Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आघाडी सरकारने, गेल्या वर्षभरांत किती कामे केली आहेत?

म
मुक्त विहारि
Wed, 03/10/2021 - 14:22
🗣 91 प्रतिसाद
साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे... गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते. सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते.. आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही... आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत. संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे. अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते.... ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत. -- मिपा व्यवस्थापन

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 28728 views

🗣 चर्चा (91)
R
Rajesh188 Sun, 03/14/2021 - 09:59 नवीन
२००८ मध्ये मोदी नी असे जाहीर वक्तव्य केले होते. की गुजरात नी केंद्राला कर का द्यावा. तो विषय चालू आहे. कर देण्यास त्यांनी विरोध केला होता.
म
मुक्त विहारि Sun, 03/14/2021 - 10:16 नवीन
हवेत गोळीबार करू नका
R
Rajesh188 Sun, 03/14/2021 - 10:25 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/cong-guns-for-modi-for-his-no-tax-remarks/articleshow/3121181.cms&ved=2ahUKEwjpp8Sdu6_vAhUE7XMBHRSHAb8QFjAAegQIARAC&usg=AOvVaw0G3MHbPJ7Wez1gnk_7v6Mb
म
मुक्त विहारि Sun, 03/14/2021 - 11:22 नवीन
मग त्याला काही अर्थ नाही...
स
सुबोध खरे Mon, 03/15/2021 - 15:34 नवीन

आपल्याला भीक मागावी लागते हक्क च्या पैश्यासाठी.

थापाडे महाराज गेल्या ६० वर्षापैकी ४९ वर्षे काँग्रेसचे राज्य होते गेले एक वर्ष महा भिकार आघाडीचे आहे आणि १० वर्षे भाजप आणि शिवसेनेचे. मग तुमच्या हक्कासाठी भीक मागायला कुणी लावलं तुम्हाला याचा उत्तर द्या बरं
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 06:08 नवीन
सहना यांच्याशी सहमत.. तुमच्या भूमिका एकदम स्पष्ट आणि प्रतिसाद एकदम सडेतोड असतात..
र
राज२००९ Wed, 03/10/2021 - 22:46 नवीन
हल्ली मिपावर काहितरी नविन वाचायला मिळेल या आशेवर आलो कि नेहेमीचे खेळाडु "चूगलखोर चाची" ची भूमिका इमानेइतबारे वटवुन आपलंच रडगाणं गाताना दिसतात. शिवाय, भाजपाच्या काळात सर्वकाहि कुशल-मंगल होतं असंहि नाहि. बहुतेक त्या काळात मिळणारा "कडक माल", जो मारल्यावर ट्रांस स्टेट मधे जाता येत असे, तो हल्ली मिळत नसावा... ;)
स
सुक्या गुरुवार, 03/11/2021 - 02:47 नवीन
थोडासा तर-तम-भाव असला की उद्वेग येतो. यात कुणीही पुर्वी सगळे आलबेल होते आणि आता सगळीकडे सावळागोंधळ आहे असे कुणीही म्हणत नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे / त्यातल्या भ्रष्टाचारामुळे राज्याचे, परीणामी देशाचे किती नुकसान होते हे पाहिले आहे. त्याच नाकर्तेपणाचे कुणी समर्थन करत असेल तर त्याला वेळीच पायबंद घालावाच लागतो. मागे एक वरिष्ट पोलिस अधिकारी "भ्रष्टाचार हा व्यवस्थेचा एक भाग आहे, तो कधीच संपणार नाही" असे बोलतो तेव्हा तो भ्रष्टाचाराचे समर्थन करतो आणी असे ओपनली जेव्हा कुणी बोलते तेव्हा त्याला परीणामाची भीती नसते. राज्याच्या प्रमुखाने ती भिती दाखवली नाही किंवा तशी जरब त्यात नसेल तर लवकरच अनागोंदीला प्रारंभ होतो. ह्यात तुम्हाला रडगाणे दिसत असेल तर असो बापडे.
R
Rajesh188 Sat, 03/13/2021 - 22:39 नवीन
आता पण भ्रष्ट शासन प्रशासन आहे तसेच आहे BJP आली म्हणजे खूप बदल झाला आहे असे काही नाही काहीच बदल bjp सरकार च्या काळात पण झालेला नाही.
V
Vichar Manus गुरुवार, 03/11/2021 - 12:00 नवीन
शिवसेना पहिलेपासून असाच आहे, त्याला भाजपनेच मोठा केला, बाळासाहेब असताना पण असाच होता पण त्यांचे बोलणे भाजपने ठाकरी भाषा म्हणून कौतुक केले, आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने अति अप्रिय झाला त्यांना आणि काही लोकांना
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/11/2021 - 12:03 नवीन
शिवसेनेने गेल्या वर्षभरात केलेले भरीव काम सांगीतलेत तर उत्तम...
स
साहना गुरुवार, 03/11/2021 - 23:41 नवीन
> शिवसेना पहिलेपासून असाच आहे हीच तर समस्या आहे. कुत्रा गाडीच्या मागे धावतो तो पर्यंत मजा आहे. पण तुम्ही उतरून त्याच्या हाती दिलं स्टेरिंग तर मग काय ?
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 17:01 नवीन
इथल्या काही आयडी ना आणि bjp ला सुद्धा सेना ही कशी महाराष्ट्र च्या हिताची आहे अशी पोपट पांच्छी करावी लागली असती. सत्तेत अशा नालायक पक्षाला bjp नी इतकी वर्ष कसे काय सामावून घेतले. बाळासाहेबांना भेटायला झाडून सर्व bjp चे वरिष्ठ नेते येत होते. तेव्हाची सेना वेगळी होती का.
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 17:07 नवीन
त्यांची योग्य जागा दाखवून दिली म्हणून सर्व चिडचिड आहे बाकी काही नाही. कोणत्याच पक्षाला ठराविक अशी कोणतीच वैचारिक बैठक नाही त्या मध्ये bjp सुद्धा आहे. फक्त थापा मारून सत्ता मिळवणे एवढेच सामायिक हित राजकीय पक्ष बघत असतात. त्या मुळे हा पक्ष चांगला तो वाईट असे काही नाही. फक्त मनाचे खेळ आहेत ते. मी पुढे जावून असे म्हणेन अमेरिकेत जसे अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळालेला कोणताही परकीय नागरिक निवडणूक लढवू शकतो तसे भारतात सुद्धा असावे. जरा हुशार लोक तरी चुकून सत्तेच्या ठिकाणी येतील. भारतीय सत्ता योग्य रित्या सांभाळू शकत नाहीत.राज्य करणे हे त्यांचे काम नाही हे ब्रिटिश लोकांचे म्हणणे एकदम चुकीचे पण नाही.
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 17:25 नवीन
मी पुढे जावून असे म्हणेन अमेरिकेत जसे अमेरिकेचे राष्ट्रीयत्व मिळालेला कोणताही परकीय नागरिक निवडणूक लढवू शकतो तसे भारतात सुद्धा असावे.
तुमचा रोख कुणाकडे आहे ते समजले..
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 17:42 नवीन
तसा अर्थ घेतला तरी चालेल. सोनिया गांधी ना त्या फक्त परदेशात जन्मल्या आहेत म्हणून विरोध करणे मला तरी बिलकुल पटलेलं नाही. त्यांनी सत्ता व्यवस्थित सांभाळली असती ह्या विषयी पुर्ण खात्री होती.
ब
बापूसाहेब गुरुवार, 03/11/2021 - 18:06 नवीन
आपले मनातले मांडे समजले..!! धन्यवाद..
स
सुक्या गुरुवार, 03/11/2021 - 18:16 नवीन
तुमच्या मताचा आदर आहे. परंतु ज्या अमेरिकेचे उदाहरण दिलेत त्या देशाचे नियम काय आहेत हे समजाउन घेतले असते तर असले समर्थन केले नसते (म्हणजे निदान अमेरिकेचे उदाहरण तरी दिले नसते). तुमच्या माहीतीकरता: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हा त्या देशाचा जन्माने नागरीक असावा ही मुळ अट आहे. बाकी जौ द्या. तुमच्या मताचा प्रतीवाद करण्याचे मी कटाक्षाने टाळतो. त्यामुळे तुमच्या मतावर माझे काहीही मत नाही.
म
मुक्त विहारि Fri, 03/12/2021 - 02:49 नवीन
इदी अमीन, परवेझ मुशर्रफ आदी व्यक्तींनी पण भारताचे पंतप्रधान व्हायला, तुमची हरकत नसावी..... बाय द वे, उत्तर कोरियाचा, राष्ट्राध्यक्ष जर ह्याच न्यायाने, उद्या भारताचा पंतप्रधान झाला तर?
स
स्वलिखित Sat, 03/13/2021 - 07:24 नवीन
दुसऱ्या देशाचा नागरिक जर निवडणूक लढवून पंतप्रधान झाला स्वातंत्र्य सुद्धा धोक्यात आणेल , असं चुकूनही ह्यांच्या ध्यानी मनी नसेल , ह्यांच्या आपलेच खपत नाहीत बाहेरच कशाला पाहिजेत , छातीवर (उरावर) बसवायला !!
ब
बापूसाहेब Sat, 03/13/2021 - 07:34 नवीन
त्यांच असं आहे.. कि गाढव पण चालेल. कुत्रा पण चालेल.. भले आपल्या देशातले नसले तर परदेशातून आणू.. पण पंतप्रधानपदी मोदी नको. bjp नको.. फक्त एवढा एकच अजेंडा घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद खरडत बसायचे..
न
नावातकायआहे Sat, 03/13/2021 - 11:49 नवीन
मोदीळ झाली आहे बापूसाहेब. ह्या रोगाला औषध नाही!
स
सुक्या Sat, 03/13/2021 - 17:34 नवीन
"मोदीळ होणे" हा वाक्प्रचार मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल "नावातकायआहे" यांचे जाहीर अभिनंदन.
स
सुबोध खरे Sat, 03/13/2021 - 08:05 नवीन
As per citizenship law in India, Any foreigner becoming a citizen of India will be subject to conditions, which conditions are Indian becoming a citizen in their country. Which means the conditions an Indian has to face in becoming a citizen of Italy will be applied to an Italian person in becoming a citizen of India. ( This is amended now but this is unconstitutional I guess again Swamy is working on it) In Italy, You cannot be PM if you are not born in Italy. The same condition will apply to Italy person in India and hence Sonia Gandhi can’t become PM in India. आणि २००४ मध्ये श्रीमती सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिकत्व घेतलं असलं तर ईटालियन नागरिकत्व सोडलेलं नव्हतं. हे बेकायदेशीर आहे ( कारण तेंव्हाच्या भारतीय कायद्याप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या देशाचे नागरिकत्व सोडावे लागत असे) या कारणास्तव श्री स्वामी यांच्या पत्राप्रमाणे श्रीमती सोनिया गांधी याना पंतप्रधान होणे अशक्य होते. बाकी तुम्ही वाटेल त्या थापा मारता हे मी अनेक वेळेस दाखवलेले आहेच.
R
Rajesh188 गुरुवार, 03/11/2021 - 17:39 नवीन
तो पर्यंत कोणत्या ही पक्षाचे सरकार येवू ध्या ते जनतेचे भले कधीच करणार नाहीत. सेने नी सत्तेत न येता संघटना म्हणून जरी काम केले असते तरी त्यांची किंमत खूप वाढली असती. तेच अरविंद केजरीवाल विषयी पण म्हणता येईल. लोक संघटित होवून स्वतःच्या हक्क विषयी जागरूक होत नाहीत तो पर्यंत कोणत्याच पक्षाचे सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाही.. अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा. एक पण काम अडणार नाही.
स
सुबोध खरे Sat, 03/13/2021 - 14:32 नवीन
अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल तरी संघटना करून बघा. तुम्ही केली आहे का? सध्या हौसिंग सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर येण्यासाठी चार लोक तयार नसतात आणि तुम्ही इथे नसलेल्या गाजराचा हलवा विकताय?
ख
खेडूत Sat, 03/13/2021 - 18:19 नवीन
आमच्या पहाण्यात एकच सक्षम समाज संघटना आहे. दुसरी कुठलीच नाही! एकवार स्वतः, प्रत्यक्ष अनुभव घ्या असे सुचवेन.
श
श्रीगुरुजी Sat, 03/13/2021 - 18:45 नवीन
+ ९९९९९९९९९९९९ . . .
क
कपिलमुनी Sun, 03/14/2021 - 00:49 नवीन
सदर संघटनेचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा आहे. सरसंचालकांनी हातात दांडी घेऊन काढलेल्या यात्रेला 75 वर्षे झाली म्हणून चड्डी घालून हातात दांडी घेऊन दांडी यात्रा काढणार आहेत
ख
खेडूत Sun, 03/14/2021 - 03:40 नवीन
आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष प्रवक्त्यासारखा वाटतो. स्वातंत्र्य लढा हा इथे मुद्दा नसून सामाजिक, सेवाकार्य करण्याबाबत आहे. त्या बाबतील संघा इतकी चांगली संघटना माझ्या माहितीत दुसरी नाही. शेकडो संस्था उगाच उभ्या राहत नाहीत. अनेक लोक तिसऱ्या पिढीत निःस्वार्थ पणे काम करत आहेत. मी स्वतः किमान तीन संस्थांच्या सेवा कार्यात काम केले आहे. मला काही हजार रुपयांची मदत करावीशी वाटली तर ती परिवारातील संस्थेला देऊन टाकू शकतो कारण ती तिथे पोहोचणार, योग्य वापर होणार याची खात्री असते. आपला काही संघ कार्यकर्त्यावर राग असू शकतो. माझाही आहे. म्हणून संघटनेचे महत्त्व कमी होत नाही. आजही द्वेष करण्या ऐवजी एक क्षेत्र निवडून अल्पकाळ तिथे सहभाग द्याल तर वेगळेपणा सहज जाणवेल. संघ म्हणजे समर्पण. आपल्याला काही मिळावे म्हणून कुणी काम करत नाही. देशासाठी काहीं करावेसे वाटले तर ही कामे चालतात आणि आपल्याला पटतात त्यात मदत करावी. तर असो. आपली एकदा प्रत्यक्ष भेट झाली असल्याने हे सगळं लिहीत आहे. बाकी वाद वगैरे घालण्यात मला रस नाही! :))
श
श्रीगुरुजी Sun, 03/14/2021 - 03:47 नवीन
प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
क
कपिलमुनी Sun, 03/14/2021 - 13:02 नवीन
प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
श
श्रीगुरुजी Sun, 03/14/2021 - 14:28 नवीन
प्रतिसाद संपादित. सदस्यांनी तारतम्य बाळगून प्रतिसाद द्यावेत . व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांवर कारवाई केली जाईल. -मिपा व्यवस्थापन
ग
गामा पैलवान Mon, 03/15/2021 - 19:00 नवीन
कपिलमुनी, इथे स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला? बरं, आलाय तर येऊ द्या. त्यांत रास्वसंघाचं योगदान काय असं तुम्ही विचारताय. पण मग भारताच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं तरी कुठे काही योगदान होतं? इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या उठावामुळे. आ.न., -गा.पै.
ब
बापूसाहेब Mon, 03/15/2021 - 20:13 नवीन
गा पै. सहमत. पण स्वातंत्र्य हे चरखा फिरवून आणि एका कुटुंबातील व्यक्तींमुळे मिळाले हे धांदात खोटे आयुष्यभर खरं समजणाऱ्या भारतातील सुशिक्षित अडाणी लोकांना कधी समजणार देव जाणे..
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 02:39 नवीन
त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही... हिटलरने साहेबाच्या तीन पिढ्यांची हानी केली, साहेबाला आपले घर सांभाळायचे होते, म्हणून साहेबाने फाळणी करून, तडजोड केली... आझाद हिंद सेनेमुळे, नेहरूंचा पंतप्रधान होण्याची शक्यता दिसायला लागली आणि सरदार पटेल यांना, महात्मा गांधी यांनी सांभाळले आणि नेहरू घराणे पंतप्रधान पद उपभोगू लागले... आता अडाणी जनतेला, घराणेशाही नको आहे...
र
रंगीला रतन Tue, 03/16/2021 - 05:23 नवीन
त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही... असहमत. इथे राहिलो तर पॅन्ट शर्ट उतरवून खादीचा सदरा लेंगा घालावा लागणार. मग मड्डम जवळ नाय घेणार. या भीतीने साहेब गेला. हिटलरनी सायबाला चड्डी पण घालायची औकात ठेवली नस्ती ही अंधश्रद्धा आहे :-)
म
मुक्त विहारि Tue, 03/16/2021 - 06:24 नवीन
आता सामान्य माणसे देखील खादी वापरत नाहीत...खादीचा उपयोग फक्त मते मागण्यासाठी... अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....
र
रंगीला रतन Tue, 03/16/2021 - 06:31 नवीन
अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते.... बरोबर. पण मला वाटते जपाननी काशी घातली नसती तर साहेबाला अजून लवकर पळावे लागले असते.
स
सुरिया Tue, 03/16/2021 - 06:48 नवीन
सिराजौद्दौल्या आणि साहेबाबाबत असेच काहीतरी मत होते म्हणे. असे असते तर किंवा तसे नसते तर टाईप.
R
Rajesh188 Tue, 03/16/2021 - 06:40 नवीन
फक्त ह्याच कारणांमुळे भारताला स्वतंत्र मिळाले. मग तात्या टोपे भगतसिंग. राजगुरू लोकमान्य मौलाना आझाद. सुभाषचंद्र बोस क्रांतिसिंह नाना पाटील आणि अशी अनंत लोक ज्यांनी प्राणाचे दान दिले ते कशासाठी . असेच त्यांना जास्त मस्ती होती म्हणून की काय
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा