Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

श्रीमंतीचे नियम??

उ
उपयोजक
Sat, 03/20/2021 - 04:26
🗣 180 प्रतिसाद
भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? बहुतांश लोकांना तसे वाटते तरी किंवा भोवतालची परिस्थिती तरी त्यासाठी प्रयत्न करायला भाग पाडते. भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथे संघर्ष खूप आहे, भ्रष्टाचारसुद्धा बराच आहे. शिवाय भारतात श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीतून प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते. थिंक अँड ग्रो रिच हे श्रीमंत कसे व्हावे या विषयावर बरेच गाजलेले पुस्तक विशेषत: अमेरिकन जनता डोळ्यासमोर ठेवून लेखक नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. यालाही साधारण ८४ वर्षे होऊन गेली. चर्चेचा विषय हाच आहे की भारतासारख्या देशात श्रीमंत होण्यासाठीचे काही ठाशीव नियम असू शकतात का? अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. ते व्यक्तिपरत्वे थोडे बदलूही शकतात. ते कायम तसेच राहतात असेही नाही. पण अपवादानेच नियम सिद्ध होतात हे ही खरे आहे. ते अपवाद गृहित धरुन श्रीमंत होण्यासाठीचे काही ठराविक नियम असू शकतात का? हेच पहायचे आहे. आता श्रीमंत कोणाला म्हणावे? तर एका त्रिकोणी कुटूंबाला ज्यातल्या कुटूंबप्रमुखाचे पुण्यासारख्या शहरात, वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी. यात त्याच्याकडे बाईक आहे पण चारचाकी नाही, कसलेही खर्चिक व्यसन नाही असे गृहित धरले आहे. ही झाली किमान मर्यादा. आता याउपर ही मर्यादा कितीही असू शकते. जसे उत्पन्न वाढेल तसतसे चारचाकी किंवा खर्चिक व्यसन किंवा अजून खर्चायला लावणार्‍या बाबी उत्पन्नाच्या प्रमाणात अॅड करायला हरकत नाही. धाग्याचा उद्देश प्रामुख्याने उपरोल्लिखित किमान कमाईपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांना श्रीमंत होण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा हाच असावा. आधीच भरपूर कमवणार्‍यांना अजून कसे कमवता येईल यासाठी हा धागा नाही. _/\_ विषयानुषंगाने काही प्रश्न की जेणेकरुन चर्चेला दिशा मिळेल. १) नशीब हा फॅक्टर श्रीमंतीसाठी किती महत्वाचा आहे? २) मराठी लोक व्यापारात फारशी जोखीम घेत नसल्याने त्यांना पंगुसिंमा (पंजाबी, गुजराती, सिंधी, मारवाडी) इतके यश व्यापारात मिळत नाही असे म्हटले जाते. पण पंगुसिंमांच्या व्यापाराच्या अशा काही पद्धती किंवा ट्रिक्स असू शकतात का की ज्यामुळेच ते व्यापारात यशस्वी होतात? उदा. एका मारवाडी व्यक्तीने दुसर्‍या मारवाड्याला धंद्यासाठी कर्ज दिले. ते व्याजासहीत वसूल होण्याचा कालावधी हा मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला धंद्यासाठी दिलेल्या कर्जवसूलीच्या कालावधीपेक्षा जास्त असू शकतो का? पंगुसिंमा हा तग कसा धरु शकतात? अशाच अजून काही युक्त्या असू शकतात का पंगुसिंमांच्या? ३) शहर जितके मोठे तितकी आर्थिक समृद्धी जास्त असे काही असते का? ४) काही क्षेत्रे अशी आहेत ज्यातील कौशल्यातून चांगले पैसे मिळतात. ते कौशल्य शिकण्यासाठी गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत परतावा जास्त आहे. काही मिपाकरांशी चर्चा करुनच ही यादी बनवली आहे. यात अजून काही सुधारणा किंवा वाढ करता येईल का? १. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लागणारं कोणतंही कौशल्य २. कॉम्प्युटर हार्डवेअर इन्स्टॉलेशन,फिक्सिंग ३. सेल्स अँड मार्केटिंग ४. कायिक आरोग्यसेवांतर्गत येणारे कोणतेही कौशल्य ५. गणित, विज्ञान, इंग्रजी हे विषय शिकवता येणे. ६. आर्थिक गुंतवणूकीचे सल्लागार ७. रसायनशास्त्र (कॅटॅलिस्टस्) ८. विद्युत अभियांत्रिकी (कॅप्टीव्ह जनरेशन) ९. लोगो डिझाईनिंग १०. चारचाकी किंवा जड वाहन सफाईदारपणे चालवता येणे. ११. धार्मिक,अध्यात्मिक सेवा पुरवणे १२. कार, बाईक दुरुस्ती, स्वच्छता १३. न्यायिक सेवा (वकील वगैरे) १४. स्पर्धापरीक्षा उत्तम गुणांनी पास होणे. १५. वातानुकूलन यंत्र दुरुस्ती,निगा १६. चेतनकला १७. स्टँडअप कॉमेडी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 75462 views

🗣 चर्चा (180)
ग
गणेशा Sat, 03/20/2021 - 04:53 नवीन
मी आता future रिटायरमेंट चा विचार करुन आणी सध्य स्तिथीतील नोकरी लवकरच म्हणजे अजून ७-८ वर्षात सोडत आहे. त्यामुळे आत्ताच साईड बाय साईड व्यवसायात उतरलो आहे. म्हणजे नंतर जम बसलेला असु शकतो. तरी पैसे कमवणे हा उद्देश असला तरी Ethically व्यवसाय करणे कधी हि ईस्ट ठरते. त्याने भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होतोच होतो. आणि भविष्यात तुमच्याकडे client एक योग्य व्यक्ती किंवा कंपनी म्हणुन जास्त पैसे देऊनही sarvise घेऊ शकतो.. बाकी श्रीमंत - गरीब असले कुठलेही parameter व्यवसायाला नसले पाहिजेत असे वाटते..
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 03/20/2021 - 09:59 नवीन
अभिनंदन! पूर्वी बनवलेली एक यादी आपल्यासहित इतरांनाही उपयोगी पडावी. भरपूर पैसे देणारी+अल्प कालांतराने उत्पादनाची पुनर्निमिती करावी लागणारी उत्पादने आणि भरपूर पैसे देणारे+अल्प कालांतराने पुन्हा सेवा द्यावी लागणारे सेवा उद्योग यांची यादी. यासाठी स्टॅटेस्टीकल डेटा गोळा केलेला नाही.साधारण अंदाज बांधून ही यादी बनवली आहे.त्यामुळे यात उणीवा असण्याची शक्यता असू शकते.मिपावरच्या तज्ञांनी यादी वाढवण्यास/संपादन करण्यास कृपया मदत करावी. १. शेती २. गाय/म्हैस/शेळी/मेंढी/खाण्यायोग्य पक्षीपालन ३. स्थानिक अन्नपदार्थ निर्मिती केंद्रे (हॉटेल,फास्टफूड,रेस्टॉरंट,खानावळ,बेकरी पदार्थ इ.) ४. अन्नपदार्थ विक्री. (दुग्धजन्य पदार्थ,स्नॅक्स प्रकारातले पदार्थ,लोणची,पापड,चटण्या,आईस्क्रिम इ.) ५. प्राशनयोग्य द्रव पदार्थ (दूध,दारु,कोल्ड्रिंक्स,दुग्धसमाविष्ट द्रव पदार्थ उदा.चहा,कॉफी इ.) ६. मिनरल वॉटर ७. सौंदर्यप्रसाधने ८. कागद आणि प्लॅस्टीकवरील छपाई ९.राज्य/देश/आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिव्ही चॅनलसाठी व्हिडिओ शुटींग/व्हिडिओ एडीटींग १०. पॅकेजिंग उद्योग ११. बँकींग १२. ड्रायक्लिनिंग १३. मनोरंजन उद्योग १४. वाहनांची स्वच्छता/दुरुस्ती १५. खनिज तेल उद्योग १६. कारखाने/मोठी हॉटेल्स यांची विद्युतीय देखभाल १७. वीजनिर्मिती उद्योग १८. पर्यटन १९. हॉटेल मॅनेजमेंट २०. प्लॅस्टीक आणि रबरी वस्तूंची निर्मिती २१. सलून/ब्युटीपार्लर २२. रसायन निर्मिती/प्रक्रिया उद्योग २३. औषध निर्मिती २४. औषध वितरण
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 03/20/2021 - 10:40 नवीन
मी करत असलेली आणि माझ्या आवडीचे काही सांगतो.. Finance , Book keeping , health/ wealth planner , share market, Teaching, Trek/outing planner , event management , photography .......................
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 03/23/2021 - 02:49 नवीन
या क्षेत्रातल्या चांगल्या कंपन्या बघून त्यांच्यात शेअर्स च्या माध्यमातून गुंतवणूक करणे हाही एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 03/23/2021 - 08:53 नवीन
जी उत्पादने आपण आणि आजुबजुचे लोक वापरतात त्याच कंपनीचे समभाग घ्यावे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 09:13 नवीन
आचरणांत आणला नाही...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/20/2021 - 05:16 नवीन
उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नौकरी आणि सार्वकालिन सर्वोत्तम म्हणजे, सल्लागार.... परकीय आक्रमण झाले आणि आपण ही चतुःसुत्री, हरवून बसलो.. मराठी माणूस नौकरी करत असेल तर लग्न लगेच होते किंवा मग तो अतिशय श्रीमंत तरी हवा
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sat, 03/20/2021 - 06:30 नवीन
तुम्ही लेखात दिलेल्या लिस्टमधील पर्यायांवर, खालील थंब रुल लावून काट मारा वा नका मारू. निर्णय तुमचा... "ज्या गोष्टी (ए आय /मशीन लर्निंगने) ऑटोमायझेशन करता येतील त्या नको..." उदा. वाहन चालवणे... बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार... "ज्या गोष्टी (ए आय /मशीन लर्निंगने) ऑटोमायझेशन करता येणार नाही त्यावर फोकस करा..." उदा. स्टँडअप कॉमेडी, कोणतीही कला.. गुगल, अँपल यांचे तीर्थरूप जरी आज आले, तरी (ए आय /मशीन लर्निंगने) ते घंटा जास्त काही करू शकत नाही साध्याला....
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/20/2021 - 06:57 नवीन
बरोबर,मी इंटरनेटवरून फिटनेस practices शिकले ज्यासाठी मी निर्बुद्धपणे खुप पैसा घालवला.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 03/20/2021 - 10:21 नवीन
कारखाने आणि वाहनउद्योग यातले ऑटोमेशन हे भारताय कितीजणांना परवडणारे असेल?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 03/20/2021 - 10:33 नवीन
आताच जानेवारी २०२१ मध्ये माझा बालमित्र असलेला एक जन मेकॅनिकल अ‍ॅटोमेशन मध्ये आला आहे, आणि प्रगती पण चांगली आहे. भारी आहे फिल्ड ते.. त्याचे प्रोजेक्ट पाहुन भारी वाटले...
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Sat, 03/20/2021 - 11:00 नवीन
कारखाने आणि वाहनउद्योग यातले ऑटोमेशन हे भारताय कितीजणांना परवडणारे असेल?
कोणा सामान्य भारतीयाला ऑटोमेशन परवडणारे नाही, म्हणूनच मी म्हटले, की अश्या प्रकारावर फोकस करा, की जे उद्या ऑटोमेशन होणार नाही/ होऊ शकणार नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/25/2021 - 13:27 नवीन
भारत देशातून किती वहाने निर्यात होतील त्याच्या आकारमानावर ते अवलम्बून असेल. आपल्याकडे गोव्याचे बाजूला काजूच्या सम्बन्धित कारखाने आहेत तसे ते टर्की मधी देखील आहेत. दोन्ही चे विडिओ यू ट्यूब वर आहेत. ते पाहून तुम्हाला कळेल की आपले कारखाने पूर्ण यान्त्रिक नाहीत. मानवी हाताचे काम इथे आहे. उलट तर्की येतील कारखान्यात ९० टक्के काम यन्त्रच करते. पण तेथील उत्पादन खूप जास्त आहे. त्याना ते त्यामुळे परवडते. मोठ्या कारखान्याची युनिफॉर्मची मागणी मिळत असल्याने पुण्यात बाहेती यान्चे कारखान्यात बरीचशी कामे यन्त्रे करीत असतात. अतिशय गुन्तागुन्तीची किचकट कामे असतील तर ती माणूस ठेवून करणे बरे ठरते. रोबो हा पर्याय तिथे असत नाही. आता ड्रोन जसे स्वस्त होत आहेत तसे रोबोही असे माझा शेजारी जो या क्षेत्रात आहे तो सांगतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 03/20/2021 - 21:15 नवीन
बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार...
असं एका रात्रीत वगैरे काही होत नाही. अजून पाश्चात्य जगातही विना ड्रायव्हर कारचे प्रयोगच केवळ चालू आहेत. भविष्यात होणारच नाही असे नाही. पण यात खूप गुंतागुंत असेल , तांत्रिक, कायदेशीर, विमा विषयक, अर्थिक गुंतवणूक ई.. अजून तरी ऑटो पायलट तंत्रज्ञान असून वैमानिकाशिवाय देशांतर्गत विमानेही उडत नाहीत. तिथे तर एअर ट्रॅफिक कंट्रोल, अद्ययावत यंत्रणा ई सगळे असून.. वैमानिकांचा पगार तर कार (वा बस, ट्रक ई) चालकाच्या पगाराच्या अनेक पट असतो.. पण वैमानिकाची नोकरी जाण्याची अजून भीती दिसत नाही .. तीच गोष्ट ट्रेन्सची ट्रेन निश्चित ट्रॅकवरुन धावते सिग्नल यंत्रणा असते, मध्ये कुणी घुसत नाही तरी लाख-दोन लाख पगाराचा मोटरमन असतोच. मग पंधरा-वीस हजार पगार असलेल्या ड्रायव्हरनेच काय घोडं मारलंय. बरं तो बिचारा सामान पण उचलून डीकीत ठेवतो, दार उघडतो, प्रवासात गप्पा मारुन मनोरंजन पण करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 03/21/2021 - 01:30 नवीन
हे सगळ्यात महत्वाचे ...
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/24/2021 - 05:17 नवीन
कोणतेही नवे तन्त्र आले की त्याला प्रस्थापित ज्याच्या पायाखालची वाळू सरकते त्याचा विरोध असतो ! दुसरे नवे तन्त्र स्वीकारण्यात काही भावनिक गोष्टीचा ही प्रभाव असतो. जसे ज्यावेळी विद्युत दाहिनी आली त्यावेळी हे काय निर्दयपणे प्रेताला एका खोलीत ढकलून द्यायचे किन्वा अहो वीज आणि लाकडाचा अग्नी यात लाकडाचा अग्नी हाच पवित्र आहे वगैरे असे प्रतिपादन करण्यात आले. अपघाती मरण वा हार्ट अटॅक वगळता मरण हे देखील टप्प्याटप्याने येत असते. तांत्रिक बदलाचे तसेच आहे ! बँकेत संगणक आले त्यावेळी युनियन ने केवढा गहजब केला ! आज युनियनच म्हणेल स्टॅण्डबाय संगणक ठेवा बिघडला तर घोळ.नको .आजही ऑन लाईन सत्यनारायण पूजेपेक्षा भाविकाला ओढ आहे ती गुरुजींनी घरी येऊन समक्ष पूजा सांगण्याची ! जाता जाता- इताम्बूल मध्ये आताही एक मेट्रो लाईन ड्रायव्हर शिवाय चालत आहे ! अनेक सामाजिक समस्यांचा विचार करून काही ठिकाणी तांत्रिक प्रगती मुद्दाम होऊन नाकारावी लागते ! भारत याचे फार मोठे उदाहरण आहे !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 03/21/2021 - 21:05 नवीन
Ai वर आधारित यंत्र ही माणसाला replace करत आहेत. आता पर्यंत जे शोध लागले उपकरण निर्माण झाली ती माणसाला replace करत नव्हती तर माणसाला मदत करत होती. त्या आता पर्यंत जी आधुनिक उपकरण आली नी त्या मुळे जी स्थिती निर्माण झाली ती मानवाच्या प्रगती साठी सकस होती. त्याची आणि Ai वर आधारित तंत्राची तुलना करता येणार. AI वर आधारित तंत्र फक्त माणसाला replace करण्यासाठी वापरले जाणार. १) घरकाम करायला यंत्र २) विविध उत्पादन करणाऱ्या कारखान्यात उत्पादन घेण्यासाठी माणसं ऐवजी यंत्र. ३), बँकेत जास्तीत जास्त AI च वापर करून माणूस विरहित बँक. ४), गाड्या,विमान,रेल्वे, चालवण्यासाठी माणसाची गरज लागणार नाही. ५) रोबोट चे तंत्र अजुन प्रगत झाले तर माणसाची सर्व च्या सर्व काम यंत्र करतील. अगदी डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. यंत्र माणसापेक्षा ताकत वान होतील . पण यंत्रात चैतन्य,भावना,संवेदना नसतात. खरा प्रश्न हा आहे सर्वच काम यंत्र करू लागतील पण त्यांनी कोणासाठी काम करायचे. माणसा साठीच ना. विविध उत्पादन कोणासाठी माणसासाठी च ना. विविध सेवा कोणासाठी माणसा साठीच ना. जर पूर्ण कामगार वर्ग किंवा जगातील खूप मोठी लोकसंख्या काहीच कामाची नसेल तेव्हा हे प्रचंड उत्पादन कोण खरेदी करणार. खूप कमी लोक . आज १०० टीव्ही जगात विकले जात असतील तर ते २ च विकले जातील. टीव्ही काही जीवन आवशश्य नाही. जर २ टीव्ही ना ग्राहक असेल तर ९८ टीव्ही चे उत्पादन घेवून त्याचे काय करणार. हे उदाहरण अन्न,पाणी,सोडून बाकी सर्व उत्पादन ला लागू होते. अन्न पाणी,हवा असेल तर मानवाला बाकी कशाचीच गरज नाही. नसलेली गरज आपण निर्माण केली आहे. फुल्ल ऑटोमेशन मुळे जागतिक अर्थ व्यवस्था पूर्ण रसातळाला जाण्याची शक्यता च जास्त आहे. ग्राहक वर्ग हा हवाच त्यांची संख्या कमी होणे म्हणजे अर्थ व्यवस्था डब्यात जाणे सरळ हिशोब आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 03/22/2021 - 01:29 नवीन
डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. यावर ए आय फिजिशियन असा लेख मी लिहिणार होतो. माझे एक मित्र रेडिऑलोजिस्ट आहेत .माझ्या सोसायटीतच रहातात . ए आय या विषयावर त्यान्च्याशी गप्पा मारताना त्यानी मला असे सांगितले की येत्या काही वर्षात आमची गरजच लागणार नाही ! हजारेक सोनोग्राफी फोटो यंत्राला फीड करून सम्पूर्ण निरिक्षणे,फिजिशयन व सर्जनला सजेशन ई कामांसकट रिपोर्ट तयार करण्याचे काम यन्त्र करील. अच्युत गोडबोले हे अभ्यासक म्हणतात " बॅंक्स शाल बी म्युझियम्स !! "
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/23/2021 - 15:45 नवीन
डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. १९९५ च्या सुमारास संगणक आले त्यात आपली लक्षणे टाकून आपले आजार निदान करता येऊ लागले. २५ वर्षांनी स्थिती काय आहे? डॉक्टरांची गरज अजूनच वाढलेलीआहे. हजारेक सोनोग्राफी फोटो यंत्राला फीड करून सम्पूर्ण निरिक्षणे,फिजिशयन व सर्जनला सजेशन ई कामांसकट रिपोर्ट तयार करण्याचे काम यन्त्र करील.

अत्यंत बाळबोध विचार आहेत.

मी ज्या सोनोग्राफी उपकरणावर काम करतो ते सेकंदाला ७० प्रतिमा निर्माण करते म्हणजे एका रुग्णाचे यकृत मी तपासतो त्याला ३ मिनिटे लागतात गृहीत धरले तर १२६०० प्रतिमा माझा मेंदू ३ मिनिटात पाहून ते माझ्या मेंदूत साठवलेल्या आणि ३१ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रतिमांशी पडताळून हे व्यवस्थित आहे कि आजारी आहे हे ठरवतो. हे केवळ एका अवयवा बद्दल आहे. असे केवळ एका रुग्णाच्या एका व्यवस्थित अवयवाबद्दल लक्षात घेतल्यास प्रत्येक अवयवासाठी आणि प्रत्येक आजारासाठी संगणकाला अब्जावधी प्रतिमा शिकवाव्या लागणार आहेत. या प्रतिमा पडताळून त्या रुग्णाचे अवयव ठीक आहेत का हे ठरवल्या जाईल. आणि ठीक नसेल तर कोणता आजार असू शकेल त्याच्या प्रतिमांशी संगणकाला तुलना करून अशा आजाराची शक्यता वर्तवावी लागेल यासाठी काही खर्व निखर्व प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागतील . हे काम रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरा कोणीही करू शकणार नाही. असे झाल्यावर आजार किती गंभीर आहे हे ठरवण्यासाठी अजून फार मोठा पल्ला गाठावा लागेल. उदा. माझ्या मित्राच्या आईला स्तनात गाठ होती ती पाहून मागच्या आठवड्यात मी त्यांना तो कर्करोगाच आहे परंतु तुमच्याकडे १०-१२ वर्षे तरी आहेत एवढे अनुभवाने सांगितले. ८० वर्षाच्या स्त्रीला हा फार मोठा दिलासा आहे. असा दिलासा संगणक देऊ शकेल असे पुढच्या २५ वर्षात तरी शक्य आहे असे वाटत नाही. तेंव्हा येणाऱ्या २५ वर्षात तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला पर्याय होणार नाही. माझ्या सोनोग्राफी उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते उदाहरणार्थ बाळाच्या डोक्याची प्रतिमा घेतली तर त्याचा व्यास आणि परिमिती संगणक मोजून देतो. पण डोक्याचा आकार वेगळा असेल तर संगणक गोंधळतो. हे मी अहंभाव दुखावला गेला आहे म्हणून लिहितो आहे असे नसून वस्तुस्थिती आहे. साधा संगणकीय ई सी जी घ्या, जो गेली २० वर्षे तरी प्रचलित आहे त्यावर संगणक आपला अहवाल (रिपोर्ट) देतो. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक अवतार आहे. त्या अहवालाबद्दल हृदयरोग तज्ज्ञ दुजोरा देत नाही तोवर त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राहिली गोष्ट. जी गोष्ट बिनडोकपणे वारंवार करावी लागते अशा कमी कौशल्याच्या गोष्टी मध्ये संगणक पुढे येईल याबद्दल शंका नाही. पण एखाद्या स्त्रीला तू सुंदर दिसतेस हे संगणकाने सांगितले तर तिला त्याचे समाधान होईल का? बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 03/23/2021 - 20:05 नवीन
तुमचा संगणक आणि त्याचे सॉफ्टवेअर AI वापरत नाही. या क्षेत्रात प्रचंड बदल झालेले आहेत आणि होताहेत. सध्याचा 1 दिवस हा 2010 मधल्या संपूर्ण वर्षाएव्हढा आहे हे संगीतलं तर किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करतो आहे हे लक्षात येईल. शिवाय आता हे सॉफ्टवेअर तुमच्या मशीन वर असण्याची गरजच नाही. त्याचा कित्येक जीबी डेटा क्लाऊड वर ठेवलेल्या सॉफ्टवेअर ला पुरवला जाईल आणि तिथे निर्णय घेऊन तुम्हाला कळवला जाईल. कॉम्प्युटर बिनडोक कामे करणार नाही या पुढे. तो projections करेल, rule based analysis करेल आणि निर्णय घेईल. I am sorry to say this, but most of the human work is doomed in coming decade and yours is the easiest to automate.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/24/2021 - 05:45 नवीन
किती प्रचंड गतीने कॉम्प्युटर ज्ञान आत्मसात करतो संगणक मुळात ढ असतो त्याला अ + ब = क हे मुळात शिकवावे लागते. आज या मूलभूत कल्पना शिकवून काही दशके झाल्यामुळे आपल्याला असे वाटत असते कि संगणकाला सर्व काही येते. मानवी शरीराच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो कि आपला स्वतःचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उजव्या हाताच्या अंगठ्याशी जुळत नाही. म्हणजेच आपण प्रत्येक व्यक्ती हि एकमेवद्वितीय ( युनिक) अशीच आहे. असेम्ब्ली लाईन मध्ये उत्पादन झालेली नाही. आई वडिलांचा एखादा अवयव (उदा मूत्रपिंड) मुलाच्या शरीरात रोपण करण्यासाठी आणि तेथे टिकवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात. हेच जीवशास्त्रीयदृष्ट्या अजिबात संबंध नसलेल्या नवऱ्याचे मूल आईच्या गर्भाशयात नुसते जगते नव्हे तर भूमितीय पटीने वाढत जाते ( ९ महिन्यात काही मायक्रोग्रॅम पासून ३ किलोग्रॅम पर्यंत). हे ज्या वेळेस वैद्यकशास्त्रास समजेल तेंव्हा अवयव रोपं अतिसाहय सोपे होईल. दुर्दैवाने अभियांत्रिकीच्या लोकांचे जीवशास्त्राचे मूलभूत ज्ञान हे नगण्यच्या जवळपास असते परंतु प्रत्येक गोष्टीचे गणितीय प्रारूप करता येईल हा अट्टाहास मात्र असतो. हि सतत होत जाणारी वैद्यकशास्त्राची प्रगती संगणकाला सतत शिकवावी लागेल. आणि शेवटी या प्रगतीचा मूळ हेतू हा मानवी जीवन सुलभ करण्यासाठी आहे हेच लोक विसरत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न अल्गोरिदमने सोडवणाऱ्या अभियंत्याला गरोदरपणामुळे बायकोच्या पोटात कसं तरी होतंय याचे उत्तर सापडत नाही. त्याची स्वतःची आई आपल्या सुनेला "अगं, गरोदरपणात असं होतंच. याच्या वेळेस माझ्या पोटात पाणी सुद्धा ठरत नव्हतं, तू अजिबात काळजी करू नकोस " हे सांगते आणि त्याने

च

बायकोचं समाधान होतं. याने कितीही गुगल वाचून संप्रेरकांच्या उलथापालथीने होते असे सांगून तिला काही फरक पडत नाही तेंव्हा त्याला हतबल वाटतं. जाता जाता -- २०१० च्या ३६५ पट वेगाने काम करणारा संगणक अजूनही करोनाची १०० % गुणकारी लस निर्माण करू शकलेला नाही. असो
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/23/2021 - 21:14 नवीन
राजेश जी, चौराकाका, पिनाक.. नाही.. मशीन लर्निग algorithms, analysis करतील लाखो images चे, लाखो data चे.. ते माणसांच्या geography वरून, त्याच्या gender वरून किंवा आणखीन कसल्याश्या data वरून अनुमान काढतील की असे झाले तर पुढे भविष्यात काय होईल.. परुंतु, AI डॉक्टरांना replace करू शकणार नाही. AI कितीही intellegent झाले तरी त्याच्या नावापुढे असलेला artificial हा word ते पुसू शकणार नाही. - गणेशा
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 03/25/2021 - 08:10 नवीन
हे दोन विषय जबरदस्त क्रांती करत आहेत. एक उदाहरण म्हणुन पेपर मधे वाचलेल्या लेखाबद्दल सांगतो १९९६ साली आय बी एम कंपनीने डीप ब्ल्यु नावाचा महा संगणक बाजारात आणला होता आणि त्याची जाहिरात म्हणुन त्यावेळचा सुप्रसिद्ध बुद्धीबळपटू कास्पारोव्ह्बरोबर त्याची प्रदर्शनीय मॅच लावली होती. कास्पारोव्हने ती जिंकली आणि मग मानवी मेंदु मशीन पेक्षा नेहमीच श्रेष्ठ असेल वगैरे स्तुती सुमने उधळुन त्या विषयावर पडदा पडला. ह्या पराभवातुन धडा घेउन आय बी एम ने समांतर गणक पद्धती(पॅरलल प्रोसेसिंग) वापरुन एका वेळेस अनेक प्रोसेसर लाखो गणिते करु शकेल असा पुढचा संगणक जन्माला घातला. आणि १९९७ साली पुन्हा तशीच एक मॅच झाली जी यावेळी डीप ब्ल्युने जिंकली. यात कास्परोव्ह जेव्हा चाली खेळताना २० शक्यता(प्रोबॅबिलिटी) विचारात घ्यायचा तेव्हा डीप ब्ल्यु साधारण २० लाख शक्यता विचारात घ्यायचा कारण तो १+१=२ असाच विचार करु शकायचा. पण तो कुठेही गाळणी (एलिमिनेशन) करत नसे. त्यानंतर पुन्हा तशी मॅच झाली नाही पण संगणकाच्या गणन शक्तीला वाढवत बसण्याला असलेल्या मर्यादा ओळखुन शास्त्रज्ञ लोकांनी गाळणी पद्धत वापरायला सुरुवात केली. त्यात २० लाख शक्यतांपैकी किती चाली कास्पारोव्हने कधीच वापरल्या नाहीत, अमुक ओपनिंग केल्यास किती चाली बाद होतात, कितव्या मिनिटाला कुठली चाल होत नाही वगैरे अनेक शक्यता विचारात घेउन संगणक नेमक्या चाली निवडे. थोडक्यात शास्त्रज्ञ लोकांनी त्याला पॅटर्न ओळखायला शिकवले ज्यामुळे फालतु गोष्टी टाळुन नेमका निर्णय घेने त्याला जमेल. शिवाय हे निर्णय लक्षात ठेवुन पुढील वेळेस तो वापरेल म्हणजे दिवसेंदिवस त्याच्या निर्णय क्षमतेमधे सुधारणा होत जाईल. अशी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण यामुळे बुद्धीबळ खेळणे थांबले का? नाही, उलट स्पर्धेसाठी तयारी करताना आज यच्चयावत खेळाडु संगणक वापरतात आणि आजकालची लॅपटॉपवर चालणारी साधी सॉफ्ट्वेअर डीप ब्ल्युपेक्षा कैक पटीने जबरदस्त आहेत. त्यामुळे फक्त तांत्रिक अंगाने विचार केला तर आज आपण करतो ती अनेक कामे भविष्यात बाद होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण नवनव्या संधी उपलब्ध होतील हेही तितकेच खरे आहे.तेव्हा परिस्थितीशी जुळवुन घेणे किवा बाजुला होणे हेच पर्याय आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 03/25/2021 - 09:07 नवीन
नक्कीच.. बरोबर..
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/25/2021 - 10:39 नवीन
आज वैद्यकाला मदत करतात ते इंजिनियर ! एखाद्या रुग्णालयाची पर्चेस ऑर्डर पहा ! त्यात कितीतरी गोष्टीना इंजिनिअर लोकांचा हात लागलेला आहे ! आणि तो पुढे लागण्याशिवाय पर्याय नाही. आज १ वर्षात आपण लस शोधू शकतो यात अनेक अत्याधुनिक उपकरणाची मदत झालेली आहे ! मानवी मेंदूचे गुणगान करताना माणूस आपल्या मेंदूतील प्रोसेसर वापरताना काहीही अडचण येत नाही असे गृहीत असते . पण जरा आजूबाजूला मानवी मेंदूच्या मर्यादांची लिस्ट पाहा . मुख्य म्हणजे अतिशय सूक्ष्म मापन करण्याची क्षमता नसणे हा माणसाचा एका मोठा दोष आहे . हात लावल्याने ताप आहे हे कळते पण तो किती आहे हे संशोधन करणारा इंजिनिअरच असेल ना ? कारण तो किती ताप आहे हे फार महत्वाचे मापन काही निरणयासाठी ठरू शकते.दूसरे महत्वाचे वैगुण्य म्हणजे स्तराधारित स्मृती . त्यामुळे मानवी मेंदूला स्थूलपणे प्रतिमा लक्षात ठेवता येत असलेली पण त्यात अतीसूक्ष्म ता आली की माणूस संगणकासारखे रिझल्ट देऊ शकत नाही ! मी जे हे प्रतिपादन करतो आहे ते मी जेंव्हा पुणे येथील आय एम डी आर् या संस्थेत आज्ञावलीतील पहिले धडे घेतले त्यावेळी जे ऐकले आहे त्यावर आधारित. मी आज जेंव्हा फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरतो त्यावेळी ते तयार करणार्या थॉमस नॉल व त्याचे सहकारी इंजिनीअर यांच्या पुढे आपण किती क्षुल्लक आहोत याचे भान येते.पण .... पण यात एक खास गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फोटोशॉप वापरणारे मेंदू त्या इंजिनिअरांच्या पलीकडचे आहेत . कारण क्रिएटिव्हिटी आली की संगणक ठप्प ! एखादा की बोर्ड काहीतरी वाजवू शकतो पण चाल लावू शकत नाही ! जिथे फक्त गणिती अनुमान आहे त्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमता नक्की पराक्रम गाजविणार ! तिला अगदी अमिताभ सारखा नाही तरी त्यासम ऍनिमेटटेड अमिताभ उभा करता येईल .पण कथा लिहिता येईल काय ? हा प्रष्णाचे उत्तर आजच्या भाषेत नाही असे आहे ! काळाच्या उदरात काय दडवून ठेवले आहे कुणास ठाऊक !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/25/2021 - 14:59 नवीन
माझा विषय रेडिओलॉजी ज्यात संगणकाचा सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सुद्धा माझ्या शाखेने सर्वात प्रथम उपयोगात आणायला सुरुवात केली. आणि याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहेच परंतु यामुळे प्रशिक्षित क्षकिरण तज्ज्ञाची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेईल हे नजीकच्या भविष्यकाळात ( आपल्या आयुष्यभरात) तरी अशक्य आहे. उदा. छातीच्या क्षकिरण प्रतिमेचे विश्लेषण करून त्यात कर्करोग असण्याची शक्यता हि आता संगणक जास्त अचूकतेने करू लागला आहे. परंतु त्यासाठी अक्षरशः हजारो कर्करोगाच्या प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागल्या होत्या. असे संगणकाचे प्रशिक्षण केल्याने सर्वात मोठा फायदा सुदूर असणाऱ्या ठिकाणी जेथे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही तेथे सर्वात जास्त होऊ शकेल. आजसुद्धा अमेरिकेत केलेल्या स्कॅनच्या प्रतिमा भारतातील क्षकिरण तज्ज्ञ आपल्या दिवसा ( अमेरिकेत रात्र असताना विश्लेषण करून त्याचा अहवाल रात्रीत तेथे पाठवून डॉलर्स मध्ये कमाई करत आहेत कारण यंत्र प्रशिक्षण (मशीन लर्निंग) देण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित शिक्षकच लागतात. एकदा यंत्राला शिकवले कि ते तेवढे काम जास्त उत्तम आणि सफाईने करते हे सत्य. आज तरी संगणक स्वतः स्वतंत्र विचार करू शकत नाही. परंतु या यंत्राला कालबाह्य करणारे तंत्रज्ञान विकसित होत जाते तसे नवींन तंत्रज्ञान नव्या यंत्राला शिकवावे लागेलच. त्यासाठी त्या बुद्धीचे मनुष्यबळ लागणारच आहे. यात अशिक्षित आणि अर्ध शिक्षित मनुष्यबळाचा ऱ्हास होईल हि मात्र वस्तुस्थिती आहे. जसे रिक्षा मोटारी आल्या तेंव्हा टांगे नाहीसे झाले आणि संगणक आल्यावर टायपिस्ट/ स्टेनोग्राफरची गरज नाहीशी झाली.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 03/22/2021 - 15:01 नवीन
हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं पॉवरफुल्ल आहे म्हणता .. मेथी निवडायचं मशीन काही अजून आलं नाही पण !!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 03/22/2021 - 15:33 नवीन
मटार स्वस्त झाले की आर्थिक दृष्टीने बरे वाटते पण शारिरीक दृष्टीने फायदेशीर पडत नाही....
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 03/22/2021 - 16:59 नवीन
तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे गोडवे गातात पण प्रत्यक्षात कितीतरी कंटाळवाणी आणि काहीतर घाणेरडी कामं माणसांना करायला लागतात. माझ्याकडे एक व्हिडिओ होता माझ्याच सोसायटीच्या बाहेरचा तुंबलेलं गटार साफ करण्यासाठी एक माणूस (महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी ) कपडे काढून सांडपाण्यात उतरला होता. फारतर वर्ष -दीड वर्षातला असेल व्हिडिओ. माझ्यानं बघितलाही गेला नाही पुर्ण.. डिलीट केला.. पण आता वाटतं ठेवायला हवा होता.. महासत्तेच्या गप्पा मारताना अशा व्हिडिओची आठवण हवी... बरं हे पण कुठल्या खेड्यातलं नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतलं दृष्य... तळागाळातल्या माणसाचं जीवनमान सुधारत नसेल तर त्या ऑटोमेशनचं काय करायचं ?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/22/2021 - 17:37 नवीन
काही काळापूर्वी CGI technology चित्रपटातील प्रमुख कलाकारांना बेकार करेल अशा बातम्या यायच्या परंतू तसे काही घडले नाही.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 03/23/2021 - 20:08 नवीन
18 व्या शतकात रेल्वे नवीन नवीन पाहून भारतातील लोक जशा चर्चा करत असावेत त्याचा हा आधुनिक प्रकार वाटतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 03/24/2021 - 16:34 नवीन
पण त्याला आपल्याकडे पर्याय नाही. या कामासाठी बोलावताना मी दोन साबण आणून देत असे आणि आंघोळ करायला लावत असे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Mon, 03/22/2021 - 17:40 नवीन
आजही शहरात रस्ते खणायला मशिन वापरले जात असेल परंतू जेथे वीज , टेलिफोनच्या वायर आणि पाण्याचे पाईप असतात त्याठीकाणी माणसेच टिकाव फावड्याने खोदकाम करतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 03/24/2021 - 09:13 नवीन
एक लक्षात घ्या १९८६ मध्ये मी संगणक वापरीत होतो . माणूस असो वा संगणक त्याला २ अधिक २ बरोबर चार हे शिकवावेच लागते . मानवी रोजगारी मध्ये पाहाल तर ८० टक्केचे वर कामे कोणतीही फार मोठी बुद्धीमत्ता वापरून होत नाहीत. म्हणून तर संगणकाला काही प्रमाणात का होईना माणसाचा पर्याय म्हणतात. १९८६ चे सुमारास फाईल वाच रेकॉर्ड तयार कर व छाप ई . कामे संगणक करीत असे. हार्डवेअर व सॉफ्टवेअर मध्ये जशी प्रगती झाली तसे फिल्टर, सॉर्ट ई गोष्टीही संगणक करू लागला . मग एकच कमांड ना वापरता कमांडचा समूह ( मॅक्रॉस ) करून अधिकाधिक गुंतागुंतीची आज्ञा द्यायची सोय संगणकात झाली. इंटेल व मायक्रोसॉफ्ट यांनी जणू एकमेकांच्या गरजा समजून आपला संशोधनातला मार्ग चोखाळलेला आहे. हा सारा इतिहास संगणक कार्य शिकविताना शिकविला जातो.संगणकाला जशा मर्यादा आहेत तशा मानवी मेंदूला देखील .(मानवी मेंदूच्या मर्यादासंबंधी काही व्हिडीओ यू ट्यूब वर सापडतील ) मुख्य म्हणजे संगणक ,एकाग्रता ह्या हा गोष्टीची गरज नसलेलेभावना शून्य यंत्र आहे. या दोन बाबी माणसाच्या हातून कितीही अनुभव असला तरी चुका घडवून आणू शकतात. ड्रायविंग लायसन्स असलेला माणूसही अपघात करून शकतो नव्हे ज्यांच्या हातून अपघात झाले आहेत यात टक्केवारी लायसन्स असणारांचीच अधिक असते. संगणक गणन विभाग व तर्क विभाग या दोनच्या संकराने चालतो .तर गणक फक्त गणन च करू शकतो . यामुळे संगणक आज्ञावलीला दोन गोष्टीची मदत लागते. संगणकाला ही पंचेंद्रिये असतात ( पेरेफेरल सेन्सर्स ) हे सेन्सर्स जितके अधिक जितके एकमेकांना संवादित तितके आज्ञावलीला मदत अधिक . आज्ञावलीत जितके व्हॅलिडेशन सखोल ,जितके लॉजिक सखोल ( डीप ली एम्बबेडेड इफ्स ( कंडीशनल स्टेटमेंट ) तितका मिळणारा रिझलट अधिक सत्याच्या जवळचा ! एकेकाळी हवामान खात्याची चेष्टा पु ल देशपान्डे आपल्या लेखात करीत ! आता तो विषय तितका चेष्टेचा राहिलेला नाही कारण अधिकाधिक सेन्सरचा शोध ! आज एकट्या फोटोशॉप हा सोफ्ट्वेअर ची प्रगति पाहिली की थक्क व्हायला होते. आवाजावरून टायपिंग हे मला एके काळी अशक्य वाटत असे आज बाजूला आपण माउसने जोडाक्षर काढले तर निमिशार्धात त्याचे रुपान्तर वेक्टर ग्राफिक्स मधे करून तो शब्द कॉपी पेस्ट करायची सोय झाली आहे. आता आपल्या प्रश्नाचे उत्तर. योग्य प्रकारचे सेन्सर असतील तर त्या यन्त्राला अगोदरच समजेल की मी जिथपर्यत खोदाई केली आहे त्यापुढे २ इन्चावर केबल जात आहे. यन्त्र थाबेल .कुठेतरी मानवी निर्णयाची गरज लागली तरी अशा निर्णय घेणार्या मानवी मेंदुन्ची गरज तुलनेने संख्यात्मक द्रुष्ट्या कमी असेल. आजही सी एन नी मशीनवर माणूस असतोच .त्याला फक्त जे रोबोही करू शकत नाही अशी गुन्तागुन्तीची कामे करावी लागतात. आज काय आहे त्या संदर्भात उद्या काय असेल याची कल्पना करता येते ती आजच्या उपलब्ध असलेल्या तन्त्रमाहिती वर . त्यापेक्षा आणखी प्रगत असे काही फिजिक्स ने शोधून दिले तर कोणतेही क्षेत्र नसेल जिथे बेकारी नाही. भावना व नवनिर्मिती इथे मात्र संगणक अपुरा पडणार हे नक्की !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 03/24/2021 - 10:08 नवीन
रोबोट काय करू शकतात ,AI काय करू शकते हा प्रश्न नाही . शेवटी जे काही शोध लागत आहेत,Ai वापरून रोबोट निर्मिती आणि उत्पादन ,सेवा,कामगार विरहित करून त्यांच्या वरचा खर्च तो कंपनीचं फायदा हा एक हेतू आहे . दुसरा हेतू आहे वेग प्रतिस्पर्थी पेक्षा जास्त वेग हवा . आणि तिसरा हेतू आहे दर्जा उत्तम ठेवणे. आणि हे तिन्ही हेतू यांत्रिकी करण आणि AI आधारित तंत्र ,रोबोट, पूर्ण करू शकतात ह्या विषयी बिलकुल शंका नाही . खरा प्रश्न हा आहे की 1) ज्याच्या साठी हे सर्व चालले आहे तो मानव च ह्या सर्व प्रक्रियेत बाहेर जात असेल तर त्याचा फायदा काय . २) उत्तम दर्जा ,असलेल्या आणि पूर्ण यांत्रिक पद्धती नी निर्माण केलेल्या वस्तू,सेवा ह्या तर hundred percent मानव जाती साठीच असणार. ३) यंत्र उत्पादक,सेवा पुरवणारे आणि ग्राहक माणूस हे सत्य कधी बदलू शकत नाही. ४) सेवा घेण्यासाठी,उत्पादित साहित्य घेण्यासाठी हे ग्राहक कसे निर्माण करायचे. ५) कारखानदार, investment करणारे,भांडवलदार,हे उत्पादक किंवा सेवा पुरवणारे असणार पण ह्या व्यतिरिक्त त्या मध्ये माणूस सहभागी नाही. फक्त यंत्र सहभागी आहेत. ६) purchhes पॉवर असणारी लोकसंख्या अशा वेळी वाढेल की कमी होईल. ६) नक्कीच कमी होईल . मग हा सर्व डोलारा नक्कीच कोसळणार आहे. ते उद्या होणारच आहे. माणसाच्या जीवनात यंत्राचा सहभाग किती असावा . काही टक्केच असावा. कोणतेही गोष्ट मर्यादे बाहेर गेली की अनिष्ट परिणाम होणारच. स्किल develop करू ,नवीन संधी मिळतील. हे पोकळ वाक्य आहे. AI च्या पुढे माणसाचे स्किल काय असणार. त्यांची निर्मिती,दुरुस्ती,आणि त्यांचा वापर इथ पर्यंत च मर्यादा आहेत. आणि हे काम काही लाख लोक च पुरेशी आहेत पूर्ण जगात. मग बाकी कित्येक अब्ज लोकांनी काय करायचे. दरोडे,चोऱ्या,हिंसा,नेटवर्क हॅक करणे,system वर हल्ला करणे . ह्या क्षेत्रात स्किल develop karave लगेल. आणि गरज च सर्व शोधाची जननी असते. नेटवर्क कसे हॅक करायचे,रोबोट कसे हॅक करून आपल्या ताब्यात ठेवायचे,ड्रायव्हर लेस गाड्या त्यांची system corrupt करून कुठे कुठे फिरवाय च्या. ह्या विषयात बाकी लोक स्वतः ला झोकून देतील.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 03/23/2021 - 05:50 नवीन
जिथे बुद्धीतील हिशेब वा मापन या भागाचा वापर होतो तिथेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग होईल . जिथे सारासार विचार हाच महत्वाचा आहे इथे यंत्राचे काही काम नाही ! मग मेथी निवडणे हे सारासार विचाराने करण्याचे काम आहे का ? तर एका अर्थाने ते खरे आहे ! मी स्वतः: मेथी निवडताना कधी कात्रीचा वापर करत तर कधी हाताने खुडतो .हा निर्णय मेथीच्या पानाचे स्वरूप ,गड्डी चा ओलेपणा यावर अवलंबून असतो असे अनेक सेन्सर्स मानवी देहात मेंदूला निर्णय घेण्यास मदत करतात तितके यंत्राला लाभत नाहीत .सबब काही कामे दिसायला जरी सोपी असली तरी मशीनच्या दृष्टीने ती गुंतागुंतीची असतात .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 03/23/2021 - 21:13 नवीन
राजेश जी, चौराकाका, पिनाक.. नाही.. मशीन लर्निग algorithms, analysis करतील लाखो images चे, लाखो data चे.. ते माणसांच्या geography वरून, त्याच्या gender वरून किंवा आणखीन कसल्याश्या data वरून अनुमान काढतील की असे झाले तर पुढे भविष्यात काय होईल.. परुंतु, AI डॉक्टरांना replace करू शकणार नाही. AI कितीही intellegent झाले तरी त्याच्या नावापुढे असलेला artificial हा word ते पुसू शकणार नाही. - गणेशा
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/20/2021 - 06:33 नवीन
वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी.
नाही हो. साठ हजारात श्रीमंत म्हणावे अशी लाईफस्टाईल नाही ठेवता येणार. त्यात ई.एम.आय वगैरे असेल तर विसराच.
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 03/22/2021 - 22:17 नवीन
इतर सर्व खर्च भागवून जर महिन्याला ६०,००० रुपये वाचत असतील तर श्रीमंत म्हणू शकतो. साधारण मासिक उत्पन्न : घरचे भाडे emi : ४०,००० फोन, इंटरनेट, वीज इत्यादी : ३५०० आरोग्य : २००० वस्त्र : ३००० चित्रपट, सैरसपाटा : २००० गाडी, पेट्रोल इत्यादी : १०,००० अन्न : ६००० नोकर आणि साफसफाई : ३००० रिटायरमेंट साठी सेविंग : ४०,००० धर्म आणि दान : २००० म्हणजे साधारण कर भरल्यास हातांत १,४०,००० तरी महिन्याला आले पाहिजेत. तरी ह्यांत वर्षाला एकदा प्रदेश प्रवास, इतर कुटुंबीय, लग्न आणि वडीलधाऱ्यांचे आरोग्य, मुलाची फी इत्यादी गोष्टी घातल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/23/2021 - 03:36 नवीन
बापरे!!!! प्रत्येकाची आर्थिक स्वातंत्र्याची, चौकट वेगळी असते...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/20/2021 - 07:04 नवीन
कायिक आरोग्यसेवा म्हणजे काय? न्यायिक सेवा (वकील हे सगळ्यात बेस्ट आहे... वैयक्तिक सल्ल्यासाठी वकीलाची बडबड १/२ तास म्हणून १००० वगैरे रुपये मोजावे लागतात.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 03/20/2021 - 08:59 नवीन
यात मानसोपचारतज्ज्ञ येणार नाहीत
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Sat, 03/20/2021 - 07:32 नवीन
आपला एखाद्या विषयात हातखंडा असेल तर तो कंटेन्ट सरळ युट्यूबवर अपलोड करावा. हल्ली व्हिडिओ बनवायला फार खर्च येत नाही आणि ते फार कठीण काम आहे असेही नाही. आजच्या काळात डेटा हा राजा आहे. एकदा एखाद्या युट्यूब चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर लोक यायला लागले की त्या जनतेला गुगल जाहिराती दाखवून पैसे कमावते आणि त्यातील काही वाटा त्या चॅनेलवाल्यांना देते. त्यातून भरपूर कमावता यायची संधी आहे. भाऊ तोरसेकरांच्या प्रतिपक्षलाच जवळपास १ लाख ८८ हजार सबस्क्राईबर्स आहेत आणि जवळपास तीन कोटी व्ह्यू त्या चॅनेलचे झाले आहेत. त्यातून लाखांमध्ये (म्हणजे एखाद लाख नाही- १५-२० लाख वगैरे) कमावायची संधी आहे. प्रगत लोकेने मागच्या वर्षी पुढील व्हिडिओ अपलोड केला होता. त्यातून कळेल की त्याला महिन्याला त्यावेळी ५०-६० हजार मिळायला लागले होते. प्रगत लोकेच्या चॅनेलला जितके व्ह्यू त्यावेळी होते त्यापेक्षा भाऊंच्या व्हिडिओंचे व्ह्यू आता चांगले १०-१५ पटींनी जास्त आहेत. म्हणजे यातून किती कमावायची संधी आहे बघा. मी यूट्यूब पर्यटन खूप करतो. नोमॅडिक इंडियन, सॅव्ही फर्नवे हे माझे आवडते चॅनेल्स आहेत. नोमॅडिक इंडियन अफगाणिस्तानला गेला होता आणि तालिबानने ज्या बामियानच्या बुध्दमूर्ती तोफा लावून तोडल्या तिथे तो गेला होता. त्या ठिकाणचा व्हिडिओ आहे. ही मंडळी पण अशीच लाखांमध्ये कमावतात. कोल्हापूरची मुक्ता नार्वेकर पण छान व्हिडिओ अपलोड करते. कोकणी रानमाणूसचे पण व्हिडिओ आवडतात. फक्त युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करताना चांगला कंटेंट देता आला पाहिजे आणि मधूनमधून सारखे काहीतरी अपलोड केले गेले पाहिजे. नाहीतर प्रेक्षक नियमितपणे आले नाहीत तर त्याचा उपयोग नाही. आताच्या काळात स्क्रीन रेकॉर्डिंग करून कोणालाही कोणतेही व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. आणि असे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आंतरजालावर कुठे पसरतील यावर व्हिडिओ बनविणार्‍याचे काहीच नियंत्रण राहत नाही. विशाल मलकान आणि त्याची बायको मेघना हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून शेअरमार्केटचे प्रशिक्षण देत आहेत. इतकी वर्षे ते पंचतारांकित हॉटेलांमध्ये सेमिनार घ्यायचे पण लॉकडाऊनमुळे त्यांना ऑनलाईन क्लास घेणे भाग पडले. ते या क्लासेससाठी ६ आकड्यांमध्ये चार्ज करतात. पण एकदा ऑनलाईन क्लास घ्यायला सुरवात केल्यानंतर त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी स्क्रीन रेकॉर्ड करून ते व्हिडिओ पसरवले. अनेक टेलिग्राम चॅनेलवर ते व्हिडिओ बघायला मिळतील. काही टेलिग्राम चॅनेलवाले तर त्याचाही धंदा करतात. म्हणजे विशाल-मेघना लाखांमध्ये चार्ज करत असतील तर आम्ही तुम्हाला तेच व्हिडिओ एक हजारात देतो वगैरे. तेव्हा काही वर्षांनी असा कंटेंट पैसे देऊन विकणे हा धंदा राहणारच नाही. त्यापेक्षा सरळ युट्यूबवर अपलोड करावे, नियमित प्रेक्षक गोळा करावेत आणि त्यातून पैसे कमावावेत. जर प्रेक्षकांना युट्यूबवर फुकटात बघायला मिळत असेल तर असे व्हिडिओ रेकॉर्ड करून विकणे हा प्रकारच बाद होईल. फक्त त्यासाठी नियमितपणे चांगला कंटेंट देता आला पाहिजे आणि चांगले मार्केटिंग जमले पाहिजे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 03/20/2021 - 10:25 नवीन
धन्यवाद. मी यातला माहितगार नाही पण हे गणित तितके सोपे नसावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 03/20/2021 - 12:34 नवीन
Image removed. हा आहे सर्वात श्रीमंत युट्यूबर रायन काजी. वय ९ वर्ष. https://en.wikipedia.org/wiki/Ryan%27s_World
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 03/20/2021 - 07:57 नवीन
अगदी गणिती हिशेबाने पहायचे झाले तर ज्याच्या कमाईपेक्षा खर्च कमी आहे तो श्रीमन्त ! ज्याचे बरेचसे पैसे हप्ते भरण्यात जातात तो गरीब ! आता आपण गरीब व्हायचे की श्रीमन्त हे ज्याचे त्याने मला आयुष्याकडून काय हवे त्यावर ठरते. तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या पुढच्या पिढी ला मी काहीतरी मोठ्ठे देणे लागतो तर तुम्ही अधिक गुन्तत जाता पैसे मिळविण्याच्या खटपटीत रहाता ! तुम्हाला असे वाटत असेल की मरणा पर्यंत मित्र -सरणापर्यंत नातेवाईक बाकी आपण एकटेच येतो व जातो ! तर तुम्ही तुमच्या साठी ठरवलेल्या जीवनशैलीतून पुढे विनासायास जाऊ शकता ! देवाने आपल्याला जशी बुद्धी, शक्ती दिली तशी पुढच्या पिढीलाही तो देईल अशी खात्री असेल तर मुलांसाठी प्लॉट घेतला आहे व त्याचे हप्ते मी माझ्या आवडी निवडी बाजूला ठेवून हप्ते भरत आहे अशी तुमची अवस्था होणार नाही ! कोणत्याही व्यवसायातून पैसा मिळविण्यासाठी कल्पकता ,कष्ट करण्याची तयारी,,काहीशी लबाड वृत्ती व नशीब अशा अनेक गोष्टी लागतात. ज्यात फारसे डोके चालवावे लागत नाही ( उदा झेरॉक्स चे दुकान ) अशा व्यवसायात तीव्र स्पर्धा उत्पन्न होते .केटरींग ची तीच तऱ्हा असू शकते .काही व्यवसाय विशेष पदवी घेतल्याखेरीज ज्ञान असले तरी करता येत नाहीत उदा सी ए ,फार्मासिस्ट ई. एक सर्वसाधारण नियम असा आहे की कोणत्याही व्यवसायात अगदी शिखरावर जायची तयारी व क्षमता असेल तर उज्ज्वल निकम होता येते नाहींतर " ट्रू कॉपी " चा स्टॅम्प मारून सही करणारा नोटरी होता येते ! एक जण बंगल्यात राहातो दुसरा फ्लॅट मध्ये पण रसरसून जगायची वृत्ती असणारा आनंदयात्रीच खरा श्रीमंत असतो . दागिने ,फ्लॅट ,कपडे,,हॉटेलिंग, मोटार ई ला बरेचसे लोक जीवनशैली म्हणतात पण व्यायाम ,संगीत,,संवाद हास्य विनोंद ,प्रेम,,स्नेह,भटकंती हे जीवनशैली नाहीतर काय आहे ,,?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 03/21/2021 - 01:54 नवीन
आहे हे ठीक आहे/ नाही वाटणारे दोन गट ?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 03/21/2021 - 03:47 नवीन
आपण भारताबद्दल बोलत आहोत. इथे आनंदयात्री असण्याला समाज फारसे महत्व देत नाही. असा आनंदयात्री फारसे पैसे कमवत नसेल,आहे त्यात समाधानाने जगत असेल आणि तो त्याचे समर्थन करत असेल तर 'Loser's philosophy' असा शिक्का मारुन कमवण्याची कुवत नाही ते सांगा ना! हा बोनसही मिळतो. आपल्या भारतीय समाजात जेव्हा एखादी व्यक्ती आपण पैसे मिळवण्यासाठी काय काय कष्ट केले , शून्यातून आर्थिक वैभव कसे निर्माण केले याबद्दल सांगतो त्यावेळी त्याचे भरभरुन कौतुक होते. मग दररोज संध्याकाळी तुडूंब पिल्याशिवाय झोप येत नसली तरीही चालतं. किती लोक त्याला "तू आनंदी आहेस का? आनंदात राहण्यासाठी तू काय काय केलंस?" असा प्रश्न विचारतात? एखाद्या आनंदयात्र्याला आपला समाज फार काळ आनंदात राहू देत नाही. संगणक शाखेतून न शिकलेले कितीतरी अभियंते हे आयटी कंपनीत चांगले पॅकेज मिळते म्हणून काम करतात.किती मायकालाल ठरवतात की मी ज्या शाखेतून शिकलो त्याच्याशी संबंधित क्षेत्रातच एखादा व्यवसाय करुन त्यातून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईन आणि हे करताना चाळीशी आली तरी चालेल. किती जण हे आपल्या पालकांना सांगू शकतात? २२-२३ पर्यंत शिक्षण, २६ पर्यंत लग्न आणि २७ पर्यंत एखादं अपत्य याच चाकोरीतून जाणारा आपला भारतीय समाज आहे. त्याला विरोध करण्याचे धाडस फार कमी लोकांमधे आहे. अफाट लोकसंख्या असल्याने पावलोपावली स्पर्धा अटळ आहे. मध्यंतरी KBC मधे एक अपंग मुलगी हॉट सीटवर आली होती.तिने आपला संघर्ष सांगितला. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते. "हमारे बाबुजी ने कहा था; के जब तक जीवन है तब तक संघर्ष है।" अमिताभसारख्या अब्जाधीश महानायकाला संघर्ष चुकत नसेल तर आपण कोण? संघर्षाची सवय होणे हेच चांगले असेही कधीकधी वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 03/21/2021 - 05:01 नवीन
आपण भार्ता बद्द्ल खरेच बोलत आहोत का ..... ? मला नाही वाटत ! मी सोनमर्ग पासून कन्याकुमारी पर्यन्त व जेसल्मेर पासून भूवनेश्वर पर्यन्त भारत पाहिलेला आहे. जब तक जीवन है तब तक संघर्ष है हे तर खरेच ! अगदी आपले शरीर देखील लाखो व्हायरसेस ,फंगी ई सह वाईट हवामान याबरोबर संघर्ष करीतच असते. अमिताभ निवॄत्त होत नाही कारण त्रुप्तीशी त्याचा संघर्षच चालू आहे ! १८० किमी चालत जाऊन पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेणारे वारकरी एका बाजूने आपण त्याना आळशी ( आळशी तरी कसे म्हणावे २० १५ ते वीस कि मी चालणे हे काय आळशीपणाचे लक्षण आहे का ?) म्हणू पण त्यान्चा जो जीवनानन्द त्याना मिळत आहे त्याला किती सम्पतीचा त्याग त्याना करावा लागतो. चरितार्थ हा कुणाला चुकलेला नाही. आरोग्य, चांगली हवा, काहीशी करमणूक यासाठी सम्पत्ती अवश्यकच आहे पण एक क्रिकेट सीरीज झाली की आठ दिवसात दुसरी, एक १०० कोटीचा सिनेमा आला की आठ दिवसात दुसरा ,दर आठवड्याला पिकनिक ,आधीचा सदरा फाटला नसला तरी नवीन सदरा हे काय आहे ..? हे सारे उत्तम आहे हे पटविण्यासाठी मग यातून रोजगार निर्मिती होते असा सिद्धात मान्डायचा ! मग आपण दुबाईला राहायचे बायकोला परभणीला ठेवत आयुष्य जगायचे व बख्ख्ळ पैसा कमावायचे असा फोर्म्युला सुरू होतो. वाढत्या रहाणी मानाचे आकर्षण एका बाजूला तर दुसर्या बाजूला प्रचंड स्पर्धा ,यान्त्रिकीकरण , क्रुत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता वापर याने एक भयानक जग आपल्यासमोर उभे रहाणार आहे ! तरीही एक मुलाला कम्पनी म्हणून दुसरे मूल हवेच हा हट्ट कायम रहाणार आहे ! भारत व इन्डिया यान्चा असा अर्धनारी नटेश्वर होणार आहे !!
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sun, 03/21/2021 - 06:28 नवीन
की पैसेही चांगले मिळतात. मिपावर अगदी सगळे नसले तरी बहुतांश मिपाकरांची इंटेलेक्चुअल लेवल ही चांगली आहे. त्यामुळे नोकरी,व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती करुन त्यातून पर्यटन,हौसमौज करणे शक्य होत असावे. चांगले आहे किंबहूना आपण सगळेच मिपाकर पोट भरले आहे म्हणून इथे लेखनासाठी वेळ देऊ शकत आहोत. बर्‍यापैकी पैसा मिळवणे आणि मन आनंदित करणारे काही करायला पुरेसा पैसा शिल्लक राहणे हे चांगलेच आहे. सर्वांना हे जमले तर आनंदच वाटेल. प्रवासाबद्दलचे साद्यंत अनुभव भटकंती विभागात वाचायला आवडतील. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा