आहारशास्त्रातील काही प्रश्न
आहारशास्त्रातील काही प्रश्न
मागेही intermittant फास्टिंग च्या धाग्यावर विचारले होते पण उत्तर न मिळाल्याने नवीन धागा
काही प्रश्न मांडतीये कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे हि विनंती
तसेच बाकीच्यांनी हि काही प्रश्न असल्यास मांडावे धन्यवाद
१. सध्या कोलेस्टेरॉल ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् ह्याबद्दल फार सगळीकडे चर्चा चालू असते ह्या तेलात जास्त ह्या तेलात कमी वगैरे
तुपाची फोडणी वापरल्याने जास्त फायदा होऊ शकतो का ?
कारण बरयाचदा आपण पदार्थांवर तूप वाढून घेतो त्याने तेल तूप हे दुप्पट पोटात जाते असे वाटते तर तुपाच्या फोडणीत पदार्थ केले तर तेल वापरायचे टाळून
तुपाचा आरोग्याला जास्त फायदा होईल का ?(साजूक किंवा गाईचे. म्हशीचे तूप अपेक्षित नाहीये तसेच विकत मिळणारे तूप किती शुद्ध असते कोण जाणे)
(ज्याला परवडेल त्याने)
२. दलिया हे धान्य गव्हांपासूनच बनलेले असते तर मुगाच्या डाळीची खिचडी करताना डाळ तांदुळाची पचायला हलकी का दलिया मुगाची हलकी होईल?
नेटवर बऱ्याच ठिकाणी दलिया तांदुळाला substitute वापरा असे सल्ले दिले आहेत पण माझ्या पूर्वीच्या जिम च्या मॅडमचे म्हणणे होते कि दलिया पौष्टिक असतो त्यामुळे वजन वाढायचे chances. तर दलिया वापरावा कि साधा तांदूळ ?(सध्या तांदळाच्या भाताने/खिचडीने जी पोट भरल्याची फीलिंग येते ती दलियाने येत नाही).
आधुनिक मताने भाताने वजन वाढते तर आयुर्वेदाप्रमाणे तांदूळ पचायला हलका आहे तर ह्यातले काय ग्राह्य मानावे ?
३. तांदूळ/साबुदाणा इ. भाजून घेतले तर त्यातल्या calories कमी होतील का?
४. विरुद्ध पदार्थ दही-गूळ,दही-फळे खाऊ नयेत असे आयुर्वेदाचे मत आहे पण आपण फ्रुट सलाड आणि शेव पुरी दही पुरी आवडीने खातो त्यात हे विरुद्ध पदार्थ एकत्र केलेले असतात (spdp त दही आणि चिंचेचे पाणी-त्यात गूळ असतो) असे अनेक विरुद्ध पदार्थ एकत्र केलेले आढळतील तर त्यात इतर घटकांमुळे (मीठ, चाट मसाला ,शेव ,साखर ) त्याची हानीकारकता कमी होते का?
५. आंबवलेले पदार्थ प्रोटीन च्या दृष्टीने चांगले (आणि बौद्धिक कामात पण -परीक्षेच्या काळात आम्हाला आमच्या शास्त्राच्या शिक्षिका fermented फूड खा असे सांगायच्या अनेकवेळा ) असे आधुनिक आहारशास्त्र सांगते पण आयुर्वेदात आंबवलेल्या पदार्थांना विरोध आढळून येतो असे का ?
उदा. इडली,दही
६. हळदी चे दूध बनवताना अनेक ठिकाणी ते चहासारखे बनवायला सांगतात (दूध गरम करायला ठेवलेले असतानांच त्यात हळद घालून थोडे उकळवायचे)आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपण ते कपात/ग्लासात हळद घालून घेतो
ह्यातले जास्त effective कुठले?
आभार आणि धन्यवाद
🗣 चर्चा
(61)
क
कंजूस
Sun, 05/17/2020 - 03:20
नवीन
शरीरातले पोटाचे अवयव तोंडातून चमचमीत म्हणून ढकलेल्या अन्नपदार्थांकडे फक्त अन्न म्हणून पाहात असते. म्हणजे त्यात हवे असलेले पोषणमूल्य आता किती गरजेचे आहे ते.
यापलिकडे आम्हाला आवडते आणि परवडते म्हणून खातो त्यास काही अर्थ नाही ते नंतर लक्षात येते.
पंधरा रु किलोचा तांदूळ आणि अडिचशे रु किलोच्या तांदूळात पोषणमुल्य तेवढेच असते. पण हातसडीचा आणि कोंडा न काढलेल्या तांदुळात जीवनसत्त्वे अधिक असतात. पण आता तो मिळत नाही. मैद्याचेही तेच.
कित्येक बाळांच्या नशीबाय लहानपणी भरपूर सकस अन्न खाण्याचे नशीबात असते. मोठेपणी तीच मुले अन्नाचा चौकसपणा करताना दिसतात.शरीराची वाढ होण्याच्या वयात (१८)चांगले अन्न पोटात गेल्याने नंतर माफक अन्नाची गरज असते.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 05/17/2020 - 06:20
नवीन
तेल व तुपामध्ये जी fatty acids (FA) असतात ती ३ प्रकारची असतात:
१. SFA = सफा
२. MUFA = मुफा
३. PUFA = पुफा
पोषणासाठी सुयोग्य गरज म्हणजे, वरील तिन्ही घटक आहारात १:१:१ अशा समप्रमाणात असावेत.
तुपात ‘सफा’चे प्रमाण बरेच जास्त असते याउलट तेलात मुफा व पुफाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तेल व तूप हे दोन्ही आहारात असावेत. त्याचा समतोल असा साधता येईल :
१. ज्या जेवणात तेलाच्या फोडणीचा पदार्थ असेल, तेव्हा पानात वरून तूप घ्यायचे नाही.
२. जेव्हा तेलयुक्त पदार्थ खाण्यात नसेल, त्यावेळी चमचाभर तूप खायचे.
मी असेच करतो.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 05/17/2020 - 06:54
नवीन
सोयाबीन ,सन्फ्लावर, राईस ब्रान ,वनस्पती तूप व साजुक तूप या पाचाचा मेळ घालून आहार.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 05/17/2020 - 08:30
नवीन
मी जाणकार नाही मात्र स्वानुभवातून काही प्रश्नांची उत्तरे देऊ इच्छितो. ही सगळ्यांना तशीच्या तशी लागू होतील असे नाही. कोणताही पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरावर काय परीणाम होतो ह्याचे ज्याने त्याने निरीक्षण करावे. सध्या करोनामुळे सगळेजण घरात बसले आहेत. खरे तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विविध प्रयोग करायला आपल्याला धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही. निसर्गाने आपल्याला तो वेळ दिला होता मात्र बहुसंख्य जनतेने तो टाईमपास करुन फुकट घालवला. असो ! '
सगळ्यात पहिले आपली दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. खरे तर आपला दिवस रात्रीपासून सुरु होतो. आपण रात्री उशीरात उशीरा १०.३० पर्यंत झोपायला जाणे आवश्यक आहे. मात्र बरेचशी जनता रात्री १२-१ पर्यंत जागून काहीना काही मनोरंजन करण्यात गुंतलेली असते हे सर्वथा चूक आहे. हे माझ्या घरात देखील चालू आहे. मी घरातल्यांना एक सूचना केली आहे. ती म्हणजे तुम्हाला जर मनोरंजनासाठी दिवस पुरत नसेल तर आज रात्री १०.३० ला झोपा. हवे तर तुम्हाला दुसर्या दिवशी सकाळी ५ वाजता उठवतो. तुम्ही सगळे काम आवरुन लवकर मनोरंजन करायला बसा.
माझ्या स्वत:च्या बाबतीत मला तेलापेक्षा तुपाचा जास्त फायदा झालेला आढळला आहे. बरेच लोक जाहीरातीला भूलून महागडी तेले खरेदी करतात. मात्र त्यात फारसा अर्थ नाही. ९० रुपयावाले सुर्यफुलाचे तेल आणि १५० रुपयावाले तेल यात गुणात्मक फरक आढळत नाही. चपातीमधून बरेचसे तेल आपल्या शरीरात जात असते. काही डाळी / भाज्यांना तुपाची फोडणी देऊन त्यांचा आहारात समावेश करुन बघा. सुर्यफूल, शेंगदाणा तेल, राईस ब्रान अशी वेगवेगळी तेल वापरुन पहा. मात्र ती एकत्र करुन वापरु नका. समजा तुम्हाला एक लीटर तेलाची पिशवी आठ दिवस जाते तर एकदा सुर्यफूल, एकदा राईस ब्रान असे वापरत चला.
आपल्या रोजच्या आहारात गहू मोठ्या प्रमाणात शरीरात जात असतात मात्र आपण घरात जी नेहमीची डाळ बनवतो त्यात पाणी जास्त असते त्यामुळे अधून मधून मुगाच्या डाळीची खिचडी जास्त चांगली आहे. ही खिचडी बनविताना डाळिचे प्रमाण जास्त आणि भाताचे प्रमाण कमी असावे.
तांदूळाने वजन वाढते की नाही ह्याचा अनुभव नाही मात्र रक्तशर्करा नक्कीच वाढते. भात बनविण्याची योग्य पद्धत म्हणजे तो कुकर मधे न शिजविता जुन्या पद्धतीप्रमाणे आचेवर शिजवावा. थोडा शिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे. या पद्धतीने बनविलेला भात आरोग्यास चांगला आहे. रक्तशर्करा जास्त प्रमाणात वाढत नाही. वर कंजूस साहेबांनी तांदूळाबाबत केलेले विधान अगदी सत्य आहे. त्यामुळे महागडा तांदूळ म्हणजे भारी असे अजिबात समजू नये. उलट मी आहाराचे प्रयोग करायला लागल्यापासून जितका स्वस्तातला तांदूळ (अगदी रेशनवाला) पण खायला शिकलो आहे. प्रयोगाचा एक भाग म्हणून तांबडा तांदूळ वगैरे पण खाऊन पाहिला मात्र जे प्रयोगशाळेत सिद्ध होते ते आपल्या शरीरात सिद्ध होतेच असे नाही. त्यामुळे तांदूळ कोणताही खा मात्र तो कुकर मधे बनविलेला नसावा हे जास्त बरोबर आहे.
अनुभव नाही.
कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला तर आरोग्यास वाईटच. आंबविलेले पदार्थ त्याला अपवाद नाहीत. मात्र आठवड्यातून एकदा आंबविलेले पदार्थ खाणे योग्य आहे. मात्र त्याच्या रतीब लाऊ नका.
शेवपुरीत किती आरोग्यदायी पदार्थ असतात त्याचा स्वत:च ताळेबंद मांडून तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता. बाहेरचे खाणे आरोग्यदायी असेलच असे नाही. फळे आणि भाज्या त्या त्या मोसमात मिळणार्या खाव्यात. एकापेक्षा जास्त प्रकारची फळे एकत्र करुन खाऊ नये. प्रत्येक फळाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. ते एकत्र करुन खाल्यामुळे सगळ्यांचा फायदा मिळत नाही. मात्र सगळ्यांचे तोटे जरुर मिळतात.
दूध गरम करुन मग त्यात नंतर हळद घालून पिणे जास्त संयुक्तिक आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर चरणे सोडा. तुम्हाला जे काही खायचे ते दिवसातून २-३ वेळा (त्यापेक्षा जास्त वेळा नाही) खाल्ले तर त्याचे जास्त फायदे होतात. दर २-२ तासांनी काही ना काही खाणे म्हणजे अनारोग्याला निमंत्रण देणे आहे.
अधूनमधून उपवास करणे चांगलेच मात्र त्यापेक्षा जमत असेल तर साखर आणि साखरेचे पदार्थ सोडा / कमीत कमी खा.
तुमच्या आयुष्यातील आरोग्यविषयक चिंता कमीतकमी ५०% तरी आपोआपच संपून जातील. साखर प्राणापेक्षा प्रिय असेल तर बाकी काहीही केले तरी घुम फिर के तिथेच याल.
धन्यवाद !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/17/2020 - 10:11
नवीन
प्र. १ कुमार यांचे मत ते जाणकार असल्याने अवश्यंभावी सयुक्तीक .
प्र. २ ज्यांच्या आहारात गहु आहेत त्यांनी तांदळाची खिचडी बदल म्हणून स्विकारावी हा पॉईंट बरोबर वाटतो.
प्र. ३ भाजण्याच्या प्रक्रीयेत पाण्याचे प्रमाणे तात्पुरते कमी होईल , फारतर अधिक किंवा कमी शिजणे असे काही होईल पण कॅलरीज मध्ये फरक पडण्याचे कारण वाटत नाही. अर्थात अन्न विषयक प्रयोगशाळेतील तज्ञांची मते काही वेगळी असल्यास कल्पना नाही पण तज्ञांची मते उपलब्ध नसताना कॅलरीज तेवढ्याच राहतील असे समजून चालणे कॅलरी विषयक निर्णय घेताना अधिक सयुक्तीक असेल असे माझे व्यक्तीगत मत.
प्र. ६ हलक्या गरम दुधात (९५ डिग्री पर्यंत गरम केलेल्या दुधात) उकळात ठेवलेल्या दुधापेक्षा ब१२ जिवनसत्व अधिक टिकून असेल.
अर्थात हळद अधिक काळ उकळत ठेवल्यास रासायनिक प्रक्रीयांचे नेमके स्वरुप काय असेल आणि वैज्ञानिक पद्धतीने जसे अॅलोपॅथीत औषधांचा अभ्यास जसा तावून सुलाखून होतो तसा दुर्दैवाने ट्रॅडीशनल पॅथीत होत नाही ही अल्टरनेटीव्ह मेडीसिन मधली उणीव भरुन काढली जाण्यास फार मोठा वाव असावा.
अर्थात हळदीचे स्रोत आणि स्थिती जिवाणू वीषाणूंबाबत खात्रीची नसेल तर जरासे उकळून घेणे अधिक सुरक्षीत असावे असा कयास ( चुभूदेघे)
प्र. ४ प्र. ५ एखाद्या खूप अनुभवी पण भोंगळ व्यक्तीची कल्पना करा मग आयुर्वेदाची कल्पना करा. आयुर्वेदाकडे अनुभव असला तरी आयुर्वेद स्वतच्या अनुभवांचा पुरेशा वैज्ञानिक अभ्यासूपद्धतीने शास्त्रीयपद्धतीने निरीक्षणे करण्यात अॅलोपॅथी आणि एकुणच आधुनिक विज्ञानाच्या हकनाक मागे पडते. हकनाक यासाठी की आमचा असा विश्वास आहे या दुराग्रहावरील आणि पुस्तक आणि पोपटपंची पुजेवरील भर.
आंबवण्याच्या प्रक्रीयांच्या परिणामी अॅसिडीक प्रमाणाचा आधुनिक आहारशास्त्राच्या अनुषंगाने विचार करण्यास आणि व्यक्तीपरत्वे नियोजन करण्यास हरकत नसावी पण केवळ आंबवण्याच्या काही प्रक्रीयात बॅक्टेरीया असतात म्हणून आंबलेले पदार्थ नाकारणे सयुक्तीक नसावे. जर इडली दोसादी पदार्थ भरपूर सांबार सोबत खाल्ले तर त्यात प्रोटीन्सचा अंश अधिक जातो आणि आंबवलेला पदार्थ-अंश कमीच असेल .
आयुर्वेदीय थंड गरम आणि तथाकथीत विरोधी पदार्थ हा तद्दन आधारहीन भोंगळपणा वाटतो. आयुर्वेदाने अॅलर्जी हा प्रकाराचे प्रभाव कधी नीटसे विचारात घेतले असतील या बाबत साशंकता वाटते. बरेचसे आयुर्वेदीय आणि भारतीय आहार विषयक टाबू मूलतः कुणालातरी अॅलर्जी झाली किंवा व्यक्तीगत आवडी निवडीला व्यक्तीगत वाटू नये म्हणून खोटे नाटे कारण जोडायचे आणि एकाने घातलेली भिती दुसर्याने पुढे न्यायची त्याची कधी तरी आयुर्वेदाने दखल घेऊन त्याचीच री ओढत रहायचे. आयुर्वेदाच्या अनुभवाबद्दल आदर ठेऊन प्रामाणिक प्रयत्नांबद्दलची साशंकता कमी होत नाही. नाही तर आता पर्यंत आयुर्वेद नाही आमच्या १०० समजुतींपैकी अमुक अमुक ४ समजूती चुकीच्या होत्या त्या आम्ही सुधारल्या म्हणून पुढे आले असते. तसे होत असल्यास किमान एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझ्या पर्यंत आलेले नाही.
आयुर्वेदाचार्यांनी नकार घंटा वाजवलेली बरीच थंड-गरम पित्त-कफ कारक तथाकथीत विरोधी बरेच पदार्थ मी बिन दिक्कत खात आलो आहे. माझ्यापुढे वैज्ञानिक प्रयोगाधारीत अभ्यास आल्यास मी ते स्विकारेन अन्यथा नाही. (मी आयुर्वेद आणि घरगुती औषधींना पुर्ण त्याज्य मानतो असे नाही. मला ज्या औषधींचा लाभ झाला आहे त्या वापरत असतो अर्थात इतर पथ्यपाण्यासाठी अॅलोपॅथीला त्याच्या प्रयोगशीलतेतील अधिक प्रामाणिकपणामुळे अधिक प्रमाण मानतो असो.
(चुभूदेघे. मी विषय जाणकार नाही उत्तरदायीत्वास नकार लागू)
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 05/17/2020 - 10:58
नवीन
ह्या विधानाशी असहमत आहे. माझ्या मुलाच्या आजारात मी अनेक अॅलोपॅथीक डॉक्टरांचे उपचार घेतले मात्र त्याने फरक पडला नाही. मात्र एका आयुर्वेदीक डॉक्टरांनी त्याच्या अॅलर्जीचे नेमके निदान केले व त्याप्रमाणे आहार सुचविला. यामुळे आज त्याला होणारा त्रास कित्येकपटीने आवाक्यात आला आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 05/17/2020 - 11:59
नवीन
साबजी, मॉडर्न मेडिसीन (डॉ. कुमारांनी सुचवलेला शब्द, ह्या शब्दाचा इतर पॅथी मिसयूज करणार नाहीत याची अजून शाश्वती वाटत नाही.)
तर साबजी, मॉडर्न मेडिसीन टेस्ट लॅबकडे ब्लड सँपल घेऊन नेमक्या अॅलर्जी कन्फर्म करु शकते. अँटी अॅलर्जी मेडीकेशन पुरवते -जे सुस्पष्ट शास्त्रीय प्रायोगिक चाचण्यातून बाहेर पडते आणि साईड इफेक्ट असतील तर सांगण्याची प्रामाणिकता दाखवते.
जुन्या काळात एखाद्या व्यक्तीला डायबेटीस आहे तर कळण्याचा मार्ग नव्हता. त्याने अंब्याचा रस आणि अती गोड खाऊन आजारी पडला पण ते वैद्याला कळलेच नाही तर तो त्या दिवशी खाल्लेली कार्ल्याची भाजी बाधली असा चुकीचा निष्कर्ष बांधू शकत होता (कारली गृहीत उदाहरण म्हणून). साखर अंब्याचा रस असो अथवा मध वा कारली प्रत्येक पदार्थ हजार लोकांना देऊन पाहीला आणि हजार लोकांना दिला नाही आणि मग त्यांच्या नोंदी घेतल्या या शास्त्रीय पद्धतीचा अभाव होता आहे. मध चांगला म्हणजे चांगला त्याला ब्लडशुगर लेव्हल काय पण असली तरी चांगलाच हा आंधळा व्यवहार झाला. आणि असे बरेच आयुर्वेदातील असे बरेच व्यवहार अद्यापी आंधळे आणि अथवा भोंगळ आहेत.
विरोधी पदार्थ काय असते? मी सर्व तथाकथीत विरोधी पदार्थांची मिश्रणे खातो आणि ठणठणीत असतो. आहारा मध्ये असंख्य प्रक्रीया आणि मिश्रणे होत असतात, त्यांचा आधूनिक रसायनशास्त्र आणि आहारशास्त्रीय कितपत अभ्यास आयुर्वेदाने पार पाडला आहे आपल्या पुर्वीच्या गृहीतकातल्या किती उणीवा आता पर्यंत मोकळेपणाने स्विकारल्या आहेत? दोन चार न झेपलेल्यांचा अनुभव घेऊन अथवा चुकीचा निष्कर्ष जोडून त्याला प्रमाणभूत मानून मार्गदर्शन ही काही आदर्श व्य्वस्था नव्हे किंवा कसे .
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 05/17/2020 - 12:30
नवीन
मला वाटते हे अॅलोपॅथी च्या डॉक्टरांनी सुचवायला हवे होते. मी गेलेल्या सगळ्याच्या सगळ्या डॉक्टरांनी केवळ तात्पुरता दिलासा मिळेल अशीच औषधे दिली. मात्र मुळापर्यंत जाण्याची कोणतीही तसदी घेतली नाही किंवा काय खाऊ नये हे देखील सुचविले नाही. मी हा निर्णय आंतरजालावर सल्ला / माहिती घेऊन करावा असे माझ्या मनात आले नाही. दर पंधरा दिवसांनी डॉ़क्टरांची फी आणि दर आठवड्याला वेगवेगळी औषधे घेऊन मुलगा कंटाळला होता. त्यामुळेच मी आयुर्वेदाचा मार्ग धरला. मी ज्या आयुर्वेदीक डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगीतले की आयुर्वेदातली सुचविलेली औषधे ही तुमची व्याधी बळावू नयेत म्हणून आहेत. मात्र तुम्हाला मुळातून बरे व्हायचे असेल तर तुम्ही तुमचा आहार विहार नीट ठेवलाच पाहिजे. हे तत्त्व मला मनापासून पटले आणि ते जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा माझा प्रयत्न असतो.
अर्थात आयुर्वेद ग्रेट आणि अॅलोपॅथी वाईट असा माझा दृष्टीकोन नाही.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 05/17/2020 - 11:13
नवीन
या धाग्याच्या निमित्ताने सर्वांना एक विनंती, की 'allopathy' हा कालबाह्य आणि अशास्त्रीय शब्द न वापरता त्याला 'आधुनिक वैद्यक '(Modern Medicine) च म्हणावे .
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/17/2020 - 11:18
नवीन
१. भूक लागल्याशिवाय काहीही खाऊ नका
२. भूक लागली का हे घडयाळाकडे पाहून ठरवू नका. खरी भूक तुम्हाला जेवणाशिवाय काहीही सुचू देणार नाही.
३. दिवसात एकदाच जेवायची गरज आहे.
४. सकाळी भूक लागली तर आवडेल तो ब्रेकफस्ट करा.
५. अन्नपदार्थांचं विश्लेषण > कॅलरीज, प्रोटीन्स, कोलॅस्टरॉल .... आणि कायकाय, अजिबात करु नका. माणूस सोडता कोणताही सजीव ते करत नाही.
कायम चवीनं आणि स्वादानं खा, त्यामुळे तृप्ती येईल आणि ते शरीराला श्रेयस होईल.
६. गेल्या कित्येक वर्षांचा हा अनुभव आहे.
७. उत्साह हा फिटनेसचा खरा क्रायटेरिया आहे आणि वय न जाणवणं हे शरीरस्वास्थाचं लक्षण आहे.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
Wed, 05/20/2020 - 11:39
नवीन
या उत्साहाचे करायचे काय ? मला उत्साहच नियंत्रण जमत नाही मग मी काय करावे ?
मी स्वतः फक्त एकवेळ आहार घेणे सुरू केले व मला अत्यंत फायदा झाला आता संध्याकाळी भूकच लागत नाही खाल्ले तर शरीराची सहजता कमी होते की काय असा अनुभव येतो पण तो मूळ प्रश्न नाही उत्साह टिकवून करायचे काय ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 05/20/2020 - 16:41
नवीन
उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे सतत काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या चांगल्या वाटलेल्या गोष्टींना मनःपूर्वक दाद द्या, हाच वृक्षासारखं बहरत जाण्याचा मार्ग आहे. इंटेलीजन्स आणि अॅस्थेटिक्स हे दोन जीवनाचे महत्तम पैलू आहेत.
स्वतःच्या कामात माहिरीयत हासिल करा, मग इतर गोष्टींसाठी फुर्सत उरते. आपल्या कामावर आपलं निःसिम प्रेम हवं. दिवसेंदिवस आपलं काम जास्त कौशल्यपूर्ण, सोपं आणि कमालीचं इफेक्टीव होत गेलं पाहिजे. उदा. सध्या मी बँकांचं रिमोट अॅक्सेस ऑडिट करतोयं. हजारो कोटींच्या व्यावहारातून नेमके व्यावहार निवडून, त्यांची छाननी करुन, ब्रांचच्या बॅलन्सशीट आणि पी अँड एलची वैधता ठरवायची. एकदम जबरदस्त काम आहे आणि कमालीची मजा येतेयं.
आणि वरचं सगळं चालू असतांना इथे एकसोएक आणि हटके विचार मांडायचे आणि पराकोटीच्या विरोधासमोर आपली चमक बर्करार ठेवायची. अर्थात, हे काल तुम्हाला करोनाचे साइड इफेक्टसवर लक्षात आलंच असेल !
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
Wed, 05/20/2020 - 16:55
नवीन
इतकं नवनविन करून झालंय किती आता all knowledge is related या तथ्यावर पोचलो आहे त्यामुळे learning curve उरला आहे का असा भ्रम तयार होतो
मला एकतर्फीपणा पटत नाही मी सम्यकता जोपासना करतो वस्तुतः एखादी गोष्ट चांगली असेल तर मनमोकळी तारीफही करतो व पटली नसेल तर यथेच्छ शिव्या ही घालतो , पण लोकांना फक्त शिव्याच पोचतात की काय असा doubt येतो हो चांगलं बोलेल्याची हमखास माती केली जाते की काय कळत नाही
तुम्ही हे करत असाल तर सध्या मी तुमच्या सारख्याना बेरोजगार बनवायचे काम करत आहे म्हटलं तर अतिशयोक्ती नाही एका मोठ्या JSON वर प्रोसेस करून लाखो रुपयांचे नियोजन कसे करायचे व कस्टरमर प्रोफाइल बघून त्याला रिलेटेड स्कीम सजेस्ट करायच्या असेच काहीसे कामाचे स्वरूप असलेला AI नुकताच तयार केला आणी ते काम करताना बघून मस्तही वाटत आहे तरी हा उत्साह काय माझा कमी होत नाही शेवटी वाढत जाऊन तो अति बनतो हो :(
मीही काहीसे असेच करतो हो पण तुम्हाला हे मी सांगूनही लक्षात येईल का याची खात्री नाही...
उत्साह मावळतच नाही
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Wed, 05/20/2020 - 20:56
नवीन
याची चिंता कशापायी ? उत्साह तर कायम राहणारच. तो वापरायचा कसा हा प्रश्न आहे.
>इतकं नवनविन करून झालंय किती आता all knowledge is related या तथ्यावर पोचलो आहे त्यामुळे learning curve उरला आहे का असा भ्रम तयार होतो
अर्थात, ऑल नॉलेज इज इंटरलिटेड पण तो अस्तित्वाच्या स्ट्रक्चरींगचा गाभा आहे. तुम्ही संगीतचा अभ्यास करतांना अॅस्थेटिक्स येणारच. स्पोर्टस अॅक्टीविटीशी योगासनं, अलर्टनेस, प्राणायाम संगतीत आहेतच. त्यामुळे शिकण्याची उमेद वाढायला हवी. लर्नींग कर्व उतरणं असंभव आहे.
> मला एकतर्फीपणा पटत नाही मी सम्यकता जोपासना करतो वस्तुतः एखादी गोष्ट चांगली असेल तर मनमोकळी तारीफही करतो व पटली नसेल तर यथेच्छ शिव्या ही घालतो , पण लोकांना फक्त शिव्याच पोचतात की काय असा doubt येतो हो चांगलं बोलेल्याची हमखास माती केली जाते की काय कळत नाही
चांगल्या गोष्टींना दाद दिली तर ती दुसर्यापर्यंत पोहोचायलाच हवी कारण जाणीव एकसंध आहे. शिव्या घालण्यातून मात्र बखेडाच उद्भवतो, ते टाळायला हवं.
> तुम्ही हे करत असाल तर सध्या मी तुमच्या सारख्याना बेरोजगार बनवायचे काम करत आहे म्हटलं तर अतिशयोक्ती नाही.
मी सीए आहे आणि आम्हाला बेरोजगार करायला जगातली पैसा ही संकल्पना संपुष्टात यायला हवी. त्यामुळे तुम्ही तुमचा प्रोजेक्ट आनंदानं करत रहा.
> मीही काहीसे असेच करतो हो पण तुम्हाला हे मी सांगूनही लक्षात येईल का याची खात्री नाही.
तुमचं लेखन तुम्ही नक्की काय करता याची साक्ष असतं, तस्मात तुमच्या स्वतंत्र लेखनावरुन त्याची खात्री पटेलच > सुरु करा.
> उत्साह मावळतच नाही
जीवनातला सर्वोच्च आणि कमालीच्या हुशार व्यक्तीचा अल्टिमेट पर्याय अध्यात्म आहे. एकदा त्यात प्रवेश केला की प्रत्येक उत्साहाचं उधाण स्वरुपाचं नवं दालन उघडतं > इच्छा असेल तर ओशोंच्या " बुक ऑफ सिक्रेटस " या महान ग्रंथापासून सुरुवात करा.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 07:19
नवीन
कमी उत्साही लोकांना आपण म्हणता ते 200% लागू पडते माझा उत्साह जास्त आहे
शिव्या घालण्यातून न्हवे तर मिळालेल्या शिव्या स्वीकारायच्या कशा याचे अज्ञान असल्याने बखेडे तयार होतात, शिव्या काय मनातल्या मनातही दिल्या जातीलच व पण अशावेळी अंतर्विरोध तयार होईल व जग ही बाब अत्यन्त उथळ बनेल
तुम्ही MA जरी असला तरी पैसा ही संकल्पना बदलत आहेच व तंत्रज्ञानही कमालीचे सुधारत आहे त्यामुळे CA ऑडिट AI सारखी निर्जीव गोष्ट लीलया करू शकते हे आज ना उद्या जगाला स्वीकारावे लागेलच. राहिला प्रश्न तुम्हाला हेच समजावण्याचा तर एक काम करा तुम्ही जे काही काम करत होता असे वर चर्चेत लिहले आहे ते एका सेपरेट धाग्यावर विस्तृतपणे लिहा तिथेच मी तेच काम करणारा AI जो मी उत्साहाच्या भरात स्वतः तयार करेन तो ही प्रदर्शित करेन... म्हणजे आपणास नक्की समजेल की मानवी बुद्धी कितीतरी फडतूस बाबी इंटेलिजन्स म्हणून पकडून असते ते पण खरा इंटेलिजन्स ज्याला म्हणावे त्याची चुणूकही बहुतांश लोक अनुभवत नाहीत
चूक तुमचे लेखन तुमचे कल्पनाविश्व काय आहे याची चुणूक असते तुम्ही काय आहात ते तुम्ही इतरांच्या लेखनाला मताला सामोरे कसे जाता यावर ठरते
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 16:56
नवीन
> कमी उत्साही लोकांना आपण म्हणता ते 200% लागू पडते माझा उत्साह जास्त आहे
उत्साहामुळे तुमच्या जीवनात नक्की काय प्रश्न येतायंत ?
> शिव्या घालण्यातून न्हवे तर मिळालेल्या शिव्या स्वीकारायच्या कशा याचे अज्ञान असल्याने बखेडे तयार होतात.
> समाजात रहायचं असेल तर शिव्या न देता बोलण्याची सवय ही सभ्यता आहे.
> CA ऑडिट AI सारखी निर्जीव गोष्ट लीलया करू शकते हे आज ना उद्या जगाला स्वीकारावे लागेलच
तुमच्या प्रणालीला सीएची परिक्षा उत्तीर्ण व्हायला लागेल > करा प्रयत्न
> चूक तुमचे लेखन तुमचे कल्पनाविश्व काय आहे याची चुणूक असते तुम्ही काय आहात ते तुम्ही इतरांच्या लेखनाला मताला सामोरे कसे जाता यावर ठरते
तुमच्या इथल्या प्रोफाईलवरुन त्याची झलक मिळते.
इतरांच्या विरोधी मतांविरुद्ध तुम्ही किती सभ्यतेनं प्रतिवाद करता यावरुन व्यक्तिमत्त्वाची घडण कळते आणि तुमच्या लेखनावरुन तुमच्या व्यासंगाची झलक मिळते. अर्थात, व्यक्ती तद्दन असेल आणि लेखनातून सुद्धा केवळ कल्पनेच्या भरार्याच मारत असेल तर विमान कोसळायला फारसा अवधी लागत नाही.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 17:17
नवीन
तुमच्या लिखाणावरून तुमच्या व्यक्तिमत्व बाबत टीचकिभरही माहीती कळत नाही हे दुर्दैव. आणी फुका खुमारी, कैफ आशा हिंदी व उर्दू व इतर अनेक भाषेतील उधार शब्द वापरणे याला कोणी व्यासंग म्हणनार नाही.
हेच हेच ते शेपूट वळवणे... परीक्षा सोडा तुम्ही काय करत होता ते स्पष्ट करा माझी प्रणाली ते काम करेल हे आव्हान स्वीकारता का ते बोला ? परीक्षा एक कायदेशीर बाब आहे ती औपचारिकता केंव्हाही पूर्ण करू कौशल्य विकसित आहे हे सिद्ध केले तर आहे तयारी ?
समाजात रहायचे असेल तर शिव्या खायची वेळ येऊ न देणे अशी वर्तणूक असणे जास्त म्हत्वाचे आहे अन्यथा शिव्या तर खाव्या लागणारच
रामाची सीता कोण हे सांगू म्हणता ? ठीक आहे माझे लिखाण परत वाचा तरीही शंका उरली तर निर्सनाला मी आहेच काळजी नको
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 17:40
नवीन
> तुमच्या लिखाणावरून तुमच्या व्यक्तिमत्व बाबत टीचकिभरही माहीती कळत नाही
हा तुमचा दृष्टीकोन आहे पण तुमच्या प्रोफाईलवरुन ती मिळते.
> परीक्षा सोडा तुम्ही काय करत होता ते स्पष्ट करा माझी प्रणाली ते काम करेल
प्रणाली विकसित करणार्याला ज्या क्षेत्रात ती प्रणाली काम करणार त्याचं ज्ञान असणं ही सुरुवात आहे. ऑडीट ही फार पुढची गोष्ट आहे. तुम्ही बँकिंगमधे काय प्रणाली विकसित केल्यात ते सांगा त्यावरुन तुम्हाला बँकिंग व्यावहाराची कितपत कल्पना आहे ते समजेल.
> समाजात रहायचे असेल तर शिव्या खायची वेळ येऊ न देणे अशी वर्तणूक असणे जास्त म्हत्वाचे
ते उघड आहे पण तुम्ही शिव्या घालता ती सभ्यता नाही.
> माझे लिखाण परत वाचा तरीही शंका उरली तर निर्सनाला मी आहेच काळजी नको
प्रश्न तुम्हाला आहे, मला नाही.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 17:49
नवीन
विचारला तुम्ही ना ? मग प्रश्न मला कसा ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 17:58
नवीन
> या उत्साहाचे करायचे काय ? मला उत्साहच नियंत्रण जमत नाही मग मी काय करावे ?
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:08
नवीन
उत्साहामुळे तुमच्या जीवनात नक्की काय प्रश्न येतायंत ?
हा प्रश्न तुम्ही विचारला आहे...
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:15
नवीन
> या उत्साहाचे करायचे काय ? मला उत्साहच नियंत्रण जमत नाही मग मी काय करावे ?
प्रतिप्रश्न आहे.
सुरुवात तुमच्या त्याच प्रश्नानं झाली आहे.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:26
नवीन
इतर निर्माण झालेले प्रश्न निरर्थक ठरत नाहीत...
तुमचा प्रश्न निरर्थक असूच शकत नाही
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:43
नवीन
हे असंभव आहे.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:45
नवीन
पण याचा अर्थ तुम्हाला प्रश्न पडत नाहीत असे नाही फक्त तुमची लज्जा तुमच्या आड येते
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 19:05
नवीन
अर्थात एखादा नवा छंद किंवा नवे कौशल्य प्राप्त करतांना मला अजिबात संकोच वाटत नाही.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 19:11
नवीन
तुम्हाला प्रश्नच पडत नाहीत की प्रश्नच समजत नाहित ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 19:22
नवीन
निष्प्रश्न याचा अर्थ ज्याला आपल्या स्वरुपाचा उलगडा झाला आहे.
प्रश्नकर्त्याच्या प्रश्न समजला नाही तर त्याला पुन्हा विचारता येतं.
पण आपण प्रश्न विचारतोयं हे न समजणं गोंधळाचं लक्षण आहे.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 17:54
नवीन
कारण बघून मी शिव्या घालतो विनाकारण नाही हे मी आधीच स्पष्ट केले आहे आणी
असे तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही माझ्या शिव्या द्यायच्या विरोधात आहात की बाजूने हे तुम्हाला समजत नाही असे का मानू नये ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:01
नवीन
हे माझं मत आहे.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:06
नवीन
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:13
नवीन
http://misalpav.com/comment/1067085#comment-1067085
याचे उत्तर तुम्ही द्याल का ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:21
नवीन
Frick >A word commonly used by to express displeasure.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:24
नवीन
इतकाही तुमचा व्यासंग नाही ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:38
नवीन
हे कुठून काढलं ?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:24
नवीन
> पटली नसेल तर यथेच्छ शिव्या ही घालतो , पण लोकांना फक्त शिव्याच पोचतात की काय असा doubt येतो हो चांगलं बोलेल्याची हमखास माती केली जाते की काय कळत नाही
मी त्यावर माझं मत सांगितलंय.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:30
नवीन
आणी तुम्ही स्वतः कथेचे नाव F U दिले आहे व F U म्हणजे काय याचे स्पष्टीकरणही तुम्ही चुकीचे दिलेले आहे
तरिही तुमची दांभिकता सुस्पष्ट होण्यास ही लिंक पुरेशी आहे
http://onlineslangdictionary.com/meaning-definition-of/fu
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:41
नवीन
Frick >A word commonly used by to express displeasure.
तुम्ही तुमचा अर्थ काढतायं
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:43
नवीन
Fu गुगल करा म्हणजे तो का वापरतात ते स्पष्ट होईल आणी इतकेही तुम्हाला अजून माहीत न्हवते तर व्यसंगातील व ही तुमच्या ओळखीचा नाही असे खेदाने कबूल करावे लागेल
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 18:52
नवीन
fever of unknown origin
मी माझा अर्थ सांगितला आहे. तुम्ही दुसरा अर्थ घेतायं हा तुमचा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 18:55
नवीन
आम्हाला चमकोगीरीची तूर्त गरज नाही थांबतो तुम्ही चालू रहा
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/21/2020 - 19:08
नवीन
चमकोगिरी सदस्याच्या प्रोफाईलवरुन कळते.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
गुरुवार, 05/21/2020 - 19:29
नवीन
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Fri, 05/22/2020 - 05:12
नवीन
त्याची अंमलबजावणी करायला या संकेतस्थळाचं मालक व्हायला लागेल.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 05/24/2020 - 05:20
नवीन
उत्साह हा सृजनाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे सतत काही तरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या चांगल्या वाटलेल्या गोष्टींना मनःपूर्वक दाद द्या, हाच वृक्षासारखं बहरत जाण्याचा मार्ग आहे. इंटेलीजन्स आणि अॅस्थेटिक्स हे दोन जीवनाचे महत्तम पैलू आहेत
आता मिपावर प्रथम पुरूषी एकवचनी असं काही ( मी बोटीवर होतो तेंव्हा...... वारा वहात होता या स्टाईल ) लिहिलेले लोकाना भावत नाही असा अनुभव आहे .असे असतानाही आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असे म्हणेन की मी हे प्रत्यक्शात आणले आहे. माझे मते आपल्या इथे ते चित्रगुप्त ,डॉ म्हात्रे व कन्जुष काका यानीही प्रत्यक्शात उतरवले आहे !!!
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/24/2020 - 07:59
नवीन
> लिहिलेले लोकाना भावत नाही
बरोबरे !
कदाचित सतत काही तरी नवं शिकण्याचा सायास करण्यापेक्षा, सांगणार्यावर हल्ला चढवणं हे नाविन्यपूर्ण काम वाटत असावं
> मी बोटीवर होतो तेंव्हा...... वारा वहात होता
हे कर्तव्यपरायणता आणि राष्ट्रभक्ती यांच्या ओघात आल्यामुळे भरपूर वारा वाहू शकतो.
> आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी असे म्हणेन की मी हे प्रत्यक्शात आणले आहे
अभिनंदन !
दुसर्यांना उपयोगी होणारं ठामपणे लिहायला प्रथम पुरूषी एकवचनीच लिहावं लागणार कारण तो व्यक्तिगत अनुभव असतो. निव्वळ माहितीपर लेखनात ते खुबीनं टाळता येतं.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 05/17/2020 - 12:37
नवीन
यावरुन असे दिसते की आपण तरुण किंवा मध्यमवयीन आहात. मात्र असे असेल तर 'आताच जितं मया ! म्हणण्याची गरज नाही. शरीर आणि वेळ कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. आयुष्यभर केलेल्या जेवणाची फळे उतारवयात जरुर मिळतात. तेव्हा थोडे वाट पाहून हे विधान करणे संयुक्तीक ठरेल. मात्र आपण उतार वयात असूनही बिन दिक्कत काहीही खात असाल तर आपले मी अभिनंदन करतो.
- Log in or register to post comments
आ
आंबट चिंच
Wed, 05/20/2020 - 12:33
नवीन
जावु दे मुटके साहेब आयर्नमॅन म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारु आहेत. पण ते खुप उत्साहात आहेत कारण फक्त २० तासात बर्याच ठिकाणी पिंका टाकुन झाल्यात.
- Log in or register to post comments
आ
आयर्नमॅन
Wed, 05/20/2020 - 12:58
नवीन
I take that as compliment.
पण जर मी खरच जुना आहे असे वाटत असेल तर जुने ते सोने म्हणायला हरकत नसावी.
धन्यवाद आंबट चिंच साहेब. बाकी मीसुद्धा आंबट शौकीन असल्याने आपले चाहतेच समजा मला
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sun, 05/17/2020 - 17:35
नवीन
गरोदर स्त्रीला एखादा पदार्थ खाण्याची खुप इच्छा झाली, तर त्या स्त्रीला किंवा वाढणाऱ्या गर्भाला, त्या पदार्थातील पोषक घटकाची किंवा खनिज द्रव्याची गरज असणार , अशी मान्यता आहे.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »