Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अयोध्या राममंदिर

म
मंदार कात्रे
Sat, 02/10/2018 - 05:08
🗣 150 प्रतिसाद
अयोध्या राममंदिर संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेहमीच वादग्रस्त अन संशयास्पद राहिली आहे. कोर्टाने निष्पक्ष पणे समोर उपलब्ध तथ्ये , पुरावे अन घटनांचा आढावा घेवून त्वरित निकाल देणे अपेक्षित असते . गेल्या महिन्यात घडलेल्या जजेस च्या पत्रकार परिषदे सारख्या घटनांमुळे संशयाची सुई कोर्टाकडेच वळत आहे. कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी अथवा अल्पसंख्यांकांच्या हिंसक प्रतिक्रिया येतील या भीतीपोटी अथवा दडपणाखाली सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणात चालढकल व वेळकाढूपणा करत आहे . अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्‍या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ? घोर कलयुग !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 40890 views

🗣 चर्चा (150)
इ
इरसाल Mon, 02/12/2018 - 12:08 नवीन
ताहेर शाह असे वाचावे
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 02/13/2018 - 05:41 नवीन
राम कहानी ऐतिहासीक सत्य असल्याचा पुरावा नसणे हि रामकथेची लिमीटेशन आहे कि इतिहास शास्त्राची ??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 08:36 नवीन
ही संशोधनाची/संशोधकांची लिमिटेशन असू शकतं.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 09:20 नवीन
...राम कहानी ऐतिहासीक सत्य असल्याचा पुरावा नसणे हि रामकथेची लिमीटेशन आहे कि इतिहास शास्त्राची ??
लिमीटेशन रामकथेचे नाही संदर्भ न नमुद करता पुराणे लिहिणार्‍या आणि सांगणार्‍या संदर्भाचा आग्रह न धरणार्‍या श्रोते आणि वाचकांचे लिमीटेशन आहे. दुसरे लिमीटेशन आपापल्या प्रवासाची प्रवासवर्णने न टिपणार्‍या तितिहासातील भारतीय प्रवाश्यांचे कि ज्यामुळे , बाहेरुन येणार्‍या संकटांची माहिती भारतीय राजांना वेळेत विश्वासार्ह पद्धतीने मिळाली नाही . भारतीय व्यापारी आणि उत्पादक ज्यांनी पररास्।ट्रात उपलब्ध शस्त्रांचा अभ्यासकरुन तशी शस्त्रास्त्रे भारतीय राजांना उपलब्ध करवली नाही त्यांची लिमीटेशन आहे.भारतीय प्रवासांनी प्रवासातील नोंदी करण्याची संस्क्र्ती न जोपासल्यामुळे भारतीय इतिहासाच्या नोंदी होऊ शकलेल्या नाहीत . ही लिमीटेशन आहे. लिमीटेशन इतिहासशास्त्राचे नाही, जनतेचे इंटरेस्ट ओळखून उत्खनानांवर आणि इतिहास संशोधनावर वेळीच लक्ष न पुरवणार्‍या स्वातंत्र्योत्तर सरकारची लिमीटेशन आहे - एक उदाहरण द्यायचे म्हणजे नेताजी सुभाष चंद्रांच्या मृत्यूचा शोध घेणारी बहुतेक कमिशने तैवानच्या भेटीला गेलीच नाहीत किंवा जपान मधल्या अस्थींचा डि एन ए चेक केला जाऊ शकतो पण एकही सरकार काय केल्या पुढे येत नाही. सांगायचा मुद्दा सखोल संषोधनाचा अ‍ॅटीट्यूड नसण्यात लिमिटेशन आहे. समोर आलेल्या ऐतिहासिक पुराव्यांना केवळ ऐतिहासिक पुरावा म्हणून न पहाता डावे किंवा उजवे चष्मेलावून सोईस्कर भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करण्यात लिमिटेशन आहे. शास्त्रांनाही लिमिटेशन असता त पण शास्त्रे काळाच्या ओघात प्रगती करतात. माणसांच्या अ‍ॅटीट्यूडमधली लिमिटेशन्स अधिक खतरनाक असू शकतात.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/15/2018 - 21:28 नवीन
शंभर कथांपेक्षा अस्सल कागदपत्राचा एक चिटोरा इतीहास संशोधन शास्त्रात जास्त प्रमाण मानतात. त्यातही समकालीन, समभाषीक, समप्रादेशीक, नॉन बायस्ड वगैरे चाळण्या असतातच. तसं ते योग्य देखील आहे. पण घटनांची जंत्री अशी हार्ड कॉपी करुन साठवणे हे अगदी अलिकडचे आहे. अशी जंत्री बनवणे, भविष्यात त्याचा संदर्भ म्हणुन अभ्यास करणे, त्यातुन इन्फरन्स काढणे हि एक शैली आहे. घटनांवरुन निष्कर्श काढणे, मेंदुत साठवणे, आणि हे शहाणपण गोष्टीरुपाने प्रचलीत करणे हि दुसरी शैली. पूर्वीच्या काळात हि दुसरी शैली प्रचारात असणं जास्त स्वाभावीक होतं. उदा. व्यासांनी एकाच वेदराशीला चार भागात विभागलं. पुढे तेच चार वेद म्हणुन प्रसिद्ध झाले. मूळ वेदसंहितेला जपण्याच्या भानगडीत कुणी पडलं नाहि. तसं करणं व्यावहारीक देखील नव्हतं. आता या घटनेला अर्वाचीन इतीहास शास्त्रात कसं बसवायचं ? रामायणलाकीन कागदाचा चिटोरा कसा मिळणार ? बाकी डॉक्युमेण्टेशनची बोंब तर होतीच इथे. चंद्रगुप्त वगैरेचे संदर्भ आपल्याला परदेशी साहित्यात होते म्हणुन कळले. चाणक्याचा केवळ एक अर्थशास्त्र ग्रंथ कसा तरी उपलब्ध आहे. अजुन शीवचरीत्र पूर्णपणे समोर आलेलं नाहि. अशा वेळी पौराणीक काळाचं, आणि त्या आधीचं जग कसं होतं याची व्युत्पती आधुनीक इतीहासशास्त्राच्या चौकटीत मांडणं कठीण वाटतं. म्हणुनच रामायण-महाभारताला इतीहास म्हणुन कधि मान्यता मिळेल असं वाटत नाहि. पण त्याने काहि फरक देखील पडु नये :).
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/16/2018 - 05:02 नवीन
....अशा वेळी पौराणीक काळाचं, आणि त्या आधीचं जग कसं होतं याची व्युत्पती आधुनीक इतीहासशास्त्राच्या चौकटीत मांडणं कठीण वाटतं.
इथे असंख्य साधनांची उपलब्धता असताना अलिकडच्या काळाचा निष्पक्ष लेखा जोखा मांडणे कठीण असते , तिथे ज्या काळासाठी साधनांची कमतरता अथवा साधने अनुपलब्ध आहेत त्याचा अमुक एकच शक्यता बरोबर अशा पद्धतीने इतिहास शास्त्राच्या चौकटीत बसवणे कठीण असावे. अनेक शक्यता असू शकतात असा सर्वसाधारणपणे विचार करणे आणि अधिकतम स्विकारणे श्रेयस्कर असावे. येशू ख्रिस्ताचा काही काळ तो नेमका कुठे होता हे माहित नाही. तो भारतात येऊन गेला असेल का अशी एक शक्यता पिकवली जाते, अशी शक्यता पिकवण्यास हरकत नाही पण शक्यतेला शक्यतेची मर्यादा असते तीही की इतरही अनेक शक्यता असू शकतात . तो त्याच्या त्याच्या गावी नॉर्मल जिवन जगत फक्त इतिहासात अनरेकॉर्डेड असावी.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/16/2018 - 13:24 नवीन
..... म्हणुनच रामायण-....ला इतीहास म्हणुन कधि मान्यता मिळेल असं वाटत नाहि. पण त्याने काहि फरक देखील पडु नये :).
विधिशाशास्त्राचा विचार करताना प्रस्तुत अयोध्या मंदिर वादाच्या बाबत अंशतः फरक /प्रभाव पडतो. शोले चित्रपट किंवा हॅरी पॉटर इतिहास नाही हे नक्की माहीत आहे तर शोले किंवा हॅरी पॉटर संबंधी मंदिर अयोध्येत होते असा कुणी दावा केला तर तात्काळ फेटाळता येतो कारण तशी शक्यता मुळी बाकी राहात नाही . रामायणाच्या बाबतीत शक्यता पूर्ण फेटाळताही येत नाही. जे शक्यता पूर्ण फेटाळू इच्छितात त्यांनाहि १) बाबरी ढाचाखाली (बाबरपुर्व भारतीय शैलीतील) मंदिर भींतीचे आर्किओलॉजीकल पुरावे मिळाले हे वास्तव स्वीकारावे लागते. २) बाबरी ढाचाच्या जागी मंदिर असल्या बद्दल (कागदोपत्री पुरावा उपलब्ध होता नसतानाही) आणि सांस्कृतिक दृष्ट्या गंडवले गेल्याचा लोकसंस्कृती सातत्याने दावा सांगता होती हे मात्र बऱ्या पैकी पुढे येते (संदर्भ मीनाक्षी जैन ) हे हि स्वीकारावे लागते. ( ३) हरी-विष्णू शिलालेखास प्रमाण म्हणून स्वीकारावे कि नाही - ३.१ आणि स्वीकारला तर ते विष्णू मंदिर रामाचे म्हणून स्वीकारावे का - हा तिसराही प्रश्न न्यायालयासमोर असेल तो वेगळा अधिकचा ) तसे पहाता आपण म्हणता तसे क्रमांक १, २, ३, ३.१ या पैकी कोणताही दावा स्वीकारण्यास न्यायालय तयार झाले तर रामायण झाले नसले तरी निकाल मंदिराच्य बाजूने लागणे शक्य आहे. पण रामायण घडलेच नाही असे शोले सिनेमाचे साम्य दाखवून जनतेच्या गळी उतरवता आले तर मंदिराकरताचा दाव्यातला जनतेचा रस कमी होईल अशी काही डाव्या विचाराच्या लोकांना आशा असते. त्यांच्या कथनाला जनतेचे बळ मिळाले तर टोकाच्या उजव्यांचा करणी सेना स्टाईल फ्लॉपशो होऊ शकतो. जिथपर्यंत न्यायालय आहे, तीथपर्यंत १२० कोटी भारतीयांपैकी एकाही भारतीयाने मूलभूत अधिकाराचा वास्ता दिला कि न्यायालयास बाबरी च्या बाजू अधिक वरील चार मुद्दे पैकी कशास रास्त मानायचे हे ठरवून निकाल द्यावा लागेल म्हणजे रामायण खरेच घडले कि नाही याचा वास्ता न्यायालयास नाही, पण रामायण घडले आणि नाही घडले या पैकी जनतेस काय कन्व्हीन्सिंग वाटेल त्यात डाव्यांच्या आणि उजव्यां चे दोन्हीही बाजूचे राजकीय हितसंबध नेमके कसे गुंतले आहेत हे लक्षात येते. विषय निघालाच आहे तर विधी न्याय मीमांसाशास्त्रा समोरची अजून काही आव्हानांचा विचार करता येईल . १) कोणत्याही जमिनीचा पहिला आणि शेवटचा मालक कोण ? तसे म्हटले तर त्या त्या वेळचे सत्ताधीश / राजे आणि आताच्या काळात सरकार १. १) सत्ता बदलानंतर मागच्या सत्तेने केलेले जमिनीचे अलोकेशन नवीन सत्तेने मान्य करावे का १.२) मागच्या सत्ताधीशानी त्यांच्या आधीच्या सत्ताधीशाच्या वेळच्या मालकी बदलताना अन्याय्य दृष्टिकोन ठेवला असेल -जसे अयोध्या मंदिर संबंधाने दावा आहे किंवा आताच्या काळात नव्या सत्तेस बदल करणे जरुरी वाटते जसे कुळ कायदा - तरीही मान्य करावे का ? १. २ ) मान्य केले तर मागच्या सत्ताधीशानी त्यांच्या आधीच्या सत्ताधीशाच्या वेळच्या मालकी बदलल्या असतील कोणती मालकी ग्राह्य धरावी १. ३ ) मागच्या सत्ताधीशानी त्यांच्या आधीच्या सत्ताधीशाच्या वेळच्या मालकी बदलताना अन्याय्य दृष्टिकोन ठेवला असेल आणि त्या बद्दल आता न्याय द्यायचे नव्याने ठरवले तर असे किती केसेस बद्दल किती काळासाठी मागे जात राहावे १. ४) नव्या सत्तेने मागच्या सत्तेचे अलोकेशन सरळ सरळ त्याज्य ठरवून नवी अलोकेशंस करावीत का ? आता हे सर्व प्रश्न पाहिल्या नंतर काही बाबाजी न्यायालयाच्या अखत्यारीत तारा काही संसदेच्या आणि राज्य घटनेच्या अधीन असतील हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 02/13/2018 - 06:05 नवीन
माझ्या मते, सर्वोच्च न्यायालय या केसचा निकाल लावण्यासाठी जो वेळ घेते तो योग्य आहे. तडकाफडकी कुठल्यातरी एका बाजूला फेव्हर करणारा निर्णय दिला तर राजकिय पक्ष, धर्मांध संघटना लोकांच्या भावना भडकावून दंगली घडवून आणण्याची मोठीच जोखीम आहे. यात गरीबाची घरे जळणार. मुख्य सूत्रधार नामानिराळे राहतील. आपल्या देशात कायदा- सुव्यवस्थेबाबत जे 'गांभिर्य' दिसते त्यावरून आणखी १०-१५ वर्षे तरी सतत भळभळती जखमच माथी राहील. त्यापेक्षा न्यायालयाच्या बाहेरच काही समेट होतो का ते पाहणे योग्य राहिल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 09:42 नवीन
माझ्या मते, सर्वोच्च न्यायालय या केसचा निकाल लावण्यासाठी जो वेळ घेते तो ....
धागा लेखकाच्या न्याययंत्रणेवर अनावश्यक खापर फोडण्याकडे आपले लक्ष गेले ते बरे झाले. पण वस्तुतः न्याय हा लवकरात लवकर होणे अभिप्रेत असते. जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड अशी म्हण आहे. तरीही धागा लेखकाचीही बाजू निसटती आहे.
अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्‍या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ?
इथे धागा लेखकाचा दृष्टीकोण सब्जेक्टीव्ह आहे. मुळात न्यायालयीन दिरंगाई केवळ या एका केसपुरती होते आहे हे अनभिज्ञतेतून किंवा हेतुपुरस्सर रंगवलेले चित्र ठरते. वस्तुतः पुरेशा न्यायाधिशांच्या संख्ये अभावी प्रचंड मोठी संख्या निकालांच्या प्रतिक्षेत आहे . त्या पैकीच हा एक खटला आहे. न्यायालयासमोर हा केवळ प्रॉपर्टी विषयक खटला म्हणुन दाखल केला गेला त्याला इतर प्रॉपर्टी विषयक खटल्या पेक्षा वेगळी वागणूक देण्याचे वस्तुतः न्याय यंत्रणेस कारण नाही. व्यक्ति स्वातंत्र्य विषयक खटले सर्वसाधारणपणे न्यायालयये अधिक तातडीने घेतात तसे फाशी दिल्या जाणार्‍ञा व्यक्ती बाबत अपरात्री सुद्धा पुर्नचाचपणी करण्यात न्यायालयाची यथायोग्य तत्परता दिसून येते. अयोध्या खटल्यालाच जेव्हा धार्मिक प्रार्थना मुलभूत अधिकार आहे त्या दृष्तीने प्रॉपर्टी विषयक खटला विचारात घ्यावा असा अर्ज जेव्हा अर्जदार म्हणुन सुब्रमण्यम स्वामींनी केला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने खटला विचारार्थ ही घेतला. पण मुलतः न्यायाधीशांची संख्या कमी असणे त्यासाठी बजेटची व्यवस्था करणे यास न्याययंत्रणा नव्हे तर सरकारे जबाबदार असतात. त्याचे खापर न्याययंत्रणेवर फोडणे आणि लोकांच्या भुकेचे आणि टॉयल्ट्सारखे जिवनावश्यक इतर प्रश्न सोडून धर्मस्थळाच्या प्रॉपर्टी विषयक खटल्यास प्राथमिकतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल साशंकता आहे. तसे पाहू जाता ईश्वर र्‍हदयात असणे अपेक्षीत असते. कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Tue, 02/13/2018 - 09:41 नवीन
रामाचे राज्य काव्यात वर्णिलेले आहे. बाबराचे राज्यही कागदोपत्री लोकांना माहित आहे. घटकाभर दोघेही राजे काल्पनिक मानु...तरीही दोहोंच्या ""कथित व काल्पनिक’" राज्यपद्धतीचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना कुणाचे राज्य आदर्श वाटते? एका सामान्य प्रजाजनाच्या मनातील शंकेखातर सुद्धा, त्या शंकेला मान देत आपल्या पत्नीची परीक्षा घेणा-या व त्याचे समाधान करणा-या शासक रामाचे की परस्त्रिया उचलून आणून उपभोगणा-या बाबराचे? प्रश्न महत्वाचा आहे कारण रामायणातील राज्यशासनाचा प्रभाव आपल्या राज्यशासनात असलेले, व प्रभावी राज्य केलेले शासक या देशाने पाहिले आहेत. उदा. शिवाजी महाराज. आता शिवाजी महाराज पण खोटे होते असे म्हणणार असाल तर तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 10:15 नवीन
एका सामान्य प्रजाजनाच्या मनातील शंकेखातर सुद्धा, त्या शंकेला मान देत आपल्या पत्नीची परीक्षा घेणा-या व त्याचे समाधान करणा-या शासक रामाचे की परस्त्रिया उचलून आणून उपभोगणा-या बाबराचे?
मला वाटते आपल्या वाक्याची मांडणी जरा वेगळी असणे उपयूक्त ठरले असते का ? "एका सामान्य प्रजाजनाच्या मनातील शंकेखातर व्यक्तीगत त्याग करु इच्छिणार्‍या राम आदर्श की परस्त्रीस जबरदस्तीने उचलून नेणारा बाबर ? (बाबराने असे केल्याचा प्रमाण ऐतिहासिक पुरावा आहे का ? हे तुर्तास बाजुस ठेऊ) प्रश्न एवढाच असेल तर उत्तर राम आदर्श ठरतो असे होईल. (पण मग व्यक्तीगत त्याग करु इच्छिणार्‍या व्यक्तीच्या नावे न्यायालयाचा आमच्या बाजून निकाल नाही आला तरीही मंदिर उभारु हि भूमिका -भक्तांचे तर काम होईल- रामास किती न्याय देते ?) सितेवरचा ब्लेम व्हिक्टीम ब्लेमींग होते हे लक्षात न घेता , व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍याला एज्युकेट अथवा दंडीत न करता व्हिक्टीमला पुन्हा एकदा व्हिक्टीम करणे , त्यागाचा उद्देश किती ही चांगला असला तरी अस्थानी दान होते. त्यामुळे सीता कथा खरी असो अथवा काल्पनिक व्हिक्टीम ब्लेमींग करणारे सुटत राहीले आणि नसत्या शुचितेच्या आग्रहाने भारतातील किती पिढ्यातील किती स्त्रीयांचे जीवन होरपळून निघाले असेल. रामायणातील उत्तर कांडाचा भाग प्रक्षीप्त आहे असे म्हणतात, ६ व्या शतकातील एक प्रत दोन वर्षापुर्वी एसियातीक सोसायटी कलकत्तात सापडली त्यात सुद्धा बातमी प्रमाणे उत्तरकांड नाही . पण एका लेखकाच्या लेखनाचा उद्देश्य सीतेवर अन्याय झाला तसा पुन्हा होऊ नये असाही असेल पण पढत ..र्खांचा विवेक कैक शतके जागेवर येऊ शकला नाही. माणूस हा प्राणी तर्कसुसंगत विचार करण्याचपाक्षमते बाबत खरेच साशंकता वाटत राहते.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 10:28 नवीन
परस्त्रीस तर रावण , भीष्माचार्यानेही नेले होते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 14:58 नवीन
इतरकुणी उत्तर देउ शकेल का ? म्हणजे मी माझा वेळ वाचवतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 02/16/2018 - 12:44 नवीन
चिखलात लोळायची इच्छा नाही
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 02/13/2018 - 14:40 नवीन
हा हा , काल्पनिक 'अच्छे दिन' तर चांगलेच वाटत असतात. जनतेला मात्र सत्याशीच सामना करावा लागतो. बाकी बिनबुडाच्या मुस्लिमविरोधी प्रतिक्रिया देत राहणे दासबोधडॉटकॉमवाल्याचा पिढीजात धंदा दिसतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 14:55 नवीन
व्यक्तीलक्ष्य तर्कदोष
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Wed, 04/25/2018 - 22:09 नवीन
आमच्या पूर्वजांच्या काळात इंटरनेट नव्हते त्यामुळे हा आमचा पिढीजात धंदा नाही .आम्हीच अभ्यासपूर्वक सुरू केला आहे .आपला पिढीजात धंदा कुठला ?
  • Log in or register to post comments
स
संन्यस्त खड्ग Tue, 02/13/2018 - 15:23 नवीन
अयोध्येतील रामजन्मभूमीचा प्रश्‍न न्यायालयातून सोडवण्यापेक्षा चर्चेने सोडवला जाऊ शकतो का ? या दृष्टीने अनेक घडामोडींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना सलमान नदवी हे श्री श्री रविशंकर यांना भेटले आणि त्यांनी ‘बाबरी मशीद शरीयतनुसार इतरत्र हालवली जाऊ शकते’, असा पर्याय ठेवला होता. त्यानंतर मौलाना सलमान नदवी यांना ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’तून निलंबित करण्यात आले. यावर मौलाना सलमान नदवी यांनी ‘सध्या बोर्डामध्ये हुकूमशाही चालू असून कट्टरपंथियांनी बोर्डावर ताबा मिळवला आहे’, असे पत्रकारांना सांगितले. दुसरीकडे एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बाबरी मशिदीविषयी धर्मांध भूमिका घेतांना सांगितले, ‘‘एकदा मशीद बांधली की, ती तेथे अनंतकाळपर्यंत रहाते. त्यामुळे अयोध्येत बाबरी मशीदच राहील. बाबरीविषयी तडजोड करणार्‍यांना ‘अल्लाह’ला उत्तर द्यावे लागेल.’’ ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’मधील कट्टरतावाद ! मौलाना सलमान नदवी यांच्यावरील कारवाईनंतर बोर्डाच्या सदस्यांची कट्टरपंथियता उघड झाली. तशाच प्रकारे उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिजवी यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चे खरे स्वरूप घोषित करतांना ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ ही आतंकवाद्यांचीच एक शाखा आहे. पसार झालेले वादग्रस्त धर्मगुरु डॉ. झाकिर नाईक हे बोर्डाचे सदस्य आहेत. आतंकवाद्यांची ही शाखा देशाचे वातावरण बिघडवत असून ‘बोर्ड’वर बंदी आणायला हवी’, असे म्हटले आहे. वरील दोघांच्या वक्तव्यावरून ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’मध्ये कट्टरतावाद फोफावलेला दिसून येतो, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. याचसमवेत राममंदिराच्या जागेचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन आहे. बोर्डातील कट्टरतावाद पहाता उद्या न्यायालयाने कोणताही निर्णय दिल्यास तो ‘बोर्ड’ मान्य करेलच, असे ठामपणे सांगता येणार नाही. सध्या सर्वोच्च न्यायालयात राममंदिराचे प्रकरण चालू असतांना बोर्डातील धर्मांध त्यावर भाष्य करून वातावरण बिघडवत आहेत, हेही कितपत उचित ? याविषयी तथाकथित न्यायप्रेमीही गप्प का ? हिंदू ठाम भूमिका कधी घेणार ? ज्या पद्धतीने बाबरी मशिदीविषयी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ स्वतःची आक्रमक भूमिका मांडते, तशी राममंदिराविषयीची ठाम भूमिका सध्या भाजपचे नेते तथा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी सोडल्यास अन्य कोणीही मांडतांना दिसत नाहीत. ओवैसी यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर एका ठिकाणी मशीद बांधल्यावर ती अनंतकाळपर्यंत तेथेच असते, तसेच हिंदूंची मंदिरेही अनादी काळापासूनची असून विश्‍वाच्या अंतापर्यंत ती जेथे बांधली तेथे कायमच रहातील. हे सत्य ओवैसी राममंदिराविषयी का नाकारत आहेत ? ओवैसी यांनी ते नाकारले, तरी हिंदूंनी त्यांना ते ठामपणे सांगणे आवश्यक आहे. आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर परकियांनी आक्रमणे करून भारतासह जगभरातील अनेक मंदिरे पाडून त्या ठिकाणी प्रार्थनास्थळे बांधली आहेत. याविषयी अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. असे असतांना यापूर्वी राममंदिराविषयी बोलणारे हिंदूंचे नेते आता ठाम भूमिका मांडतांना कोठेच दिसत नाहीत. अलाहबाद उच्च न्यायालयाने रामजन्मभूमीला अनुकूल असा निर्णय दिला होता. त्या दृष्टीनेही हिंदू ठाम भूमिका घेतांना दिसत नाहीत. आज राममंदिर आणि हिंदु देवता यांच्या विरोधात सातत्याने गरळओक केली जात असतांना कोणीच काहीही न बोलणे, हे हिंदूंना लज्जास्पद आणि त्याचसमवेत संशयास्पदही आहे. स्वतःचे राजकीय हित साधण्यासाठी राममंदिराचे सूत्र उपस्थित केले गेले, असा जो विरोधक आरोप करत आहेत, त्याला राममंदिराविषयी कोणतेही मत न मांडल्याने बळ दिल्यासारखे होईल. सरकारचा हस्तक्षेप आवश्यक ! वसिम रिजवी आणि मौलाना सलमान नदवी यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’विषयी उपस्थित केलेली सूत्रे महत्त्वाची आहेत. बोर्डामध्ये वाढत असलेला कट्टरतावाद हा काही एका दिवसात निर्माण झालेला नाही. मौलाना नदवी हे बोर्डामध्ये मोठ्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी त्याविषयी कधीही वाच्यता केलेली नाही. त्या दोघांनी जर वेळीच हा कट्टरतावाद सरकार आणि जनता यांच्यासमोर आणला असता, तर त्यावर उपाययोजना करता आली असती. जनतेला वाटत होते की, कट्टरतावाद हा केवळ जम्मू-काश्मीर आणि देशातील काही भागांपुरता मर्यादित आहे; पण तो राममंदिर, तिहेरी तलाक आणि देशांतर्गत वाढत असलेली धर्मांधता यावरून देशभर पसरत चालला आहे, हेच त्या दोघांच्या विधानाची दुसरी बाजू तर नाही ना ? वादग्रस्त धर्मगुरु डॉ. झाकिर नाईक हे जर ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य असतील, तर या बोर्डाचे कामकाज कसे चालत असेल, ते सांगायलाच नको. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा वाढता हस्तक्षेप आणि कट्टरतावाद हा नेमका काय आहे ? डॉ. झाकिर नाईकच्या प्रवृत्तीची आणखी किती माणसे तेथे आहेत ?, याची पडताळणी सरकार करणार कि नाही ? हिंदूंच्या प्रथा, परंपरा यांच्याविषयी जरा कुठे खुट्ट झाल्यास सरकार तात्काळ हस्तक्षेप करते. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’मधील कट्टरतावाद तर देशातील वातावरणच बिघडवणारा आहे. त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे. दैनिक सनातन प्रभात संपादकीय
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 02/13/2018 - 15:27 नवीन
टनाटन प्रभात आणि झाकिर नाईक दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही आवळेजावळे बंधूच. एकसारखेच विचार, धर्म वेगळा फक्त.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 02/13/2018 - 17:46 नवीन
तर्राट जोकर, टनाटन प्रभात म्हणजे काय? प्रभातसमयी तुमचं टनाटन होत नाही का? होत नसल्यास यथोचित उपचार घ्या म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 18:31 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 02/13/2018 - 19:30 नवीन
समजूतदार सदस्यांनी असे प्रतिसाद टाकणे योग्य नाही, इतरांकडून अपेक्षा नाहीच!
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द गुरुवार, 02/15/2018 - 06:49 नवीन
मटेरियल एव्हिडन्स उपलब्ध करू शकले नाहीत म्हणून " बाबराने अन्यायाने हिंदूंचे श्रद्धास्थान उद्ध्वस्थ करून त्याचे मशिदीत रूपांतर केले " हा दावा न्यायालयात खोटा ठरेल का ? जर फक्त मटेरियल एव्हिडन्स हाच ठोस पुरावा आहे असे मानायचे तर गेल्या ४००- ५०० वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा हा " ही रामजन्मभूमी किंवा राममंदिर आहे " या गैरसमजुतीमुळे सुरु आहे असे म्हणावे लागेल .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 02/15/2018 - 07:17 नवीन
४०० वर्षे ?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 02/15/2018 - 10:47 नवीन
गेल्या ४००- ५०० वर्षांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा
आठवणीप्रमाणे हा तथाकथित 'लढा' विश्व हिंदू परिषदेने १९८३-८४ च्या सुमारास चालू केला. शहाबानो खटल्यानंतर 'रामलल्ला'चा बर्यापैकी उपयोग करून घेता येईल हे भाजपा धुरीणांच्या लक्षात आले व 'शीलान्यास समिती' स्थापन झाली. मग पुढे 'मंदीर वही बनायेंगे' चालु झाले व १९९२ साली मस्जीद पाडून 'त्यांना' धडा शिकवल्याचे समाधान भाजपा व त्यांच्या मतदारांना मिळाले.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 02/15/2018 - 11:46 नवीन
तेच ना ! ४०० वर्षे म्हणे ... तसे असते तर हिंदू राजानी एकत्र येऊन मोघलांचा पाडाव केला असता की .. युद्धात जिंकणे , हरणे , चारदोन गावे येणे जाणे हे म्हणजे बुद्धिबळागत कधी काळा जिंकला कधी पांढरा जिंकला , इतका किरकोळ मामला होता. आपले वतन शाबूत राहिल्याशी मतलब ..
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका गुरुवार, 02/15/2018 - 12:33 नवीन
ते जशी चुकीची माहिती सांगत आहेत तशीच तुमची माहिती पण चुकीची आहे असे मला वाटते. ३००-४०० वर्षे जरी नसली तरी या वादाला कमीत कमी १५० एक वर्षांची पार्श्वभूमी तरी नक्कीच असावी. १८५० च्या वगैरे सुमारास पहिल्यांदा तिथल्या स्थानिकांनी इंग्रज वसाहत वाल्यांकडे या जागेचा ताबा मागितला होता, शिवाय काही हिंसक घटनांचेही संदर्भ आहेत असे काही इतिहासतज्ञ नोंदवतात. मला वाटते मशिदीच्या आत मूर्ती ठेवण्याच्या घटना १९४९-१९५० च्या सुमारास घडल्या होत्या. त्यामुळे तो वरचा १९८३ -८४ चा संदर्भ सुद्धा चुकीचा वाटतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/15/2018 - 14:30 नवीन
या मुद्यावर मीनाक्षी जैनांची मांडणी अधिक व्यवस्थीत वाटते. वर आधीच्या प्रतिसादातून युट्यूब जोडलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/15/2018 - 14:37 नवीन
अहो माईसाहेब, तिथे कुठलीही मशीद नव्हती हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जरा तुमच्या ह्यांना विचारून घ्यायचं होतं ना, इथे लिहिण्याआधी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 02/16/2018 - 11:20 नवीन
मग ६ डिसेंबर(१९९२)ला विहिपवाले 'एक धक्का और दो, बाबरी मस्जीद तोड दो' हे बेंबीच्या देठापासून ओरडून का सांगत होते?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 02/16/2018 - 11:27 नवीन
मशीद नव्हती, मग पाडणार्यानी नेमकं काय पाडलं ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 02/17/2018 - 10:11 नवीन
जुनं राममंदिर ! -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/17/2018 - 12:18 नवीन
मग अडवानी मशीद पाडा बोल्ले , ठाकरे बोल्ले मला आमच्या लोकांचा अभिमान आहे इ इ इ हे सगळे अज्ञानीच होते की !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 02/17/2018 - 22:45 नवीन
manguu@mail.com, होय. तुमचं बरोबर आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 02/17/2018 - 10:13 नवीन
ती बाबरी मशीद रेमडोक्या सेक्युलरांच्या मस्तकात बिली आहे. ती जमीनदोस्त करायची आजसुद्धा तितकीच गरज आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 02/15/2018 - 11:53 नवीन
ज्यानी मशीद पाडली , तेच मुसलमान झालेत म्हणे. http://www.dnaindia.com/india/report-responsible-for-razing-babri-masjid-three-guilt-ridden-karsevaks-have-embraced-islam-2565361 https://www.indiatoday.in/india/story/kar-sevak-from-haryana-who-was-part-of-babri-masjid-demolition-now-preaches-islam-builds-masjids-1162804-2018-02-07
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 02/15/2018 - 12:36 नवीन
रोचक आहे.. पण मला वाटते याला देखील काउंटर स्टोरी असणारच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/15/2018 - 14:39 नवीन
.
...पण मला वाटते याला देखील काउंटर स्टोरी असणारच.
टोक गाठणार्‍यांचे असेच असते टोकावरचहोचजीवन त्यांना सुरक्षीत भासते.या टोकाला तरी असतात अथवा त्या टोकाला , एका टोआवरुन ढललले गेले की सरळ दुसर्‍या टोकास पोहोचतात
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 02/15/2018 - 15:58 नवीन
डोक्यावरून गेले..
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 02/15/2018 - 17:35 नवीन
टोकाच्या मंडळीची वैशीष्ट्य म्हणजे कुणाच्या तरी एकांगी बहकाव्यात आलेली असतात , इकडे या धर्माची पूर्ण बाजू बघीतलेली नसते आणि तिकडे गेले तर त्याही धर्माची पूर्ण बाजू समजलेली नसते. एकांगी दृष्टीकोणांच्या प्रभावाखाली असणेच तेवढे जमते . अन बॅलन्स्ड सी सॉ असतात टोकाची मंडळी मग सी सॉच्या कोणत्याही बाजूस बसू द्यात त्यांना. वस्तुतः सर्वसामान्य माणूस बॅलन्सस्ड असण्या पेक्षा नसण्याचीच शक्यता अधीक असते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 02/16/2018 - 08:23 नवीन
माहितगार, मला ही माणसं टोकाची बिकाची न वाटता विकाऊ कार्यकर्ते वाटतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Fri, 02/16/2018 - 08:37 नवीन
आधी ज्या पार्टीत होते त्यानीही ह्यान्ना विकतच घेतले होते का ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 02/17/2018 - 10:11 नवीन
घुसवलेले फितूर असू शकतात. -गा.पै.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 02/18/2018 - 03:39 नवीन
बाहेरून माणसे आली आणि घुमटावर सर्वात आधी तेच चढले , जुने लोक खालीच राहिले. एकंदर भाजप्यांची परंपरा जुनी दिसते आहे ... बाहेरुन आलेले वर जातात अन जुने लोक खालीच.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 02/18/2018 - 09:32 नवीन
गा. पै. मोड ऑन :) फेक वीटनेस तयार करण्याचाही प्रयत्न असू शकतो . गा. पै. मोड ऑफ ह. घ्या हेवेसानल :)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 02/18/2018 - 09:28 नवीन
Symposium on Rama, Ramayana and Ayodhya: Insights from History In this symposium, Dr. K. K. Muhammed, (Former) Regional Director of Archaeological Survey of India (ASI), and Dr. Meenakshi Jain, member of Indian Council of Historical Research (ICHR), New Delhi, will address the audience on this issue. Date: 2018-03-17 09:00 to 17:00
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/18/2018 - 10:24 नवीन
*जे दिसले तेच सांगितले* *– डॉ. के. के. मोहम्मद* *निवृत्त पुरातत्त्व संचालक (उत्तर भारत)* मंदिराला उद्ध्वस्त केल्यानंतर तिथे वादग्रस्त ढांचा उभारण्यात आला, या महत्त्वाच्या पूर्वपक्षावर रामजन्मभूमी आंदोलनाचे सारतत्त्व आधारलेले आहे. या आंदोलनाच्याही पूर्वी अयोध्येत पुरातत्त्वीय उत्खनन करण्यात आले होते. प्रो. बी. बी. लाल यांच्या चमूने, ज्यात डॉ. के. के. मोहम्मदही होते, जे पुरातत्त्वीय पुरावे गोळा केलेत, त्याने सिद्ध केले की, त्या वादग्रस्त जागी आधीपासून अस्तित्वात असलेल्या वास्तूचा विध्वंस करण्यात आला होता. मूळ मल्याळम भाषेत लिहिलेल्या ‘जान एन्ना भारतीयन’ (मी, भारतीय) या पुस्तकात डॉ. मोहम्मद यांनी इतिहासाचे पुनर्विलोकन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया विशद केली आहे. अयोध्येच्या विषयावर चर्चा करताना किंवा तो मांडताना या पुस्तकातील प्रस्तुत काही अंश महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात. हा लेख ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हा अनुवाद. __________________________________ हा भाग सांगितल्याशिवाय माझ्या जीवनाची कहाणी पूर्ण होणार नाही. यात कुणाच्या धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नाही किंवा दुसर्‍या कुणाच्या भावना भडकविण्याचाही. या दोन्हींसाठी या लिखाणाचा कुणीही वापर करू नये. १९९० साली अयोध्येचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यापूर्वी, १९७८ साली पुरातत्त्वशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला अयोध्येचे सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली. प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वात जी चमू अयोध्येचे सघन सर्वेक्षण करणार होती त्या चमूचा दिल्लीच्या स्कूल ऑफ आर्किऑलॉजीचा एक विद्यार्थी म्हणून मीही एक सदस्य होतो. तिथे आम्हाला पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या स्तंभांना आधार देणारे विटांचे पायवे सापडले. असले काही आढळणे वादग्रस्त असेल असे त्या वेळी कुणालाही वाटले नाही. पुरातत्त्वीय तज्ज्ञ म्हणून पुरेशा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आम्ही सर्व वस्तुस्थिती तपासली. बाबरी मशिदीच्या भिंतींमध्ये मंदिराचे स्तंभ चिणलेले तिथे होते. हे स्तंभ ब्लॅक बसॉल्ट नावाने ओळखल्या जाणार्‍या एका विशिष्ट दगडांपासून तयार केलेले होते. या स्तंभाच्या तळाशी ‘पूर्ण कलश’ कोरलेला होता. ११ व्या व १२ व्या शतकात अशी पद्धती होती. मंदिराच्या शिल्पशास्त्रात पूर्ण कलशाला समृद्धीच्या आठ पवित्र प्रतीकांपैकी एक मानले जाते. १९९२ साली ही मशीद उद्ध्वस्त होण्यापूर्वी एक-दोन नाही, तर असे १४ स्तंभ तिथे होते. मशीद पोलिस संरक्षणात असली आणि आत कुणालाही जाण्याची परवानगी नसली तरी आम्ही संशोधन चमूचे सदस्य असल्याने आम्हाला कुणी रोखले नाही. त्यामुळे मी त्या स्तंभांना अगदी जवळून नीट न्याहाळू शकलो. प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वातील चमूत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेचे अधिकारी होते, तसेच आम्ही स्कूल ऑफ आर्किऑलॉजीचे १२ विद्यार्थी होतो. आम्ही अयोध्येत विविध ठिकाणी उत्खनन करत दोन महिने घालविले. मीर, जो बाबरचा सरसेनापती होता त्याने उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचेच अवशेष वापरून ही मशीद बांधली. हे मंदिर एकतर त्याने उद्ध्वस्त केलेले असावे अथवा दुसर्‍या कुणीतरी आधीच उद्ध्वस्त केलेले असावे. मशिदीच्या मागे तसेच बाजूला उत्खनन करताना विटांचा चबुतरा आढळला. यावर ब्लॅक बसॉल्टचे ते स्तंभ उभे असावेत. या वस्तुस्थितीच्या आधारे मी १९९० साली असे विधान केले होते की, बाबरी मशिदीच्या खाली एखादे मंदिर अस्तित्वात असावे. त्या वेळेपर्यंत वातावरण चांगलेच तापलेले होते. दोन्ही बाजूंकडील मध्यममार्गी मंडळी तडजोड करण्याची धडपड करीत होती. परंतु, कडक भूमिका घेतलेल्या विश्‍व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीचा मुद्दा आधीच आपल्या विषयपत्रिकेवर घेतलेला होता. मुस्लिमांमध्ये जे मध्यममार्गी होते त्यांनी विचार करणे सुरू केले होते की, अयोध्या हिंदूंना सोपवून हा वाद संपविणे योग्य राहील. काही मुस्लिम नेतेदेखील याच मताचे होते; परंतु हे सांगण्याची कुणी हिंमत दाखविली नाही. मला चांगले लक्षात आहे की, काही मुस्लिम नेत्यांचे म्हणणे होते की, अयोध्या हिंदूंना सोपविल्यास विश्‍व हिंदू परिषदेच्या शिडातील वाराच काढून घेण्यासारखे होईल. या अशा आवाजांना त्यावेळी महत्त्व मिळाले असते तर वातावरण निवळण्यास मदतच झाली असती. परंतु, काही डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी विरोध करणार्‍या मुस्लिमांची बाजू उचलून धरली आणि संपूर्ण प्रकरणाचा विपर्यास करून टाकला. एस. गोपाल, रोमिला थापर आणि बिपन चंद्र यांच्या नेतृत्वाखालील काही इतिहासकारांनी रामायणाच्या ऐतिहासिकतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणे सुरू केले. रामायण घडलेच नाही, असा त्यांचा दावा होता. त्यांचा मुद्दा होता की, १९व्या शतकापूर्वी मंदिर उद्ध्वस्त केल्याची कुठेच नोंद नाही. त्यांनी तर असेही घोषित करून टाकले की, अयोध्या हे मुळात बौद्ध व जैनांचे केंद्र होते. या गटाला प्रो. आर. एस. शर्मा, अक्तार अली, डी. एन. झा, सूरज भान, इरफान हबीब यासारखे लोक येऊन मिळाल्याने या गटाची ताकद आणखीनच वाढली. या सर्वांमध्ये सूरज भान हेच काय ते एकमेव पुरातत्त्व तज्ज्ञ होते. आर. एस. शर्मांच्या गटातील इतिहासकारांनी बाबरी मशीद कृती समितीच्या बाजूने तज्ज्ञ म्हणून अनेक अधिकृत बैठकींमध्ये भाग घेतला. भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे (आयसीएचआर) अध्यक्ष असलेल्या इरफान हबीब यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मशीद कृती समितीच्या अनेक बैठकी झाल्यात. आयसीएचआरचे सदस्य-सचिव एम. जी. एस. नारायणन यांनी आयसीएचआरमध्ये बाबरी मशीद कृती समितीच्या बैठकी आयोजित करण्यावर आक्षेप घेतला. पण, इरफान हबीबने त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले. वामपंथी इतिहासकारांच्या या गटाचा वृत्तपत्रे, नियतकालिके यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे अयोध्येच्या वस्तुस्थितीवर प्रश्‍नचिन्ह लावणार्‍या त्यांच्या प्रकाशित लेखांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला. हे इतिहासकार आणि नियतकालिके जणू काही त्यांची मुखपत्रेच झाली होती आणि ज्या मध्यममार्गी मुसलमानांची या वादाच्या तोडग्याला सहमती होती, त्यांना परावृत्त करण्यात हीच मंडळी जबाबदार होती. दुर्दैवाने या वातावरणामुळे बाबरी मशीद कृती समितीला कायदेशीरपणा प्राप्त झाला. बाबरी मशीद कृती समिती युद्धखोर झाली. सामान्य मुस्लिम जो एका वळणावर हिंदूसाठी आपला दावा सोडून देण्याच्या कल्पनेशी सहमत होता, तो मुस्लिम आता हळूहळू आपला विचार बदलवू लागला. त्याचा परिणाम असा झाला की, आता मध्यममार्गी मुसलमानदेखील म्हणू लागले की, आम्ही मशिदीवरचा दावा सोडू शकत नाही. कम्युनिस्ट इतिहासकारांच्या ढवळाढवळीने त्यांची बुद्धी भरकटत गेली. या दोन गटांच्या एकत्रित खोडसाळपणामुळे तोडगा निघण्याची दारे नेहमीसाठी बंद झाली. ही तडजोड मान्य झाली असती तर ते या देशातील हिंदू-मुस्लिम संबंधाच्या इतिहासात एक महत्त्वाचे व ऐतिहासिक वळण ठरले असते. त्यामुळे इतरही वादग्रस्त मुद्यांवर स्वाभाविक तोडगा काढणे शक्य झाले असते. या वाया गेलेल्या संधीने एक गोष्ट स्पष्ट झाली की, केवळ हिंदू व मुसलमानांमधील कट्टरवादीच नाही, तर हे कम्युनिस्ट कट्टरवादीदेखील देशासाठी धोकादायक आहेत. मी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष बघितले आहेत, हे अयोध्येच्या वस्तुस्थितीबाबतचे माझे विधान १५ डिसेंबर १९९० रोजी प्रकाशित झाले. तोपर्यंत दोन्ही बाजूंकडील इतिहासकार व पुरातत्त्व तज्ज्ञ यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मी चेन्नई येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणमध्ये उपअधीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या वेळी इरावतम महादेवन (आयएएस) यांचा इंडियन एक्स्प्रेसमधील एक लेख माझ्या वाचनात आला. त्यांनी सिंधू शिलालेखांबाबत बरेच लिखाण केले आहे आणि एक मान्यताप्राप्त विद्धान म्हणून त्यांची कीर्ती आहे. निवृत्तीनंतर ते प्रचंड खपाच्या दिनमणी या तमिळ वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम बघायचे. त्यांनी लिहिले होते : खाली मंदिराचे अस्तित्व आहे याबाबत इतिहासकारांना अजूनही शंका असेल तर, ती शंका दूर करण्यासाठी पुन्हा एकदा उत्खनन व्हायला हवे. परंतु, एक ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्यासाठी ऐतिहासिक वास्तू (बाबरी मशीद) पाडायलाच हवी, असे म्हणणे चूक आहे. मी त्यांच्या समतोल मताचा आदर केला आणि त्यांची प्रशंसा करणारे पत्र लिहिले. त्यात मी उल्लेख केला की, १९७६-७७ साली तिथे ज्या चमूने उत्खनन केले, त्याचा मी सदस्य होतो. ‘‘एका ऐतिहासिक चुकीच्या दुरुस्तीसाठी बदला म्हणून एखादे स्मारक उद्ध्वस्त करणे चूक आहे, हे तुमचे म्हणणे स्तुत्यच आहे. तुम्ही तुमचे उदार मत मांडले आहे.’’ त्यांना पत्र मिळाले. लगेच ते तमिळनाडू सचिवालयाच्या क्लाईव्ह इमारतीतील माझ्या कार्यालयात आले. माझे पत्र प्रकाशित करण्याची ते परवानगी मागू लागले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सरकारी नोकर असल्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय अशा संवेदनशील मुद्यावर लिहिणे आत्महत्या करण्यासारखे आहे. तुमचे वरिष्ठ तुम्हाला परवानगी देणार नाही, हे निश्‍चित आहे. असे असले तरी सत्याला झाकून ठेवायला नको. योग्य तो निर्णय घ्या.’’ आम्ही पुरातत्त्व अधीक्षक बी. नरसिंहय्या यांच्याशी चर्चा केली आणि ठरविले की, अशी महत्त्वाची माहिती झाकून ठेवणे योग्य नाही. प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वात आम्ही विटांचा चबुतरा शोधून काढला होता, तेव्हा नरसिंहय्या हे महाअधीक्षक होते. परंतु आम्हाला कट्टरवादी हिंदूंच्या हातातील खेळणे व्हायचे नव्हते. सर्व प्रकारच्या जातीयवादी शक्तींपासून आम्हाला सारखे अंतर ठेवायचे होते. शेवटी, इंडियन एक्स्प्रेसच्या सर्व आवृत्त्यांमध्ये ‘संपादकांना पत्र’ या सदरात माझे ते विधान प्रकाशित झाले. तद्वतच, ते इतर भाषेतील सर्व वृत्तपत्रांमध्येही आले. मला अनेक फोनकॉल्स आलेत- धमकविणारे आणि अभिनंदन करणारेही. परंतु, ठरविल्याप्रमाणे माझ्या भोवती जे काही चालले होते, त्यापासून मी स्वत:ला अलिप्त ठेवले. त्या काळात चेन्नईत आम्ही युनेस्को प्रायोजित सिल्क रूट परिषद आयोजित केली होती. के. टी. नरसिंहन आणि मी याचे आयोजक होतो. दिल्लीवरून संयुक्त संचालक (संस्कृती) आर. सी. त्रिपाठी आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे महासंचालक एम. सी. जोशी त्यात भाग घेण्यासाठी आले होते. परिषद उत्तम रीतीने पार पाडल्याबद्दल दोघांनीही माझे कौतुक केले. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘जर अलिगडचा तो प्राध्यापक इथे असता तर त्याला लाजीरवाणे झाले असते.’’ ते डॉ. इरफान हबीबबाबत बोलत होते. डॉ. जोशींनी माझी वैयक्तिक माहितीदेखील डॉ. त्रिपाठींना दिली. त्यानंतर डॉ. जोशी म्हणाले, ‘‘आता आम्हाला तुमच्या प्रेस स्टेटमेंटबद्दल प्रश्‍न आहेत. सरकारच्या परवानगीशिवाय तुम्ही या अशा महत्त्वाच्या मुद्यांवर सार्वजनिक पत्रक कसे काय काढले? आम्ही तुम्हाला या क्षणी चौकशी प्रलंबित (पेंडिंग इक्वायरी) ठेवून निलंबित करीत आहोत.’’ मी म्हणालो, ‘‘सर, मला माहीत होते की, या अशा बाबतीत मला परवानगी मिळणार नाही. मी लोकहितास्तव खरे बोललो.’’ मी त्यांना एक संस्कृत वचनही ऐकविले- ‘लोकसंग्रामेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि|’ ‘‘तुम्ही मला शिकवता का? मी अलाहाबादचा ब्राह्मण आहे.’’ त्रिपाठी ओरडले. पुढे म्हणाले, ‘‘मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता निलंबित करतो.’’ मी शांतपणे म्हणालो, ‘‘स्वधर्मे निधनं श्रेय:|’’ (म्हणजे कर्तव्य करीत असताना अगदी मृत्यूदेखील श्रेयस्कर असतो.) त्रिपाठी शांत झाले व म्हणाले, ‘‘मोहम्मद, तुमची ठाम भूमिका स्तुत्य आहे. परंतु, तुमच्यावर कारवाई करावी म्हणून वरून माझ्यावर दबाव आहे.’’ मी म्हणालो, ‘‘मला माहीत आहे सर, सर्व परिणामांचा पूर्ण विचार करूनच मी ते स्टेटमेंट जारी केले होते.’’ तरीही जोशींचे काही समाधान होईना. ते म्हणाले, ‘‘तुम्ही वृत्तपत्रात तुमचे नाव, पद, पत्ता का टाकले?’’ मी म्हणालो, ‘‘मी विचार केला की ते आवश्यक आहे. कारण, कुणी असा विचार करू नये की हा मोहम्मद कुणी क्षुल्लक व्यक्ती आहे.’’ दुसर्‍या दिवशी महादेवन त्या दोघांना भेटले आणि त्यांनी माझा निलंबनाचा आदेश बदलवून माझी बदली चेन्नईहून गोव्याला केली. ६ डिसेंबर १९९२ रोजी गोव्यातील बॉम जेझस चर्चच्या रेक्टरशी चर्चा करीत होतो. याच चर्चमध्ये सेंट झेव्हियरचे पवित्र अवशेष ठेवले आहेत. तेवढ्यात बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याची बातमी आली. त्याच्या पुढील वर्षी बाबरी उद्ध्वस्त करण्याच्या पहिल्या वर्धापनदिनी कट्टरपंथी हिंदू ओल्ड गोव्यातील चर्चेसवर हल्ला करतील, अशी भीती फादर रिगो यांनी बोलून दाखविली. आम्ही दोन चमू तयार केल्या. एका चमूने बॉम जेझस चर्चमध्ये फादर रिगो यांच्या नेतृत्वात मुक्काम ठोकला आणि दुसरी चमू माझ्या नेतृत्वात सेंट कॅथेड्रल आणि सेंट आसिसी येथे रात्रभर पहारा देत बसलो. भारतीय धर्मनिरपेक्षतेचा तो एक रोमांचक अनुभव होता. राष्ट्रीय स्मारकांच्या रक्षणासाठी मुस्लिम, हिंदू व ख्रिश्‍चन पहारा देत उभे होते. अयोध्येतील विध्वंसात जी अत्यंत महत्त्वाची शिल्पाकृती बाहेर आली, ती म्हणजे विष्णुहरि शिला. या शिलालेखावर ११-१२व्या शतकातील संस्कृतमध्ये नागरी लिपीत लिहिले होते की, हे मंदिर, ज्याने वाली व दशमुखीला (रावण) ठार केले, त्या विष्णूला (राम हा विष्णूचा अवतार आहे), समर्पित आहे. १९९२ साली डॉ. वाय. डी. शर्मा व डॉ. के. एम. श्रीवास्तव यांनी जेव्हा घटनास्थळाचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना विष्णूचे अवतार, शिव, पार्वती इत्यादींच्या मातीच्या लहान लहान मूर्ती आढळल्या. या कुशाण काळातील (१०० ते ३०० इ. स.) होत्या. २००३ साली जेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा उत्खनन करण्यात आले तेव्हा मंदिराच्या स्तंभांना आधार देण्यासाठी निर्मित ५० हून अधिक विटांचे चबुतरे सापडले. साधारणत: मंदिराच्या शिखरावर असणारे ‘अमलक’ आणि अभिषेकाचे तीर्थ वाहून जाण्यासाठी असलेले ‘मकर प्रणाली’देखील उत्खननात सापडले. बाबरी मशिदीच्या समोरील परिसर समतल केल्यानंतर मंदिराशी संबंधित २६३ शिल्पाकृती सापडल्याचा अहवाल उत्तरप्रदेशचे पुरातत्त्व संचालक डॉ. रागेश तिवारी यांनी सादर केला. उत्खननात उघड झालेले पुरावे तसेच ऐतिहासिक शिल्पाकृतींचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या निष्कर्षाप्रत आले की, बाबरी मशिदीच्या खाली एखादे मंदिर अस्तित्वात होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठदेखील याच निष्कर्षावर पोहोचले. उत्खनन निष्पक्ष व्हावे म्हणून १३१ उत्खननकर्त्यांमध्ये ५२ मुस्लिमांना घेतले होते. एवढेच नाही, तर बाबरी मशीद कृती समितीच्या पुरातत्त्वीय इतिहासकार व प्रतिनिधींच्या (नामे सूरज भान, मंडल, सुप्रिया वर्मा व जया मेनन) उपस्थितीत उत्खनन करण्यात आले. उत्खनन याहून अधिक निष्पक्ष करता आले असते काय? उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वामपंथी इतिहासकारांच्या कोलांटउड्या सुरूच होत्या. या आधीही त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या होत्या आणि त्याची त्यांना खंतही नव्हती. या त्यांच्या सततच्या भूमिका बदलण्यामागचे कारण म्हणजे बाबरी मशीद कृती समितीचे प्रतिनिधी म्हणून जे त्या उत्खननाला उपस्थित होते ते फक्त इतिहासकार होते. त्यातल्या तीन-चार जणांना पुरातत्त्वशास्त्राचे थोडेफार ज्ञान होते. असे असले तरी पुरातत्त्वशास्त्राचा जो परीघ आहे, त्याबाबत मात्र ते सर्व अज्ञानीच होते. त्यामुळे प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. बी. आर. मणी यांच्यासारख्यांपुढे तर ते केवळ खुजेच होते. बाबरी मशीद कृती समितीचे प्रतिनिधित्व करणारे जेएनयू व अलिगड विद्यापीठातील जे कुणी होते, त्यांना पुरातत्त्व शास्त्राचे ज्ञान नव्हते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी या लोकांना काही किंमतच दिली नाही. पुरातत्त्व विभागाला सत्य आणि निष्पक्षपणा सर्वोपरी होता. दरम्यान, विहिंपशी जवळीक सांगणार्‍या पुरातत्त्व विभागाच्या एका अधिकार्‍याने डॉ. मणी यांचे स्थान बळकवण्याचा प्रयत्न केला. यात तो यशस्वी झाला असता तर मंदिराचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या उत्साहात अयोध्या एका वेगळ्या वादात सापडली असती. परंतु, पुरातत्त्व विभाग नमला नाही आणि डॉ. मणी यांना पदावरून काढण्यात आले नाही. पुरातत्त्व विभागाने पुन्हा एकदा आपला निष्पक्षपणा सिद्ध केला. केंद्रात भाजपा सत्तेत असूनही पुरातत्त्व विभागाने जवाहर प्रसाद नामक भाजपा आमदाराचा, मंदिराचा विस्तार करण्याचा प्रयत्न मोठ्या धाडसाने थांबविला, म्हणून बाबरी मशीद समितीचे एक प्रमुख नेते सय्यद शहाबुद्दीन यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांना पत्र लिहून पुरातत्त्व विभागाचे कौतुक केले. हे शासकीय पत्र पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांनी मला अग्रेषित केले. मी सय्यद शहाबुद्दीन यांना सविस्तर उत्तर लिहिले. त्यात अयोध्या मुद्याचाही उल्लेख होता. मी लिहिले की, प्रो. बी. बी. लाल यांच्या नेतृत्वात मी अयोध्या उत्खननात भाग घेतला होता आणि बाबरी मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष मी पाहिले आहेत. मी त्यांना विनंती केली की, त्यांनी हे सत्य समजून घ्यावे आणि अयोध्या प्रश्‍न सुटण्याच्या दृष्टीने मुसलमानांमध्ये अनुकूलता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी मला आश्‍वस्त केले की, पुढील बैठकीत मुस्लिम नेत्यांसमोर मी ही वस्तुस्थिती मांडून चर्चा करीन. बैठकीनंतर त्यांनी मला कळविले की, मशीद हिंदूंना सोपविण्यास एकही जण तयार नाही. नंतर माझी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. परंतु, बाबरी मशीद हिंदूंना सोपविण्यास शहाबुद्दीन तयार नव्हते. भेटीनंतर परत येताना मी खोलवर चिंतन करीत होतो. जर भारत एक मुस्लिमबहुल सेक्युलर देश असता (तसा मुस्लिमबहुल देश कधीही सेक्युलर राहूच शकत नाही) आणि जर एखाद्या मुस्लिम नेत्याने मंदिराच्या (जे एक राष्ट्रीय स्मारक आहे) परिसरात अवैधपणे मशीद बांधण्याचा प्रयत्न केला आणि एका हिंदू अधिकार्‍याने त्याला विरोध केला, तर किती मुसलमान त्या अधिकार्‍याच्या पाठीशी उभे राहतील? भारताच्या पंथनिरपेक्ष-वृत्तीची ही महानता आहे. अपवाद दाखविता येतील- की काही ठिकाणी मुसलमानांची सामूहिक हत्या करण्यात आली वगैरे. परंतु, सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केला असता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो- हिंदूंमधील जातीयवाद हा काही त्यांचा मूळ स्वभाव नाही. बरेचदा एखाद्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून तो बाहेर येतो. गोधराच्या घटनेच्या संदर्भातही हे लागू आहे. जर्मनीच्या एका आंतरराष्ट्रीय उत्खननाच्या चमूसोबत मी एकदा ओमानमधील सलाला गावी गेलो होतो. जमिनीत गाडल्या गेलेल्या अल बलिद शहराचे उत्खनन करायचे होते. तिथे मला काही केरळी लोक भेटले. ते सिमी या प्रतिबंधित संघटनेचे समर्थक होते. त्यांनी मला त्यांच्या एका कार्यक्रमाला आमंत्रित केले. त्यातील काहींना माझे अयोध्येबाबतचे विचार माहीत होते. परंतु मी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या. मी येईन व बोलीन. माझ्या विचारांवर तुम्ही प्रश्‍न विचारू शकता. परंतु मी इथे जर्मनीच्या निमंत्रणावरून आलेलो असल्यामुळे तिथे कुठलीही अप्रिय घटना घडावयास नको. शिस्त पाळली गेली पाहिजे आणि विरोधी मताचा आदर केला पाहिजे. त्यांनी मान्य केले आणि मी तिथे रामजन्मभूमीचा विषय मांडला. भाषणाच्या प्रारंभी मी इस्लामच्या सहिष्णू काळाविषयी बोललो. पवित्र कुराणातील मी देत असलेले संदर्भ पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले. नंतर मी उत्खनन व त्यात सापडलेल्या शिल्पाकृतींबाबत सविस्तर बोललो. त्यांनी अतिशय लक्षपूर्वक ते ऐकले. माझ्या भाषणाचा समारोप मी असा केला : ‘‘मुस्लिमांना मक्का आणि मदिना जसे महत्त्वाचे आहे, तसेच हिंदूंना अयोध्या. मक्का किंवा मदिना दुसर्‍यांच्या ताब्यात असल्याचा मुस्लिम विचारदेखील करू शकणार नाही. हिंदूबहुल देश असतानाही त्याचे मंदिर मुस्लिमांच्या ताब्यात असल्याचे पाहून भारतातील हिंदू जो अपमान सहन करीत आहे, त्या हतबल हिंदूंच्या आक्रोशाकडे मुसलमानांनी लक्ष दिले पाहिजे. हिंदूंची श्रद्धा आहे की, बाबरी मशीद रामाचे जन्मस्थान आहे आणि या जागेचा पैगंबर मोहम्मद यांच्याशी काहीही संबंध नाही. या स्थानाचा सहाबीस किंवा खुलाफौर रसयिदिन्सशी तसेच तबिऊन किंवा औलिया वा सलाफ-अस-सलिहशी काहीही संबंध नाही. केवळ मोगल राजा बाबराशी संबंध आहे. मग त्या मशिदीला एवढे महत्त्व का म्हणून द्यायचे?’’ नंतर मी माझ्या लहानपणची एक घटना त्यांना सांगितली- ‘‘जेरुसलेमची बैतुल मुकद्दस ज्यूंच्या हातात गेली, तेव्हा आम्ही कोदुवल्लीच्या जुम्मा मशिदीत गोळा झालो होतो आणि अल्लाहने बैतुल मुकद्दस आमच्या ताब्यात द्यावी म्हणून आक्रोश केला होता. बैतुल मुकद्दस दुसर्‍याच्या ताब्यात गेली म्हणून जी वेदना आमची होती, तीच वेदना सामान्य हिंदूंची आहे. मी सुशिक्षित आणि प्रगतिशील हिंदूंबाबत बोलत नाहीये. मी उत्तर भारतातील सामान्य हिंदूंबाबत बोलत आहे. जे श्रीरामाच्या दर्शनासाठी कडाक्याच्या थंडीत, अंगावर सदरादेखील न घालता, अनवाणी पायाने, कितीतरी किलोमीटर अंतर चालत येतात, त्यांच्याबाबत बोलत आहे. आम्ही त्यांच्या वेदना, त्यांच्या धार्मिक भावनांचा थोडा तरी आदर करू शकणार नाही का?’’ उपस्थित श्रोतृवृंद विचारात पडला होता. मी पुढे म्हणालो- स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र देश वेगळा करून देण्यात आला. त्या वेळी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून सहजच घोषित करता आले असते. परंतु, गांधीजी, नेहरू, पटेल, आझाद यासारखे महान नेते असल्यामुळे त्यांनी हे घडू दिले नाही. मुस्लिम अल्पसंख्यकांना स्वतंत्र देश दिल्यानंतरही त्यांनी भारताला सेक्युलर देश म्हणून घोषित केले. तुम्हाला ही अशी हृदयाची विशालता जगात कुठेही आढळणार नाही. या कृतीसाठी पंचा नेसणार्‍या त्या वृद्ध मानवाला सेक्युलॅरिझमच्या वेदीवर आपले प्राण अर्पण करावे लागले. उपस्थितांना विचार करण्यास उसंत मिळावी म्हणून मी थोडा थांबलो. त्यानंतर भाषण आटोपत मी म्हटले- ‘‘भारत जर मुस्लिमबहुल भूमी असती तर तो सेक्युलर राहिला असता का?’’ समोरून काहीच उत्तर आले नाही. मी म्हणालो, ‘‘नसता राहिला. भारत जर मुस्लिमबहुल देश असता आणि अल्पसंख्य हिंदूंना स्वतंत्र देश दिल्यावर, त्याने आपणहून स्वत:ला सेक्युलर म्हणून घोषित केलेच नसते. ही उदार वृत्ती हिंदुत्वात स्वभावत:च आहे. सहिष्णुता हा हिंदुत्वाचा स्वभाव आहे. आम्ही या स्वभावाला समजून घेतले पाहिजे. आम्ही या मानसिकतेचा आदर केला पाहिजे. भारतात हिंदूंऐवजी दुसर्‍या कुठल्या धर्माच्या लोकांची बहुसंख्या असती, तर मुसलमानांची काय दशा झाली असती, याचा तुम्ही विचार केला तर बरे होईल. प्रत्येकाने या अशा ऐतिहासिक वस्तुस्थितीला समजून घेतले पाहिजे आणि तडजोडीसाठी तयार राहायला हवे. तरच आम्ही खर्‍या अर्थाने सेक्युलर देश बनू शकतो. मी या विचारांना ‘उलट चिंतन’ (रीव्हर्स थिंकिंग) असे म्हणतो. तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही मुसलमान असल्याची कल्पना करा आणि समस्येकडे बघा. तुम्ही मुसलमान असाल तर तुम्ही हिंदू असल्याची कल्पना करा आणि समस्येकडे बघून, ती सोडविण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्व वेगवेगळ्या धर्माचे आहोत, हा एक अपघात आहे, योगायोग आहे हे लक्षात ठेवा.’’ समोरून एक प्रश्‍न आला- ‘‘आम्ही या तीनही जागा हिंदूंना सोपविल्या आणि नंतर विहिंपने तीन हजार जागांची मागणी केली तर? त्यांची यादी फारच मोठी नाही का?’’ मी उत्तरलो- ‘‘आपण सलोख्याच्या, समेटाच्या मार्गावर आहोत. वाटाघाटीतून शांततेची पहाट उगवेल, अशी आपल्याला आशा आहे. अवाजवी मागण्यांच्या विरुद्ध उभे राहण्याची मुसलमानांना गरजच पडणार नाही. हिंदूच ते काम करतील. हिंदुत्वाची हीच तर महानता आहे. हे लक्षात ठेवा की, बजरंग दल, विहिंप, रामसेना इत्यादी कट्टरपंथी हिंदू संघटनांना सर्वसामान्य हिंदू समाजात स्वीकार्यता नाही.’’ बाबरी मशिदीवरील दावा सोडून ती हिंदूंना सोपविल्याने समस्या सुटू शकते, या माझ्या प्रतिपादनाशी उपस्थित श्रोतृवृंद सहमत झाला असल्याचे मला जाणवले. पण उघडपणे कुणीच मान्य केले नाही. बरेचदा शरीराच्या हावभावावरून मनातील भाव समजून येतात. कार्यक्रमानंतर आयोजकांनी मला एका लहानशा खोलीत नेले आणि विचारले- ‘‘तुम्ही ही सर्व वस्तुस्थिती सय्यद शहाबुद्दीनसारख्या वरिष्ठ नेत्यांना का सांगत नाहीत?’’ तोपर्यंत मी शहाबुद्दीन यांना ओळखत नव्हतो. नंतर शाह सुरी मकबर्‍याच्या घटनेनंतर मी त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर मी त्यांना माझे म्हणणे सविस्तर लिहून पाठविले होते. असो. भारतात अनेक पंथ-संप्रदाय आहेत. युरोपात संप्रदायनिष्ठा बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. पश्‍चिमेकडे जे संप्रदाय आजही अस्तित्वात आहेत ते केवळ वारसा व संस्कृती म्हणून. लक्षात ठेवा, हिंदूंमधील वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध बहुसंख्य हिंदूंनीच आवाज उठविला आहे. तसेच दादरी येथे जे घडले अशा अत्याचारांविरुद्धदेखील. पुरस्कार परत करून त्यांनी वाढत्या असहिष्णुतेला आळा घातला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती व आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतात जीवनाच्या प्रत्येक अंगावर धर्माचा प्रभाव आहे. प्रत्येक धर्माचे त्याचे स्वत:चे असे शिल्पशास्त्र आणि बांधकाम तंत्रज्ञान असते. या सर्व सांस्कृतिक आदानप्रदानाचा भारतात संगम झाला आहे. या सर्व परिवर्तनाची आधारशिला हिंदू संस्कृती आहे. बौद्ध आणि जैन संप्रदाय हिंदुत्वाच्या शाखा आहेत. इस्लामिक वास्तुशास्त्राने हिंदू-बौद्ध-जैन आधारशिलेचे सौंदर्य वाढविले आहे. या सौंदर्याला ख्रिश्‍चन वास्तुशास्त्राने अधिक संपन्न केले आहे. कुतुबमिनार व ताजमहाल ही याची उदाहरणे आहेत. मिनार व घुमट यांचे उगमस्थान इराण, इराक व तुर्कस्थान आहे. परंतु, त्यांच्याकडे कुतुबमिनारच्या तोडीची एकही वास्तू नाही. का? ताजमहालची कमीतकमी एखादी प्रतिकृतीदेखील ते का बांधू शकले नाहीत? भारत हे करू शकला. कारण, आम्ही भारतीय हस्तकलेचे इस्लामिक वास्तुकलेशी मिश्रण करू शकलो. आम्ही संयुक्त संस्कृतीत जगत आहोत. प्रत्येक मोहम्मदामध्ये ब्रह्मदत्त असावा आणि प्रत्येक ब्रह्मदत्तात मोहम्मद. आम्ही भारतात अशी संयुक्त संस्कृती निर्माण केली पाहिजे. अनुवाद : श्रीनिवास वैद्य – डॉ. के. के. मोहम्मद निवृत्त पुरातत्त्व संचालक (उत्तर भारत)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 02/26/2018 - 05:03 नवीन
तर कुठलिही समस्या उग्र होण्यापूर्वीच शमवता येईल.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/26/2018 - 08:34 नवीन
डॉ. के. के. मोहम्मद यांच्या सारख्या लोकांची भारताला गरज आहे. सर्वसामान्य मुस्लिम लोकांना हे पटणे अवघड आहे , तसेच "अयोध्या केवल झांकी है , काशी मथुरा बाकी है" अशा घोषणा देणार्‍यांचा उन्माद कसा रोखायचा हा प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/26/2018 - 08:52 नवीन
अश्या सत्याच्या उपासकांची आजच्या घडीला फार गरज आहे. त्यांची काही वाक्ये फार बोलकी आहेत आणि भारतातील राजकीय नीतिमत्ता हननाची कारणे त्यांच्यात लपलेली आहेत. उदा : या वाया गेलेल्या संधीने एक गोष्ट स्पष्ट झाली की, केवळ हिंदू व मुसलमानांमधील कट्टरवादीच नाही, तर हे कम्युनिस्ट कट्टरवादीदेखील देशासाठी धोकादायक आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 11 hours ago
  • सुंदर !!
    3 days 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा