जय परशुराम...जय वामन!!!
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू...
ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.
ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे
पेव फुटलेले आहे
धुळीत बसलेले ते वादळ
पुन्हा उठले आहे.
जिथे पहावे तेथे आमचे
बोर्ड टांगले आहेत.
ज्याला हवे त्या तागडीत
सोइने तोलले आहेत.
जय परशुराम,जय वामन
ह्याच घोषणा आहेत
नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या
हे लोक तयारीत आहेत?
इतिहास/वर्त-मान तपासायची
गरजच संपली आहे
भयगंडाच्या आत धिटाई
हिंसक झाली आहे.
संघटनांच्या बळा'साठी
घटना हव्या आहेत
तोंडात तत्व नैतिकतेची
मनात(मात्र)शिव्या आहेत.
आपले चेहेरे डागाळलेले
कधि दिसणार आहेत?
आणी ते पहायला कुणाच्या हतात
आरसे... असणार आहेत?
''ते'' काहिही म्हणोत परंतू
चिखल माझ्या घरात आहे.
मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या
ऐन...मोसमा/भरात आहे.
===================================================================
💬 प्रतिसाद
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/23/2013 - 11:20
नवीन
>>> आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.
वर्तमानकालातले ब्राह्मण नक्की कोणत्या ऐतिहासिक चुकांची/घोडचुकांची पुनरावृत्ती करत आहेत?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/23/2013 - 18:20
नवीन
@वर्तमानकालातले ब्राह्मण नक्की कोणत्या ऐतिहासिक चुकांची/घोडचुकांची पुनरावृत्ती करत आहेत? >>> अजुनही आपापल्या गोटात चालणार्या चर्चां मध्ये (लहान मुलांदेखत) तथाकथित जातीय गुणांच्या मक्तेदारीची/किंवा नैसर्गिक रित्या ते गुण आपलेच असल्याची भाषा वापरली जाते.
उदा-
१)"अरे...तो काठावर का होइ ना...? पास होणारच,शेवटी ब्राम्हण आहे तो!!!"
२)''अमक्या तमक्या जातीतला(किंवा-मिश्र जातिचा) असून नाव कमवलन हो बेट्यानी... अहो शेवटी आई(किंवा-वडील) ब्राम्हणच आहेत ना!!!''
३)''काय रे ? मुंजिला काय नाही म्हणतोस? ब्राम्हण आहेस की ****?''
४)''नको त्या जातित पोरगी दिलि की जन्माला हे असलच यायचं काहितरी''
या प्रकारची अनेक जातीय संस्करणातली वाक्य आहेत जी आपल्या ब्राम्हण समाजात आजही बोलली जातात...या मागे जात या घटका बद्दलच वैज्ञानिक अज्ञान असो...अगर सर्व माहित असूनही जातिच्या अहंते मुळे हे बोललं जात असो... काळाप्रमाणे भाषा फक्त बदलली आहे... मूळ ऐतिहासिक भुमिका तीच चालू आहे. अजाणतेपणी/गैरसमजानी/अज्ञान/लबाडी...या पैकी कोणत्याही गोष्टीमुळे असेल पण हे आजही ''चालू'' आहे... हे आपण माहित असुनही नाकारणार का? मी हे सर्व माझ्या लहान पणा पासून ऐकतो आहे... या धाग्यात काहि जण असंही म्हणत आहेत,की असले अवगुण प्रत्येक जातीत आहेत... होय..मी ही मान्य करतो आहेत,कारण जातिचा रोग हा हिंन्दु समाजाचा स्थाईभाव आहे... आणी मला जात निर्मूलनाच्या कामात स्वतःच्या जातिवर सकारात्मक टीका...प्रबोधन या गोष्टी आवश्यक वाटतात... हे व्यसनाच्या रोगासारखं
आहे. जो पर्यंत मी व्यसनी आहे.हे मला मान्य होत नाही.मी स्वतःला (व्यसनरुग्ण असल्यामुळे) ''व्यसनी'' म्हणत नाही, आणी त्या अनुषंगानी लोकांनी लावलेले ''बोल'' शांतपणे ऐकत नाही...तोपर्यंत मला त्यातून बाहेर पडायचा ''रस्ता'' हाती लागणार नाही. म्हणून स्वजातीवर टीका/प्रबोधन हे जाति निर्मूलनाचं पहिलं तत्व आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प
Fri, 05/24/2013 - 09:01
नवीन
कारण आपण फक्त ब्राह्मण समाजातिल ईतर कार्यक्षेत्र निवडुन त्यात काम करणारया लोकान्च्या वर्तना बद्दल बोलत आहात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/24/2013 - 09:12
नवीन
वरील वाक्ये तुम्ही नक्की कोणत्या आणि किती ब्राह्मण कुटुंबात ऐकली याची मला कल्पना नाही. पण माझ्या परिचयाच्या, नातेवाईकांच्या व स्वतःच्या कुटुंबात वरील किंवा वरील अर्थाची वाक्ये मी ऐकली नाहीत. त्यामुळे वर्तमानकाळातील ब्राह्मण ऐतिहासिक घोडचुका करत आहेत हा निष्कर्ष तुम्ही किती कुटुंबांच्या अनुभवावरून काढला हे तुम्हालाच ठाऊक.
माझ्या दृष्टीने ब्राह्मणांच्या ऐतिहासिक घोडचुका दोन. त्या म्हणजे अस्पृश्यता व इतर जातींना शिक्षणापासून वंचित ठेवणे. या दोन्ही चुका वर्तमानकालात अस्तित्वात नाहीत. वरील किंवा वरील अर्थाची वाक्ये तुमच्या पाहण्यातल्या काही थोड्या कुटुंबात बोलली गेली असली तरी ती कुटुंबे म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाज नव्हे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 05/24/2013 - 10:21
नवीन
अशी वाक्ये मीही कुठेही ऐकली नाहीत..
खरतर.. ब्राह्मण घरांमध्ये एकंदरीतच जातीद्वेष कमी पाहीलाय मी.. व्रुथा अभिमान तर लांब राहिला.
ब्राहमण आहे म्हणजे संस्कार चांगले असतील, वागणे चांगले असेल, वाचन - संगीताचि आवड असेल असा (संस्कार जे आई वडीलांच्या हातात असतात त्या बद्दल) समज पाहिला आहे. पण ब्राहमण आहे म्हणुन हुषार असेलच, नाव कमावेलच , पैसा मिळवेलच अशा (आपल्या हातात नसलेल्या) गोष्टींबद्दल गैरसमज पाहीले नाहीत.
आणि हे ही पाहिलय की आपण ब्राहमण आहोत ह्याची जाणिव त्या व्यक्तीला असेल वा नसेल , ब्राहमणेतरांना ती जास्त असते. आणि त्या हिशोबाने वागवताना अनुभवलय. अनेकदा ब्राह्मणला अभिमान असल्यापेक्षा इतरांना त्याचं (सुप्त) कौतुक असलेलंही पाहिलं आहे.
अर्थात हे माझे अनुभव आहेत.. मत नाहीत.. आणि हेच सर्व घरांम्मध्ये घडत असेल असा माझा काही समजही नाही.
तुम्ही चे.पु बद्दल जे लिहीत आहात, त्यामध्ये मी सुद्धा मध्यंतरी भरपुर अॅक्टिव्ह होते. तिथे माझेही भरपुर वाद - चर्चा झाली आहे. पण ब्राहमण स्वतःचे कौतुक करताना जेवढे दिसतात त्यापेक्षा जास्त त्यांच्या विरुद्ध लोक गरळ ओकताना दिसतात. (हरामदास असमर्थ.. वगैरे तुम्ही वाचले आहे का?) आता व्रुथा अभिमान बाळगण्यापेक्षा हे जास्त घातक नाही का? खेडेकरांच्या पुस्तकाबद्दल तर लिहायलाच नको. त्यात जे लिहीलं होतं ते मला जास्त भयंकर वाटतं. त्यापुढे "जय परशुराम" आणि "गर्व नाही माज आहे मला ब्राहमण असण्याचा" फारच क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही ब्राहमण लेखकाचे असे एखादे "मारुन टाका", "संपवुन टाका" असे महान संदेश दिलेले पुस्तक पाहीले आहे काय?
स्वजातीचे प्रबोधन ही एक चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही रस्ता चुकलाय असं वाटतय.
आणि तुम्ही हे करत रहाल तोवर (तुम्ही माना अगर न माना) पण तुम्हाला ब्राहमण (= शत्रु) समजुन कोणी हल्ला चढवेल तर प्रबोधन आवश्यक आहे की संरक्षण?
तुम्ही जे आदर्शवादि विचार मांडत आहात ते आदर्श जगातच शोभुन दिसतील जेथे कुणीही कुणाचाही द्वेष करत नाही. पण दुर्दैवाने जग तसे नाही. त्यामुळे अगदी डसला नाही तरि सापाला फुत्कार तरी टाकु द्या...
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/24/2013 - 11:52
नवीन
@ब्राह्मण घरांमध्ये एकंदरीतच जातीद्वेष कमी पाहीलाय मी.. >>> मी जातिव्देषाबद्दल नव्हे,जातियतेबद्दल बोलतो आहे.
@ पण ब्राहमण स्वतःचे कौतुक करताना जेवढे दिसतात त्यापेक्षा जास्त त्यांच्या विरुद्ध लोक गरळ ओकताना दिसतात. (हरामदास असमर्थ.. वगैरे तुम्ही वाचले आहे का?) आता व्रुथा अभिमान बाळगण्यापेक्षा हे जास्त घातक नाही का? खेडेकरांच्या पुस्तकाबद्दल तर लिहायलाच नको. त्यात जे लिहीलं होतं ते मला जास्त भयंकर वाटतं. त्यापुढे "जय परशुराम" आणि "गर्व नाही माज आहे मला ब्राहमण असण्याचा" फारच क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही ब्राहमण लेखकाचे असे एखादे "मारुन टाका", "संपवुन टाका" असे महान संदेश दिलेले पुस्तक पाहीले आहे काय? >>> विरोधी लोक गरळ ओकतात,ते फारच टोकाला गेलेत,ते स्वतः तेव्हढे सज्जन नाहित की त्यांनी अशी टीका करावी..... ''हे'' सर्व मलाही मान्य आहे.पण मी याचा प्रश्ण मांडलेला नाही.या संदर्भात जो वोरोध/खंडन-मंडन करायचं,ते पुन्हा ''तोच-तोच''पणा करून कसं साध्य होइल? यामुळे त्यांना दररोज आपण आरोप करायची नविनवि साधन उपलब्ध करून देत नाही काय? आपल्यातल्या आपल्या धर्मातल्या ज्या वाइट मुल्यांमुळे त्यांना भांडायची ''संधी''/कारणं मिळतात,ती नष्ट करायला हवीत,आणी त्याकरिता ती वाइट आहेत,हे आपल्याला मान्य व्हायला हवं असं माझं मत आहे.
@आणि तुम्ही हे करत रहाल तोवर (तुम्ही माना अगर न माना) पण तुम्हाला ब्राहमण (= शत्रु) समजुन कोणी हल्ला चढवेल तर प्रबोधन आवश्यक आहे की संरक्षण? >>> जागं केल्याबद्दल आभारी आहे... धन्यवाद!!!!!
@पण दुर्दैवाने जग तसे नाही. त्यामुळे अगदी डसला नाही तरि सापाला फुत्कार तरी टाकु द्या...>>> __/\__/\__/\__
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Fri, 05/24/2013 - 10:28
नवीन
१,२,३ एवढ्या टोकाची वाक्ये मी तरी माझ्या ६० वर्षांच्या आयुष्यात ऐकलेली नाहीत.
४. जाती बाहेर मुलगी न देण्याचे प्रकार इतर जातीतही आहेत.
समाज बदलत आहे. अजून बराच कालावधी, कदाचित २-३ पिढ्या (राजकारण्यांनी जातीचे राजकारण करणे सोडून दिल्यास), लागतील मानसिकता बदलायला. जात व्यवस्था टिकून राहावी आणि आपली पोळी व्यवस्थित भाजून घेता यावी अशा विचारांच्या स्वार्थी राजकारण्यांना अभय देऊन इतर बाबींवर चर्चा करणे वेळेचा अपव्यय ठरेल.
मराठा समाजात (माझ्या सासुरवाडीस) मराठा जातीच्या अभिमानाची अनेक वाक्ये कानावर पडली आहेत तसेच ब्राह्मणांच्या हेटाळणीचे सुरही ऐकले आहेत. ९६ कुळी मराठाही इतर जातीच्या (त्यांच्या दृष्टीने खालच्या जातीच्या) लोकांना 'वेगळी' वागणूक पूर्वी तरी द्यायचे. पंगतीला काटकोनात पाट मांडणे ही प्रथा आत्ताआत्ता पर्यंत चालू होती. असे ऐकले आहे. हल्ली रोटी व्यवहार होतात पण 'बेटी' व्यवहार अजून होत नाहीत. म्हणजे ते स्विकारण्याची मानसिकता अजून नाही.
आपल्या जाती बाहेर लग्ने होऊ नयेत असे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक जातीत प्रयत्न असतात.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 05/24/2013 - 12:01
नवीन
श्रीगुरुजी,पिलीयन रायडर, आणि काकाश्री यांच्या प्रतिसादांशी सहमत !
ब्राम्हण पोट जातींमधे जसा दुजाभाव असतो,तसा इतर जातीं मधे देखील असतो,याचे उत्तम इदाहरण पहायचे असेल तर कोणत्याही विवाह नोंदणी कार्यालातील नोंदणी रजिस्टर चाळावीत.
ब्राम्हणांच्या यादीत फक्त कोकणस्थ असे अपेक्षा लिहलेल्या जास्त पहायला मिळतील तर इतर जातीत ९६कुळीच हवा किंवा तत्सम मागणी सहज पहायला मिळेल.
माझ्या माहितीतल्या अनेक कोकणस्थ मुलींनी इतर जातीत विवाह केल्याचे पाहिले आहे.मध्यंतरी जेव्हा कोकण रेल्वेतुन प्रवास केला होता,तेव्हा समोरच बसलेल्या एका जोडप्या बरोबर माझ्या गप्पा चालल्या होत्या,समोरचा व्यक्ती आयटी मधलाच होता त्यामुळे माझी त्याच्याशी बोलता बोलता अनेक विषयांवर चर्चा चालली होती,अचानक त्याने मला विचारले तुम्ही ब्राम्हण आहात का ? क्षणभर मला समजलेच नाही असे का विचारले असेल ! मग त्यांना मी विचारले की हे तुम्हाला कसे कळले,त्यावर त्याने मला उत्तर दिले तुमच्या एकंदर बोलण्यातुन...(संभाषणात कोणतीही जातीय चर्चा नव्हती,आयटी क्षेत्राशी संबंधीतच जास्त होती)मी परत विचारले बोलण्यातुन कसे समजले ?त्यावर त्यांनी उत्तर दिले सर्व शब्दांचे स्पष्ट उच्चार्,आणि माझी बायको ब्राम्हणच आहे त्यामुळे ते पटकन जाणवले !तसेच माझी बायको कोकणातली आहे,कोकणस्थ ब्राम्हण. आमचे ऑफिस मधेच प्रेम जमले आणि लग्न केले.
मी स्वतः कधीच कोणाला त्याच्या जाती संबंधी माहिती विचारत नाही,आणि आडनावा वरुन देखील मला समोरचा कोणत्या जातीचा आहे ते कळत नाही आणि ते कळावे अशी माझी इच्छा देखील कधीच नसते...
पंरतु मी ब्राम्हण आहे असे समोरच्याला माझ्या आडनावावरुन कळल्यावर तिरस्कार युक्त वर्तनाचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.माझे अनेक घनिष्ठ मित्र अब्राम्हण आहेत आणि ते या जगात वेगवेगळ्या देशात असुन सुद्धा आमची मैत्री अजुनही अबाधित आहे.
जाता जाता :--- माणसाने माणसा सारखे वागले तरी पुष्कळ आहे असे मला नेहमी वाटते !
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प
Fri, 05/24/2013 - 12:49
नवीन
तसेच मदनबाण यान्च्याशी सुद्धा सहमत्,तसेच श्रीगुरुजी यान्नी म्हत्ल्याप्रमाणे,जर अस्प्रुष्यता वगैरे जरी त्या काळात हे क्रुत्य जरी ब्राह्म्णानी केले असतील तरि त्या कळात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुद्धा सर्वप्रथम ब्राह्मणानीच केला.त्या साठी सन्त एक्नाथान्चे नाव प्रथम घेतले जाते.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/24/2013 - 14:08
नवीन
एका मित्राच्या घरी वास्तुशांत होती. सहज म्हणून मी विचारलं की मी त्यादिवशी घरीच आहे मदत वैगरे हवी असली तर सांग. सगळं ब्राम्हणांनीच करायचंय, तू नको येऊस मदतीला. यावर शेजारी उभ्या माझ्या कोब्रा मैत्रिणीने त्याला चार शब्द ऐकवावे अशी अपेक्षा होती माझी, पण तिने फक्त एक स्माईल दिली. ग्रूपमधल्या कोणीही त्याची कानउघडणी केली नाही. वेळ मारुन न्यायची म्हणून वास्तुशांतीला हजेरी लावली मी, पण आता पुन्हा त्या घरी गेलो की मला ते शब्द आठवतात.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 05/24/2013 - 16:01
नवीन
हे असं अपेक्षित आहे बरोबर? नैतर वाचून कन्फ्यूज होतंय.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/24/2013 - 16:56
नवीन
कर्रेक्ट !!
- Log in or register to post comments
ज
जे.जे.
Fri, 05/24/2013 - 18:54
नवीन
येथे तुमचा गैर समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यान्ची वास्तुशांतीची पुर्व तयारी कदाचीत आधिच झालि असेल आणि वास्तुशांती चे सकाळचे विधि / मन्त्र पठण - जे फक्त भटजीन्निच करायचे असतात - त्याबद्दल ते बोलत असावेत. काहि लोक भटजीन्ना ब्राम्हण म्हणतात - यावरुन तुमची कदाचित गल्लत झालि असणार.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/24/2013 - 19:38
नवीन
मलाही तसंच वाटलं होतं की गैरसमज तर झाला नाही ना माझा, पण गैरसमजाला जागाच नव्हती. ते लोक घरीच स्वयंपाक करणार होते येणार्यांसाठी आणि त्यासाठी स्वयंपाकाला किंवा पंगतीत वाढायला मदतीला कोण कोण येणार यावर चर्चा चालू होती. बरं एक विचार असा केला की सोवळ्यात असेल सगळं, पण ज्याच्याकडे वास्तुशांत होती तो स्वत:सुद्धा काही ब्राम्हण नव्हता. मग अशी कमेंट यायला कारण काय हे कळायला काही मार्ग नव्हता. विसरलो होतो, आता विषय निघाला तेव्हा पटकन आठवलं.
- Log in or register to post comments
अ
अमोल खरे
Sat, 05/25/2013 - 17:09
नवीन
>>पण ज्याच्याकडे वास्तुशांत होती तो स्वत:सुद्धा काही ब्राम्हण नव्हता.
मग ब्राम्हणांना नावं कशाला ठेवताय. तो जो नॉन ब्राम्हण मित्र होता त्याच्या जातीला ठेवा वाटल्यास. सोप्प आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Sun, 05/26/2013 - 20:30
नवीन
मग ब्राम्हणांना नावं कशाला ठेवताय. तो जो नॉन ब्राम्हण मित्र होता त्याच्या जातीला ठेवा वाटल्यास. सोप्प आहे.
मी यात ब्राम्हणांना कुठे नावं ठेवलीयेत सांगाल का? कोणी त्याला सुनवावं अशी अपेक्षा मी केली असेल तर ती मैत्रीच्या नात्याने केली होती. मैत्रीण कोब्रा होती हे लिहीलं गेलं म्हणून तेवढंच तुम्हाला झोंबलं असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
- Log in or register to post comments
अ
अमोल खरे
Tue, 05/28/2013 - 06:24
नवीन
एक मिनिट कशाला, दोन मिनिटे घे चल. मुद्दा एवढाच आहे की तु आणि जो मुलगा तुला बोलला ते दोघे अब्राम्हण. तो जे बोलला ते तुला नाही आवडलं, पण तुला ते त्याला सांगायची / तुझ्या भाषेत "सुनवायची" हिंमत नाही. त्यासाठी तुला मदत हवी एका ब्राम्हणाची. दोन जण बोलत असताना (ह्या केस मध्ये तुम्ही दोघे), तिस-याने (म्हणजे तुझ्या ग्रुप मधल्या ब्राम्हण मुलीने) मध्ये बोलायचं नसतं हा सिंपल एटिकेट आहे. कितीही मैत्री असली तरी हा एटिकेट नेहेमीच पाळला जातो, विशेषतः धार्मिक बाबतीत. तुला इतकंही माहित नाही हे नवल आहे. परत ती मुलगी म्हणजे काही पुरोहित नाही जी अधिकाराने काही बोलु शकेल. असो. माझा मुद्दा शांतपणे लक्षात घेऊन विचार कर. आणि आणखीन एक गोष्ट. मिपावर आणि आजुबाजुलाही माझे अनेक अब्राम्हण मित्र आहेत. मी कोणालाही जात विचारत नाही. पण कोणी ओढुन ताणुन माझ्या जातीवर टिका केली तर मी गप्प पण बसणार नाही. ह्या चर्चेला माझ्याकडुन इथेच पुर्णविराम.
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 05/29/2013 - 10:08
नवीन
यप्प
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
गुरुवार, 05/23/2013 - 11:42
नवीन
मला एक कळत नाही, जर तुम्ही या ब्राह्मण्/ब्राह्मणेतर वादाच्या कुठल्याच पक्षात नाही आहात, तर अशा विनाकारण चर्चा करायचं कारण काय?
आपण जातींवरुन बोलायचं नाही हे तत्व आपल्यापुरतं. या बाबतीत जग आपण बदलू शकत नाही. मग अशा चर्चा चालू करुन पुरोगामित्वाचा आव का आणावा?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/23/2013 - 18:15
नवीन
@जर तुम्ही या ब्राह्मण्/ब्राह्मणेतर वादाच्या कुठल्याच पक्षात नाही आहात, तर अशा विनाकारण चर्चा करायचं कारण काय?>>> अगदी बरोब्बर!!! मी या दोन्ही पक्षात नाही...! माझा पक्ष सावरकरांनी सांगितलेला ''हिंन्दू जाती'' होण्याचा पक्ष... किंवा भारतीय संविधानानी सांगितलेला ''भारतीय'' होण्याचा पक्ष... मला सरकारी-सामाजिक नियमांमुळे जन्म-जात ''लावावी'' लागत असली तरीही मनानी/आचरणात मी हिंन्दू किंवा भारतीय म्हणुनच जगणार...वागणार!!! हा माझा खरा पक्ष. :)
@आपण जातींवरुन बोलायचं नाही हे तत्व आपल्यापुरतं. या बाबतीत जग आपण बदलू शकत नाही.>>> मी तेच तर म्हणतोय ना... ''आपण'' जग बदलायचच नाही...आपण स्वत:लाच बदलायचं,आपले सामाजिक दोष/चुका समजुन घेऊन मान्य करून मनानी..आचारानी जातिविहिन व्हायचं आणी आजच्या काळाला उपकारक असणार्या मानवतावादी मुल्य शिकवणार्या सावरकरी ''हिन्दूजातीत'' किंवा भारतीय संविधानानी दिलेल्या ''भारतीय'' या जातीत रुपांतरीत व्हायचं... यासाठीच मी कवितेच्या शेवटुन दुसर्या कडव्यात ''आपला चेहेरा पाहण्यासाठी आरसा'' असं रुपक वापरलेलं आहे.
@मग अशा चर्चा चालू करुन पुरोगामित्वाचा आव का आणावा? >>> मी पुरोगामित्वाचा आव बिल्कुल आणलेला नाही...मी मनानी/आचारानी पुरोगामीच आहे. आपण हा निष्कर्ष कश्याच्या आधारे काढलात...मला अंदाज येत नाही.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
गुरुवार, 05/23/2013 - 20:47
नवीन
मूळ लेखातील
मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.
आणि प्रतिसादातील
मला सरकारी-सामाजिक नियमांमुळे जन्म-जात ''लावावी'' लागत असली तरीही मनानी/आचरणात मी हिंन्दू किंवा भारतीय म्हणुनच जगणार...वागणार!!!
हे मला जरा विसंगत वाटले. कारण तुम्हाला जरी जात 'लावावी' लागत असली तरी तुम्ही त्या समाजाचा एक घटक म्हणून बोलत आहात. ब्राह्मण समाजाचा घटक म्हणून या गोष्टीकडे पाहणे हे एका अर्थी आत्मनिरीक्षण झाले. ते इथे जाहीरपणे मांडावेसे का वाटावे हे मला कळले नाही. जर तुम्ही जात मनातून काढून टाकली असेल तर 'मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो' हा उल्लेख का हे नाही समजले.
मला तुमच्या लेखात 'मी ब्राह्मण आहे आणि तरी मी हा असा विचार करतो' असा एक टोन कुठेतरी जाणवला. त्यामुळे मला त्यात मांडलेले विचार पूर्णतया निरपेक्ष वाटले नाहीत; पण त्यात पुरोगामी निरपेक्षता दाखवण्याचा प्रयत्न फार वाटला. म्हणून मी 'पुरोगामित्वाचा आव' असा शब्दप्रयोग केला. अर्थात ही फक्त माझी समज आहे.
वैयक्तिकरित्या तुमची आणि माझी मते बरीचशी सारखीही असू शकतात. पण ते जाहीर व्यासपीठावर मांडून काय साध्य करायचं होतं ते कळलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/24/2013 - 11:54
नवीन
@वैयक्तिकरित्या तुमची आणि माझी मते बरीचशी सारखीही असू शकतात. पण ते जाहीर व्यासपीठावर मांडून काय साध्य करायचं होतं ते कळलं नाही.>>> असो!!!!!
- Log in or register to post comments
र
रानी १३
गुरुवार, 05/23/2013 - 12:09
नवीन
बुवानी फक्त विड्बन पाडावीत....... बाकी सुज्ञास सान्गनी न लगे.....
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/23/2013 - 18:13
नवीन
@बुवानी फक्त विड्बन पाडावीत....... बाकी सुज्ञास सान्गनी न लगे.....>>>आपली अपेक्षा कळली...धन्यवाद! :)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 05/23/2013 - 14:23
नवीन
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/23/2013 - 18:24
नवीन
@काय बोलणार ?
चौकटराजा ->>> चौ.रा.काका बोला हो.....! राग आला माझ्या लेखनाचा तर चार हाणा बिंधास! :)
पण मनात काहि ठेऊ नका...बोला,,, अहो इथे नाही बोलणार तर कुठे मग? :)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 05/24/2013 - 16:26
नवीन
तांत्रिक कारणामुळे तर्री मिसळीत पडली नाही त्यामुळे फकस्त काय बोलणार असा मथळा आला.
बाकी आम्हाला चित्पावन असण्याचा , मराठी असण्याचा, भारतीय असण्याचा अभिमान वगैरे आहे. आम्ही आंतरजातीय (?) विवाह् केला .( देशस्थ मुलीशी ) त्यातून आमच्या " चित मधले वाईट गुण कळले व आम्ही कोठे पेशल आहोत हे ही उमगले.या विवाहातून काही शिकायला मिळाले. ब्राह्मणात टोकाचे लोक आहेत. तसेच ते ब्राह्मण नसलेल्यामधेही आहेत. आमचा द्वेष कसा केला जातो. व काही प्रमाणात आदरही. याचा अनुभव लहानपणापासून आलेला आहे.आता स्वातंत्र्यानंतर आमचा द्वेष करण्याची, त्यासाठी २००० वर्षाचा इतिहास उकरून गरळ ओकण्याची फॅशन व पॅशन निर्माण झाली आहे.आमच्या लहानपणी सर्रास उल्लेखिलेली जात असलेली भुतयोनी आता नाश पावली आहे.( अत्रुप्त आत्म्याची ऐशी तैशी झाली आहे ) काही काळ लोटला की धर्म जात याना अंगठ्याने पाणी देण्यासाठी लोक सरसावतील.कदाचित त राष्ट्र ही कल्पनाही मोडीत निघेल. शेवटी सगुण साकार देवाचा नम्बर लागेल.किती काळ लागेल याला हे सांगता येत नाही.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 05/24/2013 - 18:11
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 05/24/2013 - 05:26
नवीन
हा घ्या वामन
आणि हा घ्या परशुराम :)

- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/24/2013 - 05:52
नवीन
:-)
- Log in or register to post comments
उ
उद्दाम
Wed, 05/29/2013 - 09:26
नवीन
वामनाचा पाय गुढग्यात वाकत नव्हता काय?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 05/29/2013 - 09:32
नवीन
=)) =)) =))
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2013 - 09:45
नवीन
रशियन सैनिकांची परेड पाहिली आहे का ? वामन रशियन असावा असा दाट संशय येतोय. नाहितरी इंद्राने बळिचा काटा स्वतः न काढता राज्याबाहेरच्या शक्तीला (वामनाला) बोलावूनच काढला होता. त्यामुळे त्याकाळी आपला स्वर्गलोक रशियाच्या जागी होता असे म्हणून आपण रशियावर हल्लेखोरीचा आरोप करायला हरकत नाही. आपल्या पार्टीची मत वाढवायला छान आयडिया आहे. बोला, उद्याच्या मोर्चाला कोणकोण येणार ? +D
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 05/29/2013 - 10:09
नवीन
बरोबर आहे, आर्य नाहीतरी बाहेरूनच आलेले होते ;)
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Fri, 05/24/2013 - 11:59
नवीन
बुवा आज हात लय दुखत असल नाय…टायपून टायपून :))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 05/24/2013 - 12:05
नवीन
@टायपून टायपून>>> =)) अच्रत...हल्कत...बव्लत.... =))
- Log in or register to post comments
अ
अशोक पतिल
Fri, 05/24/2013 - 17:42
नवीन
ब्राह्मण असो वा अन्य कोनतीहि जात, चागल्या व वाइट गोष्टी या असताततच. ब्राह्मणांमध्ये अनुसरणीय बाबी या जास्त प्रमाणात आहेत हे निशंषंनीय! ब्राह्मण घरात लहानपनापासुन मुलांना जे सस्कांर होतात ते अन्य जातिही अनुकरन करतात.अपवाद म्ह्णुन काही ब्राह्मण हे व्यसनी, मांसाहारी वा अन्य विकारी जरी असले तरी हे प्रमाण अजुनही नग्यणच म्हनावे लागेल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 05/24/2013 - 20:13
नवीन
मांसाहाराला व्यसन आणि विकाराच्या पंगतीत बसवलेले पाहून छातीत एक कळ आली, आणि (कोंबडीसोबतची गिरवी तिखट लागल्याने) डोळे पाणावले.
(कट्टर नॉनव्हेजप्रेमी खा'मण'(भरून)) बॅटमॅन.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 05/27/2013 - 07:21
नवीन
तात्काळ निषेधाचा धागा उघडावा…किंवा सामिष धागे वर आणावेत
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 05/27/2013 - 08:05
नवीन
निषेध म्हणुन आज आम्ही एका कोंबडीचे बलिदान द्यायच्या निश्चय केला आहे .
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Mon, 05/27/2013 - 13:07
नवीन
बॅटमॅन
आपण मांसाहार करतो अशी जाहीरात करणार्या जातीतले आय मीन कॅटेगरीमधेले आपण दिसता.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 05/27/2013 - 13:10
नवीन
मांसाहाराची जाहिरात नाही पण फालतू बिनबुडाच्या कारणांसाठी मांसाहाराचा विरोध करणे आणि त्याला व्यसनाच्या पंगतीला बसवणे या मूर्खागमनीपणाचा मी निषेध करतो. आणि या निषेधाची जाहिरातही करतो. येणी पिराब्ळेम?
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 05/27/2013 - 13:17
नवीन
का नाही बॅट्या? त्या कम्बख्त* लोकांना खाद्यविश्वातला उरलेला ७५% आनंद मिळवून द्यायचा असेल तर जनहितार्थ मांसाहाराची जाहिरात करावीच असं माझं मत आहे. ही पहा हल्लीच फस्त केलेली सुरमई थाळी:
मी मांसाहार करतो. मला त्याचा अभिमान आहे आणि त्या तांबड्या रश्श्याचा भुरका माझ्या समस्त शाकाहारी बंधुभगिनींनी मारावा आणि मोक्ष मिळवावा अशी माझी मनापासून इच्छा आहे असं उंच मानेने म्हणत जा.
* तळटीपः कम्बख्त हा शब्द शाकाहारींना अपशब्द म्हणून वापरण्याचा उद्देश नसून "हाय कंबख्त तूने पीही नही" मधला संदर्भ आहे. हो शब्दात सेफ असावे नेहमी.. :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 05/27/2013 - 13:20
नवीन
ओक्के गविशेठ, तुमच्यासाठी कायपण! मांसाहाराची जाहिरातपण ;)
गर्व से कहो हम मांसाहारी हैं ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 05/27/2013 - 13:43
नवीन
@गर्व से कहो हम मांसाहारी हैं >>> 
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2013 - 09:52
नवीन
काडीच टाकायची होती तर जरा स्वच्छ शुद्ध भाषेत टाकायची होती. अशा अशुद्ध भाषेच्या भिजलेल्या काडीने मस्तपैकी भडका उडण्याची शक्यता फार कमी आहे
+D
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 05/24/2013 - 19:41
नवीन
"सी"ग्रेडी लोकांकडुन ब्राम्हणद्वेश सोडुन अजुन काय अपेक्षा करणार??
दिवस उगवला, ब्राम्हणांना चार शिव्या दिल्या की झालं काम. प्रोडक्टीव कामाच्या नावानी बोंबा-बोंब.
साला, सर्व जाती-धर्मांना, स्त्रियांना शिक्षणाची समान संधी मिळवुन देणारे कोण होते हो? ब्राम्हणच होते ना ते? का "सी"ग्रेडी लोकं आली होती ह्या चांगल्या कामाची सुरुवात करायला?
ज्यानी त्यानी आपापल्या जाती-धर्माचा अभिमान जरुर बाळगावा, पण त्याचा दुसर्याला त्रास होऊ देऊ नये म्हणजे झालं.
साला, कर्तुत्वाला मान द्यायला शिका की जरा जात-पात नं विचारात घेता.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Fri, 05/24/2013 - 20:28
नवीन
अजुन शंभरी भरली नाही का ? अरेरे, एक मुळ लेख आणि त्यापेक्षा मोठे दोन प्रतिसाद वाया गेले. असो, बुवा तब्येत कशी आहे आता ?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 05/24/2013 - 20:42
नवीन
कालः फार वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान होतो, तेव्हा माझ्या पिढीच्या आवडीचे विषय वेगळे होते. वर्तमानपत्रात येणारी गावसकर, सुभाष चंद्र बोस इत्यादी थोरांच्या चित्रांची कात्रणे काढून ती वहीत डकवणे हा त्यातलाच एक प्रकार. एका वर्तमान पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय सुंदर चित्र आलं होतं. त्यांच्यावर शाळेत एक धडा होता आणि ते महान होते हे मी ऐकलं होतं. बाकीचं समजायचं ते वय नव्हतं. मी ते कापलं आणि एका पुठ्ठ्यावर डकवून त्याचा एक फोटो तयार केला. तो मग आमच्या रेडियोवर ठेवून दिला. माझ्या आई वडीलांनी ते पाहीलं आणि ते अवघडले (मला हे आत्ता सुद्धा स्वच्छ आठवतंय). तो फोटो तिथे ठेवू नये असं त्यांनी मला समजावून पाहीलं. पण 'का' या माझ्या प्रश्णाला ते उत्तर देवू शकले नाहीत. मग तो फोटो तिथेच राहीला. त्यातले बाबासाहेब हे प्रेमळ दिसायचे किंवा तसं मला वाटायचं. बरेच दिवस किंवा वर्षे तो तिथेच असावा. गांधीजी, नेहरू, आंबेडकर, शिवाजी महाराज हे लोकोत्तर महान पुरुष होते असं ठाम मत असण्याचं ते वय होतं. हाच प्रकार एका बुद्धाच्या कपाटावर चिकटायच्या मॅग्नेटीक बिल्ल्या बद्दल.
आजः श्री. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्ती बद्दल मला आदर जरूर वाटतो, पण आत्मियता वाटत नाही. आरक्षणाच्या राजकारणाने बाकी काही झाले असेल न झाले असेल, मी माझ्या जातीचा कडवा समर्थक बनलो आहे. मला त्यांच्या बद्दल किंवा महात्मा फुलेंबद्दल आत्मियता वाटली ही असती, पण महामूर्ख बहुजन नेत्यांनी नव-समाजाला सुद्धा विभागण्याचं काम केलय आणि आपली ओळख आता जास्तच जातीनिहाय बनत चालली आहे. त्यामुळे जे ब्राह्मण पुरोगामी विचारांचं समर्थन करतात, ते माझ्या मते चुकतायत. हा समाज कधीही जात विसरू शकत नाही तर स्वत्:ची जातहत्या करून काय फायदा?
ता.क. सध्या माझ्या घरात कुठेही बाबासाहेब, किंवा शिवाजी महाराजांचा फोटो नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 05/24/2013 - 21:01
नवीन
>>>
अगदी अगदी हेच माझ्या मनात आहे !!
ह्या धाग्याच्या निमित्ताने काही समविचारी माणसे भेटली ...भारी वाटले !!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »