समरसतेची ऐशी-तैशी

समरसतेची ऐशी-तैशी
===========

--राजीव उपाध्ये

गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे.

संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो. हा बेसावधपणा मग कमकुवत बाजूला उघडं पाडतो.

कळलं च नाई

इवले इवले डोळे, खूप खूप खेळले,
दमून झोपी कधी गेले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, खेळता खेळता रडले,
रडता रडता कधी हसले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, छोटे छोटे डोळे,
मोठे कधी झाले, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, दूर निघून गेले,
कधी परत येतात, कळलं च नाई.

इवले इवले डोळे, परत फिरून आले,
नवीन इवले डोळे, सोबत कधी आले कळलं च नाई.

बघ

बघ
ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ
माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ

वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू
मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ

म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले
नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ

साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला
होते हजर परंतू कायम पटावरी बघ

वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती
आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ

करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी
मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