Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

स
सोमनाथ खांदवे
Wed, 08/01/2018 - 03:09
🗣 266 प्रतिसाद
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 82317 views

🗣 चर्चा (266)
श
शब्दबम्बाळ Fri, 08/31/2018 - 21:48 नवीन
ओ माहितगार! तीन चार दिवस झाले...

प्रतिसाद दाखवा नाहीतर स्पष्ट माफी मागा!

आणि दोन्ही जमत नसेल तर वाचकांना कळेलच की माहितगार हा आयडी "फितुर" "शेळपटासारखे (देशप्रेम)" असे आणि इतर शब्द वापरून कशा पिंका टाकतोय ते!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 09/02/2018 - 12:14 नवीन
१) वरची सर्व चर्चा तपासून घ्या चर्चेला व्यक्तिगत वळण देण्यास आपण स्वतःच सुरवात करण्याचा दोष आपल्याकडेच आहे हे दिसून येईल. २) देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या प्रतिसादांना 'फालतू' म्हणण्याची जुर्रत आपल्या कडुन घडली याचा अपणास सोईस्कर विसर पडला असेल तर पुनाश्च निदर्शनस आणतो. ३) झेपत नसेल तर भारतीय देशप्रेमींशी वाकड्याने न जाणे श्रेयस्कर असते. ४) देशप्रेमींच्या देशप्रेमास 'फलतू' ठरवून कुणाच्या स्वतःच्या देशप्रेमावर सावट आले असेल तर असे सावट स्वतःचे देशप्रेम व्यक्त करुनच दूर होऊ शकते. देशप्रेमींवर धाक धपटशहा करुन नव्हे ५) ज्यांना स्वतःच्या देशाची माफी मगण्याची लाज वाटते त्यांनी इतरांना माफ्या मागत फिरु नये.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 09/04/2018 - 21:09 नवीन
गेट वेल सून मामू! नाही सापडला ना प्रतिसाद! मुखवटे गळून पडू लागले कि खरा चेहरा नीट दिसतो... बाकी आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणी आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे उगवले नव्हते आणि कोणाला पुरावे देण्याची गरज लागली नव्हती. हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! (त्यांना सत्तेत आणण्यात माझाही हातभार आहेच म्हणा) बर आणि असले लोक स्वतः काय दिवे लावतात हे खालचा व्हिडीओ बघून कळेलच! :D जेव्हा चर्चा भरकटायची असेल तेव्हा मग असले मुद्दे उकरून काढायचे आणि मी कसा देशभक्त आणि तू कसा देशद्रोही हे कीबोर्ड बडवून सिद्ध करायला लागायचे हेच काही लोकांचे उद्योग असतात! Image removed.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 09/05/2018 - 06:31 नवीन
पहिली गोष्ट पहिले, ज्यांना आपली देशभक्ती पातळ असल्याचा उघडपणे अभिमान वाटतो त्यांच्याशी उपहासातले नातेही नाकारतो. आपण आपल्या प्रतिसादाच्या शेवटी जे भारत द्वेष्ट्यां प्रार्थनेचे सॅम्युएल जॉनसन यांचे वाक्य दिले आहे, 'पॅट्रीयॉटीझम इज लास्ट रेफ्युज ऑफ स्काउंड्रेल' त्याचा मराठी अनुवाद, 'देशभक्ती हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे' असा होतो. आणि अशा भारतद्वेष्ट्या प्रार्थनेचा मतितार्थ "...पंचमहासत्ता र्शेजी केले शत्रु श्रेष्ठजाण । या विचारें पावलें समाधान । फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ जोहार परकीयासी फितुरांचा जोहार !! .." असा होत असावा.
....मी कसा देशभक्त आणि तू कसा देशद्रोही हे कीबोर्ड बडवून सिद्ध करायला लागायचे हेच काही लोकांचे उद्योग असतात!... आणि त्याच्या आधीचे आपल्या प्रतिसादातील वाक्य .....बाकी आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधी कोणी आमच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे उगवले नव्हते आणि कोणाला पुरावे देण्याची गरज लागली नव्हती....
उलटा ** कोतवल को डाटे' स्टाईलमध्ये, सॅम्युएल जॉनसनच्या देशभक्तांनाच 'नीच' संबोधणार्‍या वाक्यावरील आपल्या दृढ विश्वासातून कुणी आपणच आपली महती सिद्ध करत असेल तर अजून कोणते पुरावे हवेत. जेव्हा साशंकता येतात तेव्हा खोकल्याची उबळ झटकून देशाची माफी मागावी आणि 'वंदे मातरम' म्हणावे.
... त्या आधी .......हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! ...
'....हा पक्ष सत्तेत आल्यावरच हि जमात कुठून पैदा झालीये काय माहित?! ...' असा विचार मनात आणणार्‍या, देशप्रेम पातळ असलेल्यांनो, या सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम माय भूमीत, देशप्रेम पातळ असलेल्यांना विदेशी हितसंबंधांचा दंश होऊन वैचारीक फितूरी येते तेव्हा तेव्हा गाढे देशप्रेम असलेले जन आणि जमाती या भारतीय मातीतून पैदा होतात. केवळ अमुक पक्ष सत्तेत आला म्हणून नव्हे, देशप्रेम पातळ असलेल्यांना ओळखून किमान आधे मधे तरी गाढ्या देशप्रेमींना हा देश पुढे आणून त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
...(त्यांना सत्तेत आणण्यात माझाही हातभार आहेच म्हणा)....
आपल्या वाक्याचा अर्थ -प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे असेल ते- आपल्यालाच ठाऊक असणार पण जे असेल ते , आपण सत्तेत आणलेल्या माणसाचे हे भाषण ऐका आणि देशाचे गौरवगान करणार्‍यांची जाणीवपुर्वक बदनामी करणार्‍या माध्यमांनी भरवलेल्या काळाच्या उबळीपासून वेळेत सावध होण्याचा प्रयत्न करुन पहावा. (बाकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीने कोणतेही सरकार सत्तेत आणण्यात आमचा कोणताही सहभाग नाही हा आमचा कुणासच मत नव्हते हा आमचा डिसक्लेमर - आम्ही मुखवटे चढवत नाही आणि वैचारीक सातत्यही आहे, आमच्या लेखनाच्या पूर्ण वाचन आणि आकलनात कुणी कमी पडत असेल तर खेदपुर्वक शुभेच्छाच देऊ शकतो.)
....बर आणि असले लोक स्वतः काय दिवे लावतात हे खालचा व्हिडीओ बघून कळेलच! ....
देशप्रेम व्यक्त करण्याच्या महत्वाचे आकलन न होण्यात तर वैचारीक फितुरांची गोची होते आणि त्यांची त्यांना लक्षात येत नाही. 'वंदे मातरम' किंवा 'भारतमाता की जय' 'जय हिंद' असे दोन तीन शब्द म्हणण्याची तयारी तेही आपापल्या भाषेत पुरेसे आहे, आणि आपण दिलेल्या युट्यूब लिंकेत त्या मंत्र्याची ती तयारी आहे ही फार मोठी गोष्ट आहे हे देशप्रेम पातळ असलेल्यांना समजणार नाही हे ओघाने आलेच. बरे होण्याची गरज असलेले देशप्रेमींनाच आजारी म्हणतात ह्यावर हसावे की रडावे कळणे मुश्कील आहे. आपण बरे व्हाल की नाही कल्पना नाही पण आपल्याला चांगली देशप्रेमाचे धडे देणारी सून मिळो ही शुभेच्छा. आणि आपणास देशप्रेमी सून मिळाली तर देशप्रेमाच्या खालील युट्यूब तिच्यासाठी.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Sat, 09/08/2018 - 01:51 नवीन
त्याचा मराठी अनुवाद, 'देशभक्ती हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे' असा होतो.
सॅम्युएल जॉनसनच्या देशभक्तांनाच 'नीच' संबोधणार्‍या वाक्यावरील
अरेरे... आता हे मनोरंजक पातळीवरून विनोदीपातळीच्याही खाली घसरायला लागले की हो. लोक कुठल्या वाक्याचा काय अर्थ लावतील हे सांगणे अशक्यच आहे म्हणायचे. :) अहो ते "देशभक्ती" हा नीच लोकांचा शेवटचा आश्रय आहे असे वाक्य आहे हो. ते वाक्य देशभक्तांबाबत कसे काय असेल? ते नीच लोकांबाबत आहे ना? म्हणजे ज्या लोकांना आपला मुद्दा धड सिद्ध करता येत नाही तरीही तो त्यांना काहीही करून इतरांच्या मानगुटीवर बसवायचाच असतो तेव्हा तसे करण्यासाठी ते देशभक्तीचा ढोल शक्य तितक्या मोठ्याने वाजवतात असा काहीसा अर्थ मला तरी माहिती होता आजवर. कशाचा संबंध कुठे लागेल काही सांगता येत नाही बाबा. असो, चालूद्यात. जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, विश्वची माझे घर... :)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 09/08/2018 - 05:33 नवीन
....म्हणजे ज्या लोकांना आपला मुद्दा धड सिद्ध करता येत नाही तरीही तो त्यांना काहीही करून इतरांच्या मानगुटीवर बसवायचाच असतो तेव्हा तसे करण्यासाठी ते देशभक्तीचा ढोल शक्य तितक्या मोठ्याने वाजवतात....
एखादा मुद्दा देशभक्तीने सिद्ध होत नसेल तर त्या मुद्यावर टिका करा, देशभक्ताच्या देशभक्तीवर टिका करण्याचे प्रयोजन दिसत नाही. एखाद्या वाक्याचा लक्ष्यार्थ वाच्यार्थापेक्षा वेगळा असू शकतो हे तत्वतः मान्य, पण वाक्यातील 'भावार्थ' नावाचा प्रकार असतो , हे 'भावार्थ' वाक्याचे वजन वाच्यार्थाकडे आहे की लक्ष्यार्थाकडे आहे हे ठरवत असावेत. एका बोटाच्या थुंकीचा वास, दुसर्‍या बोटावरची थुंकी दाखवून जात नाही. कुणि कसेही मोजले तरी -'नीच लोकांचा शेवटचा आश्रय देशभक्ती आहे' असा बदल केला तरी-, सॅम्युएल जॉनसनचे वाक्यातील भावार्थ खर्‍या खुर्‍या देशभक्तांनाही 'नीच'च संबोधतो; किंवा किमान स्तरावर, 'नीच लोक स्वतःस देशभक्त समजतात' असे म्हणत कळत-नकळत, देशभक्त म्हणवणार्‍यां प्रामाणिक देशभक्तांनाही नीचलोकांच्या पारड्यात तोलतो किंवा कसे. आपल्या युक्तीवादात संबंधांची गल्लत होत असली तरी, "जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, विश्वची माझे घर" स्विकारत मनमोकळा संवाद साधलात त्यासाठी अनेक आभार. :)
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 08/24/2018 - 05:45 नवीन
मागा जी , मेमन साठी रात्री न्यायालय उघडायला लावणारे , अफजल गुरू ला शाहिद घोषित करून भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणारे , 60 वर्ष दाढ्या कुरवाळून जम्मू काश्मीर मधील हिंदू ना देशोधडीला लावणाऱ्या रागा च्या अल्पसंख्याक संकरित घराण्याची वकिली करणारे , 8 / 10 मुलं असतांना 2 मुलं असून इमानदारीने टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशातून गॅस सबसिडी घेणारे , आसाम / बांगलादेश मध्ये घुसखोरी करून त्या राज्याची राजकीय , आर्थिक परिस्थिती कोलमडून पडण्यास कारणीभूत ठरणारे आणि दाऊद /सिमी /लष्करे तैययब च्या स्लीपर सेल ला पोसणारे यांच्या आणि त्यांची वकिली करणाऱ्या कडून तुम्ही देशभक्ती ची अपेक्षा करताय ? कमाल आहे राव तुमची . अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाखाली देशाचे वाटोळे करण्यास उत्सुक असलेली ही जमात टॅक्सपेयर च्या पैशातून उच्चशिक्षण घेऊन देश आणि देशातील जनतेचीच मारायला निघाले आहेत . फुकट भेटणाऱ्या उच्च शिक्षणातून देशाची सेवा करणे दूर स्वतःची आर्थिक प्रगती तरी करायला पाहिजे पण नाही उलट उच्च शिक्षणाचा उपयोग देशविघातक कारवाया मध्ये करतात . कुठलाच पक्ष परिपूर्ण असू शकत नाही , म्हणून भाजपच्या ही चुका होत असतील पण भाजप वाले देशद्रोही गद्दार लोकांना पाठीशी घालणार नाही आणि याच कारणासाठी विरोधकांनी कितीही कोल्हेकुई करू द्या सामान्य मतदार निवडणुकीत उमेदवाराची जात न बघता भाजप च्या पाठीमागे खंबीर उभा असतो .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 08/24/2018 - 08:23 नवीन
सहमत आहे, देशद्रोहींना देशप्रेमाबाबत तडजोद होत नाही हे सुनावत, राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी सकारात्मक राजकीय दबावाची योगदानाच्या भूमिकेचे स्वतःचे महत्व नक्कीच आहे. देश विघटनाचे समर्थन करणार्‍यांपेक्षा, बाकी हजार उणिवा असलेले देशप्रेमी परवडतील.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/24/2018 - 08:42 नवीन
विद्यमान सरकारवर तिखट टीका करणे हे मान्य आहे. नोटबंदी, जीएसटी, विफल झाले मोदी सरकार हे साफ अयशस्वी आहे हे कुणाचे वैयक्तिक मत असू शकते तो लोकशाहीचा भाग आहे. परंतु फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे हे अजिबात मान्य होणार नाही. पुरोगामी म्हणवण्यासाठी असल्या हलकट लोकांची साथ देणारे लोक सुद्धा देशद्रोहीच आहेत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 08/24/2018 - 09:18 नवीन
सौ टके की बात ! डॉ. सुबोधजी, देशप्रेम हृदयात बाळगणार्‍या आणि देशप्रेम व्यक्त करण्यास न लाजलेल्या प्रत्येकास, त्या प्रत्येकात देशप्रेम जागवलेल्या प्रत्येकास माझे शत शत प्रणाम ! ज्यांना देशप्रेमव्यक्त करण्यासही लाज वाटते असे आपलेच फितुर बांधव पाहीले की, आपल्या मनात देशप्रेमाची ज्योत जागवणार्‍यांबद्दलचा आदर शतगुणित होतो. देशप्रेम जागवणार्‍यांचे महत्व अधिक ठळक होते. फितुरांना सामील होणार्‍या देशबांधवांना देशप्रेमाची महती समजावून देण्यात आपण कमी पडतो आहोत याचा दुसरीकडे नाही म्हटले तरी अल्पसा खेदही वाटतो. देशप्रेमाची भाषा बोलताना त्वेश जागा झाला नाही, दगाबाजांशी संवाद करताना शब्दात कठोरता आली नाही तर ते देशप्रेम कसलं ? एखादा माठ नीट भाजलेला आहे की नाही ते त्यावर लाकडाने टपली मारुनच तपासले जाते, संत मुक्ताईने संत नामदेवांची शब्दशः अशी परिक्षा घेतली तशी देशप्रेमाचे मडके नीट भाजलेले आहे की नाही याची परीक्षा घेण्यात काही वावगे नाहीच प्रसंगी अशी कठोरताच देशाला सुरक्षीत ठेवत असते. आपण म्हणता तसे प्रांजळ्पणे सांगतो, माझा अलमोस्ट लिहून तयार असलेला पुढचा लेख परंपरावादातील काही नाजूक भूमिकांची चिकित्सा करणार आहे. पण अशी कोणतीही चिकित्सा करतो म्हणजे मला देशप्रेम व्यक्त करण्याची लाज वाटणे शरमेचे ठरेल, हे तथाकथित पुरोगाम्यांना समजत नसेल असे नाही पण संकुचित-हित्संबंध आणि राजकीय भूमिकांचे चष्मे एवढे प्रीय झालेले असतात की संत मुक्ताई प्रमाणे प्रसंगी टपली मारुन काजवे चमकवले जात नाहीत तो पर्यंत सूताचा गूणही देणे अवघड असावे.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 08/24/2018 - 10:44 नवीन
ही वरची टिप्पणी तुंम्ही नक्की कोणावर अाणि कोणत्या मुद्दयावर केली अाहे, ते स्पष्ट केले तर बरे होईल. मी या संपूर्ण चर्चेत फक्त नोटबदलीविषयी मत मांडले होते. इतके उपप्रतिसाद अाले अाहेत, की नक्की तुंम्ही कोणाच्या मुद्द्यावर हे बोलला अाहात समजत नाही.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 08/24/2018 - 19:11 नवीन
देशाच्या न्यायालयाने अजून देशद्रोही ठरवलेले नसताना न्यायालयापेक्षा स्वतःला जास्त शहाणे समजणार्‍यांना व देशाच्या नागरिकांचा अपराध सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जाण्याचा हक्क मारणार्‍यांनाही देशद्रोही म्हणले पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 08/25/2018 - 05:12 नवीन
ननिजी, मी जिएनयु प्राध्यापकांच्या नेमक्या निसटत्या बाजूंवर सविस्तर प्रतिसाद मालिका मागे लिहिली आहेत. नेमकी भूमिका तुम्हाला शोधून वाचावी लागेल. जिएनयु काही क्षण बाजूस ठेवा. इन एनी केस जादवपूर प्रकरण सुस्पष्ट उदाहरण आहे. जादवपूर प्रकरणावर आपण तथाकथित पुरोगामी तोंड का उघडत नाही. जादवपुरच्या बाबतीत न्यायालयातून कारवाईस स्वतः कथित पुरोगाम्यांनीच पुढाकार घेऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. शहाबानो केस नंतर न्यायालयीन आणि राज्यघटना उत्पातमुल्य आणि मतपेटीच्या जोरावर धाब्यावर कशी काय बसवली गेली ? त्यावेळी तथाकथित पुरोगाम्यांनी आणि धर्मांधांच्या पाठीराखे स्वतःस केवळ न्यायालयांपेक्षा शहाणेपद घेतले नाही भरतीय राज्यघटनेचे हरण केले आणि जे खरोखर देशप्रेमी असतात ते राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेची आपोआप बूज राखतात राज्यघटनेची फसवणूक करत नाहीत. जिथून राज्यघटनेला वाकवणार्‍या चुकीच्या मार्गांची सुरवात झाली त्या घटनात्मक उद्दीष्टांचे आधी पुर्नस्थापन करावे आणि मग प्रतिपक्षाला व्याख्याने द्यावीत. देशाच्या एकतेची आणि देशप्रेमाची अपेक्षा करणार्‍यांच्याही लेजीटीमेट अपेक्षा असतात सर्व कायद्यात राष्ट्राची एकसंघता सर्वोच्च प्राधान्याची असते ती देशप्रेमीव्यक्तींच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते हे मी वर स्पष्ट केलेच आहे. बाकी उर्वरीत शंकाना माझे आधीचे प्रतिसाद पुरेसे आहेत. अहिंसेच्या अपेक्षेबाबत माझा वेगळा पूर्ण लेख लौकरच येईल.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 08/24/2018 - 19:26 नवीन
फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे हे अजिबात मान्य होणार नाही. पुरोगामी म्हणवण्यासाठी असल्या हलकट लोकांची साथ देणारे लोक सुद्धा देशद्रोहीच आहेत.
आता आपण कोण? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश?? जर नसाल तर आपले शिक्के आणि प्रमाणपत्रे आपल्याजवळ ठेवा! कोणता चष्मा घालून कुठल्या प्रतिसादात फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण समर्थन दिसले ते स्पष्ट दाखवून द्या. पाल्हाळ नको उगीच! सरकारची तळी उचलायला कोणाची ना नसेल पण उठसुठ "देशातल्या इतर नागरिकांना" हलकट, देशद्रोही शिक्के मारणारे लोक सुद्धा देशद्रोही का म्हणू नयेत?(मी असली पांचटगिरी करणार नाही पण इथल्या काही आयडींना देशद्रोह कावीळ झालेली दिसतेय त्याच लायनीवर हे पण!) आपल्या आवडत्या पक्षाने फुटीरतावादाला समर्थन असणाऱ्यांसोबत "सत्तासोबत" केली तरीही ते मात्र याना चालते!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/25/2018 - 05:40 नवीन
मी एक सामान्य नागरिक आहे. ज्याने आपल्या तारुण्याची २२ वर्षे लष्करात काढलेली आहेत. काश्मीर, पूर्वांचलातील फुटीरतावाद म्हणजे काय हे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय आणि अनुभवलंय. वरील दोन वाक्ये यात सुद्धा तुम्हाला पक्षीय दृष्टिकोन दिसतोय? ती वाक्ये द्वेषाने तुम्ही तुम्हाला म्हणालो आहे हे गृहीत धरून असे प्रतिसाद देताय. आपला दृष्टिकोन भाजप द्वेषाने किती भरलाय कि सध्या सरळ दोन ओळीतही तुम्हाला पूर्वग्रह दिसतोय? आपल्या समोर एखादा राष्ट्रध्वज जाळत असेल किंवा देशविरोधी घोषणा देत असेल तर न्यायालयाने त्याला दोषी म्हणे पर्यंत तुम्ही वाट पाहणार का? किंवा याकूब मेमनला फाशी झाली याबद्दल निषेध करणारे मेणबत्त्या जाळणारे पुरोगामी हे देशद्रोही नाहीत का? उगाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी काहींच्या काही
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 08/27/2018 - 00:37 नवीन
काही गोष्टी स्पष्ट बोलणेच आवश्यक असते! म्हणून मी तुम्हाला धाग्यावर कोणी या गोष्टींचं समर्थन केलं आहे का स्पष्ट विचारलाय. तुमच्या प्रतिसादावरून हे दिसून येतंय कि किमान तुम्ही या धाग्यावरच्या प्रतिसादांच्या रोखाने बोलत नाही आहात. काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधू नयेत म्हणून हे करावं लागलं. वाईट वाटल्यास माफी असावी. या धाग्यावर माहितगार नामक आयडी कोणालाही देशद्रोही ठरवू पाहत आहे. (सध्या मी रडार वरती आहे) तुम्ही दिलेल्या प्रतिसादामध्ये "फुटीरतावादी" हा शब्द आहे त्यावर इथे काहीच चर्चा झालेली नाहीये पण "देशद्रोही" हा शब्द इतका कॉमन करून टाकलाय या लोकांनी कि उद्या कोणालाही देशद्रोही ठरवून टाकतील. (जसे आत्ताच मला ठरवायचं चाललंय) तुम्ही सैन्यदलात सेवा केली आहे त्याबद्दल आदर ठेऊन देखील मी हेच म्हणेन कि "देशद्रोही" ठरवायचं अधिकार हा न्यायालयाचा आहे. तो कोणत्याही सामान्य माणसाच्या हातात बिलकुल देऊ नये आणि तशी पद्धत देखील पाडू नये.
"आपल्या समोर एखादा राष्ट्रध्वज जाळत असेल किंवा देशविरोधी घोषणा देत असेल तर न्यायालयाने त्याला दोषी म्हणे पर्यंत तुम्ही वाट पाहणार का?"
भारतात सध्या एकमेकांवरच्या संशयातून जे मॉब लीचिंग होत आहे त्यात लोकांचे जीव जात आहेत. जर उद्या कोणाबद्दल तो देशद्रोही असल्याची बातमी पसरवली गेली आणि दुर्दैवाने स्वतःला देशभक्त समजणाऱ्या लोकांकडून त्याचे काही बरे वाईट झाले आणि नंतर कळून आले कि तो देशद्रोही वगैरे नव्हता तर झालेलं नुकसान कोण आणि कसे भरून देईल? माहितगार यांनी आधीच्या धाग्यावर चक्क झुंडशाहीचे समर्थन केले आहे. आणि अशा प्रवृत्तींना माझा कायमच विरोध राहील. ते संभाषण खाली देत आहे त्यांना माझा प्रश्न होता :
याशिवाय इतकाच निषेध म्हणत असाल तर हातात झेंडा घेतलेल्या वकिलांनी आणि जमावाने "न्यायालयाबाहेर" निवाडा होण्याआधीच त्याला बदडले त्याच काय? न्यायालयाने असे प्रकार रोखायला हवेत असे सांगून पण पुन्हा मारहाण झाली त्याच काय? जेन्यू च्या विद्यार्थ्याला भाजपच्या विधायकाने भर रस्त्यात लाथा घातल्या होत्या, बंदूक असती तर गोळ्या घातल्या असत्या असेही म्हणाला होता त्याच काय? हे सगळे संविधानाला अनुसरून वाटते का? हे समाजात भीती पसरवणारे वाटत नाही?
त्यावर माहितगारांचा प्रतिसाद:
कायदा त्याची वळणे घेतो. समाजाला एखादी गोष्ट रुचली नाही तर दबाव पडणे सहाजिक आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल असे कसे समजावे."
हेच बघा कि इथेच कोणीतरी "भारतचा झेंडा कोणा मुसलमान मुलाने फाडला" असा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. नंतर कळले (पुम्बा यांनी बातमीची लिंक देखील दिलेली आहे) की तो मुलगा मुसलमान नव्हताच! दुसऱ्याच कोणत्या जातीचा होता. पण हे माहित नसताना लोकांनी मुसलमानांबद्दल हेट कमेंट्स दिल्या, दुर्दैवाने दंगल वगैरे झाली असती तर कोण जबाबदार मानायचे? जर कुठे काही आक्षेपार्ह दिसले तर सामान्य माणसाने पोलिसांना कळवावे आणि जे काही पुरावे असतील ते सुपूर्त करावेत. पोलीस आणि न्यायालय तिथून पुढचे काम करेल. आणि आपण आपले काम करू शकू. मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस पूर्णतः बंद व्हायला पाहिजे. बिहार मधल्या घडलेल्या घटनेचं वृत्तांकन पाहिलं पर्वा आणि सुन्न व्हायला झाल. तरुणांना शिक्षण, नोकरी आणि जबाबदारी असणे किती गरजेचे आहे नाही तर समाजाचे अधःपतन किती होऊ शकते ते पहा. पहिले ४-५ मिनिटच बघून नको होत...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/27/2018 - 06:06 नवीन
मीडिया ट्रायल आणि मॉब जस्टीस पूर्णतः बंद व्हायला पाहिजे. पूर्ण सहमत बाकी मेगाबायटी प्रतिसाद मी वाचतच नाही( कुणाचेही असो) तेंव्हा त्याबद्दल काही बोलणे नाही
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 09/02/2018 - 14:04 नवीन
@ शब्दबम्बाळ आपण स्वतः माझे वाक्य अर्धवट क्वोट केलेत, सांगण्याचा मुद्दा हा की तथाकथित पुरोगामी आगीत तेल ओतण्यात परंपरावाद्यांपेक्षा अगदी पुढे असतात. वरच्या प्रतिसादातील भोजपूर बातमीचा देशप्रेम विषयक उपरोक्त चर्चेशी अन्योन्य संबंध नाही. संबंध नसलेली बातमी क्वोट करण्या इतपत आपणास अनावर होते. मी अशा अनावर होण्याचे समर्थन करत नाही, पण 'आमचे अनावर होणे इतरांच्या अनावर होण्यापेक्षा अधिक चांगले', हा तथाकथितांचा दुटप्पीपणा आहे त्या बद्दल साशंकता आहेत. जादवपूर विद्यापीठातील देशाच्या एकतेची जी थट्टा केली गेली त्या बद्दल प्रश्न उपस्थित करुनही त्याबाबत पाळले गेलेले मौन सहज दिसते. असाच प्रकार याकुब मेमनच्या फाशीचा काही अती शहाण्यांनी विरोध केला, फाशीस तत्वतः विरोध असेल तर, फाशीच्या शीक्षेचा इतर वेळी विरोध करता आला असता ना पण तो नेमका याकुब मेमनच्या बाबतीत करणे कित्पत औचित्यास धरुन होते. हे सर्व समाज बघत असतो. मग समाजाचा राग कुठेतरी अनावर होतो , हे सामाजिक राग अनावर होण्याचे समर्थन नाह, समजून घेणे आहे, हे लक्षात घ्यावे. देशप्रेमाच्या विषयाचा खेळ करण्यात काही प्राध्यापक मंडळींच्या भूमिका साशंकीत असाव्यात ह्या बाबत मी मागच्या पहिल्या चर्चेत काय विश्लेषण केले ते आपण शोधण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नसताना आउट ऑफ काँटेक्स्ट अर्धवट विधान नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. झूंडशाहीचे समर्थन करतो असे मी कुठेही लिहिलेले नाही. ' कायदा त्याची वळणे घेतो' हे आधी लिहिलेले आहे. खासकरून देशप्रेमासारख्या गोष्टींबाबत खेळ होतो तेव्हा समाज हातावर हात ठेवून बसेल हि अपेक्षा अवाजवीच आहे - हे लिहिले म्हणजे झूंडशाहीचे समर्थन केले असा होत नाही, देशप्रेमावर सावट आले तर देशप्रेम व्यक्त करुन मोकळे होणे हा राजमार्ग आहे, हे मत त्या आणि या धाग्यात मी व्यक्त केले ते आपण लक्षात घेऊ इच्छित नाही ही आपली समस्या आहे. झेंडा प्रकाराबद्दलची माझा प्रतिसाद 'रचनात्मक सकारात्म्क मत परिवर्तन कसे करता येईल ' असा आहे. यात तुम्हाला कुठे झुंडशाही सुचवलेली दिसते का ? प्राध्यापकांच्या निसटत्या बाजूंबद्दल संताप व्यक्त केला पण सोबत गांधींसारखा अहिंसावादी आहे हे लिहिले त्याकडे आपण सोईस्कर डोळे झाक केली हि तथाकथीत पुरोगामींची समस्या आहे. देशप्रेमाचे मनमोकळे व्यक्त करायचे नाही तर टिका होणार मग नंतर स्वतःच गुंता करुन खुंतण्याला अर्थ नसतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 09/02/2018 - 18:42 नवीन
जिएनयुतील तुकडे तुकडे गँग काश्मिर बाबत काय म्हणताहेत युट्यूबवर पहा ( देशाच्या अंखंडते इतकी विरोधी भूमिका आहे की मी युट्यूब इथे जसाच्या तसा जोडणे शहाणपणाचे समजत नाही) तथाकथित प्राध्यापक निवेदीता मेनन ; तथाकथित विद्यार्थी उमर खालीद
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 08/25/2018 - 07:38 नवीन
...आपल्या आवडत्या पक्षाने फुटीरतावादाला समर्थन असणाऱ्यांसोबत "सत्तासोबत" केली तरीही ते मात्र याना चालते!
आता आपणसुद्धा न्यायालयीन निर्णयाचा दाखला दिलेला आहे असे दिसत नाही. अगदी बरोबर फुटीरतावाद्यांबद्दलची 'सत्तासोबत' चुकत असेल तर -अशा परिस्थितीस कारणीभूत झालेल्या- फुटीरतावाद्यांचे गुरुजन आणि त्यांनी आधार घेतलेले शब्द-ग्रंथ प्रामाण्य हे ही प्रश्नांकीत व्हावयास हवे ना ? आणि हि वस्तुस्थिती पाठीशी घालणार्‍यांनाही प्रश्नचिन्हांकीत केले जावयास हवे ना ? आणि प्रश्नस्थिती या पेक्षा हाता बाहेर गेल्यावर उपस्थित करायचे की आधीच उपस्थित करणे उत्तम ? बाकी विशीष्ट बाजुच्य राजकीय समर्थनात रस नाही तरीपण जो पर्यंत देश विघटनाचे समर्थन होत नाही तो पर्यंत तात्पुरत्या राजकीय तडजोडी रास्तही असू शकतात.
....उठसुठ "देशातल्या इतर नागरिकांना" हलकट, देशद्रोही शिक्के मारणारे लोक सुद्धा देशद्रोही का म्हणू नयेत?
खर्‍यांचे लेखनात हलकट हे विशेषण 'फुटीरतावाद्यांना साथ देणे, देशद्रोह्यांची भलामण करणे ' यासाठी आलेले दिसते आणि देशद्रोह्यांची साथ देणार्‍यांना देशद्रोही म्हटले आहे. देशद्रोह्यांची साथ देणारे देशद्रोहीच असतात की अजून वेगळे काही असतात ? आणि 'देशातल्या इतर नागरीकांनी', त्यांनी असे काही म्हटलेले नसताना आपण असा जावई शोध लावू शकता, -कावीळ पांचटगिरी नेमकी कुठे होते हे लक्षात यावे म्हणून इतर वाचक आणि आपल्या स्वतःच्या सोयीसाठी नोंदवून ठेवतो.
...पाल्हाळ नको उगीच!
जोपर्यंत मिपाधोरणात बसते तो पर्यंत उत्तरांची लांबी आणि शैली सांगणारे आणि चर्चा व्यक्तिगतते नेणारे आपण कोण ? पाल्हाळ आहे की नाही वाचायचे की फाट्यावर मारायचे जो तो वाचक ठरवेल, नको म्हणणारे आपण कोण ?
आता आपण कोण? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश?? जर नसाल तर आपले शिक्के आणि प्रमाणपत्रे आपल्याजवळ ठेवा!
देशप्रेम्यांचा देशावर पहिला आधीकार असतो आणि देशद्रोहावर आक्षेप घेणे आणि देशावर वेळ आल्यास प्रसंगी प्राणांची बाजी लावणे हे देशप्रेम्यांचे कर्तव्यही असते. विसृत चोख उत्तर आधीच्या प्रतिसादांमधून दिलेले आहेच. तरीही खरे स्वतःला सामान्य नागरीक म्हणून घेतात हि त्यांच्या मनाची मोठी बाजू . आता इतर संबंधीत मुद्द्यांवर येऊ, सलमान खानच्या देशप्रेमा बाबत शंका नाही, एक उदाहरण म्हणून सलमानखान न्यायालयातून सुटून येत नाही तो पर्यंत तो आरोपी असतो, आणि सुटल्यावर .. काय ते आपल्याला माहितच असावे. खाली संविधानाच्या अवमानने बद्दल आपण लिहिले आहे आणि त्याबाबतही पोलीस चैकशी आणि कारवाई व्हावी अशी आपली किंबहूना इतरांचीही अपेक्षा असणारच, न्यायालयातून मुक्तता होई पर्यंत त्यांच्यावर होणार्‍या पोलीस कारवाईवर आक्षेप घेण्यास कारण नसावे तसे जिएनयु प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयातून निर्दोषमुक्त होई पर्यंत पोलीस कारवाईच्या नावाने शंख करण्याचे काही कारण नसावे, आणि आरोपींना आरोपी म्हणण्यासही. ज्यांच्यावर न्यायालयातून ठपका नाही त्यांची सोशल मिडिया आणि मिडीयातून बदनामी करताना तथाकथित पुरोगामी एकतर्फीपणा करतात की नाही हे चष्मेलावलेले स्विकारतील अथवा न स्विकारतील तटस्थ प्रेक्षक आणि तटस्थ विश्लेषकांना हे व्यवस्थीत दिसत असते. आता पुढच्या मुद्याकडे येऊ जि एन यु बाजूस ठेवा, पाठीशी घातल्यावर काय होते त्याचे जादवपुर प्रकरणातील कायद्याची मस्करी जिवंत उदाहरण होते, जादवपूर प्रकरणात काहीच कारवाई कशी काय झाली नाही ? कायदे कमी पडले की आमच्या देशभक्तीची प्रमाणपत्रे मागू नका म्हणणारे कमी पडले ? जादवपूर वाल्यांनी जादवपूर प्रकरणात शासकीय अथवा न्यायालयीन कारवाई करण्याचे कायदे कमी पडत असतील तर कायदे बदलण्याचे केंद्रीय भाजपा अथवा स्थानिक भाजपा कडूनही फारसे काही दिसले नाही त्यास तथाकथित पुरोगाम्यांचा भाजपा समर्थक विरोधी अवास्तव गोबेल्स प्रचार कारणीभूत ठरला नाही असे कसे म्हणावे ? जादवपुर प्रकरणात देशाची थट्टा टाळण्यात कायदे कमी पडले असतील तर संबंधीत कायद्यत सुधारणेचे समर्थन आपण करता का ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/22/2018 - 14:16 नवीन
भाजप सरकार अपयशी आहे असा प्रचार किती ही काँग्रेस च्या लोकांनी केला तर मतदार त्यांना फाट्यावर मारतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे , शिवाय चौकट राजा रागा सारखा एक ही ' विशेष ' माणूस भाजप मध्ये नाही ही जमेची बाजू .
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Tue, 08/21/2018 - 15:14 नवीन
दोन महिन्यांपूर्वी महिलांच्या सुरक्षितता वरून कानउघाडणी करणाऱ्या वर्ल्डबँक ने आता GDP बद्दल भारताची पाठ थोपटली आहे म्हणून जनतेत संभ्रम पसरवण्या करिता काँग्रेस चे स्वपार्श्वलाल प्रवक्ते सुरजीत वाला काँग्रेस ने न केलेल्या कामगिरी बद्दल ' आमच्या काँग्रेसची च लाल ' म्हणवून घेत आहेत .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 08/21/2018 - 15:40 नवीन
..........If one looks at the per capita income levels, India is far behind many countries whom we have beaten on the GDP growth rate. Take France for instance. India has an estimated per capita income of $7,060 while France has $43,720, some six times more than that of India. India is ranked at the 123th position when it comes to per capita income at PPP while France is in the 25th position. For the record, China, which has a population of 1.4 billion has a per capita income of $16,760. Perhaps, the governments, both UPA and NDA, are too fixated on the GDP figures and less on the broad-based economic recovery that can bring in actual changes for the common man on the ground.... संदर्भ GDP game: How to cherry-pick your.. Dinesh Unnikrishnan.
युपीए २ मध्ये कथित विकास दर अधिक असूनही कदाचित महागाईच्या बडग्याने आणि 'कॉमन'-वेल्थच्या प्रभावाने युपीएला पराभव पत्करावा लागला असे काही झाले का ठाऊक नाही . ज्यांच्या हाती नौकर्‍या नाहीत, शेती आणि उद्योग चालवण्यासाठी व्याजदर अवास्तव आहेत त्यांना या जिडीपी विवादातून कोणत्याही एका पक्षाबद्दल प्रेम उत्त्पन्न होण्याची शक्यता तुर्तास कमी असावी.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 08/21/2018 - 20:44 नवीन
जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेब, दलित आणि आरक्षण विरोधी नारे दिले गेले! तरीही मिपावर काहीच घडोमोडी नाहीत? इतर वेळेस देशद्रोह ठरवायला पुढे असलेले सगळेच गायब! महाराष्ट्रात ATS ने धडक कारवाई करत बॉम्ब आणि इतर शस्त्रांसहित काही संशयित लोकांना अटक केली आणि त्यांचा दहशतीचा डाव उधळून लावला, त्याबद्दल अभिनंदन करायचे राहिले बाजूला केवळ ते लोक हिंदू आहेत आणि ठराविक हिंदू संघटनांशी संबंधित आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला गेला! त्याच कारवाई मधून दाभोलकरांच्या खुनामधील संशयित देखील पकडला गेला आहे. सचिन अंदुरेच्या मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल जप्त; या पिस्तुलानेच दाभोलकरांची हत्या? काय होणारे पुढे काय माहित अजून...
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/22/2018 - 13:59 नवीन
संविधान जाळणारे माथेफिरू होते आणि त्या कर्तृत्वाच्या समर्थनार्थ संपूर्ण ब्राह्मण समाजाला ओढू पहात होते , पण ते विसरले की ब्राह्मण ला कट्टर विरोध फक्त ब्राह्मण च करू शकतो . गावोगावी भाजप कार्यकर्त्यांनी ऑन दी स्पॉट सेल्फ डिसीजन घेऊन कार्यवाही करत दलित अत्याचार , गाईंच्या वाहतूक करणाऱ्याच्या केलेल्या हत्या या गोष्टी मूळे भाजप ची प्रतिमा थोडी मळलेली होती , म्हणून 2019 मधील निवडणूक मध्ये पक्षाच्या उजळ प्रतिमे साठी ATS कारवाई मध्ये काही प्याद्यांचा बळी दिला गेला का ? . सुब्रह्मण्यम स्वामीनीं गांधी राजघरान्या वर टाकलेली नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चे केस सोडता गेल्या चार वर्षात कॉ व राकॉ ने केलेल्या भ्रष्टरचाराचे कुठलेही प्रकरण बाहेर काढले गेले नाही . देशातील बावळट जनतेने बच्चन प्रमाणे दोन्ही काँग्रेस ची गाडलेली गाठोडी बाहेर काढतील या आशेने मोदी व फडणवीसांना भरभरून मते दिली , पण गेल्या चार वर्षात एक ही गाठोडे बाहेर निघाले नाही . बाकी फक्त हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या दाभोळकर व पानसरे केस माझ्या तर्फे फुल इग्नोर साईड ट्रॅक ,कारण त्यावर बोलणे म्हणजे तिकीट काढून ओ माय गॉड आणि पी के सिनेमे बघणे .
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 08/23/2018 - 04:23 नवीन
जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली गेली, बाबासाहेब, दलित आणि आरक्षण विरोधी नारे दिले गेले! तरीही मिपावर काहीच घडोमोडी नाहीत? इतर वेळेस देशद्रोह ठरवायला पुढे असलेले सगळेच गायब!
कारण देशप्रेम, घटनेचा आदर, समान नागरिक वगैरे फक्त सत्ता मिळवण्यापुरतंच आहे हे उघड बोलायचं नसलं तरी बहुतेक "देशप्रेमी" मंडळींना चांगलंच माहित आहे. खरा अजेंडा वेगळा आहे आणि त्या दिशेने हळू हळू पण दमदार वाटचाल चालू आहे. मध्ययुगीन काळात जेव्हा "खरी घटना" लागू होती आणि शोषण करायचे जन्मजात अधिकार होते ते खरे अच्छे दिन! ते परत आणायला हवेत ना!
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 08/23/2018 - 05:46 नवीन
मुस्लिम मुलाने झेंडा फाडल्याच्या व्हिडियोमागील सत्य. https://www.thequint.com/news/webqoof/fake-news-boy-tears-indian-flag-pakka-muslim-hoon
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 08/23/2018 - 15:12 नवीन
खरं म्हणजे कन्हैया ने वक्तव्य केले आहे त्याच्या अगदी उलटा अर्थ निघतो . ' आता पर्यंत कन्हया ने कित्तेक वेळा मोदींना चावण्याचा प्रयत्न केला , पण मोदींनी त्याला एकदाही प्रतिसाद न दिल्या मूळे तो पिसाळलेल्या कुत्र्या सारखा चावत सुटला आहे . नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण Updated: Aug 23 2018 04:50 p.m. | Written by लोकसत्ता ऑनलाइन कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही असं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कन्हैय्या कुमार यांनी दिलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये कन्हैय्या कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना असं विचारण्यात आलं की, "तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?". या खोचक प्रश्नाला तितकंच तिरकस उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी ही प्रसिद्धी मिळण्यासाठी किती गमवायला लागलंय याचा दाखला दिला. अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असे अनेक दाखले देत ही प्रसिद्धी खडतर असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदींसंदर्भात कन्हैय्या कुमारनी दिलं चावणाऱ्या कुत्र्याचं उदाहरण https://www.loksatta.com/mumbai-news/kanhaiyya-kumar-gave-reference-of-dog-byte-while-speaking-about-narendra-modi-1736997/ जाता जाता कन्हैया साठी एक सुभाषित : - मच्छर आपल्या गाडीला चावू शकतो पण आपण मच्छर च्या गाडीला चावू शकत नाही .
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 08/24/2018 - 18:29 नवीन
नमो फेब्रुवारी २०१९ पर्यंत देशातील सुमारे पन्नास पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे स्वतः उदघाटन करणार आहेत. जनता अगोदरच त्यांच्या हातवार्यांना, थापांना आणि रेकून बोलण्याच्या शैलीला कंटाळली आहे. या पन्नास कार्यक्रमांमुळे ती पूर्ती वैतागून जाऊन त्यांना बहुतेक घरी पाठविलं.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/24/2018 - 23:34 नवीन
केरळ राज्यात आलेल्या भयानक पुरामुळे मनुष्यहानी व बरीच मालमत्तेची व वित्तहानी झाली आहे. केरळ सरकारच्या नविन अनुमानाप्रमाणे वित्तीय हानी २०,००० कोटीच्या घरात गेलेली आहे. केरळ राज्य सरकारच्या चुकीच्या हाताळण्यामुळे पुर परीस्थीती काबु बाहेर गेली अस केरळातले लोक बोलुन दाखवत आहे. व्यवस्थीत नियोजन न केलल्यामुळे केरळ राज्यात ईतकी वाईट परिस्थीती उत्पन्न झाली. मुळ्ळ्पेरीयार नावाच्या धरणातल्या पाण्याच्या पातळीत धोकादायक लेव्हल पर्यंत वाढ झाल्याने धरणाची झडपे उघडली, त्यामुळे पुर परीस्थीती तयार झाली. धरणाची झडपे उघडताना नागरीकांना कोणतीही धोक्याची सुचना दिली नव्हती त्यामुळे येणार्या परिस्थीतीला सामोर जाण्यास नागरीक तयार नव्हते. ह्या पुरात बरीच मनुष्य हानी झालेली आहे. पण ह्या सर्वांना राज्य सरकार व जवाबदार अधिकारी कधीच पकडले जाणार नाहीत. ह्या प्रकरणात केंद्र सरकारने केरळ राज्याला ६०० कोटी रु ची सहाय्यता घोषीत केली, भारतातल्या बर्याच राज्य सरकारांनी आपापल्या परीने सढळ हस्ते मदत घोषीत केलेली आहे. देश विदेशातल्या उद्योजकांनी, केरळ, तामिळ सिने तारकांनी सुद्धा भरघोस मदत केलेली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत केरळ सरकारला दिलेला निधी विना वापर पडुन आहे, त्याचा ताळेबंद केरळ सरकारकडुन केंद्र सरकारला दिलेला नाही ना , ही रक्कम केंद्र सरकरला परत करण्यात आलेली आहे. तो निधी कित्येक हजार कोटीच्या घरात आहे. पण केरळ सरकारला केंद्र सरकार कडुन आता वेगळे २०,००० कोटी हवे आहेत. यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसने जाहीर केली . पण अशी कोणतीही घोषणा यु ए ई ( दुबई ) देशाने केलेली नसल्याचे यु ए ई च्या सरकारी प्रवक्त्याने सांगीतले आहे. मुख्यमंत्री विजयन ह्यांना ह्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी सांगीतल की यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार अशी माहिती युएईतल्या अनिवासी व्यावसायीकाने त्यांना दिली होती. भारत सरकार गेले दोन दशक पेक्षा जास्त वेळेपासुन "कोणत्याही नैसर्गीक विपत्तीच्या परिस्थीतीत केंद्र सरकार विदेशी आर्थिक मदत स्विकारणार नाही " अस धोरण राबवत आहे. तरी सुद्धा भारत सरकार , यु ए ई ( दुबई ) देशाकडुन येणार्या ७०० कोटीची मदत केरळ सरकारला परवानगी द्यावी अशी केरळ राज्य सरकार गळ घालत होत. मुळातच यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार नसताना केरळ सरकारला कोणाकडुन ७०० कोटीची मदत अपेक्षीत होती ? पुर्ण गोष्टीची माहीती नसताना सुद्धा यु ए ई ( दुबई ) देशाकडुन येणार्या ७०० कोटीची मदत केंद्र सरकार नाकारत आहे अशी चुकीची माहीती मिडीया पसरवत होती. यु ए ई ( दुबई ) देश ७०० कोटीची मदत देणार नसल्याची नविन माहीती समोर आल्यावर केंद्र सरकारला ह्या प्रकरणात जाब विचारणार्या मिडीयाची आता दातखीळ बसलेली आहे. पुरग्रस्त राज्यात पैश्याचा अपहार कसा केला जातो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/65535609.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 08/25/2018 - 01:25 नवीन
गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत केरळ सरकारला दिलेला निधी विना वापर पडुन आहे, त्याचा ताळेबंद केरळ सरकारकडुन केंद्र सरकारला दिलेला नाही ना , ही रक्कम केंद्र सरकरला परत करण्यात आलेली आहे. तो निधी कित्येक हजार कोटीच्या घरात आहे.
ह्याचा उल्लेख दिलेल्या बातमीत नाही. ह्या माहितीचा सोर्स देता येईल का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/25/2018 - 10:20 नवीन
केरळला केंद्र सरकार सापत्न वागणूक देत आहे म्हणून आम्हाला अरब अमिरातीकडून पैसे पाहिजेत. 40% of Central funds unutilised, says CAG The latest report of the Comptroller and Auditor General of India on local self-government institutions in Kerala tabled in the Assembly on Monday has revealed that ₹1,263.5 crore of the ₹3,162.96 crore available for various Central schemes during the year ending March 2016 had been unutilised. https://www.thehindu.com/news/national/kerala/40-of-central-funds-unutilised-says-cag/article18526668.ece
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 08/25/2018 - 10:23 नवीन
तरी बरं या सर्व योजना गांधी नेहरू नावाच्या आहेत. संघ मोदी वाजपेयींच्या नावाच्या नाहीत. The unutilised funds mainly related to the Integrated Housing and Slum Development Programme (IHSDP), ₹358.02 crore, Indira Awas Yojana (IAY), ₹234.81 crore, Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission, ₹185.19 crore and the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, ₹131.57 crore.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 08/26/2018 - 06:44 नवीन
अत्यंत नालायकपणा व अकार्यक्षमतेचा कळस आहे हा केरळ सरकारचा. शिवाय युएईच्या मदतीच्या बाबतीतही खोटारडेपणा उघडा पडला आहे त्यांचा. इतकी साक्षरता असलेल्या राज्यात लोकांना सरकारचा खोटारडेपणा कळायला हवा खरं तर; पण मला बिलकुल आशा नाही. साक्षरच काय उच्चविद्याविभूषित लोकही वस्तुनिष्ठपणे विचार करु शकत नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे. तुमचेच उदाहरण घ्या ना. एक डॉक्टर, लष्करी अधिकारी व जग पाहिलेली व्यक्ती असूनही मोदीचा खोटारडेपणा तुम्हाला दिसत नाही. शेवटी धर्म व जात महत्त्वाची मानून लोक आपापल्या “तारणहारांना” पाठिंबा देत राहतात; पण ह्या तारणहारांची निष्ठा नक्की कोणाप्रति आहे हे तपासण्यासाठी सतत जागरुक राहून टीकाकाराची भूमिका घेतली पाहिजे हे विसरुन जातात. दैवदुर्विलास!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 08/26/2018 - 16:52 नवीन
इतकी साक्षरता असलेल्या राज्यात लोकांना सरकारचा खोटारडेपणा कळायला हवा खरं तर; केरळ राज्याचे आताचे मुख्यमंत्री पिणराई विजयन हे लँवलिन पॉवर केस मध्ये आरोपी आहेत !! ७०० कोटी रु भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे. ही केस ७-८ वर्षांपुर्वीची आहे. तरी सुद्धा अच्चुतानंदन सारख्या स्वच्छ पुर्व मूख्यमंत्र्याला डावलुन विजयन ह्यांना मुख्यमंत्री करण्यात आल ! केरळ राज्याच्या परंपरेनुसार दर पाच वर्षांने कॉंग्रेस व कम्युनीस्ट पार्टी सत्तेत असते. कम्युनीस्ट पार्टीमुळे राज्यात एकही उद्योग आलेला नाही. ईतके वर्षे केरळमधला सुशिक्षीत मध्यपुर्वेत काम करत आहे. त्यामुळे बेरोजगारी सारखे प्रश्न तिथल्या सत्तेत असल्यांना पडत नाहीत.पण येणार्या जागतीक बदलामध्ये तिथली रोजगार भरती कमी होत आहे !! पुढे येणार्या काळात मोठे प्रश्न केरळ राज्यासमोर येणार आहेत. अंधाधुंद माईनींग, जंगल तोड, बेजवाबदार अधिकारी व अत्याधिक पाउस ह्या मुळे केरळ राज्य पुरात संपुर्ण बुडाल ! फक्त दोन जिल्हे सोडुन संपुर्ण राज्य पुरात लोटले गेलेले आहे !
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 08/26/2018 - 19:28 नवीन
बेरोजगारीबद्दल तर सगळ्या भारतात हेच चित्र कमीअधिक स्वरुपात आहे. जे जे राज्यकर्ते बदलत्या काळाकडे दुर्लक्ष करतील त्या त्या ठिकाणी भयंकर कठीण काळ येणारच आहे. मुळात जगभर प्रोटेक्शनिजम व आत्यंतिक नॅशनलिजम यायचं यायचं कारण केवळ धर्मांधता किंवा सगळीकडे देशद्रोही वाढले अचानक हे नसून रिसोर्स टंचाई हे आहे. त्यामुळेच परदेशात नोकर्‍या मिळणे अवघड होणे, नवीन गुंतवणूक न येणे या गोष्टी होतात. २ कोटी रोजगार निर्माण करण्याची इच्छा असताना काही लाखांत रोजगार निर्माण होणे हे काय दाखवते? ह्यावर उपाय म्हणून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे व लहान-मध्यम उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने धर्म-जात, आपण आणि ते ह्या मुद्द्यांवरुन लोकांमध्ये भांडणं लावून काही मूठभरांची धन करण्याचे प्रकार चालू आहेत. अर्थात हे आत्ता कितीही माथेफोड करुन सांगितलं तरी समजण्याच्या मनस्थितीत कोणी नाही. ह्युमन इन्जेन्युइटी रिसोर्स टंचाईवर मात करेल ह्या आशेवर बसलेत आणि लोक. प्रत्यक्षात टोळ्या करुन स्वतःसाठी संसाधने मिळवणे हेच आणि एवढंच लोक करणार. सुरुवात मोठ्या टोळ्यांनी होईल आणि हळू हळू टोळ्या लहान होत जातील. त्यात ह्या नेसर्गिक आपत्तींचे खापर केवळ स्थानिक भ्रष्टाचारावर फोडले जातेय. पण क्लायमेट चेंजबद्दल कोणी बोलत नाहीय. मोदींचा विश्वास नाही क्लायमेट चेंजवर; पण भारताला त्याची झळ बसणार की नाही ते त्यावर ठरत नाही. इतर राज्यांमधे सगळं व्यवस्थित आहे असंही नाही. उत्तराखंडातल्या पुरावेळी दिसलंच. पण ह्या सगळ्याचा शांत डोक्याने विचार करता येईल अशी परिस्थितीच ठेवलेली नाही. फूट पाडून टोळीयुद्ध आधीच सुरु करण्याचे प्रयत्न जोरात सुरु झालेत.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 08/26/2018 - 15:43 नवीन
खरे साहेब बुलेटप्रूफ जॅकेट घालून बसा !!!!!! तीर सुटले आहेत . टॅक्सपेयर च्या पैशातून शिक्षण, आरक्षण घेतले पण म्हणतात ना ' पादऱ्याला पावट्या चा आधार ' अशी गत झाली आहे मोदी विरोधकांची . कितीही उच्च शिक्षण घेतले तरी सामाजिक जबाबदारी मुक्त वागणूक ज्याच्या अंगी भिनलेली असते आशा व्यक्ती अक्कल ना बक्कल , अन गावभर नक्कल करत फिरत असतात.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sat, 08/25/2018 - 05:09 नवीन
देशद्रोही कोण हा प्रश्न असेल तर अफझल गुरुच्या फाशीच्या विरोधात मोर्चा काढणारे , तसेच नंतर त्याला फाशी दिली म्हणून त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कृतीक कार्यक्रम आयोजित करणारे, तसेच याकूब मेमन साठी मध्यरात्री कोर्ट उघडायला लावणारे हे तर नक्कीच देशद्रोही आहेत. अफझल गुरु, याकूब मेमन यांनी भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले याबद्दल कोणाला काही शंका आहे का? असल्यास स्पष्टपणे सांगावे. नसेल तर मग भारताच्या विरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या या लोकांचा एवढा पुळका असणाऱ्यांना देशद्रोही का म्हणू नये? आणि मग हाच न्याय पुढे लावून जनेवि किंवा AMU मधल्या तथाकथित विद्यार्थी पुढाऱ्यांना गरीब बिच्चारे म्हणून त्यांचे गोडवे गाणाऱ्यांना काय म्हणावे? आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण रहात असलेल्या एरियात केवळ भुकेपोटी चोरी केली म्हणून चोर शिक्का बसलेल्या लोकांसोबत नाव जोडले जाऊ नये याची काळजी करणाऱ्या लोकांना या देशद्रोह्यांची काळजी करणाऱ्यांसोबत जोडले जायला काहीच वाटत नाही?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 08/25/2018 - 06:56 नवीन
याकुब मेमन च्या समर्थकांचे , बाटला हाऊस मध्ये आतेरिकी मेला म्हणून रात्रभर न झोपणाऱ्या म्याडम चे , डोकलम मध्ये चिनी सैन्यची भाजप वाटाघाटी करून परतावत असताना चिनी राजदूता ची गुपचूप भेट घेणाऱ्या चौकट रागा चे , पाकिस्तान मध्ये जाऊन भाजप ला सत्तेतून दूर करण्यासाठी भीक मागणारा मणिशंकर चे , उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्या नंतर मुस्लिम खतरे में असे बोलणारा व काँग्रेस चे नेते आणि पाकिस्तानी राजदूत ची एकत्र पार्टी ठेवणारा हमीद अन्सारी चे देशप्रेम आम्हाला दिसलेच नाही हो !!!!!!!!!! का यांच्या देशप्रेमाची व्याख्या उच्चपातळीवरची आहे ? वर उल्लेख केलेले सगळे देशप्रेमी पाकिस्तान किंवा अरबी देशात असे देशप्रेम दाखवू शकले असते का ? का भारतात विचारस्वातंत्र्य आहे म्हणून राष्ट्रध्वज जाळायचा , तुकडे होंगे हजार म्हणायचे आणि त्यांच्या समर्थकांनी मात्र निषेध न करता ' हे पाहायला न्यायालय आहे ' मर्दुमकी करायची ? आर्थिक , सामाजिक , राजकीय फायदा करून घेण्यासाठी सद्सद्विवेक बुद्धी गहाण ठेवून काय फायदा ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/25/2018 - 08:14 नवीन
ट्रेड मार्क , ट्रंप , सही बोललात !
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 08/26/2018 - 10:07 नवीन
एका धाग्यात कुमार केतकर यांचे आकंठ प्रेमात गुणगान केले होते, त्यांच्यासाठी खुशखबर. निस्पृह, तटस्थ आणि साक्षेपी केतकर यांचा आता कॉंग्रेसचे लोकसभा जाहीरनामा समितीत समावेश केला आहे. कुबेरांना राज्यसभेचे डोहाळे लागले असतीलच त्यांना या बातमीने आनंद वाटला असेल. संपूर्ण बातमी आजचा मटा मध्ये वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 08/26/2018 - 15:21 नवीन
Raghuram Rajan lauds Modi's fiscal math; says must focus on this 1 problem before polls, and it's not Rupee रघुराम राजन यांचा चष्माबदल ?!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 08/26/2018 - 19:46 नवीन
चांगली बातमी. दोन्ही बाजूंनी चष्माबदल होतोय ही चांगली गोष्ट आहे. एनपीएसाठी परत राजन यांच्याशी सल्लामसलत करणे हेही स्तुत्यच आहे व शिवाय रुपया पडला तरी काही होत नाही हे भारतीयांना कळले हाही चांगला चष्माबदल आहे. करंट अकाऊंट डेफिसिट नियंत्रित ठेवा असा सल्ला देण्यापूर्वी फिस्कल अकाऊंट मॅनेजमेंटची स्तुती करुन राजन यांनी चांगली प्रथा पाडली आहे. शर्करावगुंठीत औषध चांगल्या प्रकारे स्विकारलं जातं.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 08/26/2018 - 15:59 नवीन
रघुराम राजन यांनी चष्मा /पार्टी बदलेली दिसतेय , चक्क श्री मोदीजींच कौतुक ? कमाल आहे ? ज्यांना सहन होत नाही त्यांनी बर्नाॅलची सोय स्वतःच करावी !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 08/26/2018 - 17:28 नवीन
सांगतो त्यामागे संघाचा हात आहे तशी प्रथाच आहे मिपावर प्रत्येक गोष्टीचा संघाशी संबंध जोडण्याची. अडाणी ओंडके नाखु
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 08/26/2018 - 21:00 नवीन
कै. श्री अटल बिहारी यांच्या मृृत्यु नंतर काढलेल्या व्हिडीओत त्यांना श्रद्धांजली देण्याऐवजी हीन दर्ज्याची टिका केलेली आहे !! आता पर्यंत दुआ बद्दल असलेला थोडा आदर ही गळुन पडला !! श्रद्धांजली देताना मृृत व्यक्ती बद्दल संवेदनशील असण्याचा संकेत मोडुन जग प्रसिद्ध अटजी बद्दल ईतक्या खोट्या गोष्टी सांगीतल्यात ! बाबरी सारख्या अनेक गोष्टींचा तसेच पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या मृृत्युबद्दलही अटलजींनाच दोषी ठरवलय ! https://youtu.be/R_uTryBkUh4 हाच माणुस करुणानिधीनां श्रद्धांजली देताना मात्र त्यांच्या कार्याबद्दल सांगताना थकत नव्हता !! खरच मा श्री मोदीजींना विरोधी पक्षाचीच नव्हे तर अश्या विकल्या गेलेल्या मिडीया ला वठणीवर आणायच आहे !! मिडीया व डावे भारतातील जनतेला दिशाभुल करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत !! ह्या प्रकारावर आपला काय विचार आहे !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 11:57 नवीन
Raksha Bandhan 2018: रक्षाबंधनानिमित्त बहिणींना शौचालय भेट रक्षाबंधननिमित्त रविवारी जिल्ह्यात एकूण २४०० शौचालये भावांनी बहिणींना भेट दिली आहेत. बेळगाव जिल्ह्यात गरजूंना शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. रामचंद्रन यांनी ठेवले होते. ज्या घरी शौचालये नाहीत त्या घरी शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी सुमारे २४०० शौचालये बहिणींना भेट स्वरूपात मिळाली आहेत. विशेष म्हणजे आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही अनेक भावांनी पदरमोड करून बहिणीला शौचालयाची ओवाळणी दिली आहे. या अनोख्या भेटीने भारावलेल्या बहिणींनी शौचालयासमोरच भावाला राखी बांधून औक्षण केले. इतर वेळी सहसा न दिसणारे हे चित्र रविवारी बेळगाव जिल्ह्यात पहायला मिळाले. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/on-the-occasion-of-raksha-bandhan-sisters-were-gifted-toilets-by-their-brothers/articleshow/65554121.cms
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 16:47 नवीन
देश बदल रहा है !! स्वच्छ हो रहा है !! देशात अशी लाट आणण्याच सर्व श्रेय फक्त श्री मोदीजींनाच जात आहे ! त्यामुळेच २०१९ पुर्वी देशात ५ लाख शौचालय बांधुन पुर्ण होतील !! Over 6 crore toilets built across rural India under Swachh Bharat Mission http://www.uniindia.com/over-6-crore-toilets-built-across-rural-india-under-swachh-bharat-mission/india/news/1116488.html#XTCdv3pjCrzWLPAx.14 देशात ६ कोटी शौचालय बांधुन झालेली असताना, हिंदु पेपर Not one toilet built under Swachh Bharat Mission अश्या मथळ्या खाली बातमी देतो की दिल्ली शहरात स्वच्छ भारत मिशनच्या खाली एकही शौचालय बांधुन झालेल नाही. भारतातील मिडीया किती खालच्या पातळीवर गेलेले आहेत ह्याचाच एक पुरावा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/29/2018 - 06:09 नवीन
@डँबिस००७ Not a single toilet was constructed in the national capital since the inception of the Swachh Bharat Mission two-and-half years ago, with funds to the tune of Rs 40.31 crore for this purpose lying 'idle', the CAG said on Tuesday. According to a report by the Comptroller and Auditor General (CAG) tabled in the Delhi Assembly, the AAP-led city government did not allocate the Mission funds to implementing agencies as per their requirements. उघड्यावर शौचास बसणे हे सार्वजनिक आरोग्यास हानिकारक आहे असे केवळ श्री मोदी म्हणाले म्हणून रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारी माणसं तेथे सरकार चालवत आहेत. दोष त्यांना द्या येथे तरी माध्यमांचा दोष दिसत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/29/2018 - 06:10 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/not-a-single-toilet-built-in-delhi-under-swachh-bharat-mission-cag/articleshow/63607779.cms
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा