Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भिडे गुरुजींना झालंय काय ?

स
सोमनाथ खांदवे
Mon, 07/09/2018 - 15:19
🗣 118 प्रतिसाद
भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो . अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले . कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38689 views

🗣 चर्चा (118)
ग
गामा पैलवान Tue, 07/17/2018 - 23:29 नवीन
स्वधर्म,
- कदाचित त्या काळाशी सुसंगत असेल अश्या पद्धतीने लिहिलेल्या ग्रंथाला आता गौरवण्याचे कारण काय?
माझ्या मते मनुस्मृतीस गौरवण्याचं कारण असं की स्मृती लिहिणे ही एक प्रक्रिया आहे. मनुने ती पहिल्यांदा पद्धतशीरपणे राबवली. जरी ती स्मृती आज अंशात: कालबाह्य असली, तरी नवनिर्मितीची प्रक्रिया आजिबात कालबाह्य नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 07/18/2018 - 07:40 नवीन
प्रा. सदानंद मोरे यांचे या विषयावरचे भाष्य वेगळे असावे, संबंधीत एक कुणाचा प्रतिसाद वर असावा आणि आपण त्याची अद्याप कदाचित दखल घेतली नसावी.
...मनुने ती पहिल्यांदा पद्धतशीरपणे राबवली. ...
आपल्या या वाक्याचे विश्लेषण आपणच करावे आणि ठरवावे की आपणास नेमके काय म्हणायचे आहे ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 07/18/2018 - 09:40 नवीन
या युट्यूब दुव्यावर न्यूज१८लोकमत चॅनलवर उदय निरगुडकरांनी घेतलेली संभाजी भिडे यांची जवळपास ४४ मिनीटांची मुलाखत दिसते आहे. संभाजी भिडेंचे काही पूर्वग्रह कायम दिसतात तर काही विधानांची वस्तुनिष्ठता साशंकीत असल्याची चर्चा आहे. मनुस्मृती ग्रंथातील त्याज्य सोडून चांगले पहा असा काहीसा होरा त्यांच्या मुलाखतीतून असला -जातीयवादाचे समर्थन करताना ते दिसत नाहीत - तरी काही विधानांच्या वस्तुनिष्ठता साशंकीत झाल्याने चर्चेत राहतील असे दिसते, पण ते सरते शेवटी ग्रंथ प्रामाण्याचे नाहीतर राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी व्यक्ती प्रामाण्याचे समर्थन करताना दिसताहेत. मुख्य म्हणजे त्यांचे आंबा विषयक विधानाचे स्पष्टीकरण वर दासबोध.कॉम यांच्या प्रतिसादातील स्पष्टीकरणापेक्षा वेगळे दिसते. त्यांनी आंबा विषयक केलेले विधान अधिक व्यापक रुपकाचा भाग असले तरीही संभाजी भिडे गुरुजींना गर्भलिंग निदान विरोधी कायद्यातील नेमक्या तरतुदींची कल्पना नसावी आणि ते या कायद्याच्या कचाट्यात तांत्रिक दृष्ट्या सापडू शकतात असे प्रथम दर्शनी वाटते. पण उर्वरीत मुलाखत राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याने एवढी प्रखर आहे , एकीकडे गर्भलिंग निदान विरोधी कायद्यान्वयेची कारवाई टळण्याची शक्यता कमी वाटते पण त्यांच्यावरील अशा कारवाईने त्यांच्या बद्दल सहानुभूती वाढणारच नाही असे ही सांगणे कठीण असावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/18/2018 - 14:32 नवीन
भिडे गुरूजींच्या आंबा विषयी विधानावर एक ही महिला संघटना तावातावाने वाद घालायला कशा नाही आल्या ? तुकाराम मुंढे हे पुण्यात pmpl चे ceo असताना पुण्यातील सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांना चार हात लांब ठेऊन विनादबाव काम करण्याची त्यांची हातोटी पुणेकरांनी पहिली आहे आणि आता ते नाशिक महानगरपालिका चे आयुक्त आहेत . अशा कर्तव्यदक्ष व्यक्ती ला राज्य सरकारला ने रिपोर्ट पाठवायला सांगितले आहे .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/18/2018 - 23:34 नवीन
वामन देशमुख,
कुराणात लिहिलंय म्हणून काफिरांना ठार मारणारे असे मोमीनच कुराणानुसार योग्य दिशेने जातात असे नव्हे का?
थोडं शब्दांकन चुकलं माझं. दुरुस्त केलेलं विधान असं की :
कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणून पुरोगामी लोकं संशयाचा फायदा देतात.
आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/19/2018 - 13:15 नवीन
वामन देशमुख आणि गा.पै. गा. पै.ंनी उपचर्चा खाली घेतल्यामुळे वामन देशमुख यांचा ह्या प्रतिसादावरची चर्चाही इथेच करतो.
आधी गा.पै. कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. अशा मोमीनांना दिशा चुकलेले म्हणून पुरोगामी लोकं संशयाचा फायदा देतात. गा.पैंचा प्रतिसाद संदर्भ
ईथे कथित पुरोगामी मांडणी जराशी वेगळी असते. त्यांचा पहिला बचाव, 'हिंसा आणि परधर्मीयांशी केलेल्या हिंसेचे उल्लेख ईतर धर्मीय ग्रंथात सुद्धा असतात', या मांडणीत अंशतः वस्तुनिष्ठता असल्याचे ईतर धर्मीय अती-उजवे नाही म्हटले तरी लक्षात घेत नाहीत; आणि दुसर्‍या बाजुला ह्या स्वतःच्या पुरोगामी मांडणीच्या निसटत्या बाजू पुरोगाम्यांनाही लक्षात येत नाहीत की, ईतर धर्मीय ग्रंथातही अशा हिंसा विषयक समस्या असल्या तरी, इतर धर्म आणि धर्मीय रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून बर्‍यापैकी पुढे गेले आहेत, ईस्लामच्या बाबतीत रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या प्रक्रीये बाबत बर्‍यापैकी मागे असावी. आताशा भीत भीत का होईना बोटावर मोजण्या एवढे का होईना मुस्लीमातील पुरोगामी स्विकारु लागले आहेत असे दिसते, रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या अपेक्षीत प्रक्रीये बद्दल मुस्लीमातील या पुरोगामी विचारांची नीटशी दखल घेतली जाणे अद्याप बाकी आहे. तो स्वतंत्र लेखाचा विषय -माझ्या येत्या स्वतंत्र लेखात असणार- आहे. रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाच्या बाजूचे नसलेले पुरोगामी अजून एक वाट शोधत असतात ती म्हणजे ईतर धर्मीयांचे रिफॉर्मेशन आणि एनलाईटनमेंट पुर्नमांडणी आणि प्रबोधनाची प्रक्रीया झाली म्हणता तर ईतर धर्मीयातील अती उजवे कट्टर लोक हिंसा करताना दिसतात त्याचे काय ? म्हणजे धर्मग्रंथात लिखीत ग्रंथप्रामाण्याचा अंशतः पडणारा प्रभाव त्यांना या पळवाटेने सरसकट नाकारायचा असतो-म्हणजे पुर्नमांडणी आणि प्रबोधन नाकारयचे असते. ईथे पुरोगामी असुरक्षीतता आणि अ-विश्वासाच्या भावनेतून होणार्‍या प्रतिक्रीयावादी इतर हिंसा आणि ग्रंथप्रामाण्यातून येणार्‍या हिंसा यांची गल्लत करत असावेत. वस्तुतः ते जर खरे विशुद्ध पुरोगामी असतील तर एक ते ग्रंथप्रामाण्याचे नव्हे तर विवेकाचे समर्थक असायवास हवेत, दुसरे विवेकावर विश्वास असेल तर कोणत्याही अबकड ग्रंथाच्या चिकित्से बाबत कथित पुरोगाम्यांना आक्षेप असण्याचे कारण नसावे . तसेच ग्रंथ प्रामाण्याच्या पाठीशी असलेल्या अंधश्रद्धा, त्यातुन निर्मित होणारे उत्पात मुल्य, हिंसा इत्यादी नाकारण्याचे कारण नसावे. पण इथे विरुद्ध गंमत अशी होते की, साध्या शांततामयी शब्दातला उपरोध त्यांचा त्यांनाच व्यवस्थित कळत असतो -पण या उपरोधास विरोधक नाही ते स्वतःच जबाबदार आहेत हे त्यांच्या लक्षात का येत नसावे कोण जाणे. विवीध प्रेषित ते परमेश्वर यांची नावे चुकाशील माणसांनी वापरणे चालते पण व्यंगचित्र दूर असूद्यात आदरपुर्वक काढलेल्या चित्राला , मुर्तीला अथवा अभिनयालाही चालत नाहीत -उत्पात मुल्य ते हिंसा ते शिक्षा यांची भिती असते - तिथे यांना सहनशीलता शांततामयी शब्द त्यांचे त्यांना खटकत असतील तर नवल नसावे. जेव्हा स्वतः मुस्लीम, मुस्लीम स्त्रीया आणि मुस्लीमेतरांच्या १) (व्यक्ती) स्वातंत्र्य, २) मानवाधिकार, ३) सहिष्णूता, ४) कायद्या समोर समानता, ५) विवीधता (pluralism) यांची विवीध स्तरावर विवीध देशातून पायमल्ली होते आणि या पायमल्लीची कोणतीही चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य नसते आणि स्वातंत्र्य दडपण्यासाठी अबकड ग्रंथांचे दाखले दिले जातात तेव्हा प्रबोधनेच्छु रास्त टिकांबद्दलच्या फोबीआचे प्रदर्शन तथाकथित पुरोगाम्यांकडून होताना दिसते (संदर्भ डॉ.अली रिझवी आणि हमेद अब्देल-समद), त्यातील अनेक अगदी टोकाच्या परंपरावाद्यांप्रमाणेच मुद्देसुद चर्चाकरण्या एवजी पिंका आणि टिकाकारास व्यक्तीगत लक्ष्य करतानाही दिसून येतात. अगदी या मुद्द्यावरही इतर धर्म/धर्मीयातही हे दोष नाहीत का ? चे तुणतुणे एकाच्या उणीवा झाकण्यासाठी दुसर्‍याच्या उणीवाम्ची उदाहरणे सादर केली जातात आणि अशा पद्धतीने पुरोगामी संशयाचा फायदा देतात असे वाटते. मग वामन देशमुख प्रतीवाद नाही आणि समर्थन तर मुळीच नाही. माझ्या माहीतीनुसार आणि समजुतीनुसार- १. भारतीय कायदा (किंवा घटना) मोमिनांना इस्लामचे पालन करण्यास परवानगी देते. २. इस्लामचा पाया कुराण आहे. मग, जर कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात. हे खरे असेल तर अशा मोमीनांना दिशा चुकलेले कसं म्हणता येईल? ते तर कुराणानुसार आणि म्हणून subsequently घटनेनुसारही योग्य दिशेनेच जात असतील ना? वामन देशमुखांचा प्रतिसाद संदर्भ आधी वामन देशमुखांची बाजू ईथे वामन देशमुखांच्या उप्रोधा मागची भावना समजता येते, व्यक्तिगतत कायदा अमुक एका ग्रंथातील प्रामाण्यानुसारच चालला पाहीजे त्यात कालसुसंगत सुधारणांना वाव नाही आणि हे ग्रंथ प्रामाण्य राज्यघटनेपेक्षा अधिक महत्वाचे असेल; राज्यघटना आणि लोकशाही आमच्या ग्रंथप्रामाण्यानुसार चालली नाहीतर आमच्या उत्पात मुल्याची तुम्हाला भिती वाटली पाहिजे जेणे करुन कालसुसंगत बदल योग्य असले तरी आम्ही होऊ न देण्याच्या अट्टाहासात यशस्वी होऊच होऊ. इथे तथाकथीत पुरोगाम्यांना त्यांचे कर्मठ आपलेसे वाटतात आणि सुधारणांचा आग्रह धरणारे फोबीआ ग्रस्त वाटतात, काही फोबीआ ग्रस्त असतीलही पण सुधारणांच्या सर्वच मागण्या सरसकट कशा चुकीच्या असुशकतत आणि कोणतेच बदल कसे पुढे येत नाहीत असे प्रश्न कुणाला पडत असतील तर भावना समजता येते. अर्थात या समर्थनाचा उद्देश्य फोबीआ निर्माण करणे नाही योय बाजूचे समर्थन एवढाच मर्यादीत आहे. बाकी वामन देशमुखांकडून सुटणार्‍या बाजू आधी झाकीर नाईक कृत बचाव कसा असू शकेल आणि नंतर भारतीय कायद्यातील वस्तुस्थिती. कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात, हे विधान सरसकट बरोबर नसावे. कुराण आणि हदीथ यांची वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रीटेशन होत असावित त्यातील झाकीर नाईक प्रणित आणि पुरोगाम्यांनाही (आणि तसे कुणालाही) चालावेसे इंटरप्रिटेशन म्हणजे, इस्लाम आणि कुराण मधील संदेश शांततामयी आहे, तुमचा धर्म तुमच्यापाशी आमचा धर्म आमच्या पाशी, कुणावरही आपला धर्म लादू नका असेच कुराण सांगते. - इथे पुरोगामी गापै म्हणतात तसे संशयाचा फायदा देतात. मग 'कुराणात लिहिलंय म्हणून मुस्लिम काफिरांना ठार मारतात'- याचे गौड बंगाल काय आहे ? तर फक्त काफीर युद्धात जिवंत मिळाले तर धर्मपरिवर्तनाच्या अटीवर तुम्ही काफीरांना दंड जिझीया लावून जिवदान देऊ शकता किंवा धर्म परिवर्तन स्विकारले नाहीतर तुम्ही त्यांना ठार मारु शकता. मग आहे की नाही धर्म शांततामयी, विरोधक उगीचच चुकीचा गवगवा करतात ! आता कोण स्वतःला खलीफा /सुल्तान किंवा अमुकतमुक जाहीर करुन कुणा विरुद्ध केव्हा युद्ध पुकारेल आणि आपले स्वतंत्र इंटरप्रिटेशन लावत आस्मानी सुल्तानी बरसवेल हे सांगणे कर्म कठीण असावे . कुणा परधर्मीयांविरुद्ध केवळ वेगळ्या धर्माचे आहेत म्हणून जिझीया का लावावा ? परधर्मीयतेमुळे युद्ध का पुकारावे ? युद्धात जिवंत सापडले तर धर्म बदलण्याचे कंपल्शन का टाकावे ? जर सर्वश्री परमेश्वर एकटा एकमेव असेल तर त्याची ईतर कोणी इतर कोणत्या पद्धतीने भक्ती केली किंवा नाही केली तर सर्व शक्तीमानास का फरक पडावा ? त्या सर्वशक्तीमान दयाळूस मानवाची हिंसक परिक्षा का पहावी वाटावी ? क्रौर्यपूर्ण शिक्षा का द्याव्या वाटाव्यात या प्रश्नांची उत्तरे पुरोगामी त्यांच्या कर्मठांकडे मागतील का आणि त्यांच्यातले झाकीर नाईकांसारखे कर्मठ परंपरावादी इतरांसाठी नको स्वतःसाठी याची उत्तरे कधी शोधतील हा मोठा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे प्रेषित महोदयांना (त्यांना शांती लाभो) सुरवातीच्या काळात आलेले संदेश शांतता मयी समजले जातात तर दुसर्‍या टप्प्यात आलेले संदेश हिंसा आणि क्रौर्याकडे झुकलेले समजले जात असावेत. वर म्हटल्या प्रमाणे कोणत्या भागाचे काय अर्थ लावायचे याच्या नुसार इंटर प्रिटेशन बदलतात. अहिंसक पुरोगामी आपल्या सोईचे इंटरप्रिटेशन घेऊन बसतात, आणि हिंसक इंटरप्रिटेशन वापरणारे दिसले की दुसरीकडेही असेच आहेना अशी मखलाशी करतात. त्यांच्यातील सर्वच लोक अथवा सर्वच समुह हिंसा आणि क्रौर्यात सहभागी होत नाहीत असा एक दावा केला जातो त्यात तथ्य नक्कीच आहे पण जो पर्यंत काही लोक ग्रंथप्रामाण्याचा आधार सांगत हिंसा आणि क्रौर्याचा मार्ग वापरत आहेत तोपर्यंत - अशा प्रामाण्य मानल्या जाणार्‍या तत्वज्ञानाची मनमोकळी चिकित्सा होऊन तत्वज्ञानाच्या पुर्नबांधणीस गती यावयास हवी आणि प्रबोधन तशा हिंसक मार्गाची निवड करु शकणार्‍यांपर्यंत पोहोचावयास हवे असे वाटते कायद्याचे जागतिक संदर्भ तसे पहाता अगदी जागतिक स्तरावर इस्लामिक देशातही बरेच कायदे व्यवहारता पाहून बदलले गेले आहेत, क्रिमीनल लॉ मधील दंडाच्या पद्धतील क्रौर्य कमी होऊन तुरुरंगवासाच्या सिव्हीलाईज्ड पद्धतीचा वापर वाढत आहे. व्यवहारात फायदा आणि आवश्यक असेल तेथे हि मंडळी सोईने बरेच काही न बोलता वाकवतात. कर्जाचे देणे घेणेस परवानगी नसावी पण बहुधा दुसृया खलिफानेही कर्ज घेण्याचा अथवा देण्याचा व्यवहार केल्याचे वाचल्याचे आठवते चुभूदेघे पण ओटोमनांनी कर्ज घेऊन वसुलीसाठी तुर्कस्थान युरोपीयनांना चक्क आंदण दिला होता. आताही तेलाधारीत देश सोडले तर बहुतेक इस्लामीक देश सर्रास कर्जे घेतात. एकीकडे कम्युनीस्ट नास्तीक म्हणून रशियनांशी लढाई केली जाते दुसरीकडे नास्तीक असलेल्या चिनचे तळवे चाटले जातात. हे सर्व शेवटी सोईने होत असते. दुसरीकडे ज्या काही कट्टरवाद्यांना हे ग्रंथ प्रामाण्यात बसत नाही हे कळते त्यांच्या साठी परमेश्वर आणि त्याच्या ग्रंथातील आदेशानुसार चालणार्‍या खलिफा शिवाय इतर कोणतेही स्थानिक सरकार अथवा युनो सार्वभौम असू शकत नाही . ग्रंथात फक्त सोन्या आणि चांदीच्या नाण्यांचाच उल्लेख आहे म्हणून कागदी चलनही चालत नाही अशा प्रकारच्या अनेक कट्टरतावादी इंटरप्रिटेशन्स आणि त्यांच्या मागे धावणे समांतरपणे अव्याहत चालते. जिथ पर्यंत भारतीय कायद्यांचा संदर्भ आहे यातील कायद्यातील कट्टरता बाजूस ठेऊन मोकळा श्वास घेण्याचे अकबराच्या पद्धतीने काही प्रयत्न झाले नाही असे नाही. किंवा मराठा साम्राज्य आणि त्या नंतर रणजित सिघांनी पंजाबात कंट्रोल मिळवल तसे किमान चर्चित वाक्या प्रमाणे वागण्यास बर्‍यापैकी लगाम बसू लागला असावा. ब्रिटीशांच्या कालावधी नंतर क्रिमीनल लॉच्या बाबतीत रिफॉर्मेशन पूर्णतः यशस्वी पणे लावले गेले - हे ब्रिटीशांचे रिफॉर्मेशनही पलटवू इच्छित काही पाकिस्तानी कट्टरतावादी गट पाकिस्तानात आहेत त्यांच्या कारवाया सातत्याने दिसतच असतात. भारतीय राज्य घटना किमान थेअरॉटीकली सार्वभौम आहे. व्यक्तिगत कायद्याच्या संदर्भाने भारतीय राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समानतेच्या व्यावहारीक विवेकी अंमलबजावणी समोर ग्रंथप्रामाण्य कृत उत्पात आणि वोटबँक कृत अव्हाने आहेत नाही असे नाही तरीही हिंसा आणि क्रौर्य या बाबतीत वामन देशमुख म्हणतात तसा खुला परवाना भारतीय कायदा आणि राज्यघटनेत दिसत नाही असे वाटते. असो. हा प्रतिसाद स्वतंत्र लेखाच्या स्वरुपात असावयास होता का असे वाटून गेले कारण यात वस्तुनिष्ठतेच्या आणि संदर्भांच्या गरजेपोटी बदल करणे भर घालणे अवघड जाईल. असे वाटते. काही संदर्भ आणि वस्तुनिष्ठ बदल सुचवावे वाटल्यास स्वागत असेल. चुभूदेघे. पिंका आणि व्यक्तिगतात विरहीत सकारात्मक रचनात्मक चर्चा सहभागा साठी अनेक आभार.
  • Log in or register to post comments
आ
आकाश५०८९ गुरुवार, 07/19/2018 - 20:31 नवीन
संभाजी भिडे यांच्या आंबा प्रकरणाविषयी https://www.facebook.com/barve.prasanna/posts/10213609662970770 येथे लेख वाचनात आला. तोच लेख https://prasannavadane.blogspot.com/2018/06/blog-post.html येथेही आहे. त्यावरून सर्व वृत्तवाहिन्यांनी मुद्दाम चुकीचे वार्तांकन केल्याचे दिसते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 07/20/2018 - 06:11 नवीन
प्रसन्न वदनेंचा ब्लॉग वाचून युट्यूब जरा आणखी खोदले तर २१ जूनची जनप्रवास लाइववरची हि मुलाखत युट्यूबवर दिसली पण याच गोष्टी संभाजी भिडे उदय निरगुडकरांना दिलेल्या या मुलाखतीत का सांगत नाहीत याचा प्रश्न पडतो -प्रत्येक व्यक्तिला मिडीया मिसरिपोर्टींगला कसे तोंड द्यायचे हे माहित असेलच असे नसावे . भिडेंच्या इतर चुका काय असतील ते असोत, प्रसन्न वदने म्हणतात तसे जनप्रवास लाइववरची मुलाखत पाहिल्यानंतर, आंबा प्रकरणाचा पूर्ण वक्तव्याचा मूळ व्हिडियो न दाखवता सोईचे मर्यादीत अंश फक्त दाखवले गेले असल्याची साशंकता आधी पेक्षा अधिक वाटत आहे. भिडेंच्या चुकीच्या अंधश्रद्धेचे खंडण जरुर करावे पण भिडेंना अंधश्रद्धा आहेत म्हणून त्यांचे वक्तव्य अर्धवट दाखवले जात असेल तर पत्रकारीतेच्या नैतिकतेच्या नेमक्या कोणत्या नियमात बसते कि अधःपतन आहे असे म्हणावे. संबंधीत पत्रकारांनी खरेच अर्धवट रिपोर्टींग केले असेल तरी बहुधा बदनामीच्या कायद्या अंतर्गत कव्हर होणार नाही पण पत्रकारीतेच्या मुल्यांचे पालन झाल्या बाबत शंका असेल तर प्रेस काऊंसिल ऑफ ईंडियाकडे कुणालाही इमेल ने पण तक्रार करता येत असावी. अशा सभेत उपस्थित व्यक्तींकडून खात्री करुन घेऊन अशी तक्रार करण्यास हरकत नसावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sun, 07/22/2018 - 20:04 नवीन
सोशल मिडियावरच्या व्हिडियोजवरुन जनतेची अदालत बसायला लागलीयआजकाल. गंमत म्हणजे “व्हिडिओ एव्हिडन्स“वरुन निरुपद्रवी विद्यार्थ्यांना थेट देशद्रोही ठरवून मोकळे झालेले लोक आता बावचळले आहेत. दुधारी हत्यार आता उलटले तर पूर्ण पुरावा,न्यायालायात प्रलंबित असणे वगैरे गोष्टी आठवायला लागल्या आहेत. चांगलीच गोष्ट आहे. दरम्यान कन्हैय्याकुमारला विद्यापीठाच्या “उच्चस्तरीय” समितीने केलेला दहा हजाराचा दंड न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच न्यायालय ह्या बाबतीतही योग्य तो निर्णय देईलच. प्रश्न फक्त असा उरतो की अशा गोष्टी पसरवणाऱयांचं काय करावं? सरकार अशा आयटीकंटकांचा बंदोबस्त करणार की उलट आणखी सेना निर्माण करणार?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 07/23/2018 - 18:53 नवीन
निरुपद्रवी विद्यार्थी कोणाला म्हणताय? कन्हैया आणि त्याच्या गॅंगला? आपल्याकडे विद्यार्थीदशा साधारणतः वयाच्या २४-२५ पर्यंत संपते. पुढे जे PHd वगैरे करतात ते एकीकडे कामधंदा करत आपला अभ्यास चालू ठेवतात. आता ३१ वर्षांचा असूनही कन्हैयाच्या अचिव्हमेंट्स सांगा. दुर्दैवाने तो कम्युनिस्ट विचारांच्या प्रभावाखाली आला आणि त्यात नंतर जनेवि सारख्या विद्यापीठात दाखल झाला. कन्हैयाने काय केलं ते तुम्हाला माहित असेलच. तरी त्याला पाठिंबा देत असाल तर.... काय बोलणार!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 07/28/2018 - 21:37 नवीन
कोर्टाच्या आधी तुम्हाला कळलेलं दिसतंय त्याने काय केलं ते. की ठरवूनच टाकलंय तुम्ही? कोर्टाने तर त्याचा दंडही रद्द केला आहे. ह्या देशाच्या न्यायसंस्थेबद्दल आपल्याला काहीच आदर नसेल तर तुम्हाला देशभक्तीचा ठेका घ्यायचा काहीही अधिकार नाही. मुळात देशाच्या नावाखाली सरकारच्या अशा दडपशाहीला पाठिंबा देऊन देशाचे नुकसानच केले जात आहे. अर्थात तुम्हाला ते समजणार नाही किंवा समजून घ्यायचं नाहीय ते उघड आहे.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/23/2018 - 12:30 नवीन
कन्हैयाकुमार बद्दल अजून वादविवाद चालू आहेत ? आपल्या भारतातील लोक पण कोणाला आणि का डोक्यावर बसवून ठेवतात हेच कळत नाही . कन्हैया ने आता पर्यंत राष्ट्रीय पार्टी कशी स्थापन केली याचेच आश्चर्य वाटते . विद्यार्थीदशेतला कन्हैयाकुमार ला थेट भारताच्या पंतप्रधानांना मीडिया समोर एकेरीत उल्लेख करण्याचे बळ पुरवत कोण ? आता बहिर्जी नाईक जरी असते त्यांना सुध्दा पडद्यामागचे सापडले नसते ( पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणारा देशद्रोहाच्या घोषणा देईल असा जावईशोध कुणी लावू नये हं ! ) खरंच मोठा राजकीय नेता बनण्याचे गुण वैशिष्ट्य आहे त्याच्यात .
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 07/24/2018 - 06:22 नवीन
हीहीही! कन्हैया गॅंग च जाऊदे तुम्ही चष्मेवाल्या गॅंगचे दिसताय...
आपल्याकडे विद्यार्थीदशा साधारणतः वयाच्या २४-२५ पर्यंत संपते.
कुठून निष्कर्ष काढलात? असाही "देशद्रोह्यांसाठी" संदर्भ कुठल्या गोष्टींना लागतो पण तरीही बघूया... जर १२ वी १८ व्या वर्षी झालीच, तर डिग्री ३/४ वर्ष पुढे म्हणजे २२ वर्षांपर्यंत... त्यानंतर लगेच पीएचडी करता येत नाही मास्टर्स डिग्री करावी लागणार म्हणजे २ वर्ष किमान! त्यानंतर करता येईल पीएचडी! आता पीएचडीसाठी ३ ते ५ वर्ष कितीही लागू शकतात... म्हणजेच किमान २९-३० पर्यंत तरी पीएचडी साठी कालावधी लागणारच! हो का? मास्टर्स करून आता डोंबल नोकरी मिळतेय, पण ते जाऊद्या... पीएचडी करताना स्टायपेंड मिळू शकतो त्यामुळे अनेक जण पूर्णवेळ करतात त्यात काय गैर आहे? आणि गम्मत म्हणजे बीजेपीच्या तथाकथित देशभक्त गॅंग ने "कन्हैया ११ वेळा पीएचडीला नापास झाला" हा संदेश व्हायरल केलाय! पीएचडीला परीक्षा नसते मग ११ वेळा नापास कसा होणार, हे याना कोण सांगणार! Speaking to Alt News, Kumar said, “This information is totally fake. There is no exam for PhD. I am a final year student. My thesis is in the final stage and will be submitted by July 21, 2018. The subject of my thesis is ‘social transformation in South Africa’. I enrolled in JNU for the integrated MPhil-PhD program in 2011 which is of 7 years’ duration. I commenced my PhD in 2013. I suspect that someone just created a message with this rumour which then started to circulate. I haven’t even been in JNU for 11 years. This is my 7th and final year.” Kumar also tweeted the same. Link1
कन्हैयाने काय केलं ते तुम्हाला माहित असेलच. तरी त्याला पाठिंबा देत असाल तर.... काय बोलणार!
काय केलं त्याने? जरा सांगाल का? नाही म्हणजे कोर्ट सुद्धा असे काही म्हणत नाहीये जर तुम्हाला काही आतली बातमी असेल तर कळू दे सगळ्यांना! नाहीतर कोर्टात पाठवून द्या पुरावे म्हणजे शिक्षा पक्की होईल त्याला! मध्यंतरी कुणाल कामरा ने याची मुलाखत घेतलेली तेव्हापासून त्याला पण देशद्रोही केलं! आता नुकताच त्याचा कार्यक्रम एका युनिव्हर्सिटी मधून रद्द केलाय. का तर म्हणे तो देशद्रोही बोलतो?! कोण ठरवू लागलाय हे? सगळी फालतुगिरी चाललीये नुसती... एखाद्या विद्यार्थ्याला इतकी मेहनत घेऊन मीडिया ट्रायल करून राष्ट्रीय पातळीवर कोर्टाच्या आधीच "देशद्रोही" ठरवण्याची हि पहिलीच वेळ असेल. जर चष्मा काढून जरा बघावासा वाटलं तर एक छोटा व्हिडीओ दिला आहे तो बघा.. तो पूर्ण व्हिडीओ नाहीये, असे अर्धवट व्हिडीओ देणे मलाही योग्य वाटत नाही पण लोकांकडे १-२ तास वेळ नसतो त्यामुळे १८ मिनिटांचा व्हिडीओ बघा... तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील कदाचित. सुरुवातच त्याच वय आणि शिक्षण यावरून आहे म्हणून देत आहे. (त्याच शीर्षक नका घेऊ मनावर! ;) )
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 07/25/2018 - 16:16 नवीन
धन्यबाद शब्दबंबाड जी !!!! अठडा मिनट का आपने अच्छा बीडीओ पोस्ट किया . हम कुछ बात कहना चाहते है कन्हया जी के बाडे में . १) एव्हलांचं प्रूफ टेंट के लिये सिर्फ भाजप को जिम्मेदाड पकड रहे है ? काँग्रेस ने क्यो नही लिये ? 2) बिहाड में जो दलितो की हत्याये हुई उसके लिये भाजप क्यो ? नितीश कुमार जिम्मेदाड नही है ? 3) दलितो की बुक बॅन के बारे में बोलते वक्त मनुस्मृती बॅन के बारे में क्यो नही बोले ? 4) आरक्षण के बारे में बोलते वक्त गटड साफ करने वाले और मंदीड के पुजाडी की बात करते करते प्रायव्हेट कम्पनी में आरक्षण क्यो नही ऐसा उन्होंने सवाल किया . कीधड की लिंक कीधड जोड रहे हैं वो ? प्रायव्हेट कम्पनीयो में भला गटड साफ कडने वाले और मंदिड के पुजाडी का क्या काम , वाहां टॅलेंटेंड लोगो को ही चूनते है फिर वॊ किसीं भी जाती से हो . सिड्फ गव्हर्नमेंट में आरक्षण के नाम पर कुछ भी चलता हैं . 5) हमारे भारत में दलितो की जीवन अवस्था के लिये सिर्फ चार साल पुराणी भाजप की सरकार जिम्मेदाड है ? दलितो की जीवन अवस्था के लिये काँग्रेस की कोई जिम्मेदाडी नही ? अगर है तो आज तक हमने श्रीमान कन्हया कुमार जी को काँग्रेस के खिलाफ बोलते वक्त हमने नही देखा . अगर आपने देखा है तो डालीये बीडीओ . 6) कन्हया कुमार जी बिहाड से आये है और बिहाड की जो दुरावस्था लालूप्रसाद ने की है , कन्हया जी ने उनके बारे में भी कभी गुस्सा आज तक नही दिखाया ? ऐसा क्यो ? सभी प्रॉब्लेम के लिये सिड्फ भाजपा की गलती है क्या ? सबसे अहम बात पी एच डी के बारे में बोलते वक्त टॅक्सपेयर की बात की बहुत अच्छा लगा , लेकीन हम ये कहना चाहते है की वो देश की जनता के टॅक्स पे मुफत में खा पी के पी एच डी ही करे 30 साल नही तो 40 साल लगने दो लेकीन सिर्फ शिक्षा पे ध्यान देना चाहीये ना की राजनीती पे . ये तो पाकिस्तान और अमडीका की तरह हो गया . क्या जडूडत है टॅक्सपेयर के पैसो पे जीवन जीते हुये टी व्ही इंटडव्यूव देना , जंतड मंतड पे मोर्चा , जे एन यू में अफजल की शहादत मनाना ?
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/25/2018 - 17:35 नवीन
फुल शालजोडे आणि एकदम पर्फेक्ट जागेवर हाणल्यात , कन्हया व्हिडिओ मध्ये बऱ्याच ठिकाणी ' र ' चा 'ड ' करतोय वाचतांना हगून हगून पुरेवाट झाली खी ! खी !!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/26/2018 - 11:35 नवीन
वाचतांना

हगून हगून

पुरेवाट झाली खी ! खी !! << नीट धुवा बर ! सध्या पावसाळा सुरु आहे, उगाच इंफ्केशन व्हायचे. :))
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 07/26/2018 - 12:20 नवीन
ह ह पु वा चा लॉंग फॉर्म आहे तो !!!!!
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/26/2018 - 11:24 नवीन
आंब्याचा वाद एकदाचा नाशिक नहानगर पालिकेने स्थानिक न्यायालयात दाखल केला असे बातम्यांवरुन दिसते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा