Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सर्व वास्तु पांडवकालीन कश्या ?

प
प्रमोद देर्देकर
Fri, 01/24/2014 - 07:02
🗣 106 प्रतिसाद
आपण कोणत्या ही ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) पहायला गेलात तर तेथील स्थानिक रहिवाशी ती वास्तु पांडवकालीन आहे असा उल्लेख करतात. माझे इतिहासाचे जे वाचन झाले ते थोडेसेच, आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा योगही जास्त नाहिये. आज पर्यंत जेवढ्या ऐतिहासिक वास्तु (लेणी, देवुळ) गोष्टी पहिल्या, स्थळांचा इतिहास स्थानिक लोकांकडुन ऐकला त्यावरुन एक अनुमान निघते की या सर्व वास्तु पांडवांनी त्यांच्या वनवासातील काळात ते इथे होते तेव्हा बांधल्या आहेत. आता पांडवांना जो वनवास झाला तो १२ वर्षाचा आणि एक वर्षाचा एकांतवास होता. त्यानंतर ते कौरवांशी लढाई मध्ये गुंतले आणि जेव्हा युधिष्ठीर राजा झाला तेव्हा त्याने केलेल्या राज्यकारभारातील काळात इतर पांडव त्याच्या बरोबरीने होते. ही एवढी शिक्षेची १३ वर्षे सोडली तर पांडव हस्तिनापुर सोडुन बाहेर गेलेले नाहित. मग आता प्रश्न असा की एवढी देवळे, लेण्या त्यांनी कधी बांधल्या. मग त्यात लोणावळ्याची एकवीरा देवी, अंबरनाथचे शंकर मंदिर, दाभोळची चंडिकादेवी, नुकत्याच अतिवास यांनी केलेल्या भीमनी घंटींचा उल्लेख. आणि इतरही बरेच काही मंदिरे, वास्तु,लेण्या ज्या पांडवांनी बांधल्या असे सर्रास सांगितले जाते त्या आल्या. औंढा नागनाथ हे मंदिर तर एका रात्रीत बांधुन पुर्ण झाले असे म्हटले जाते. मग फक्त एकांतवासचे एक वर्षाच्या काळात भारतातील बहुतेक सर्व राज्यांना पांडवांनी भेटी दिल्या होत्या काय? आणि एकांतवास भंगु नये म्हणुन ते जर सतत जागा बदलत असतील तर किती कमी वेळात हे बांधकाम झाले असेल?. ( पण एकांतवासात पांडव हे विराट राजाच्या दरबारी आश्रयाला होते.) का त्यांनी फक्त कोनशीला बसवीली आणि नंतर ते बांधकाम तिथल्या स्थानिक लोकांनी बांधकाम क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मदतीने पुर्ण केले. कारण मुळात असे कोरिव बांधकाम करायला अनेक वर्षे लागतात. कारण ताजमहाल बांधायला ही ३० वर्षाच्या वर काळ लागला होता तेही हजारो मजुर असताना आणि कुशल कारागिर असताना. मग बांधकाम क्षेत्रातील कुशलता ५ पांडवांपैकी कोणत्या पांडवाकडे होती? कारण गुरुकुलातले शिक्षण तर शस्त्रविद्या संबंधी झाले होते. जाणकार लोक काही प्रकाश टाकतील काय?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24667 views

🗣 चर्चा (106)
य
योगी९०० Fri, 01/24/2014 - 07:45 नवीन
रास्त प्रश्न..!! पुर्वी जसे बरेचसे जोक आचार्य अत्रे यांच्यानावाने खपवायचे त्यातलाच हा प्रकार दिसतोय. पण पांडवकालीन याचा अर्थ नॉट नेसेसरी की पांडवांनीच बांधलेय, त्याकाळातील इतर लोकांनी पण पांडवांच्या राज्य काळात बांधल्या असू शकतात ना?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 01/24/2014 - 08:21 नवीन
कौरव 'कालीन' असेही म्हणतो... (हलकेच घेणे)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 01/24/2014 - 08:25 नवीन
एकांतवास नाही, अज्ञातवास. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/24/2014 - 08:58 नवीन
>>एकांतवास नाही, अज्ञातवास. बाकी चालू द्या. =)) सं.मं. सदस्यांनीच असे बार उडवले तर आमच्यासारख्यांनी आपली बदनामी कुठल्या तोंडाने मिरवावी =)) अत्यंत आशयगर्भ क्रिप्टीक लिहावं ते म्याऊनेच =))
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 01/24/2014 - 17:52 नवीन
^*^&$%@&*(@^&# =))
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/24/2014 - 08:51 नवीन
अरेरे चुकुन झाले. क्षमस्व. धन्यवाद लीमाउजेट - जर सं.पा. मदत करित असेल तर क्रुपया एकांतवासच्या जागी अज्ञातवास असा बदल करावा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/24/2014 - 08:57 नवीन
आपण कोणाच्या घरी गेलो आणि हा चहा आमच्याच अंगणातल्या चहाच्या पानांचा आहे असं त्यांनी सांगितले तर मी लगेच हो म्हणेन .कारण मला माझा वेळ चहा पीत मजेत घालवायचा आहे . असो . (विनोद बाजूला ठेऊन) महाभारतकालीन एकही ऐतिहासिक पुरावा अजूनपर्यंत सापडलेला नाही .तो काळ साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा धरल्यास कठीण आहे . कुरूक्षेत्रात सापडलेल्या वस्तु पाहून असे सांगता येत नाही की येथे अठरा अक्षौहिणी सैन्य लढले . बुडालेली द्वारका अजून सापडलेली नाही .एकूण महाभारतावरच प्रश्न आहे . व्यासांच्या महाभारतात चमत्कार आहेत परंतु त्यांनी त्याला महत्व दिले नाही . लग्नापूर्वी कुंतीला झालेल्या अपत्याचा प्रश्न सोडवणे ,पुढे तो शत्रुकडे आहे हे कळून अगतिक तिचे होणे हे नाट्य महतवाचे केले आहे . (बाकी आहे .)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/24/2014 - 09:30 नवीन
बुडालेले द्वारका शहर मिळालेले आहे पण ते दीडेक हजार वर्षेच जुने आहे. त्याच्या जवळ बेट द्वारका नामक प्रकार सापडलाय तो मात्र इसपू १००० च्या आसपासचा आहे. हस्तिनापुर, अहिच्छत्र, इ. ठिकाणी इसपू १००० च्या वेळचे पुरावे सापडलेत-वस्ती, खापरे, तटबंदी, इ.इ. त्यामुळे अगदीच काही सापडले नाही हे चूक आहे. पण जे काम झालेय ते विस्कळीत आहे आणि जनतेसमोर यावे तेवढे आलेले नाही. शिवाय कुरुक्षेत्रात काही उत्खनन झाल्याचे मला माहिती नाही, पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 01/25/2014 - 09:35 नवीन
कुरूक्षेत्रात सापडलेल्या वस्तु पाहून असे सांगता येत नाही की येथे अठरा अक्षौहिणी सैन्य लढले .
खरे आहे. आमचाही अनुभव असाच आहे. उदाहरणार्थ आम्ही कुरुक्षेत्रि गेलेलो असता आम्हास खालील वस्तु सापडल्या होत्या: फ्रूटीचे रिकामे डबे नग २७, कुरकुर्याची पाकिटे नग ४२, प्लास्टिक पिशव्या नग १७७, रबरी चपला नग ३, पानपराग पाऊच नग ६२, विड्यांची थोटके नग २६, तुटका वस्तरा नग १, लोकरी टोपी नग १, सायकलीचे टायर नग १. अठरा अक्षौहिणी सैन्यास एवढ्या वस्तू पुरेशा नाहीत, असे आम्हासही वाटले, परंतु महाभारतकाली हे सर्व शोध लागलेले होते, हे बघून वैदिक संस्कृतीच्या अभिमानाने ऊर भरून आला. महाभारतावरील आमचे लेखः http://www.misalpav.com/node/26554 http://www.misalpav.com/node/26667 http://www.misalpav.com/node/25328
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/24/2014 - 09:42 नवीन
व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् :)
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/24/2014 - 10:52 नवीन
येवढे प्रश्न पडायला आणि ते सोडवायला वेगळे धागे उसवायला लोकांना वेळ कसा मिळतो हा आजवर मला पडलेला प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/24/2014 - 10:55 नवीन
नाही ,सापडलेल्या वस्तु कोणत्याही जुन्या बंदराजवळच्या समुद्रात मिळतात अशा आहेत . द्वारका नगरीचे अवशेष म्हटता येतील या तोडीचे नाहीत . प्रयत्न सोडून दिले आहेत . पाचशे वर्षांपुर्वीच्या तरवारी आणि चिलखते पाहून आपण लगेच मान्य करतो की ते योध्दे धिप्पाड (छाती ५६ इंच) होते . सहाव्या शतकात बुध्दधर्मीय भारत सोडून जाऊ लागले .जैनांचाही प्रभाव कमी होऊ लागला .त्यांच्या गुंफांमध्ये दरवाजापाशी कुबेर ,कुबेरी ,इंद्र होते .कुबेरीला सजवून देवी करण्यात आले ,गाभाऱ्यात हिंदू देवता बसवण्यात आल्या .पांडवांच्या कथा त्याला चिटकवण्यात आल्यास नवल नाही .
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 01/24/2014 - 11:18 नवीन
मला एक मूलभूत प्रश्न पडला आहे - या कथा नेमक्या कशा चिकटतात?
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/24/2014 - 11:28 नवीन
त्याचं काय आहे - एखादे अगडबंब, अगम्य वाक्य, एका पाश्चिमात्य विद्वानाने म्हटले आहे असे सांगितल्यावर कसे एकदम भारदस्त वाटू लागते. तसेच, एखादी जीर्ण, पडकी वस्तू, पांडवकालीन म्हटल्यावर एकदम शुचिर्भूत वाटू लागते!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/24/2014 - 12:22 नवीन
@ सुड जी जसे आपल्याला विडंबन नीट होण्यासाठी काय करावे ? ह्या धाग्यासाठी आणि तो प्रश्न सोडवायला इतर लोक धावुन येतात ना अगदि तसाच वेळ आम्हालाही ( म्हणजे सर्वांना ) मिळतो.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 01/24/2014 - 15:21 नवीन
आपण मी लिहीलेले जुने धागे उसवून वाचता आहात याबद्दल कवतिक वाटलं. कालपर्यंत मला वाटत होतं की आपल्या लिखाणाची काहीच किंमत नाही मिपावर. तुम्ही माझा तो समज फोल ठरवल्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. आता लिखाणाला नवीन हुरुप येईल.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 01/29/2014 - 02:36 नवीन
धाग्यावर आल्याचं सार्थक झालं.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 01/24/2014 - 15:54 नवीन
पांडववाडा: एरंडोल जिल्हा:जळगाव (महाराष्ट्र) पांडववाडा एरंडोल शहराचे अवंती नगरी व त्‍यानंतर एक चक्र नगरी असे अस्तित्‍व हे त्रेता व द्वापार युग असतांना पांडव अज्ञातवासात याठिकाणी येवून राहिले. त्‍यावेळेस दुष्‍ट राक्षस बकासूराचा वध करून शहरावरील राक्षसाचा भय नाहिसे करण्‍यास भिमाने मोठा पराक्रम केला. त्‍यामुळेच एक चक्र नगरीच्‍या इतिहासकालीन राजाने पांडवांना वाडा दान दिला. तेव्‍हापासूनचा सदर वाडा हा पांडववाडा म्‍हणून आजही ओळखला जातो. अतिशय जून्‍या पध्‍दतीने बांधकाम असलेले पक्‍क्‍या दगडी भिंतीचे की ज्‍यावरून भिंतीवरून बैलगाडी फिरू शकते एवढ्या जाडीच्‍या भिंती असून विस्‍तीर्ण पटांगणात संपूर्ण दगडी बांधकाम असून अशी ऐतिहासिक वास्‍तू शहरात अस्तित्‍वात आहे. संदर्भ: महाभारतातील एक कथा: कुंतीचा त्याग, भीम बकासुर युध्द
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/24/2014 - 16:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 01/24/2014 - 17:58 नवीन
वल्लीदादाना धाग्यासाठी नवीन विषय मिळालाय. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 01/25/2014 - 07:39 नवीन
नाही हो. पांडवांनी अज्ञातवासात असताना बकासूराचा वध आणि तोही जळगावानजीक एरंडोल येथे केला हे वाचून हसू आले.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/25/2014 - 08:25 नवीन
रीपिट केलं असेल महाभारत! ;)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Sat, 01/25/2014 - 08:09 नवीन
येकाण्दा फटु तरी द्या की जरा.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 01/25/2014 - 10:28 नवीन
पांडव वाडा फोटो लिंक दिग्विजयी समुद्रगुप्तानें महाराष्ट्रांत एरंडपल्ली जिंकलें एरंडोल येथे पर्शियन भाषेतील शिलालेख सापडला असून, याच ठिकाणचा पांडववाडा प्रसिद्ध आहे. भीम-बकासूर यांचे तुंबळ युध्द झाले ते श्री क्षेत्र पद्मालय जवळ असलेले भीमकुंड
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/25/2014 - 10:55 नवीन
सातपुड्याच्या रांगा हे विराटनगरी च्या राज्याचे दक्षिण टोक होते बहुतेक, सबंध रांगेत ह्या कथा अन ही ठीकाणे आहेत, जसे की अमरावती जिल्ह्यात पण चिखलदरा (किचकदरा) चा अपभ्रंश असल्याचे म्हणतात, इथे सुद्धा भीमकुंड आहे फक्त हे भीमकुंड म्हणजे किचकवध केल्यावर जिथुन भीमाने त्याचे छिन्न शरीर दरीत फेकुन दिले अन स्नान केले ते कुंड (फस्स्क्लास जागा हाए!!!, महाराष्ट्रात कॉफी लागवड फक्त इथेच होते अन मस्त कॉफी असते!). श्रीकृष्णाच्या शापाने व त्यानेच मणी कापुन घेतल्यावर भाळावर जखम घेऊन तो इथेच (ह्या पट्ट्यात ) तेल मागत फिरतो अशी पण बोलवा आहे, अश्वथामा दिसल्याचे पार इकडे गाविलगड टेकड्या (जिल्हा अमरावती)ते गुजरात पर्यंतचे काही लोक सांगतात , पक्के माहिती नाही पण बहुदा स्थानिक वनवासीजन अश्वथाम्याची पुजा करतात असे ऐकले आहे (जाणकारांनी प्रकाश टाकावा)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/25/2014 - 16:49 नवीन
सोन्याबापू विराटनगरी म्हणजे आजचे "वाई " ( वैराष्ट्रक ) इथे देखील भीमाने पाचगणीजवळ कीचकाचा वध केल्याच्या गोष्टी साम्गितल्या जातात. दुसरे असे की पांडवकालीन याचा अर्थ पांडवानी केलेल्या असे नव्हे. उदा: पांडव ज्या काळात होते त्या काळी अफगाणेस्थान / श्रीलंका / अरबस्थान इथेही काही लोक जगत असतीलच. त्यानी त्या काळात बांधलेल्या वास्तुही पांडवकालीनच असणार.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Sat, 01/25/2014 - 11:07 नवीन
आयुर्हित,माहिती आणि त्वरित प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Mon, 01/27/2014 - 14:59 नवीन
अहो त्या बकासुर कथेत पद्मालयाची घंटा अन सांडलेला भात राहिला की! बाकी, पांडवांचा 'एकांतवास' ;)
त्रेता व द्वापार युग असतांना पांडव अज्ञातवासात याठिकाणी येवून राहिले.
अशी दोन युगे सुरू होता हे वाचूण जरा टाईमलाईण पंक्चर झाल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 01/24/2014 - 19:11 नवीन
दगडांनी बांधलेले काही असेल तर ते चौथ्या शतकापेक्षा जूने नाही .त्यांचे सांधेही बघा .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/24/2014 - 19:47 नवीन
असे काही नाही. मौर्यकाळातील दगडी खांब इ. देखील मिळालेले आहेत. दगड किंवा माती यापेक्षा फ्री-स्टँडिंग देवळांची ट्रॅडिशन गुप्तकाळात जास्त सुरू झाली असे म्हणता यावे. अन द्वारकेबद्दल बोलायचे तर बेट द्वारकेत १००० बीसीच्या आसपासची पॉटरी सापडलेली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/25/2014 - 17:16 नवीन
व्दारकेचे अवशेष नक्की करायचे असले तर खालीलपैकी कमीतकमी एकतरी व्हावे लागेल: १. प्रथम महाभारताचा काळ निश्चित करावा लागेल. त्या काळात समुद्रकिनारा कोठे होता हे ठरवून तेथे पाहणी करायला लागेल. उदा. १०,००० वर्षांपूर्वी समुद्राच्या पाण्याची उंची आताच्यापेक्षा १०० ते १३० मीटर खाली होती. म्हणजे तो किनारा आता १०० ते १३० मीटर पाण्याखाली आहे आणि आताच्या किनार्‍यापासून काहीशे मीटर ते काही किलोमीटर दूर पाण्यात आहे. हेच महाभारत काळात समुद्रकिनारा कोठे होता हे ठरवून तेथे संशोधन करावे लागेल. अर्थात हे इतके सोपे नाही कारण या मधल्या काही हजार वर्षांत समुद्रकिनार्‍यांची झीज, समुद्रतळाच्या पृष्ठभागाची झीज, जमिनीच्या स्तरांची हालचाल (भुकंप वगैरे) इ या सगळ्या गोष्टी सगळी समिकरणे उलटसुलट करू शकतात आणि सशोधनाचा रोख मूळ जागेपासून काही किलोमीटर दूर जावू शकतो... आणि संशोधन व्यर्थ होऊ शकते. म्हणजे हा जरी शास्त्रिय उपाय असला तरी त्यांनेही खात्रीलायक पुरावे हाती येतीलच असे नाही. २. अनेकदा नशिबावर अथवा योगायोगावर आधारलेल्या घटनेतूनही काहीवेळा दुसर्‍या कारणासाठी केलेल्या शोधात किंवा एखाद्या चूकीमुळे अगदी वेगळेच संशोधन होऊन अत्यंत महत्वाचे पुरावे बाहेर येतात. ते पुरावे डेटिंग करण्याजोगे असले तर सोन्याहून पिवळे. जर ते पुरावे लिखित अथवा चर्चित इतिहासाबरोबर नि:शंकपणे जुळले तर मग तो इतिहास विश्वासू म्हणायला हरकत नसावी अथवा इतिहास विश्वासू आहे पण तारखा वेगळ्या आहेत असेही सिद्ध होऊ शकते... निदान भविष्यात अजून काही वेगळे आणि जास्त विश्वासू सापडेपर्यंत तरी :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 08:30 नवीन
दोन्हीही मुद्दे मान्यच आहेत. महाभारताचा काळ अगदी नक्की करता आला नसला तरीही साधारण इसपू १००० च्या आसपास त्यात वर्णिलेल्या समाजरचनेसारखी स्थिती भारतात होती असे सध्या मानले जाते. त्यामुळे त्या काळच्या आसपासचे काही सापडले तर त्याला महाभारतकालीन म्हणायची सध्या चाल आहे इतकेच. पण अर्थातच, ट्रॉयच्या मानाने इकडे आजिबातच संशोधन झालेले नाही.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 01/27/2014 - 09:46 नवीन
ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये(कल्पामध्ये) ४३२ कोटी सौरवर्षे(मानवी वर्षे) होतात. त्या दिवसामध्ये चौदा मन्वंतरे होतात. एका मन्वंतरामध्ये ७१ महायुगे होतात. प्रत्येक मन्वंतर संपल्यानंतर दुसरे सुरू होण्यापूर्वी मध्ये एका कृतयुगाएवढा(१७,२८,००० वर्षांचा) संधिकाल असतो. असे तेरा संधिकाल असून, नवीन कल्प सुरू होण्यापूर्वी असणारा एक चौदावा संधिकाल असतो. सध्या चालू असलेल्या स्वेतवाराह कल्पामधली संधिकालांसह सहा मन्वंतरे होऊन गेली आहेत आणि सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. मन्वंतरातील २७ महायुगे पूर्ण होऊन २८वे महायुग चालू आहे. या अठ्ठाविसाव्या महायुगातली कृत(=सत्य), त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून सध्या कलियुग चालू आहे. इ.स.२०१२ सालापर्यंत कलियुगातली ५,११३ वर्षे पूर्ण होऊन ५,११४वे वर्ष चालू आहे. महाभारताचे युद्ध संपले आणि कलियुग सूरु झाले अशी मान्यता आहे. याचा अर्थ इसवी सन पूर्व ३१००(अंदाजे)साली महाभारताचे युद्ध संपले. (५११४-२०१२=३१०२) अजून एक पुरावा: कृष्ण जन्मदिनांक २१ जुलै ३२२८ (ख्रिस्तपूर्व) i.e. July 21, 3228 BC आहे. Source: Arun K. Bansal, the father of computer astrology in India.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/25/2014 - 08:22 नवीन
अहो जसे सर्व राजे सुर्यवंशी किंवा चांद्रवंशी तशीच सगळी जुनी ठिकाणे पांडवकालीन... मोठ्या प्रसिद्ध माणसांच्या नावानं कसं भलं मोठं तेजस्वी वलय येतं वस्तू/जागे-भोवती ;) गंज लागलेली तलवार पण शिवकालीन म्हटली की लोकांच्या मनात आणि मालकाच्या चेहर्‍यावर कशी तळपू लागते ! जर प्रदेकालीन अथवा इएकालीन म्हटलं तर त्या गोष्टीला इतकं महत्व देतील का लोक?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/25/2014 - 08:31 नवीन
भारतात ज्ञानसंग्रहाचा पार बट्ट्याबोळ होता, गुणकर्म आधारीत जातीव्यवस्था होती तेव्हा ज्ञानाचे संक्रमण हे "मौखिक" पद्धतीने व्हायचे (अर्थात त्याचे उदाहरण आजही आपणास हयात असलेल्या अस्सल वेदशाळां मधे सापडेलच) ह्या संक्रमण पद्धतीत प्रत्येक कन्सेप्ट ला एक विशिष्ट उच्चार वर्ग केलेला असायअन, अन एक पुर्ण तप रोज तेच उच्चार घोकल्यावर त्या कन्सेप्ट्स पक्क्या होत असत, अतिशय मेधावी असणारी मंडळी जेव्हा नवी कन्सेप्ट काढत तेव्हा त्या कन्सेप्ट साठी नवा उच्चार अलॉट केला जात असे. पण हे आजही स्थापित ऐतिहासिक तथ्य आहे की नाही हा एक मोठा विवाद " इंडॉलॉजी" अर्थात "प्राचिन भारतीय अभ्यास शास्त्रात" आहे. त्यात आपल्याकडे कंड्या ज्या गतीने पिकतात त्या गतीने पाहील्यास जे मौखिक ज्ञान शुद्धमत तत्वात होते ते आज हमखास दुषित झालेले आहे. परत "हिस्टोरीयोग्राफी" च्या आधुनिक "आर्कायव्हिंग अन डॉक्युमेंटेशन" च्या तत्वांनुसार मौखिक परंपरांना इतिहास परिशीलनात स्थान नाही (आभार माना मॅक्समुलर ते कनिंघँम साहेबांचे). कदाचित हेच कारण आहे की मध्यपुर्वेत "डेड सी स्क्रोल्स" तर चीन मधे "पार्चमेंट्स" अन अगदी आझतेक अन इंका संस्कृतींत त्यांनी लिहुन ठेवलेले विशाल "दगड" का होईना सापडतातच. त्या उलट आपल्याकडे लिखित इतिहास हा नॉवेल्टी आयटम होता अन आहे, प्रथम उदाहरण भीमबेटका त्या नंतर डायरेक्ट आले ते मौर्यकालीन "अर्थशास्त्र" वगैरे मंडळी. अन नंतर थेट आयने अकबरी चा काळ, त्यात परत इतिहास म्हणजे काय ?? हा मुलप्रश्न आहेच तर इतिहास म्हणजे गतकाळातील मानवी आयुष्याचा अभ्यास, आपल्याकडे कालानुरुप करप्ट झालेल्या जातीव्यवस्थेपाई एका विशेष मानवी समुहाचा इतिहास सापडतो अन एका विशेष चा नाही. असे हे एकंदरी त्रांगडे कमीत कमी शब्दात मांडायचा यत्न करतो आहे (इतिहासात पीएच्डी मिळवणारच ह्या जिद्दीने पेपर टाकलेला) बाप्या
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/25/2014 - 08:44 नवीन
+१ त्यात अजून एक भरः लिखीत इतिहासही नेहमीच लेखकाच्या (किंबहुना त्याच्या आश्रयकर्त्याच्या) शाईच्या रंगात लिहीला गेला आहे. धर्म-बल-धन-दांडग्यांच्या मर्जीत न बसलेले लिखाण लिहिल्याने जाळून / डोके धडावेगळे होऊन मेलेल्या लेखकांची उदाहरणेही काही कमी नाहीत. म्हणजे लिखित इतिहास हा नेहमी गाळीवच असतो... आणि जितका जास्त जुना तेवढा वारंवार अनेक काळांतील गाळण्याचा रंग त्याच्यावर चढतच जातो ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/25/2014 - 08:51 नवीन
काही शंका: अशा परिस्थितीत सगळ्या इतिहासावर विश्वास कसा ठेवावा? पुरावे 'बनवले' जातात का? तुमच्या 'माणूस प्रवास' सेरिज मध्ये काही ठिकाणी ह्या कथित इतिहासाचा वापर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी झाला असं कुणीसं म्हटलेलं होतं. त्यात कितपत तथ्य? युरोपियन लोकांनी शब्दशः जगावर राज्य केलं. ह्या काळात त्यांनी आपल्या सोयीसाठी इतिहास 'बनवला' असण्याची शक्यता कितपत? संशोधक पूर्णतः कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय (विचारसरणीशिवाय) काम करतात असं मान्य करता येऊ शकतं का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/25/2014 - 09:37 नवीन
मी काही इतिहास संशोधक नाही. तेव्हा खालची मते ही माझ्या अल्पमतीवर आधारलेली आहेत असे समजावे: १. अशा परिस्थितीत सगळ्या इतिहासावर विश्वास कसा ठेवावा? पुरावे 'बनवले' जातात का? >पुरावे "बनवले" जाण्याची अनेक उदाहरणे सिद्ध झालेली आहेत. >>साधारणपणे जास्तीतजास्त संख्येने आणि विश्वासूपणा असलेल्या पियर्सकडून मान्यता मिळालेले लिखित पुरावे ग्राह्य धरले जाते. जर नंतर इतर जास्त ग्राह्य पुरावे सापडले तर निष्कर्ष बदलले जातात. >>>पुराणकाळाबद्दल जिवाश्म आणि डेटिंग प्रणाल्या वापरून काढलेले निष्कर्ष जास्त ग्राह्य असतात पण ते माणसांची नावे अथवा त्यांची प्रत्यक्ष कृती (ज्याला आपण सर्वसाधारणपणे व्यक्तीचा इतिहास म्हणतो) याबद्दल काहीच सांगू शकत नाही. २. तुमच्या 'माणूस प्रवास' सेरिज मध्ये काही ठिकाणी ह्या कथित इतिहासाचा वापर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी झाला असं कुणीसं म्हटलेलं होतं. त्यात कितपत तथ्य? > तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. स्पष्ट संदर्भ दिलात तर काही सांगता येईल. ३. युरोपियन लोकांनी शब्दशः जगावर राज्य केलं. ह्या काळात त्यांनी आपल्या सोयीसाठी इतिहास 'बनवला' असण्याची शक्यता कितपत? > हा प्रश्न तुम्हाला का पडला? हे त्यांनी अनेकदा केले हे तर जगजाहीर सत्य आहे. गोर्‍या रंगाचा वांशिक वरचष्मा हे तर "गोरे असत्य (व्हईट लाय)" जगजाहीर आहेच. ४. संशोधक पूर्णतः कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय (विचारसरणीशिवाय) काम करतात असं मान्य करता येऊ शकतं का? >संशोधक माणुसच असतो. त्याला पूर्वग्रह नसणार हे शक्यच नाही. >>जुन्या काळी जेव्हा संशोधन आणि वैचारीक निष्कर्ष हे काही थोड्या लोकांचाच हक्क होता तेव्हा कंपू बनवून पूर्वग्रहदूषित इतिहास गळी मारण्याचे यशस्वी प्रयत्न झालेले आहेत. गोर्‍या रंगाचा वांशिक वरचष्मा हे त्याचेच उत्तम उदाहरण. >>>मात्र हल्लीच्या काळी जेव्हा एक संशोधन अनेक जणांनी अनेक प्रकारे करून एकाच निष्कर्षाला आल्याशिवाय सर्वमान्य होत नाही. त्यामुळे पूर्वग्रहदुषित / कल्पनाविलासावर आधारलेले संशोधन मान्य होण्यापेक्षा चेष्टेचा विषय बनते... त्यामुळे तसा प्रकार खूप कमी वेळा होतो. याचे हल्लीचे उत्तम उदाहरण म्हणजे हिग्ज बोसान (गॉड पार्टिकल) सारखे संशोधनही फार सावधगिरीने आणि इतर संशोधकांच्या हमीची गरज आहे अश्या पुस्तीसह प्रसिद्ध केले गेले हे आठवत असेलच.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/25/2014 - 17:33 नवीन
>>>तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. स्पष्ट संदर्भ दिलात तर काही सांगता येईल. तुम्ही म्हणालात असं नाही, मला वाटतंय चित्रगुप्त ह्यांनी काही प्रतिसाद टाकले होते. सामाजिक वर्चस्वाचा विचार करुन सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अशा गोष्टी घडवल्या गेल्या होत्या असं काही.... कूक्ड अप स्टोरीज!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/26/2014 - 19:03 नवीन
कोणत्याही प्रकारचे वर्चस्व हे प्रथम मनात निर्माण करायचे असते... मनाने गुलाम झालेल्यांना भौतीक, राजकीय, आर्थिक गुलाम बनवायला फार श्रम पडत नाहीत. गेल्या अनेक शतकांत रुजवलेली "पश्चिमेचे ते सगळे सोने" आणि "आपले ते सगळे माती" ही विचारसरणी किती भारतियांच्या मनातून गेली आहे? योगशास्त्रही भारतिय म्हणून बुरसटलेले होते, पण ते पश्चिमेकडून "योगा" बनून आले तेव्हा कॉन्व्हेंट-शिक्षित हुच्चभ्रू समाजालाही त्याच्यावर सोन्याची झळाळी दिसू लागली. १७-१८ व्या शतकापर्यंत भारत आणि चीन यांचा प्रत्येकी सर्व जगाच्या एक त्रितियांश व्यापारावर कब्जा होतो हा इतिहास आपण कधीच विसरून गेलो आहे. अमेरिकेच्या पहिल्या दोन शतकात तेथे गेलेले युरोपियन्स त्यांच्या राजांच्या जुलूमाला आणि गरीबीला कंटाळून जिवावर उदार होऊन गेले होते हे किती जणांना आठवते? युरोपच्या सम्राटांची आणि अगदी लहानसहान राजांची नावे आठवतात याचे आपल्याला किती कौतूक असते पण भारताच्या इतिहासाच्या अज्ञानाचे दु:ख वाटत नाही. डिसइन्फरमेशन / मिसइन्फर्मेशन कँपेन हे एक फार मोठे मानसिक साधन (सायकॉलॉजीकल टूल) आहे आणि त्याचा उपयोग युद्धकाळात होतो तितकाच (किंबहुना त्यापेक्षा जास्त) शांतताकाळातही होतो. आताही जागतिक आणि भारतिय राजकारणात आपण काय फार वेगळे बघतो आहोत काय?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 01/27/2014 - 09:21 नवीन
प्रश्न विचारण्याचा हेतू सफल झाला. ;) (प्रश्न फक्त तुम्हालाच विचारले असं नव्हतं ते) भारतीय लोक मेंढरांसारखे असतात/ आहेत हा आजचा प्रवाद काही विचारवंत करताना दिसतात. फारसा चुकीचा नाही. पण त्यामागची मनोरचना, समाजरचना, इतिहास सोयिस्कर रित्या विसरला जातो का एवढंच पहायचं होतं. प्रचंड चळवळ्या युरोपियनांनी, अमेरिकेनं जगाला बंदिशाळेत परिवर्तित केलं, आपल्याला सोयिस्कर असे शोध लावले नि अत्यंत बहिर्मुख बनवलं. आज आम्ही भारतीय त्यांचं अंधानुकरण करण्यात कृतकृत्यता मानतो. बाकी कोलंबस महाशय भारताकडंच जाणीवपूर्वक निघाले होते म्हणे. (भय्ये मुंबईला येतात तसंच असावं) असो. कालचक्र सगळ्यालाच नि सगळ्यांनाच उलटं पालटं करतंच म्हणा. अज्ञान, आळस त्याला वेगानं कार्य करायला मदत करत असावेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 01/28/2014 - 08:11 नवीन
माझे २ पैसे. बर्‍याच लिखित गोष्टी इस्लामी आक्रमकांनी केलेल्या जाळपोळीत नष्ट झाल्या असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/25/2014 - 14:25 नवीन
द्वारका आणि कुरुक्षेत्र वगैरेच्या वस्तुंबद्दल एक फिल्म मी डीडी भारतीवर पाहिली आहे म्हणून लिहिले . त्या वस्तु एखाद्या मोठ्या स्वतंत्र संस्कृतीची साक्ष देणाऱ्या असत्या तर लगेच वेगळे संग्रहालय बनवण्यात आले असते . वि . का .राजवाडे यांनी पुराव्यानिशी मराठ्यांचा इतिहास लिहिण्याअगोदर इंग्रजांनी लिहिलेला अंतिम समजला जात होता . जाता जाता : सर्वात जुनी मराठी हस्तलिखिते तामिळनाडूत तंजावूरमध्ये व्यंकोजीच्या सरस्वतिमहालात आहेत .दासबोधसुध्दा आहे .
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 01/27/2014 - 05:41 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्स. चर्चा पण खुपच रंगली. पण मुळ प्रश्न अजुन अनुत्तरीत राहीला आहे. खरोखरच पांडव येवढे बांधकाम करुन गेले आहेत काय? आणि त्याचे पुरावे म्हणुन काही दाखले देता येतिल काय?
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 01/27/2014 - 10:37 नवीन
प्रमोदभाव, उत्तर सोपे आहे. लोकं खोटे बोलु शकतात.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 01/27/2014 - 06:07 नवीन
नशीब आहे हो .. तुमच्या कुठल्या कुठल्या धाग्यांना कित्येक प्रतिसाद मिळतात आणि आम्ही कितीही चांगला विषय घेतला तरी प्रतिसादांची संख्या दोन आकडी होत नाही ! निव्वळ नशिब !! ( अर वो सांबा , ये थानावाले लोग . किस चक्कि का आटा खाते हय रे ?) प्रमोद (पम्या)- कळवा,ठाणे. रच्याकने , तुम्हाला नक्कि काय कळ्वायचं? प्रत्येक प्रतिसादात काय कळ्वण्यासारखं अस्ते ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 01/27/2014 - 12:26 नवीन
तुमच्या कुठल्या कुठल्या धाग्यांना कित्येक प्रतिसाद मिळतात आणि आम्ही कितीही चांगला विषय घेतला तरी प्रतिसादांची संख्या दोन आकडी होत नाही ! निव्वळ नशिब
अहो, थर्मल बाबाने सांगितलेला उपाय करून तर बघा: http://misalpav.com/node/24707 (मिपासुर-मर्दिनी' 'फुत्कार-सर्पिंणी' 'विक्षिप्त-विध्वंसिनी' वगैरे)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 01/27/2014 - 06:52 नवीन
अहो विटेकर काका मी ठाण्याला कळवा येथे राहतो (ठाण्याचे पुढचे रेल्वे स्टेशन). म्हणुन सही नंतर कळवा ठाणे लिहतो. बाकी तुम्ही रोज तुमची ख्याली खुशाली कळवा मला व्य.नी. करुन. मग आपली गट्टी जमली, की भट्टी पण जमवु या. काय? धन्स
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/27/2014 - 09:22 नवीन
बाकी पांडवकालीन वास्तु खरोखरच अस्तित्वात आहेत बरं का ;) रायपूर जिल्ह्यातील राजीम गावात पांडववंशाचा ताम्रपट सापडला आहे. त्यानंतर परत रेवा संस्थानातील बह्मनी गावी याच वंशाचा अजून एक ताम्रपट सापडला. हे राजे गुप्तांचे मांडलिक होते. तर त्यांचा नंतरचा राजा भरतबल हा वाकाटक सम्राट नरेन्द्रसेनाचा मांडलिक. हा नरेन्द्रसेन हा द्वितीय प्रवरसेनाचा मुलगा आणि अर्थात गुप्त सम्राट चंद्रगुप्त (दुसरा) म्हणजेच विक्रमादित्याच्या प्रभावती नामक कन्येचा नातू. यानंतरचे पांडववंशाचे लेख दक्षिण कोसल किंवा छत्तीसगड येथे सापडले आहेत. हा वंश स्वतःला पांडववंशाबरोबरच सोमवंशी पण म्हणवून घेत असे. ह्या राजांनी छत्तीसगडात अनेक पिढ्या राज्य करून अनेक नगरे बसविली, मंदिरे बांधली. ह्यांनी हिंदू धर्माप्रमाणेच बौद्धधर्माला उदार राजाश्रय दिला. त्यांनी बांधलेल्या वास्तू आजही विद्यमान आहेत. अर्थात ह्या पांडवांचा आणि त्या पांडवांचा कै संबंध नै. संदर्भः दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने- प्राचीन भारतातील पांडववंश - म.मो. वा. वि. मिराशी.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 11:08 नवीन
ते छतीसगडमध्ये सिरपूर येथे १८४ एकरात सापडलेले अतिप्रचंड भव्य अवशेष याच राजवटीतले असावेत काय?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा