आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!
भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे. या पुर्वीच मतदार यादीशी आधारकार्ड जुळणी न्यायव्यवस्थेने नाकारली होती. खासगीपणा बाबतचा निर्णय आधीच झाल्या मुळे निकालाची दिशा सर्वसाधारण पणे काय असणार याचा अदमास होता नाही असे नाही. पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालय केराची टोपली दाखवेल असे वाटले नव्हते, ते काम आजच्या निकालाने एकदाचे केले. अलिकडे भारताच्या न्यायव्यवस्थेलाही तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवून घेण्याची जरा जास्तच घाई झाल्यासारखे वृत्तपत्रिय बातम्यांवरुन वाटत आहे.
डिटेल मधील निकाल वाचून सविस्तर मत काळाच्या ओघात देता येईल पण मतदार यादीशी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याशी सांगड घालू न देणे , सीम कार्ड आणि इतर क्षेत्रात आयडी म्हणून सांगड घालू न देणे पटलेले नाही. शासन यंत्रणा दातांनी चुकीचे चावे घेत असेल तर शासन यंत्रणेला शिस्त लावणे न्यायालयाची जबाबदारी आहे हे मान्य, खासगीपणाचा आधिकार मान्य पण राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा काहीही मोठे असू नये; जबडा ठेवा पण दातच नको अशा पद्धतीने कोणतीही शासकीय यंत्रणा कसे काम करु शकेल ? असा विचार या निकालाचे प्राथमिक वृत्त वाचून मनात येऊन गेला. असो.
#AadhaarVerdict — key points संदर्भ
Welfare schemes ✔️
I-T returns ✔️
Linking to PAN card ✔️
Banks accounts ✖️
SIM cards ✖️
Private companies ✖️
School admissions ✖️
NEET, UGC, CBSE ✖️
उत्तर दायीत्वास नकार लागू
पाच कोटी बोगस खाती, तीन कोटी बोगस गॅस जोडण्या, दोन कोटीच्या वर बोगस रेशन कार्डे रद्द झाली आहेत.
https://m.dailyhunt.in/news/india/english/news+gram+24-epaper-newsgram/how+many+fake+jobs+fake+gas+connections+and+fake+ration+cards+holders+have+been+caught+through+aadhaar-newsid-81446916 हा दुवा तर लोकांनी जरूर उघडून पहा असाही कळकळीची विनंती आहे. हि आकडेवारी पहिली तर छाती दडपून जाते. मडक्याला शंभर भोकं असतील तर ते भरणार कसे? हि गळती अंदाजे ९०,०००कोटी दरवर्षी होत होती. मग गेल्या काही दशकात किती पैसे झिरपला आहे याचा हिशेब लावा https://www.hindustantimes.com/india-news/aadhaar-verdict-historic-scheme-saves-govt-90k-crores-annually-arun-jaitley/story-tEjzMgVixxZbuitF3srQ2N.html सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती या सर्व गोष्टींचा विचार करणार नाहीत असे कसे होईल. हे पाहिले भारत देश श्रीमंत आहे पण भारतीय लोक दरिद्री का आहेत याची खात्री पटेल. गोपाळ सुब्रमनियम कपिल सिब्बल श्री चिदंबरम ममता बॅनर्जी सारख्या दिग्गज लोकांचा आधार रद्द करण्यासाठी एवढा आटोकाट प्रयत्न का चालला होता ते लक्षात येईल. आता सांगा या सर्व लोकांचे अच्छे दिन कसे येणार? तोंडावर कोण पडलंय आणि पडलं तरी नाक वर कोण सांगतंय हे स्पष्ट आहे.आधार कायदा हे वित्त विधेयक
म्हणून आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वित्त विधेयकाचा कायदा होण्यासाठी राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसते. जसे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही. विरोधकांचा हाच डाव होता कि न्यायालयात आधार कायदा वित्त विधेयकात टाकता येणार नाही हे सिद्ध करून दिलं कि ते राज्यसभेतअडकवता
येईल. पण त्यांच्या दुर्दैवाने न्यायालयाने आधार कायद्याला वित्त विधेयकात टाकण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा हाही एक महत्त्वाचा डावपेच अक्षरशः पाण्यात गेला आहे. बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.-- अगदी..:))