Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिठाचे काय आहे!

श
शशिधर केळकर
Mon, 01/19/2009 - 18:53
🗣 16 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5411 views

🗣 चर्चा (16)
प
प्राजु Mon, 01/19/2009 - 19:40 नवीन
एकदा श्रीकृष्णाला सगळ्या त्याच्या (१०८) बायका विचारतात की , " आम्ही तुम्हाला जशा वाटतो ते सांगा." श्रीकृष्ण सांगत जातो.. "अमुक.. बुंदिच्या लाडवासारखी गोड, अमुक.. बासुंदीसारखी.. अमुक.. केशराच्या रंगासारखी.." असं तो सगळ्यांविषयी काहीबाही सांगतो. रूक्मिणीची वेळ येते तेव्हा तिला म्हणतो ,"तू मला मिठासारखी आहेस". ती रूसते. "सगळ्यांबद्दल छान छान सांगितलं आणि मी मिठासारखी .." असं म्हणून निघून जाते. दुसरे दिवशी श्रीकृष्ण भटार खान्यातल्या स्वयंपाक्याला सांगतो की, कोणत्याही पदार्थात मीठ नको घालू. आणि ते जेवण तयार झालं की रूक्मिणीला चव बघण्यासाठी दे.. स्वयंपाकी तसं करतो. रूक्मिणी चिडते, "एकाही पदार्थात मीठ नाहिये.. कसला हा स्वयंपाक केलाय? " असं म्हणत त्याला शिक्षा देऊ लागतो इतक्यात कृष्ण येतो आणि म्हणतो.."आता तू माझ्यासाठी मिठासारखी आहेस.. या वाक्याचा अर्थ तुला समजला असेल." रूक्मिणी वरमते. अशी ही साताजन्माची कहाणी आठव्या जन्मी सुफळ संपूर्ण.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सोनम Mon, 01/19/2009 - 19:51 नवीन
मिठाचे सर्वसाधारणपणे योग्य असे काही प्रमाण असते हे जरी खरे, तरी काही लोकाना फार मीठ लागते. तर काहीना फार कमी मीठ पुरते. तसे मला मीठ कमीच लागते.जेवताना कधी ही वरुन मीठ टाकत नाही. अपवाद जर एखाद्या पदार्थात अजिबात मीठ टाकले नसेल तर मीठ घेणे जरुरीचे असते.काही जण तर तसेच मीठ खातात्.काय प्रत्येकाची आवड निराळी. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ Tue, 01/20/2009 - 05:07 नवीन
छान लिहिले आहेस, मीठ योग्य पाहिजे हे तर खरेच. यावरून आठवले, माझ्या एका मैत्रीणीने एकदा काहीतरी मटणाचा पदार्थ बनवला होता , आम्ही कॉलेजमधे असताना, त्यात मीठ जास्त झाले होते. तिच्या आईने मला सांगितले, आज हिने " मीठ ए मीट" बनवले आहे म्हणून. पण बाकी वर्णनावरून, तुमच्या कुटुंबात तुमच्यातल्या मीठाचे प्रमाण किती सुयोग्य होते ते दिसते आहे, नाही का ?
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/20/2009 - 05:18 नवीन
मिठाचे काय आहे तर एक कथा होउ शकते किंवा लेख किंवा पाकृ......किंवा सर्वकाही मस्त....
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/20/2009 - 06:44 नवीन
एक छोटासाच विषय पण मस्त फुलवला आहे! एकाद्या पदार्थात मीट जास्त झाले असेल तर त्यात एक शिजवलेला बटाटा घालावा. बटाटा मीठ शोषून घेतो. काही हॉटेलात पदार्थात मीठ घालतच नाहीत किंवा अगदीच कमी घालतात. वरून मीठ घालण्याची सोय ग्राहकांना असतेच! महाराष्ट्रातील काही भागात मीठाला "गोड" असा शब्द आहे, तो किती सार्थ आहे, हे अळणी प्रदार्थ खाल्यावरच समजते!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
रम्या Tue, 01/20/2009 - 10:00 नवीन
माझी कोल्हापूरची म्हातारी आत्ती मीठ पाहिजे हे विचारताना "साखर पाहिजे का" असंच विचारते ! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 01/20/2009 - 11:31 नवीन
केळकर साहेब, एक साधा छोटासा विषय घेऊन तो मस्त फुलवला आहे. लेखनात सहजता आहे, बोजडपणा अजिबात नाहिये. माझ्याबद्दल बोलायचं तर, मला मीठ जरा जास्तच लागतं. आपण 'मीठ भाकरी' असा शब्दप्रयोग वापरतो. पण माझ्या बाबतीत ते शब्दशः खरे आहे. जेवणात नुसती गरम भाकरी / पोळी फक्त मीठाबरोबर खाऊ शकतो आणि आवडतं पण. लहानपणी तर मी येताजाता चिमूटभर मीठ खात असे. घरी मिठाच्या बाबतीत नेहमी मारामारी असते कारण बाबांना मीठ अगदी कमी लागते. आणि मी, माझी आई वगैरे म्हणजे निव्वळ लवणासुर, त्या मुळे जेवतानाचा हा एक चिरंतन वाद विषय आहे. आपल्याकडे 'नावडतीचे मीठ सुद्धा अळणी' अशी एक म्हण पण आहेच. असेच नियमितपणे लिहित जा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/20/2009 - 14:44 नवीन
केळकर साहेब, एक साधा छोटासा विषय घेऊन तो मस्त फुलवला आहे. लेखनात सहजता आहे, बोजडपणा अजिबात नाहिये. असेच नियमितपणे लिहित जा.
सहमत. लेख छान आहे. -- लिखाळ. माझी अनुदिनी खरेतर मला दर्जेदार लेखक व्हायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो :).
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 01/20/2009 - 11:44 नवीन
वा! छोट्याश्या बाबींवर अतिशय सुंदर आणि वेधक लेख लिहला आहे. हे कमी -अधिक 'कळणे'म्हणजेच विवेक! ते स्वयंपाकातच नव्हे तर आयुष्यालाही लागू होते! - विटेकर. आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Tue, 01/20/2009 - 11:49 नवीन
मस्त जमलाय लेख.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 01/20/2009 - 14:36 नवीन
मिठा बद्दल ..... मिठ समुद्राच्या पाण्या पासुन बनते. जिथे बनते तिथे त्याला मिठागर असे म्हणतात मिठात काळे मिठ व पांढरे मीठ असा भेद भाव आहे. गांधिंना मिठ तयार करायला आवडत असे.. त्या साठि त्यांनि सत्याग्रह केला. आम्हि टाटा नमक खातो.. व हमने इस देशका नमक खाया है..असे गर्वाने म्हणतो. माझि आत्या "अन्नपुर्णा नमक" वापरते. त्या मुळे तिच्या २ हि मुलि कलेक्टर झाल्या आहेत. जय हिंद अविनाश
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 01/20/2009 - 15:20 नवीन
अतिशय आवडले!
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 01/24/2009 - 11:26 नवीन
अरे काय मस्त लेख जमलाय.. अभिनंदन केळकर तुमचं... कि "तुझं " म्हणायचंरे?
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 01/24/2009 - 20:14 नवीन
'मीठ चवीपुरतं', 'नमक स्वादानुसार', 'सॉल्ट टू टेस्ट' म्हणजेच 'मीठाचे' नाते 'चवीशी' घट्ट आहे. खिचडीत मीठ जास्त झाले तर खिचडीत किंचित आंबट दही घालावे. कमी झाले असेल तर तेलाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला लसूण तांबूस रंगावर तळून त्यात तिखट आणि पुरेसे मीठ घालून ते खिचडीवर घ्यावे. मीठाची उणीव तर दूर होतेच लज्जतही वाढते. फारच कोरड्या (विशेषतः तळलेल्या. उदा. भजी, कटलेट) पदार्थांवर चाट मसाला भुरभुरावा. (असे पदार्थ तळण्याआधी किंचित चाखून मीठ जुळवून घेणे जास्त सोयिस्कर.) रसदार पदार्थात मीठ कमी झाले तर नंतर वाढवता येते. जास्त झाले तर त्यात 'कच्चा' बटाटा घालून शिजवून, पदार्थ जरा थंड करून खावा. शक्य असेल तर उकडलेल्या बटाट्याची पेस्ट करून मिसळावी. माशाच्या आमटीत नारळाचे दाट दूध वापरता येते. चिकन, मटण रस्सा खारट झाला तर त्यातही दही फेटून मिसळावे. मीठ चुकून जास्त पडले तर पदार्थ शिजताना त्यात कोळसा टाकावा. पदार्थ शिजला की थोड्यावेळाने तो कोळसा काढून टाकावा. कोळसा मीठ शोषून घेतो असं ऐकले आहे. कधी प्रयोग करून बघितला नाही. रश्यात मीठ किंचीत जास्त झाले असेल तर बिन मिठाच्या भाताबरोबर तो पदार्थ खावा. काही करता येण्यासारखे नसेल, तरीही पदार्थ फेकू नये. भिकार्‍याला वाढावा. त्याच्या जवळच्या इतर अन्नात मिसळून तो खाऊ शकतो. उन्हातान्हात फिरल्याने त्याला मिठाची गरजही जास्त असते. अन्न हे पूर्ण ब्रह्म ! उदर भरण नोहे जाणीजे 'यज्ञकर्म'.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/27/2009 - 18:07 नवीन
उत्तम.. या मिठावरच्या लेखातला चव वाढवणारा प्रतिसाद :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 01/27/2009 - 16:50 नवीन
की अरे म्हणायचं? - हा काय प्रश्न आहे? अर्थात अरे म्हणायचं!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा