Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

AREA 51 to Nageshware

भटकंती

AREA 51 to Nageshware

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

नावात्_काय्_आहे
Wed, 12/26/2012 - 10:41

नागेश्वर ट्रेक
“ trek “ ह्या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे ? नाही ना पटकन आठवत आहे , मला पण नाही आठवल . जिसका कोई नाही , उसका google होता है यारो . असा म्हणून मी पटकन " google “ वर search मारला , आणि आपण किती इंग्लिशळेलो आहे , याची जाणीव झाली .असो , ट्रेक चा मराठी अर्थ 'अवघड प्रवास' असा काही तरी search result मध्ये आल .तसा तो अर्थ , मला काही पटला नाही . कारण त्या अनुशंगाने जीवनालाही ट्रेक म्हणावं लागेल .
आता ह्या विषयावर मी जास्त चकटफू सल्ले न देतो सरळ आपलं भटकंतीच्या वर्णनावर येतो .
साधारणतः भीमाशंकरचा ट्रेक जेव्हा चालू होता , त्या वेळेसचं ' वासोटा ' ट्रेक करायचा हा विचार चालू झाला . ५ डिसेंबरला आमची १ छोटेखानी मीटिंग झाली , आणि वासोटा ट्रेक with night hault .असा प्लान झाला .
त्या नन्तर परत शुक्रवारी ०७ डिसेंबरला परत भेटलो ,कोण येणार ,अंदाजे खर्च ,जायचं कस सर्वांचा आराखडा आखण्यात आला . या ट्रेकचा "headcount” ठरवण्यात आला तो ७ .जास्त डोकी headache वाढवतात , नि संख्या वाढली कि ट्रेकिंगचा " feel “ जाऊन ट्रेकिंग'चा 'घो' होतो. तर असा टाळण्याजोग्या गोष्टी आम्ही टाळल्या .
त्यातच अशी माहिती आली कि , नागेश्वारला राहायची परवानगी मिळत नाही . वासोटा - नागेश्वर (रात्रीचा थांबा ) - चोरवड हा थांबण्याचा प्लान बोंबलला. त्यानंतर वासोटा - नागेश्वर – back to pune असा प्लान कागदावरती तयार झाला . ७ सदस्य final झाले . शनिवार जायचे निश्चित झाले .धीरज ,समीर ,भरत ,भूषण , तुषार ,प्रतीक नि प्रतिकचा मित्र . जेवणाची सोय प्रत्येकानी आपापली करायची असे हि ठरले . आणि " तकालीया " म्हणून मीटिंग बरखास्त झाली .
पण हा हि प्लान फिस्कटला, त्याची कारणे पुढील प्रमाणे .

१. शुक्रवारी दिनांक १४ /१२/२०१२ या शुभ मुहूर्तावर , कंपनीने ( राम गोपाल वर्माची नाही ) सर्वसाधारण वार्षिक पार्टी ठवली होती . “ AREA 51 “ येथे साम्ग्रसंगीताची सोय , अधिक नृत्यास परवानगी + नि फुकट मदिरापान पण असल्यामुळे , कंपनीचे मन आम्हाला मोडवेना आणि आलेला थकवा थोडक्यात Hangover ,“over“ करण्यासाठी शनिवार पाहिजे होता .त्यामुळे त्यासाठी शनिवार निघणे थोडे कठीणच होते .

२.शनिवार रात्री निघायचं हा प्लान ठरला , पण …....
प्रतीक was invited for party . :P.
असो झाकली मुठ सव्वा लाखाची . त्या नंतर रविवारी पहाटे शार्प ५ वाजता पुण्यातून निघायचे ठरलं .
गाडीची अरेंजमेंट हि arrange marriage इतकीच कठीण आहे . पण समीरने ते बरोबर अरेंज केल .

शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ( ठिकाण : 'AREA 51' )
पार्टीत आम्हाला परत १ कदा ५ मिनटात आढावा घायचा होता .
मी नि माझा १मित्र पार्टीत साधारण ८.३० वाजता पोहचलो . Area 51 हा आमच्यासाठी गूढ ,अगम्य प्रदेश होता . मनगटावर डिस्कोचा शिक्का उमटवून , मानगुटीवरचे डिस्कचे भूत उतरवायला
आम्ही शिरलो . पार्ट्यानमधल्या पोरी पाहून ,ह्या पोरी आपल्याच ऑफिसमधल्या का ? कि ऑफिस मध्ये ह्याच पोरी असतात का ? असले प्रश्न पडले आणि त्यांना पाहून जगात चमत्कार घडतात यावर माझा विश्वास बसला .
पार्टीत जो गोंधळ घालायचा तो घातला . फक्त समीरचं कौतुक वाटल , सवाई गंधर्वला हजेरी लावून तो डिस्क मध्ये आलेला होता .मेहफिलीच्या रागापासून ते डिस्क च्या बिट्स पर्यंत ,या सर्वां साठी १ मुक्त नि कलात्मक मनाची गरज असते .
त्या वेळेस सुरेश भटांची १ ओळ आठवली .

“ रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा , गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा "

पार्टीचा रंग उधळून आम्ही घरी आलो

शनिवार दिनांक १५ डिसेंबर
फोनाफोनी झाली , सकाळी ४.१५ वाजता मला कोथरूड वरून पिक अप करणर होते. ५ वाजता पुणे सोडायचं ठरलं .
रात्री भरत माझ्याकडेच आला ,आणि लग्न नि पोरी या विषयावर बोलता बोलता रात्रीचा १ कधी वाजला ? कळलाच नाही .तसा हा न संपणारा विषय .सगळ्यांच सर्वज्ञात असलेला विषय .सकाळी ३.४५ गजर लावून झोपी गेलो .

रविवार दिनांक १६ डिसेंबर
सकाळचे प्रातः विधी आटपून तयार झालो . त्यावेळेस घडल्यात बरोबर ४.३० वाजले होते .
समीर नि भूषण ला कॅाल करून झालेत . आणि गाडी बरोबर ठरल्याप्रमाणे ५.१५ वाजता ४५ मिनिटे उशिरा आली .
मग तुषारला just सातारा रोडवरच फक्त ४ km आतून कोंढव्या वरून गाडीत घातलं नि निघालो .
( मी व्याकारणाचा गळा घोटला आहे , माहित आहे पण …..)

त्यानंतर बरोबर ०६.०५ मिनिटांनी पुणे सोडले .
फुटकळ विनोद झाले , चहा झाला , एकमेकांचे पाय ओढून झाले , आणि मध्ये बायोब्रेकहि झाला.

गाडीने सातारा सोडलं नि आम्ही कास पाठराकडे निघालो .
कास पठारावर ना फुल ना पान , सगळा कास पठार शुष्क पडलेला.
सगळी कडे कुंपण बांधलेली . काही महिन्यांनपूर्वी फुलांनी बहररेला , माणसांनी गजबजलेला अशा पठारावर आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आमचे हि कॅमेरे बॅगेतच होते. सौंदर्य हे चिरकालीन नाही , आणि सौंदर्यासाठी येणारे पण कायम साथ देत नाही हेच खरे .
त्यानंतर १५ वीस मिनटातचं आम्ही बामणोली ला पाहोचालो .

बामणोली म्हणजे " base village for Vasota trek “.
साताऱ्यापासून ३८ किलोमीटर वर .
मला तसे कांदे पोहे खायचे होते , त्या वरून जरा फिरकी पण घेतली गेली .
पण कांदे पोह्यांची भूक मिसळवर भागवली .
वासोट्याला जाण्यासाठी , बामणोलीला वन खात्याची परवानगी घ्यावी लागते .
परवानगी घेण्यासाठी तुषार नि समीर रवाना झाले .
परवाना सरकारी खात्यात (न खाता/पिता ) मिळणं , हा कलीयुगातला चमत्कार म्हणव लागेल .
असो परवानगी साठी खालील गोष्टी लागल्यात .
१. प्रत्येक माणसासाठी प्रवेश फी :- रुपये ३० ( ३० * ७ = २१० )
२. बोटीची प्रवेश फी :- रुपये १५०
३. कॅमेरा फी :- ४० रुपये /कॅमेरा (४०*४ =१६०)
४. pan कार्ड ,ओळखीच्या किंवा नात्यातल्या लोकांचे नंबर.
आणि त्या व्यतिरिक्त ३००० रुपये बोटीचे .
आमच्या ६ लोकां व्यतिरिक्त , नाही हो नाही नि परत हो करत आमच्या गाडीचा ड्रायव्हरपण आला .
कॅमेरे निघाले , कोणी कॅमेराच्या पुढे तर कोणी कॅमेराच्या मागे .
बोट येई पर्यंत १०.३० वाजले . बोटीत बसलो . आम्ही फक्त बोटीत ८ लोक , ६ आम्ही + १ आमच्या गाडीचा ड्रायव्हर + १ बोटीचा ड्रायव्हर .
पाणी किती खोल , कोणाला पोहता येत /येत नाही , किती वेळ लागतो असे नेहमीचेच प्रश्न त्या नावाड़‌‍याला विचारून घेतले . जाताना एका ठिकाणी त्रिवेणी संगम आहे ,असं तो म्हंटल खरा , पण कोयना back water मध्ये त्रिवेणी संगम , काही झेपलं नाही . काही न झेपलेले प्रश्न सोडून दिलेले बरे , त्याने वाद टाळता येतो , हे अनुभवाने आलेले शहाणपण आहे .जवळपास ११.४० ला आमची बोट किनाऱ्याला लागली . तिथे पाण्यात जळू आहे हे समजलं. महाराष्ट्रात जळू नाहीsss !.अशी काहीशी माझी प्रतीक्रिया होती . आणि माझ्या ( अति) शहाणपणाची झालर गळून पडली .
हं त्यानंतर , घेतलेली परवानगी चौकीवर दाखवून , आम्ही जंगलात शिरलो . साधारण घडाळ्यात ११.४५ किंवा १२ वाजले असतील .जंगल दाट होते .दुपार असून सुद्धा गर्द झाडीमुळे उन्ह भासत नव्हते.
रस्त्यात ओहळ लागलेत , पावसाळ्यात नक्कीच ते ओढे असावेत .
अशाच १ का ठिकाणी १ छोटस मंदिर होत . हनुमान आणि गणपतीचे . ४ हि बाजूला २ फुटाची दगड ठेवून बनवलेली भिंत आणि छत नसलेले . कदाचित म्हणूनच झाडवेलींचे छत त्याच्या डोक्यावर असेल . मग पुन्हा कॅमेरात आणि मनात ते क्षण टिपून पुढचा प्रवास चालू झाला . कुठे तरी झाडत हळद्या पक्ष्याचा आवाज एकू आला . त्याची छबी कॅमेरात टिपण्याचा अयशश्वी प्रयत्न हि झाला.आता वाट जर खडतर ,चढण असलेली झाली होती आणि बॅग जड असल्यामुळे जर थकवा पण लागत होता .
१ गोष्ट चांगली होती चढताना , जोगो जागी दिशा दर्शवणारे फलक होते . एक सव्वा तास झाल्यावर आम्ही एका ठिकाणी थांबलो . मी तर जाम थकलो होतो . जरा आराम करून ,glukon D पिऊन बर वाटल. तिथून २ रस्ते होते , १ वासोटा किल्ल्याकडे जात होता नि २ रा नागेश्वर , नि एकमताने आम्ही नागेश्वरचा रस्ता धरला . माझ्या खांद्यावरची जवाबदारी तुषारने त्याच्या खांद्यावर घेतली . म्हणजे माझी बॅग त्याने घेतली . आणि मी मस्त चालू लागलो , ते हि सर्वात पुढे . आम्ही सलग १ तास चालत होतो , आणि झाडीतून बाहेर आल्यवर लक्षात आले , आम्ही डोंगराच्या माथ्यावर होतो . समोर डोंगरांची रांग , खोल दरी आणि दूर नागेश्वरची गुफा दिसत होती .

डोंगराच्या कडेकडेने जात दुसऱ्या डोंगरावर नागेश्वरच्या इथे जायचे होते . डाव्या हाताला दरी नि उजव्या हाताला पर्वत ,अगदी डोळे गरगरतील असं दृश्य . चालत चालत १दाच आम्ही २.३० वाजता नागेश्वारला पाहोचलो.दुपारच्या उन्हात पण मस्त थंड वाटत होतं त्यात वार हि होते . परत कॅमेरात ते क्षण टिपून जेवयला बसलो . मेथीचे पराठे , टोमटो सॅास , चटणी ..मस्त जेवण झाल . काही जणांनी दुपारची वाम कुशी पण घेतली . एवढ्या शांततेचा भंग करणारी १च गोष्ट होती , ते म्हणजे आमच्या ड्रायव्हरचं घोरण .

त्यानंतर परतीचा प्रवास चालू झाला . थोडा रस्ता हि चुकलो ,पण परत वाटेवर आलो . ( तस हे आम्हाला जीवनात नि ट्रेकवर सवयीचे झाले आहे ) . माझा पाय मुरगळा , तरीसुधा उसन अवसान आणून , मी किती इ 'strong' आहे हे दाखवत मी चालत होतो . पण शेवटी relief spry मारूनच घेतला. काही लोक थकले होते पण चालत होते .उतार असूनसुद्धा वेळ लागत होता , पाय थकले होते नि मन हि असेल .

परत १दा हळद्या पक्षाचा आवाज आला , जागा हि तीच होती . संध्याकाळ होता होता आम्ही परत नावेपाशी आलो . घडाळ्यात ५.३० वाजले होते. ताक पिऊन परत होडीवर(मध्ये) ( जे काही असेल ते ) बसलो . आमचं सोबत १ मावशी पण होत्या ,त्याच त्या ' ताक ' विकणाऱ्या. होडीत बसल्यावर
त्यांच्या लक्षात आले , त्यांच्या पायावर जळू होता ,आणि जळू पाहण्यचे भाग्य आमच्या नशिबी आले.

आमच्या यांत्रिक नावेला आणखी १ नाव जोडली ,ती त्यांच्या मुलाची होती , जी हाताने वल्व्हवावी लागायची .सूर्य डोंगरापर गेला होता , संधी प्रकाश पडला होता आणि मधोमध चालणारी आमची नाव .
Its heaven . तोच नदी किनारी पाणी प्यायला रानगवा आला होता .आम्हाला पाहताच तसाच तो मागे फिरला . अर्थात अस ( माणसांचे )मागे फिरन ,सवयीचे झाले असल्यामुळे घडलेल्या प्रसंगाचे काही वाटले नाही . नाव पुढे निघाली .पुढे
त्या मावशी मध्ये १का ठिकाणी उतरल्या.तिथे फक्त २च घर होती . ते हि जंगलात …. खरच माणसाला जगण्यासाठी किती पैसा लागतो किंवा खुश राहण्याची किमत तरी किती ???

हे प्रश्न अजून हि माझ्यासाठी अनुउत्तरीतच आहे . अंधार दाटला होता .आणि डोक्यावर दिसत होती ती चंद्रकोर . त्या चंद्रकोरीला पाहून कोणाकोणाची आठवण आली हे नका विचारू . शेवटी नाव बामानोलीच्या किनारी लागली . तिथेच चहा पिऊन आम्ही निघालो . कास → सातारा → NH4 . गाडी चालत होती . ड्रायव्हरची फालतू बडबड चालू होती .भूक पण जबरी लागली होती .एक ठिकाणी थांबून , मस्त मालवणी चिकन हाणल नि निघालो .
मधेच काय जोर आला , काय मस्ती आली त्या ड्रायव्हरच्या अंगात , गाडी पळवू लागला . २ ठिकाणी गाडी ठोकलीच होती . एकदाची गाडी पुण्यात आली , पहिल्यांदा तुषारला घरी सोडलं नि नंतर मला .माझ्या सोबत भरत पण होताच. घरी जाताच भरत झोपी गेला , मी अंघोळ करून पलंगावर पडलो होतो.

२ दिवसापूर्वी असाच ' area 51 ' ची पार्टी करून घरी आलो होतो . वेळ अशीच १२ साडे बाराची असेल . पार्टीमधला दंगा , नाच गाणे , तरीसुद्धा घरी आल्यवर १ प्रकारचा एकटेपणाच होता . सुख असते तरी काय ?
area 51 , party , दारू , पैसे कि माणस ( जी माझी नाहीत ) …
कि
वासोट्याचे जंगल , होडीतून पाहिलेला तो संधीप्रकाश किंवा ती चंद्राची कोर .
कि जंगलात पायावर जळू चढलेल्या त्या मावशी ….
मला अजून तरी ते माहित नाही , कालापरे ह्याही प्रश्नांची उत्तरे सुटतील .
पण १ मात्र खर ,आज ट्रेक वरून आल्यावर भारी वाटत होत. माझ जग म्हणजे ' area 51 ' नाही ते आहे माझ्या फोटोग्राफित , ट्रेक नि माझ्या कवितात …..

“ रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा , गुंत्यात गुंतुनी साऱ्या पाय माझा मोकळा "

by dhiraj bhandare
dhiraj.bhandare@gmail.com

  • Log in or register to post comments
  • 5377 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा