चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे
धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो
धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे.
* कितीसा पुरोगामी आहेस ?
* Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे.
* मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे.
* पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे.
* ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत
** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत
** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व
** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?
** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान
** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश
*** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त ***
*** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न ***
या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्यापैकी संभव असतो.
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही.
** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही.
* या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे.
* ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही.
* भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही.
* पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच.
खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही.
चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे
(आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे.
बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य.
दुसरे असे की दुसर्या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय
चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे.
*** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories ***
*** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा ***
* आत्ते-मामे भावंडे
🗣 चर्चा
(208)
ए
एस
Wed, 06/20/2018 - 06:04
नवीन
चुलत भावंडांशी विवाह करणे हे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांत दिसते. ज्यू धर्मातही कदाचित चालत असावे. एकूणच, अब्राहमिक धर्मांमध्ये अशा विवाहांना मान्यता असावी. भारतात अगदीच वेगवेगळ्या परंपरा दिसतात. महाराष्ट्रात आत्तेभावाशी मुलगी लग्न करू शकते. अजून सांगायचं तर तेलुगू समाजात काही ठिकाणी मुलीचं लग्न मामाशी लावण्याचीही प्रथा दिसली तेव्हा फारच विचित्र वाटलं होतं. मला वाटतं उत्तर भारतात कदाचित मामाच्या मुलाशी मुलीचं लग्न चालत असावं. महाराष्ट्रात असे दिसणार नाही. चुभूदेघे. ब्रह्मदेशात पूर्वी राजाचं लग्न त्याच्या सख्ख्या बहिणींशी लावण्यात येई. थिबा राजाच्या दोन्ही राण्या त्याच्या सख्ख्या बहिणी होत्या असे वाचून आहे.
पण वैज्ञानिक दृष्ट्या पाहता दोन जोडीदारांमध्ये जितके जनुकीय वैविध्य असेल तितकी त्यांची संतती आरोग्यपूर्ण आणि जनुकीय दोषांपासून मुक्त असण्याची शक्यता वाढते. फार जवळच्या नात्यात लग्न केल्यास संततीत गंभीर स्वरूपाचे जनुकीय दोष निर्माण होऊ शकतात.
तेव्हा जवळच्या नात्यात लग्न करण्याचे टाळावे हेच उत्तम.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/20/2018 - 09:53
नवीन
उत्तर भारतात मामाच्या मुलीशी लग्न करत नाहीत. तसेच दक्षिणेत चारही राज्यात मामाचं भाचीशी लग्न लावतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 06/20/2018 - 06:17
नवीन
जवळच्या नातेवाईकांत विवाह संबंध झाल्यामुळे मूळ होणारे जनुकीय आजार यावर खाली दुवा दिला आहे.
CONSANGUINITY हा शब्द गुगलुन पहा भरपूर साहित्य मिळेल
https://www.sciencedirect.com/science/article/pii/S1110863013000037
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 07:54
नवीन
धन्यवाद, दोन स्रोत मिळाले ईंग्रजी विकिपीडियावरील Consanguinity लेखात संभाव्य Genetic_disorders ची माहिती आलेली दिसते आहे.
दुसरे Hussain, R. , Bittles, A. and Sullivan, S. (2001), यांच्या Consanguinity and early mortality in the muslim populations of India and Pakistan. ह्या शोध निबंधा नुसार बालमृत्यूंचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता दिसते (चुभूदेघे)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 06/20/2018 - 07:38
नवीन
लेखकाच्या माहिती मिळवण्याच्या इच्छेपेक्षा शेरेबाजी करण्याची ईच्छा जास्त प्रबळ वाटते.
चुलत भावंडांच्या लग्नात वाईट करायला टपलेले जीन्स आतेभाऊ - मामेबहिण या लग्नात कसे वागत असतील बरे?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 08:06
नवीन
समाजात आयोग्य गोष्टींचे समर्थन व्हावे - वरच्या प्रतिसादात डॉकनी माहिती दिल्यानुसार अयोग्यते बद्दलचे संदर्भ दिलेले आहेत - आणि टिकाकारांनी शेरेबाजी करू नये अशी अपेक्षा ती मात्र योग्य बरयं चालू द्या . ( बाकी आम्ही शांततेच्या धर्मातील चांगल्या गोष्टी घेण्या बद्दल प्रामाणिक धागा चर्चा सुद्धा मिपावर केलेली आहे ह्याचे स्मरण दिलेले बरे )
ईतर सुप्रसिद्ध पुरोगाम्यांप्रमाणे आपले ठेवायचे झाकुन दुसर्याचे पहायचे वाकून असे अस्मादीक करत नाहीत -एकसारखीच टिका करतो. वस्तुतः एका मिपा पुरोगमी मित्रांनी दुसर्या धाग्यावरील काही प्रश्न अनुत्तरीत ठेवल्यामुळे शेरेबाजी तिथपर्यंत मर्यादीत आहे असे समजावे
अगदी भावी पिढीसाठी अनारोग्यकारकतेच्या शक्यतेनकमी, पण एखाद्या प्रचलनाची तुलना केली असता हिंदूंमधील आतेभाऊ - मामेबहिण प्रमाण कमी आहे . माझ्या परीचयातील आतेभाऊ - मामेबहिण विवाहातील एक संतती अल्पवयात गेल्याची माहिती आहे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 06/20/2018 - 10:24
नवीन
+१
अभिनिवेष टाळून लिहलेला अधिक चांगला वाटला असता. असो. ज्याचे त्याचे स्वातंत्र्य
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 18:30
नवीन
मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार. अर्थात शेवटी विज्ञान काय म्हणते ते महत्वाचे नाही का ? डॉ. मंगु यांनीही विज्ञानाची बाजू स्विकारली तर इतरांनी स्विकारण्यास हरकत नसावी.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/21/2018 - 10:17
नवीन
१) शांततामयी मुस्लीम धर्मी
२) शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथ.
आणि
३) चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे.
अनुक्रमे मुद्यातून काही एक धर्मियांचे हिशेब चूकते करायचे आहे, असे दिसते. त्यांचा हेतू स्वच्छ आहे असे समजून आणखी काही काही एक धर्मीयामधे काय पद्धती होत्या का त्याकडे मी काही अभ्यासकांचे लक्ष वेधु इच्छितो.
पंडू राजा कुंतीला म्हणतो ( पाहा महाभारत आदिपर्व १२२.४ आणि ७) की पूर्वयुगात स्रिया कोणाच्याही बंधनात नसत, त्या इच्छेला येईल त्या प्रमाणे वर्तन करीत, एका पुरुषाचा त्याग करून दुस-याचे मागे जात आणि अशी स्थीती पंडूच्या वेळेलासुद्धा उत्तरकुरु देशात अस्तित्वात होती.
अभ्यासकांनी याही मुद्यांकडे लक्ष द्यावे ही नम्र ही विनंती.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 06/21/2018 - 11:00
नवीन
@ प्रा डॉ सर मी चष्मा लावलाय ? प्रत्येक गोष्टीत अंशतः सब्जेक्टीव्हीटी असल्यामुळे शक्यय म्हणून घ्यावेत हवे तर, अशा निष्कर्ष घाईचे आपल्याला स्वातंत्र्य आहेच. पण हि निष्कर्ष घाई करण्यापुर्वी या धाग्यावरील माझे सर्व प्रतिसाद वाचून पूर्ण झाल्याची आपण नक्की खात्री केलेली आहे का ? खात्री करून घ्या, अस्मादिकांच्या थॉट प्रोसेस मध्ये इन-कन्सिस्टन्सी जाणवल्यास सांगा, माझ्या बाजूला इन-कन्सिस्टन्सी असेल तर बदलण्याचा जरूर प्रयत्न करेन,पण तत्पुर्वी चष्मा उतरवून आस्मादिकांच्या मांडणी कडे बघण्याची ईच्छा असल्यास खालील मुद्दे लक्षात घ्याल असा विश्वास आहे.
१) कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?
हि धागा चर्चाही अस्मादिकांनीच काढलेली असते आणि एक हाती डिफेंड केलेली असते , डझनभर मिपा पुरोगाम्यांपैकी एकानेच कौतुक करण्या पुरता चेहरा दाखवलेला असतो, चांगल्या गोष्टी नोंदवण्यासाठी मिपा पुरोगाम्यांपैकी कितींनी हजेरी लावली आपणच अभ्यासून काय तो निष्कर्ष काढावा. माझ्या बाजूला मी लोकगीतातील रामायणाची सकारात्मक दखल घेतली त्या धाग्यावर आपण दाद दिल्याचे आठवते, फाफटमुक्त रामायण अशीही मालिका लिहिलेली असते, त्यापुर्वी पुराणांमधील उणींवांवर किमान दोन धागा लेख येऊन गेलेले असतात याची 'एक धर्मियांचे हिशेब चूकते' असा आरोप करताना दखल घ्यावीशी का बरे वाटत नसेल ?
२) मी मिपावर आहे तेव्हा पासूनचे सर्व धागे आणि प्रतिसाद अभ्यासले तर मी शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारतो पण कोणत्या ग्रंथात काही चांगले असल्यास घेण्यासही तयार असतो हे आपण लक्षात घेत नाही. आपण स्वतःस सरकसट नास्तीक म्हणवता मी डोळस आस्तीक किंवा डोळस नास्तिक दोन्ही आहे आणि डोळस आस्तीक या नात्याने मुस्लीम संस्कृतीतील डॉळस श्रद्धा आपण आणि इतर तक (तथाकथित) पुरोगाम्यांप्रमाणे माझ्याकडून नाकारले जाण्याची शक्यता कमी असावी.
३) हा धागा काढण्याचे त्यातील तात्कालीक कारण डॉ. मंगू यांच्या सोबत ताज्या घडामोडी धाग्यावतील निसटत्या बाजू - उजागर करण्याचे होते हे खरे आहे आणि त्यामुळे धागा लेखनात तात्कालीक अभिनिवेश आला असणे शक्य आहे पण ताज्या घडामोडी धाग्यावर डॉ मंगु शी एका विषयावर प्रतिवाद करताना दुसर्या बाजूला हिंदूत्व वाद्यांशी किमान दोन विषयावर प्रतिवाद केलेला दिसेल. - आपण मला श्रद्धेची बाजू घेताना पाहिलेत , घाटपांडेंच्या कालच्या धाग्यावर जाऊन पहा मी अंधश्रद्धेवर टिकाकरणारा विनोदी व्हिडीओही दिसेल
४) जिथ पर्यंत टिकेतल्या कठोरतेचा भाग आहे, माझ्या मिपावरील पहिल्या धाग्याचे नाव आणि विषयच कठोर पण सभ्य टिका कशी करावी हे आहे ह्या कडे आपले लक्ष्य वेधू इच्छितो.
एवढे वाचावेत तो पर्यंत उपरोक्त दाव्यातील निसटत्या बाजूंचा पुढचा भाग लिहितो.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 06/21/2018 - 12:06
नवीन
१)
पाण्डू कुंती संवादाचा खूप छान मुद्दा मांडलात, पाण्डू कुंती संवाद आपण दिलेल्या वाक्या पेक्षा पदीर्घ आहे , कदाचित संतान ते मोक्ष प्राप्तीच्या अंधश्रद्धेने असेल पण त्याही काळात म्हणजे पाण्डूने कुंतीला स्वातंत्र्य देण्याच्या आधीही कुंतीला विवाहपुर्व मातृत्व आल्यावर आपला पूत्र नदीत वाहावा लागला म्हणजे समाज स्त्रीचे निवड स्वातंत्र्य नाकारु लागल्या नंतर पांण्डू अंधश्रद्धेतून असेल पण कुंतीचे निवड स्वातंत्र्य स्विकारतच नाही तर या संबंधातून झालेल्या पुत्रांच्या समान आधीकारा खातर अख्खी महाभारताची कथा ऊभी रहाते.
रामायणात राम सीतेवर संशय घेतो तेव्हा सीता रामासाठी (सुसंस्कृत हा शब्द खुबीने टाळून) प्राकृतांसारखे काय करताय हा प्रश्न विचारते. स्त्रीचे निवड स्वातंत्र्याची भलावण करण्याच्या काळात आमचे प्राकृताचे अभ्यासक सर योनी शुचीतेवर टिका करत पुढे येतात तेव्हा स्त्रीच्या निवड स्वातंत्र्याची सुसंस्कृती गाठली जाण्यासाठी मोठा टप्पा गाठला जाणे बाकी आहे याची पुनःश्च खात्री होते. आमचे प्राकृताचे आदरणिय अभ्यासक प्रा. डॉ. सर योनी शुचितेच्या मुद्याने जेवढे दबलेले आहेत तेवढे तर हलालाचे समर्थन करणारा आणि पुर्नविवाहवर भर देणारा मुस्लीम धर्मही योनी शुचितेची पाठराखण करत नाही आणि मुस्लिम धर्मातील योनी शुचिता बाजूस ठेऊन स्त्री पुर्नविवहास महत्व प्रदान करणार्या बाबीची सकारात्मक दखल अस्मादिकांनी त्यांच्या कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? धागा लेखातून घेतलेली असते ती आमच्या आदरणीय प्राकृत अभ्यासक सरांना दिसणार नसते,
आदरणीय प्राकृत अभ्यासक सरांनी आमच्या इतर मिपा लेखनाचा धांडोळा घेतल्यास स्त्रीच्या निवड स्वातंत्र्याची बाजू घेणारे अनेक धागा लेख तेवढेच नाही तर अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भलावण करणारे भरपूर लेखनही त्यांच्या दृष्टोत्पत्तीस पडते पण हां त्यांचा स्वतःचा अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास नसेल तर आमच्या त्या लेखनातील त्यांना काही दृष्टोत्पत्तीस पडणार नाही ते असो.
अॅडल्ट्रीच्या केस मध्ये भारतीय कायदा स्त्रीस शिक्षा करत नाही आणि पतीची हरकत नसेल तर परपुरुषासही शिक्षा होत नाही, इतपत निवड स्वातंत्र्य देणारा भारतीय कायदा देतो तेवढा तरी सुसंस्कृत नक्कीच आहे. सीतेच्या निवडस्वातंत्र्यावर आक्षेप घेणारे त्रयस्थ धोबी भारतास नवे नाहीत, आणिर्मुलांच्या हाती रेणूकेचा शिरच्छेद करुन स्त्रीचे निवड स्वातंत्र्य नाकारणारे प्राकृत जमदग्नीही कमी नाहीत (धोबी शब्द जातीय अर्थाने घेऊ नये) पण तरीही या देशात पत्नीवर संशय घेणार्या रामाचा अध्याय लिहून झाल्या नंतर (प्रक्षिप्त ?) बालकांड रचून त्याच रामाच्या करवी त्याच्या तारुण्यात निवडस्वातंत्र्य उपभोगणार्या अहल्येची मुक्तीची गोष्ट जोडली जाते आणि पक्ष्यांच्या मुक्त प्रणयाची प्रशंसा करणारा वाल्मिकीही जोडला जातो त्याच देशात दत्तात्रेयाचीही पूजा होते याचा विसर पडल्याने आमच्या आदरणीय प्राकृत अभ्यासक सरांना या देशातिल संस्कृतीत पत्नीची धड शिरावेगळे करवणार्या ऋषींनाही कोणी शांततामयी म्हणत नाही - सुसंस्कृतीत ऋषींसमोरचा सदैव आदर्श क्रोधावर नियंत्रण हाच असतो - आणि निवड स्वातंत्र्य उपभोगणार्या स्त्रीवर दगड मारण्याचे आदेश आदर्श मानणार्या संस्कृतीस शांततामयी म्हणणे शांतता शब्दाचा अपमान नसतो किंवा कसे ? एतदेशीय संस्कृती किमान पतीच्या संमतीने स्त्रीस निवड स्वातंत्र्य देणारी पाण्डू कुंती संवादाची कथा तरी लिहित व्यवहारात आणले नाहीतरी समर्थीत करत होती , दुसरीकडे स्त्रीचे स्वतःचे पूर्ण स्वातंत्र्य सोडा पतीला मान्य असले तरी स्त्रीचे निवड स्वातंत्र्य नाकारुन केवळ दगडाने सामुहीक पणे मारण्याच्या आदेश असलेल्या बाबीं बद्दल शांततामयी उल्लेख करावा असे आमच्या आदरणीय सरांना आणि ते पाठ राखण करत असलेल्यांना वाटते म्हणूनच आम्ही त्यांना शांततामयी म्हणतो ना . कुणाला उपरोध वाटत असेल त्यांनी अधिक शांततामयी होण्यास अद्याप वाव आहे का प्रामाणिकतेने आत्मपरीक्षण करुन खरे खुरे शांततामयी होण्याचा प्रयास करावा . आमच्या टिकेचा उद्देश टिकाकार बनूनी रहावे रहावे शेजारी,दांभिकाता दूर सारुनी खर्या खुर्या शांततेस द्यावे उत्तेजन असा शुद्ध आणि सात्विकच आहे.
आम्ही एकालाच लक्ष्य करत नाही टिका योग्य असल्यास सर्वत्र कठोर पण सभ्य पणे करावी याचा होता होईतो शिरस्ता दिसेल .
प्राकृत हा शब्द निवड स्वातंत्र्याच्या सुसंस्कृतीचे महत्व पटवण्यासाठी विचार परिवर्तनासाठी ज्यांच्या बद्दल आदर आहे त्यांच्या बद्दल मनावर दगड ठेऊन केला आहे, पण तरीही मन दुखावले गेल्यास अस्मादिकांनी स्वतःच्या मनावर अधिक मोठा दगड ठेऊन घेतला आहे हे लक्षात घेऊन गुरुजनांनी मोठ्या मनाने आमचा प्रणिपात स्विकार करावा हि नम्र विनंती.
आणि तरीही न मानवल्यास हा प्रतिसाद संपादकांकरवी उडवण्यास पूर्ण समर्थन.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 06/21/2018 - 17:22
नवीन
मिपा सदस्या अॅमी यांच्या सोबत झालेली चर्चा प्रा. डॉ. सरांनी वाचण्याची राहून गेली असेल म्हणून त्याचा काही भाग इथे उधृत करतो.
असा प्रश्न त्यांनी विचारला त्याचे उत्तर खालील प्रमाणे दिले
विज्ञान विषयक अज्ञान अथवा निष्काळजीपणाने व्याधी ग्रस्थ अपत्य जन्मास येऊ नये , आणि आल्यास सुयोग्य दंड लावून मुलास भरपाई देणारा कायदा असण्याची गरज आहे...सुयोग्य कायद्याची व्यवस्था करून मग ज्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगू देण्यास माझी टेक्निकली हरकत नाही. पण व्यावहारीक दृष्ट्या हा फसवा / फॉल्टी प्रश्न आहे..... उर्वरीत प्रतिसाद मोठा असल्याने तिथे वाचून घ्यावा पण ईथेही कन्सीस्टन्टली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली आहे हे आपण समजून घेऊ शकता.
कायदा सर्वांना समान असावा या बाबत पूर्ण सहमती आहे.
अर्थात हिंदू बाजूला विवाह लावून देतानाही गोत्र पद्धतीचा प्रभाव असल्यामूळे चुलत भाऊ बहीण असे विवाह होण्याचे प्रमाण जवळपास नसावे. -मावस भावांचे विवाहही कधी ऐकण्यात आलेले नाहीत- मामे बहिण आणि आत्ये भाऊ असे काही विवाह होतात पण जन्म पत्रिकेतील गुण जुळवण्याच्या अंधश्रद्धीय खटपटी मुळे त्यांचे प्रमाणही कमी होते . त्या विरुद्ध शांततेच्या धर्मात अद्याप ग्रंथ प्रामाण्याचे प्राबल्य अधिक असल्यामुळे तिकडे चुलत पारिवारीक विवाहांचे प्रमाण बरेच मोठे आहे. हि विभागणी सर्वांना सारखा असलेल्या कायद्यास लक्षात घ्यावी लागत नाही, त्या त्या समाजातील समाज सुधारकांना लक्षात घ्यावी लागते.
तरीही मामे बहिण आणि आत्ये भाऊ असे काही विवाह होतातच हेही वास्तव आहे आणि असे विवाह लावून देणार्यांना कायद्यापुढे एकाच मापाने तोलावे या आपल्या मताशी सहमत आहेच.
३) चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. ....यात एक धर्मियांचे हिशेब चूकते करायचे उल्लेख आहे, याचे कारण वर अॅमी यांना जो प्रतिसाद दिला गोत्र आणि पत्रिका पद्धतीच्या अंधश्रद्धांमुळे हिंदू धर्मीयातही हे प्रमाण असले तरी मुस्लीम धर्मीया पेक्षा कमी आहे .
मी तर चौफेर चौकस बॅटींग करतो , कोणत्यातरी एका धर्माला झुकते माप देऊ ईच्छित, ( माझ्यावर) एक दिशीय बॉलींग करुन टिका करणार्यांचा उद्देश्य हिशेब चुकते करण्याचा नाही असा विश्वास नक्कीच आहे. मी आता पावेतो हिंदू धर्म आणि धर्मीयांवर टिकेचे धागे आणि प्रतिसादाम्ची संख्या खूप अधिक आहे त्यामुळे बॅलन्स साधणे महत्वाचे वाटत असेल तर इतर धर्मावर टिका करणारे मला अधिक धागा लेख लिहावे लागतील कमी नव्हे हे पुन्हा एकदा नम्रपणे नोंदवतो.
* विज्ञान संपन्न (?) ग्रंथ चा विषय रहातोय तो सामायिक आणि महत्वाचा असल्याने सर्वात खाली नवीन प्रतिसादाने हाताळणार आहे.
मनमोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/22/2018 - 04:53
नवीन
>>>मी तर चौफेर चौकस बॅटींग करतो , कोणत्यातरी एका धर्माला झुकते माप देऊ ईच्छित, ( माझ्यावर) एक दिशीय बॉलींग करुन टिका करणार्यांचा उद्देश्य हिशेब चुकते करण्याचा नाही असा विश्वास नक्कीच आहे.
ठीक आहे, आभार. नोंद घेतली आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 06/22/2018 - 05:40
नवीन
मिथक कालीन (स्वतःचे भाऊ नसलेले) बहुपती विवाह किंवा (स्वतःचे भाऊ नसलेले) बहु-पुरुष विवाह करणारी स्त्री आणि या धागा चर्चेचा विषय आपलाच भाऊ पती असलेली स्त्रीस होणारी संतती परस्पर विरोधी विषय आहेत याची नीटशी नोंद घेतली ना सर ? अद्यापही दोन बाबीतले भिन्नत लक्षात आले नसेल तर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासकांची मदत घेण्यास हरकत नाही.
(स्त्रीचे स्वतःचे भाऊ नसलेले) बहुपती विवाह किंवा (स्त्रीचे स्वतःचे भाऊ नसलेले) बहु-पुरुष विवाह करणारी स्त्रीस होणार्या संतती पुढच्या पिढीतील जनूकीय वैवीध्य वाढवण्यास हात भार लावतात. आणि स्वतःच्याच भावांशी विवाह करणारी स्त्रीची संतती जनूकीय वैवीध्य वाढवण्यात तेवढा हात भार लावत नाहीत.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 06/20/2018 - 08:20
नवीन
ह्याला मंगु कशाला लागतो ?
प्रत्येक माणसाला दोन पालक असतात , आई आणि बाप .
आई आणि बापाचे random selection method ने गुणसूत्रे / जीन्स बालकाला येतात.
नात्यात लग्न केले तर त्याच त्याच जिनांच्या combination मुळे दोष असलेले जीन्स सँक्रमीत होण्याची शक्यता वाढते.
आता पुढची गंमत ऐका ...
अपत्याचे लग्न काकांशी किंवा मामाशी होणे - हे जेनेटिकली equal dangerous आहे , दोन्हीमध्ये रिस्क सेमच आहे,
अपत्याचे लग्न मामे / मावस भावंडांशी होणे किंवा चुलत/ आत्ये भावंडांशी होणे ,हे जेनेटिकली equal dangerous आहे , दोन्हीमध्ये रिस्क सेमच आहे,
हिंदू धर्मात आईकडची नातेवाईक लग्नास चालतील , अशी रूढी आहे.
मुस्लिम धर्मात पित्याकडची नातेवाईक लग्नास चालतील , अशी रूढी आहे.
या सर्व रूढी आहेत , त्याला सामाजिक कारणे असू शकतील .
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 06/20/2018 - 08:59
नवीन
छान..
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 09:05
नवीन
आपण जाणते डॉक्टर आहात म्हणून तुमचे खास मार्गदर्शन तुमच्या शुभेच्छा असलेल्यांना मिळावे म्हणून डॉ, मंगु हवेतच ! कारणे कोणतीही असू द्यात वैद्यकीय दृष्ट्या असे शरीर संबंध भावी पिढीच्या दृष्टीने सुयोग्य नाही हे आपण अप्रत्यक्षपणे मान्य करता असे दिसते आहे . सामाजिक कारणे आहेत म्हणून वैद्यकीय दृष्ट्या टाळण्याजोगी गोष्ट योग्य होऊन जाते असे आपल्याला म्हणावयाचे नसावे असे गृहीत धरतो .
जवळपास सारखा परिणाम असलेल्या प्रथा दोन्ही कडे असल्या तरी एकी कडे ते प्रमाण १० % असेल आणि दुसरीकडे ते प्रमाण ९० % असेल तर फरक पडतो की नाही ? एकीकडे प्रत्येक पिढीत होत नाही दुसरीकडे प्रत्येक पिढीत होते फरक पडत असेल की नाही ?
* आता हे प्रश्न केवळ टिकेसाठी नाही गंभीरपणे ज्ञानवृद्धीसाठीच विचारले आहेत त्याची उत्तरे कृपावंत डॉक्टर म्हणुन द्याल काय ?
**कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ?
खालील भाग मात्र टिकेसाठी आहे हे प्रांजळपणे सांगतो आपल्याकडे याचे उत्तर असणार नाही हे अभिप्रेत असले तरी , यदा यदा निरपेक्षता ग्लार्भवती या न्यायाने कॉपी पेस्टवतो
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 09:06
नवीन
*ग्लानीर्भवती
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 06/20/2018 - 09:51
नवीन
नात्यातली लग्ने असली की प्रश्न निर्माण होतात .
http://www.thehindu.com/seta/2004/04/29/stories/2004042900161600.htm
https://en.m.wikipedia.org/wiki/Cousin_marriage
अशी लग्ने करू नका , हे डॉक्टर , मॅरेज कोन्सिलर सांगू शकतात , हे म्हणणे , न मानणे वधुवरावर अवलंबून असते.
काही रोगांमसाठी काही टेस्ट उपलब्ध आहेत
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/20/2018 - 08:58
नवीन
अगदी थोडक्यात -
१)सामाजिक ढोंगिपणा,
२)लोभीपणा
यापुढे खंबिरपणा न दाखवता शरण जावे लागले हे म्हणायचे.
असे आंतर्विवाह केल्याने काय होते ते इजिप्तच्या इतिहासात दिसेल.
विज्ञान तुमच्या जातीधर्माला ओळखत नाही,आपले काम चोख बजावते.
--
लोकांची तोंडे बंद करण्यासाठी १) आमच्यात चालते, २)आम्ही असंच करतो म्हणतात.
----
जे देश लहान आहेत त्यांच्याच जाती/वंशाचे आणि आर्थिक बरोबरीचे मुलगेमुली कठीण होत जाते. राजकुमारास योग्य स्थळ मिळायला अशी बरीच राजघराणी त्या देशात असावी लागतील.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 06/20/2018 - 09:02
नवीन
विज्ञान तुमच्या जातीधर्माला ओळखत नाही,आपले काम चोख बजावते.
+1
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 06/20/2018 - 09:35
नवीन
मालदीव मध्ये लोकसंख्या बेटावर बंदिस्त आहे . एकाच gene pool मधून genes येत रहातात , त्यामुळे थेलेसेमिया हा आजार common आहे.
भारतात सिंधी समाजात काही रक्तविकार common आहेत.
The results indicate that the thalassemia trait is more prevalent in the Sindhi community. Vaishyavani, Brahmin, Maheshwari, Vaishnav, and Patel were the other contributing castes
http://www.mjdrdypu.org/article.asp?issn=0975-2870;year=2015;volume=8;issue=4;spage=575;epage=576;aulast=Chandel
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 10:31
नवीन
अधिक माहिती साठी अनेक आभार. आपण दिलेल्या दुव्यातच खालील वाक्य आहे
आपण दिलेल्या रिपोर्ट मध्ये extensive awareness campaigns ची गरज व्यक्त केलेली दिसते. तेव्हा ते गंभीरपणे घेतले पाहीजे.
१) मी या विषयाचा जाणकार नाही , डॉ. मंगु यांनी दिलेला संदर्भातील रिपोर्ट CONSANGUINITY बद्दलच असल्याची खात्री डॉ. सुबोध खरे करून मार्गदर्शन करु शकतील का ?
२) ऊपरोक्त नमुद समुदायामध्ये मुस्लीम समाजा एवढे CONSANGUINITY रिलेशन चे प्रमाण असल्याचे माझ्या व्यक्तीगत पहाण्यात कधी नव्हते ईतर कुणाच्या पहाण्यात असल्यास कुणि दुजोरा देऊ शकेल का ?
३) या रिपोर्ट मध्ये Vaishnav, आणि Patel यांचा ऊल्लेख कास्ट म्हणून कसा आला आहे आणि त्याचा अभ्यासीत विषयाशी घातलेली सांगड विस्कटून सांगितली जाऊ शकेल का ?
४) डॉ. मंगु यांनी त्यांना विचारलेले मुख्य दोन प्रश्न अनुत्तरीत ठेवले आहेत, एकाच्या अप्रशस्त कृतीने दुसर्याची अप्रशस्त कृती झाकली जात नसते , त्यामुळे चर्चेतील मुख्य विषया बद्दल विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तरे असल्यास डॉ. मंगु यांनी उत्तरे जरुर द्यावीत.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 06/20/2018 - 10:41
नवीन
कुठले 2 प्रश्न ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 10:43
नवीन
* आता हे प्रश्न केवळ टिकेसाठी नाही गंभीरपणे ज्ञानवृद्धीसाठीच विचारले आहेत त्याची उत्तरे कृपावंत डॉक्टर म्हणुन द्याल काय ?
**कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ?
खालील भाग मात्र टिकेसाठी आहे हे प्रांजळपणे सांगतो आपल्याकडे याचे उत्तर असणार नाही हे अभिप्रेत असले तरी , यदा यदा निरपेक्षता ग्लार्भवती या न्यायाने कॉपी पेस्टवतो
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 06/20/2018 - 11:18
नवीन
कोणत्या आजारास कोणत्या टेस्ट , किंमत किती वगैरेची उत्तरे संबंधित डॉक्टर डिटेलमध्ये देतील , expert ना भेटावे , गुगल करावे.
दुसर्या प्रशनाचेही उत्तर माझ्याकडे नाही , असे उत्तर कोणत्या धर्मातील कोणत्या धर्मगुरूंना माहीत असेलच , तर त्याची माहिती द्यावी , म्हणजे समाज प्रबोधन होऊ शकेल.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 11:43
नवीन
नाही मी आजार झाल्या नंतरच्या टेस्ट विचारल्या नाहीत ,
* लग्न करण्यापुर्वी जनुकीय दृष्ट्या किती मॅच होतो आणि अपत्याला संभाव्य धोका कमी असेल हे कळण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात ?
* समजा जनुकीय दृष्ट्या अयोग्य विवाह झालेलाच आहे तरीही निरोगी संतती हवी आहे यासाठी काही संशोधन होऊन काही मार्ग निघाला
आहे का ? - आपण दिलेल्या दुव्यातून अशी शक्यता अद्याप तरी नसावी असे दिसते
आपणच दिलेल्या रिपोर्ट दुव्यात खालील वाक्य आहे
बहुतांश धर्मगुरू अशा प्रागतिक भूमिका घेताना अद्यापतरी कुठेच आढळणार नाहीत, त्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सलेक्टीव्हली कुणाला आर्थीक मदत केली म्हणजे हुरळून जाण्याचे कारण नाही कारण एरवी हि धर्मांध मंडळी सुयोग्य कायदे आणि
सामाजिक सजगतेच्या मार्गांच्या आड येत असतात .
त्यांच्या (आपल्या प्रिय शांततामय) धर्मातील विवाहांच्या नियमांचे कोडींग करू दिले असते तर हिंदूंना जसे कायद्याने क्लोज रिलेशनमध्ये लग्न करु नये असा नियम आहे तसा घालून देता आला असता, पण तथाकथित शातंतावादी लोक समाज सुधारणेचा मुद्दा आला उत्पात मुल्य दाखवावयास लागतात.
कोणत्याही धर्मांधतेची भलावण करण्यापुर्वी पुरोगामी मंडळींनी निरपेक्ष होऊन सगळ्याच समाज सुधारणा विरोधकांना सारखेच फैलावर घ्यावयास नको का ? असो.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 06/20/2018 - 11:56
नवीन
मीही लग्नापूर्वीच्या टेस्टबद्दलच लिहिले आहे
------
हिंदूंना जसे कायद्याने क्लोज रिलेशनमध्ये लग्न करु नये असा नियम आहे तसा घालून देता आला असता
म्हणजे इतके लिहून अखेर पालथ्या घड्यावरच पाणी का ?
हिंदूंना असा नियम अर्धवटच आहे .
हिंदू धर्मात आईकडची नातेवाईक लग्नास चालतील , अशी रूढी आहे. ( कायद्याने फक्त चुलत भावंदास मज्जाअव आहे , तो देखील धर्म म्हणतो म्हणूनच आहे . कायद्याने जेनेटिक्स सांगते म्हणून तो निर्णय घेतलेला नाही. )
मुस्लिम धर्मात पित्याकडची नातेवाईक लग्नास चालतील , अशी रूढी आहे.
त्यामुळे जिथे कुठे नातेवाईकांत लग्न होते , तिथे अशी रिस्क उद्भवू शकते .
इतके स्पष्ट लिहूनही कोणत्या तरी एका धर्माला अन मला एकत्र target करत आहात , ज्यांची उत्तरे गुगल करून मिळू शकतात , ते प्रश्न जाणीवपूर्वक का विचारत आहात ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 12:16
नवीन
नेमका हा विषय निवडण्याचे कारण असे की आपण डॉक्टर असल्यामुळे आपल्या एकतर्फी पाठराखणीच्या संधी आपोआपच कमी होतील. आपण एकाचीच भालावण केली की टार्गेट केल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे, पण असे वाटण्यास कदाचित आपणच जबाबदार असतो , कारण तीन बोटे आपल्याकडेही आहेत याचा डिफेन्सीव्ह होण्याच्या भरात विसर पडत रहातो. एकाच्या चुकीने दुसर्याच्या चुकीचे समर्थन होत नाही. अशी पाठराखण तर्कांच्या बेसीसवर टिकत नाही.
तीने बोटे दुसर्या बाजूलाही नक्कीच आहेत ते हा धागा लेख चर्चा असो की इतरत्र, ताज्या घडामोडींच्या धाग्यावर एकीकडे तुमचा प्रतिवाद करताना दुसर्या प्रतिसादात गापैंचे मुद्द्यांचाही प्रतिवाद करतच होतो. त्यामुळे एकालाच लक्ष करणे असा काही प्रकार नाही.
यांना कुरकुरत का होईना कमीत कमी कायद्यात बदल करून घेण्याची सवय झाली आहे आणि ग्रंथ प्रामाण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोणाचे महत्व पटू लागले आहे आणि म्हणूनच सिव्हील कोड मधील पुढच्या बदलांची स्वतः हून वाटप हात आहेत.
दुसर्या बाजूला आपण डोळे मिटून ज्यांची पाठराखण करता ते अद्यापही ग्रंथ प्रामाण्याच्या बेड्यात अडकलेले आहेत कायद्यात अपेक्षीत प्रागतिक बदल एकगठ्ठा मतपेटीच्या राजकारणाच्या आधारावर अथवा उत्पात मुल्याच्या आधारावर थांबवले जात असतील तर प्रश्न उपस्थित केले जाणे स्वाभाविक असावे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 12:17
नवीन
वाट पहात आहेत.
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 06/20/2018 - 12:50
नवीन
+१
हिंदू कायद्यात असलेला नियम अर्धवटच आहे .
जर त्या त्या भागात, समाजात, जातीत नात्यात लग्न करण्याची प्रथा असेल तर कायदा त्याला लगाम घालत नाही.
https://www.maayboli.com/node/65595 इथे याबद्दल चर्चा झाली आहे.
===
* लग्न करण्यापुर्वी जनुकीय दृष्ट्या किती मॅच होतो आणि अपत्याला संभाव्य धोका कमी असेल हे कळण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात ? >> या चाचण्या सगळ्यानीच करून घ्यायला हव्या फक्त नात्यात लग्न करणार्यांनी नाही. आपापल्या जातीत लग्न करणारे, खासकरून ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांनीदेखील करायला हव्या या चाचण्या.
The results indicate that the thalassemia trait is more prevalent in the Sindhi community. Vaishyavani, Brahmin, Maheshwari, Vaishnav, and Patel were the other contributing castes <<< इथे काहींची नावं आली आहेत.
===
बादवे मुलं जन्माला घालणारच नसतील तर जवळच्या नात्यात शरीरसंबंध ठेवलेले चालेल का???
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 06/20/2018 - 13:33
नवीन
हृद्यविकार, कॅन्सर, मधुमेह, सिझोफ्रेनिया वगैरेदेखील अनुवंशिक आजार आहेत ना? एक पिढी सोडून येणारं?
ते चेक करताय का लग्न करताना?
अशी व्यक्ती कुटुंबात असलेल्यानी मुलंच जन्माला घालू नये सांगतो का समाज आणि कायदा?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 18:02
नवीन
जन्माला येणार्या अपत्याचे म्हणून काही अधिकार असावेत का ? अपत्याला जन्म घालू इच्छित पालकां वर नैतिक आणि कायदेशीर जबाबदार्या असाव्यात की नको ?
इथे बर्याचदा सुदृढ मुले आम्हाला जन्माला कशाला घातले असा आपल्या पालकांना प्रश्न विचारतात, (अमिताभ बच्चन या विषयावर कोणतीशी कविता वाचतात नेहमी) आता जी मुले पालकांच्या, समाजाच्या आणि शासनाच्या निष्काळजीपणाने काही वेळा बेजबाबदारपणामूळे व्याधीग्रस्त म्हणून जन्मतील त्यांनी आपापले पालक , समाज आणि शासनास कोणते प्रश्न विचारावेत असे आपल्याला वाटते ?
का करू नये ? असे काही असेल तर चेक केलेच पाहीजे.
विज्ञान विषयक अज्ञान अथवा निष्काळजीपणाने व्याधी ग्रस्थ अपत्य जन्मास येऊ नये , आणि आल्यास सुयोग्य दंड लावून मुलास भरपाई देणारा कायदा असण्याची गरज आहे, कारण नवी शहाणी पिढी विवाहा शिवाय संततीचा विचार करू लागली आहे.
वर म्हटले तशा सुयोग्य कायद्याची व्यवस्था करून मग ज्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगू देण्यास माझी टेक्निकली हरकत नाही. पण व्यावहारीक दृष्ट्या हा फसवा / फॉल्टी प्रश्न आहे.
* सहसा बहुतांश केसेस मध्ये भाऊ बहीण यांना आपापसात आकर्षण वाटणार नाही अशी नैसर्गिक व्यवस्था असावी. मोकळ्या वातावरणात वाढलेल्या अगदी कझीन्सना कझीन्सचे शारीरीक आकर्षण बहुतांश केसेस मध्ये वाटत नसावे.
* मुस्लिम साईडला पडदा पद्धतीने स्त्री पुरुष संवाद मोकळेपणाने न झाल्याने कझीन्सचेही आकर्षण वाटत असल्यास माहित नाही पण हि गोष्ट नैसर्गिकपणे शक्य आहे का या बद्दल दाट शंका वाटते.
* जि मुले मुली को एज्युकेशन शाळेत सोबत शिकतात त्यांचेही मोकळीक दिलीतरीही वर्ग मित्रांसोबतच्या विवाहाचे प्रमाण अत्यल्प असते . मिसळण्याची मोकळीक असलेल्या मुला मुलींची नात्यात विवाहही कमी होतात कारण कदाचित शारीरीक आकर्षणा साठी आपल्या भावंडांवर अवलंबीत्वही रहात नसावे आणि घरातील वडील धार्यांच्या सक्तीलाही सामोरे जावे लागत नसावे.
* बहुतांश कझीन मॅरेजेस घरातील मोट्यांनी लावून दिलेली अरेंज्ड मॅरेजेस असतात. अशा लव्ह मॅरेजेसचे प्रमाण अत्यल्प असते. अरेंज्ड मॅरेजची मुस्लिम साईडला प्रॉपर्टी परिवारात रहावी हे मोठे आकर्षण असते त्या शिवाय तलाक होऊन संसार मोडला गेल्यास मुलांचा सांभाळ परिवारातल्या परिवारात होत रहातो. हे आकर्षण असावे.
** हिंदूंमध्ये जी मामाचा मुलगा आत्याची मुलगी विवाह होतात त्याचे कारण वेगळ्या अनिष्ठ परंपरा जसे लग्न होऊन गेलेल्या बहिणीच्या सासरच्यांच्या मुलगी झाल्याने होणारा छळ अथवा बहिणीला मुलगी आहे आणि तिला इतरत्र हुंडा देणे परवडत नाही अशा वेळी बहिणीच्या सुरक्षा आणि प्रेमाचा भाग म्हणून बहिणीची मुलगी आपल्या मुलास करून घेणे हे एक वेगळे कारण राहीले असू शकते.
प्रॉपर्टी विभाजन नको असणे अत्यल्प प्रमाणात हिंदूतही शक्य असावे पण अशी शक्यता हिंदूं मध्ये कमी राहिली असावी.
** पण इन एनी केस मेजॉरीटी कझीन मॅरेजेस मोठ्यांनी अरेंज केलेले बालविवाह किंवा मुलांना नाही म्हणण्याची परवानगी न दिलेले विवाह असण्याची मोठी शक्यता पहाता शिक्षेच्या तरतुदीसहीत कायद्याच्या बंधनाची गरज असावी.
सहमत, पण मोठ्यांच्या मर्जीवर अवलंबून नात्यातील विवाहांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यासाठी कायद्याने अधिक जबाबदारी (दंड आणि शिक्षेची ) टाकावयास हवी. विवाह कर्त्या मुला मुलीस दंड नाही केला आणि लग्न लावून देणार्या पालकांना जबाबदार धरले तरी हरकत नाही.
* हिंदू कायद्यात असलेला नियम अर्धवटच आहे .
ते अद्ययावत करावेत, हिंदूत आमच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्यघटनेला नाही आमचा धर्म राज्यघटनेपेक्षा संसदेच्या अधिकारापेक्षा मोठा आहे , आमच्या धर्मात ढवळा ढवळ केलीतर उत्पात मुल्य दाखवून देऊ असे म्हणणे कमी होते , कुणि म्हणाले तरी त्याची पत्रास दखल घेण्याची परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची समस्या सहसा निर्माण होत नाही, अपवादावरून नियम सिद्ध करण्यासाठी लगेच एखादा अपवाद काढून येऊ नये .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 18:15
नवीन
भरीव पोटगी शिवाय तलाक प्रकरण फार सुलभ केले तर मुले सांभाळली जावीत म्हणून समाज कझीन मॅरेजेस करण्यावर भर देतो , त्यातून अनहेल्दी संतती जन्मास येण्याचा धोका वाढतो. आई तर पुर्नविवाह होऊन अजून वेगळीकडे चालली जाते, मुलांचा परिवारात जेमतेम सांभाळ होतो पण शिक्षणाचा आर्थिकभार पूर्ण उचलला जात नाही , उनाड मुले गुन्हेगारीस लागतात आणि आमची मुले कारागृहात अधिक का ? असा विचारकरत त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे निष्कर्ष काढले जातात.
विरोधाभास हा कि अधिक विवाह करताना प्रत्येक स्त्रीस समान वेळ आणि आर्थिक तरतुद लक्ष देण्यास सांगणारा शांततामयी धर्म ऐपत असल्या शिवाय पूर्ण वेळ देणे शक्य झाल्या शिवाय अधिकची संतती करू नका हे सांगण्यास विसरत असावा.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 06/21/2018 - 00:38
नवीन
जन्माला येणार्या अपत्याचे म्हणून काही अधिकार असावेत का ? >> काहीच अधिकार नसावेत जोपर्यंत लोकसंख्यावाढीचा दर ऋण होत नाही तोपर्यंत!
===
अपत्याला जन्म घालू इच्छित पालकां वर नैतिक आणि कायदेशीर जबाबदार्या असाव्यात की नको ? >> असाव्यात.
===
इथे बर्याचदा सुदृढ मुले आम्हाला जन्माला कशाला घातले असा आपल्या पालकांना प्रश्न विचारतात, (अमिताभ बच्चन या विषयावर कोणतीशी कविता वाचतात नेहमी) >> आपण मुलांना जन्माला घालून त्यांच्यावर आणि समाजावर फार उपकर केलेत असं पालक आणि समाज सतत कानिकपाळी ओरडत असत मुलांच्या; म्हणून मुलं तसा प्रश्न विचारतात.
===
आता जी मुले पालकांच्या, समाजाच्या आणि शासनाच्या निष्काळजीपणाने काही वेळा बेजबाबदारपणामूळे व्याधीग्रस्त म्हणून जन्मतील त्यांनी आपापले पालक , समाज आणि शासनास कोणते प्रश्न विचारावेत असे आपल्याला वाटते ? >> व्याधिग्रस्त मुलंच जन्माला येऊ देऊ नयेत. गर्भावस्थेत जितक्या लवकऱ शक्य होईल तितके हे व्याधी डिटेक्ट व्हावेत, आणि ते गर्भपात करावेत. अशा आरोग्य सुविधा सर्व जनतेपर्यंत, वाजवी दरात पोहचवायचा सरकारचा प्रयत्न असायला हवा.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 06/21/2018 - 03:10
नवीन
* किंवा ** देऊन जे मुद्दे लिहिले आहेत त्याबद्दल
जर बहुतांशी आत्ते, मामे, चुलत, मावस भावाबहिणीत किंवा इतर रक्त नातेवाईकात 'शारीरिक आकर्षण' असण्याची शक्यता फार कमी असेल तर त्याला कायद्याने लगाम घालण्यासाठी इतका खटाटोप करायची गरज नाही.
===
सहमत, पण मोठ्यांच्या मर्जीवर अवलंबून नात्यातील विवाहांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यासाठी कायद्याने अधिक जबाबदारी (दंड आणि शिक्षेची ) टाकावयास हवी. विवाह कर्त्या मुला मुलीस दंड नाही केला आणि लग्न लावून देणार्या पालकांना जबाबदार धरले तरी हरकत नाही. >> मोठ्यांच्या मर्जीवर अवलंबून केल्या जाणाऱ्या'नात्यातील' विवाहांचे प्रमाण अधिक आहे स्वजातीय विवाहपेक्षा? कशावरून?
===
दंड, शिक्षा करायचीच असेल तर केवळ शांतताप्रिय धर्म &/ केवळ नात्यातील लग्न विचारात न घेता ; व्याधीग्रस्त मुलं जन्माला येण्याची शकयता जास्त असलेली लग्न 'लावून देणार्या' सगळ्याना शिक्षा करा (म्हणजे मग त्यात ते सिंधी, वैष्णव, ब्राह्मण वगैरे सगळेच येतील)
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 06/21/2018 - 09:52
नवीन
आपले मुद्दे उलट्या क्रमाने विचारात घेतो.
कायदा सर्वांना समान असावा या बाबत पूर्ण सहमती आहे.
अर्थात हिंदू बाजूला विवाह लावून देतानाही गोत्र पद्धतीचा प्रभाव असल्यामूळे चुलत भाऊ बहीण असे विवाह होण्याचे प्रमाण जवळपास नसावे. -मावस भावांचे विवाहही कधी ऐकण्यात आलेले नाहीत- मामे बहिण आणि आत्ये भाऊ असे काही विवाह होतात पण जन्म पत्रिकेतील गुण जुळवण्याच्या अंधश्रद्धीय खटपटी मुळे त्यांचे प्रमाणही कमी होते . त्या विरुद्ध शांततेच्या धर्मात अद्याप ग्रंथ प्रामाण्याचे प्राबल्य अधिक असल्यामुळे तिकडे चुलत पारिवारीक विवाहांचे प्रमाण बरेच मोठे आहे. हि विभागणी सर्वांना सारखा असलेल्या कायद्यास लक्षात घ्यावी लागत नाही, त्या त्या समाजातील समाज सुधारकांना लक्षात घ्यावी लागते.
तरीही मामे बहिण आणि आत्ये भाऊ असे काही विवाह होतातच हेही वास्तव आहे आणि असे विवाह लावून देणार्यांना कायद्यापुढे एकाच मापाने तोलावे या आपल्या मताशी सहमत आहेच.
अहो मी स्वजातीय विवाहाशी तुलना केलेली नाही, परिवारातल्या परिवारात अरेंज्ड मॅरेज आणि परिवारातल्या परिवारात प्रेम विवाह अशी तुलना केली आहे. परिवारातल्या परिवारात -जिथे मुले मुली परिवारा बाहेरच्या मुलामुलीत पुरेसे मिसळू अथवा पाहू शकतात तिथे- चुलत भाऊ चुलत बहिण किंवा आत्ये भाऊ मामे बहिण असे प्रेम विवाहाचे प्रमाण , अशा लावून दिलेल्या अरेंज्ड मॅरेजपेक्षा सहाजिक पणे कमी असेल. ज्या नात्यांमध्ये जनुकीय जवळीक असते त्या नात्यात शारिरीक आकर्षण सहसा निर्माण होताना दिसत नाही, या विषयावर जे वैद्यकीय संशोधन असेल ते जाणकारांनी आपणास उपलब्ध करावे असे आवाहन करतो.
परंतु माझ्या मते जनुकीय जवळीक असते त्या नात्यात शारिरीक आकर्षण सहसा निर्माण होत नाही हा सहसा सार्वत्रिक अनुभव असावा, असे आकर्षण टाळण्यास काही सुवासिक ग्रंथि हार्मोन्स किंवा जे काय असेल ते काम करत असणार असे वाटते; तसे नसते तर चुलत चुलत भिन्न लिंगीत आकर्षण राहिले असतेच पण आई - मुलगा बाप मुलगी अशी नाती पण सुटली नसती पण इथे काही अपवादात्मक केसेस सोडल्या तर काकाला पुतणीचे मामा भाची प्रेमाचे प्रमाण कायदा आणि समाजाला हाताळता येणार नाही त्या पलिकडे गेले असते; पण जनुकीय जवळीक असते त्या नात्यात शारिरीक आकर्षण सहसा निसर्ग स्वतःच टाळताना दिसतो. पारिवारीक विवाहांचा प्रश्न मी वर म्हटल्या प्रमाणे परिवारातील मोठ्या लोकांनी टाकलेल्या दबावांमुळे निर्माण होतो आणि वाढतो.
पारिवारीक विवाहांचा प्रश्न मी वर म्हटल्या प्रमाणे परिवारातील मोठ्या लोकांनी टाकलेल्या दबावांमुळे निर्माण होतो आणि वाढतो म्हणून अशी कायद्याची गरज असते. सर्वच समाज सुधारणा कायद्यांमुळे प्रत्यक्षात शिक्षा होतात असे नाही पण समाजावर कायद्यांचा प्रभाव पडत असतो, त्या प्रभावांचा समाज सुधारणा घडवण्यात मोलाचा हात भार लागतो. (सती विरोधी कायद्या अंतर्गत खूप केसेस दाखल होतात असे नाही पण सतीच्या प्रथेला अडथळा घालण्यात , समाजातील कुरीतींना दूर करण्यात यश येते हे समाज सुधारणा कायद्यांना विरोध करण्यापुर्वी लक्षात घ्यावयास हवे)
तत्वतः सहमत आहे पण सर्व जनुकीय व्याधी भ्रूणावस्थेत समजतातच एवढे विज्ञान पुढे गेले आहे का ? याची कल्पना नाही, दुसरे एकदा का मातेच्या पोटात भ्रूण तयार झाले की माता पिता आणि परिवारासाठी गर्भपात हे मानसिक आघात करणारे ठरू शकतात आणि त्यांनी आपण म्हणता तसे गर्भपात करवून घेतले नाही तर एका नवजात अभ्रकावर आईवडीलांच्या चुकीच्या जनुकीय विवाह आणि संतती निर्मिती मुळे अन्याय होण्याचा संभव निर्माण होतो त्यामुळे, परिवारांतर्गत भावा बहिणीचे विवाह लावण्यात मोठी मंडळी पुढाकार घेत नाहीत हे पहाण्यास कायद्याने आणि समाजातील डोळस नेतृत्वाने पुढाकार घेणे नितांत गरजेचे वाटते.
अहो ईथे चर्चेचा मुख्य विषय, जन्मतः व्याधीग्रस्त मुलांना काय वाटत असेल याची चालू आहे , नाही का ?
मी जन्माला येणार्या म्हणजे जन्म झालेल्या या अर्थाने म्हणालोय आपण कदाचित भ्रूण या अर्थाने घेताय ; पण ईन एनी केस भ्रूणांचे काहीच आधिकार नसावेत हा विचारही टोकाचा वाटतो समजा एकाध्या जनुकीय सुदृढ भ्रूणाची आईने ते गर्भपात करून पाडलेही नाही पण पोटात स्वतःच जाणीवपूर्वक अथवा हलगर्जीपणाने कुपोषण केले आणि सुदृढ नसलेले बालक जन्मले तर आपले मत काय असेल ?
हाही भयानक विचार आहे. या न्यायाने उद्द्या लोकसंख्यावाढ ऋण करायचीए म्हणून कुणि हिटलर प्रमाणे वंश विच्छेद पॉलीसी राबवतो म्हणेल आणि असे करणे अमानुष ठरेल असे आपल्याला वाटत नाही का ?
मन मोकळ्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 06/22/2018 - 02:24
नवीन
अर्थात हिंदू बाजूला विवाह लावून देतानाही गोत्र पद्धतीचा प्रभाव असल्यामूळे चुलत भाऊ बहीण असे विवाह होण्याचे प्रमाण जवळपास नसावे. -मावस भावांचे विवाहही कधी ऐकण्यात आलेले नाहीत- >> गोत्र पद्धती फक्त उत्तरेकडील काही राज्यात वापरली जाते.
मामे बहिण आणि आत्ये भाऊ असे काही विवाह होतात पण जन्म पत्रिकेतील गुण जुळवण्याच्या अंधश्रद्धीय खटपटी मुळे त्यांचे प्रमाणही कमी होते . >> तेलगू, तमिळ भागात या विवाहांच प्रमाण भरपूर आहे आणि तिकडच्या सिनेमात याच उदात्तीकरण करतात असे वर कुठल्यातरी प्रतिसादात आलेल्या एका दुव्यात वाचले. महाराष्ट्रातदेखील हे प्रमाण अगदी कमी नसावे (अंदाज)
त्या विरुद्ध शांततेच्या धर्मात अद्याप ग्रंथ प्रामाण्याचे प्राबल्य अधिक असल्यामुळे तिकडे चुलत पारिवारीक विवाहांचे प्रमाण बरेच मोठे आहे. >> भारतातल्या मुस्लिममध्ये हे कितपत होत याचा नीट विदा जमवावा लागेल.
===
अहो मी स्वजातीय विवाहाशी तुलना केलेली नाही,....…... परिवारातील मोठ्या लोकांनी टाकलेल्या दबावांमुळे निर्माण होतो आणि वाढतो. >> माझं म्हणणं आहे कि नात्यातील विवाहाचा विदा जमा करून त्यातील संतती जनुकीय व्याधीग्रस्त असण्याची शक्यता वाढणे याचा जसा आणि जितका अभ्यास झाला आहे तसाच स्वजातीय विवाहबद्दलदेखील व्हावा. कदाचीत जवळपास सारखाच विदा येईल; खासकरून कमी लोकसंख्या असलेल्या जातींसाठी.
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 06/22/2018 - 02:44
नवीन
तत्वतः सहमत आहे पण सर्व जनुकीय व्याधी भ्रूणावस्थेत समजतातच एवढे विज्ञान पुढे गेले आहे का ? >> गेले आहे का माहित नाही पण जायला हवं.
दुसरे एकदा का मातेच्या पोटात भ्रूण तयार झाले की माता पिता आणि परिवारासाठी गर्भपात हे मानसिक आघात करणारे ठरू शकतात >> हे planned pregancies बाबत खरे असेल unplanned बाबत नाही. आणि भारतातलय 50% गर्भधारणा unplanned असतात.
आणि त्यांनी आपण म्हणता तसे गर्भपात करवून घेतले नाही तर एका नवजात अभ्रकावर आईवडीलांच्या चुकीच्या जनुकीय विवाह आणि संतती निर्मिती मुळे अन्याय होण्याचा संभव निर्माण होतो >> आईवडिलांची चूक 'चुकीचा जनुकीय विवाह करणे' ही नसून; 'व्याधिग्रस्त गर्भ आहे हे लक्षत येऊनदेखील तो वाढवणे, जन्माला घालणे' ही आहे. आणि ती चूक ननात्यातील विवाहातदेखील होऊ शकते.
===
अहो ईथे चर्चेचा मुख्य विषय, जन्मतः व्याधीग्रस्त मुलांना काय वाटत असेल याची चालू आहे , नाही का ? >> व्याधिग्रस्त मुलानी आपले प्रश्न RTL कायदा बनवनाऱ्या सरकारला विचारावेत. तुमच्याच कुठल्यातरी एका लेखात बातमी वाचलेली ' मी एकल पालक आहे, गर्भ मतिमंद निघणार आहे त्यामुळे मला ५+ महिन्यानंतरही गर्भपातास परवानगी द्या' अशी मागणी एका स्त्रीने कोर्टात केलेली. जी कोर्टाने नाकारली. ते मूल कोर्टाच्या/ संसदेच्या पायरिवर ठेऊन द्यायच का त्या बाईने??
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 06/22/2018 - 06:41
नवीन
माझ्या कोणत्याही लेखात मी अशी बातमी दिल्याचे स्मरत नाही, संदर्भ दिल्यास आभारी राहीन. स्त्रीचे निवडस्वातंत्र्य विषयक माझा मुख्य धागा स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१ या धाग्यावर आपली मुख्य चर्चा डॉ. खरे सरांशी चालू होती. इथेही त्यांच्यशी या विषयावर आपणास चर्चा करावयाची असल्यास माझी हरकत नाही.
या धागा लेखाच्या संदर्भात बोलायचे झाले तर, (चुलत/मावस/मामे/आते) भावाशी लग्न करायचे , गर्भाचा जनुकीय व्याधी प्रश्न दिसल्यावर गर्भ ५ महिन्यानंतर मारायचे स्वातंत्र्य मागायचे रॅशनल समजले नाही,
समजा कायदा, न्यायालय, समाज, गर्भाचा बाप सगळ्यांनी जरी स्विकारले तरी किती टक्के स्त्रीया आपल्या मताच्या निघून गर्भपात घडवतील ? आणि तिने गर्भपत नाही केला तर त्या मुलाने काय करायचे ?
भावापासून्चा गर्भ तयार होऊ देण्यासाठी आधी कोण जबाबदार आहे ? आई बाप की सरकार ?
(चुलत/मावस/मामे/आते) भावाशी लग्न केल्यास ती २५ ते ५० टक्के शक्यता असेल; समजा ननात्यातील विवाहात अगदी छोट्या जाती अंतर्गत केले आणि हजार विवाहोत्सूक मुले असतील तर शक्यता १/१००० एवढी कमी होते ना ! कुठे २५ ते ५० % आणि कुठे १/१००० काही तूलना आहे का ?
आपले लॉजीक समजले नाही. प्रेग्नेंसी प्लान केलेली असो अथवा नसो, बहुसंख्य स्त्रीयांसाठीही गर्भपात मानसिक आघात असण्याची शक्यता अधिक असेल ना ? तुम्ही स्वतःच्या मानसिक कठोरते वरून बहुसंख्य स्त्रीयांबद्दल निष्कर्ष म्हणजे अपवदावरून नियम सिद्ध करत नाही आहात ना ?
आणि भ्रूणाच्य प्राथमिक अवस्थेत सर्वच संभाव्य व्याधींची माहिती मिळण्या इतके विज्ञान पुढे जाणार नाही तो पर्यंत काय ?
आणि समजा विज्ञान पुढे गेले पण ग्रंथ प्रामाण्यामुळे अथवा स्त्री बिज आणि पुरुषबीज एक झाले कि आयुष्य सुरु झाले समजून गर्भपात नाकारणार्या भाऊ बहीण विवाहातून जन्मलेल्या व्याधीग्रस्त संततींनी काय करायचे ?
पुढच्या निसटत्या बाजू शॉर्ट ब्रेकके बाद
- Log in or register to post comments
ए
एमी
Sat, 06/23/2018 - 01:11
नवीन
या धागा लेखाच्या संदर्भात बोलायचे झाले तर, (चुलत/मावस/मामे/आते) भावाशी लग्न करायचे , गर्भाचा जनुकीय व्याधी प्रश्न दिसल्यावर गर्भ ५ महिन्यानंतर मारायचे स्वातंत्र्य मागायचे रॅशनल समजले नाही,
भावापासून्चा गर्भ तयार होऊ देण्यासाठी आधी कोण जबाबदार आहे ? आई बाप की सरकार ?
>> तुम्ही 'भावाशी लग्न -> जनुकीय व्याधीग्रस्त गर्भ -> गर्भपात' असाच विचार का करताय? भावाशी लग्न केले नाही तर सुदृढ गर्भ'च' असेल याची खात्री देता येते का? जनुकीय व्याधीग्रस्त गर्भ कोणत्याही लग्नातून निर्माण होऊ शकतो.
===
समजा कायदा, न्यायालय, समाज, गर्भाचा बाप सगळ्यांनी जरी स्विकारले तरी किती टक्के स्त्रीया आपल्या मताच्या निघून गर्भपात घडवतील?
>> ते परवानगी दिल्यावरच कळेल. सध्या भारतात ४.८ कोटी गर्भधारणा वर्षाला होतात, त्यातल्या २.४ कोटी अनप्लान्ड असतात, त्यापैकी १.६ कोटी गर्भपात करतात, एकदा मलातरी 'कमी' वाटत नाहीय.
आणि तिने गर्भपत नाही केला तर त्या मुलाने काय करायचे ?
>> न/कळत केलेल्या चुकांची फळं भोगायची मग दोघांनी!
===
(चुलत/मावस/मामे/आते) भावाशी लग्न केल्यास ती २५ ते ५० टक्के शक्यता असेल; समजा ननात्यातील विवाहात अगदी छोट्या जाती अंतर्गत केले आणि हजार विवाहोत्सूक मुले असतील तर शक्यता १/१००० एवढी कमी होते ना ! कुठे २५ ते ५० % आणि कुठे १/१००० काही तूलना आहे का ?
>> गणित काय झेपले नाही.....
===
आपले लॉजीक समजले नाही. प्रेग्नेंसी प्लान केलेली असो अथवा नसो, बहुसंख्य स्त्रीयांसाठीही गर्भपात मानसिक आघात असण्याची शक्यता अधिक असेल ना ?
>> assumption!
तुम्ही स्वतःच्या मानसिक कठोरते वरून बहुसंख्य स्त्रीयांबद्दल निष्कर्ष म्हणजे अपवदावरून नियम सिद्ध करत नाही आहात ना ?
>> तुम्ही स्वतःच्या मानसिक दौर्रबल्यावरून बहुसंख्य स्त्रियांबद्दल निष्कर्ष काढत नाही आहात ना?
===
आणि भ्रूणाच्य प्राथमिक अवस्थेत सर्वच संभाव्य व्याधींची माहिती मिळण्या इतके विज्ञान पुढे जाणार नाही तो पर्यंत काय?
>> तोपर्यन्त प्राथमिक अवस्थेनंतरही गर्भपातला परवानगी द्या. create as many 'safe passages' as possible for adults to opt out of the situation.
===
आणि समजा विज्ञान पुढे गेले पण ग्रंथ प्रामाण्यामुळे अथवा स्त्री बिज आणि पुरुषबीज एक झाले कि आयुष्य सुरु झाले समजून गर्भपात नाकारणार्या भाऊ बहीण विवाहातून जन्मलेल्या व्याधीग्रस्त संततींनी काय करायचे ?
>> त्यांच्यातदेखील १२ आठवडेपर्यंत गर्भपात करता येतो. भारतादेखील 'कुठल्याही' दवाखान्यातून गर्भपात करता येण्याला तेच १२ आठवडे लिमिट आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
Sat, 06/23/2018 - 01:16
नवीन
एकदा मलातरी 'कमी' वाटत नाहीय. > > > आकडा मलातरी 'कमी' वाटत नाहीय.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 06/22/2018 - 07:45
नवीन
तसे याचे उत्तर देऊन झाले आहे, खासकरून कमी लोकसंख्या असलेल्या जातींत विवाहासाठी (भाऊ नसलेले) १००० मुले उपलब्ध आहेत, अशा जातीतल्या जातीत विवाह केला तर एकसारखे जनुकीय असण्याची शक्यता १/१००० ईतकी पण कमी होऊ शकेल. आणि तेच उपलब्ध विवाह उमेदवार ६ चुलत भाऊ आहेत, ६ आत्येभाऊ आहेत ६ मावस भाऊ आहेत, ६ मामे भाऊ आहेत ( त्यातील अर्धी प्रोबॅबिलीटी चुलतभावाने त्याचे जीन्स काकू कडून घेतले म्हणून कमी होईल आत्येभावाने आत्तोबा कडून घेतली म्हणून कमी होईल मामे भावाने मामीचे जीन्स घेतले म्हणून कमी होईल असेच मावसोबामुळे अर्धी प्रोबॅबीलीटी कमी होईल ) म्हणजे जनुकीय चाचणी केलेली नसेल तर १२ जनूकीय दृष्ट्या योग्यही असू शकतील तर १२ जनूकीय दृष्ट्या अयोग्यही असू शकतील आता इथे जनुकीय अयोग्यतेची प्रोबॅबीलीटी ५० टक्के होते आणि कुटूंबा बाहेर पण जातीतल्या जातीत जरी भावेतर विवाह केला तर प्रॉबॅबिली टी अत्यंत छोट्या जातीतही १/१००० एवढी कमी होईल. तुम्ही म्हटता तसे टक्केवारी शास्त्रीय पद्धतीने अभ्यसलीतरी थोडी फार तफावत पडेल पण परिवारातल्या भावाशी लग्न करण्या पेक्षा परिवारेतर पण जातीत लग्न केल्यास रिस्क फॅक्टर खूपच कमी असेल हे साधे तोंडी गणित आहे , अर्थात जातीची लोकसंख्या जेवही मोठी अथवा जात धर्म वंश फॅक्टर टाळले तेवढीप्रिस्क फॅक्टर कमी होत जाईल हे नक्की.
विवाह पूर्व सर्वाम्च्याच जनूकीय चाचण्या होऊन निर्णय होणे उत्तमच पण अशी चाचणी होत नसेल तर किमान पक्षी परिवारातल्या परिवारात विवाह टाळावयस हवेत या बद्दल आपले काय मत आहे ?
उर्वरीत मुद्द्यांचा परामर्ष पुढच्या प्रतिसादात शॉर्ट ब्रेक के बाद.
- Log in or register to post comments
ए
एमी
Sat, 06/23/2018 - 01:20
नवीन
विवाह पूर्व सर्वाम्च्याच जनूकीय चाचण्या होऊन निर्णय होणे उत्तमच पण अशी चाचणी होत नसेल तर किमान पक्षी परिवारातल्या परिवारात विवाह टाळावयस हवेत या बद्दल आपले काय मत आहे ?
>> हो टाळायला हवेत. पण त्यासाठी बंदी घालणारा कायदा नको.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 06/22/2018 - 08:35
नवीन
ग्रंथ प्रामाण्येतर रूढींपेक्षा ग्रंथप्रामाण्याचा आधार असलेल्या रुढी बदलण्यास तुलनेने कठीण जातात . भारतीय हिंदूंच्या विवाहातही भावांशी विवाहाचे प्रमाण असले तरीही मनुस्मृतीचा आधार घेतला जात असण्याची शक्यता ना के बराबर वाटते पण आपण म्हणता म्हणून गूगल ट्रेंडवरची मनुस्मृती वि. कुराण शब्द शोध भारतात घेतला जाण्याचे प्रमाण बघीतल्यास कुराण हा शब्द मनुस्मृती शब्दाच्या ३० ते ८० पट अधीक शोधला जातो सुद्धा अॅव्हरेज ४० पट अधीक आहे आणि जेव्हा की मुस्लीम लोकसंख्या भारताच्या १५ ते फारतर २० टक्के असेल
प्रदेश निहाय स्थिती पाहिली तर हिमाचल, हरियाणा आणि छत्तीसगढ या केवळ तीन राज्यात मनुस्मृती शब्दाचा अधिकतम शोध कुराणच्या तुलनेत १० टक्के पर्यंत म्हनजे तेथे सुद्धा कुराण शब्दाचा शोध दहापट आहे. ओडीसा आणि उत्तराखंदातून कुराण शब्दाचा शोध १४ ते १६ पट आहे. पंजाब, राजस्थान, युपी, बिहार, मध्यप्रदेश या पाच राज्यात मनुस्मृती पेक्षा कुराण शब्दाचा शोध २०पटीने अधिक आहे. दिल्ली गुजरात महाराष्ट्र कुराण शब्दाचा शोध ३० पट आहे म्हणजे मनुस्मृती शब्दाचा शोध कुराण शब्दाच्या शोधाच्या केवळ ३ % आहे, प. बंगाल , मणिपूर कर्नातक आसाम चंदीगढ कुराण शब्दाचा शोध मनुस्मृती शब्दाच्या ५० मट आहे म्हणजे मनुस्मृती शब्दाचा शोध केवळ २ % आहे. बाकी दक्षिणी राज्ये म्हणजे तामीळ नाडू , तेलंगाणा, आंध्रा मनुस्मृती शब्दाचा शोध कुराण शब्दाच्या तुलनेत केवळ १ टक्का आहे म्हणजे कुराण शब्दाचा शोध तिथे १०० पट आहे तर काश्मिर गोवा आणि पुर्वोत्तर भारतात मनुस्मृती शब्दाचा शोध घेतला जात असल्याचे दिसत नाही.
दक्षिण भारतात हिंदूत बहीण भाऊ विवाह दिसत असले तरी मनुस्मृतीच्या प्रभावाने नसावे हे लक्षात घेता यावे. दुसर्या बाजूला ग्रंथ प्रामाण्याची शक्यता पुरेपूर दिसते.
बाकी प्रत्यक्ष भाऊ बहीण विवाहांची आकडेवारी ४.२ मध्ये देतो
- Log in or register to post comments
ए
एमी
Sat, 06/23/2018 - 01:24
नवीन
अरे बापरे :O
कुठला शब्द जास्त गुगलला त्यावरून कुठली संतती जनुकीय व्याधिग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे हे ठरवायचं का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 06/22/2018 - 09:22
नवीन
ऍमी ताई
तुम्ही हि केस म्हणताय का?
त्यात वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
http://www.newindianexpress.com/nation/2017/oct/13/bombay-high-court-says-no-to-abortion-for-16-year-old-rape-survivor-1673273.html
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 06/22/2018 - 23:09
नवीन
ती नाही ही:
http://www.livelaw.in/sc-refuses-permission-woman-abort-26-week-foetus-syndrome/
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 06/23/2018 - 07:09
नवीन
ऍमी ताई
गर्भपात या बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती नसावी हे गृहीत धरून मी लिहीत आहे.
तीन महिन्यांनंतर केंव्हाही गर्भपात करतात ते एक छोट्याशा प्रसूती सारखेच असते.गर्भाशयाचे तोंड उघडून बाळाला बाहेर काढले जाते. चोवीस आठवड्यापर्यंत गर्भाची फुप्फुसे विकसित झालेली नसतात त्यामुळे कोणत्याही उपचाराने मूल जगू शकत नाही. तरी सुरक्षितता म्हणून वीस आठवड्यापर्यंतचा गर्भपात कायदेशीर केलेला आहे.
सव्वीस आठवड्याच्या गर्भाला तुम्ही गर्भपाताने बाहेर काढाल तेंव्हा ते श्वास घेऊ लागण्याची आणि स्वताहून जिवंत राहण्याची शक्यता बरीच आहे. यापेक्षा त्या बाळाला पूर्ण वाढ होऊ देणे हे श्रेयस्कर असते.
केवळ बाळ मतिमंद आहे म्हणून त्याला मारून टाकायचे हे कायद्यात बसत नाही.
पूर्ण दिवसाच्या प्रसूतीच्या वेळेस घुस्मटल्याने बाळ जर मतिमंद झाले तर त्याला मारून टाकायचे का?
दुसरी गोष्ट कायदा करणे हे न्यायालयाचे काम नाही तर कायदयाचा अर्थ लावणे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे न्यायालयाचे काम आहे.
जर आई किंवा बाळाच्या जीवाला धोका नसेल तर २० आठवडयाच्या पलीकडे गर्भपाताला परवानगी देणे हे कायद्याच्या कक्षेत बसत नाही. त्यास्थितीत न्यायालयाचे हात बांधले गेलेले असतात.
अशा स्थितीत स्वतः जगत असलेल्या बाळाला मारून टाकायचा हक्क न्यायालयाला नाही. असा कायदा करायचा कि बाळाला संसदेच्या/ कोर्टाच्या दारात टाकायचे हे समाजाने ठरवायचे आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 06/22/2018 - 11:44
नवीन
आंतरजालीय उपलब्ध विदा बघीतला तर १९९२ च्या आसपास मुस्लिमांतील हे प्रमाण साधारणपणे हिंदूंच्या दुप्पट होते असे दिसते. पण तत्पुर्वी आपण जातीचा प्रश्न विचारलात तर ह्या साठी शोध घेताना अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील संशोधकांचा एक निबंध (पिडीएफ) दिसला. त्याचे पान १९ वरील निष्कर्ष पहाता अश्रफ म्हणजे भारता बाहेरून आलेल आक्रमणकर्ते मुस्लीम आणि अज्लफ म्हणजे भारतातील स्थानीक धर्मांतरीत मुस्लीम यांच्यातील जनुकीय अंतर अद्यापही कायम आहे. (बाहेरून आलेले आश्रफ वंशीय स्थानीक धर्मांतरीत अजलफांना अजूनही कसे बरोबरीने वागवत नाहीत या बद्दल इंग्रजी विकिपीडियावर लेखात उल्लेखही दिसतो. पण तो या धागा चर्चेचा मुख्य मुद्दा नाही) त्यांच्यात तांत्रिक दृष्ट्या मुस्लीमधर्मांतर्गत आंतरजातीय विवाह प्रतिबंधीत नाहीत तरीही अशा पद्धतीने जनुकीय अंतर अद्याप शिल्लक रहाण्याचे एक कारण चुलत भाऊ बहीण विवाहावरील भर राहिले असू शकेल का ? (आणि हे कारण नसेल तर आश्रफ मंडळी जाणीव पूर्वक वैवाहीक उच्चता पाळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात पुन्हा हे कारण या धाग्यच्या मुख्य चर्चेचा भाग असणार नाही )
आता हा (मुस्लीम जनुकीय शोधतज्ञांचा) शोध निबंध स्पेसिफीकली मुस्लीम मुलांचा अभ्यास करण्या मागे खालील कारण देताना दिसतो. शोध निबंधाचे निष्कर्ष डोळे उघडणारे ठरावेत ते वाचून घ्यावेत.
PDF | Endogamy, consanguinity and community genetics. Available from: https://www.researchgate.net/publication/7404668_Endogamy_consanguinity_and_community_genetics [accessed Jun 22 2018]. मधील काही नोंदी पहा
या शोध निबंधाचे पृष्ठ ९४ वरील तेबल क्रमांक २ मधील आकडेवारी १९९२ -९३ मध्ये भाऊ बहीण विवाहाचे मुस्लीमाम्चे प्रमाण हिम्दूंच्या दुप्पट असावे या कडे निर्देश करते. http://www.njcmindia.org वरील विदर्भातील अलिकडील एक शोध निबंध या आकडेवारीस दुजोरा दिसताना दिसतो. त्यांना त्यांच्या विदर्भातील अभ्यासात मात्र हिंदूंअध्ये हे प्रमाण १५.८८ टक्के तर मुस्लीमां मध्ये २३.७६ टक्के आढळले म्हणजे दुप्पट नाही तरीही मुस्लीमतील हे प्रमाण विदर्भात अदमासे ८ टक्क्यांनी अधिकच आहे. *अर्तात या पहाणीचा सँपल साईज लहान आहे
* An analysis of consanguineous marriage in the Muslim population of India at regional and state levels. इसवी २०००
काय म्हणते पहा
* Trends of consanguineous marriages in a Sunni Muslim population of West Bengal, India. ईस्वी २००७ ह्या निबंधा नुसार पश्चिम बंगाल मधील मुस्लीमातील भाऊ बहीण विवाहाचे प्रमाण कमी होत चालल्याची म्हणजे अदमासे ८ टक्क्या पर्यंत असल्याची नोंद दिसते, अर्थात पुर्व भारतातील हे प्रमाण आधी पासूनच कमी व्हावयास लागले असावे.
हा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाच्या संशोधकाम्चा संशोधन निबंध खालील प्रमाणे मत नोंदवताना दिसतो
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »