Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/11/2021 - 05:05
🗣 166 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते. महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थकबाकीदारांचे वीजेचे कनेक्शन तोडले जाणार नाही असे म्हटले होते पण काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन तोडणार असे जाहीर करून आपली आधीचीच भूमिका बदलली आहे. अनेकांना नेहमीपेक्षा ८-१०-१२ पटींनी जास्त वीजेची बिले आली आहेत. म्हणजे वीजेच्या बिलांच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गफलत झाली आहे हे स्पष्ट आहे. असे असताना कोरोना काळात लोकांच्या अडचणी वाढलेल्या असताना १०-१२ पटींनी जास्त बिले देऊन, नक्की काय गफलत झाली आहे याचा तपास न करता आणि सुधारित बिले पाठवून लोकांना दिलासा न देता वर कनेक्शन तोडणे हा निर्लज्जपणाचा कळस झाला. सरकारला सामान्यांचे श्राप भोवणार आहेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54845 views

🗣 चर्चा (166)
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/11/2021 - 05:43 नवीन
खुप दिवसांनी सामान्यांचे प्रश्न मांडलेले बघुन बरे वाटले
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 05:53 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/refinery-project-will-be-shifted-from-nanar-says-cm-uddhav-thackeray/articleshow/81442233.cms कुठलेही काम सुरळीत होऊ शकत नाही का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 05:56 नवीन
पण, घराणेशाहीला मानणार्या, काही असामान्य व्यक्ती पण आहेतच की.... जे सर्वसामान्य माणसांना समजते, ते असामान्य व्यक्तींना समजेलच असे नाही...
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 05:58 नवीन
हो.. आणखी एक U टर्न घेतला.. वीज कनेक्शन तोडणार. इतके भंगार सरकार पाहिले नाही.. !!!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 06:02 नवीन
शिवसेना सोडल्याचे, मला अजिबात दूःख होत नाही...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 06:23 नवीन
मागील अनेक दशकांच्या वीजशुल्क थकबाकीची रक्कम आता ५०,००० कोटी रूपयांहून अधिक झाली आहे. ज्याअर्थी वीज महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत आहे त्याअर्थी ही वेतनाची रक्कम नियमितपणे वीजशुल्क भरणाऱ्यांकडून वाढीव शुल्क घेऊन दिली जात आहे. ही थकबाकी संपूर्ण वसूल करणे व थकबाकी न भरणाऱ्यांंची वीज तोडणे हा योग्य उपाय आहे. ज्यांना अतिरिक्त भरमसाट रकमेची बिले आली आहेत, त्यांची बिले कमी केली पाहिजेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 06:28 नवीन
उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, करण्यात काय अर्थ आहे? अजून थोडे दिवस थांबा, एक रूपयाच्या झुणका भाकरेच्या वाटेवर, शिवभोजन थाळी, जाण्याची शक्यता आहे..
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 03/11/2021 - 06:33 नवीन
प्री-पेड वीज मीटर केले पाहीजेत. नम्बर ऑफ युनिट्स गुणिले प्रति युनिट किंमत = बिल इंधन अधिभार, व्हिलिंग चार्जेस वगैरे फालतु प्रकार बंद झाले पाहिजेत. यामुळे बिलात पण पारदर्शकता येईल, वाढिव बिले वगैरे प्रकार बंद होतील, बिल न भरुन फुकटात मजा मारणार्‍यांची गोची होईल आणि वीज चोरीला पण थोडातरी आळा बसेल.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/11/2021 - 06:35 नवीन
वर्षानुवर्षे बिले न भरणार्‍यांची कनेक्शन तोडलीच पाहिजेत. पण सरकार कोरोना काळात ८-१० पटींनी जास्त बिले पाठविलेल्या लोकांनी ती बिले न भरल्यास कनेक्शन तोडत आहे. हे अजिबात समर्थनीय नाही. उद्या महिना हजार-पंधराशे बिल येणार्‍याला एक लाख बिल पाठवतील आणि ते बिल न भरल्यास कनेक्शन कट करतील. हे कसे चालेल?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 06:59 नवीन
काही सांगता येत नाही....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 07:06 नवीन
हे मान्य आहे.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/11/2021 - 07:30 नवीन
वीजमंडळ कर्ज काढून आपला कारभार सांभाळत आहे. कर्ज का काढावे लागले ह्याची पूर्ण जबाबदारी हि वीज मंडळाची आहे. उगाच वीज ग्राहकांना वाढीव बिल पाठवून जबरदस्ती करू नये. लॉक डाऊन काळात मी ऑनलाईन मिटर रिडिंग पाठवल्याने मला योग्य बिल आले, परंतू ज्यांनी असे रिडिंग पाठवले नाही त्यांना भरमसाठ बिल पाठवले. पाठपुरावा केल्यास बिल कमी/योग्य केले जाते. काही अधिकारी अजिबात दाद देत नाही. लॉक डाऊन काळात अजिबात वीज वापरली नसताना मला अवाच्यासव्वा कृषिपंपाचे बिल पाठवले. सरकारी योजनेप्रमाणे कमीही केले, परंतू मला मागील वर्षाचे बिलच मान्य नाही हे कळवले आहे. बघू काय म्हणतात ते.
  • Log in or register to post comments
य
यश राज गुरुवार, 03/11/2021 - 08:25 नवीन
आमचे दर महिन्याला जवळपास ६००/७०० पर्यन्त बिल येते. पण २०२० च्या एप्रिल व मे मध्ये एकदम ९००० रु बिल आले. भावाने तक्रार दाखल केली. पण विज केंद्राच्या कर्मचार्यांनी त्याची दखल घेतलि नाही. एकदम मग्रुरिची भाषा बोलले की तुमच्य घरात दिवसभर ए.सी चालु असल्यामुळे एवढे बिल आले. गंमत अशी की आमच्या घरात ए.सी नाहीए. त्यावर त्यांची टोलवा टोलवी सुरु झाली की तुमचे मागचे बिल भरायचे राहीले असेल, तुमचे मीटर रीडिन्ग एवढे असेल इत्यादी. पण आमचे मागिल सर्व बिल ओनलाइन भरले असल्यामुळे त्यांची तोंडे बन्द झाली. भावाला त्यानी १ महिन्यानंतर परत भेटायला सांगितले आणि बिल तोपर्यंत भरु नका असे ही सांगितले. पुढ्च्या महिन्यापासुन आमचे बिल जवळपास २००० रु यायला लागले. मागचे ९०००+२००० असे ११००० आणि त्या पटीत वाढत राहीले. भाऊ सतत पाठपुरावा करतच होता. पण कर्मचारी फक्त टोलवा टोलवी करत राहीले. त्यांना सतत आम्ही रीडिंग पाठवत होतो पण त्याचा ही काही उपयोग झाला नाही. जानेवारी २०२१ पर्यत आमचे बिल तब्बल १८५०० रू ईतके आले. आणि त्यानंतर महाभकास सरकारने विज बिल भरलेले नसल्यास मिटर कापण्याचा भकास निर्णय घेतला. सध्या घरुनच काम करत असल्यामुळे विज नसलेली परवड्णार नाही म्हणुन मु़काट्याने सर्व बिल त भरावे लागले. अजुन एक , आमच्या सोसाएटीत एक कुटुंब राहते. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागण्या अगोदर त्यांनी त्यांच्या गावाला जायचा निर्णय घेतला. त्यांच्या अनुपस्थितीत त्याचे विजबिल तब्ब्ल २५००० रु इतके आले. आता याला काय म्हणावे. त्यांनाही सग़ळे बिल भरावे लागले. हा सगळा तळतळाट या सध्याच्या सत्ताधार्यांना भोगावाच लागणार आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 08:41 नवीन
अशीच सेम स्टोरी माझी देखील आहे.. साध्याच सरकार म्हणजे भिक नको पण कुत्र आवर अश्या पद्धतीचे आहे.. काही मदत, विकास कामे नको पण तुमची दादागिरी, चोरी, लुटालूट थांबवा..
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 03/11/2021 - 09:31 नवीन
आपण ऑनलाइन मिटर रिडिंग पाठवत असाल आणि तरीही युनिट प्रमाणे बिल येत नसेल तर सरळ SVR साठी (site visit report ) लेखी तक्रार करा. ते त्यांना मान्यच करावे लागते.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 03/11/2021 - 09:36 नवीन
किती भयानक..अवघड आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/11/2021 - 09:38 नवीन
हा सगळा तळतळाट या सध्याच्या सत्ताधार्यांना भोगावाच लागणार आहे.
हा भाबडा आशावाद आहे. असे काहीच होत नसते. भोगावे फक्त सामान्य माणसालच लागते.
  • Log in or register to post comments
अ
अजय देशपांडे Fri, 03/12/2021 - 04:34 नवीन
सध्या च्या काळात या शब्दाला काहिहि किमत नाही , काही हि फरक पडत नाही यांना , बाप मेला काय आणि आई आजारी असली काय या राजकारण्याला काहिहि माहिती नसते त्यान फक्त पैसे , सत्ता, खुची शी संबध असतो , ते खुश असतात, असे तळतळाट सगळ्यांचे लागले असते तर आत्तापर्यंत सर्व पक्षाचे नेते , लकवा भरून गलितगात्र झालेले पाहायला मिळाले असते पण तसे होत नाही उलट ते जास्त मोठे होताना दिसून येत आहेत, माझे हे विधान कुठल्याही जाती अथवा राजकीय पक्ष बद्दल नाही. मी सर्वः म्हणालो आहे हे सरस गल्लीतल्या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पासून पार वर च्या ठरपार्यात आहे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 05:46 नवीन
पण, सामान्य लोकांच्या मनांत ह्यांची किंमत शून्यच.... फक्त घरांत राजकीय व्यक्ती असणारे आणि घराणेशाहीची पुजा करणारेच, ह्यांच्या अवतीभोवती असतात....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 06:58 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bengaluru-woman-alleges-zomato-delivery-man-hit-her-left-with-bloody-nose-sgy-87-2418348/ प्रायव्हेट कंपनी असेल तर, असे होण्याची शक्यता जास्त असते....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 07:16 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-sanajy-raut-bjp-devendra-fadanvis-saamana-sgy-87-2418452/ तरीच, चीन मागे हटला.... आता पुढच्या वेळी, सामना वाचून, आतंकवादी पण शरण येतील...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 08:47 नवीन
आमच्याकडे २-३ वर्षांचे लहान मूल असते तर रोज सामना घेतला असता.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 03/11/2021 - 09:33 नवीन
आतंकवाद्यांना मराठी येत असेल तर नक्कीच शरण येतील. आतंकवादी पण विचार करतील , माय म्हणतात तरी मराठीचे असे धिंडवडे काढतात. जिथे हे सामनाकार मराठीला सोडत नाही तिथे आपली काय गत, त्यापेक्षा शरण जा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 07:28 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/mns-leader-santosh-dhuri-from-waroli-slams-mla-aditya-thackeray-for-late-night-shooting-permission-for-disha-patani-film-scsg-91-2418455/ सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे, सरकार असल्याने, मनोरंजन हे प्रमुख उद्दिष्ट असावे....
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/11/2021 - 08:30 नवीन
एक चांगला लेख. https://www.loksatta.com/trending-news/arvind-jagtap-blog-about-marathi-manoos-not-leading-in-business-and-growth-but-busy-in-politics-scsg-91-2418365/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 08:46 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 03/11/2021 - 14:05 नवीन
त्यातील एक वाक्य , इथे होणार्‍या सगळ्यात जास्त चर्चांना लागु पडते.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 14:25 नवीन
लेख वाचला पण बऱ्याच अंशी पटला नाही.. मराठी माणूस एकजूट नाही.. उद्योग आणि व्यवसायाला योग्य ते महत्व आणि प्रतिष्ठा नाही.. एखादा व्यक्ती उद्योग धंदा सुरु करत असताना त्याला सहाय्य करण्याची प्रवृत्ती नाही, उलट पाय खेचले जातात. प्रॉपर्टी आणि जमीनी यांचे कधीही न मिटणारी भांडणे, माझ चांगलं नाही झालं तरी चालेल पण अमुक अमुक याच वाईट करणार.. या आणि अश्या अनेक प्रकारच्या मानसिकता मराठी लोकांच्या रक्तात भिनलेल्या आहेत. सर्व समस्येचे मुळ इथे आहे. त्याचा संबंध राजकारनाशी जोडणे हे जरा खटकले. राजकारण बाजूला ठेवले किंवा आपण उद्धव - फडणवीस करणे सोडून दिले म्हणून राज्यात उद्योगधंदे, व्यवसाय करणारे तरुण वाढतील हा भ्रम आहे. लेख संपूर्ण वाचल्यावर त्यातला छुपा अजेंडा लक्षात आला. माझे कित्येक नातेवाईक, मित्र यांचे लग्न फक्त एवढयासाठी जमत नाही कारण ते लोकं छोटा मोठा व्यवसाय करतात.. मुलाकडे शेती हवी पण शेतीव्यवसाय करणारा नको.. नोकरी असणारी मुलांची लग्न लगेच जमतात ( मग तो बँकेत शिपाई का असेना ) पण एखादा रिक्षावाला, किराणामाल विकणारा, वडापाव स्टॉल वाला, फळेवाला इ मुलांना तुच्छ नजरेने बघितले जाते जरी ते नोकरीपेक्षा जास्त कमावत असले तरी.. समाजाच्या चुकीच्या मानसिकतेचा आणि प्रवृत्तीचा दोष राजकारणावर फोडणे पटले नाही..!!
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 08:50 नवीन
अतिशय योग्य अशी च काम करत आहे असे वाटते.सरकार विषयी जनतेत बिलकुल असंतोष नाही.ज्यांनी ठरवून वीज बिल थकवली आहेत त्यांची वीज तोडली म्हणून कुणाला पान्हा फुटत असेल त्यांनी ती वीज बिल भरावीत. ह्या नालायक लोकांमुळे वीज वितरण कंपनी बंद पडेल आणि ते राज्याच्या हिताचे नाही.जे प्रामाणिक ग्राहक आहेत त्यांच्या वर तो अन्याय आहे. बाकी वाढीव वीज बिलाचा तक्रारी निकालात काढण्यासाठी सरकार नी यंत्रणा उभी करावी. १०५ असून सत्ता नाही, थापा मारून जनता ह्यांच्या थापा वर विश्वास ठेवत नाही. हेच खरे bjp चे दुखणे आहे. त्याला काही इलाज नाही हा रोग पुढील वीस वर्ष तरी बरा होणार नाही उलट अजुन गंभीर होईल. वेड्यांच दवाखाने बांधायला सरकार नी आता पासूनच सुरुवात करावी पुढे वेड्यांची संख्या प्रचंड वाढू शकते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 08:58 नवीन
..... सरकार नी यंत्रणा उभी करावी.... हे सांगावे लागत आहे, हेच तर दूःख आहे... ‐------------------- वेड्यांच दवाखाने बांधायला सरकार नी आता पासूनच सुरुवात करावी पुढे वेड्यांची संख्या प्रचंड वाढू शकते.... सहमत आहे, सिंहासन मधला दिगू आठवला..... सरकारचा कारभार बघून, दिगूवर तीच पाळी आली होती.... ‐------------------ अतिशय योग्य अशी च काम करत आहे असे वाटते.सरकार विषयी जनतेत बिलकुल असंतोष नाही....... कुठली कामे? साधू हत्याकांड, सामान्य माणसाला मारहाण, निवृत्त नौसैनिकाला मारहाण, ही चांगली कामे आहेत का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 09:04 नवीन
सामान्य लोकांना वरील कोणत्याच घटनेत सरकार चा दोष वाटत नाही. सरकार विरुद्ध असंतोष आहे ह्याचे कोणतेच दृश्य परिणाम कुठेच दिसत नाही. पण केंद्रातील bjp सरकार विरुद्ध असंतोष आहे ह्याची अनेक दृश्य परिणाम लोकांनी टीव्ही वर बघितले आहेत. आणि पेट्रोल पंपावर गेले की रोज हे सरकार किती नालायक आहे ह्याची खात्री पटते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 09:10 नवीन
एका निवृत्त नौसैनिकाला मारहाण झाल्यावर, कोण कशाला रस्त्यावर येईल? जनता इतकी भोळी राहिली नाही.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 09:07 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/minor-school-girl-raped-in-mahabaleshwar-satara-sgy-87-2416959/lite/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS आता 21 दिवसांत निर्णय लावणार का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 09:48 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/mamata-banerjee-injured-prashant-kishor-trend-on-twitter/articleshow/81440560.cms काल निवडणुक प्रचारात ममता बॅनर्जींंच्या पायाला दुखापत झाल्याने रूग्णालयात भरती केलंय. यासाठी ममताने अर्थातच भाजपवर आरोप केलेत. परंतु ममताचे निवडणुक सल्लागार प्रशांत किशोरांच्या यांच्या सल्ल्यानुसारच ममताने हे नाटक केलंय असा आरोप होतोय. प्रशांत किशोरांच्या सल्ल्यानुसारच पूर्वी केजरीवालांनी सुद्धा असेच नाटक केले होते असाही आरोप होतोय. प्रशांत किशोरांचा इतिहास रोचक आहे. ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचे सल्लागार होते. मोदी खरं तर स्वतःच्या लोकप्रियतेमुळे व अचूक मुद्द्यांंवर प्रचार करून स्वतःला समर्थ पर्याय या स्वरूपात यशस्वीपणे उभा केल्याने जिंकले होते. २०१४ पूर्वी त्यांनी गुजरातेत सलग ३ विधानसभा निवडणुकीत व सलग २ विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला होता. २०१४ मध्ये निवडणुक जिंकण्याचे