मूर्तीपूजा
सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा).
देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही.
बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते?
खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार.
आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे.
पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)
हा मुद्दा योग्य आहे पण मूर्तीपूजेच्या संदर्भात उपयोगी नाही कारण प्रत्येक भक्ताला आपण चांगुलपणाच करतोयं असं वाटतं.असहमत. मुर्तीपुजेचा चांगूलपणाशी काय संबंध??? मूर्तीपूजा करणे अथवा न करणे हा केवळ एक बाह्योपचार आहे. ते करण्याने कोणी चांगुलपणा करत नाही अथवा न केल्याने चांगुलपणा करतो अथवा ज्ञानी बनतो असे नाही. माणुसकी असणे किंवा नसणे जास्त महत्वाचे. निसर्ग विविधतेने भरलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एकवाक्यता आणण्यात शक्ती व्यर्थच जाईल कारण निसर्गातील विविधता अनादी आणि अनंत आहे (होती, आहे आणि पुढेही राहीलच)... यांत मानवी विचारांची विविधताही सामील आहे. तेव्हा जगातल्या सगळ्या मानवांचा वैचारीक रोबो बनविण्याची स्वप्ने बघण्यामध्ये (जे आजपर्यंत कोणालाच जमलेले नाही आणि मनुष्याची नैसर्गीक घडण पहाता भविष्यातही जमणार नाही !) शक्ती खर्च करण्याऐवजी, ज्या गोष्टींचा इतरांना उपद्रव होत नाही अश्या गोष्टींबद्दल सहिष्णू राहणे (अॅग्री टू डिसॅग्री अँड कोहॅबिट विथ मुचुअल रिस्पेक्ट) म्हणजे मानवता. या जगात एकच साध्य साधायला मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले असे एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. त्यापैकी आपल्याला भावेल तो पर्याय वापरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे उमजले नाही की अतिरेक सुरू होतो. मुख्य आश्चर्य असे की एकेरी तत्वज्ञानामुळे जगात किती अतिरेकीपणा चालला आहे हे दिसत असूनही मानव आपला अतिरेकी आग्रह सोडायला तयार नसतो हे वारंवार दिसते ! आता हा काय चांगूलपणा झाला काय?