वा स्वातीताई, अतिशय सुंदर कविता...
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३
मित्रान्नी बसायचय
प्रामाणिकपणे सांगायचं तर कविता वाचून खूप भरून आलं आणि अक्षरश: डोळ्यातनं पाणी आलं!
असो, मी या विषयावर अधिक काही लिहू शकेन असं वाटत नाही! शाळेची आठवण निघाली की मी खूप हळवा होतो! परंतु इतर सभासदांच्या आठवणी मात्र नक्कीच वाचायला आवडतील!
आपला,
(शाळाप्रेमी) तात्या.
वर्गात रसायन शास्त्राचा प्रयोग होता. क्लोरीन वायू तयार करण्यात आला. पोपटी रंग, मिरमिरीत वास इ. इ.
तास संपल्यावर सरांनी मला मदतीला बोलावून घेतले. (केवढा अभिमान वाटायचा अशा वेळी). त्यांनी इतर उपकरणं घेतली आणि मी पोपटी रंगाच्या क्लोरीनने भरलेले वायुपात्र घेतले. सर पुढे निघून गेले. (मलाही तेच हवे होते) मी जाता वायूपात्रावरील झाकण बाजूला करून तो वायू जोरात हुंगला आणि जे हाल झालेत म्हणून सांगू. कसाबसा प्रयोगशाळेत वायुपात्र नेऊन ठेवलं. वर्गात आलो. तर उलटीची भावना होऊ लागली. डोळ्यात पाणी. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मित्राने नवीन आलेल्या शिक्षकांना सागितलं. मला वर्गाबाहेरच्या बाकावर झोपवून रसायन शास्त्राच्या सरांना बोलावून आणलं. त्यांना मी खरं खरं सांगितलं (दूसरा उपायच नव्हता, मला वाटलं आता मी मरणार्) सगळ्यांची धावपळ झाली. क्लोरीन पाण्यात विरघळतो म्हणून पाणी पाजण्यात आलं तर क्लोरीन हा 'जड' वायू असल्यामुळे शिर्षासन करायला सांगा असा उपायही कोणी तरी सुचवला. (नशिबाने तेवढा दूर्धर प्रसंग आला नाही) मोकळ्या हवेत पडून राहिल्यावर किंचित बरं वाटू लागलं. त्यामुळे त्या बाकड्यावर अर्धा-पाऊण तास अंडर ऑब्झर्व्हेशन झोपवून ठेवल्यावर मी उठून बसलो. आणि रसायन शास्त्राच्या सरांच्या चेहर्यावरील ताण दूर झाला.
नंतरचा तास गणिताचा होता त्यामुळे तो बुडविण्यासाठी मी 'नाटक' केलं असा माझ्या काही दुष्ट मित्रांनी (?) प्रचार केला. आता सायन्सच्या उपकरणांना हात लावण्याची आपल्याला मिळणारी मुभा जाणार आणि वर्गात भाव खाता येणार नाही असे मला वाटले परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही. लाज वाचली.
अगदी असाच प्रसंग दहावीत असताना माझ्यावर ओढवला होता. बाईनी वर्गात टेस्ट ट्यूबमध्ये क्लोरीन वायू तयार केला होता आणि त्याचे गुणधर्म सांगत होत्या. त्यात त्या म्हणाल्या हा पोपटी रंगाचा वायू असतो. मला त्यात टेस्ट ट्यूबमध्ये पोपटी रंग खरंच दिसत नव्हता म्हणून मी म्हणालो, "ह्यात कुठे आहे क्लोरीन वायू ?" त्यावर बाईनी जवळ बोलवून नळी हुंगायला दिली आणि त्यानंतर जो काही घसा सुकला, नाका-डोळ्यांतून पाणी यायला लागले, खोकला येऊ लागला, त्याला काही अंतच नव्हता. अनेक वेगवेगळे उपाय झाले, शेवटी कोणीतरी सुक्या खोबर्याचा तुकडा खायला दिला. घशाची ती खवखव काही दिवसानीच गेली. कित्येक किस्से आहेत, सवडीने सांगत राहीन. चागला विषय दिल्याबद्दल आभार.
हा एक छान धागा सुरु केलाय स्वाती यानी :)
मी पहिलीत होतो तेव्हाची गोष्ट.
मधली सुट्टी झाली होती. डबा खाल्ला. आणि पुर्ण वॉटर बॅग भरुन पाणी प्यायलो खेळता खेळता मी आणि माझ्या एका वर्गातलयाच मुलाने.
सुट्टी संपत आली आणि मग माझ्या लक्षात आल की अरे आपण "सु" करायला गेलोच नाही. तोवर सुट्टी संपल्याची घंटा वाजली आणि मला जोरात
"सु सु" आली.
आमच्या बाई बाहेर येवुन चला मुलानो वर्गात चला अस म्हणत होत्या (नुसती घंटा ऐकुन पहिलीतली मुल थोडीच वर्गात पळतात लग्गेच. ती अजुन खेळण्याच्याच मुड मध्ये असतात.) आणि मी तिकडे सु करत होतो बराच वेळ :) (मनात भिती बाई आल्या आहेत बोलवायला आणि इकडे तर जोराची "सु सु" )
वर ही कामगिरी घरी जावुन आईला सांगितली होती. :)
आता आठवल तरी खुप हसु येतय.
ओफ्फ तासाला एखद वेळेस शिक्शक वर्गावर वेळेत आले नहित कि आम्हि सगळे रान्ग करून हातात दप्तर घेउन वर्गाबाहेर पडायचो....आणि तसेच सरळ शाळेच्या मेन गेट मधुन रान्गेत बाहेर जायचो..थेट घरि...
रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही.
विजुभाऊ
विजुभाऊ...च्यामारी, एकदम खल्लास आयडिया ! एकदम आवडली.
आमचे उद्योग (टवाळक्या):
१.ऑफ तासाला जमेल तेव्हढ॑ अन् जमेल त्या शिक्षका॑च्या नकला करण॑
२.तळमजल्यावर आमचा वर्ग असताना तब्बल ३ महिन्या॑च्या परिश्रमा॑न॑तर "हॅक-सॉ" ब्लेडने खिडकीचा गज कापण्यात आलेल॑ यश, आणि तो गज हळूच काढून वर्गातून पळून जाणे. (लवकर घरी जायच॑ असेल तर इतर वर्गातली मुल॑पण आमच्याकडे यायची आणि आमचा एक गृहपाठ करून देण्याच्या बोलीवर हा "खुष्कीचा मार्ग" वापरायची)
३.बे॑चच्या फटीत ब्लेड अडकवून "चावणार्या" गुर्जी॑च्या तासाला ते वाजवण॑ (केल्याशिवाय कळायच॑ नाही देवा, काय मजा येते)
४. स्वच्छतागृहात कोपर्यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! )
५. प्राण्या॑ना घाबरणार्या शिक्षका॑च्या तासाला त्या॑च्या टेबलावर सरडा / सापसुरळी / मा॑जराचे पिल्लू / वर्गात नेमबाजीच्या स्पर्धेत कर्कटक फेकून मारलेली पाल इ.इ. आणून ठेवणे.
६.मारकुटे मास्तर टेबलावर जिथे नेहमी हात ठेऊन शिकवतात तिथे अगदी "वस्त्रगाळ" खाजखुयलीची पूड टाकणे..
हुश्श.. एव्हढ्यावरच था॑बतो नाहीतर मिपावाले मला हाकलून देतील 'असल॑ नतद्रष्ट कार्ट इथे नको' म्हणून :)
(हे प्रकार अत्य॑त निष्णात टवाळा॑नी केले असून त्यामागे कित्येक वर्षा॑ची मेहनत असते. कृपया अनुकरण करण्याच्या फ॑दात पडू नये, होणार्या परिणामा॑स आम्ही जबाबदार नाही.)
आपला 'णम्र'
- टवाळ ध मा ल.
काळा गेंडा, सिलिंडर, पिक्या आम्हाला होते..
आम्हाला ३ वर्षे मराठी शिकवायला बुट्टी लेडी (श्री. वा.) होते. पण जोक्स अपार्ट अतिशय सुरेख शिक्षक होते ते.. त्यांच्यामुळेच माझं मराठी वाचन वाढलं.
संस्कृत ला चंबू .(खरं नाव विसरलो.. बहुतेक कुलकर्णी) होत्या.
आणि मुख्याध्यापक "कि. भा. बळी" (ज्याचा लाँग फॉर्म .. किड* भाड** बळी असा होता.)
कुठली बॅच तुझी?
मी १९९२ ला १०वी पास आउट.
नंतर मी विमलाबाई गरवारे शाळेत गेलो. १० वी पास मी १९९९ साली झालो. बळी सराना मी पाचवीला असताना ज्यु. कॉलेजच्या मुलांनी शाळेत बेदम मारुन मुतारीत नेऊन टाकले होते. ६ वी च्या वेळेला शाळेत गोसावी सर होते मुख्याध्यापक.
पुण्याचे पेशवे
म्हणजे आमच्या नंतरची पिढी फारच पुढे गेली होती तर.. आम्ही फक्त त्यांना प्रयोगशाळेत कोंडलं होतं ;-( (सभ्य ठिकाणी लिहितो आहे म्हणून "ते त्यांना" असं म्हणतो आहे.. नाहीतर.. किड* भाड** बळ्याच..)
बाय द वे, मी असं ऐकलं होतं कि तो आधी बारामती च्या शाळेत होता तिथल्या पोरांनी त्याला झाडावरून खाली टाकला होता.
आम्हाला पण होता बारामतीमध्ये.
एक्या तुझी माहिती बरोबर आहे. एक न॑बरच॑ खत्रुड होत॑ बेण॑....मग लै मारला त्याला.
मी वैयक्तिकरित्या देखील त्याला जबरा छळला होता.
मला ९वीत असताना कॉपी केली म्हणून पकडल॑..आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही!
त्या॑च॑ आणि आमच्या तिर्थरुपा॑च॑ एकदम कॅपिटल ३६...मग काय, आम्ही केला त्याचाच इश्यू...जे बो॑ब ठोकली,
मी वैयक्तिक द्वेषाचा बळी....होपलेस आहे बळी!!! पोर॑ पार पेटवली...
वर घरी जाऊन आबा॑ना सा॑गितल॑ (तिखट-मीठ लाऊन) आबा डायरेक्ट खू॑खार झाले...दुसर्या दिवशी शाळेत आबा॑नी बळ्याला जे झाडला, स॑स्थेच्या अध्यक्षा॑कडेच चाललो आत्ताच्या आत्ता म्हणाले.... बळ्या गारगार!!!!!!
पुढ॑ वर्षभर मला काहीच बोलला नाही. पण ईतरा॑ना फार त्रास द्यायचा.
असो, समद्वेषी भेटल्याचा आन॑द झाला.
आपला
-म.ए.सो.चा सह अध्यायी
ध मा ल.
"आता जरा इकड॑ तिकड॑ करण॑ म्हणजे काय कॉपी झाली का बॉ? पण नाही!..."
हॅ ही काय कॉपी झाली.. कॉपी क्वालिफिकेशन साठी कमीतकमी पुस्तकाच पान सापडलं पाहिजे..
मला वाटलचं होतं तू म. ए. सो. चाच निघणार..
मुख्याध्यापक (विमलाबाई गरवारे)
मला ते मुख्याध्यापक नक्की कोण हे नीटसे आठवत नाही. परन्तु भाषणाच्या वेळेला त्यान्चे एक ठरलेले वाक्य आठवते " माझ्या चिमण्या फुलपाखरानो" ह्या वाक्य शिवाय त्यान्चे भषण पुर्ण होतच न्हवते. हे वाक्य येताच ८, ९, १० ची मुल ईतकी हसायची कि बस्स्स्स.... , फुलपाखरु ह्या शब्दावरुन लगेचच मागुन मुलान्ची कुजबुज सुरु व्हायची. कुणाला आठ्वत असेल तर अजुन गमती सान्गा.
रान्ग अस्ल्यामुले कोणि कोठे जाताय असे कधिहि विचारले नाहि. कोणाल तशी शन्का ही कधि आली नाही.
आयला, मला हि आयडीया सॉल्लिड आवडली. निदान त्या साठीतरी परत शाळेत जाऊन बसायला आवडेल!
शाळेत आमचा Outstanding Performance होता. कारण ८ पैकी किमान ३-४ तास तरी आम्ही वर्गाबाहेर Standing Out असायचो.
आठवी नववीत तर शिक्शक फळ्यावरती लिहित असताना पाठीमागून कुणाचाही आवाज आला तरी जास्ती चौकशी न करता आम्हा ठरावीक ३-४ मुलाना नियमीतपणे वर्गाबाहेर काढीत असत. नन्तर नन्तर तर आम्हाला वर्गाबाहेर जायची इतकी सवय झालेली की, शिक्शकानी "कोण आवाज करतय?" अस नुसत विचारला तरिही आम्ही ३-४ जण चुप-चाप मान खाली घालून वर्गाबाहेर जाऊन उभे रहात असू. :)
-ओम फट स्वाहा
तात्या विन्चू
आमचा ग्रूप आणि दुसर्या वर्गातील अजून मैत्रिणी अशा १५-२० जणी मिळून आम्ही शाळा सुटल्यावर बास्केटबॉलच्या ग्राउंडवर विषामृत किंवा जोडीसाखळी खेळत असू.
असेच एकदा आम्ही ग्राउंडवर जमलो. पण दुसर्या वर्गातल्या मैत्रिणी काही आल्या नाहीत. त्यांच्या इंग्रजीच्या (करकरे) बाई एक्स्ट्रॉ तास घेत होत्या. (करकरे बाई एकदम कडक. एंग्रजीतला "t" जर "+" असा काढला तर १/२ मार्क कट! )
तर आमची हरहुन्नरी जया त्या वर्गाच्या खिडकीवर उभी राहून आमच्या त्या वर्गातल्या मैत्रिणींना हळूचकन हाक मारायला लागली. आणि ते करकरे बाईंनी पाहिलं!
झालं! जयाला बाईंनी वर्गात बोलावलं आणि काय करत होतीस विचारलं. जयानी सांगितलं घाबरत घाबरत ही मी अमूक अमूकला बाहेर बोलावत होते.
बाकीच्या मुली फिदीफिदी हसत होत्या म्हणून बाईंना आणखीनच राग आला. जयाच्या तोंडावर मात्र १२ वाजले होते. बाईंनी जयाला तास होईपर्यंत वर्गात भिंतीकडे तोंड करून उभे केले. तास होईपर्यंत जयाचा रुमाल पूर्ण ओला झाला होता.
तेव्हा जयाची टरकली होती. पण नंतर आम्ही हा प्रसंग आठवून खूप हसत असू. तेव्हा पण जयाचा चेहेरा बघण्यासारखा होई.
(जयाच्या आठवणीत रमलेली) मनस्वी, १०वी ब
४. स्वच्छतागृहात कोपर्यात उदबत्तीच्या खालच्या टोकाला फटाका (शक्यतो सुतळीबॉ॑ब) गु॑डाळून ती उदबत्ती पेटवून ठेवणे. (लय भारी बार निघतो म्हाराजा...समदी शाळा गोळा व्हतीय, काय झाल॑ म्हणून...पण जर का सापडला तर....! )
याला आम्ही टाईम बॉम्ब म्हणत असू.
पुण्याचे पेशवे
फळ्याला तेल लावून ठेवले आणि वर्तमानपत्राच्या तुकड्यांनी पुसून घेतले.
मग काय 'चकचकीत' फळ्यावर खडू उमटेना आणि वर्गात आमची हसू दाबता-दाबता भंबेरी, पार डोळ्यातून पाण्याच्या धारा!
मास्तर वैतागले, एका घरभेद्याने नावे सांगितली - उलट्या मुठीवर डस्टरने जाम मार पडला (साला, काय त्यावेळी मारायचे ना? आता पोरांना मास्तरही हात लावत नाही आणि आई-बापही नाही, सगळी मजा संपली!;)
'सूर्याजी पिसाळ' कोण हे समजताच त्याची आम्ही सर्वांनी अशी धुलाई केली की बास!
यथासावकाश फळ्याला नवीन काळा रंग द्यावा लागला.
--------------------------------------------------------------
बोअर तासाला डस्टर गायब करणे हा तर आमचा नित्याचा प्रकार असे. मग मास्तर किंवा बाई डस्टर शोधायला लागल्या की आपण तयारीत -
"अरे, कोणीतरी कॉमनरुम मधून डस्टर घेऊन या रे", हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत आम्ही वर्गाबाहेर - कारण चक्क तासाला वर्गाबाहेर पडून शाळेत भटकायला मिळण्याची मजा काही औरच. मग इतर वर्गापाशी उभे राहून खिडकीतून कोणाला तरी उचकव त्याला बोलणी बसायला लागली की तिथून पळून जा, असे करत करत निम्मा तास संपल्यावर आम्ही वर्गात डस्टर घेऊन हजर. तो पर्यंत वर्गातच लपवलेले आधीचे डस्टर सापडलेले नसले तर मग हातानेच थोडा फळा पुसून शिकवणे चालू झालेले असे. मग मानभावी पणाने स्वतः पुढे होऊन उरलेला फळा वैगेरे स्वच्छ करुन देणार! (बोलणी खायला नकोत!)
--------------------------------------------------------------
पहिली ते चौथी आम्ही ज्या शाळेत होतो तिथे वर्गात बसण्याची व्यवस्था म्हणजे जाड मोठ्याच्यामोठ्या सतरंज्या असत.
अगदी १२ फूट बाय १२ फूट वैगेरे असतील. मधल्या सुट्टीतला आमचा एक खेळ म्हणजे रोज कोणातरी एका-दोघांना सतरंजीत गुंडाळणे व कोपर्यात नेऊन त्यावर इतर सर्वांनी ढीग रचणे. तो झाला की मग दुसरा.
आता ते आठवून असे वाटते की कोणाचेही हातपाय मोडणे, मूल गुदमरणे वैगेरे प्रकार तेव्हा झाले कसे नाहीत? आणि आम्हाला हे करु नका अन् ते करु नका असंही कोणी सांगितले नाही!
-------------------------------------------------------------
तेव्हाचीच आणखी एक मजा म्हणजे लाकडी पट्यांची मारामारी.
आमच्या शाळेत फळ्यावर खडूने रेघा मारण्यासाठी चार्-साडेचार फुटी लाकडी पट्ट्या ठेवलेल्या असत. दोन वर्गांच्या मधे दुमडले जाणारे लाकडी पार्टिशन होते. सुट्टीच्या आधीच्या तासाला आमची पट्ट्यांची जमवाजमवी सुरु असे आणी वर्गाच्या मागे जाऊन बसणे. पलीकडच्या वर्गात हेच सुरु असे. सुट्टी झाली रे झाली आणि शिक्षक बाहेर पडले की पार्टिशन ढकलून "हर, हर, महादेव" असे ओरडत एकमेकांच्या आंगावर पट्ट्या घेऊन आम्ही तुटून पडत असू. जाम दे दणादण मारामारी. कित्येक वेळा हातावर-बोटांवर फटके बसून सूज येई. पण आम्ही कोणी एकमेकांविरुध्द तक्रारी वैगेरे केलेल्या आठवत नाहीत. शिवाय शाळा सुटली की पुन्हा गळ्यात गळे घालून रमतगमत घरी. ते सगळं तेवढ्यापुरतं असे.
-------------------------------------------------------------
चतुरंग
आमच्या शाळेत फळ्याला तेल वगैरे लावण्यापेक्षा आईने डोक्यावर थापलेले तेल पोरं फळ्यावर डोके घासून उतरवत. मग शाळेने हिरव्या रंगचे काचेचे फळे आणले. मग मुले त्यावर ओल्या खडूने लिहून ठेवत. ओल्या खडूने लिहिले की ते पुसायला मास्तरना फार कष्ट पडत. तासाची पहिली ५-१० मिनीटे तशीच निघून जात. :) :)
पुण्याचे पेशवे
पण त्यामधे डोक्याला खडूची भुकटी लागून पोरं पिठाच्या गिरणीतून आल्यासारखी दिसत आणि चावटपणा पकडला जाई - त्यामुळे ही नवीन शक्कल लढवावी लागली! :) (आपल्या कामात सतत सुधारणा करा! - हा आजचा कॉर्पोरेट मूलमंत्र आम्ही किती पूर्वीच अमलात आणला होता पहा! द्रष्टेच आम्ही!!::))
चतुरंग
मी १०वी ला होते तेव्हाची गोष्ट .वर्गात शेवटचा तास अर्थशास्त्राचा होता. आमचे सर पहिले ३० मि. वाचून दाखवायचे आणि म्हणायचे आता तुम्ही वाचा.म्हणजे पहिल्या बाकावरच्या मुलाने उठून वाचायला सुरवात करायची. प्रत्येकाने १० ओळी वाचायच्या असे करत करत शेवटपर्यंत वाचायचे.
तो पर्यंत हे सर समोरच्या टेबलावर हाताची घडी करून मस्त घोरत असायचे.
एक दिवस एक मुलगा वाचत होता. बहुतेक त्याचा आवाज मोठा होता त्यामुळे कि काय? एकदम सर जागे झाले आणि त्याच्या मुस्काटात मारली.
त्याला ५ मिनिटे कळलेच नाही ......का मारले?
बहुतेक सरांची झोपमोड झाली असेल असा आम्ही तर्क लढवत घरी गेलो.
अहो आम्ही सहावीत असताना आम्हाला मराठीचे एक मास्तर होते - आडनाव काळे बहुधा - शिकवायचे खूप छान.
पण त्यांची एक खोड होती - कोणाचीही पाठ दिसली की ते जोरात धपका घालायचे - कारण माहीत नाही.
त्यामुळे ते बेंचेस मधल्या रांगेतून मागे मागे जाऊ लागले की बेंचवर पुढे झुकून लिहिणारी वाअचणारी सर्व मुले मागे मागे वळत अंग ताठ करून बसत जेणेकरुन त्यांना पाठ दिसू नये!
त्यामुळे पाच मिनिटेच काय पण सहावीचे संपूर्ण वर्ष आम्हाले ते का मारत होते ते कळलं नाही!!
चतुरंग
एकदा आमच्या वर्गात कोणीतरी एक शोध लावला. चिंचोका खूप वेळ घासला की खूप गरम होतो. मग काय.... आयडिया तयार. आमच्या एक बाई होत्या. अतिविशाल महिला मंडळाच्या सभासद. त्यांच्यावर हा प्रयोग करायचा कट शिजला. आमच्या वर्गातून बाहेर जायला जो रस्ता होता, तो एक बाक एक्स्ट्रा टाकल्यामुळे जरा अडला गेला होता. तिथे हल्ला (ambush) करायचे ठरले. आणि ह्या कटात सगळा वर्ग सामिल झाला होता... (शिष्ट मुली सुद्धा). दरवाज्या जवळ जे २-३ बाक होते तिथली मुलं १५-२० मिनिटे तो चिंचोका घासत बसली होती. तास संपल्याची बेल झाली... बाई बाहेर जायला निघाल्या... त्या अरूंद जागी त्या थोड्या अडकत असत. तिथे १०-१२ मुलं आणि मुली त्यांच्या भोवती घोळका करून त्यांना काहीतरी विचारायला लागले. आणि..... त्या गर्दीत तो छान गरम झालेला चिंचोका कोणितरी बाईंच्या हाताला लावला.
मग काय मंडळी... पुढे जे काही घडले त्याची आठवण आजही ताजी आहे. वर्गात सगळयांना आमच्या हेडमास्तरांनी मोजून १०-१० छड्या मारल्या होत्या.
बिपिन.
कोंबडा करणे, अंगठे धरणे, खुर्ची करणे अशा काही सजा आम्हाला शाळेत असताना होत असत. कधी कधी वैयक्तिक कारणासाठी आणि काही काही वेळेला सार्वजनिक कारणासाठी. एकावेळेला एकापेक्षा अधिक मुले अंगठे धरुन उभी असतील किंवा कोंबडा करुन उभी असतीत
तर एकमेकांना पार्श्वभागाने धक्के मारुन पाडायचा खेळ आम्ही मनमुराद खेळत असू. :)
एकदा तर एका ढिगार्याने इतका जोरात धक्का मारला की बास ओळीने अंगठे धरुन उभे असलेले ५-७ पडले. बाईंना कळले की शिक्षा करुनही मुले काही दंगा करायची बंद झाली नाहीत. :):) मग सर्वाना मैदानावर अंगठे धरुन उभे केले होते. पण काय एन्जॉय केला तो दिवस आम्ही. :)
स्टीलची फूटपट्टी बाकाच्या फटीत घालून वाजवण्याची मजा तर काही औरच. किंवा बाकाच्या वही ठेवायच्या फळीच्या खालच्या फळीवर डोके ठेऊन झोपायची मजा देखील काही औरच. :)
पुण्याचे पेशवे
गाडगीळ सरांच्या किंवा पाचकुडवे सरांच्या शिक्षा सांग! :)
माईकवरून यथेच्छ शिव्या न काय काय..
हे आमचे (विमलाबाई गरवारेचे) गाडगीळ सर कायम धोतर न सदरा या वेशात असत.. आणि अतिशय कडक आणि फाटक्या तोंडाचे..
पण, एकदा बँडच्या प्रॅक्टीसला रविवारी बोलवलं होतं, तेव्हा ते चक्क जिन्स न टीशर्ट घालून आले होते!! :) आम्ही इतके हसलो होतो!!
बर्याच गमती जमती आहेत...
आम्ही तर गाडगीळ सराना शर्ट आणि पँट मधे पण पाहीले आहे. आणि तेव्हा पण आम्ही फार हसलो होतो.
आणि ते जर कोणाला ओरडत असतील तर त्यांच्या आवडत्या शिव्या म्हणजे "बेवकूफ आहेस, मुसलमान आहेस" :):)
तसेच आमच्या शाळेत शनिवारी शाळा भरायच्या आधी सभा (सर्वानी ग्राऊंडवर येऊन प्रार्थना म्हणायची) असायची . तेव्हा तर फार मजा यायची. गाडगीळ सर पुढे चौथर्यावर उभे राहून कोण कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवायचे आणि नंतर एकेकाचा पुढे बोलावून सत्कार करायचे.
आमच्या शाळेतले पाचकुडवे सर रोज पितात अशी एक वदंता होती. आणि शनिवारी(इतर वेळेला शाळा दुपारी असे) सकाळी त्यांचे तारवटलेले डोळे बघून ते खरे पण वाटे. :) त्यांचे एक प्रसिध्द वाक्य "बेंच खाली घालून तुडवील".
भूगोलाच्या कानडे सराना आम्ही 'गावठी बच्चन' म्हणत असू. ते दहावीला आम्हाला शिकवताना नेहेमी म्हणत असत की "मला बाहेर हाच विषय शिकवला तर तासाला १००० रु. मिळतील पण तुम्हाला शिकवायला म्हणून मी इकडे येतो."(किती थोर ते उपकार आमच्यावर!)
पुण्याचे पेशवे
ते कानडे सर आणि भुगोल? आम्हाला ते ९वी ला मराठी ला होते. तसेही त्यांना काय येत होतं म्हणून ठेवले होते देवालाच माहीत. माझे सगळ्यात नावडते शिक्षक..
पाचकुडवे मला कधीच नव्हते, पण मोठ्या भावाकडून खूप किस्से ऐकले आहेत त्यांचे.
सिरसीकर नावाच्या बाई इंग्लिश शिकवायच्या, खूप छान शिकवायच्या. पण कायम "ठीकेकीनै" असं वाक्य दर ५-१० वाक्यांनंतर ! :)) आमचं ते मोजण्याकडेच जास्त लक्ष.. !
८वी ला सेमी ईंग्लिश सुरू झाले तेव्हा सायन्स शिकवायला लोखंडे मॅडम होत्या.. ( त्या आमच्या शाळेतल्या सगळया मुलांच्या अगदी "आवडत्या" मॅडम होत्या! :) ) त्यांचि शिकवण्याची पद्धत म्हणजे, आम्ही धड्यातले अवघड शब्द लिहून आणायचे, अर्थ न स्पेलींग सकट.. आणि नंतर तो धडा त्या वाचून दाखवणार! एकदा सगळ्यांनी लिहून आणले होते, पण मी एक पण लिहीला नव्हता.. मॅडमनी मला अगदी चिडून पुढे बोलवलं.. आणि म्हणाल्या सगळे शब्द येतायत का तुला.. ? सांग बरं, मिस्लेनिअस चा अर्थ आणि स्पेलिंग.. :) आणि मला तेव्हा जमलं होतं.. बाई म्हणाल्या बर बर ठिक आहे. जा जागेवर! मी एकदम भाव खात जागेवर येऊन बसले होते मग.. :D
( तेव्हा माझे बरे दिवस होते बहुतेक.. कारण त्या सहामाही का तिमाही ला सायन्स मधे मी पहीली आले होते! आयुष्यात मिळालेला पहीला न शेवटचा पहीला नंबर.. नंतर मी अभ्यास करणं सोडलं.. ) :D
आमच्या शाळेत संध्याकाळी शाळा सुटल्यावर रोज प्रार्थना, पसायदान्,ओंकार्,विविध भाषेतील गाणी म्हणणे(उदा. मल्याळी,संस्कृत! ई..) असा कार्यक्रम व्हायचा. असं कुठल्या शाळेत होते की नाही माहीत नाही.. खूप मजा यायची.. खूप टीपी पण चालायचा आमचा.. मल्याळी वगैरे गाणी म्हणण्यामागचा उद्देश मला अजुन कळला नाहीय.. इजगान साठी यल्ल रे, ओ यम्मानिकु.. असं काहीतरी असंबद्ध गाणं होते ते! :) संस्कृत मात्र मस्त होतें.. कृत्वा नवदृढ संकल्पम, वितरन्तो नवसंदेशम वगैरे..
सर्वात शेवटी वंदे मातरम.. ते म्हणताना खूप छान वाटायचे .. शहारे यायचे इतक्या सगळ्या जणांच्या तोंडून ते ऐकताना.. !!
असो.. जरा जास्तच भरकटले.. पण काय मस्त विषय आहे हा.. सगळं जुनं आठवलं !! धन्यवाद हा विषय चालू केल्याबद्दल.. :)
काय सांगू, किती प्रेमाने मारायच्या हो त्या!
मी तर ८वी ला असताना माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कधीच अभ्यास करत नसे म्हणून रोज रोज मार खायचो लोखंडे बाईंचा.
आणि स्पेलिंगसकट अर्थ तर मी कधीच लिहून आणले नव्हते. म्हणून तर रोज मार खायचो. :) :)
इंग्रजीच्या राजलक्ष्मी पाटील बाई तर साक्षात कडकलक्ष्मी होत्या. मी २-३ वेळा सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे १०वी ला त्यानी आमच्या वर्गशिक्षिका झाल्यावर मला पहील्या बाकावर बसवले होते. :(
पुण्याचे पेशवे
गाडगीळ सर पाचकुड्वे सर कानडे सर कडक्लक्ष्मी बाई ..... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. अजुन एक माझ्या आठ्वनितिल किस्सा, त्या वेळी मुलिना हस्तकलेचा तास असायचा गोल रिन्ग मधे कापड अडकवुन त्या वर रेशमी धाग्याने वेग वेगळे टाके घालणे आणि ते बरोबर जमलेत की नाही हे बाईना नेउन दाखवायचे असायचे. ज्या ज्या मुलीन्चे काम पुर्ण व्ह्यायचे त्या बाईन जवळ घोळ्का करुन उभ्या रहायच्या. मि हि एकदा त्या घोळ्क्यात नेमकी बाइच्या ( बहुदा जोशी नाव असाव) जवळ उभी होते, एका हातात रिन्ग धरलेली आणि दुस-या हातात सुई-धागा. कुणीतरी मागुन हळुच धक्का मारला त्याच क्षणि हातात धरलेली सुई बाईन्च्या दन्डाला टोचली..... मला हे समजताच घोळक्याचा फायदा घेउन मि पटकन मागे झाले. बाईना सुई जोरात टोचली होती. त्यानी आमच्या बाजुला वळुन बघे पर्यन्त मी मागे झाले होते. त्या मुळे नेमकी कोणाची सुई टोचली ते काही कळाले नाही. माझी सुटका तर झाली होती. पण त्या दिवसानन्तर बाई एक एक करुन आम्हाला पुढ बोलवु लागल्या.
कानडे सरान्चा तर आम्हा खुप मुलिना राग अजुनही आहे. कारण.. वर्गात शिकवताना काही आचरट मुलिन्चि शिक्क्षा विनाकारन आम्हाला हि मिळली होती, ती साधि-सुधि शिक्षा नव्हती. चार मुलीन बरोबर आमच्या पुर्ण ओळिला सरानी नापास करण्याची शिक्षा केली. आम्हि ते मजा म्हणुन त्या कडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा प्रगती पुस्तक हातात आले तेव्हा निकाल बघुन धक्का बसला, माझ्या बरोबर त्या ओळितिल सर्व मुली पण नापस झाल्या होत्या. ती माझी पहीली आणि शेवटची शिक्षा होती.
जबरी आहेत एकेक किस्से. :)
हा एक किस्सा अगदीच शाळेतला नाही पण मी कॉलेजात असताना पहिल्याच वर्षीचा.
दिवाळीच्या सुट्टी नंतर कॉलेज सुरु झाले होते नुकतेच.
एक लेक्चर ऑफ होत. मग बरेच पोर पोरी टवाळक्या करायला गेले होते.
वर्गात २-४ पोर उरले होते. त्यात मी एक सज्जन (अजुन कालेजच वार लागल नव्हत हो)
आणि २-३ टारगट पोर आणि २-४ सज्जन आणि शिष्ट मुली.
तर माज म्हणा वळवळणारा किडा म्हणा किंवा अजुन काही म्हणा.
एका पोराने एक सुतळी बाँब वर्गात लावला. आणि तो तिथुन बाहेर पडुन रिकाम्या पॅसेज मध्ये जावुन उभा राहिला.
अर्थात हे वर्गात सगळ्याच उपस्थितानी पाहिले. एक मोठ्ठा आवाज मग काय बरेच जण येवुन पाहु लागले काय झाल म्हणुन.
मग कॉलेजचा एक शिपाई आला. त्याने पाहिले तर त्याला अवशेषांवरुन तर कळालेच की कोणीतरी वर्गात फटाका फोडला.
त्याने येवुन आधी मला विचारले मी बोललो माहित नाही. मी आताच आलो वर्गात.
मग तो मुलींकडे वळाला. तर त्यानी उत्तर दिले की मुलांनी लावले.
तो शिपाई गेला आणि आमच्या वर्गाच रजिस्टर घेवुन आला १० मिनटानी आणि म्हणाला ह्यात "मुलानी" ह्या आडनावाचा कोणीच नाहिये की. :)
असल फिस्स्कन हसु आल होत मला ते ऐकुन.
बाकी काही म्हणा.
बाकीच्या कालेजापेक्षा इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :)
इन्जिनियरिंग मधल्या पोरा पोरींची डोस्की जरा हटेलेच असतात. :)
का हो? तुमच्या त्या महामुर्ख शिपायाने त्याचा मुर्खपणा दाखवला तर पोरींची डोकी हटेलेच असतात होय? आणि तुम्हाला विचारले कुणी फटाका उडवला तर सांगताना तुमची फॅ फॅ झाली म्हणून दोष मुलिंना देताय होय..तेव्हा कुठं गेली तुमची मर्दानगी? मुलिंची डोकी तुम्हाला हटेली वाटतात म्हणजे तुम्ही जरा मतीमंदच वाटताय! जरा डोळे उघडून त्याच मुलींनी केलेली प्रगती पहा!
माफ करा इतके दिवस इथे पाहिलेच नाही मी.
मी फक्त मुलींची डोस्की हटेली असतात अस नाही लिहिलेल.
पोरा पोरींची अस लिहिलय ते वाचा.
आणि माझी फॅ फॅ उडली हे कशावरुन लिहिताय तुम्ही????/
माझ्याच वर्गातील मुलांची नाव मी का म्हणुन सांगेन??????
म्हणुन मी माहित नाही अस सांगितल होत अस लिहिलय मी.
तुम्ही काहितरी एकांगी अर्थ घेवुन मला मतिमंद म्हणताय अस वाटल म्हणुन हे उत्तर लिहिलय मी.
या उप्पर माझ्यावर काही आरोप केले तरी मी उत्तर लिहिनच अस नाही.
मराठी मेडियमच्या पोराच्या आठवणी वाचून वाटतंय, आपून सारे एकाच वर्गात होतो की काय ? :)
गणिताच्या मास्तराने पावकीचा पाढा म्हणायला लावल्यावर ( सिलॅबसला नव्हता ) सांगता आला नाही, म्हणुन ठोकुन काढल्यावर,घरचा राग माझ्यावर काढला रे !!! या अविर्भावात दात काढणारे आम्ही !!! तेव्हापासून गणित आयुष्यातून जे निघून गेले ते आतापर्यंत....!!!
दिलीप बिरुटे
नाकात शिल्लक काही राहिले तर नाही ना !!! सतत चाचपून पाहणारा :)
वर्ग ६ वी,तुकडी 'अ '
आम्ही सातवीत असताना मधल्या सुट्टीत क्रिकेट मॅच साठी घरी पळून गेलो आणखी एका मित्राबरोबर.... त्यच्याकडे छान मॅच पाहिली, दिवस्भर धमाल केली...घरी आलो, मला वाटत होते की शाळेत काही कळणार नाही...दुसर्या दिवशी सकाळी क्लासटीचर बाईंनी उभे केले , आणि माझ्याबरोबरच पळालेल्या मित्राने आजारी होतो अशी पालकांची चिठी आणली ( आमच्या काळात डॉक्टर सर्टिफिकेट वगैरे लागत नसे)....मी अवाक्, खरंतर पकडले गेल्यावर काय योजना आखायची हे आमचे आदल्या दिवशी मुळीच ठरले नव्हते, पण त्याने शिताफीने चिठी आणली आणि वाचला...आणि मी छड्या काय खाल्ल्या, अंगठे धरून एक तास वर्गाबाहेर काय उभा राहिलो, मी अगदी शिक्षकांच्या जाण्या येण्याच्या वाटेत उभा होतो तोंड लपवत्..प्रत्येक शिक्षक येऊन विचारत असे, " का रे, आज ही वेळ आली का तुझ्यावर?"..मग सगळ्यांना नाईलाजाने सगळी गोष्ट सांगायला लागत असे...आत जाऊन मित्राला खूप शिव्या घातल्या, "चिठीचं मला का नाही सांगितलस? "म्हणत...( तो मित्र बर्याच वर्षांनी भेटला, त्याला ही आठवण होती... खूप हसलो )
( एकट्यापेक्षा समूहशिक्षा एंजॉय करणारा)स. भडकमकर
संस्कृतला तांबे सर होते. त्यांना अण्णा म्हटले की भडकायचे. आठवीत वर्ग तळमजल्याला होता. कांही मुले त्यांच्या तासाला शाळेबाहेर जाऊन बाहेरच्या बाजूने खिडकीत येत व अण्णाअसे ओरडून पळून जात. खिडकीतील मुलगा मार खाई.
का॑दळकर शेठ, आमच्या शाळेत पण एक कुलकर्णी सर होते, त्या॑ना अण्णा म्हणाल॑ की भय॑कर राग यायचा..
मुल॑ असली भारी, ते शिकवत असले की "अण्णा" अशी जोरात हाक मारायचे आणि अण्णा पेटले की "कोणितरी खिडकीरून ओरडून पळाला" अस॑ आम्ही सा॑गायचो, त्या "कोणितरी" ला शोधण्यात उरलेला सगळा तास भुर्रर्र... :)
१०त असताना शाळेतल्या रात्र-अभ्यास वर्गाला गेलो होतो...च्यामारी एकदाच गेलो आणि कानाला खडा लावला.
कोणितरी मेन-स्विच ब॑द केला आणि त्यादिवशी (रात्री) कुलकर्णी सर होते, अ॑धार झाल्यावर पोरा॑नी शाळेच्या मधल्या चौकात येऊन अण्णा च्या नावाने जो काय हैदोस घातला..अगगगग !!! अण्णा॑नी दोन हातात दोन छड्या घेऊनअ॑धारातच मुरारबाजीच्या आवेशात जी काही तलवारबाजी केली...पार सगळी कार्टी फोडून काढली....त्यात जोडीला आई-माईवरून शिव्या...आपलीतर जाम टरकली..परत म्हणून गेलो नाही रात्र-अभ्यासवर्गाला.
शाळेत असताना धमाल यायची,शाळा सुट्ल्यावर बाहेर येताना पुढच्याला ढकलायचे आनी मग माग्च्याला 'का ढकललस?' म्हणुन ओरडायचे मग पुढचा आपल्याला काहि म्हनत नाही,आनी मागच्याशीच भांडायला लागायचा त्यातच भर म्हनुन जीन्यामधे पुढच्याच्या दप्तराची बटने खोलुन टाकायची मग पुस्तक खाली यायला लागली की पुस्तक भरोस्तोवर जीन्यात ट्राफीक जाम,कधी कधी सॅक चे जे माघे लोंबनारे बेल्ट असतात ते दोघांचे गुपचुप बांघुन टाकायचे मग ते सोडवन्यात अशी धांदल उडायची त्या मुलांची,आम्ही आपली ही सारी काम करुन पटकन पुढे निघुन जायचो एकदा वर्गामध्ये नवीन सर आले होते,नवीन अस्ल्यामुळे ते थोडेशे घाबरलेले आम्ही प्लास्टीकची कॅरी बॅग फुगवुन ती फोडायचो 'फट्!' असा आवाज यायचा पन सरांना कळायचेच नाही की आवाज कुठुन येतो ते,१५ दिवस खूप् त्रास दिला त्याना,गृहपाठ केला नसेल की वही नेहमी घरी असायची(आपन ऐवढे हुश्शार सगळ डोक्यात राहत मग वहीत कशाला लिहायचे असा माझा समज)घरी पाठवलच तर जायचे आनी मस्त तास संपल्यावर परत,सरांनी विचारलच तर घरी कुलुप आहे अशी थाप मारायची.खुप मस्ती केली शाळेत असताना
मुल॑ असली भारी, ते शिकवत असले की "अण्णा" अशी जोरात हाक मारायचे आणि अण्णा पेटले की "कोणितरी खिडकीरून ओरडून पळाला" अस॑ आम्ही सा॑गायचो, त्या "कोणितरी" ला शोधण्यात उरलेला सगळा तास भुर्रर्र... :)
१०त असताना शाळेतल्या रात्र-अभ्यास वर्गाला गेलो होतो...च्यामारी एकदाच गेलो आणि कानाला खडा लावला.
कोणितरी मेन-स्विच ब॑द केला आणि त्यादिवशी (रात्री) कुलकर्णी सर होते, अ॑धार झाल्यावर पोरा॑नी शाळेच्या मधल्या चौकात येऊन अण्णा च्या नावाने जो काय हैदोस घातला..अगगगग !!! अण्णा॑नी दोन हातात दोन छड्या घेऊनअ॑धारातच मुरारबाजीच्या आवेशात जी काही तलवारबाजी केली...पार सगळी कार्टी फोडून काढली....त्यात जोडीला आई-माईवरून शिव्या...आपलीतर जाम टरकली..परत म्हणून गेलो नाही रात्र-अभ्यासवर्गाला.
शाळेत असताना धमाल यायची,शाळा सुट्ल्यावर बाहेर येताना पुढच्याला ढकलायचे आनी मग माग्च्याला
'का ढकललस?' म्हणुन ओरडायचे मग पुढचा आपल्याला काहि म्हनत नाही,आनी मागच्याशीच भांडायला लागायचा
त्यातच भर म्हनुन जीन्यामधे पुढच्याच्या दप्तराची बटने खोलुन टाकायची मग पुस्तक खाली यायला
लागली की पुस्तक भरोस्तोवर जीन्यात ट्राफीक जाम,कधी कधी सॅक चे जे माघे लोंबनारे बेल्ट असतात ते
दोघांचे गुपचुप बांघुन टाकायचे मग ते सोडवन्यात अशी धांदल उडायची त्या मुलांची,आम्ही आपली ही सारी
काम करुन पटकन पुढे निघुन जायचो
एकदा वर्गामध्ये नवीन सर आले होते,नवीन अस्ल्यामुळे ते थोडेशे घाबरलेले आम्ही प्लास्टीकची कॅरी बॅग फुगवुन
ती फोडायचो 'फट्!' असा आवाज यायचा पन सरांना कळायचेच नाही की आवाज कुठुन येतो ते,१५ दिवस खूप्
त्रास दिला त्याना,गृहपाठ केला नसेल की वही नेहमी घरी असायची(आपन ऐवढे हुश्शार सगळ डोक्यात राहत मग वहीत
कशाला लिहायचे असा माझा समज)घरी पाठवलच तर जायचे आनी मस्त तास संपल्यावर परत,सरांनी विचारलच तर
घरी कुलुप आहे अशी थाप मारायची.खुप मस्ती केली शाळेत असताना