म्हणे तुम्हाला?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 07/17/2021 - 13:02 नवीन
आपला तसा काही संबंध नाही असे समजू शकता... हवे तर
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Sat, 07/17/2021 - 13:52 नवीन
अशा पण प्रकारांचे एक्स्पर्ट असतात? जग फार विचित्र झालंय हेच खरं.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Sat, 07/17/2021 - 16:12 नवीन
केरळ सरकारने 21 तारखेला होणारी ईद साजरी करण्यासाठी 3 दिवस lockdown मध्ये शिथीलता आणली आहे. तर उत्तर प्रदेश येथे 25 तारखेला होणाऱ्या कनवर यात्रे मूळे व्यथित होऊन सुप्रीम कोर्टाने स्वतःहुन उत्तर प्रदेश सरकार ला नोटीस पाठवली आहे. सध्यातरी उत्तर प्रदेशातील कोविड रुग्णांची दैनंदिन वाढ ही 100 च्या आत आहे तर केरळ मध्ये दिवसाला 13000 पेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत आहेत.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 07/17/2021 - 17:12 नवीन
ही सगळी डाव्या पुरोगामी विचारवंतांची इकोसिस्टीम आणि त्या इकोसिस्टीमची ताकद आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो तथाकथित शेतकरी नोव्हेंबरच्या शेवटपासूनच यायला लागले होते. तेव्हा त्या तथाकथित शेतकर्‍यांचे उद्दिष्ट यांच्या अजेंड्याला साजेसे असल्याने इतकी गर्दी झाल्याने कोरोना वाढेल याची चिंता या पुरोगामी विचारवंतांच्या नियंत्रणातील मिडियामध्ये (एन.डी.टी.व्ही, स्क्रोल, वायर वगैरे) नव्हती. पण नंतर दुसरी लाट आल्यावरही सुरवातीला महाराष्ट्रातच आकडे वाढत होते म्हणूनही तितक्या प्रमाणावर कोरोनाचा उल्लेख नव्हता. पण नंतर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशात आकडे वाढायला लागल्यावर मग केवढी मोठी दुसरी लाट आदळली आहे याविषयी जगभरातील पेपरांमध्ये लिहून यायला लागले. मग त्यासाठी कुंभमेळा आणि बंगालमधील मोदींच्या सभा कशा जबाबदार आहेत हा नवा नरेटिव्ह तयार झाला. जसे काही ममता वगैरे मोठ्या सभा घेतच नव्हते. अजूनही दुसरी लाट संपलेली नाही. पण अर्ध्याहून जास्त आकडे महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याने परत एकदा या लाटेचा उल्लेख आता फारसा होताना दिसत नाही. इतके दिवस केरळ मॉडेलचे कौतुक सांगणारे सगळे विचारवंत गायब झालेले दिसतात. केरळ सरकारच्या निर्बंधांमध्ये बकरी ईदसाठी शिथिलता आणायच्या निर्णयाचे समर्थन होऊच शकत नाही. तरीही तिथे या विचारवंतांचे लाडके कम्युनिस्ट सरकार असल्याने त्याविषयी कोणी बोलताना दिसत नाही. आणि गंमत म्हणजे इतके सगळे होऊनही कम्युनिस्ट सरकार कसे धर्मनिरपेक्ष आणि योगी कसे धर्मांध म्हणून रकानेच्या रकाने हेच हलकट लोक लिहून आणतील. ही हलकट डाव्या पुरोगामी विचारवंतांची इकोसिस्टीम जिथे असेल तिथून कोणतीही दयामाया न दाखवता मुळापासून उखडून टाकायला हवी. मला शक्य होईल तितके ते काम मी मिपावर तरी करत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 07/23/2021 - 20:14 नवीन
आकाशातील माता आपल्याला नक्कीच यश देवो. आपण विषय काढलाच आहे तर डावी विचारसरणी तथाकथित प्रस्थापितांवर नेमकी काय जादू करते की ते त्या विचारसरणीची बाजू उचलू लागतात ? यावर आपले निरीक्षण अवश्य नोंदवावे... एखाद्या गोष्टीचे मूळ काय हे समजून घेतले तर मुळासकट उपटणे सोपं होतं
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 07/17/2021 - 20:19 नवीन
मुस्लिम राष्ट्रांनी घेरलेल्या भारताला कट्टर तेचा किती मोठा धोका आहे ह्याची हिंदू ना जाणीव आहे. शरीयत नुसार देशाचा कारभार चालत असणारे किंवा तसा चालवा अशी इच्छा असणारे देश भारताच्या भोवती आहेत. तिथे सर्व धर्म भाव असल्या चिल्लर विचारला किंमत नाही. आणि कधी हे ते भारताला निशाणा बनवू शकतात. हा झाला बाहेरून धोका . अंतर्गत धोका काय आहे ह्याची चुणूक रोज paper मध्ये वाचायला मिळते. 1) हिंदू ना सण साजरे करण्यापासून रोखणे. मग त्या साठी ध्वनी प्रदुषण,पाणी प्रदूषण,रस्त्यावर गर्दी असले पॉइंट पुढे केला जातात पण मूळ हेतू . हिंदू ना सण साजरे करता आले नाही पाहिजेत. २) भारतात असणारी नास्तिक लोक ही खरी नास्तिक नाहीत ढोंगी आहेत. नास्तिक विचाराच्या आडून हिंदू च्या परंपरा,रिती रीवाज बंद पडतील ह्या साठी झटणारे आहेत. त्यांना अस्तिक फक्त हिंदू च आहेत असे वाटत. बाकी मुस्लिम,ख्रिस्त ,आणि बाकी धर्मातील अंध श्रद्धा,श्रद्धा ह्या वर ते कधीच भाष्य करत नाहीत. ३)हिंदू ना कायद्या पुढे सर्व समान असा उपदेश देत असतात पण समान नागरी कायदा मात्र ह्यांना नको असतो. अल्पसंख्याक म्हणून खास सुविधा हव्या असतात. तेव्हा नेमकं समानतेचा विसर पडतो. सर्व पुढील धोके हिंदू ना माहीत आहेत. म्हणून तर bjp बहुमत नी सत्तेत आहे. पण bjp sarkar ni हिंदू ना आर्थिक बाबतीत दुर्बल करतील असे निर्णय घेवू नये. हीच फक्त माफक अपेक्षा आहे. आणि विरोध पण त्याच पॉइंट वर आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 07/18/2021 - 06:26 नवीन
शिवसेना भाजप युती होते की काय आता?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 07/18/2021 - 07:05 नवीन
भाजप एकीकडे उद्धव ठाकरेंना डोळा मारत आहे तर त्याचवेळी दुसरीकडे पवारांना खाणाखुणा करीत आहे. दोघांपैकी कोणीतरी एक जण पटेल या आशेवर गळ टाकले आहेत. त्यापैकी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. त्यामुळे युती केली तर बिहारप्रमाणे भाजपला फार तर काही मंत्रीपदे मिळतील. कदाचित चंपा आणि फडणवीस हे दोघेही उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीला पटविले तर निम्मा काळ राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल. तसेच अर्थ, गृह, महसूल, नगरविकास या महत्त्वाच्या खात्यांपैकी निम्मी खाती राष्ट्रवादीला द्यावी लागतील. असल्या भ्रष्ट पक्षाशी युती केली तर समर्थक संतापतील हा अजून एक मुद्दा. परंतु भाजपचे महाराष्ट्रातील सध्याचे नेते हे लाज, लज्जा, शरम, स्वाभिमान याच्या पलिकडे पोहोचून अत्यंत निगरगट्ट झाले असल्याने ते समर्थकांच्या संतापाला काडीचीही किंमत देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 07/18/2021 - 07:30 नवीन
महाराष्ट्र मध्ये bjp नी सेने शी युती न करता स्व बळावर निवडणूक लढावी असे श्री गुरुजी ह्यांचे मत आहे आणि bjp समर्थक मतदार चे पण तेच मत आहे असे त्यांचे मत आहे. Bjp हाच फक्त हिंदुत्व वादी पक्ष आहे सेना ढोंगी आहे असे पण त्यांचे मत आहे. मग आता परिस्थिती अनुकूल आहे bjp नी युती तोडली नाही सेनेने तोडली आहे. बिन औषधाची खरूज गेलो असे समजायचे. पण राजकारणी लोकांना सर्व बाजूंनी विचार करावा लागत. पक्ष सत्तेत नसेल तर पक्ष फुटण्याची भीती असते. त्या मुळे जास्त दिवस पक्ष सत्तेबाहेर असला नाही पाहिजे. Bjp ला स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी उशीर लागेल.सेने शी युती केली की सत्ता लगेच मिळेल . हे गणित आहे. सेना थोडी तरी हिंदुत्व वादी आहे पण नितीश कुमार पक्का संमधर्म वाला आहे तरी वासरात लंगडी गाय शहाणी समजून bjp नी नितीश बरोबर जुळवून घेतले आहे. ते फक्त तिथे पक्ष सत्तेत असावा म्हणून.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 07/18/2021 - 10:01 नवीन
राजेशभाऊ, बेअरिंग सुटतंय.. जरा दमाने घ्या.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Mon, 07/19/2021 - 20:25 नवीन
.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Sun, 08/01/2021 - 12:03 नवीन
राजेश जी. बाकी काही ही असो.. तुम्ही आजकाल उजव्या गल्लीकडे वळायला लागला आहात..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/21/2021 - 18:56 नवीन
महाराष्ट्रात पडद्याआड बऱ्याच राजकीय घडामोडी घडताहेत असे बऱ्याच राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जून महिन्यात मोदी व उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली. त्या भेटीत पुन्हा एकदा सेना व भाजप एकत्र येण्यावर चर्चा झाली व उर्वरीत सव्वातीन वर्षे ठाकरेंंना मुख्यमंत्रीपदासाठी भाजप पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मोदींनी ठाकरेंसमोर ठेवला असे एका विश्लेषकाने मत व्यक्त केले होते. त्या प्रस्तावानुसार भाजप महाराष्ट्र मंत्रीमंडळात सामील होईल, मंत्रीमंडळात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ३० तर सेना १८ जागा लढेल व विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागी लढतील, असे विश्लेषकाने सांगितले. नंतर काही दिवसांंपूर्वी शरद पवार व मोदींची वैयक्तिक भेट झाली. त्या भेटीनंतर एका विश्लेषकाच्या मतानुसार राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देईल, फडणवीस मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री असतील व अजितदादा पवार केंद्रात मंत्री होतील असा प्रस्ताव मान्य होत आला आहे. २०२१ च्या दिवाळीत वर्षा निवासस्थानात फडणवीस असणार असेही विश्लेषकाने सांगितले. यात काही तथ्य आहे का याची कल्पना नाही. परंतु महाराष्ट्रात भाजप लवकरच पुन्हा सत्तेत येणार अशी भाजप नेतृत्वाची खात्री असावी. त्यामुळेच फडणवीस केंद्रात न जाता अजूनही महाराष्ट्रात आहेत व राज्यपालांनी सुद्धा विधानपरीषदेतील १२ नियुक्त सदस्यांच्या यादीवर साडेआठ महिने उलटल्यानंतरही निर्णय घेतलेला नाही. भाजपने सेनेबरोबर किंवा राष्ट्रवादीबरोबर जाणे हा निर्णय महाराष्ट्रासाठी व भाजप समर्थकांसाठी अत्यंत दुर्दैवी असेल हे नक्की. असे खरोखरच घडले तर 'विनाशकाले विपरीत बुद्धी' हा वाक्प्रचार सार्थ ठरेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/21/2021 - 19:03 नवीन
महाराष्ट्रात पडद्याआड बऱ्याच राजकीय घडामोडी घडताहेत असे बऱ्याच राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जून महिन्यात मोदी व उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली. त्या भेटीत पुन्हा एकदा सेना व भाजप एकत्र येण्यावर चर्चा झाली व उर्वरीत सव्वातीन वर्षे ठाकरेंंना मुख्यमंत्रीपदासाठी भाजप पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मोदींनी ठाकरेंसमोर ठेवला असे एका विश्लेषकाने मत व्यक्त केले होते. त्या प्रस्तावानुसार भाजप महाराष्ट्र मंत्रीमंडळात सामील होईल, मंत्रीमंडळात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ३० तर सेना १८ जागा लढेल व विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागी लढतील, असे विश्लेषकाने सांगितले. नंतर काही दिवसांंपूर्वी शरद पवार व मोदींची वैयक्तिक भेट झाली. त्या भेटीनंतर एका विश्लेषकाच्या मतानुसार राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देईल, फडणवीस मुख्यमंत्री तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री असतील व अजितदादा पवार केंद्रात मंत्री होतील असा प्रस्ताव मान्य होत आला आहे. २०२१ च्या दिवाळीत वर्षा निवासस्थानात फडणवीस असणार असेही विश्लेषकाने सांगितले. यात काही तथ्य आहे का याची कल्पना नाही. परंतु महाराष्ट्रात भाजप लवकरच पुन्हा सत्तेत येणार अशी भाजप नेतृत्वाची खात्री असावी. त्यामुळेच फडणवीस केंद्रात न जाता अजूनही महाराष्ट्रात आहेत व राज्यपालांनी सुद्धा विधानपरीषदेतील १२ नियुक्त सदस्यांच्या यादीवर साडेआठ महिने उलटल्यानंतरही निर्णय घेतलेला नाही. भाजपने सेनेबरोबर किंवा राष्ट्रवादीबरोबर जाणे हा निर्णय महाराष्ट्रासाठी व भाजप समर्थकांसाठी अत्यंत दुर्दैवी असेल हे नक्की. असे खरोखरच घडले तर 'विनाशकाले विपरीत बुद्धी' हा वाक्प्रचार सार्थ ठरेल.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 07/22/2021 - 08:43 नवीन
शक्यता कमी आहे . . . मोदी व उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक भेटीला फार महत्त्व नाही. उद्धव ठाकरे यांनी काही मागण्या केल्या असतिल .. फडवणीसांची तक्रार केली असेल ... परंतु युतीची झालेली वाताहत आणी उद्धव ठाकरेंनी जुळवलेली मोट यानंतर मोदी जु़ळवाजुळव करतील हे पटत नाही. त्यात वाचाळ्वीर रोज मुखपत्रातुन केंद्र सरकार वर आसुड ओढत आहेत. ज्या दिवशी मुखपत्रात केंद्र सरकारचे गोडवे गाणे सुरु होइल ... तेव्हा काय ते खरे मानु . . शरद पवार व मोदींची वैयक्तिक भेट यातही काही राजकारण नाही. राष्ट्रवादी ने दिलेला दगा पाहता तिथे काही शक्यता नाही. मला वाटते मोदी वेट अ‍ॅंड वाच भुमिकेत आहेत ... हे तिघाडी सरकार आपापसातल्या लाथाळ्यांनी पडेल .. तेव्हा बघु असाच होरा असावा... मोदींसाठी आता उत्तर प्रदेश जास्त महत्त्वाचा आहे ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/22/2021 - 12:48 नवीन
भाजप महाराष्ट्रात सध्या सत्तेसाठी इतका वखवखलेला आहे की त्यांची कोणाबरोबरही शय्यासोबत करण्याची तयारी आहे. ज्यांना कृपाशंकरसारखा जगावरून ओवाळून टाकावा असा नतद्रष्ट चालतो, त्यांना शिवसेना किंवा राष्ट्रवादी का चालणार नाही?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 07/22/2021 - 16:38 नवीन
नि:पक्ष पत्रकारांचा वारसा महाराष्ट्राकडे होता. भाउ तोरसेकर्/अनय जोगळेकर हे नि:ष्पक्ष पत्रकारिता करतील अशी आशा होती. पण त्यांच्या त्या व्हिडियोज मध्ये तोच तोचपणा यायला लागलाय. "काँग्रेस वाईट व भाजपा(मोदी/शहा/फडणवीस) चांगला" ह्या पलिकडे ह्या भाऊ/अनयरावांची पत्रकारिता जात नाही. गेल्या काही दिवसातले भाउंचे विषय पहा- १) "कोल्हे काय बोलले? आदरणीय? की भादरणीय?" २) "पंतप्रधान नव्हे तर नरेंद्र मोदी व्हायचंय देवेंद्र फडणवीसांना" ३) "अनिल देशमुखांना कंगनाचे शब्द आठवत असतील का" आणी हे अनयभाऊचे विषय- १)राहुल आणि नाना... करती ठणाणा २)बारामतीचे राष्ट्रपती? ३)उडत्या पंजाबमध्ये फडणवीस कोण? काय हे ? आणी हे स्वःताला अनुभवी पत्रकार म्हणवतात? 'सामना/मार्मिक' पुरतेच भाउंचे करियर मर्यादित राहिले हे आमचे नशीब. पेट्रोलवाढ/महागाई/बेरोजगारी/शिक्षण/आंतराराष्ट्रिय संबंध.. अशा कोणत्याही विषयावर ह्यांना बोलावेसे वाटत नाही? "बहुत हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार" ह्याची आठवण केंद्र सरकारला करून द्यायला हवी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/22/2021 - 17:06 नवीन
यांच्यात अनिल थत्ते पण हवा.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 07/22/2021 - 17:09 नवीन
सहमत, मी ही ह्या दोघांचे videos काही दिवसांपूर्वी बघत होतो. पण नंतर तोचतोचपणा यायला लागला आणि पाहणे बंद केले. काहीही झाले तरी मोदी-शहा-फडणवीस हेच कसे बरोबर हे पटवून देण्याव्यतिरिक्त त्यामध्ये काहीही नसायचे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा