चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)
Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच....-- हे काय विचारणे झाले ? कॉग्रेस, आप व टिएमसी शासित राज्यात काहीही घडले तर त्याला बाय डिफॉल्ट केंद्र सरकार जबाबदार असते. सतत केंद्राच्या नावाने खडे फोडल्याशिवाय त्यांना जेवण देखील जात नसेल. हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत आलेय ते फक्त खंडणी वसुलीसाठी, यांना जनतेची काय फिकीर असणार ! या सर्वात मला ओडीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक आदर्श वाटतात ते कधीही टिव्हीवर येऊन केंद्र सरकारविरुद्ध वायफळ टिका करताना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या एका आवाहनां नंतर त्यांनी त्यांच्या राज्यातून इतर राज्यांना ऑक्सिजन टॅंकर पाठवायला सुरुवात देखील केली ते ही कोणताही गाजावाजा न करता."मृतदेह जाळण्याकरता आम्हाला लाकडे देखील केंद्राने पुरवावीत"अशी मागणी करायची तेवढी बाकी ठेवलेय या महा वसुली गॅंगने.