Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आघाडी सरकार आणि सामान्य जनता

म
मुक्त विहारि
Sat, 01/16/2021 - 02:50
🗣 159 प्रतिसाद
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. 1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. 3. साधु हत्याकांड 4. तांदूळ घोटाळा 5. अर्भक मृत्यू 6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत 7. वाढीव पेट्रोल दर. 8. ड्रगचा वाढता वापर... 9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल 10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले 11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे. 12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 52340 views

🗣 चर्चा (159)
स
सुबोध खरे Mon, 01/18/2021 - 13:26 नवीन
लोकांना आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते people get the government, they deserve it.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/18/2021 - 13:32 नवीन
नक्कीच. परंतु ज्यांना प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून मत दिले त्यांच्याकडूनच विश्वासघात व्हावा हेच भाजप समर्थक मतदार deserve करीत होते का?
  • Log in or register to post comments
ज
जानु Sat, 01/16/2021 - 14:03 नवीन
सरकार स्थापन केले ही राजकीय खेळी म्हणुन मान्य केले जाईल. पण आरे कार शेड बाबत केलेला खेळ, बुलेट रेल्वे ला खोडा हे पातळी सोडुन घेतलेले निर्णय सगळ्यात जास्त टोचले. सेना जगते ती मुंबईच्या जोरावर. पक्ष आणि सत्ता पैशाच्या जोरावर चालते. सेनेला पैसा मिळतो तो मुंबई आणि ठाण्यातुन. राजकारणासाठी पोटावर लाथ मारायला तयार झालात, जनतेच्या फायद्यापेक्षा आपले राजकारण महत्वाचे. राऊत यांच्या वायफळ बडबडीने जास्त उबग आणला. त्यात कंगना आणि अर्णब ने शिस्तीत म्हणा किंवा खेळुन, त्यांना काय राजकारण येते ते लोकांच्या मनात ठसवले. साहेब कायम हे दाखविण्यात मग्न झाले की मी म्हणजे फायनल रिमोट. कायम सरकार पडणार नाही ही टेप. कोणती कामे केली किंवा निर्णय घेतले हे विचारले तर सगळा गोंधळ. पुन्हा निवडणुका आल्या की यांना अजिबात उभे नाही करणार.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/16/2021 - 16:18 नवीन
१०१ टक्के सहमत !
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 01/17/2021 - 08:47 नवीन
>पण आरे कार शेड बाबत केलेला खेळ,..वगैरे वगैरे.. एरवी इथे मत सेनेविरुध्द जायला हवे पण रातोरात असंख्य झाडांची कत्तल करुन फडणवीस आपली विश्वासार्हता गमावुन बसले आहेत.बीजेपी च्या बाजुने असलेल्या अनेकांनाही ते कृत्य काही पसंत पडले नव्हते. हीच गोष्ट घाईगडबडीत पहाटे पहाटे उरकलेल्या शपथविधीची.ह्या दोन्ही कृत्यांना जनता माफ करणे अवघड आहे. >सेना जगते ती मुंबईच्या जोरावर. पक्ष आणि सत्ता पैशाच्या जोरावर चालते. सेनेला पैसा मिळतो तो मुंबई आणि ठाण्यातुन. बरोबरे.सेनेचा मुख्य अजेंडा हा मुंबई मनपा वर सत्ता हाच असतो आणि राज्यपातळीवरची सत्ता हे त्यामानाने दुय्य्म उद्देश्य असावे आणि पुढील मनपा निवडणुकींची सेनेने आत्तापासुनच फिल्डींग लावायला चालु केली आहे. (गुजरातीमधुन पत्रके वगैरे.). सेनेला जनता जोपर्यंत मनपा वरुन पायउतार करत नाही तोपर्यंत सेनेला लोकाधार नाही असे म्हणणे बिनबुडाचे ठरेल. बाकी राऊत ही बीजेपीची एक डोकेदुखी होऊन बसले आहेत आणि त्यांना हाताळणारा एकही सक्षम वीर बीजेपीत नाहीत.(काय ती अमृतावहींनीची आणि राणे सुपुत्रांची प्रत्युत्तरे.!)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 01/16/2021 - 16:11 नवीन
सेना आणि भारतीय जनता पक्षात निवडणुकी आधीच संघर्ष चालू होता.. युती होईल की नाही ह्याची खात्री नव्हती. नानार प्रकल्प ल bjp आग्रही होती तर सेना त्याला विरोध करत होती. जिथे सेनेचे उमेदवार जिंकतात तेथील च राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या ताकत वान लोकांना bjp नी पक्षात प्रवेश दिला होता. देवेंद्र फडणवीस कर्ज माफी दिली असे सांगत होते तर ठाकरे एकाला ही कर्ज माफी मिळाली नाही असे सांगत होते. आरे मधील मेट्रो शेड साठी bjp आग्रही होती तर सेना त्याचा विरोध करत होती. Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना. नारायण राणेंचा bjp pravesh सेने ला रुचला नव्हता. इतके सारे महाभारत निवडणुकी अगोदर घडत होते तरी युती झाली. का? दोन्ही पक्षात बेबनाव आहे हे राजकीय पंडित असलेल्या अमित शाह ना माहीत नव्हते का? ते काय बोळ्याने दूध पितात काय. युती तुटण्याची सर्व जबाबदारी सेने वर टाकून स्वतः नामा निराळा राहण्याचा प्रयत्न BJP करते आहे. पण राजकारणातील खेळाडू आणि समंजस जनता त्या वर विश्वास का म्हणून ठेवेल.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 01/16/2021 - 22:41 नवीन
Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना. हे जर असे होते तर शिमगा करायला निवडणुक का होउ दिली. त्या अगोदर आमचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आहे हे का नाही बोलले? कुणी तोन्ड दाबुन ठेवले होते का?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sun, 01/17/2021 - 00:24 नवीन
Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना.
सेना आदित्य ठाकरे ना प्रमोट करत होती ह्याचा एखादा पुरावा आहे तुमच्याकडे? की आपले नेहमीप्रमाणे मनात येईल ते टंकायचे ?निवडणुक काळातील एखादी बातमी ज्यात सेनेने आदित्य ठाकरे ना मुख्यमंत्री म्हणून सादर केले आहे किंवा एखाद्या प्रचार सभेतील पोस्टर ज्या प्रचार सभेत सेना / भाजप मधले पहिल्या फळीतील नेते आहेत, असे काही असेल तर प्लिज इथे पोस्ट करा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 01/17/2021 - 14:59 नवीन
आदित्य ठाकरेचे नाव नव्हते, परंतु १८ फेब्रुवारीस युतीची अधिकृत घोषणा करताना "भाजप व सेना सर्व जागा, सर्व पदे व सर्व जबाबदाऱ्या समान वाटून घेणार आहेत", असे फडणवीसांनी आधी मराठीत व नंतर हिंदीत सांगितले होते (ते प्रत्येक गोष्ट दोन्ही भाषात सांगतात). नंतर १९ फेब्रुवारीस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना "सुरूवातीची अडीच वर्षे सेनेचा व उर्वरीत अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होईल असे वाटाघाटीत दोन्ही पक्षांनी ठरविले आहे", असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हेच इतर सर्व सेना नेते वेगवेगळ्या सभातून ऑक्टोबर २०१९ पर्यंत सांगत होते व कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये फायनान्शियल एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेने सुद्धा हेच सांगितले होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या एक आठवडा आधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी असे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले. हे सांगण्यास त्यांनी इतका उशीर का लावला? हे आधी सांगितले असते तर सेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वीच युती तोडली असती या शंकेमुळे भाजप नेते जवळपास ८ महिने गप्प असावे. युतीसाठी सेनेने पुढाकार घेतला नव्हता. स्वतः फडणवीसच युतीसाठी अत्यंत कासावीस होते. त्यामुळेच त्यांनी वारंवार मातोश्रीवर फेऱ्या मारून अक्षरशः उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडून युती करायला लावली. युतीसाठी त्यांनी निदान मोघम स्वरूपात तरी सेनेला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असावे. त्यामुळेच निकालानंतर सेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहिली. मुळात संपत आलेल्या सेनेला तब्बल १२६ जागा देऊन भाजपने स्वतः फक्त १४६ जागा लढविल्या, तेव्हाच भाजप बहुमताच्या १४५ या आकड्यापासून खूप दूर राहणार व सेनेला आपल्या ताकदीपेक्षा खूप जास्त जागा मिळून सेना भाजपला नाचविणार हे दिसत होते. हे ओळखून फडणवीसांनी मित्र पक्षाला दिलेल्या १८ जागा कमळ चिन्हावर लढवायला लावून आपली उमेदवार संख्या १६४ वर नेली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट आयाराम पायघड्या घालून भाजपत आणले. किमान २०१४ प्रमाणे १२५ च्या आसपास जागा मिळतील या भ्रमात फडणवीस होते. परंतु मतदारांनी दणका देऊन भाजपला १०५ वरच रोखले (यात मित्रपक्षांचे २ व १७-१८ आयारामांचा समावेश आहे) व फडणवीसांची स्वप्ने उधळली गेली.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/19/2021 - 05:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Tue, 01/19/2021 - 19:32 नवीन
सेनेचे नेते सेनेचा मुख्यमंत्री होईल हे सांगत होते. पण आदित्य ठाकरेचे नाव कोणी घेतले का, इतकेच विचारायचे होते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 01/16/2021 - 16:11 नवीन

+१

१०० टक्के सहमत !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 05:21 नवीन
https://maharashtratimes.onelink.me/W6tZ/dd08d9d7 ही महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी पूर्ण वाचा. पुढचा मुख्यमंत्री सेने चाचं असेल असे उद्धव ठाकरे किती तरी वेळेला सभेत म्हणाले आहेत. त्याची लिंक मागू नका ते जग जाहीर आहे. लोकसभा निवडणुकीत युती झाली तेव्हा ती bjp ची गरज होती. आणि सेना तिथेच चुकली.लोकसभे साठी सेने नी युती करायला च नको होती. Bjp ची गरज भागली होती. 370 कलम ,आणि बाकी कारण मुळे bjp स्वबळावर विधानसभा जिंकेल ह्याची खात्री bjp ला होती. त्या मुळे युती करणे निवडणूक पूर्व ही सेनेची गरज होती. लोकसभेत युती करून सेने नी जी चूक केली होती.त्याचा च तो परिणाम होता.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 05:22 नवीन
http://mtonline.in/RbjxsZ48?utm_source=whatsapp&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 05:39 नवीन
बिहार मध्ये नितीश कुमार च्या जागा कमी असून त्यांना मुख्यमंत्री पद bjp नी स्वतः दिले. का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 07:35 नवीन
राजकारण असे चालत नाही. युती तुटण्याच कारण मुख्यमंत्री पद हे कधीच नव्हत.जसे तुम्ही समजत आहात. Bjp आणि सेनेची युती बाळासाहेब आणि bjp ह्यांनी का घडवून आणली. हा प्रश्न विचारून बघा स्वतः ला. नंतर काय काय घडामोडी घडल्या त्याचा एकदा विचार करा. मग तुटणे कोणाची गरज होती bjp ची की सेने ची तो विचार करा . मग तुमच्या लक्षात येईल मुख्यमंत्री पद तर फक्त बहाणा होता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/17/2021 - 15:15 नवीन
सध्याचे सरकार, जनतेच्या भल्यासाठी, काम करत आहे का? हा आहे ....
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 16:13 नवीन
आता जी तीन पक्षाची आघाडी आहे त्या सरकार नी काय काम केली . 1 वर्षाचे सरकार आणि lockdown मध्ये सापडलेले सरकार . त्या सरकार नी काय काम केले त्याचे मापन कोणत्या फूट पट्टी नी करायचे. असे एका वर्षात सरकारी निर्णय होवून काम चालू होत नाही. त्या साठी मला वाटत. काँग्रेस ,राष्ट्रवादी युती सरकार जावून सेना युती सत्तेवर आली आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून राज्यात काय काम झाली त्याचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्री फडणवीस झाल्या नंतर किती धरण बांधली गेली ? किती क्षेत्र पाण्याखाली आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्या पासून आज पर्यंत प्रशासन गतिमान झाले आहे का. फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा पासून आज पर्यंत भ्रष्ट कारभार जो प्रशासनात होता तो नष्ट झाला आहे का. लोकांची काम सरकारी बाबू वेळात पूर्ण करत आहेत का . नवीन किती युनिट वीज निर्मिती महाराष्ट्रात चालू झाली. आता महाराष्ट्रात ज्या काही सुविधा दिसत आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार च्या काळातील आहेत,मुख्यमंत्री मनोहर जोशी च्या काळातील आहेत. की फडणवीस सरकार नी निर्माण केलेल्या आहेत. पाहिले ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा आणि नंतर आताच्या सरकार ला प्रश्न विचारा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/17/2021 - 16:19 नवीन
ह्या घटनांचा आणि करोनाचा, फार काही संबंध नाही उदाहरणार्थ, सामान्य माणसाला घरी बोलावून केलेली मारहाण निवृत्त सेनाधिकार्याला केलेली मारहाण यांचा आणि करोनाचा काहीही संबंध नाही
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 01/17/2021 - 18:08 नवीन
देशाची राजधानी दिल्ली शहरात आज (बुधवार, 1 जुलै) पेट्रोल 80.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.53 रुपये प्रति लीटर आहे. मात्र, दोन्ही इंधनांचा मूळ दर पाहिला तर तो अनुक्रमे 24.92 आणि 27.03 रुपये प्रति लीटर इतका आहे. दिल्ली मध्ये 24.92 रुपये मूळ किंमत (बेस प्राइज) असलेले पेट्रोल 80.43 रुपये आणि डीजेल 27.03 रुपये असताना 80.53 रुपये प्रति लीटर गेलेच कसे? जाणून घेण्यासाठी इंडियन ऑयल संकेतस्थळावर नजर टाकल्यावर दरांबाबत बरेच काही ध्यानात येते. जे दर 1 जुलै पासून लागू झाले आहेत. पेट्रोल बेस प्राइज 24.92 रुपये प्रति लीटर आहे. ज्यावर 33 पैसे प्रति लीटर दराने भाडे दिल्यानंतर त्याची किंमत 25.25 रुपये प्रति लीटर होते. त्यावर एक्साइज ड्युटी 32.98 रुपये प्रति लीटर, डीलरचे कमीशन 3.64 रुपये प्रतिल लीटर आणि मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट 18.56 रुपये प्रति लीटर असे लागते. त्यामुळे सर्वांचे मीळून होतात 80.43 रुपये. जो दर प्रत्यक्षात ग्राहकालाच द्यावे असे ठरतात पेट्रोल ,डिझेल चे दर. एक्साइज duty हा केंद्र सरकार चा कर आहे.. तो 32.98 रुपये आहे. राज्याने लावलेल्या vat च्या दुप्पट कर केंद्रांनी लावला आहे पेट्रोल ,डिझेल वर. त्या मुळे पेट्रोल चे दर जास्त आहेत त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. भाव वाढीला तेच जास्त जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 01/17/2021 - 21:05 नवीन
त्या मुळे पेट्रोल चे दर जास्त आहेत त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे.
केंद्रात मोदी सरकारच्या ऐवजी चिवसेना आली किंवा भ्रष्टवादी आली किंवा वरुन "गर्व से कहो" म्हणणारे येउंदेत किंवा "हे राम" म्हणणारे बापू येउंदेत...पेट्रोलचे भाव वर वरच जात रहाणार आहेत #go electric
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 06:19 नवीन
राज्य सरकार, त्यांचे दर कमीजास्त करू शकते. उदा. केंद्र सरकारने, आधारभूत किंमत 50/₹ ठरवली तर, राज्य सरकार ते त्याच किंमतीने विकू शकते किंवा, जास्त दर लाऊन विकू शकते. महाराष्ट्र सरकारने, इतर काही राज्यांपेक्षा जास्त दर लावले आहेत. काही लोकांना, स्वतःच्या चुकीचे खापर, इतर लोकांवर फोडायची सवय असते. सर्वसामान्य माणूस, इतका खोलवर विचार करत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 06:13 नवीन
दरवाढ, राज्य सरकारने केली आहे. इतर काही राज्यात, महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर कमी आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/18/2021 - 08:33 नवीन
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण. 2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार. यात आता ३ री भर देखील पडली आहे असे म्हणावे का ? ‘Physically and mentally tortured’ former BARC CEO, arrested by Mumbai Police, admitted to hospital, daughter requests PM Modi to save his life दासगुप्ता यांची कन्या यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहुन त्यांच्याकडे आपल्या वडीलांच्या प्राणाची भिक मागितली असुन, दासगुप्ता यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 01/18/2021 - 08:51 नवीन
अर्णव चे व्हॉट्सॲप चाट व्हायरल झाले आहे त्या वरून केंद्र सरकार आणि अर्णव चे देश प्रेम किती उच्च कोटी चे आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे. दासगुप्ता पण त्यांचाच सवंगडी आहे. उच्च कोटी तील देश प्रेम असणारा. (उच्च कोटी देशप्रेम म्हणजे सामान्य लोक समजतात त्या पेक्षा खूप वेगळे देशावरचे प्रेम.) आता फक्त सुशांत बद्द्ल चे अर्णव चे चाट व्हायरल झाले की खूप मज्जा येईल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/18/2021 - 09:41 नवीन
अर्णव चे व्हॉट्सॲप चाट व्हायरल झाले आहे त्या वरून केंद्र सरकार आणि अर्णव चे देश प्रेम किती उच्च कोटी चे आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे अर्णब आणि दासगुप्ता [ ज्यांना तुम्ही सवंगडी म्हणता ] हे दोघेही स्वतःचे पर्सनल कम्युनिकेशन स्वतःलाच गोत्यात आणण्यासाठी तसेच टॉर्चर करुन घेण्यासाठी व्हायरल करतील का ? अर्थातच नाही. मग त्यांचे पर्सनल कम्युनिकेशन व्हायरल कसे होउ शकत ? व्हॉट्सएप म्हणते ते एंड टु एंड एनक्रिप्शन करतात, म्हणजे कोणी तरी व्हॉट्सएप ला विनंती केली किंवा पैसे दिले आणि त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर असणार्‍या एनक्रिप्शन की वापरुन व्हॉट्सएप ने हा डेटा पुरवला ? पण ही शक्यता देखील धुसर दिसते ! [आधीच त्यांची पुंगी वाजलीय,असं केल तर देशातुनच ब्लॉक होतील. ] समजा तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे आणि माझा तुमच्याकडे, मग मी तुमचा नंबर अर्णब गोस्वामी नावाने सेव्ह करतो आणि तुम्ही माझा दास गुप्ता या नावाने सेव्ह करता, मग जसा प्लॅन असेल तसे आपण लिहायचे आणि स्क्रिन शॉट काढुन व्हायरल करायचे ! [ हे सहज शक्य आहे नाही ? :))) ] एक मंत्री काही काळा पूर्वी अर्णब जेल मध्ये आत्महत्या करेल अश्या स्वरुपाचे विधान करताना स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसले होते, त्याच मंत्र्याचा जावई ड्रग केस मध्ये अडकल्यावर हे अर्णब चॅट प्रकरण अचानक आले [ इतके दिवस हे चॅट रेकॉर्ड्स कुठे बरं दडलेले होते ? ] थोडक्यात कोणीतरी टायमिंग धरुन हा उध्योग करत आहे. असो... पाकिस्तानकडुन अपेक्षित प्रतिक्रिया देखील आली बघा ! तेव्हा देश-विघातक शक्तींचा हा एक डाव असलल्याचेच प्रथम दर्शनी दिसते. संदर्भ :- Pakistan calls Pulwama attack ‘false flag operation’ citing Arnab Goswami’s WhatsApp chats

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 01/18/2021 - 10:00 नवीन
त्या scroll.in che ceo समीर पाटील आणि संपादक नरेश हे अर्णव चेच भावबंध नाहीत ना ह्याची खात्री पटल्यावर च तुम्ही दिलेल्या दुव्यावर किती विश्वास ठेवायचं ह्याचा विचार कोणी पण करेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 01/18/2021 - 10:30 नवीन
अगदी बरोबर! या दोघांच्या कायप्पा गप्पा या दोघांशिवाय कोण प्रसिद्ध करणार? एका मंत्र्याची कबुतरबाजी व व दुसऱ्या मंत्र्याच्या जावयाचे अंमली पदार्थ संबंध बाहेर आल्यानंतर या दोघांच्या नावाखाली कायप्पा गप्पा प्रसिद्ध करणे हे संशयास्पद आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 01/18/2021 - 11:52 नवीन
सुशांत सिंग प्रकरणानंतर व्हाट्स ऍप सुरक्षेत चांगलीच वाढ झालेली दिसतेय. नायतर रियाचे सगळे चॅट टीव्हीवर दाखवायचे, त्याच्यावर तर मु.पो. ची सही पण नसायची.रियाच्या चॅट मधून सुशांतच्या चहात कायकाय मिसळलं कळत होतं की.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/18/2021 - 14:57 नवीन
रेहा ने तिची ड्रग चॅट मान्य केली होती, हे सांगायचे सोयिस्कर रित्या विसरलात वाटतं !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 01/18/2021 - 16:05 नवीन
गोस्वामीने सुद्धा हे माझे चॅट नाहीत, मु.पो. थापा लावत आहे असे कुठे म्हणले नाही, हे तुम्हीसुद्धा विसरलातच की. चालायचंच.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 01/18/2021 - 17:30 नवीन
गोस्वामीने सुद्धा हे माझे चॅट नाहीत, मु.पो. थापा लावत आहे असे कुठे म्हणले नाही ओक्के, तर मुंबई पोलिसांनी हे स्विकारले, त्यावर माननिय माजी मुख्यमंत्री काय म्हणाले ते खाली देतो :- The voluminous transcript of Mr Goswami’s chats released by Mumbai Police is deeply disturbing. Who gave access to such sensitive information from national security to constitutional amendments and political appointments?” “The Government of India must launch a thorough probe. Also the Parliamentary Standing Committee on Defence must take this matter with utmost priority,” he added. The admission by Chavan is, again, a stark reminder of the extent to which the Mumbai Police and the Maharashtra Government have gone to in order to target Arnab Goswami. संदर्भ :- Congress admits Mumbai police leaked Arnab Goswami chats: Here are all the wild conspiracy theories they generated जाता जाता :- From Times of Islamabad to The Hindu: 5 media outlets which ’knew about the Balakot airstrike before it happened’ according to ‘liberal’ logic

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 01/18/2021 - 18:02 नवीन
रियाचे चॅट्स वाचणे ओके होते, ते पण पोलिसांनी नाही तर टीव्ही अँकर्स नी, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी पसरवल्या आणि त्यासाठी पोलिसांनी चॅट वाचले हे काय, तर "टार्गेटिंग गोस्वामी." छान. (टीआरपी scam, सरकारी कनेक्शन्सचा गैरवापर हे पण आहेच!) OpIndia नेहमीसारखं lol. काय होईल ह्याच स्पेक्युलेशन करणं आणि सरकार काय करणार आहे ह्याची नक्की बातमी आपल्या मित्राला सांगणे, हे सेम वाटतं का ? टाइम्स ऑफ इस्लामाबाद 4 पर्यायांचा विचार करत होता, त्यातला नक्की ऑप्शन गोस्वामीने लॉक करून दिला असता तर ? मिलिटरी, सैन्य वैगेरे बद्दल इतकं लिहिणाऱ्या व्यक्तीकडून असा रिस्पॉन्स ? बाकी सगळे पेपर पर्यायांचा विचार करत होते, तर गोस्वामीला काय होणार हे माहिती होतं आणि तो ते मित्राला सांगत होता. ह्यात मला तर फरक वाटतो. बाकी, मु.पो. ने बेकायदेशीर मार्गाने चॅट मिळवले तर नक्की कारवाई व्हावी. मूळ विषय- चॅट खरे आहेत की नाहीत ? कि मुंबई पोलीस सहजगत्या व्हेरिफाय होऊ शकणाऱ्या गोष्टीवर इतके धाधांत खोटे बोलत आहे ? (मला हे चॅट्स खरे आहेत असे म्हणायचे नसून, दोन चॅट्स लीक मध्ये काय क्वालिटेटिव्ह फरक तुम्हाला दिसला, ज्याने ते चॅट विश्वासार्ह होते आणि हे "कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या नावाने सेव्ह करून घेतलेले स्क्रीनशॉट" आहेत हे जाणून घ्यायचे आहे.)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/19/2021 - 07:48 नवीन
रियाचे चॅट्स वाचणे ओके होते, ते पण पोलिसांनी नाही तर टीव्ही अँकर्स नी पोलिसांनी चॅट व्हायरल करण्याचे कारण काय ? असे व्यक्तिगत कम्युनिकेशन व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का ? त्यामुळे ट्रार्गेट गोस्वामी आहे हे उघड सत्य आहे, जरी तुम्हाला व्यक्तिगत रित्या ते मान्य नसेल तरी. काय होईल ह्याच स्पेक्युलेशन करणं आणि सरकार काय करणार आहे ह्याची नक्की बातमी आपल्या मित्राला सांगणे, हे सेम वाटतं का ? टाइम्स ऑफ इस्लामाबाद 4 पर्यायांचा विचार करत होता, त्यातला नक्की ऑप्शन गोस्वामीने लॉक करून दिला असता तर ? जर तर ला न्यायालयात देखील किंमत नसते... आर ठाकरेंची सगळी भाषणे अशीच जर-तर शब्दांचा वापर असलेली असतात. :) स्पेक्युलेशन करणे आणि अचूक माहिती देणे यात फरक असतो हे आपल्या समजत असेल असे मी समजतो.अर्णब ने कोणतीही ऑपरेशनल माहिती उघड केलेली निदान मला तरी दिसली नाही. जी लिंक दिली आहे त्यात अजय शुक्ला यांचे ट्विट वाचुन देखील तुम्ही जे अर्णबच्या बाबतीत म्हणत आहात तेच म्हणता येइल. बाकी सगळे पेपर पर्यायांचा विचार करत होते, तर गोस्वामीला काय होणार हे माहिती होतं आणि तो ते मित्राला सांगत होता. ह्यात मला तर फरक वाटतो. अगदी आपल्या पंतप्रधानां पासुन ट्रम्प तात्यांनी त्या काळात अशीच विधाने केलेली होती, फार मोठी कारवाई होइल हा अंदाज आणि नक्की कुठे आणि काय कारवाई होणार हे सांगणे यात फार मोठे अंतर आहे. अगदी टाईम्स ने देखील बातमी छापली होती :- Response to Pulwama attack: Precision air strikes the favoured option बाकी, मु.पो. ने बेकायदेशीर मार्गाने चॅट मिळवले तर नक्की कारवाई व्हावी. जशी मु.पो. वरकठोर कारवाई झाली पाहिजे, तसेच जर अर्णब दोषी आढळला तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. मूळ विषय- चॅट खरे आहेत की नाहीत ? कि मुंबई पोलीस सहजगत्या व्हेरिफाय होऊ शकणाऱ्या गोष्टीवर इतके धाधांत खोटे बोलत आहे ? जेव्हा मी प्रतिसाद लिहला होता तेव्हा मु.पो यांनीच हे पर्सनल कम्युनिकेशन लिक केले होते ते मला ठावूक नव्हते, तुमच्या दुसर्‍या प्रतिसादात जेव्हा उल्लेख आला त्या नंतर मी बातमी शोधली आणि मग दुवा देखील दिला. दोन चॅट्स लीक मध्ये काय क्वालिटेटिव्ह फरक तुम्हाला दिसला, ज्याने ते चॅट विश्वासार्ह होते आणि हे "कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या नावाने सेव्ह करून घेतलेले स्क्रीनशॉट" आहेत हे जाणून घ्यायचे आहे. दोन्ह चॅट मधील मुख्य फरक म्हणजे एक चॅट एका व्यक्तीने ड्रग्स संबंधी केले असुन दुसरे एका पत्रकाराने दुसर्‍या व्यक्तीशी केलेली सविस्तर चर्चा आणि इतर बाबींची चर्चा आहे. रेहा ने स्वत: मान्य केल्याचे तिचे चॅट सत्यच होते, त्यानुसार तिच्यावर कारवाई झालीच होती तसेच मु.पो. यांनीच स्वतः चॅट लिक केल्याचे मान्य केले असल्याने अर्णब चे चॅट सत्य असावे असे निदान या घडीला तरी मान्य करावे लागेल. तसेच मु.पो. वर कशी आणि कोणती कारवाई होइल ते देखील पहावयास हवे. जाता जाता :- कारगिल युद्धाच्या वेळी बर्खा दत्त आणि २६/११ च्या वेळी जवळपास सगळा मिडिया कसा वागला होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. संदर्भ :- Book reveals that Army was spooked by Barkha Dutt’s reporting in Kargil Remembering the role Barkha Dutt played in endangering the lives of 100s of civilians during the 26/11 Mumbai terror attack 26/11 attack: Media pulled by Supreme Court for it's role

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/22/2021 - 09:22 नवीन
आधीच्या प्रतिसादात बर्खा दत्त यांचा उल्लेख केलेला आहेत, भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या वरील व्हिडियोत तिचे व्यवस्थित कौतुक केले आहे ते ऐकण्या सारखे आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 01/18/2021 - 08:36 नवीन
देश चालवण्यासाठी पैसे लागतात तर राज्य चालवण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. केंद्र सरकार देश चालवण्यासाठी 32..98 म्हणजे 33 रुपये एक्साईज duty लावत असेल तर 18 रुपये vat राज्य सरकार का लावू शकतं नाही. . राज्यांची देनी केंद्र सरकार वेळेवर देत नाही. Gst मधील राज्यांचा हिस्सा वेळेवर देत नाही . मग राज्यांनी काय करायचे. एक तर gst मुळे राज्यांचे आर्थिक स्वतंत्र ह्या bjp सरकार नी हिरावून घेतले आहे. पण हे bjp च्या समर्थकांना कधीच दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 01/18/2021 - 12:04 नवीन
योग्य ती आर्थिक मदत नक्कीच केली आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/18/2021 - 19:28 नवीन
साडेसहा हजार ग्रामपंचायती मध्ये आघाडीला यश मिळाले आहे याचा अर्थ इथे लिहितात तेवढे सरकार वाईट नाही
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/18/2021 - 20:00 नवीन
शून्य स्टॅटिस्टिक्स असलेला भोंगळ धागा ! केवळ आरोप चालणार
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 01/19/2021 - 03:52 नवीन
दिलेल्या मुद्द्यावर बरेच बोलण्यासारखे आहे, पण वेळेअभावी लिहिता येत नाहीये. विशेष करून. पेट्रोल, साधू हत्या, आरे / कारशेड, मराठा आरक्षण आणि काही, cbi /ed तत्सम संस्था आणि इतर. तरीही लिहिण्याचा प्रयत्न केला असता, पण मुळ धागा लेखकानेच वेळ न घालवता फक्त point लिहिले आहेत तेच आवडले नाही. मते वेगळी असावीत पण विश्लेषण नको का आपल्या मतांचे? म्हणुन विस्तृत लिहीत नाही. उदा. पेट्रोल : देशात केंद्र सरकार अमुक ३०-३२ रुपये tax लावतेय, राज्य सरकार इतके लावतेय. बॅरल च्या किंमती.. म्हणजे देशात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना केंद्र सरकार विरोधात पेट्रोल, गॅस यांच्या विरोधात आंदोलन करायचे आणि आता राज्य? का मोदी है तो.. साधू हत्या झाली ती वाईट, पण जमलेल्या लोकात तेथील सरपंच हा सुद्धा bjp चा होता, ग्रामपंचायत सदस्य bjp चे. Lockdown, whatsapp मेसेज फिरेलेले होते मुले पळवणारी टोळी फिरतेय, वगैरे हे सगळे संदर्भ नकोत का? मराठा आरक्षण न्याय प्रविष्ट आहे हे फडणवीस सरकार सांगत होते, विरोधी राजकारण करतात हे बोलत होते, मग आता ते राज्य सरकार अंतर्गत आहे काय? शेतकरी अपुरी मदत, तांदूळ घोटाळा या बाबत माहिती येऊद्या सगळेच whatsapp सारखे नसते.. Cbi संस्था केंद्राकडे, तसेच ed वगैरे.. त्यांचा गैरवापर केंद्र सरकार करतेय कि राज्य? ड्रग चा वापर सामान्य माणसात वाढलेला data तर द्या.. मला वाटते म्हणुन कसे चालेल? कंगना, अर्णब फलाना कोणासाठी आहेत हे एकदा पाहिले पाहिजे, अर्णब चे चाट जे फिरतेय ते ही पाहिले पाहिजे.. असली लोकं आणि इतर याबद्दल सविस्तर तर लिहा.. असो..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 01/19/2021 - 06:12 नवीन
सहमत. हा धागा १०५ आणबनही घरी बसवले ह्याची जळजळ कुठेतरी काढण्यासाठी काढलेला वाटतोय :) असो. आघाडी सरकार ऊत्तम काम करतंय. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/19/2021 - 07:06 नवीन
असहमत. आघाडी सरकार आधीच्या सरकारसारखेच अत्यंत वाईट आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 01/19/2021 - 07:12 नवीन
आघाडी सरकार ऊत्तम काम करतंय. -- आघाडी सरकारने, गेल्या दिडदोन वर्षात केलेले एक 'उत्तम' काम सांगा ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 01/19/2021 - 07:39 नवीन
किमान समान लुटीचा कार्यक्रम किती छानपैकी राबवला जात आहे. तुम्हाला ना, कशाचं काही कौतुकच नाही बघा... :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/20/2021 - 04:52 नवीन
आघाडी सरकारने, गेल्या दिडदोन वर्षात केलेले एक 'उत्तम' काम सांगा ?>>>> -महाराष्ट्राला काडीचा ऊपयोग नसलेल्या बुलेट ट्रेन ला स्थगीती. -कोरोना संकटावर ऊपाययोजना. (मागचं सरकार कोल्हापुरात लोक मरत असताना मते मागत फिरत होतं) -मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणनार्यांना धडा. -मुंबई पोलिसांना बदनाम करनार्याना चपराक. -कारशेड ची जागा बदलणे. - महाराष्ट्रात झालेली मोठी गुंतवणूक. - मुंबईतील कार्यालये अहमदाबाद ला हलवण्याचा डाव हाणून पाडणे. - राज्याच्या हक्काचा जीएसटी केंद्राने अडवलाय त्याविरूध्द वेळोवेळी आवाज ऊठवणे. - महाराष्ट्र हिताची कामे करणे. -मराठी माणूस अन्वय नाईक ह्यांच्या आत्महत्येची चौकशी करून दोषीला अटक करणे. अजुन अनेक
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 01/20/2021 - 05:15 नवीन
ही सरकार ची कामे आहेत? (कामणा) वाचता काय रोज?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/20/2021 - 05:28 नवीन
वरील कामात अजून एक कामात अ‍ॅड करा त्या अर्णव गोस्मावीची ट्याव ट्याव बंद केली. किती तो आक्रस्ताळपणा. सध्या त्याचा आवाज म्यूट झाला एक चांगलं काम झालं टीआरपी घोटाळा मला वाटतं, ही नवी माहिती जनतेला मिळाली. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/20/2021 - 05:38 नवीन
राऊतची बेताल ट्याव ट्याव प्रचंड वाढली, हे अजून एक काम अ‍ॅड करा.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 01/20/2021 - 06:24 नवीन
राऊत आणि अर्णब हे एकाच माळेचे मणी आहेत, दोघांचीही ट्याव ट्याव बंद झाली तर अतिउत्तम होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/20/2021 - 05:16 नवीन
१) मा.सैनिक, विधवा, यांच्यासाठी घरपट्टी माफ २) शिवभोजन थाळी रुपये पाच ३) शेतक-यांना आठतास वीज मिळावी यासाठी कृषीपंप जोडणे.४) धानउत्पादकांना सातशे रुपये क्विंटल प्रोत्साहन योजना ५) सिंधुदुर्गात पाचशे खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय ६) नोव्हेंबरापासून कापूस खरेदी केंद्र सुरु .. ७) हेक्टरी शेतक-यांना आर्थिक मदत. असे बरेच कामं आहेत. बाकीचे सर्व घेतलेले निर्णय इथे आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा