चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ६)
सचिन वाझेंपाठोपाठ आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची सुद्धा उचलबांगडी झाली. मुकेश अंबानीच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडणे, गाडीचा मालक मनसुख हिरेनचे प्रेत सापडणे, सचिन वाझेचा प्रकरणाशी संबंध जुळणे . . . यातून हे प्रकरण दिवसेंदिवस जास्त गूढ होत चाललंय. सुरूवातीला यात प्यादी बळी जाताना दिसताहेत. सर्व प्यादी संपली तर शेवटी वजीर बळी जाऊ शकतो. यातील नक्की वजीर कोण, राजा कोण आणि डाव खेळणारा कोण हे गूढ कधी उकलेल का हे समजत नाही.
मी परत येईन यावर फडणवीसांनी विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. प्रचारादरम्यान शिवसेनेने त्या घोषणेला एकदाही आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. मोदींची मुंबईत सभा झाली तेव्हा मोदी मतदारांना उद्देशून म्हणाले होते की केंद्रात जसे तुम्ही नरेंद्रला परत निवडून दिलेत तसेच राज्यात देवेंद्रलाही परत निवडून द्या. त्यावेळी उधोजी त्याच व्यासपीठावर होते पण त्यावेळी आणि नंतरही- अगदी मतमोजणीच्या दिवशीपर्यंत त्यांनी किंवा अन्य कोणत्या शिवसेनेच्या नेत्याने त्याला आक्षेप घेतला नव्हता.१८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी युतीची घोषणा करताना फडणवीस, शहा व उधोजी या तिघांनीही मुख्यमंत्री कोण यावर चकार शब्द काढला नव्हता. बाय डिफॉल्ट फडणवीसच मुख्यमंत्री असे भाजप समर्थकाना वाटले असेल. परंतु निवडणुक जिंकली तरी विद्यमान मुख्यमंत्रीच पुन्हा मुख्यमंत्री होतोच असे नाही. "शहांंशी झालेल्या चर्चेनुसार पहिली अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्या अटीवरच मी युती केली आहे." असे १९ फेब्रुवारीस उधोजींनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाहिन्यांंच्या उपस्थितीत सांगितले होते. त्याची चित्रफीत अनेकदा वाहिन्यांंनी दाखविली आहे. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळे सेना नेते हेच सांगत होते. तेव्हाही भाजपच्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये आदित्यने टाईम्सच्या मुलाखतीत हेच सांगितले होते. परंतु सर्व भाजप नेते गप्प होते. आपण विरोध केला तर सेना युती तोडेल ही भीति वाटत असावी. नंतर ११ ऑक्टोबरच्या सुमारास सर्वात पहिल्यांदा आपण असे काही मान्य केल्याचे शहांनी नाकारले. मग आधीचे ८ महिने ते का गप्प होते? मतदानाला जेमतेम एक आठवडा असल्याने आता सेना युती तोडू शकणार नाही याची खात्री झाल्यानेच त्यांनी तोंड उघडले होते का? सेना युतीच्या दुसऱ्या दिवसापासून मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत होती. परंतु ते नाकारायला भाजपने आठ महिने घेतले.बाळासाहेबांना दिलेले वचन, बाळासाहेबांच्या खोलीत बसून अर्ध्या काळासाठी मुख्यमंत्रीपद द्यायचे कबूल केले होते वगैरे नंतर मारलेल्या थापा आहेत हे त्यावरून लक्षात येतेच. अर्थात विशिष्ट चष्मा घातल्याने ही गोष्ट बघायचीच नसेल तर गोष्ट वेगळी.त्यांनी एकमेकांना नक्की काय आश्वासने दिली हे फक्त तेच सांगू शकतील. कोण थापा मारतोय व कोण सत्यवादी राजा हरीश्चंद्र आहे हे तेच सांगू शकतील. परंतु सेना युतीसाठी तयार नव्हती व फडणवीस युतीसाठी अत्यंत कासावीस होऊन मातोश्रीवर फेऱ्या मारत होते ही वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपनेच युतीसाठी सेनेला मुख्यमंत्रीपद व इतर अनेक अव्यवहार्य आश्वासने दिली असण्याची बरीच शक्यता आहे.तेव्हा खरं तर मतदारांच्या दृष्टीने देवेंद्रना मुख्यमंत्री म्हणून १०५ + ५६ = १६१ जागा दिल्या गेल्या होत्या.सेनेच्या मतदारांनी सेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी कौल दिला आणि भाजपच्या मतदारांनी भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठी.त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांचा कौल कितपत जनमताचा निर्देशक आहे हा प्रश्न उभा राहतोच.पदवीधर मतदारसंघात लाखो मतदार असतात. पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाखांहून अधिक मतदार आहेत व हे सर्व सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित मतदार भाजपचे समर्थक समजले जातात. १९९०, १९९६, २००८ व २०१४ अशी चार वेळा भाजपने पुण्यातील निवडणुक जिंकली होती. नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपने सलग ६-७ वेळा जिंकला होता. या दोन्ही मतदारसंघात यावेळी भाजपचा चांगल्या फरकाने पराभव झाला. त्यातून कल स्पष्ट दिसतो..(निवडणुकीआधी कधीतरी अमित शाह मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा करायला स्वतः उद्धव ठाकरे न जाता आदित्य ठाकरेंना पाठवले गेले होते. हा ही भाजपाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न असणार पण भाजपाने हे सर्व होऊनही युती तोडली नाही)ते २०१४ मध्ये. तेव्हा अमित शहा नव्हते. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांशी जागावाटपाच्या चर्चेला आदित्य गेला होता. माझ्या मते फडणवीस भाजपतील पवार आहेत व चंपा भाजपतील राऊत आहेत.