Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?

म
मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 13:46
🗣 115 प्रतिसाद
फतवा: https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-lockdown-regulations-for-wedding-ceremony-attendance-of-only-25-people-and-2-hour-limit-provision-of-penalty-of-rs-50-000-for-breaking-the-rules-442502.html हे सरकार आल्या पासून विविध प्रकारचे आदेश किंवा सुचना , साॅरी फतवे, निघत आहेत... पण, हा फतवा मात्र खरोखरच विचार करायला लावणारा आहे... आम्ही आमच्या परीने ह्या फतव्याचे पालन, माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, करणार आहोतच. त्यासाठी काही नियमावली पण आखून ठेवणार होतो.. पण जालावर खालील नियमावली मिळाली.... -------------- दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली... 1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे. 2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे. 3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10ऐवजी 3मंत्र म्हणण्याची अट. 4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2मिनिटे दिली जातील. 5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल. 6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील. 7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10मिनिट दिले जातील... त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे.. *नियमावली संपली* ----------- आपल्या मनांत देखील, ह्या कार्याला आणि ह्या फतव्याला अनुसरून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36276 views

🗣 चर्चा (115)
R
Rajesh188 Fri, 04/23/2021 - 16:46 नवीन
लग्न झाल्या नंतर मुलीचे नाव बदलणे हा प्रकार च किळसवाणा आहे. जुन्या रुढी सोडून दिल्या पाहिजेत. नाव बदलून त्या मुलीची ओळख च पुसून टाकण्याचा हा गलिच्छ प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/24/2021 - 04:14 नवीन
मात्र जन्म-प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट, घराची कागदपत्रे, वडिलांचे मृत्युपत्र वगैरेत असलेले माहेरचे नाव बदलून घेणे वगैरे फारच कटकटीचे वा अशक्यप्रायच असते. शिवाय हल्ली लग्न किती टिकेल, पुन्हा किती वेळा नाव बदलावे लागेल हेही सांगता येत नाही. म्हणूनच बहुधा परदेशात असली नाव बदलण्याची भानगडच नाही. किळसवाणे म्हणून नव्हे तर गैरसोयीचे आणि कटकटीचे असल्यामुळे मूळ नावच राहू देणे बरे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/24/2021 - 05:45 नवीन
किळसवाणा, गलिच्छ ... ?
काहीही हं श्री१८८ !
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/24/2021 - 17:04 नवीन
तुमच्या मते लग्नानंतर मुलीचे नाव बदलणे योग्य आहे की अयोग्य आहे?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/24/2021 - 11:22 नवीन
आणि मुलींना ठेवलेले नाव नको असले तर हीच ती वेळ नाव बदलायची.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/24/2021 - 12:41 नवीन
बरोबर, कंजूसजी !
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 04/24/2021 - 18:20 नवीन
मलापण हा प्रकार नाही पटत.. माझ्या नावाने जमीन करताना सोपं पडाव म्हणून माझं नाव बदलाव लागणार आहे.मला तर इच्छाच नाही,पण कायद्यामुळे काही दिवसांनी बदलाव लागणार आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 04/24/2021 - 10:15 नवीन
दोन तासानंतर चे नियम?
  • Log in or register to post comments
प
पिनाक Sat, 04/24/2021 - 11:11 नवीन
दोन तासात संपलं तर प्रश्न नाही. दोन तासात लग्न संपलं नाही, तर लग्न कॅन्सल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 04/24/2021 - 13:47 नवीन
पुरे पच्चास हजार ....
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sun, 04/25/2021 - 19:33 नवीन
वेळमर्यादेची अडचण नाही. माणसांचा आकडा मात्र चुकलाय. २५ नको एकतर २४ हवे नाहीतर २६. विषम संख्या असेल तर कोणीतरी एक व्यक्ति बिनलग्नाची राहील किंवा एका व्यक्तिला दोन व्यक्तिंसोबत लग्न करावे लागेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 02:17 नवीन
25 होऊ शकतात ...
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Mon, 04/26/2021 - 12:00 नवीन
चेसुगुंचा प्रश्न जरी योग्य असला तरी लग्न २४ माणसांचे व १ भटजी असे टोटल २५.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 04/26/2021 - 11:51 नवीन
टेंशन नका घेवु. आताच टीव्हीवर चालु असलेल्या बातमी नुसार कृषीमंत्र्याच्या मुलाच्या लग्नात २५ पेक्षा जास्त लोक असुन. आमदार खासदारच शासनाच्या नियमाला हरताळ फासत असल्याची चॅनेल बोंबाबोंब करत आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/26/2021 - 12:48 नवीन
माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा