सर्जीकल स्ट्राईक रिटर्न
शत्रू सीमेच्या आत येईपर्यंत गाफील राहणे हे भारतीय इतिहासाचे व्यवच्छेदक लक्षण. (अर्थात यास नक्कीच सन्माननीय अपवाद आहेत)
आमचा आदर्श हनुमानाचा. पण तोही समुद्राकाठी आपली शक्ती विसरून हतबल झालेला.
वरून आदर्शवादाची पांघरलेली फाटकी चादर फारच उठून दिसायची. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा आमचा सत्य अहिंसा दया करूणाचा अर्थ. कोट्यावधींची शस्त्रे विकत घेऊन ती केवळ पुजत ठेवुन कुजवण्यातच आम्हा कोण आनंद!
पुर्वी सागरी सिमा अोलांडल्या की पाप समजले जायचे. नंतर काही युद्धातही सीमा न अोलांडून आपण कोण मर्यादा राखली होती.
या प्रतिमेला छेद देणारी आजची घटना आहे. काहींना हे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे पण अशा गोष्टींचे उदात्तीकरण व्हायलाच हवे.
यावेळसा स्ट्राईक सर्वार्धाने वेगळा होता. यावेळेस पाकिस्तानला पुर्ण कल्पना होती की असे काही होणार आहे. थोडक्यात पाकिस्तान अलर्टवर असूनही आपण हा हल्ला साधारण २० मिनिटात करून दाखवला आहे.
या हल्यात भारतीय वायुसेनेने इंटरनॅशनल बॉर्डर पार केल्याचे दावे करण्यात आले आहेत. म्हणजे पी.अो.के च्याही पलीलडे जावून पाकिस्तानात हल्ला झाला आहे. कदाचित आधीच्या बैठकीत याची कल्पना इतर देशांना देण्यात आली होती.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व विमाने सुखरूप परत आणणे.
यातही आपली जागतिक प्रतिमा जपताना कोणताही नागरिक वा पाकिस्तानी सैनिक , सैन्यअड्डे यावर हल्ला न करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
गुप्त माहिती मिळवणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांना एकत्र काम करणे अर्थात आवश्यक असते. विभागातील समन्वय यावेळी अजून उठून दिसत आहे.
वायूसेना ही बंद केलेल्या जिनीसारखी होती असे माझे ब-याच दिवसापासुन मत होते. या जिनला बाहेर काढले आणि त्याने दिलेले काम चोख केले.
विषारी झाडाची आपण केवळ एक फांदी तोडली आहे ह्याचे मात्र भान हरपता कामा नये. संपूर्ण झाड कधी उपटून निघेल हे बघणे अौत्युक्याचे ठरेल. सद्ध्या पुढचे काही दिवस मात्र राजकिय चिखलफेकीत जाणार एवढेच आपण ठामपणे सांगू शकतो.
🗣 चर्चा
(109)
ट
ट्रेड मार्क
Fri, 03/01/2019 - 03:33
नवीन
काँग्रेस आणि सहयोगी -
हे असं चित्र उभं करणं ही मोदींची चाल आहे. सत्तेची लालसा त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आमच्या सरकारने सर्व देशांशी सारखे संबंध ठेवले होते. आमच्यासाठी सगळे सारखे आहेत, सर्वधर्मसमभाव हा आमचा नारा आहे. प्रत्येकाला स्वतःचा फायदा बघण्याचा अधिकार आहे, त्यात चीन आणि पाकिस्तान पण आले. खरं तर या देशाच्या सीमा उगाच आहेत, सगळे एकत्र राहू शकलो तर बरंच होईल. आमचा राहुल सगळ्यांचं नेतृत्व करायला सक्षम आहे.
मोदी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करतात. खरं तर काय करतात हा प्रश्नच आहे, जाहिरातच जास्त करतात. ममो सिंग सगळं करायचे पण काही बोलायचे नाहीत, म्हणजे जाहिरात करत नव्हते.
सेक्युलर मोड -
मोदी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी सगळं करतात. खरं तर काय करतात हा प्रश्नच आहे, जाहिरातच जास्त करतात. ममो सिंग सगळं करायचे पण काही बोलायचे नाहीत, म्हणजे जाहिरात करत नव्हते.
कम्युनिस्ट मोड -
चीनचा एवढा द्वेष करण्याचे काही कारण नाही. जर आपण चीन बरोबर संबंध वाढवले तर सिपेकचा फायदा आपल्यालाही होऊ शकतो. पण या फॅसिस्ट सरकारला स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तान दुश्मन म्हणून दाखवावे लागतात. चीनला बरोबर घेऊन आपण आशिया खंड ताकदवर बनवू शकतो आणि अमेरिका युरोपला आव्हान देऊ शकतो. त्यांच्या सहयोगाने भारतात पण कम्युनिस्ट राजवट आणता येईल ज्याने सर्व गरिबांना फायदा होईल. लाल सलाम!
- Log in or register to post comments
श
शब्दानुज
Fri, 03/01/2019 - 04:06
नवीन
या बाबतीत अधिक माहिती मिळेल काय ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 03/01/2019 - 05:02
नवीन
पण इतकं बालीश कौतुक?
विरोधी पक्षांना, किंबहुना सर्वच पक्षांना, सत्तेची लालसा असतेच. अस्तित्व पणाला लागलं कि इकडे तिकडे थोडीफार आगळीकही होते. पण म्हणुन विरोधी पक्ष शत्रुच्या वळचळणीला वगैरे लागलेला नाहि.
मोदिंच्या भेटींमुळे हे देश भारताकडे कसे काय वळतील? आपला जीडीपी खुप वाढला, आपल्याकडे बिझनेस खुप वाढला, आपल्या शेजार्यांना भरपूर अर्थसहाय्य केलं, जॉब आउटसोर्स केलं, तिथल्या सरकारांना स्थीर करण्यात मदत केली... असलं काहि करुन शेजार्यांना अपल्याबाजुने वळवता आलं असतं... पण नुसतं भेटी देऊन
काय साधणार?
म्हणुनच चीनने डायरेक्ट रशीयावरुन एक पाईपलाईन त्यांच्या अंगणात उतरवली आहे. न जाणो उद्या ते अणु इंधनावर चालणार्या रेल्वे देखील विकसीत करतील. तसंही त्यांच्या रेल्वेचं जाळं युरोपपर्यंत धडका द्यायचा प्लॅन आहेच.
भारताच्या चाबहारमधल्या गुंतवणुकीचं चीनच्या ग्वादारमधल्या गुंतवणुकीशी गुणोत्तर काढलं तर असं अजीबात वाटत नाहि
केवळ भारताच्या भरीस पडुन हे देश चीनशी पंगा घ्यायची सुतराम शक्यता नाहि.
एकदम कट्टर शत्रुत्व नसेल कदाचीत, हे तीनही देश वेगवेगळ्या कारणांनी तसेही पाकच्या विरुद्धच होते.
म्हणजे जुन्या काळात बंदुकींच्या पलटणींविरुद्ध भाला-तलवार घेतलेली फौज उभी करतोय भारत. क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं वगैरेंचं महत्व निर्वीवाद आहे, पण चीनचं युद्धतंत्र अत्याधुनीक सायबर वॉर वगैरे पद्धतीचं असणार आहे. २१व्या शतकाला साजेसं युद्धतंत्र चीन वापरणार हे नक्की. त्याचा पहिला फटका भारताला बसु नये हिच इच्छा.
मोदी आणि कंपनीचा कामाचा धडाका थक्क करणारा आहे हे सत्य आहे.
पसंतीच्या दृष्टीने मोदी इतरांपेक्षा बरेच पुढे आहेत हे ही सत्य आहे. देशापुढे उभी असलेली आव्हानं बघता उगाच वेगळा प्रयोग करण्यात अर्थ नाहि... तरिही... बारामतीकर काकांच्या नेतृत्वात गांधी-ममता-मायावती वगैरे मंडळी विरहीत मजबूत सरकार बनणार असेल तर आम्हाला चालेल :)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 03/01/2019 - 05:04
नवीन
कायप्पावर हे सगळं टाईपण्याचा कंटाळाअ येतो :)
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Sun, 03/03/2019 - 12:06
नवीन
मोदींचं कौतुक आहे, पण ह्या ढकलपत्रात लिहिणारा वाहवत गेला आहे.तोंड फाटेस्तोवर स्तुती करताना वास्तवाशी परखड राहणे त्याला जमलेले नाही.
- Log in or register to post comments
च
चिगो
Mon, 03/04/2019 - 08:50
नवीन
पक्ष आणि सरकार वेगवेगळे असतात, हे जनतेला कळेल, तो सुदीन.. जरा जास्तच वाहवला आहे कौतूककर्ता. सद्यसरकारचे कौतूक आहेच त्यांनी केलेल्या कार्यासाठी, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संबंध आणि कार्य हे 'लॉन्ग टर्म' असतात. चाबहारसाठी भारताचे प्रयत्न बरेच पुर्वी सुरु झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील जनतेचा धर्म हा नगण्य मुद्दा असतो. तिथे इंधनसुरक्षा, नैसर्गिक स्त्रोतांची उपलब्धता, आर्थिक फायदे इत्यादी महत्त्वाचे असतात.
बरोबर.. चीन कदाचित भारताशी पारंपारीक युद्ध करणार नाही. सिंगल चाईल्ड पॉलिसी राबवल्यामुळे चीनसाठी सीमेवरुन 'बॉडीबॅग्स' परत येणं परवडणारं नाही, असं लष्करीतज्ञांचं मत आहे.
'चायनीज मनी ट्रॅप' बद्दल नेटवर बरंच साहीत्य उपलब्ध आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Fri, 03/01/2019 - 10:56
नवीन
/\ /\. = )
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 03/05/2019 - 02:35
नवीन
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/pakistani-twitter-handles-explode-with-airstrike-2-0-speculation-1470190-2019-03-04
कोणी काहीच केलेलं नाही तरी धुमाकूळ सुरुय पब्लिकचा ट्विटरवर!
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 03/05/2019 - 09:13
नवीन
अनिरुद्ध.वैद्य,
अहो, साहजिकच आहे पब्लिकने धुमाकूळ घालणं. चौकीदार म्हणाले ना की पायलट प्रोजेक्ट ठीक झाला, आता प्रत्यक्ष काम करायचंय म्हणून!
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3