निर्विवाद श्रेय त्यांचेच होते. परंतु जळफळाटी विरोधकांनी प्रशांत किशोरांंनाच सर्व श्रेय दिले. नंतर प्रशांत किशोरांना एकदम महत्त्व प्राप्त झाले. २०१५ मध्ये ते केजरीवालांचे सल्लागार होते व ती निवडणुक केजरीवालांनी जिंकली. २०१५ मध्येच ते नितीशकुमारांचेही सल्लागार होते. लालूशी युती करण्याचा सल्ला त्यांनीच दिला होता. २०१९ मध्ये ते उद्धव ठाकरेंचे सल्लागार होते. विधानसभा निवडणुकीत ठाकरे १४४ जागांसाठी अडून बसले होते, परंतु फडणवीस फक्त १२४ जागा देण्यास तयार होते. सेना स्वबळावर २८८ जागा लढली तर फार तर ३० आमदार निवडून येतील. परंतु भाजप स्वबळावर लढला तर किमान १२५ जागा जिंकून २०१४ प्रमाणे ५ वर्षे सेनेला फरपटत जावे लागेल हे प्रशांत किशोरांनी ओळखले होते. मताधार खूप कमी असल्याने जागा थोड्या कमी मिळाल्या तरी युती होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेना २०१४ च्या कामगिरी ची पुनरावृत्ती करू शकेल. परंतु फक्त १४६ जागा लढविल्याने भाजप बहुमतापासून खूप लांब राहून सेनेला हवे ते मिळविता येईल हे त्यांनी ठाकरेंना पटवून दिल्याने ठाकरेंनी १२४ जागा मान्य केल्या. आपण सेनेला खूप जास्त जागा देऊन फसलो हे भाजपने ओळखले होते. परंतु खूप उशीर झाला होता. त्यामुळे भाजपने मित्रपक्षांना त्यांच्या जागा कमळ चिन्हावर लढवायला लावून आपल्या जागा १६४ केल्या. परंतु तरीही भाजप १०५ च्या पुढे जाऊ शकला नाही व परीणामी सत्ता गमवावी लागली. बंगाल निवडणुकीत भाजपला १० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत व मिळाल्या तर मी ट्विटर सोडेन, असे भाकीत प्रशांत किशोरांनी नुकतेच केले आहे. २ मे या दिवशी समजेलच. https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/latest/988095/prashant-kishor-reiterates-prediction-on-bjps-seats-in-wb-calls-polls-key-battle-for-democracy
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/11/2021 - 09:58 नवीन
माझ्या मिपावरील पूर्वजन्मात प्रशांत किशोर या गृहस्थाविषयी थोडेफार लिहिले होते. तो अतिशय ओव्हररेटेड माणूस आहे. जिंकणार्‍या घोड्यांवर त्याने पैसे लावले म्हणून तो फार निष्णात रेसवाला होतो असे नाही. २०१४ मध्ये मोदी आणि २०१५ मध्ये नितीश कुमार या तगड्या उमेदवारांचा सल्लागार म्हणून त्याने काम केले. पण २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात राहुल गांधींचा सल्लागार म्हणून काम करायची वेळ आल्यावर त्याच्या मर्यादा उघड झाल्या. २०१४ चे मोदींचे यश हे प्रशांत किशोरचे यश हे सगळ्यांनी पसरवायला सुरवात केल्यानंतर या माणसाच्या अपेक्षा वाढल्या. भाजपकडून त्याला राज्यसभेत खासदारकी पाहिजे होती त्याला अमित शहांनी नकार दिला म्हणून तो मोदींना सोडून गेला असे वाचल्याचे आठवते.
बंगाल निवडणुकीत भाजपला १० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत व मिळाल्या तर मी ट्विटर सोडेन, असे भाकीत प्रशांत किशोरांनी नुकतेच केले आहे. २ मे या दिवशी समजेलच.
https://twitter.com/PrashantKishor/status/1340882902628749317?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1340882902628749317%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.ndtv.com%2Findia-news%2Fprashant-kishor-says-will-quit-twitter-if-his-bjp-in-bengal-forecast-fails-2341454 प्रशांत किशोरच्या या ट्विटचा अर्थ वेगळा लावला गेला आहे असे वाटते. त्याला म्हणायचे आहे की भाजप दोन अंक क्रॉस करायला 'स्ट्रगल' करेल याचा अर्थ भाजपला दोन आकड्यातच जागा मिळतील म्हणजेच १०० जागा भाजप क्रॉस करू शकणार नाही असे त्याला म्हणायचे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/11/2021 - 09:59 नवीन
प्रशांत किशोरचा टिवटिवाट---

For all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in #WestBengal

PS: Please save this tweet and if BJP does any better I must quit this space!

— Prashant Kishor (@PrashantKishor) December 21, 2020
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 10:11 नवीन
ओह. Cross double digit mark याचा अर्थ १० पेक्षा कमी असा मी घेतला होता.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 10:24 नवीन
कम्युनिस्ट पक्षाने नंदीग्राम मध्ये मुस्लिम व्यक्ती ल उमेदवारी दिली नाही. ही पहिलीच झलक कशी वाटली. सर्वच गणित bjp ची कोलमडली आहेत नंदीग्राम मध्ये bjp ची. आता सरळ लढत bjp विरूद्ध ममता होईल आणि मुस्लिम मत दाता एक गठ्ठा मत ममता दीदी च्या पारड्यात टाकणार. प्रशांत किशोर अगदी योग्य बोलत आहेत. Bjp च पूर्ण पराभव बंगाल मध्ये नक्की आहे. बाकी तामिळनाडू,केरळ ,ह्या राज्यात अशी पण entry नाही त्यांना.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 17:30 नवीन
येणारा काळ च उत्तर देईल तेव्हा गायब होऊ नका.. किंवा EVM ला दोष देऊ नका.. .. बाकी मुस्लिम लोकं आणि त्यांची मत हा विषय काढला कि तो सेक्युलॅरिज्म असतो.. आणि हिंदू आणि त्यांची मत याबाबत चर्चा केली कि लगेच ध्रुवीकरण, जातीयवाद इ विशेषणे लावली जातात.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 03/11/2021 - 18:12 नवीन
+११११^११११
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 10:45 नवीन
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-latest-decision-of-the-supreme-court-on-the-issue-of-maratha-reservation-abn-97-2417234/ बऱ्याच काळानंतर कुबेरांचा चांगला लेख वाचला. त्यातील खालील निष्कर्ष पटले. - राज्याच्या मुख्यमंत्रिपदी फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलनांचा जोर या अवस्थेत राजकीय अर्थ ठासून भरलेला आहे. तो ओळखण्याइतके चातुर्य फडणवीस आणि भाजप यांच्या ठायी असल्याने त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन टाकला. - पण त्यामुळे मतसंख्येत आवश्यक तितका त्याचा फायदा झाला नाही. उलट भाजपचा अत्यंत पारंपरिक असा एक मतदारवर्ग यामुळे त्या पक्षापासून दुरावला. काँग्रेस वा राष्ट्रवादी यांनी मतांच्या राजकारणासाठी जो लांगूलचालनी निर्णय घेणे अपेक्षित होते, तो भाजपने घेतला यामुळे त्या पक्षाचे पारंपरिक मतदार काही प्रमाणात दुरावले. - फडणवीस सरकारने ज्या राजकीय फायद्याकडे डोळा ठेवून हा निर्णय घेतला तो फायदा काही मिळाला नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 03/11/2021 - 10:49 नवीन
मतदान टक्केवारीनुसार तसं काही झाल्याचं जाणवत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 03/11/2021 - 11:15 नवीन
सहमत! या तर्काला कुठलाही आधार दिसत नाही.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 03/11/2021 - 11:42 नवीन
-फडणवीस सरकारने ज्या राजकीय फायद्याकडे डोळा ठेवून हा निर्णय घेतला तो फायदा काही मिळाला नाही.
सत्ता मिळाली नाही हि इष्टापत्ती म्हणावी का मग बीजेपी च्या दृष्टीने? कारण मराठा आरक्षण हे भिजवलेले घोंगडे आघाडीच्या गळ्यात पडले आणि कायदेशीर दृष्ट्या हे आरक्षण मिळणे शक्य नाही असे जे वाचले आहे मग न मिळण्याचे पाप ही आघाडीच्या बोकांडी टाकता येईल. (मंडल आयोग लागु करुन वी.पी सिंगानी येणार्या सरकारसाठी डोकेदुखी करुन ठेवली होती तसा प्रकार )
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 03/11/2021 - 13:15 नवीन
होय. मी इष्टापत्तीच समजतोय. पक्षातले विरोधक लक्षात येताहेत. सगळे राज्य पालथे घालायला मिळतंय कारण वेळ भरपूर आहे. राज्याबाहेरच्याही कामगिऱ्या मिळताहेत. आमच्या कालखंडात आम्ही काय केलं हे सांगता येतंय. त्याची वर्तमान काळाशी तुलना करता येते आहे. उठा हे मुमं पदाचे उमेदवार असणे ही झाकली मूठ असण्याचा फायदा शिवसेनेने गमावला आहे. विरोधीपक्ष नेता असूनही त्याच्या भोवतीच राजकारण फिरत असल्याचं जाणवतंय. असे बरेच फायदे अजूनही सांगता येतील. पण सर्वात महत्वाचे म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होऊन शिवसेनेचा जनाधार कमी होईल, व त्याचा लाभ भाजपाला मिळणार आहे. त्यामुळे भाजपाची मतदान टक्केवारी ३५% च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो पण तरी ते २०% च्या पुढे जातील असे वाटत नाही. थोडक्यात भाजप पुढच्या वेळेस स्वबळावर मुमं पद मिळवेल.
  • Log in or register to post comments
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 13:37 नवीन
पुढच्या वेळी खरी लढत राष्ट्रवादी आणि BJP मध्येच होईल.. काँग्रेस आणि शिवसेना आपले अस्तित्व सुद्धा गमावून बसतील.. तसेच निवडणुकीच्या थोडा आधीच ह्या महाविकास आघाडीचे विसर्जन होईल.. नाही झाले तरी जागावाटपावरून गोंधळ माजेल आणि सर्व पक्ष पुन्हा स्वतंत्र लढतील.. किंवा काँग्रेस +NCP ची युती होऊन शिवसेना एकटी पडेल.. शरद पवार आता 80+ झालेत.. निवडणुकीच्या आधी त्यांचे काही बरेवाईट झाले तर NCP ला याचा भरगोस फायदा मिळेल.. सहानुभूतीच्या लाटेवर NCP जोरदार मुसंडी मारेल.. अर्थातच हे सगळे अंदाज..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 15:52 नवीन
पवार कॉंग्रेसची शकले होतील... शरद पवार यांचा हातगूण असा आहे की, त्यांनी ज्या ज्या पक्षांशी युती केली ते सगळे पक्ष रसातळाला गेले किंवा त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले... शेकाप, मनसे ही काही उदाहरणे ... शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले पण, शिवसेनेची, "हिंदुत्व आणि मराठी" ह्या दोन्ही झाकल्या मुठी उघड्या पडल्या.... सामान्य माणसाला कस्पटासमान मानले की, असे होणारच... स्व. वसंतराव नाईक, यांना त्यांच्या ओळखीतला सामान्य माणूस, बिंधास्त पणे, नावाने हाक मारत होते.... राजकीय नेत्यांनी, सामान्य जनते पासून, अंतर ठेवले की, नेते सत्ता गमावून बसतात....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 03/12/2021 - 13:36 नवीन
शरद पवार यांचा हातगूण असा आहे की, त्यांनी ज्या ज्या पक्षांशी युती केली ते सगळे पक्ष रसातळाला गेले किंवा त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले... असे त्या पक्षाचे देखील व्हावे ! शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले पण, शिवसेनेची, "हिंदुत्व आणि मराठी" ह्या दोन्ही झाकल्या मुठी उघड्या पडल्या.... त्यांचेच्या भाषेत सांगायचे झाले तर हिंदूत्वाचे धोतर देखील सुटले आणि आत मराठी बाण्याचा लंगोट देखील नाही हे समस्त जनतेला कळले ! :))) सामान्य माणसाला कस्पटासमान मानले की, असे होणारच... कोण सामान्य माणुस ? [ यांच्यासाठी ] राजकीय नेत्यांनी, सामान्य जनते पासून, अंतर ठेवले की, नेते सत्ता गमावून बसतात.... खरयं...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vaseegara | Geethiyaa Varman | Music Cover
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 13:43 नवीन
घराणेशाही राबवणार्या सर्वच पक्षांची होते... घराणेशाही आधारित राजवट, जास्त काळ टिकत नाही... सध्या लोकसत्तेत असे लेख रोजच येत आहेत... नियमाला अपवाद म्हणून, आखाती देश आणि उत्तर कोरिया...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/11/2021 - 15:59 नवीन
उठांकडे संघटनाकौशल्य आहे, परंतु प्रशासकीय कौशल्य अजिबात नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. बाळ ठाकरेंंकडेही संघटनाकौशल्य होते. परंतु आपल्याकडे प्रशासकीय कौशल्य नाही हे बहुधा त्यांना माहिती असावे. त्यामुळे त्यांनी आपली मूठ झाकली ठेवूनच १९९५ मध्ये मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याच्या आग्रहाला बळी न पडता मनोहर जोशींना तोंडदेखले मुख्यमंत्री केले होते. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न होते. परंतु धूर्त पवारांनी उद्धव मुख्यमंत्री होणार असतील तरच आम्ही पाठिंबा देणार हे सांगून त्यांना बळेबळे घोड्यावर बसविले. आता त्याचे परीणाम दिसून आहेत. उद्धव ठाकरे कोरोनाचे निमित्त करून कोणतेही निर्णय न घेता पुढे ढकलत आहेत. निर्णयांची जबाबदारी टाळण्यासाठी सर्व गोष्टी पुढे ढकलल्या जात आहेत. आज महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ऐनवेळी चौथ्यांदा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय. कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेहमीप्रमाणेच नामानिराळे राहून परीक्षा घेण्याची मागणी करताहेत. हे पक्ष एकीकडे मराठा संघटनांना चिथवून परीक्षेला विरोध व दुसरीकडे परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध अशा दुटप्पी भूमिकेतून ठाकरेंना अडचणीत आणत आहेत. पुढील लढतीत सेना व भाजप एकटे लढतील आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती असेल. अशा तिरंगी लढतीत भाजप व सेनेचा पराभव अटळ आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा