कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर
आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, काश्मीर संदर्भात काही खास होणार आहे असे दिसत होते. ३५अ/३७० रद्दबातल करण्याच्या दृष्टीने आणि/किंवा जम्मूकाश्मीरचे विभाजन केले जाण्याच्या दिशेन पावले उचलली जातील, अश्या अनेक वावड्या उठत होत्या. मात्र, सरकारने या सर्व समस्येच्या मूळावरच घाव घातला आहे... ३७० कलम रद्द झाले की इतर सर्व गोष्टी आपोआप रद्दबातल/अनावश्यक ठरतील. १९४७ पासून भारताचे सर्वात मोठे दुखणे ठरलेल्या समस्येचा हा उपाय, कोणत्याही सरकारने १९४७ पासून आजतागायत केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई व सर्वात मोठे राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन आहे, यात वाद नाही. आता येथून पुढे कोणता घटनाक्रम होईल हे पाहणे मोठे रोचक असेल.
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवानाखु निनसुपारीवाला या गुगली पेश्यालिष्टने ये मारा येक छक्का ! =)) =)) =))उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा...याचा रोख...अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन...इकडे होता. ;) म्हणून गल्ली चूकली. :)उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा...याचा रोख...अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन...इकडे होता. ;) म्हणून गल्ली चूकली. :) ता क : पहिल्या वाक्यात, "उद्या सकाळमध्ये..." असे आहे, "उद्या सकाळी..." असे नाही, इकडेही लक्ष वेधत आहे. ;)काँग्रेसी मंडळींचा तोरा कायदामंत्री रवी शंकर प्रसादांना आणि दुसर्या बाजूच्या इतर कायदे तज्ञांना कायदा आणि राज्य घटनेच्या तरतुदी समजत नसल्याप्रमाणे आहे, त्यातून बाहेर पडणे त्यांच्या स्वतःच्या हिताचे असावे. इति : नाखुआणिकायद्याचा किस पाडण्यासाठी कपिल सिब्बल पासून ते सिंघवी पर्यंत फौज उभी आहेच याचा नक्कीच विचार सद्य सरकारने केला असणार. इति : माहितगारजे खरेच कायदेपंडित नाहीत, अश्या सर्वसामान्य नागरिकांना, निदान वरच्या दोन वाक्यांतील तर्क समजण्याइतकी बुद्धी असते व त्यामुळे ते वरचे गट एकमेकाविरुद्ध कोणते कायद्याचे डावपेच लढवतात, हे पाहण्यासाठी वाट पहातात. फारतर, "असे असू शकेल का?" असे अंदाज बांधतात/प्रश्न करतात आणि किमानपक्षी, स्वतःच्या अंदाजावर आरोपांच्या फैरी झाडत सुटत नाही. पण, हितसंबंध आणि अहंकार यांची गुंतागुंत माणसाला नको नको ते खेळ खेळायला भाग पाडते. :)