कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर
आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, काश्मीर संदर्भात काही खास होणार आहे असे दिसत होते. ३५अ/३७० रद्दबातल करण्याच्या दृष्टीने आणि/किंवा जम्मूकाश्मीरचे विभाजन केले जाण्याच्या दिशेन पावले उचलली जातील, अश्या अनेक वावड्या उठत होत्या. मात्र, सरकारने या सर्व समस्येच्या मूळावरच घाव घातला आहे... ३७० कलम रद्द झाले की इतर सर्व गोष्टी आपोआप रद्दबातल/अनावश्यक ठरतील. १९४७ पासून भारताचे सर्वात मोठे दुखणे ठरलेल्या समस्येचा हा उपाय, कोणत्याही सरकारने १९४७ पासून आजतागायत केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई व सर्वात मोठे राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन आहे, यात वाद नाही. आता येथून पुढे कोणता घटनाक्रम होईल हे पाहणे मोठे रोचक असेल.
कोल्ड ब्लडेड मर्डर हा शब्द उगाच आठवला हे सगळं नीट पद्धतशीर पणे लावून वाचल्यावर... !'तथाकथित' बुद्धीवादी विचारवंतांनी भारतियांचा इतका बुद्धीभेद केला आहे की, त्यांनी आपल्याला आपल्या नकळत, निर्हेतूकपणे पण, स्वतःच्याच गैरसोईचे असलेले चुकीचे शब्द आठवण्याची सवय लावली आहे ! :) मला बाबा खालील शब्द / शब्दयोजना आठवल्या आणि त्या चपखल आहेत असे वाटते... * शठं प्रतिशाठ्य. * भले तरी देऊ कासेची लंगोटी... (संवाद संसदिय भाषेत ठेवण्यासाठी तुकाराम महाराजांनी वापरलेला मूळ शब्दाऐवजी 'कासेची' हा बदली शब्द स्विकारला आहे ;) ) (हघ्या)कदाचित शब्द चुकीचा वापरल्यामुळे विरोध असल्यासारखं जाणवलं असावं! असो.हे "कदाचित", सहजपणे व वारंवार का होतं, याचीच कारणमिमांसा मी केली वर आहे. :)