Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अयोध्या राममंदिर

म
मंदार कात्रे
Sat, 02/10/2018 - 05:08
🗣 150 प्रतिसाद
अयोध्या राममंदिर संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका नेहमीच वादग्रस्त अन संशयास्पद राहिली आहे. कोर्टाने निष्पक्ष पणे समोर उपलब्ध तथ्ये , पुरावे अन घटनांचा आढावा घेवून त्वरित निकाल देणे अपेक्षित असते . गेल्या महिन्यात घडलेल्या जजेस च्या पत्रकार परिषदे सारख्या घटनांमुळे संशयाची सुई कोर्टाकडेच वळत आहे. कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी अथवा अल्पसंख्यांकांच्या हिंसक प्रतिक्रिया येतील या भीतीपोटी अथवा दडपणाखाली सुप्रीम कोर्ट ह्या प्रकरणात चालढकल व वेळकाढूपणा करत आहे . अनेक बिनमहत्त्व्वाच्या बाबींवर रात्री अपरात्री देखील सेशन बोलावून चुटकीसरशी "निकाल" लावणार्‍या कोर्टाला या बहुसंख्य हिंदूंच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निकाल द्यायला ६०-७० वर्षे पुरत नाहीत याला काय म्हणावे ? घोर कलयुग !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 40890 views

🗣 चर्चा (150)
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 18:20 नवीन
बच्चू कडू!!!! LLRC
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 15:47 नवीन
अमक्या तमक्याने टक्केटोणपे खावेत ही का अपेक्षा म्हणे ? त्यांचे सासू सासरे, नवरा जर श्रीमंत असतील तर त्याचा फायदा त्याना मिळणारच. आपल्यापेक्षा पुढची पिढी जास्ती आरामात असावी , असेच सर्वाना वाटते ना ? की टक्केटोणप्याच्या नावाने त्याना पाथरवटीचे काम , विहिरीतून पाणी शेंदायचे काम द्यायचे ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 15:50 नवीन
....की टक्केटोणप्याच्या नावाने त्याना पाथरवटीचे काम , विहिरीतून पाणी शेंदायचे काम द्यायचे ?
अगदी द्यावयास हवे .लाएल तर जबरदस्तीने करुन घ्यावे . हि एक चांगली गोस्।ट चीनच्या कम्युनीस्ट पक्षा कडून घेण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 02/13/2018 - 14:42 नवीन
बाबर मेला पण इतिहासातील अपकृत्ये लपवू इच्छिणारी जी काही मंडळी आहेत त्या सर्वांची नैतीक जबाबदारी बनते.
नेमके कोण हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. 'आम्ही बाबराचे समर्थक आहोत' अशी भूमिका कुणी घेतली आहे का ?
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 02/13/2018 - 17:50 नवीन
'ऐतिहासिकता सिद्ध करण्यासाठी तर्कसुसंगत प्रमाण साधनांद्वारे आधार द्यावे लागतात हे खरेच, पण एखाद्या गोष्टीस आज पुरावा नाही म्हणून उद्या उपलब्ध होणारच नाही असे नाही.' या माहितगार यांच्या विधानाला दुजोरा देण्यासाठी ह्या दोन माहिती उपलब्ध करत आहे. १. आपण सरस्वती नदी लुप्त झाली असे कैक पिढया मानत आलो आहोत. त्या मान्यतेची सत्यता पटवणारे बरेच संशोधन गेल्या पन्नास वर्षात झाले आहे आणि त्यावर लेख व पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्याचा गोषवारा येथे वाचता येईल. http://serveveda.org/?p=166 २.. श्रीकृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली असे आपल्या कैक पीढ्या मानतात . एस. आर. राव या पुरातत्ववेत्त्यांनी द्वारके जवळच्या समुद्रात संशोधन केले आणि या विषयावर पुस्तक लिहिले आहे. त्या बद्दलची माहिती येथे वाचता येईल. http://blog.abhinavagarwal.net/2013/09/lost-city-of-dvaraka-sr-rao.html
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 02/13/2018 - 03:25 नवीन
पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात मशीद पाडणे कायदेशीर मानावे आणि मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल असे मला वाटते. कायदेतज्ञ यावर भाष्य करतीलच, पण मला वाटते की सामाजिकदृष्ट्याही ते चुकीचे ठरेल. पुर्वी जे झाले ते झाले आता त्याकरिता नवीन वादळ उठवणे , तोडफोड करणे अयोग्य ठरेल. झालेच तर खरेच हा प्रश्न ६०-७० लाख हिंदूंच्या जिव्हाळ्याचा आहे का ? मला तरी वाटत नाही.. >> +७८६
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 04:28 नवीन
न्यूमरॉलॉजीने प्रश्न सुटतात अशी बर्‍याचजणांची श्रद्धा असते .
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 02/13/2018 - 04:53 नवीन
+666 ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 05:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 09:33 नवीन
>>> अयोध्येतील विशिष्ट ठिकाणी पुर्वी राममंदिर होते आणि नंतर ते पाडून काही शतकांपुर्वी मशीद बांधली गेली असा दावा आहे. कदाचित खराही असेल. पण त्यामुळे न्यायालयाने आजच्या काळात मशीद पाडणे कायदेशीर मानावे आणि मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य ठरेल असे मला वाटते. सर्वात आधी तिथे श्रीराम मंदीर होते. बाबराने ते पाडून मशीद बांधली. १९९२ मध्ये वापरात नसलेली मशीद इतिहासजमा झाली व तिथे २५ वर्षांहून अधिक काळ मंदीर उभे आहे. न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी आता तिथून मंदीर हटणार नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 09:52 नवीन
सर्वात आधी तिथे श्रीराम मंदीर होते. बाबराने ते पाडून मशीद बांधली. १९९२ मध्ये वापरात नसलेली मशीद इतिहासजमा झाली व तिथे २५ वर्षांहून अधिक काळ मंदीर उभे आहे.
उत्खनानाचा दाखला घेतला तर बाबरीय ढाचाखाली मंदिराच्या भिंती होत्या हे सिद्ध होते. अयोध्येत आहे म्हणून राममंदिर असण्या ची शक्यता जास्त असली तरीही राममंदिरच होते असे म्हणण्यासाठी अधिक सबळ पुराव्याची आवश्यकता असावी. तसे नसते तर न्यायालयाच्या निर्णयाबाबत अधिक आस्वस्तता वाटली असती आणि नंतरचे विधान आपण कदाचित लिहिले नसते.
न्यायालयाचा निर्णय काहीही लागला तरी आता तिथून मंदीर हटणार नाही.
न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने लागला नाही तर तुम्ही अन्याय ठरली तरी अन्याय् भूमिकेचे समर्थन तेही अशा देवतेच्या नावाने की ज्या देवतेच्या अवतारात न्याय्य बाजूचा आग्रह आहे म्हणून देवता मानले जाते त्या देवतेचे नाव घेऊन न्यायालयाने केलेला निकाल नाकारु इच्छिणे जरा अतीच होत नाही का ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 10:01 नवीन
>>> न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने लागला नाही तर तुम्ही अन्याय ठरली तरी अन्याय् भूमिकेचे समर्थन तेही अशा देवतेच्या नावाने की ज्या देवतेच्या अवतारात न्याय्य बाजूचा आग्रह आहे म्हणून देवता मानले जाते त्या देवतेचे नाव घेऊन न्यायालयाने केलेला निकाल नाकारु इच्छिणे जरा अतीच होत नाही का ? हिंदूंची भूमिका सुरवातीपासूनच न्याय्य होती. न्यायालय न्याय्य/अन्याय्य भूमिका न बघता, व्यावहारिकता न बघता फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे निकाल देतात. आता ते मंदीर तिथून हलविणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/13/2018 - 10:20 नवीन
हिंदूंची भूमिका सुरवातीपासूनच न्याय्य होती. न्यायालय न्याय्य/अन्याय्य भूमिका न बघता, व्यावहारिकता न बघता फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे निकाल देतात. आता ते मंदीर तिथून हलविणे अशक्य आहे.
'गृहीत धरणे' असा वाक्प्रचार आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 02/13/2018 - 14:49 नवीन
व तिथे २५ वर्षांहून अधिक काळ मंदीर उभे आहे
मग आता कोणतं मंदिर उभारण्याचा निर्धार अधूनमधून बोलला जात असतो...
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 02/13/2018 - 15:25 नवीन
ते मंदीर म्हणजे श्रॉडींगरची मांजर आहे. आहे पण आणि नाही पण.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 18:24 नवीन
तिथे उभे असलेले छोटे मंदीर भव्य स्वरूपात निर्माण करण्याचा निर्धार बोलला जातो.
  • Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Tue, 02/13/2018 - 15:34 नवीन
६०-७० लाख ? सामान्य जनतेच्या माहितीसाठी भारताची लोकसंख्या १३० कोटी असून त्यात हिंदू ८०% मुस्लिम १४% ख्रिश्चन २% बौद्ध २% आणि इतर २% आहेत . याचा अर्थ जिंदू जनसंख्या ९० कोटीच्या आसपास आहे . अशा परिस्थितीत बहुसंख्य हिंदून्च्या हिताचे रक्षण करणे हे कोणत्याही सरकारचे आद्यकर्तव्य ठरते . परंतु यापूर्वीच्या सरकारानी बेगडी धर्मनिरपेक्षतेचे बुरखे पांघरून अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले . या अभद्र अन्यायाचे परिमार्जन त्वरित होणे क्रमप्राप्त आहे... हिंदू मुस्लिम सिक्ख इसाई मिल रहते यहा भाई भाई हे ऐकल्यावर संतापाची एक तिडीक डोक्यात जाते .... कुणाला कुणाच्या रांगेत बसवत आहात? ९० % आणि १४% समसमान ? का म्हणून?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 02/13/2018 - 15:41 नवीन
सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या राज्यघटनेनुसार सर्व भारतीय समसमान आहेत. पटत नसेल तर देश सोडू शकता.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 02/13/2018 - 18:58 नवीन
सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या राज्यघटनेनुसार सर्व भारतीय समसमान आहेत
सहमत
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 19:10 नवीन
>>> सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या राज्यघटनेनुसार सर्व भारतीय समसमान आहेत. गैरसमज आहे. गैरसमज दूर करण्यासाठी वाचन व अभ्यास वाढवावा.
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Fri, 02/16/2018 - 04:32 नवीन
संघिष्टांनी आणि मनुवाद्यांनी कधी राज्यघटना मनापासून स्वीकारली नाही.. त्यामुळे सर्व भारतीयांनी स्विकारलेल्या ही वाक्यरचना चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 15:55 नवीन
हिंदु १०० कोटी असले तरी बाबराच्या काळात मंदिर प्रवेश करण्याचा अधिकार असणारे त्या काळात वरच्या दोन वर्णातले १०-२० % च होते ना? की सगळे हिंदु आत जात होते ? मग इतराना त्या काळात त्या मंदिराचे सोयरेसुतक का असेल ? आज त्या १४ % पेक्षा आपण भरपूर जास्त आहोत हे दाखवायला हे वरचे १०-२० % उरलेल्या ६० % ना सांगताहेत, या तुम्हीही देवळात !
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Tue, 02/13/2018 - 16:04 नवीन
बरोब्बर.... एकदा त्या १४ टक्क्यांना पायाखाली आणले की परत ह्या ६० टक्क्यांना पायाखाली आणायचे प्रयत्न सुरु होतील. शिकू नका, शिकलेले वेडे असतात, शिकलेल्या पोरी चवचाल असतात अशी प्रचारफेरी त्यासाठीची पायाभरणी आहे. आपल्या पोरांना बरोब्बर शिकून परदेशी पाठवायचे, इतरांच्या पोरांना बत्तीसमण सोन्याच्या सिंहासनामागे दौडत लावायचे संघी कावे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 18:27 नवीन
>>> आपल्या पोरांना बरोब्बर शिकून परदेशी पाठवायचे, खरी जळजळ बाहेर आली.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 02/13/2018 - 19:23 नवीन
आणि तुमची जळजळ काय आहे ? अब्दागिर्या धरायला , पालख्या उचलायला , धुणी धुवायला , अमूक तमूक म्हटले की कोरसमध्ये जय म्हणायला ... माणसे कमी पडतील ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/10/2018 - 05:14 नवीन
अगदी सहमत. सलमान सुटला.. आता हेही प्रकर्ण लवकर सोडवावे. कोर्टाने म्हटले आहे ... की या वादाकडे फक्त जागेचा वाद म्हणून पाहिले जाईल. धार्मिक , भावनिक मुद्दे विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर Sat, 02/10/2018 - 06:03 नवीन
राम खरोखरीच होता की नव्हता हा येथे प्रश्नच नाही. तो होता अशी श्रद्धाळू हिंदु समाजाची श्रद्धा होती आणि त्याचा जन्म 'येथेच' झाला असेहि त्या भोळसट लोकांना वाटत होते. त्यांना तसे वाटत होते हे जाणणार्‍या शासकांनी 'आता नव्या धर्माचे राज्य आले आहे' हा मुद्दा त्यांचे नाक जमिनीत घोळवून सिद्ध करण्यासाठी 'तेथेच' मशीद बांधली. मशिदी बांधण्यासाठी अन्य बर्‍याच जागा उपलब्ध असणार तरीहि ती येथेच बांधली ह्यामागे हिंदु समाज आता दुय्यम आहे हे दाखविणे हाच हेतु होता. (जिझिया कर देतांना कर देणार्‍याने तो नम्रपणेच दिला पाहिजे असेहि त्या कराच्या नियमावलीमध्ये आहे. कुर्रान ९.२९ सांगते:
Fight those who believe not in God and in the Last Day, and who do not forbid what God and His Messenger have forbidden, and who follow not the Religion of Truth among those who were given the Book, till they pay the jizyah with a willing hand, being humbled.
) त्या भोळसटांच्या हातात आता सत्ता आली आहे आणि ते आपल्यावरचा perceived अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्यात चुकीचे काय आहे? मी म्हणेन की मुस्लिम समाजाने हे मान्य केले आणि तेथे पुनः राममंदिर बांधायला संमति दिली तर ह्या समजूतदार वर्तनाचे देशाच्या राजकारणावर आणि हिंदु-मुस्लिम संबंधावर चांगला परिणाम होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/10/2018 - 06:17 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/10/2018 - 14:10 नवीन
जागेचा वाद सोडवताना श्रद्धा , राजकारण विचारात घेतले जाणार नाही, असे कोर्टाने सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 02/10/2018 - 15:55 नवीन
दोन्ही बाजूंसाठी पुरेसे ifs and buts आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/12/2018 - 05:19 नवीन
अयोध्येतील मुस्लीम बोर्डातील काही सदस्यांनी दुसरीकडे मशीद उभारु असे म्हटल्याबरोबर त्यांना काढून टाकलंय. कोण घेईल आता समजूतदारपणा....! दुसरीकडे राममंदिर उभारता येईल का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Tue, 02/13/2018 - 09:32 नवीन
योग्य प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 02/10/2018 - 07:58 नवीन
घोर कलयुग ! - ?? :)))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 02/10/2018 - 09:51 नवीन
घोर कलयुग ! - ?? नारायण ! नारायण ! कल्कि अवतार होई पर्यंत थांबले नाही म्हणजे झालं... बाकी मंदिरात जाउन आलो याची सुद्धा फॅशन आली आहे... पिक्चर रिलीज असो... काम अडलं असो... संकट निवारण ! इंइंइं... तेव्हा बालाजी पासुन साई बाबांन पर्यंत सगळीकडे मथ्था टेकुन येतात ! [ याला सेलिब्रिटी लोकांची / राजकारण्यांची / इंइंइं मंडळींची श्रद्धा म्हणता येईल का ? ] { मी तर प्रभुंची भक्तांनी चालवलेली बार्टर सिस्टीम म्हणतो... म्हणजे, देवा तु मला हे दे, म्हणजे मी तुला अमुक एक गोष्ट देइन. } हल्ली तर प्रभु रामंचंद्र / कॄष्ण काल्पनिक असे समजणारे सुद्धा चक्क देवळात जाऊ लागलेत. { संदर्भ :- Congress does not believe in Ram, Krishna, what was Rahul doing at Dwarka: Yogi Adityanath No historical proof of Ram, Centre tells SC जाता जाता :---- नारायण ! नारायण ! आता माझी सप्तलोकात चक्कर टाकायची वेळ झाली... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Exquisite Afternoon Raga Bhimpalasi | Kaushiki Chakraborty | Music of India
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 02/10/2018 - 10:04 नवीन
कल्की अवतरली म्हणून ऐकुन आहे . तीचा आदर करा म्हणजे झाले :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 02/11/2018 - 04:31 नवीन
कल्की अवतरली म्हणून ऐकुन आहे . तीचा आदर करा म्हणजे झाले तीच का ? परवा राज्यसभेत विकट हास्य करणारी ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/13/2018 - 19:43 नवीन
LLRC
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 02/16/2018 - 18:46 नवीन
लोळुन लोळुन रेणु चव्हाण का??????
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/16/2018 - 19:27 नवीन
Laughing Like Renuka Chaudhari
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/10/2018 - 16:27 नवीन
आज बोलतात ... अमका महल संस्कृतीचा भाग नाही. उद्या तिथेच झाडायला गेल्याचा सेल्फी पेप्रात देतात !!
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 18:42 नवीन
तुमच्या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/10/2018 - 18:44 नवीन
ज्याना समजायचे ते समजतील. तुमी नका टेन्शन घेऊ.
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Sat, 02/10/2018 - 18:47 नवीन
ते ज्यांच्यासाठी उद्देशून आहे त्यांना टाकलं आहे का तुम्ही? तसा काही उल्लेख दिसला नाही! पण तरीही, काय संबंध तुमच्या दोन्ही वाक्यांचा? संस्कृतीचा भाग असणाऱ्या ठिकाणचेच सेल्फी टाकावेत असा काही नियम आहे का??
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/10/2018 - 18:47 नवीन
इतक्या दिवसात समजलं नाही का? इग्नोर मारा.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 02/11/2018 - 02:18 नवीन
राममन्दिर प्रकरण कोर्टात चालू आहे, तर कोर्टाचा सन्मान करा , ते मुस्लिम पर्सनल बोर्डाचा कोणीतरी बोलला म्हणून नाचू नका, ते तीन तलाक वर कोर्टाने निर्णय दिला तर मात्र हा मुसलमानचे हक्क मारण्यासाठी कायदा करत आहेत अशी बोम्ब ठोकायची, काय मोगाखांन?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 02/11/2018 - 06:12 नवीन
तिथे काय का बांधेनात. टेंपल झालं तरी तिथे आम्ही जाणार नाही. मॉस्क झाले तरी तिथवर जाणे शक्य नाही. ( केक खायला येणार का ? उद्या १२ फेबला आमचा हॅ. ब. असतो . पण कार्यबाहुल्यामुळे १४ फेबला करावा लागतो. नेमका त्याच दिवशी बाबराचा हॅ. ब. असतो . )
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/12/2018 - 05:11 नवीन
मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे. चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 02/12/2018 - 08:24 नवीन
हा हा हा बरोबर गुरूजी
  • Log in or register to post comments
आ
आकाश कंदील Mon, 02/12/2018 - 11:03 नवीन
manguu@mail.com कार्यबाहुल्यामुळे १४ फेबला हॅ. ब. करायला जमत नसेल तर १४ ऑगस्टला करा आणि हो बाबर बरोबर हॅ. ब. साजरा करायला मिळाला नाहीतरी शब्बीर शहा बरोबर नक्कीच करा
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 02/12/2018 - 12:08 नवीन
तारेक शाह बरोबर केला तर अजुन उत्तम.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 11 hours ago
  • सुंदर !!
    3 days 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा