३००० वर्षांचा विरह
- Read more about ३००० वर्षांचा विरह
- Log in or register to post comments
- 5889 views
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे.
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे.
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष
आमे तैयार छे, गुजरात दक्ष
पाकीस्तानातून भारतात,
बेकायदेशीर! नाही विजा,
आहे ना सोबत गडगडाट,
तेजाळ लखलखाट विजा!!
कडेकडेनेच निघून जा,
हा विनंती अर्ज
पीकपाणी नुकसान नको
फिटलं नाही कर्ज.
करु नको विस्थापीत,
नको उडवू घराचे पत्रे,
हवामान महासंचालक,
कशी वाचवावी लक्तरे?
आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा.
बोलाचा भात
बोलाची कढी
पोरीला दिली
कल्पनेतली गढी
खात्यात पैसे नसता
दिला blank cheque
भरा पोट खाऊन
फोटोतला केक
तू घे पंजाब, महाराष्ट्र
हरीयाणा आणि युवा
साडेतीन जिल्हे-ईलाही !!
खेळतोय कसा जूवा ।
या आधीचे संबंधित लिखाण
रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : https://www.misalpav.com/node/51286
पूर्वार्ध इथे.
…………………………………………..
उत्तरार्ध
पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:
१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण

बेलफळ पहिल्यांदाच पाहिलं.मोठ्या शहरात ते उन्हाळ्यात विकतही सहज मिळते.मला मात्र झाडाचा शोध लागला म्हणून मिळाल.
तर सध्या एकच बरं म्हणून एकच आणलं.टणक बाहेरच्या हिरवट केशरी रंगाच्या आवरणाला जरा चिर होती.जरा सुगंध घ्यावा वाटला.अहा,काय तो परिमळ!घरी पोहचेपर्यंत सगळ्या रस्त्याने तो मधुर गंध मनभर भरून घेत राहिले.
आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण ‘प्रभात’ वाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली.
“आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...”
१९६०.
बाबांची बदली तालुक्याच्या गावाहून शहरात झाली होती. माझी चौथी पाचवी तालुक्याला झाली होती. शहरात जायचे म्हणून आई आणि माझा मोठा भाऊ खुश होते. बाबा रेवेन्यू खात्यात असल्यामुळे तालुक्यात त्यांचा वट होता. मी भाउसाहेबाचा पोरगा म्हणून नाही म्हटले तरी माझीही चलती होती.
मोठा भाऊ माझी खूप काळजी घेत असे.
“बबड्या, तुझी मला काळजी वाटते रे.” लांब चेहरा करून दादा म्हणाला.
“का? काय झाले?” मी घाबरलो.
“काय नाय. जाउंदे. काही सांगून उपयोग नाही. मी तरी तुझी किती काळजी घेणार?” दादाने निराशेचा सूर लावला. मी खूप विचारले, जंग जंग पछाडले. दादा काही ताकास तूर लाऊ देईना.