FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !!
FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !!
आत्ता राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदींना हे विधेयक माघारी घ्यावे लागले. बरीच राज्य जिंकल्या मुळे आता हळूहळू राज्यसभेत भाजपचे बहुमत निर्माण होत आहे. आता प्रश्न आहे फक्त २०१९ चा !! तर आपण सर्वानी भाजप ला प्रचंड मतांनी विजयी करू या. म्हणजे भाजप हे विधेयक पास करू शकेल. आपल्या खिशाला थोडा चुना लागला तरी काय हरकत आहे ? मोदींचे स्वप्न पूर्ण करणे हे आपलेच घरचे कार्य आहे !!
अजून एक - आता यापुढे देशात कोणतेही इतर सरकार येणारच नाहीए मुळी !! फक्त भाजप एके भाजप !! त्या मुळे या विधेयकाचा भविष्यात कोणी गैर वापर करेल हि शंकाही मनात बाळगू नका !!
थोडी जुनी माहिती वाचा. FRDI + bail in यावर
मोदी सरकार ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीपेक्षा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. किंबहुना यामुळे सर्वसामान्य बँक खातेदाराची कधीही नोटाबंदी होऊ शकते. या विधेयकाला केंद्र सरकारने जून २०१७ मध्ये मंजुरी दिली आहे. बुडित खात्यात गेलेल्या बँकांना यामुळे दिलासा मिळेल. मात्र याचा फटका बँकांच्या ग्राहकांना सोसावा लागेल.
‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’मुळे अनेकांच्या मनात भीतीची भावना आहे. यामुळे बँक बुडत असल्यास, त्यांच्याकडून ग्राहकांचा पैसा वापरला जाऊ शकतो. सर्वसामान्य बँक खातेदारांचा पैसा परत करण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल. हा कायदा बँकांसाठी तसा नवीन नाही. १९६१ मध्ये संसदेने ‘डिपॉजीट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ कायदा मंजूर केला होता. या कायद्यामुळे बँक बुडित खात्यात गेल्यास, बँक ग्राहकांना जास्तीत जास्त १ लाख रुपये खातेदारांना देणे लागते. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा अधिक रक्कम असल्यास, ती संपूर्ण रक्कम बँक आपल्या ताब्यात घेऊन तिचा वापर करु शकते.
मोदी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणल्यास बँकांना जास्त अधिकार मिळतील. यामुळे सरकारी बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ होईल. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसेल. यामुळे बँकांना ‘बेल-इन’चा अधिकार मिळेल. त्यामुळे बुडणाऱ्या बँकांना थेट खातेधारकांचा पैसा वापरता येईल. ‘बेल-इन’मुळे खातेधारकांचे त्यांच्या खात्यावर कोणतेही नियंत्रण राहणार नाही.
या विधेयकाला एवढा कडाडून विरोध करताय, मग एखादी साप भी मरे और लाठी भी ना टूटे अशी योजना सांगा बघू. नुसता टीका करणारा लेख टाकण्यापेक्षा नक्की काय चुकलंय आणि त्याला कुठले चांगले पर्याय आहेत असा लेख असेल तर त्यावर चर्चा ही चांगली होते. जरी आपल्या चर्चा करण्याने काही होणार नसलं तरी माहितीत तर भर पडते.हा तर सगळ्यांनी सगळ्याच वादविवादांत लक्षात घ्यायला हवा असा मुद्दा आहे. ज्याला विरोध करत आहोत, त्याला त्यापेक्षा चांगला पर्याय सुचवता येत नसेल, तर तो विरोध केवळ "विरोधासाठी विरोध" या सदरात गणला जातो.रुपी , CKP , अमुक तमुक अर्बन असल्या फालतू बँक मध्ये शहाणे / अर्थसाक्षर लोक पैसे ठेवत नाहीत.हा तर्क हास्यास्पद आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या धाग्यात मूळ मुद्दा गरिबांचे पैसे हा होता. गरीब माणूस अर्थसाक्षर आहे का नाही, शहाणा आहे का मूर्ख हा प्रश्न येतो कुठे? दुसरी गोष्ट म्हणजे जर बँक बुडीत निघाली तर पैसे सगळ्यांचेच बुडणार आहेत. रूपाचे उदाहरण क्लासिक आहे, एक मोठी नावाजलेली बँक डबघाईला आल्यावर काय होतं हे प्रत्यक्ष समजतंय. आत्तापुरता अर्बन/ सहकारी का PSB, ठेवीदार अर्थसाक्षर का निरक्षर, शहाणा का मूर्ख हे मुद्दे बाजूला ठेवा. कुठलेही गॉगल, चष्मे असतील तर ते काढून संपूर्ण पणे न्यूट्रल नजरेने मी काय लिहितोय ते वाचा. बेल इनचा नियम लागू नसताना सुद्धा २००२ पासून ठेवीदारांचे पैसे अडकून बसले आहेत. अतिशय गरज असेल तरच यातले थोडे किंवा गरजेइतके पैसे पूर्वपरवानगीने आणि तुमची गरज सिद्ध केल्यावर केल्यावर मिळू शकतात. आता बँक का डबघाईला आली तर कर्ज घेणाऱ्यांनी परतफेड केली नाही म्हणून, पण पैसे कोणाचे अडकले तर ठेवीदारांचे, हो की नाही? तर जर कर्ज घेणाऱ्यांकडून वसुली झाली तर हा तिढा सुटू शकेल की नाही? पण सध्या वसुलीसाठी कोण प्रयत्न करतं? तर फक्त बँक किंवा वसुली एजंट, म्हणजे थोडक्यात गुंड. हे लोक कितपत वसुली करू शकतात असं तुम्हाला वाटतं? गाडीचा हप्ता भरला नाही म्हणून सामान्य माणसाची गाडी ओढून आणण्यापलीकडे हे लोक काय करू शकतात? समजा रुपी बँकेने एका उद्योगाला ४ कोटींचं कर्ज दिलं होतं. हे पैसे आले कुठून तर हजारो लोकांनी छोट्या ठेवी ठेवल्या होत्या त्याचा वापर झाला. सुरुवातील फायद्यात असणारा आणि हप्ते व्यवस्थित भरणारा तो उद्योग काही कारणाने तोट्यात चालायला लागला. हप्ते थकायला लागले. मूळ ४ कोटी असलेले कर्ज वाढीव दराच्या चक्रवाढ व्याजाने ६ कोटींवर गेले. यात बँकेचे अधिकारी किंवा वसुली एजंट काय कारणार आहेत सांगा? रोज त्या कंपनीमध्ये जाऊन वसुलीचा तगादा लावणे? कालांतराने लवादाकडे केस करून प्रॉपर्टी जप्तीची नोटीस मिळवणे? याने प्रश्न सुटतो का? लक्षात घ्या की प्रॉपर्टी जप्तीची नोटीस आणली की कारखाना (चालू असेल तर) बंद होतो. थोडक्यात जे काही उत्पन्न होत असेल थोड्याफार प्रमाणात चालू असण्याने ते पण बंद होते. कालांतराने बँक अश्या प्रॉपर्टीज लिलावात काढते. तसेही बँक लिलाव करते म्हणजे लोक किंमत पाडून मागतात, त्यात चालू नसलेला कारखाना म्हणजे गंजलेल्या मशिन्स, त्यामुळे अजून किंमत कमी होते. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हा धंदा करणारे पण लोक आहेत, जे लिलावात कमी किमतीत प्रॉपर्टीज विकत घेतात आणि नंतर वाढीव किमतीत विकतात. अगदी घर जरी जप्त केले असेल तरी ते सील केले जाते, म्हणजे खरेदीदाराला बहुतांशी वेळेला आतून घर कसे आहे हे बघता येत नाही, त्यामुळे लोक बरीच डागडुजी करायला लागेल हे गृहीत धरून कमी बोली लावतात. २००८ च्या मंदीनंतर जगभरात बऱ्याच देशांमध्ये हा प्रॉब्लेम प्रकर्षाने जाणवला. हा तिढा सोडवण्यासाठी जगातील बऱ्याच देशात त्या त्या सरकारांनी उपाय योजले. भारतात, मल्ल्या किंवा निरव मोदी वगैरे पळून गेल्यावर, तसेच भूषण स्टील सारखी कंपनी सुद्धा डबघाईला आल्यावर सरकारने काही पावले उचलण्याचे ठरवले. याची एक महत्वाची पायरी म्हणजे एक लीगल फ्रेमवर्क तयार केलं. उद्योगांच्या प्रत्येक सेक्टरसाठी एक समिती स्थापन केली जाईल. जर एखादा उद्योग डबघाईला आला असेल तर ती समिती त्यात लक्ष घालून दुसरी एखादी कंपनी या कंपनीला मदत करायला, टेकओव्हर करायला तयार आहे का किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज विकत घेतेय का हे बघणार. जसं भूषण स्टील दिवाळखोरीत निघाल्यावर सरकारच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन टाटा स्टीलने ३२००० कोटी रुपयांना ही कंपनी खरेदी केली. यामुळे काय झालं? भूषण स्टीलवर जवळपास ५६००० कोटींचं कर्ज होतं. यातले ३२००० कोटी तर लगेच वसूल झाले. उर्वरित रक्कम कर्ज नियमित करून घेऊन बँकेच्या एनपीए किंवा बुडीत खात्यातून बाहेर येईल. इथे एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ५६००० कोटींचं कर्ज आता आहे याचा अर्थ बँकांनी कंपनीला ५६००० कोटी दिले होते असा नाही. तर मूळ कर्ज रक्कम समजा ४०००० कोटी आहे, ज्याचा मूळ व्याज दर १२% आहे. जेव्हा कंपनीचे कर्जाचे हप्ते भरणे अनियमित होते तेव्हा त्यावर लेट पेमेंट चार्जेस वगैरे लागतात. एनपीए मध्ये खातं गेल्यावर पेनल्टी म्हणून व्याजदर वाढवला जातो. यातून ही रक्कम फुगत जाते. हे केलं नसतं तर काय झालं असतं? जर कंपनीने नुसतीच दिवाळखोरी जाहीर केली असती तर सगळे पैसे बुडाले असते. ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे त्यांना ही रक्कम बुडीत खात्यात टाकायला लागली असती. कंपनीच्या मशिनरीचा आणि इतर प्रॉपर्टीज जा लिलाव करून जी काही रक्कम मिळेल ती घेऊन बँकांचे वसुलीचे बाकीचे मार्ग बंद झाले असते. फार फार तर मालक, संचालकांच्या मालमत्तेवरही टाच आणली गेली असती. पण याने प्रश्न सुटतोय का? बँका तरी हे बुडालेले पैसे कुठून आणणार? सरकारी बँक असेल तर सरकारकडून अनुदान (बेल इन!) मागणार. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडून जो कर गोळा केला जातो त्यातून सरकार या बँकांना अनुदान देणार. सहकारी बँक असेल तर ठेवीदारांचे पैसे अडकून बसणार किंवा राज्य सरकार कडून मदत मागितली जाणार. हे पैसे कुठून येणार? आता तुम्हाला माहीतीच असेल. भूषण स्टीलच्या मालकांनी काही कर्ज बुडवायचे म्हणून कंपनी चालू केली होती का? मी जवळपास १०-१२ वर्षांपूर्वी भूषण स्टीलचे शेअर्स ट्रेड करत होतो. त्यावेळेला कंपनीची स्थिती उत्तम होती. पुढे काय झालं माहीत नाही, पण काय कर्ज बुडवायचं या उद्देशाने काही संचालकांनी/ मालकांनी मुद्दाम कंपनी डबघाईला आणली नसेल. कंपनी जर बंद झाली तर त्यात नोकरी करणाऱ्या हजारो लोकांचे नुकसान होते. मग हे टाळण्यासाठी वरील उपाय कसा वाटतोय? आता तुमचा बेल इन चा मुद्दा विचारात घेऊ. हा लेख वाचा. यातील The “bail-in” tool will mean the conversion of certain creditors’ (including depositors’) debt into equity. हे वाक्य महत्वाचे आहे. तसेच खालील परिच्छेद पण महत्वाचा आहे. Deposit amounts covered by deposit insurance, pensions, and sums payable to employees have been expressly excluded from the scope of bail-ins. “Bail-in does not imply that this tool can be used at the government’s whim and fancy to arbitrarily use depositors’ money without their consent to save failed banks,” says Chatterjee of Vidhi Centre for Legal Policy. “For any action that RC takes, the law ensures that all creditors, which includes depositors, are not left in a worse position than they would have been had the entity been liquidated.” माझ्यामते मी बऱ्यापैकी सर्व उलगडून सांगितले आहे. त्यातूनही निव्वळ विरोधासाठी विरोध करायचा का सत्य जाणून घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराला सामान्य लोक बळी पडल्याने हे विधेयक सरकारला मागे घ्यायला लागलं असेल. पण माझ्यामते तरी सरकार लोकांना समजावण्यात कमी पडलं. शेवटी पैश्यांचं सोंग कोणीच अनु शकत नाही ना तुम्हीआम्ही, ना बँका, ना सरकार. टॅक्स मधून बेल इन करायचे का दुसरे मार्ग शोधायचे हे पण ठरवा.“For any action that RC takes, the law ensures that all creditors, which includes depositors, are not left in a worse position than they would have been had the entity been liquidated.”ही व्यवहारातली वस्तूस्थिती आहे... आणि शाम भागवत :रूपी बँकेच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ३०००० हजार जणांच्या आरडाओरडीमुळे ५७४३२९ लोक घाबरले. त्यामुळे हे विधेयक महाभयंकर आहे असच सर्वांना वाटायला लागले.ही विरोधी राजकारणाने निर्माण केलेली हवा आहे. सद्या राजकारणी हवा तयार करून व्यक्तिगत/पक्षाचा स्वार्थ साधणे महत्वाचे समजले जाते... तसे करताना, देशाचे किंवा सामान्य नागरिकांचे अहित झाले तरी बेहत्तर... ते केवळ कोलॅटर डॅमेज समजून विसरायचे असते. :(त्यामुळे चहा सामोसे विकणाऱ्या राजाला आपल्याला लुटून द्यायचे, का गालावर गोड खळी असलेल्या, अल्लडपणे बागडणाऱ्या स्वयंघोषित युवराजांना गादीवर बसवून लुटायला द्यायचे हा निर्णय आपण जनतेवरच सोपवून देऊ.हे वाक्य खास आवडले. =)) =))त्यामुळे चहा सामोसे विकणाऱ्या राजाला आपल्याला लुटून द्यायचे, का गालावर गोड खळी असलेल्या, अल्लडपणे बागडणाऱ्या स्वयंघोषित युवराजांना गादीवर बसवून लुटायला द्यायचे हा निर्णय आपण जनतेवरच सोपवून देऊ.उपमा म्हणून ठीक आहेपण चहावाला राजा लुटतो आहे असं मला तरी वाटत नाही. जी कर्जे आधीपासून एनपीए मध्ये आहेत ती काही एकदम परफॉर्मिंग होणार नाहीयेत हे १००% सत्य आहे. त्यासाठी काहीतरी उपाय योजावे लागणार हे नक्की, अन्यथा जर PSBs डबघाईला आल्या तर देशाची आर्थिक स्थितीच खराब होईल. अशी कर्ज ही दुधारी तलवार आहे. कसे ते सांगतो. कर्जे ही बँकेची ऍसेट्स असतात. म्हणजेच काय तर त्यावर जे व्याज मिळते ते बँकेच्या ताळेबंदात नफ्याच्या बाजूला धरले जाते. तर ठेवी या लायबिलिटीज मध्ये मोडतात कारण त्यावरचे व्याज हे बँकेच्या दृष्टीने ग्राहकाला देणं असते. आता ताळेबंदात "Interest Receivable" आणि "Interest Payable" असे दोन विभाग असतात. सगळी कर्ज काही एकाच प्रकारची नसतात. तर सामान्य माणसाला दिली जाणारी वैयक्तिक कर्जे (फक्त गॅरेंटर असतो), जनरल मॉर्टगेज (कॉलॅटरल सेक्युरिटी व गॅरेंटर), गृहकर्ज, गृह दुरुस्ती कर्ज, शेती कर्ज ईई असतात. तर उद्योगांसाठी रोखरोखपतता (Cash Credit - जे बिझनेसच्या रोजच्या खर्चासाठी असते, ठराविक कालावधी नसतो), मॉर्टगेज (फॅक्टरी उभारण्यासाठी वा अश्या ठळक कारणांसाठी दिले जाते, कर्जाचा कालावधी ठरलेला असतो). तर कर्जाचे व्याज Interest Receivable मध्ये येते, जे बँकेचा प्रॉफिट म्हणून मांडले जाते. आता जसे तुमच्या आमच्या कंपनीला, धंद्याला दर वर्षी वाढ दाखवणे आवश्यक असते तसेच बँकेला नफ्यात वाढ दाखवणे आवश्यक असते. बँकेने चांगला परफॉर्मन्स दाखवला नाही तर तुम्ही अश्या बँकेत खातं काढाल का? इथे फरक लक्षात घ्या Interest Received नसून Interest Receivable आहे. म्हणजे काय? तर हे व्याज मिळेल अश्या हेतूने ते नफ्यात दाखवले आहे. त्याचप्रमाणे Interest Payable आहे म्हणजे बँक हे व्याज देणे आहे. आता यात मेख अशी आहे की ठेवींवरचे व्याज बँकेला द्यावेच लागते. पण कर्जावरचे व्याज मिळेल याची खात्री नसते, किंबहुना मुद्दल सुद्धा मिळेल याची खात्री नसते. म्हणूनच बँकांचा नफा-तोटा हा फक्त कागदोपत्री असतो असं म्हणतात. एक आपल्याला समजेल असं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर समजा मी एका कंपनीचा शेअर १०० रुपयांना खरेदी केला आहे. उद्या तो शेअर ९० रुपयांना गेला तर मी म्हणेन मला १० रुपये तोटा आहे, पण जो पर्यंत मी तो विकत नाही तोपर्यंत तो तोटा खरंच आहे का? माझे १०० रुपये अडकून पडलेत हे मी खात्रीने म्हणू शकतो पण आत्ता जर मी तो विकून टाकला तर मला फक्त ९०च परत मिळतील. हेच अजून तो शेअर पडला आणि ७० ला गेला तर? आता मात्र मी बेकार अडकलोय ना? विकला तर ३० चा तोटा नक्की, मग माझ्याकडे काय पर्याय आहेत? तर एक तर विकून टाकायचा (loss book करणे) आणि ७० रुपये परत घ्यायचे. ते ७० परत चांगल्या ठिकाणी गुंतवून तोटा भरून काढायचा किंवा अजून पैसे उभे करून परत गुंतवणूक करून तोटा भरून काढायचा. Loss booking हे बँकेच्या भाषेत बोलायचे झाले तर कर्ज बुडीत म्हणून सोडून द्यायचे. म्हणजे काय तर write-off करायचे. म्हणजे जे Interest Receivable किंवा bad debts मध्ये दाखवत आहेत त्या पैश्यांवर तुळशीपत्र ठेवायचं. वर सांगितल्याप्रमाणे हे कर्जाऊ दिलेले पैसे कुठून आणलेत? तर ठेवीदारांच्या पैश्यांमधून, बरोबर? त्यांना तर व्याज द्यायलाच लागतंय. मग आता हे पैसे कुठून आणायचे? दुसरीकडे Interest Receivable मधून रक्कम कमी झाल्याने बँकेचा नफा कमी झालेला किंवा तोटा वाढलेला दिसतो. PSB असेल तर त्याचा परिणाम शेअरच्या किमती कोसळण्यावर होतो. बाजारात सगळीकडे बातमी पसरते की बँकेचा नफा घसरला, म्हणजे परिस्थिती काही चांगली दिसत नाहीये. मग ठेवीदारांच्या मनात भीती निर्माण होते आणि ते ठेवी काढायला लागतात. जर हे ठेवी काढणाऱ्यांचं प्रमाण वाढलं तर बँक पैश्यांची व्यवस्था करू शकत नाही, त्यातून मग अजूनच ठेवीदार पॅनिक होतात. आणि मग बँक डबघाईला येते. यात अजून एक गोष्ट अशी होते की कर्ज घेणाऱ्यांना जेव्हा बँकेची परिस्थिती समजते तेव्हा नियमित कर्ज भरणारे पण हप्ते चुकवायला बघतात. म्हणजे आवक कमी होतेय आणि जावक मात्र वाढत चाललीये. महत्वाची गोष्ट ही आहे की ही सगळी प्रोसेस २-४ वर्षांतली नाहीये. मल्ल्याला, निरव मोदीला आणि एनपीए असलेल्या बहुतेक सगळ्या उद्योगांना कर्ज बऱ्याच आधी दिलेलं आहे. ते एनपीए मध्ये पण बऱ्याच आधीपासून आहेत. आता प्रश्न हा होता की हे Interest Receivable मध्ये दाखवून नसलेला वाढीव नफा दाखवत राहायचं का परिस्थिती स्वीकार करून त्यावर काही उपाय योजायचा? मोदी परिस्थिती जैसे थे ठेवायचा सोपा मार्ग निवडू शकले असते. पण त्यांनी loss book करण्याचा पर्याय निवडला. पण म्हणजे कर्ज write-off केलं नाही तर मल्ल्या आणि निरव मोदींच्या मालमत्ता जप्त केल्या आणि त्यातून वसुली केली. बाकी ज्या कंपन्यांमध्ये जरा तरी धुगधुगी आहे अश्या कंपन्यासाठी FRDI मार्गे कर्ज रिकव्हर करायचा प्रयत्न चालू केला. वर भूषण स्टीलचं उदाहरण म्हणूनच दिलं आहे. प्रॉब्लेम हा आहे की सामान्य माणसाला यातलं काही समजत नाही आणि समजून घ्यायचंही नसतं. फक्त माझे पैसे जाणार असं एक काहीतरी वाक्य दिसलं की त्यावरून गदारोळ होतो. माझ्या मते तरी मोदी सरकार लोकांना समजावून सांगायला कमी पडतंय. त्यामुळे समजून उमजून जर लोकांनी मतदान केलं नाही तर गालावर खळी असणाऱ्या युवराजाकडून पुढचे मल्ल्या, निरव मोदी तयार होण्यासाठी तयार रहा.समजून घ्यायचंही नसतं. फक्त माझे पैसे जाणार
हा नोटबंदीत ज्यांचे काळे पैसे बुडाले आहेत त्यानि मोठ्या तोंडाने केलेला आक्रोश आहे आणि हा हलकट पत्रकार मंडळींनी त्यावर चढवलेला अपप्रचाराचा मुलामा आहे. सामान्य माणसाला बँक बुडाली किंवा तरली याच्याशी काहीही घेणे देणे नसते. त्याला माझे पैसे दुप्पट कोण करून देईल किंवा मला फुकट कोण काय देईल याच्याशी कर्तव्य असते. तुम्ही एवढ्या कळकळीने हा विषय समजावून देण्याचा प्रयत्न करत आहात तर येथेच असलेल्या सुशिक्षित मंडळींनीच समजावून घेण्याची इच्छा नाहीये मग सामान्य माणसांची काय कथा? मी तर म्हणतो २०१९ मध्ये मोदी पडावेत आणि महाठगबंधनच निवडून यावे. म्हणजे ते पण वर्ष दोन वर्षात लाथाळी होऊन पडेलच आणि मग श्री मोदी पूर्ण बहुमताने निवडून येतील. मुळात पंतप्रधान कोण यावरून पहिल्या दिवसापासूनच लठ्ठा लठ्ठी होईल. मायावती, मुलायम, ममता, राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू पासून सगळे खुर्चीची गाजरे खात आहेत. कोणालाही यात ५० च्या वर जागा मिळणार नाहीत. मग बारा घोड्यांचा रथ आठ दिशांना ओढला जाईल. people get the govt they deserve. ( लोकांना आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते)