Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 05/13/2021 - 07:17
🗣 166 प्रतिसाद
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एकेकाळच्या ज्येष्ठ नेत्या के.आर.गौरीअम्मा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले आहे. gouriamma गौरीअम्मांचा जन्म २१ जून १९१९ रोजी केरळमध्ये अलापुष्षा जिह्यातील पट्टनकड गावात झाला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात सक्रीय होत्या. १९५७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये त्या महसूलमंत्री होत्या. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांच्या सरकारने जमिन सुधारणा केल्या याबद्दल खूप काही लिहिले गेले आहे. पण त्या जमिन सुधारणांमागचा ब्रेन गौरीअम्मा होत्या. पुढे १९६७ मध्ये ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली दुसरे सरकार स्थापन झाले त्यात गौरीअम्मा परत एकदा महसूलमंत्री झाल्या आणि त्यांनी जमिन सुधारणांचे मागच्या वेळी अपुरे राहिलेले काम पुरे रेटायचा प्रयत्न केला. गौरीअम्मांनी १९५७ मध्ये कम्युनिस्ट नेते टी.व्ही.थॉमस यांच्याशी विवाह केला. दोघेही पतीपत्नी १९५७ आणि १९६७ या दोन्ही वर्षी स्थापन झालेल्या नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यात एक गुंतागुंत आली. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टी.व्ही.थॉमस भाकपमध्ये राहिले तर गौरीअम्मा माकपमध्ये गेल्या. त्यातून त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही कटुता आली. १९६७ मध्ये दोघेही नंबुद्रीपाद सरकारमध्ये मंत्री होते म्हणून दोघांनाही सरकारी बंगला मिळाला होता. या दोघांना शेजारचे बंगले दिले होते. तोपर्यंत ते विभक्त झाले नव्हते त्यामुळे दोन बंगल्यांमधील भिंत त्यांनी पाडून घेतली आणि एकमेकांकडे जाणेयेणे सुरूच ठेवले. मात्र भाकपने याला आक्षेप घेतला. त्यातून गौरीअम्मांना हृदयविकाराचा झटकाही आला. नंतरच्या काळात भाकप आणि माकप यांच्यात मतभेद वाढले. भाकप काँग्रेसबरोबर गेला तर माकप काँग्रेसविरोधी राहिला. त्यातच गौरीअम्मा आणि टी.व्ही.थॉमस हे विभक्त झाले. टी.व्ही.थॉमस यांचे १९७७ मध्ये निधन झाले तोपर्यंत हे जोडपे परत एकत्र आलेच नाही. १९८७ च्या केरळ विधानसभा निवडणुका माकपने गौरीअम्मांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करून लढवल्या. मल्याळम भाषेत केर म्हणजे नारळाचे झाड आणि केरळ म्हणजे नारळाच्या झाडांची भूमी. माकपने 'नारळाच्या झाडाच्या भूमीत गौरीअम्मांना नेता बनवा' या अर्थाची मल्याळम भाषेत यमक बनणारी घोषणा माकपची मुख्य घोषणा होती. माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण त्यानंतर मुख्यमंत्री करताना मात्र गौरीअम्मांना बाजूला सारून ई.के.नयनार यांना पक्षाने मुख्यमंत्री केले. त्यामुळे गौरीअम्मा नयनार यांच्या मंत्रीमंडळात मंत्री असल्या तरी दुखावल्या गेल्या. १९९४ मध्ये त्यांना केंद्रीय पॉलिट ब्युरोत स्थान मिळाले नाही. खरं तर त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता तसे होणे धक्कादायक होते. इतकेच नाही तर त्यांनी नंबुद्रीपाद यांच्या मंत्रीमंडळात जमिन सुधारणेचे काम केले होते. त्याचे श्रेय वर्षानुवर्षे नंबुद्रिपाद आणि पक्षाला दिले गेले पण ते खरे काम करणार्‍या गौरीअम्मांना मात्र तितके महत्व दिले गेले नाही. त्यामुळे गौरीअम्मांनी केंद्रीय नेतृत्वावर टीका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. आपली नक्की काय चूक झाली म्हणून आपल्याला ही वागणूक मिळाली हा प्रश्न त्यांनी वारंवार विचारला. नंतर त्यांनी जनथिय संरक्षण समिती (जे.एस.एस) नावाने आपला पक्ष काढला. या पक्षाने २००१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसप्रणित यु.डी.एफ शी आघाडी केली आणि गौरीअम्मा २००१ ते २००६ या काळात ए.के.अ‍ॅन्टनी आणि ओम्मेन चंडी यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होत्या. त्यांनी शेवटची निवडणुक वयाच्या ९२ व्या वर्षी २०११ मध्ये जे.एस.एस उमेदवार म्हणून लढवली पण त्यांचा भाकप उमेदवाराने पराभव केला. त्यानंतर त्या सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्या. गौरीअम्मांनी ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्यावर नंतरच्या काळात अगदी जहरी टीका केली होती. गौरीअम्मा या एळवा समुदायातील. या समुदायातील वकिलीचे शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. तर नंबुद्रिपाद हे नंबुद्री ब्राह्मण म्हणजे अगदी उच्चवर्णीय नव्हे सर्वोच्चवर्णीय असे म्हटले तरी चालेल. नंबुद्रीपाद यांना केवळ उच्चवर्णीय पुरूषांनाच पुढे आणायचे आहे इतर जातीतील लोकांच्या आणि त्यातही महिलांच्या हिताशी त्यांचे काही घेणेदेणे नाही अशी नेहमी भाजप-संघावर जी टीका करतात नेमकी तीच टीका गौरीअम्मांनी नंबुद्रीपाद यांच्यावर केली. नंतरच्या काळात त्या माकपमध्ये अर्थातच परत आल्या नाहीत. पण त्यांच्या १०० व्या वाढदिवसाला आणि इतर वाढदिवसांनाही केरळचे मुख्यमंत्री विजयन नेहमी त्यांना शुभेच्छा द्यायला जात असत. ११ मे २०२१ रोजी के.आर.गौरीअम्मांचे तिरूवनंतपुरममधील एका खाजगी रूग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना श्रध्दांजली.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52595 views

🗣 चर्चा (166)
स
सुखीमाणूस गुरुवार, 05/13/2021 - 08:12 नवीन
धन्यवाद या लेखाबद्दल.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 05/13/2021 - 08:13 नवीन
https://indianexpress.com/article/cities/mumbai/give-idle-unit-to-firm-making-covaxin-bombay-hc-tells-state-govt-7310177/
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस गुरुवार, 05/13/2021 - 08:18 नवीन
https://tfipost.com/2021/05/uddhav-government-was-trying-to-suppress-bharat-biotechs-pune-facility-the-company-went-to-court-and-won/
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 12:22 नवीन
महीतीपूर्ण लेख. आंबेडकराईट लोकांकडून कम्युनिस्ट पक्षावरसुद्धा कायमच ब्राम्हण वर्चस्वी म्हणून टिका होत आली आहे. कम्युनिस्ट आणि आंबेडकराईट पहीला सामाजिक बदल का पहिला क्रांती यावर निरर्थक काथ्याकूट वर्षानुवर्षे करत आले आहेत. "एंगेल्स भी पढता हूँ, दुर्गापूजो भी करता हूँ" हा बंगाली कम्युनिस्ट लोकांवरचा कायमचा शॉट आहे. एकूणच, कुठेही बहुजन समाजातल्या माणसाला लिडरशिप पोझिशन फंडामेंटली विरुद्ध मुद्दे उचलल्याशिवाय, किंवा आपल्या खर्‍या मताशी तडजोड केल्याशिवाय मिळत नाही, असे आंबेडकराईट्स म्हणतात. पण मला हे नाही समजले, संघ आणि भाजपावर होणार्या टिकेबाबत तुमचे काय म्हणणे आहे ? ती टिका व्हॅलिड आहे कि नाही ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/13/2021 - 13:08 नवीन
टीका करणारे नेहमीच टीका करतच असतात आणि पूर्वीपासूनच जनसंघ आणि नंतर भाजप हा सगळ्यांचा अगदी आवडता 'व्हिपिंग बॉय' होता. भाजपत एकेकाळी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी त्यापूर्वी दिनदयाळ उपाध्याय वगैरे ब्राह्मण शीर्षस्थानी होते. पण आता केंद्रीय मंत्रीमंडळात किंवा भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यात ब्राह्मण किती आणि ओबीसी किती हे बघितल्यास या टीकेला काही अर्थ नाही हे समजेलच.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/13/2021 - 13:13 नवीन
बाकी अशी टीका भाजपवर करणार्‍यांचे नेते कोण? तर नंबुद्रीपाद, रणदिवे, गोपालन, चॅटर्जी, भट्टाचार्य वगैरे ब्राह्मण आणि बसूंसारखे कायस्थ. तरी भाजपवर टीका काय करणार की हे फक्त उच्चवर्णीयांचेच नेतृत्व पुढे आणतात. आणि त्या टीकेत काही अर्थ नाही हे उघड झाले तरी तीच टीका करणे मात्र थांबवणार नाहीत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 05/13/2021 - 13:50 नवीन
जनसंघ किंवा भाजपाला "भटांचा पक्ष" किंवा "अर्धी चड्डीवाले" असं हिणवत राहून जोपर्यंत निवडणूक जिंकता येणे शक्य आहे तोपर्यंत ब्राह्मण द्वेष या लोकांना करावाच लागणार आहे. त्यांचेकडे दुसरा पर्याय नाही आहे. पण जेव्हां त्याचा उपयोग होणार नाही तेव्हां त्यांना ब्राह्मणद्वेष सोडून द्यायलाच लागेल. ममता व राहूल या दोघांनाही आपण ब्राह्मण असल्याचे जाहीररित्या सांगावे लागणे यातून बरेच काही सिध्द होत आहे. असो. जर बारकाईने पाहिले तर असे लक्षात येईल की, ब्राह्मणद्वेषाचे सहाय्याने आत्तापर्यंत खूप काही मिळवता आले असले तरी, ब्राह्मणद्वेषाचे हत्यार हळूहळू बोथट व्हायला लागले आहे. ब्राह्मणांना शिव्या घालून आपण खूप चांगले असल्याचा भास आता पूर्वीसारखा निर्माण करता येत नाही. गावाकडे अजूनही ब्राह्मणद्वेषाचा बागूलबुवा उभा करता येतो कारण परिस्थिती पडताळून पाहण्यासाठी गावाकडे ब्राह्मण शिल्लकच राहिलेला नाही. मात्र जेव्हां अशी लोकं शहरात येतात तेव्हां त्यांचा ब्राह्मण लोकांशी संबंध येतो व त्यांचे अनेक गैरसमज गळून पडतात. मात्र त्यासाठी ब्राह्मणांनी आपले वर्तन व मुख (म्हणजे जीभ) विटाळणार नाही याची काळजे घेतली पाहिजे. तरच या ब्राह्मणद्वेषावर खूप झपाट्याने मात करता येईल. जर ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात गुणपरत्वे काही फरकच नसेल तर ब्राह्मणांना कोणी व का किंमत द्यावी? गोंदवलेकर महाराज म्हणायचे की, ब्राह्मणांनी त्यांच्याकडे जे काही चांगले आहे त्याचा अभिमान सोडला पाहिजे. उलट जे काही चांगले आहे त्याबद्दल परमेश्वराप्रती कृतज्ञता ठेवली पाहिजे. असो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 12:48 नवीन
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 12:48 नवीन
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 13:04 नवीन
उत्तर प्रदेशच्या १४ हेल्थसेन्टर प्रमुखांनी सरकारी अधिकार्‍यांकडून हॅरॅसमेंट झाल्याचे आरोप केले आहेत.
“We are forced to take this step because despite working round-the-clock since last year, we are regularly being harassed and also threatened to be sent to jail by administrative officials. They scold us by making a false allegation that we are not working responsibly,” said Dr Sanjeev Kumar, the district general secretary of the Provincial Medical Services’ Association. He is also the superintendent of the Ganj Moradabad health centre and among the 14 who have offered to resign.
काय बोलाव, ते कळेना https://indianexpress.com/article/cities/lucknow/14-health-centre-chiefs-in-up-allege-harassment-by-officials-offer-to-quit-7312957/
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 05/13/2021 - 16:25 नवीन
https://m.lokmat.com/sindhudurga/cricketer-prithvi-shaw-stopped-mumbai-police-travelling-without-e-pass-a584/ ई पास फक्त महत्त्वाच्या कामासाठी दिला जाईल असे निर्देश असताना पृृथ्वी शाॅ मुंबईहून विनापास गोवा फिरायला जात असता त्याला सिंधुदुर्गात आंबोली पोलिसांनी अडविल्यावर एका तासात पास दिला गेला. काही लोक कायद्याच्या वर झालेत ह्या देशात.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 18:47 नवीन

They have been using the pandemic for their vested political interests.

But truth can’t be suppressed.

Here are the facts.#IndiaFightsCorona pic.twitter.com/RaRJblTT4Y

— BJP (@BJP4India) May 13, 2021
भाजपाने ट्विटर वर ही गंमतीशीर पोस्ट केली आहे. काही गंमती: १. मोदीजींनी १७ मार्चला स्टेट्स ना वॉर्निंग देऊन कोव्हिड वेव्ह फोरसी केली होती- एक तो गोडा बोलो या चतुर! तुमचे शास्त्रद्न्य सतत म्हणत असतात की आम्हाला बुवा सेकंड वेव्ह इतकी मोठ्ठी येईल कल्पनाच नव्हती. आणि मोदींनी फोरसी केलं ते कधी- तर १७ मार्चला ! १७ मार्चला सांगणे ह्याला "सी इट कमिंग" म्हणतात काय ? १७ मार्चला म्हणे "फक्त" ३०००० केसेस प्रतिदिन वाढत होत्या. सरकारी व्यवस्थेलाच काय, सामान्य नागरिकांना सुद्धा १७ मार्चला कुणकुण लागलीच होती. त्यात कसले डोंबलाचे "सी इट कमिंग." २. भारत #१- अबसोल्युत अकड्यांबाबत म्हणणे योग्य आहे. मृत्यू आकड्यांसंबंधीत यावरही विचार व्हावा, कि किती रुग्णांचा ऑक्सिजन आणि औषधे न मिळाल्याने मृत्यू झाला ? (जॉर्डन च्या हेल्थ मिनिस्टरने ६ जणांचा ऑक्सिजन अभावे मृत्यू झाल्याने राजीनामा दिला ! https://www.bbc.com/news/world-middle-east-56381870.amp) व्हायरस मुळे मृत्यू होणे आणि ऑक्सिजन अभावी मृत्यू होणे अत्यंत वेगळ्या गोष्टी ! मूळ मुद्द्याला ऍड्रेस केलंच नाही. ३. कुंभ मेळा आणि इलेक्शन रॅली- सरळ सरळ whataboutry ! "ऑ ? कुंभ सोडा, ह्याचे काय ? त्याचे काय ?" ४.व्हाक्सिन किंमत- राज्यावर जबाबदारी ढकलली! केंद्राला का हे माहित नाही की कन्समप्शन सगळे राज्यांतच होणार आहे ? मग जर केंद्राची खरेदी तुटपुंजी पडत असेल, आणि त्यामुळे चढ्या किंमतीत राज्यांना लसी घ्यावा लागल्या तर जनतेचे नुकसान नाही काय ?! म्हणजे राज्य आणि केंद्र हे शेवटी लोकांसाठी काम करत आहेत या गोष्टीला संपुर्ण फाटा देऊन निलाजरे उत्तर दिले आहे ! ५. जळत्या चिता कायमच असतात की, उगाच लोक तुम्हाला जळत्या चिता दाखवून घाबरवत आहेत. अरेवा. चिता कायमच जळत असतात, हा अतिशय प्रॅक्टिकल सल्ला सरकार कधूनच मिळावा. नाहीतर आम्हाला हि गोष्ट समजलीच नसती.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 18:50 नवीन
"sigh, if people only had better iq" हे रत्न राहिलंच.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 21:14 नवीन

Union Health Minister Harsh Vardhan says demand for more #vaccines from states 'arouses narrow political passion' among masses that 'harms whole-of-government approach' to tackle pandemic

— Press Trust of India (@PTI_News) May 13, 2021
राज्यांनी सारखे सारखे लसी मागितल्यावर "कुछ कुछ होता है ।" हिंदीत सांगायचे तर "जनता के बीच संकीर्ण राजनीतिक धारणा बनती है जो महामारी से निपटने के लिए सरकार के दृष्टिकोण को नुकसान पहुंचाती है." राज्यांना थेट लसी महागात मिळणार, आणि केंद्राला लसी मागितल्या तर असं काहीतरी होतंय...
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 05/14/2021 - 05:51 नवीन
बाकी सगळे मुद्दे बाजूला ठेवून सध्या लसीकरणाबद्दल बोलतो मला या लसीकरणाच्या समाजवादी धोरणावर भयंकर राग आहे. सरकारने मुळातच लसी खुल्या बाजारात आणायला हव्या होत्या. हा निर्णय घ्यायला खूप उशीर केला आहे, हा निर्णय 6 महिने अगोदर व्हायला हवा होता. जर हा निर्णय सरकारने 6 महिने अगोदर घेतला असता तर अर्धा भारत आज टोचून झाला असता. कोणत्याही भांडवलंदाराला उत्पादन बँड पडणे परवडत नाही, अश्या परिस्थितीत महिन्याला एका कामागरामागे साधारण 20बते 25 हजाराचे नुकसान भोगावे लागते. ही परिस्थिती बघता माझ्यासारखा मालक असेल तर तो वेळ पडली तर माणशी 5000 घालून सुद्धा कामगारांचे लसीकरण करून घेईल. हे जर का 6 महिने अगोदर oepn झाले असते तर आत्ता बऱ्याच लोकांनी मार्केटमधून लसी घेऊन अर्धा भारत करोना मुक्त झाला असता.. किमान लसीचा तुटवडा नक्की जाणवला नसता, कारण लोकांनी परदेशातून देखील लस आयात केली असती.. असो, देर आये दुरुस्त आये.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 05/14/2021 - 05:52 नवीन
अजून एक मी मालक असतो तर उलट welfare म्हणून कामगार आणि त्याच्या कुटुंबाचे पण लसीकरण केले असते.. एखादा मोठा कॅम्प arrange करून..
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 06:15 नवीन
लसीची टंचाई हा फॅक्टर दुर्लक्षित होत आहे. मुबलक लसी उपलब्ध होत्या पण निव्वल सरकारी मशीनरीच्या ढीलाईमुळे उशीर होत आहे अशी परिस्थिती असती तर तुमचे म्हणणे योग्य होते. पण तसे नव्हते.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 05/14/2021 - 06:20 नवीन
असहमत. समाजवाद प्रत्येक ठिकाणी नुकसानकारकच असतो असे नाही. सरकारने लसी खुल्या बाजारात आणल्या असत्या तर श्रीमंत कंपन्या व बडी कॉर्पोरेट रुग्णालये ह्यांनी सांगतील त्या दराने खरेदी करून अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले असते. म्हणजे सध्या जसे डॉक्टर्स, नर्स, आर्मी,पोलीस ह्यांना प्रेफेरन्स मिळाला त्याऐवजी अन्य लोकांचे उदा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे कर्मचारी (ज्यातले बहुतेक लोक घरून काम करत आहेत व तुलनेत कमी रिस्क मध्ये आहेत) ह्यांचे लसीकरण अगोदर झाले असते. लस देताना ती ज्या लोकांना जास्त गरज आहे त्यांना अगोदर देण्याची गरज आहे न की ज्यांना ती घेणे परवडते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 06:08 नवीन
लसीचे एप्रूव्हल गरजेचे असणे ह्यात समाजवादी काहीही नाही. कॅपिटालिस्ट अमेरिकेत सुद्धा FDA आहेच. बाकी ओपन मार्केट असते तर लोकांनी लसी घेऊन जास्त लसीकरणं झाले असते ह्या मागचा तर्क काय आहे ? लस उत्पादन शक्य तितक्या वेगाने होत असेल, आणि जर तयार झालेल्या लसी सगळ्यांच्या सगळ्या इदर निर्यात किंवा सरकारला विकल्या जात असतील तर ह्यात भांडवलदारांनी किंवा मार्केट मध्ये खरेदी करणाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रश्नच कुठून येतो ? तर्क अजिबात पटला नाही. तुमच्यासारख्या मालाकासारखेच सरकार पण आहे, शक्य तेव्हढ्या लसी खरेदी करत लसीकरण करतच आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 05/14/2021 - 10:26 नवीन
दोन प्रश्न आहेत, जर फ्रंट लाईन लोकांचे लसीकरण करायचे असेल तर त्यासाठी सरकार आहेच, आणि सरकारने लस खरेदी करूच नये असे माझे मत मुळीच नव्हते, पण सरकारने एकाधिकारशाही केली ती अजिबात करायला नको होती. त्याव्यतिरिक्त, दुसरी लाट काहीही प्लांनिंग ना करता आली हे म्हणणे सोपे आहे, पण सरकारने याच लशी वापरून फ्रंट लाईन लोकांचे लसीकरण करून घेतले. दुसऱ्या लाटेत फ्रंटलाईन वर्कर मेल्याचे ऐकण्यात नाहीये. आणि सरकारने ज्या लशी एक्स्पोर्ट केल्या त्या देखील बाहेरील देशात आत्ता फ्रंटलाईन वर्कर ना तोचण्यासाठीच दिल्या आहेत जितके मला माहीत आहे त्यानुसार. त्यांनी याची पब्लिसिटी केली, ती करावी की करू नये हा भाग वेगळा, पण वैयक्तिक रित्या मला अजूनही तो निर्णय योग्यच वाटतो. आपले फ्रंटलाईन वर्कर सुरक्षित झाल्यावर जगात इतरांना लस देणे आवश्यकच आहे. करण त्यामुळे overall death खूप कमी होतात. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत mortality बरीच कमी दिसत आहे मला तरी. पहिले 8 दिवस केओस होता, पण बहुतेक सरकारनी परिस्थिती बहुतांशी नियंत्रणात आणली आहे. पुण्यात माझे असे निरीक्षण आहे की लॉक डाउन झाल्यानंतर पण लोक फिरत होतेच, पण जसा एकदा वाढला, आणि जवळच्या लोकांचे रिपोर्ट पोसिटीव्ह यायला लागले तसे सगळे घाबरून घरात बसले. त्यानंतर करोना आटोक्यात आला. सगळीकडे तसेच होणार आहे. असो, आपल्याला सरकारवर टीका करायचीच असेल तर डबल ढोलकी आहेतच. पण माझ्या मते देशात मोदींनी आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीने (मी शिवसेनेला मोजत नाही सरकारमध्ये) बऱ्यापैकी चांगले काम केले आहे. अजून बरेच काही आहे. आता करोना उताराला लागला आहे.. थोडा भर ओसरला की एक धागा काढून एकूणच RCA करूया.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 11:42 नवीन
१) एकाधिकारशाहीचा प्रश्नच काय येतो ? लस ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि तिचा ऍक्युट तुटवडा आहे. त्यात सुद्धा एकाधिकारशाही वैगेरे भावनिक अपील ने होते काय ? अश्या ठिकाणी सरकारने येऊन देशाच्या सर्व भागांमध्ये समान वाटप करणे ह्यात फक्त idealogue माणूस, कल्पनांनी पछाडलेला माणूस, विरोध करेल. ह्यात कसलीही एकाधिकारशाही किंवा वाईट गोष्ट मला दिसत नाही. २) दुसऱ्या लाटेत फ्रंटलाईन वर्कर्स मेले नाहीत- मला कल्पना नाही. फ्रंटलाईन म्हणजे फक्त आरोग्यसेवेत कामाला असलेले म्हणत असाल तर त्यांच्या लसिकर्णावर प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले असतील तर अभिनंदन आहेच. पण जर फ्रंटलाईन वर्कर्स ची व्याख्या वाढवली तर यूपी मध्ये इलेक्शन ड्युटीचे कित्येक (७०० लोक जे शाळांमध्ये कर्मचारी होते) लोकांचा मृत्यू झाला. ३)सरकारवर टीका करणे म्हणजे डबल ढोलकी ह्याचा अर्थ तुम्हालाच माहित. मला नाही माहित तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. ४)लस एक्स्पोर्ट केल्या त्याबद्दल माझे म्हणणे नाही. लस निर्मात्यांसोबतच्या करारांमुळे सरकार बांधले गेले होते. आणि इतर देशांना लस पुरवण्यात वाईट काही नाही, ती अत्यंत उत्तम आणि मानवतावादी बाब आहे. आणि, मी कधीही लस निर्यात केल्या म्हणून सरकारवर टीका केली नाही आहे. मी अजून पण सांगतो, गरीब देशांना भारताने मदत केली तर मला अभिमानच वाटेल. मी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या वेगळ्या अँगल मधून होत्या. पुन्हा चेक केल्या तर लस एक्स्पोर्ट केल्याबद्दल मी अवाक्षर सुद्धा टीका म्हणून लिहिले नाही आहे. ५)पहिल्या लाटेपेक्षा mortality कमी दिसत आहे- हे मत कशावरून काढत आहात मला माहित नाही. पण, माझा स्टॅन्ड पुन्हा क्लिअर करतो. Mortality आणि virus spread ह्या बाबत यश आणि अपयश दोनीही सरकारवर टाकणे अयोग्य आहे. पण: १. निवडणूक आणि मोठे जमाव २. ऑक्सिजन तुटवडा आणि पहिल्या वेव्ह नंतर तातडीने दुसऱ्या वेव्हची तयारी न करणे ३. कम्युनल द्वेषभाव या संकटात सुद्धा सतत पसरवणे इथे दोष आहे. ६) तुम्हाला शिवसेना आवडत नाही म्हणून त्यांचे सरकारच नाही असे म्हणाला तरी मताचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 05/14/2021 - 13:58 नवीन
Good. 1) माझ्या मते सरकारने फक्त फ्रंटलाईन वर्कर आणि सरकारी कर्मचारी वगैरे साठी लस घेऊन उरलेली लस मार्केटमध्ये ओपन करायला हवी होती. किंवा एखाद्याला इम्पोर्ट करायची असेल तर तशी परवानगी upfront द्यायला हवी होती. सरकारने का म्हणजन ठरवावे मी कोणती लस घ्यायची ते? मी कोणती लस घ्यायची, कधी घ्यायची वगैरे सगळे सरकारनेच ठरवले, किंवा जर सरकारने सांगितले असते की बाबा पहिल्या 15 कोटी लसी आम्हाला हव्यात, सगळे ज्येना, कोविड वर्कर वगैरे ना द्यायला, ठीक आहे समजू शकतो. बाकी लसीचा acute तुटवडा म्हणजे काय? करोना लास म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन आहे का? पाय कापला की घ्यायला? मुळात आत्ता लाट असताना लसीकरणाच्या मागे लागणे हेच चूक आहे. लसीकरण चालू राहील, पण आधी लाट नियंत्रणात आणून जनजीवन सुरळीत करणे याला प्राधान्य असले पाहिजे. सुदैवाने महाराष्ट्रत तरी सरकारने त्यालाच प्राधान्य दिले आहे, त्यामुळे पहिला oxygen चा तुटवडा सोडल्यास बाकी काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. बाकी oxygen सप्लाय म्हणालात तर मला वाटते आपल्याकडे पुरेसा सप्लाय होता, पण पॅनिक मुळे साठेबाजी झाली, ज्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला.. नाहीतर सगळे ठीक झाले असते. 2) सरकारने हजार वेळेस सांगून देखील अनेक दिडशहाण्यांनी लास घेतली नाही. एक किस्सा सांगतो, एक डेप्युटी कलेक्टर, frontline वर्कर असून सुद्धा स्वतः लास घेण्याऐवजी आधी माझ्या हाताखालच्या लोकांना लस द्या म्हणून आपली लास इतरांना दिली.. 10 दिवसांनी करोना होऊन स्वतः घरात बसला. जर इतक्या वरच्या लोकांना प्रायोरिटी कळत नसेल तर आपण कोणाकडून अपेक्षा करायची? 3) डबल ढोलकी म्हणजे काय ते सांगतो - तुम्ही असाल असे नाही.. सरकार ने लसी बाहेर वाटल्या म्हणून बोंब मारायची, आणि त्याच वेळेस, सरकारला लाट कळली नाही म्हणून ओरड मारायची, आणि त्याच वेळेस lockdown लावला तर आमच्या नोकऱ्या जातात म्हणून पण बोंब मारायची.. इतर सुद्धा असे बऱ्याच गोष्टी सांगता येतील. लोक दोन्ही तोंडाने बोलतात, आपण जनरली सरकारकडे आपल्यापेक्षा जास्त माहिती असते, इतके लक्ष्यात ठेवले की झाले. 4) सोडून देऊ, तुमचे आणि माझे मत सेम आहे 5) निवडणूक ही सरकारची पण मजबुरी होती. समजा ममता रॅली काढत असेल तर भाजप ने गप्प बसावे का? काही गोष्टी या unavoidable असतात. ज्या संख्येने लोक मोदींना शिव्या घालतात, त्या संख्येने ममताला बोलताना मला कोणीही दिसलेला नाही.. आपला तो बाब्या, दुसरे काय बाकी कम्युनल बघायचे असेल तर पुण्यात मुंढव्यात जाऊन या.. करोनाचा कहर चालू असताना मला आंबे पोचवण्यासाठी फिरावे लगत होते. मुस्लिम वस्तीमध्ये बाजारात तुफान गर्दी, सोशल डिस्टन्स सोडाच, तोंडावर मास्क पण नव्हते. हेच लोक नंतर इतरत्र पण फळे विकायला जाणार आणि फिरणार. का मला राग येऊ नये? 6) शिवसेनेचा administrative level ला काय प्रेसेन्स आहे ते सांगा.. उठाठेवी सोडल्यास..
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 14:41 नवीन
१. असहमत आहे. कारण विशद केले आहे असे मला वाटते. लसीचा तुटवडा- १२७ करोड सगळ्या देशवासियांना देण्यासाठी, किंवा त्याच्या जवळपास सुद्धा लसी उपलब्ध नाही आहेत. ह्यात सरकारचा संपूर्ण दोष अर्थात नाही. लस इम्पोर्ट करण्याच्या परवानगी बाबत मात्र सहमत आहे. पण, भारतात देण्यासाठी लसींचा प्रायोरीटीने सरकारने लस स्वतः घ्यायलाच पाहिजे, असे मत आहे.त्याच लशी मार्केट मध्ये ओपन करण्याने काय वेगळा परिणाम साधला गेला असता अजून समजले नाही. त्याऊलट सरकारने लसी घेऊन राज्यांमध्ये वाटणे हाच उपाय व्यक्तिशः उत्तम वाटतो. ऑक्सिजन तुट फक्त साठेबाजीमुळे होती हे सुद्धा पटले नाही. ५. केंद्र सरकार कडे निवडणूक पुढे ढकलण्याचे स्वतंत्र्य होते. ते केले गेले नाही. रॅली भरवणे या बाबतीत सर्वच पक्ष दोषी आहेत. कोणी कोणाला किती शिव्या द्याव्यात हे ज्याचे त्याने ठरवावे. फक्त जर टिका योग्य असेल तर समर्थकांनी धावून जाण्याचा, आणि दुसरीकडे बोट दाखवायचा प्रकार थांबवायला हवा. ममता आणि मोदी यांच्या पदामध्ये सुद्धा मोठ्ठा फरक आहे. मुंढव्याच्या लोकांबद्दलच्या रागात धर्म मिसळून काही कंस्ट्रक्टिव्ह गोष्ट होणार असेल तर नक्की मिसळा,हरकत नाही. मला नाही वाटत तसे. हा मुद्दा उपस्थित करुन पुढे काय करावे- हा प्रष्न पडावा. काय करायचे मुंढव्याच्या मुस्लिमांसोबत ? किंवा, त्यांच्या अश्या वागण्यामध्ये त्यांच्या मुस्लिम असण्याचा काही संबंध आहे काय, नसल्यास धर्म ह्या व्हेरिएबल चा का विचार केला जातो आहे ? सोशल डिस्टंसिंग नोर्म्स बर्‍याच ठिकाणी तोडले जातात. त्यातले मुद्दामून मुस्लिम डेमोग्राफीचे पुढे करण्याचे कारण समजत नाही. कुंभ मेळ्यात गर्दी केल्याबद्दल हिंदू समुदायाचा राग येण्याचा विचार मला तरी शिवला नाही. मला राग आला तो स्वच्छ आणि सुरक्षित कुंभ अशी जहिरात करणार्‍या राज्य सरकारचा. मागच्या वर्षी तबलिघी जमात जशी व्हिलीफाय केली गेली तसे कुंभ मेळ्यासोबत कोणीही केले नाही. आणि करु सुद्धा नये. तबलिघी जमातीचे व्हिलिफिकेशन- हा कम्युनल खेळा आहे. आणि हे प्रकार इन्क्रिजिंगली भाजपाकडूनच झालेले दिसतात, कोविड काळात. ६. हम्म.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 05/14/2021 - 14:51 नवीन
सरकारने कुंभ साजरा करू नका असे सांगितल्यावर पण जनतेने आम्ही करणारच म्हणत कुंभ केला का? यात फरक आहे. एक बाजूला सरकारी नियम पळून केलेला कार्यक्रम आहे, तर एक बाजूला सरकारचे नियम फाट्यावर मारून केलेला कायदेभंग आहे. दोन्ही एकाच तराजूत तोलायचे का हे तुम्हीच ठरवा.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 15:20 नवीन
माझ्या माहीतीप्रमाणे, तबलिघी जमात निझामुद्दीनला ३००० च्या सन्ख्येत १३ मार्च २०२० ला उपस्थित होती. आणि दिल्ली सरकारने १३ तारखेलाच, त्याच दिवशी, ५०+ जमावबन्दी केली होती, पण त्याआधीच बाहेरून लोक आले होते. कोविड मध्ये जमाव नैतिकदृष्ट्या अर्थातच चूकीचा आहे, पण तबलिघी जमातीचा मेळावा इतका सरळसरळ कायदेभन्ग करणारा नव्हताच, पुढे कोर्ट सुद्धा म्हणाले की तुम्ही फक्त एका धार्मिक स्थलावर मर्यादा घालू शकत नाही. पण हे लक्शात घ्या, तिथे जमाव फक्त ३००० लोकांचाच होता. कुंभ मेळ्याशी त्याची तुलना केली तर मी नक्की म्हणेन की तबलिघी जमातीला निव्वळ द्वेशातून दुषणे दिली गेली ! कुम्भ मेळ्यात ३०-३५ लाख लोक आलेले. प्रश्न तर हा पण येतो, की ३.००० वर इतक्या त्वेशाने क्रॅकडाऊन करणारे ३०.००.००० लोकांच्या समुदायाला कशी परवानगी देतात. याबद्दल मला आणखी लिहावे वाटत नाही. माझ्य दृष्टीने या प्रकरणात सरळ द्वेषमूलक राजकारण उघडे दिसते आहे. धन्यवाद. ‌‌‌‌_/\_
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 05/14/2021 - 16:20 नवीन
त्यात बरेच फाटक आहेत, तबलीग मेळावा तेव्हा जेव्हा करोना म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हते. तिथे आलेले काही लोक सरकारला माहीत नव्हते. तिथल्या लोकांना करोना झाला आहे हे कळल्यावर पण ते सरकारला आत प्रवेश करू देत नव्हते ताबलीग मेळाव्यातून आलेले लोक खुलेआम लोकांमध्ये मिसळून करोनाचे वाटप करत होते असेही म्हणायला स्कोप आहे. रत्नागिरीत मिळालेला पहिला पेशंट ताबलीग मधून आलेला होता, आणि रत्नागिरीत पहिला आऊट ब्रेक पण मुस्लिम बहुल भागातच झाला होता. बाकी काय बोलणार. आपली मते वेगळी राहणारच, कारण माझा अनुभव वेगळा, तुमचा वेगळा.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 05/14/2021 - 17:07 नवीन
तबलीगिनीं मुद्दाम पसरवला नसेल परंतु त्यांनी नंतर प्रशासनाची सहकार्य केले नाही. खुद्द अजित डोवाल ला तबलिगी प्रमुखाला भेटायला जावे लागले होते. काही परदेशातील तबलिगीनि परभणी आणि जमखेड येथील मशिदी मध्ये आश्रय घेतला होता. आणि मुख्य म्हणजे मशिदिनीही अगदी खुल्या मनाने परदेशी नागरिकांना आश्रय दिला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/15/2021 - 07:19 नवीन
तबलीघी जमातीच्या लोकांनी डॉक्टर नर्सेस ला शिवीगाळ केला त्यांच्या वर थुकले आपले कपडे उतरवून अत्यंत गलिच्छ असे शब्द उच्चारणे चालून जातंय म्हणा कि. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/tabligh-jamaat-members-harass-nurses-uttar-pradesh-government-to-invoke-nsa/articleshow/74968361.cms?from=mdr https://www.indiatvnews.com/aaj-ki-baat/news-tablighi-jamaat-workers-manhandle-lady-health-worker-delhi-lnjp-hospital-rajat-sharma-opinion-610060 किंवा इन्दोर सारख्या ठिकाणी शांतीप्रिय लोकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करून हाकलून लावलं ते हि चालतंय की? https://www.indiatoday.in/india/story/violence-against-health-workers-not-acceptable-who-1664085-2020-04-07
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/15/2021 - 07:34 नवीन
असे वागणारे व्यक्ती दोषी आहेत. त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 05/15/2021 - 08:33 नवीन
ज्या व्यक्तीवर हल्ला झाला ती हिंदू असेल तर शिक्षा कायद्याने न होता धर्मावर हल्ला केला गेल्याप्रमाणे व्हायला हवी. धर्मावर हल्ल्याला फक्त मृत्युदंड ही एकच सजा असते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/15/2021 - 08:58 नवीन
हो का बरं.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/15/2021 - 09:04 नवीन
त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी. हे वाक्य अत्यंत गुळमुळीत आहे. हूतात्मा स्मारकाची विटंबना केल्या बद्दल समाजकंटकांना अटक होते आणि ते जामिनावर सुटतात. https://www.ndtv.com/mumbai-news/rioters-who-desecrated-amar-jawan-jyoti-nabbed-498199 स्पष्ट पुरावा असला तरी केस चालत राहते. या ठिकाणी श्री योगी आदित्यनाथ सारखाच माणूस पाहिजे. सव्वा दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले ते या हलकटांकडून आणि मोर्चा काढणाऱ्यांकडून सहा महिन्यात वसूल केले पाहिजेत. मोर्चा काढल्यावर हिंसा होणारच म्हणणाऱ्या हलकटाना मराठा मोर्चाचे उदाहरण दिले पाहिजे. प्रचंड मोठा मोर्चा असून कुठे स्मारकाची तोडफोड नाही कि महिला पोलिसांशी गैरवर्तन नाही झाले. शांतीप्रिय लोकांनी मोर्चा काढला कि त्यात ९९ % वेळेस हिंसा होतेच कारण आम्ही हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी आहोत आणि आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही हा दंभ भरला आहे त्यांच्यात. याना आदित्यनाथच पाहिजेत असे आताशा माझे मत होत चालले आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/15/2021 - 13:37 नवीन
त्यांना जगावर राज्य करायचे आहे.... आणि त्यासाठी हिंदुस्तानातून सुरवात करायची आहे!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 05/18/2021 - 06:54 नवीन
अरे तेवढ फार्मरस प्रोटेस्टांकडेपण लक्श द्या, सगळ्यात जास्त नुकसान त्याने केलेय.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 05/13/2021 - 19:08 नवीन
https://www.lokmat.com/politics/bjp-mla-atul-bhatkhalkar-criticize-thackeray-government-a301/ काय बोलाव, ते कळेना
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/13/2021 - 19:30 नवीन
"India made incorrect assumption, opened up prematurely: Anthony Fauci on second Covid wave" अगदी हेच मत आमचे होते व आहे. पहिला लॉक्डाउन संपल्यावर अनेक उद्योगपती/व्यापारी अस्वस्थ झाले होते. अनेक मुख्यमंत्र्यांचा धीर सुटत चालला होता. कारण कराचे उत्पन्न. मग निदान आमचा व्यवसाय लॉकडाउन वगळा अशा मागण्या पुढे येऊ लागल्या होत्या. "लॉकडाउन हे उत्तर नव्हे" असे येथील विचारवंत/बुद्धिमंतपण सांगू लागले होते. विविध राज्य सरकारे व केंद्र सरकार ह्या दबावाला बळी न पडते तर नवल. Focus on curbing mortality, not lockdown: Mahindra tells Maharashtra Covid-19 lockdown: Ficci urges easier norms for manufacturing to resume https://www.business-standard.com/article/economy-policy/covid-19-lockdown-ficci-urges-easier-norms-for-manufacturing-to-resume-120041001253_1.html
  • Log in or register to post comments
प
पिनाक Fri, 05/14/2021 - 05:39 नवीन
पाठीमागे पाहिलं की बऱ्याच गोष्टी चुकीच्या असतात हे लक्षात येणं यात काहीच नवल नाही. हा निर्णय ज्या वेळी घेतला जातो त्यावेळी तो बऱ्याच वेगवेगल्या गोष्टींबद्दल विचार करून मग घेतला जातो. आठवत असेल तर केंद्राने लावल्यानंतर राज्यांनी त्यांचे स्वतःचे लॉक डाउन लावले होते. आणि अनलॉक strategy राज्यानीच ठरवली होती. उद्धव ठाकरे टीव्ही वर येऊन अनलॉक बद्दल बोलत होते. आता ते अयशस्वी ठरल्यावर केंद्राकडे बोट दाखवणे हा निव्वळ पळपुटेपणा झाला.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 05/18/2021 - 07:04 नवीन
कोव्हिड टास्कफोर्सच्या ज्या रिसर्चरनी राजिनामा देउन मोदि सरकारवर टिका केली त्यानेच सेकंड वेव्ह येणार नाही अस म्हणलय. Jameel has been critical of the central government's handling of the pandemic, particularly the second wave. He even targeted the government for their inefficacies in his piece, which he had written for The New York Times in which he had said that scientists in India are facing a "stubborn response to evidence-based policymaking." However, it is important to note that he’s the same person who, in early January this year, had said that India will not face the second wave. “India’s first wave was quite broad. The peak was not very sharp. As a result, I think India may not have, what we traditionally call, a second wave,” Jameel said. https://www.newsbred.com/article/virologist-who-quit-critical-of-centre-look-at-his-own-track-record शिवाय ह्याच ग्रुहस्थांनी लसिकरणावर संशय घेउन लसीविषयी उदासिनता निर्माण केली Dr. Jameel says there is no experimental evidence so far that Covaxin will neutralise newly emerging mutants any better. https://www.thehindu.com/sci-tech/health/a-vaccine-is-a-vaccineregulators-never-approve-a-backup-says-virologist-shahid-jameel/article33537424.ece
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/13/2021 - 20:58 नवीन
१७ मार्चला पंतप्रधानांची स्रव मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. PM Modi calls meeting of all chief ministers on March 17 over surge in Covid cases ह्या दिवशी एकूण रूग्णाची संख्या होती- २६२९१, ५९% केसेस महाराष्ट्रातील होत्या. म्हणजे साधारण १५,०००. शिवाय ही राज्ये तेव्हा स्रवात करोनाबाधित होती. The Centre says Maharashtra, Punjab, Karnataka, Gujarat and Tamil Nadu continue to report a surge in daily Covid-19 cases. These five states account for 78.41 per cent of the new cases reported from across India. वरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मीडिया प्रश्न विचारणार की नाही ? He expressed concern about the high test positivity rate in Maharashtra and MP. and rising cases in Punjab and Maharashtra. 70 districts of the country witnessed 150 percent rise in the last few weeks. He urged to stop this emerging “second peak” of Corona immediately and warned that if we do not stop this growing pandemic now, then a country-wide outbreak can occur. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/maharashtra-active-total-covid-corona-cases-vaccine-how-many-1779647-2021-03-15 https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/pm-modi-meeting-chief-ministers-all-state-march-17-covid-coronavirus-situation-1779665-2021-03-15
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/13/2021 - 21:22 नवीन
काहीतरी गडबड झाली आहे खास. ह्या दिवशी एकूण रुग्णवाढ २६००० असेल. त्या दिवशी एकूण ऍक्टिव्ह लोड होता- २.३४ लाख रुग्ण.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/14/2021 - 06:03 नवीन
हो रूग्णवाढ २६,०००. विविध राज्य सरकारे ,मोठ्या हॉस्पिटल्स मधील डीन्स्/सिनियर डॉक्टर्स .. कोणालाच अंदाज येऊ नये? की ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते? आम्ही भाजपा समर्थक नाही पण प्रत्येक राज्याला किती ऑक्सिजन पाहिजे ह्यावर पंतप्रधानानी लक्ष ठेवायचे ? वरील राज्यांच्या आरोग्यमण्त्र्यांची काही जबाब्दारी आहे की नाही?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 06:41 नवीन
हो, नक्कीच आहे. पण पहिल्या लाटेत मीडियाने कौतुक कुणाचे केले त्यांच्यावर अपयशाचा फ्लॅक येणार कि. (२:१३ पासून बघा) अर्थात, हे फक्त मीडिया दृष्टीकोनातून. राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Fri, 05/14/2021 - 02:38 नवीन
https://www.ndtv.com/delhi-news/coronavirus-delhi-oxygen-need-has-dipped-centre-can-give-surplus-to-others-minister-2440829 अशि अचानक परिस्थिती बदलते? लय गौडबन्गाल आहे. बन्गाल निवडणुकापुर्ती लाट होती की काय? क्रुत्रिम टन्चाई आणि रुग्ण निर्माण करुन जर खर्‍या गरजुना प्राणाला मुकावे लागले असेल तर कठिण आहे देशाचे
  • Log in or register to post comments
य
यश राज Fri, 05/14/2021 - 04:34 नवीन
ही कृत्रिम च टंचाई होती. ज्यावेळी बंगाल मध्ये निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस महाराष्ट्र, दिल्ली सारख्या राज्यांकडून ऑक्सिजन साठी सारखी ओरडा ओरड चालू होती. नंतर मुद्दा हायकोर्टात गेल्यावर व ऑडिट ची मागणी झाल्यावर ही राज्ये ठिकाणावर आलीत आणि आता कोरोना च्यां केसस व ऑक्सिजन ची मागणी पण घटली. या कृत्रिम टंचाई मुळे अनेक जीव गेले त्याबद्दल या राज्याच्या मंत्रिमंडळाला ना सोयर ना सुतक.(political vultures) खरच काळंबर असू शकतं..
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/14/2021 - 05:30 नवीन
फार फेच्ड कन्स्पायरसी थिअरी. दिल्ली चा कर्व्ह बघा. तेव्हा काय परिस्थिती होती आता काय आहे नीट बघा.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Fri, 05/14/2021 - 07:31 नवीन
ब्राह्मणद्वेषाचे हत्यार हळूहळू बोथट व्हायला लागले आहे.>>> हे विधान मला पटले नाही. माझ्या ओळखीच्या अनेक ब्राह्मणानी भारत सोडून दिला आहे कारण त्याना त्यान्च्या मुलान्ची काळजी आहे. यान्च्या उद्योगात प्रत्येक वेळी अडथळा आलेला आहे. मराठा आरक्षण झाल्यास त्याचे परिणाम ब्राह्मणवर्गाला तापदायक होतील. अनेक मराठा नेत्यानी ब्राह्मणद्वेशाला खतपाणी घातले आहे. ब्राह्मणद्वेषाचे हत्यार नुसते बोथट न होता नश्ट झाले पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 05/14/2021 - 07:45 नवीन
ब्राह्मणद्वेषाचे हत्यार हळूहळू बोथट व्हायला लागले आहे
माझे विधान १९४७ साली असलेल्या ब्राह्मणद्वेषावर तुलनात्मक दृष्ट्या आधारित आहे. मला येवढेच म्हणायचे आहे की, आज फक्त ब्राह्मणद्वेष करून, म्हणजे त्याचा उपयोग हत्यारासारखा करून, त्या आधारावर कोणीही सत्तासंपादन करू शकत नाही की भरघोस मते मिळवू शकत नाही. किंवा सत्तेत असलेल्या मुमंच्या जागी बदली मुमं आणू शकत नाही.... ब्राह्मणांबद्दल प्रेम वाढले आहे असे मी म्हणालेलो नाही.

😁

  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Fri, 05/14/2021 - 07:55 नवीन
माझ्या ओळखीच्या अनेक ब्राह्मणानी भारत सोडून दिला आहे
माझ्या ओळखीच्या अनेक सर्वजातीय लोकांनी भारत सोडुन दिला आहे. व संधी मिळाली तर बहुतांश लोक भारत सोडतीलही, त्यासाठी तुमची जात व धर्म ही बाब फार मॅटर करणार नाही...
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 05/14/2021 - 08:05 नवीन
माझ्या समजूतीप्रमाणे भारतात संधी नसतात त्यामुळे लोकं देश सोडून जातात. त्यांचे भारतावर प्रेम नसते किंवा जातीपातीचा त्रास होतो म्हणून ते देश सोडून जातात असे नसावे. निदान माझे बरेचसे नातेवाईक तरी इथे त्रास होतो म्हणून तिकडे गेलेले नाहीत; तर तिथे जास्त स्कोप आहे म्हणून तिकडे गेले आहेत. मात्र तिथेही ठराविक उंची गाठल्यावर ग्लास सिलिंगला तोंड द्यायलाच लागते. असो.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब Fri, 05/14/2021 - 08:08 नवीन
दिगोची यांच्याशी सहमत.
अनेक मराठा नेत्यानी ब्राह्मणद्वेशाला खतपाणी घातले आहे. ब्राह्मणद्वेषाचे हत्यार नुसते बोथट न होता नश्ट झाले पाहिजे.
भारताचे माहीत नाही.. पण निदान महाराष्ट्रात तरी ब ग्रेडी संघटना आणि काही विचारमंच ( अनिता पाटील वगैरे) यांनी काही वर्षा पूर्वी अक्षरशः धुमाकूळ घातला होती. अगदी मी सुद्धा यांच्या लॉजिक समोर काही दिवस संमोहित झालो होतो.. पण त्यानंतर हळूहळू त्यांच्या बोलण्यातील फोलपणा लक्षात यायला लागला. हिंदूंमध्ये फूट पाडणे, ब्राम्हणद्वेष यावर त्यांचा पूर्ण जोर होता. तसेच मुस्लिम लोकं ही आक्रमक नसुन ते इथलेच आहेत, आणि तेच आपले खरे सोबती आहेत अशा प्रकारचे तत्वज्ञान पाजले जात होते. त्यासाठी लाल पिवळे गुलाबी १०० पानी ग्रंथ प्रत्येक ST स्टँड वर प्रकाशित केले जात होते. या सर्व गोष्टींना तत्कालीन राजाश्रय ( सरकारचा आशीर्वाद) होता .. आता ते राजाश्रय देणारे "जाणते राजे" कोण हे सर्वश्रुत आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा