चालू घडामोडी - डिसेंबर २०१८
सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय.
परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र.
Dollar out - India, UAE to trade in their currencies
२५ डिसेंबर २०१८ रोजी भारत आणि संयुक्त अमिराती यांच्यामध्ये (अमेरिकन डॉलरमध्ये नाही तर) एकमेकाच्या चलनात व्यापार करण्याचा करार झाला. इराण व सौदी अरेबिया यांच्याशी मर्यादित प्रमाणात (मुख्यतः खनिज तेल खरेदी संबंधात) भारताने भारतिय चलवापरून व्यवहार या अगोदर केला आहे. पण, एकमेकाचे चलन वापरून सर्वसमावेशक व्यापार करण्याचा भारताने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा पहिला करार आहे. अमेरिकन आर्थिक वर्चस्वाला (फिनान्शियल हेजेमोनी) हा एक धक्का आहे असे म्हणता येईल... व भारताच्या दृष्टीने, आपले आर्थिक महत्व अधोरेखित करणारी एक घटना ! सद्याचा भारत-संयुक्त अमिराती व्यापार सुमारे रु३,५०,००० कोटी (सुमारे $५० बिलियन) इतका आहे व दरवर्षी वाढत आहे. शिवाय, त्यांच्या परस्परांच्या देशांत अनेक लक्षणिय गुंतवणूकी आहेत व त्या दरवर्षी वाढत आहेत."hope the dog liked the bone".-- मला वाटते कॉंग्रेसी नेते/समर्थकांची लायकीच ती आहे. मात्र कुत्र्यासारख्या इमानी प्राण्याची तुलना, घोटाळे व भ्रष्टाचारात बुडालेल्या कॉंग्रेसी नेत्यांशी करुन ख्रिस्तियन मायकेलने कुत्रा प्रजातीचा फार मोठा अपमान केला आहे.असं कर्नाटकात झालं असं कोणीतरी फेकतेयकर्नाटक राज्य सरकारनेच मान्य केलंय की फक्त ८०० शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा झाला. कर्नाटक सरकारचा हे फेकण्यात काय फायदा असावा बरं? बाकी अश्या कर्जमाफीमुळे मप्र सकट इतर ३ राज्यांमध्ये काय होणार आहे ते बघा. मध्य प्रदेश मधील एनपीए २४% वाढला आहे. आता आश्वासन दिलंय पण ते पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणणार? म्हणून आता इतर योजना म्हणजे ५ एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त २०० रुपयात वीज दिली जायची किंवा आदिवासी लोकांना वैद्यकीय सुविधा तसेच तेथील मुलांना शालेय शिक्षण देण्याची योजना अश्या अजून काही योजना बंद करण्यात येणार आहेत. बाकी युरियाचा काळाबाजार चालू झालाच आहे, पोलीस शेतकऱ्यांवर लाठीमार सुद्धा करत आहेत.इथे जीएसटीबद्दल काही समजूतीने किंवा गैरसमजूतीने अज्ञानमूलक टीप्पण्या आल्या आहेत म्हणून थोडे काही...
एखाद्या चांगल्या गोष्टीचे अज्ञानाने किंवा स्वार्थी हितसंबंधासाठी मातेरे करण्यात आपण भारतियांचा हात जगात कोणी धरू शकणार नाही. आपला असा खाक्याच आहे की... "भले माझा बंगला मोडला तरी हरकत नाही पण मी विरोधकाची झोपडी जाळणार !" १. आतापर्यंत सर्व माध्यमांत झालेल्या चर्चेनंतर, "वन नेशन वन टॅक्स" म्हणजे "देशात होणार्या सर्व विक्रिवर एकच करदर" या विरोधकांनी केलेल्या चलाख टीपण्णीला कोणी व्यक्ती अजूनही बळी पडत असली तर, ती धन्य आहे ! कारण, देशात होणार्या सर्व विक्रिवर एकच करदर असणे व्यवहार्य नाही आणि म्हणून तसा 'वेडा महमुदी कायदा' जगात कोणत्याही देशात केलेला नाही. तांदूळ-डाळ-तेल यांचा आणि एसयुव्ही गाड्यांवरचा करदर समान असावा असे कोणाला वाटेल काय?! जीएसटी संबंधात, "वन नेशन वन टॅक्स" याचा अर्थ, "एकाच वस्तूच्या विक्रिवर, अनेक नावांखाली व अनेक (स्थानिक, राज्य व केंद्र) प्रशासनांव्दारे वसूल केले जाणारे अनेक करदर * जाऊन, त्याऐवजी दर वस्तूवर संपूर्ण देशात एकच करदर लागू करणे, असा आहे. * : जीएसटी अगोदरचे करः State VAT, Central Sales Tax, Luxury Tax, Entry Tax (all forms) , Entertainment and Amusement Tax (except when levied by the local bodies), Taxes on advertisements Purchase Tax Taxes on lotteries betting and gambling State Surcharges and Cesses so far as they relate to supply of goods and services Central Excise duty Duties of Excise (Medicinal and Toilet Preparations) Additional Duties of Excise (Goods of Special Importance) Additional Duties of Excise (Textiles and Textile Products) Additional Duties of Customs (commonly known as CVD) Special Additional Duty of Customs (SAD) g. Service Tax Central Surcharges and Cesses so far as they relate to supply of goods and services. etc. (मद्य, वीज, पेट्रोल, इत्यादीसारख्या राज्यसकारांच्या विरोधामुळे जीएसटीत सामील न केलेल्या गोष्टी सोडून) कोणत्याही एका गोष्टीच्या विक्रिवर, यापैकी लागू असलेले सर्व कर जाऊन, आता फक्त जीएसटी हा एकच करदर लागू झाला आहे. २. जीएसटीसाठी भरायच्या फॉर्मबाबतही असाच गदारोळ हितसंबधियांनी ऊडवून दिला होता. एका वर्षात, "जीएसटीसाठी भरायला लागणारे फॉर्म्स" आणि "वरच्या अनेक करांमधील लागू असणार्या करांसाठी भरावे लागणारे एकूण फॉर्म्स" यांची तुलना करण्यासाठी व त्यांत कोणती व्यवस्था जास्त सोईची आहे, हे सांगायला, सीएची गरज नाही. याशिवाय, 'अनेक करसंकलन विभागांतील निरिक्षकांकडे प्रत्यक्ष फेर्या मारण्याऐवजी', 'फक्त एकाच (जीएसटी) कराचा ऑनलाईन भरणा करण्यात' करदात्याचा किती फायदा आहे हे सांगायलाही फार हुशारीची गरज नाही. अर्थातच, जीएसटीविरुद्ध खालील लोकांचा विरोध अपेक्षित होता... (अ) राजकारणाने प्रेरीत विरोध करणारे (आ) एकाच कराच्या आणि त्यातही ऑनलाईन करसंकलनामुळे, ज्या बर्याच मध्यस्तांची दुकाने हळू चालू लागली किंवा बंद झाली ते दलाल, करतज्ज्ञ, इ (इ) अवैध कारवाया करून कर चुकवणारे लोक, ज्यांच्या कारवायांवर मोठी बंधने आली व त्यांना करचुकवणे कठीण झाले राजकिय विरोधक व अवैध कारवायांत सामील असणारे लोक गदारोळ करणारच. शेवटी भारत लोकशाही राष्ट्र आहे, इथे चोरालाही उलट्या बोंबा मारायची परवानगी असते!!! ;) :) ३. जीएसटीच्या दरांत बदल होत राहणे... कोणत्याही करप्रणालीत तिच्या पहिल्या पाच वर्षांत, लोकांच्या मागण्या आणि नवीन करप्रणालीचा अनुभव यावर आधारीत, जास्त वेळा बदल होतात. त्यानंतरही, ठराविक काळाने, करप्रणालीला बदलत्या स्थितीशी जास्तीत जास्त व्यवहार्य ठेवण्यासाठी बदल केले जातातच. कारण, कोणतीही करप्रणाली देवाचा शब्द नसते, की जी लोकांच्या भल्याकरताही बदलली जाऊ शकत नाही... ती एक लोकाभिमुख व लोकांच्या भल्यासाठी केलेली व परिस्थितीनुसार बदलणारी व्यवस्था असणे अपेक्षित असते. असे करताना... (अ) सुरुवातीला करदर जास्त ठेवून नंतर तो योग्य पातळीपर्यंत खाली आणणे आणि (आ) सुरुवातीला करदर कमी ठेवून नंतर तो वाढवत जाणे या दोनपैकी कोणता पर्याय लोकांच्या जास्त पचनी पडेल, हे सांगायला फार मोठ्या हुशारीची गरज नाही. कोणत्याही सरकारने (आता बोंबा मारणारे पक्ष सत्तेत असते तर त्यांनीही) पहिला पर्यायच निवडला असता. मात्र, "भारतिय जनतेला उल्लू बनवणे आपल्या डाव्या हाताचा मळ आहे" असा ठाम विश्वास असल्याने, "बघा, बघा, कसे पटापट करदर बदलत आहेत. जीएसट फेल गेली." असा विनोदी प्रचार करण्यात विरोधकांना, जनाची आणि मनाचीही, काहीच वाटत नाही. आताश्या, याचे आश्चर्य वाटणे बंद झाले आहे. :( वरची विधाने पटत नसणार्यांनी, दुसर्या एका भारतिय करकायद्यात, "आयकर कायदा (IT Act 1961)" मध्ये, कधी व किती फेरबदल (अमेंडमेंटस) केले गेले आहेत याची तपासणी केली तर, चक्कर यायला लागून, मुद्दा लगेच स्पष्ट होईल ! :) असो. अपप्रचार करणार्यांना हे माहित नसेल, असे नाही. पण, ते त्यांचे हितसंबंध साधण्यासाठी अपप्रचार करत रहाणारच, शेवटी, भारतात लोकशाही आहे ! म्हणून, त्यांच्यासाठी हे पालथ्या घड्यावरचे पाणी ठरणेच अपेक्षित आहे. मात्र, ज्यांना खरी वस्तूस्थिती जाणून घ्यायची आहे त्यांच्या करिता हा लेखनप्रपंच !