तुळजा भवानी - घाणीतले कमळ
चंद्रपूर हे शहर जसे कोळश्याच्या निखाऱ्यावर आहे तसे तुळजापूर हे शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे आहे !
आणि हा अनुभव मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेत आहे! प्रशासनापेक्षा मला तुळजापूरकरांचे आश्चर्य वाटते , याच घाणीत ते नांदतात, संसार होतात, लेकरं मोठी होतात ! कुणाला काही काही वाटत नाही !
ती जगज्जननी मात्र या साऱ्या कोलाहळापासून शेकडो मैल दूर आहे ! ती यात आहे पण आणि नाही पण ! तिच्या त्या दोन - अडीच क्षणांच्या दर्शनासाठी हे सारे सहन करायचे ! त्यातून आपली ऊर्जा साठवायची ! देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।
यावर्षी एक नवीन प्रकार ! प्रत्येक दर्शनार्थी ला तिकिटाची सक्ती आहे , विनाशुल्क आहे पण अनिवार्य आहे . पण त्यामुळे पूर्वी मंदिरात, केळाच्या साली , कागदाचे कपटे, तेलाच्या रिकाम्या बाटल्या या कचऱ्यामध्ये आता या तिकिटाच्या कपत्यांची भर पडली ! भाविक लोकांचा स्वच्छतेचा सेन्स अफाट आहे
अगदी दर्शनाच्या बारीत देखील लोक पान खाऊन थुंकले आहेत ... केळाच्या साली , चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक च्या पिशव्या, आणि असंख्य कागदाचे कपटे त्या संपूर्ण दर्शन रांगेत पसरले आहेत, गेल्या २ आकटोबर नंतर तिथे झाडू फिरला नसावा !
दर्शनाच्या बारीची ही कथा तर अभिषेकाची वेगळीच ! रात्री पावणेबारा पासून अभिषेकाच्या पाससाठी उभा आहे , अभिषेक पास किती वाजता मिळणार याबाबत वाचमन आणि अन्य स्टॅफ यांच्यात प्रचंड मतमतांतरे आहेत, कोण म्हणतो १ वाजता , कोण म्हणतो ३ वाजता ! अभिषेक पहाटे ५ पासून सुरू होणार !
प्रशासनाने कोठेही कसलाही फलक लावलेला नाही , माहिती सांगण्यासाठी कोणीही अधिकारी व्यक्ती उपलब्ध नाही , आपल्या क्षेत्र पुजाऱ्याने जी माहिती दिली , त्याआधारे आम्ही रांगेत उभे आहोत !
आम्हाला आता तिकिट मिळाले , रात्री १ वाजून १० मिनिटानंतर ! आम्हां चौघांचे फोटो काढले आणि दोन पास दिले ! सिस्टीम चांगलीय पण रात्री १ वाजता ज्यांना अभिषेकाला यायचे आहे त्या सर्वांनी तिथे उपस्थित रहायचे ??? काय हा अन्याय ! ,आम्ही दिवसभर पुण्यातून गाडी हाणत पोचलोय , थकलोय, आता रात्री विश्रांती होणार नाही , उद्या सकाळी मंदिरात जायचे आहे अभिषेकासाठी ! आमचे जाऊदे, आबालवृद्ध या अभिषेकाच्या रांगेत आहेत .. त्या सगळ्यांची हीच स्थिती आहे ...मुकी बिचारी कुणीही हाका !
अभिषेक फक्त १००० होणार , आत्ताच रांगेत तितके लोक आहेत म्हणजे यानंतर येणाऱ्या कोणालाही आज पहाटे अभिषेक करता येणार नाही !
असले तुघलकी निर्णय कोण घेते ? पूर्वी पुजारी मंडळींचा खूप उपद्रव असे , अतिरिक्त पैसे घेऊन ते लोकांना अभिषेक रांगेत लोकांना घुसवत असत ! त्याला चाप बसावा म्हणून कदाचित हा उपाय योजला असावा ! पण हे तर व्याधीपेक्षा औषध जालीम झाले !
मला शंका आहे की मंदिर व्यवस्थापनाचा पुरेसा अभ्यास केलेले आणि अनुभव असणारे लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात का?
मंदिरातील आणि आसपासच्या गल्ल्यांच्या स्वच्छतेचे दायित्व कोणाचे आहे ?
या सगळ्याची तक्रार कोणाकडे करावी ?
महाराजांच्या दर्शनापेक्षा लोकांचा आनंद सागर कडेच ओढा जास्त असतो.साफ चूक. एक फरक आहे. शेगाव संस्थान सरकार चालवत नाही. त्यांचे वेगळे मंडळ आहे. स्वयं स्फूर्ती ने बिनपगारी लोक तिथे काम करतात. तिथला पैसा बघून सरकार मागे ते खिशात घालायला बघत होते. तिथल्या लोकांनी ते होऊन दिले नाही.