चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
२६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-india-to-continue-advocating-right-of-free-expression-twitter/articleshow/80781473.cms
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे..या दोन्हींंची तुलना होऊच शकत नाही. संघात कोणत्याही व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे स्तोम नाही. संघात भ्रष्टाचाराला वाव नाही कारण संघाकडे कोणतेही शासकीय अधिकार नाहीत. संघाला देशासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत. घराणेशाहीत बरोबर उलट असते. मागील काळात संपूर्ण शासन, पंतप्रधान आपली घटनात्मक कर्तव्ये विसरून देशहिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एका विशिष्ट घराण्याची चाकरी करण्यात मग्न होते.Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा..कसली फेकूगिरी? घेतलेल्या कराचा जनतेसाठी कसा विनियोग होतोय याची अनेक उदाहरणे आधी दिली आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे, संसदेच्या उपहारगृहातील अनुदानित स्वस्त अन्नपदार्थ, परदेश दौऱ्यावर जाताना सरकारी खर्चाने माध्यम बातमीदारांचा ताफा नेणे अशा अनेक प्रकारच्या उधळपट्टीवर नियंत्रण आणले आहे.मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का? त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?१-२ उदाहरणे देतो. १९८४ मध्ये इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर, कॉंग्रेसमध्ये अनेक अनुभवी नेते असूनही, कॉंग्रेसने सरपंचपदाचा सुद्धा अनुभव नसलेल्या राजीव गांधींना थेट पंतप्रधान केले. त्यावेळी अनुभवी प्रणव मुखर्जींंनी (जे कॉंग्रेसचे संसदेतील क्र. २ चे नेते होते) आक्षेप घेतल्याने पुढील अनेक वर्षे त्यांची हकालपट्टी झाली होती. १९९१ मध्ये राजीव गांधींचा खून झाल्यानतर, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसलेल्या व जन्माने भारतीय नसलेल्या सोनिया गांधींना, कॉंग्रेसींनी थेट अध्यक्ष म्हणून निवडले होते. परंतु सोनिया गांधींनी स्वत:च त्यात रस दाखविला नव्हता. १९९८ मधील लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेता व विरोधी पक्षनेता होते. एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षांंच्या सरकारसाठी विरोधी पक्षनेता व कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता या पदांमुळे शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असणे योग्य होते. परंतु खासदार सुद्धा नसलेल्या व शून्य अनुभव असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान पदावर दावा करून बहुमताची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पवारांनी नंतर १ महिन्यातच सोनिया गांधींविरूद्ध बंड केले होते. या उदाहरणातून घराणेशाही दिसत नसेल तर सोडून द्या.काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा.-- उधळपट्टीची एक दोन उदाहरणे द्या पाहू ?