च्यायला मिपा वर चांगक्लच व्यक्तीरेखांचे पेव फुटलयं...
[ तात्यानी बत्ती लावली ... च्यायला आपण पण वाहत्या गंगेत हात धूवुन घ्यावेत, काय ?]
हा भाग एकदम मस्त झाला आहे. पुढचा भाग लवकर येऊ देत. बाकीचे म्हणल्याप्रमाणे मलाही ऊत्सुकता लागली आहे.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
धोंड्या,
सुरवात तर जबरा झाल्ये! प्रसंगानुरूप, अगदी थोडक्यात परंतु सुंदर लिहिलं आहेस!
तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला. "सतरंजी!!!!"
हे तर खासच! चित्रंच डोळ्यासमोर आलं!
कोण आहे तरी कोण हा प्राणी? लय भारी दिसतोय!
पुढील भागाची वाट पाहतोय रे धोंड्या. लवकर लिही...
अवांतर -
मी रा स्व संघात अश्या टाईपची मंडळी पाहिली आहेत. जी अगदी साधी दिसतात, संघाचं अगदी झाडू मारण्यापासून पडेल ते काम करतात, प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु वास्तवात आपल्याला कल्पनाही येणार नाही एवढी ही मंडळी उच्च्शिक्षित आणि उच्च्पदस्थ असतात! घारपुरे नांवाचा असा एक इसम माहितीतला आहे माझ्या. लिहीन त्याचाबद्दल कधितरी.
सध्या मात्र तुझ्या त्या 'प्रसाद', 'सतरंजी!!' वाल्याची ओढ लागली आहे! :)
तुझा,
तात्या.
हे असं वाचून कसं वाटलं सांगू?
लग्नाच्या कार्यालयात सकाळी-सकाळी गरमागरम उपम्याच्या डिशेस रांगेतल्या लोकांना दिल्या जात आहेत.
आम्ही आशेने वाट बघत आहोत की आत्ता येईलच, आणि आमच्या शेजारच्या माणसाला शेवटची डीश देऊन बल्लवाचार्य जाहीर करतात "पहिला घाणा संपला बरंका मंडळी, थोडा वेळ लागेल!":(
अर्थात पुढला उपमा लवकर येऊदे:)
चतुरंग
दादरच्या विठ्ठल मंदीराविषयी.
अगदी महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश देवळे जशी कायम गलिच्छ असतात तसे हे देऊळ कायम स्वच्छ असते. इथले वातावरण प्रसन्न असते. देवापुढे उभे राहिल्यावर कोणी ही पुढे चला, पुढे चला, इथे उभे राहू नका असे म्हणत नाही. हवा तितका वेळ बाप्पाशी गप्पा मारता येतात.
दुसरे चांगले म्हणजे इथली विश्वस्त मंडळी. ही मंडळी चांगल्या कामासाठी हे मंदीर, त्याचा माळा आणि त्यावरील सभागृह नि:शुल्क उपलब्ध करून देतात अगदी कितीही दिवस (अर्थात सभागृह आधीच लग्नमुंजीसाठी आरक्षित झाले नसेल तर). मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली.
ही सर्व मंडळी संघिष्ट आहेत पण एकदा तुमच्या हेतुविषयी खात्री पटली की तुम्हाला सर्वतोपरि मदत करतात. अगदी फणसासारखी, वरून रुक्ष पण आतून आपुलकी आणि प्रेम असलेली.
फारच थोड्या लोकांना माहित असेल पण २६ जुलैच्या पावसात, पाण्यात अडकलेले जवळ जवळ ५० जण ह्या विठ्ठल मंदीरात राहायला होती आणि विठ्ठल मंदीराने जेवण, अंथरूण, पांघरून वैगरे सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
धोंडोपंतांनी रेखाटलेल्या व्यक्तिविषयी किंवा त्यांच्या लेखनशैलीविषयीही दोन ओळी लिहिल्या असत्यात तर आपला प्रतिसाद बर्याचदा वाटतो तसा ठार असंबद्ध वाटला नसता! :)
मी तिथे बरेचदा संस्कृतचे वर्ग घेतले तेव्हा त्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलीच वर शेवटच्या दिवशी सर्वांना चहा, खाऊ-पाकिटे सुद्धा दिली.
अच्छा! म्हणजे तुम्ही संस्कृत विद्वान असून संस्कृतचे वर्ग चालवता हे मात्र तेवढ्यात नेमकं जाता जाता सांगून टाकलंत! :)
पण काय हो, तुम्ही एवढ्या संस्कृत विद्वान, परंतु आपण एखाद्या लेखाला ठार असंबद्ध प्रतिसाद देतो आहोत हे देखील तुम्हाला समजू नये याचं आश्चर्य वाटतं!
असो, स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करा, परंतु मिपावर जेव्हा एखादी व्यक्ति लिहिते तेव्हा त्या लेखनाला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ही अर्थातच वाचकाची मर्जी असते हे मान्य. परंतु जर प्रतिसाद दिला तर तो मूळ लेखनाविषयी त्याला/तिला नेमकं काय वाटलं, चांगलं वाटलं, ठीक वाटलं, की चांगलं वाटलं नाही, हे सांगणारा असावा!
माझ्या मते त्यामुळे लिहिणार्या व्यक्तिलाही त्याच्या लेखनाविषयी इतरांची मतं काय आहेत हे समजायला मदत होते! परंतु असंबद्ध प्रतिसादाने यापैकी काहीच साध्य होत नाही!
आपला संपूर्ण प्रतिसाद हा एक वेळ मूळ प्रतिसादानंतर 'अवांतर' या सदरात कदाचित चालला असता परंतु आपला मूळ प्रतिसादच अवांतर वाटतो आहे! :)
असो...
आपला,
(सुसंबद्ध!) तात्या.
प्रतिसाद तर देणारच होते पण दुसर्या भागात.
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत (मी लिहिलेला पोतडी हा लेख पहा, त्यात तर कर्कटक वैगरे विषयाशी संबंधित काहीच नसलेल्या प्रतिक्रिया आल्या होत्या, मी काय तेव्हा तलवार परजली नव्हती).
अर्थातच तुम्हाला वाटतो तसा मी काही संस्कृतवर्गाचा प्रसार करत नव्हते ह्याची कारणे दोन १) हे (संभाषण) वर्ग घेणे मी वेळे-अभावी केव्हाच बंद केले २) जेव्हा घेत होते तेव्हा मोफतच घेत होते त्यामुळे त्याला शाळा आणि इतर संस्थांमधून प्रसार आणि प्रचार न करता त्याला भरपूर मागणी होती आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज. एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र).
असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील. त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय?
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
दुसरे म्हणजे, अवांतर प्रतिसाद काय मिपाला नवीन नाहीत
असं मीही म्हटलेलं नाही. अवांतराला माझी व्यक्तिश: ना नाहीच आहे, माझा मुद्दा केवळ इतकाच की प्रतिसाद मूळ लेखनानुरूपही असावा!
आणि जाता जाता हे सर्व सांगायची मला काय गरज.
ते मला माहिती नाही/नव्हतं म्हणूनच विचारलं! :)
एक वेगळा लेखच लिहिला असता त्यावर (मिपा वर नव्हे इतरत्र).
इतरत्र लिहिलात तर कृपया त्याचा दुवा मिपावरही द्यावा ही विनंती म्हणजे मिपाच्या चोखंदळ वाचकांनाही तो लेख तिथे जाऊन वाचता येईल!
असो. माझी प्रतिक्रिया अगदीच अवांतर आहे असे वाटले तर धोंडोपंतानी लिहिले असते तसे / किंवा नंतर ही लिहितील.
कबूल आहे...
त्यात तुम्हाला अस्वस्थ व्हायचे कारण काय?
विशेष असं काहीच कारण नाही. परंतु आपला प्रतिसाद वाचून मात्र खूप चमत्कारिक वाटलं कारण तो प्रतिसाद अत्यंत असंबद्ध होता हे माझं मत अजूनही कायम आहे! अर्थात, आपण म्हणता त्याप्रमाणे मला अस्वस्थ व्हायचं खरंच काही कारण नव्हतं आणि आपल्या असंबद्ध प्रतिसादाला परस्पर धोंड्यानेच काय ते उत्तर दिलं असतं किंवा नसतं हेही मला मान्य आहे...
असो, माझ्यापुरता हा विषय संपला आहे...
धन्यवाद...
तात्या.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी